* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YODDHA SHASTRADNYA RASHTRAPATI A. P. J. ABDUL KALAM
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664072
  • Edition : 16
  • Publishing Year : SEPTEMBER 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 68
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN DR. KALAM WAS ELECTED AS THE PRESIDENT OF INDIA, WE INDIANS WERE IMMENSELY PROUD. A SCIENTIST FAMOUS WORLDWIDE WAS GOING TO BE THE PRESIDENT NOW. THE MERE THOUGHT WAS MESMERIZING. AFTER THE GREAT PHILOSOPHER DR. SARVAPALLI RADHAKRISHNAN; DR. KALAM WAS GOING TO CHAIR THE PRESIDENTSHIP. OUR POLITICAL LEADERS HAD GIVEN US A WONDERFUL GIFT, A PLEASANT SURPRISE. DR. KALAM CHAIRED THE POST FOR ONE YEAR. THROUGHOUT HIS TENURE HE MAINTAINED A SIMPLE LIVING AND HIGH THINKING. HIS WORKING WAS DEVOID OF POMP AND SHOW. HE SOUGHT DISCIPLINE IN EVERYTHING HE PRACTISED. HE ALWAYS SOUGHT A BRIGHT FUTURE FOR INDEPENDENT INDIA. TO FULFILL HIS DREAM HE WOULD ALWAYS ENCOURAGE THE YOUTH AND STUDENTS OF INDIA. TO ACCOMPLISH THIS MISSION, HE ENTHUSIASTICALLY TRAVELLED THROUGHOUT INDIA AND REACHED ALL THE NICHES AND CORNERS. DURING EACH OF HIS PROGRAMS HE SPECIFICALLY RESERVED SOME TIME SLOT ESPECIALLY FOR THE YOUTH AND SCHOOL CHILDREN. AT TIMES, HE DID NOT HESITATE TO KEEP THE POLITICAL DECORUM AT BAY. HIS PERSONALITY WAS A HARMONIOUS COMBINATION OF SCIENTIFIC AND PHILOSOPHICAL MIND INTERWOVEN WITH PRIDE FOR INDIA. HE WAS EXTREMELY AWARE OF THE CURRENT SCENARIO. AN IN DEPTH STUDY OF HIS BIOGRAPHY WILL SURELY HELP THE YOUTH OF INDIA. ONE CAN INCULCATE AS MANY GOOD QUALITIES FROM IT AS POSSIBLE. HE HAD SEEN A DREAM; HE HAD DEVELOPED A VISION TO WHICH WE ALL CAN CONTRIBUTE. THIS BOOKS AIMS AT THAT.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतिपदासाठी निवड करण्यात आली आणि सारा देश कधी नव्हे इतका हरखून गेला. एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ, संशोधक देशाच्या सर्वोच्च पदावर बसणार ही कल्पनाच एका परीने अद्भुतरम्य होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारख्या एका थोर तत्त्वज्ञानंतर - डॉ. कलाम राष्ट्रपतीपद भूषवणार होते. राजकीय नेतृत्वाने भारतीयांना दिलेला तो एक अनपेक्षित आणि तरीही सुखद असा धक्काच होता. आपल्या एका वर्षाच्या कारकिर्दीत डॉ. कलाम यांनी त्या पदाची शान वाढवली होती. कसलाही डामडौल, दिमाख न दाखवता, ते स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आहेत, त्यांच्या पूर्तीसाठी ते तरुणांना, विद्याथ्र्यांना अगदी मनोमन प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी ते सा-या देशभर मोठ्या उत्साहाने संचार करत आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते खास तरुणांसाठी, शाळकरी मुलांसाठी आवर्जून वेळ काढत आहेत. प्रसंगी राजनैतिक शिष्टाचार गुंडाळून ठेवत आहेत. डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वात शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व स्वदेशाभिमान यांचा सुरेख संगम आढळतो. त्यामागचे कारण एकच आहे. ते म्हणजे, त्यांनी सांप्रतच्या परिस्थितीचे ठेवलेले अचूक भान, शास्त्र काट्यावर तोलून घेतलेले आहे. देशातील समस्त तरुण-तरुणींनी त्यांच्या चरित्राचा लक्षपूर्वक वेध घेण्याची गरज आहे. त्यावरून जेवढा बोध घेता येईल, तेवढा जरूर घ्यावा. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नपूर्तीतील आपले योगदान निश्चित करावे. हेच या पुस्तकाचे प्रयोजन आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #माधवमोर्डेकर # MADHAVMORDEKAR #योद्धाशास्त्रज्ञ : राष्ट्रपतीए.पी.जे. अब्दुलकलाम #YODDHASHASTRADNYARASHTRAPATI A. P. J. ABDUL KALAM
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 07-12-2003

    भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २५ जुलै २००२ रोजी शपथ घेतली, तेव्हा या सर्वोच्च पदावर आरूढ होणारी राजकीय क्षेत्राबाहेरची दुसरी व्यक्ती अशी नोंद इतिहासात झाली. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् या थोर तत्वज्ञाची या पदीनिवड झाली होती. डॉ. कलाम हे मुळातले एक योद्धा शास्त्रज्ञ. ‘सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते’ हे सूत्र मनाशी बाळगून त्यांनी भारताला संरक्षणदृष्ट्या समर्थ करण्याचे स्वप्न उरी बाळगले. १९८२ ते १९९२ या अवघ्या दहा वर्षांत ‘एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेणास्त्र विकसन योजना’ पूर्ण केली आणि त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, नाग आणि आकाश या पंचास्त्रांचा उदय झाला. देशाचा सर्वोच्च नेता बनलेल्या या थोर शास्त्रज्ञाच्या आयुष्याचा, विचारसरणीचा जुजबी परिचय सर्वसामान्यांना व्हावा म्हणून माधव मोर्डेकर यांनी लिहिलेले त्यांचे छोटेखानी चरित्र रोचक व लहानथोरांसाठी उपयुक्त आहे. डॉ. कलाम यांचा जीवनपट थोडक्यात विशद करतानाच त्यांच्या उत्तुंग कार्याचा सुरेख आढावाही घेतल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे. योद्धा शास्त्रज्ञ राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 07-12-2003

    रोचक परिचय... भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २५ जुलै २००२ रोजी शपथ घेती, तेव्हा या सर्वोच्य पदावर आरूढ होणारी राजकीय क्षेत्राबाहेरची दुसरी व्यक्ती अशी नोंद इतिहासात झाली. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् या थोर त्वज्ञाची या पदी निवड झाली होती. डॉ. कलाम हे मुळातले एक योद्धा शास्त्रज्ञ. ‘सामर्थ्य सामर्थ्यांचा आदर करते’ हे सूत्र मनाशी बाळगून त्यांनी भारताला संरक्षणदृष्ट्या समर्थ करण्याचे स्वप्न उरी बाळगले. १९८२ ते १९९२ या अवघ्या दहा वर्षांत ‘एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकसन योजना’ पूर्ण केली आणि त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, नाग आणि आकाश या पंचास्त्रांचा उदय झाला. देशाचा सर्वोच्च नेता बनलेल्या या थोर शास्त्रज्ञानाच्या आयुष्याचा, विचारसरणींचा जुजबी परिचय सर्वसामान्यांना व्हावा म्हणून माधव मोर्डेकर यांनी लिहिलेले त्यांचे छोटेखानी चरित्र रोचक व लहानथोरांसाठी उपयुक्त आहे. डॉ. कलाम यांचा जीवनपट थोडक्यात विशद करतानाच त्यांच्या उत्तुंग कार्याचा सुरेख आढावाही घेतल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 28-09-2003

    असामान्य कर्तृत्वाचा छोटेखानी आढावा... ‘अशी सृजनशील साहसे हवी आहेत की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील... भारताचे भविष्य घडविणाऱ्या अशा सृजनशील साहसांपैकीच एक नाव म्हणजे डॉ. ए. पी. अब्दुल कलाम भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए. पी. अब्दुल कलाम यांची निवड झाली. यापूर्वी ते एक जगद् विख्यात शास्त्रज्ञ म्हणून लोकांना परिचित होते. एक साधं परंतु बुद्धिमान व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची भारतीयांवर छाप आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा वेध माधव मोर्डेकर यांनी ‘योद्धा शास्त्रज्ञ राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या पुस्तकाद्वारे घेतली आहे. तामीळनाडू राज्यातील रामेश्वरम् या लहानशा गावात जन्मलेल्या डॉ. कलामांनी एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ म्हणून कशी झेप घेतली याची आढावा लेखकाने या पुस्तकातून घेतला आहे. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म, बालपण व शिक्षण कसे व कुठे झाले याबद्दल सुरुवातीला संरक्षण लेखकाने माहिती दिली आहे. डॉ. कलामांचा मूळ पिंडच संशोधकाचा. संरक्षण खात्यात त्यांच्याकडे ‘डार्ट’ या युद्धात वापरायच्या विमानाचा आराखडा सोपवला. पुढे डॉ. विक्रम साराभाई यांच्या रुपाने कलामांना एक परिपूर्ण विज्ञानसंशोधक लाभला. डॉ. साराभार्इंच्या आश्वांसक छायेखाली त्यांच्यातील शास्त्रज्ञाची प्रगती झाली. थुंबा येथील अवकाशतळाच्या कार्यालयाची जबाबदारी, नासामध्ये प्रशिक्षणाची संधी, नाईके-अपाची भारताची पहिल्या वहिल्या अंतराळयानाच्या जुळवा-जुळवीत कमालांचा सहभाग, साऊंड रॉकेटस् आणि लाँचिंग रॉकेट्स, पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग व अग्नी या क्षेपणास्त्र निर्मितीपर्यंतचा अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीचा आलेख लेखकाने शब्दबद्ध केला आहे. या वाटचालीत त्यांच्यावरील आघात आणि आजवर त्यांना मिळालेले मानसन्मानाबद्दलही लेखक लिहितो. डॉ. कलामांनी संशोधन हा व्यवसाय बनू दिला नाही. संशोधन हा त्यांचा ध्यास, ध्येय, धर्म बनलं. भारताचे राष्ट्रपतीपद हे कलामांच्या कारकिर्दीतील मानाचा मुकुट म्हणावा लागेल. डॉ. अब्दुल कलामांकडे पाहिले की जाणवते ‘या पंखांना क्षितीज नाही.’ त्यांच्या कार्यकतृत्वाची कमान नेहमीच चढती राहील. डॉ. कलामांच्या असामान्य कतृत्वाचा छोटेखानी पुस्ताकात घेतलेला आढावा सिमित वाटला तरी लेखकाने जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 05-10-2003

    हिंदुस्थानचे विद्यमान राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे छोटेखानी चरित्र माधव मोर्डेकर यांनी लिहिले आहे. डॉ. कलाम हे नामवंत शास्त्रज्ञ असून संशोधकाचा होत. संरक्षण खात्यात त्यांना विमानाचा आराखडा तयार करण्याचे काम मिळाले. यानंतरच्या कामगिरीचा तयांच्याविषयी लोकांत खूप कुतूहल आहे. रामेश्वरम येथे संपन्न कुटुंबात जन्मलेल्या डॉ. कलाम यांना घरची फार मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसूनही शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्याबरोबरच त्यांच्यावर कुटुंबात उत्तम संस्कार झाले. त्यांचा मूळ पिंड आलेख सतत चढताच राहिला. तरुण पिढीने त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा घ्यावी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more