* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEN OF STEEL
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980288
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GENERALLY, IT IS THE BUSINESS JOURNALIST WHO WRITES THE AUTOGRAPHY OF THE BUSINESSMAN. THESE JOURNALISTS GENERALLY END UP ASKING THE PROPORTION OF THE EXPENDITURE AND PROFIT, OR THEIR YEARLY TURNOVER. VERY RARELY, THE TRUE BUSINESSMAN IS REVEALED THROUGH THESE FIGURES. I INTERVIEWED THESE BUSINESS LEADERS AS I WOULD INTERVIEW ANY POLITICIAN, ANY ACTOR, ANY AUTHOR OR ANY SUCH PERSON. SURPRISINGLY, IT WAS VERY EASY TO MAKE THEM TALK, THE FORMAT WHICH I HAD SELECTED PROVED TO BE VERY PERFECT. YOU WILL HARDLY COME ACROSS THE FIGURES IN TERMS OF FINANCE OR LOSS AND PROFIT OR ANY SUCH THING RELATED TO FINANCE. MOSTLY, THESE INTERVIEWS REFLECT THE TRUE PERSONALITIES THAT THESE PEOPLE ARE. -VEER YES, I HAVE BEEN VERY RICH THROUGHOUT MY LIFE. I WAS BORN AS A RICH. BUT I CANNOT EVER FORGET THOSE 10 YEARS IN AMERICA. I WAS SURVIVING ONLY ON THE ALLOWANCE PROVIDED BY THE RESERVE BANK, NEEDLESS TO SAY THAT IT WAS ALWAYS VERY INSUFFICIENT. TO MAKE BOTH THE ENDS MEET, I HAD TO ACCEPT JOBS AS WASHING AND CLEANING THE PLATES AND DISHES IN HOTEL, ANYTHING THAT WOULD HELP ME TO KEEP MYSELF ALIVE. SUCH JOBS MAKE YOU FORGET HOW RICH YOUR FAMILY IS. -RATAN TATA. TO WHOM SHOULD WE GIVE THE CREDIT OF OUR SUCCESS? ACTUALLY, IT DOES NOT GO TO THE MAN POWER OR MACHINE POWER. TODAY, AT THIS STAGE I REALIZE THAT IT GOES TO THE IMAGINATION POWER. TODAY, I HAVE ALSO COME TO THE CONCLUSION THAT MY IDEAS HAVE IMPRESSED THOSE WHO HAVE NOT BEEN IN MY DIRECT CONTACT. NATURALLY, THIS GIVES ME IMMENSE HAPPINESS. -NANDAN NILEKANI.
"उद्योगपतींचे चरित्रलेख साधारणत: बिझनेस-पत्रकारच लिहितात. ते त्यांना किंमत व मिळकतीच्या गुणोत्तरांसंबंधी प्रश्न विचारतात, त्यांच्या समूहाच्या वार्षिक उलाढालीविषयी चर्चा करतात... यांतून, आकड्यांच्या जंजाळातून खराखुरा माणूस क्वचितच प्रकटतो... मी या बिझनेस नेतृत्वांची मुलाखत, इतर कुणाही व्यक्तीची – म्हणजे राजकारणी, चित्रपट तारा, लेखक किंवा इतर कुणी – जशी घेतली असती, त्याच पद्धतीनं घेतली. या उद्योगपतींना बोलतं करणं आश्चर्यकारक सोपं गेलं... या लेखांच्या मांडणीचं मी निवडलेलं स्वरूप यशस्वी ठरलं. या चरित्रलेखांत आकडेवारी, नफा-तोटा, किंमत-मिळकत यासंबंधी फारसं आढळणार नाही; तर या लोकांविषयी व त्यांचं नशीब घडवणाऱ्या परिस्थितीविषयी अधिक वाचायला मिळेल." – वीर संघवी ``होय, मी खूप श्रीमंतीत वाढलो आहे... पण मी अमेरिकेतली ती दहा वर्षं विसरू शकत नाही. मी तिथं रिझर्व बँकेच्या भत्त्यावर जगत होतो, ते पैसे कधीच पुरेसे नसत. त्यामुळं मला जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी बश्या विसळण्यासह सगळ्या प्रकारची कामं करावी लागायची. अशा प्रकारच्या गोष्टींमुळं तुमचं कुटुंब श्रीमंत आहे ही गोष्ट झटकन विसरली जाते.`` – रतन टाटा ``आम्ही आमच्या यशाचं श्रेय कशाला द्यायचं? ते श्रमशक्तीला व यंत्रसामग्रीला नसून कल्पनांना आहे आणि आता मला असं जाणवतं की, माझ्या कल्पना मला कधी न भेटलेल्या माणसांवरसुद्धा प्रभाव टाकत आहेत. मला या गोष्टीचा आनंद होणार नाही का? – नंदन निलेकणी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #सुप्रिया वकील #VIRSANHAVI #NAVBHARTACHESHILPKAR #नवभारताचे शिल्पकार (MEN OF STEEL चा अनुवाद) #SUPRIYA VAKIL #
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT 27-07-2010

    आत्मभान जागवणारी ग्रंथसंपदा… आयुष्यात काही तरी करुन दाखवण्याची प्रेरणा देणारे आणखी एक दर्जेदार पुस्तक म्हणजे ’नवभारताचे शिल्पकार’. हे पुस्तक म्हणजे ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांनी भारतीय उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या नेतृत्वांशी केलेली दिलखुलास बातचीतआहे. एक मुलाखतकार आणि मुत्सद्दी लेखक महणून वीर संघवी सर्वांनाच परिचित आहेत. त्यांनी प्रश्नांची गुगली टाकत अनेकांना बोलते केले आणि गोंधळवून टाकले पण, उद्योगक्षेत्रातील काही मातब्बरांच्या यशोगाथा पडताळून पाहताना ते स्वत:च चकीत झाले, त्यातूनच नवभारताच्या ११ रत्नांचा परिचय करुन देण्याचे त्यांच्या मनाने धाटले, हे अकराजण म्हणजे नंदन निलेकणी, कुमार मंगलम बिर्ला, सुनील मित्तल, राजीव चंद्रशेखर, अझीम प्रेमजी, सुभाष चंद्रा, बिक्की ओबेरॉय, नसली वाडिया, उदय कोटक, विजय मल्ल्या आणि रतन टाटा. या सर्वांच्या जडणघडणीची कुतूहलजनक गाथा वीर संघवी यांनी मांडली असून त्याचा नेटका अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. संघवी यांनी वर्णन केलेली या अकराजणांची टीम आपल्याला उद्योगजगतातील अनेक बारकावे उलगडून दाखवतेच पण विविध क्षेत्रातील संधींचा फायदा कसा घेतला गेला हे पडताळून दाखवले. भारतीय उद्योगक्षेत्र आणि त्यातील जिद्दीची कहाणी जुळून समजून घ्यायची तर या पुस्तकाला पर्याय नाही. ...Read more

  • Rating StarNAVPRABHA 20-07-2009

    दर्जेदार पुस्तकांची मेजवानी… उत्तम आणि सकस साहित्य वाचायला मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र प्रादेशिक भाषांमधून अनेक चांगल्या पुस्तकांचे अनुवाद होत नाहीत. ही त्रुटी दूर करण्यासाठी तसेच दिग्गज उद्योगपतींची जडणघडण सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्ासाठी मेहता प्रकाशनतर्फे नवीन चार दर्जेदार अनुवादित पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. माणूस अनेकदा आत्मशोधाच्या प्रतिक्षेत असतो. या शोधात त्याला अनेक प्रश्न पडतात. आपण यशस्वी होऊ ना, यशाचे सूत्र गवसेल का नाही असे प्रश्न त्याला पडतात. त्यामुळे वेळ येते ती आत्मपरीक्षणाची. ते करताना आजूबाजूला विविध क्षेत्रातील मातब्बरांची मातब्बरी पहायला मिळते. ही माणसं मोठी कशी झाली आणि त्यांनी पाहता पाहता आकाशाला गवसणी कशी घातली हे तपासून पाहताना आश्चर्य वाटतं. म्हणूनच अशा विलक्षण उमेद लाभलेल्या व्यक्तिमत्त्वाची जीवनगाथा पडताळून पाहण्याची संधी मिळाली की गमवावीशी वाटत नाही. ‘मेहता प्रकाशन’तर्फे अलीकडेच अशी चार पुस्तके बाजारात आणण्यात आली आहेत. धीरूभाईझम, प्रतिकूलतेवर मात, नवभारताचे शिल्पकार आणि ईट हॅपन्ड इन इंडिया या चार पुस्तकांनी प्रत्येक सामान्य माणसाची जिगर जागवल्यास नवल नाही. धीरूभाईझम आणि प्रतिकूलतेवर मात या ए. जी कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांमधून धीरूभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्त्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाणी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरूभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटावर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरूभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरूभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरूभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ‘प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास-एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य? - ते काय असतं? विशालहृदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरूभार्इंचे नेमकं व्यक्तिमत्त्व उलगडतं. धीरूभार्इंनी म्हटलं होतं, ‘आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं,’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठराविक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. दोन्ही पुस्तके सुमारे ७० पानांची असून त्यांची किंमत अनुक्रमे ८० आणि ७० रुपये अशी आहे. ‘मेहता प्रकाशन’च्याच ‘इट हॅपन्ड इन इंडिया’ या पुस्तकाने अशीच एक जिगरबाज कहाणी मांडली आहे. भारतातील किरकोळ विक्री क्षेत्राचा पसारा गेल्या पाच वर्षात वाढला. या काळात हृदयात धडकी भरवणारे टोलेजंग मॉल्स धडाधड उभे राहिले आणि त्यांचे करोडोंचे अर्थकारण समजून घेता घेता सामान्यजनच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गजही हबवूâन गेले. मॉल्सच्या वाढत्या पसाNयात बिग बझार, सेंट्रल, पेंटॅलून्स, फूड बझार यांच्या शृंखलांनी अनेकांचे डोळे दिपवले. या सर्व उद्योगांचे प्रमुख म्हणून किशोर बियाणी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय उद्योगजगतात विशेष नाव कमावणाऱ्या बियाणींची सध्या ‘इट हॅपन्ड इन इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या निमित्ताने चांगली चर्चा होत आहे. वस्तूत: नामांकित उद्योजकांना बियाणींचा किरकोळ विक्री क्षेत्रात धडाक्याने उतरण्याचा उपक्रम म्हणजे एक पोरखेळ वाटला होता. चाकोरीबद्ध व्यवस्थापकांना त्यांच्या तार्विâक विचारप्रणालीनं गोंधळात टाकलं होतं. त्यांच्या बेपर्वाई बघून सहकारी काळजीत पडले होते. असे असताना बियाणी मात्र आपल्या तत्त्वानुसार पुढे जात राहिले. भरभराट अनुभवणाऱ्या भारतीय बाजारपेठेद्वारे मिळणाऱ्या विविध गुप्त संधींचा उपयोग त्यांनी करून घेतला आणि भारतीय किरकोळ विक्रीक्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. प्रचंड जाहिरातबाजी करून आणि विक्रीच्या नवनवीन क्ऌप्त्या लढवून बियाणींनी बाजारपेठेतली हलचल कायम ठेवली. त्यामुळे आज त्यांच्या नावापेक्षा विक्री कल्पनांची विशेष चर्चा आढळते. ‘इट हॅपन्ड इन इंडिया’ या पुस्तकातून त्यांची कहाणी टप्प्याटप्प्याने उलगडून दाखवली आहे. व्यवसायाच्या भारतीय शैलीवर श्रद्धा ठेवून ग्राहकांच्या मनाचा अचूक वेध घेणाऱ्या बियाणींच्या यशोगाथेची ही झलक आवर्जून अनुभवण्याजोगी आहे. माणसाने अनुभवातून सतत काही तरी शिकत जावं असं म्हणतात. हा नियम खरा मानायचा तर बियाणींचे अनुभव तपासून पहायला हवेत. ‘इट हॅपन्ड इन इंडिया’चे लेखक स्वत: किशोर बियाणी आणि दीपायन वैश्य असून मराठी भाषांतर उषा महाजन यांनी केले आहे. सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. २२४ पानांचे हे पुस्तक १८० रुपयाला उपलब्ध आहे. आयुष्यात काही तरी करून दाखवण्याची प्रेरणा देणारे आणखी एक दर्जेदार पुस्तक म्हणजे ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक महणजे ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांनी भारतीय उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या नेतृत्वांशी केलेली दिलखुलास बातचीत आहे. एक मुलाखतकार आणि मुत्सद्दी लेखक म्हणून वीर संघवी सर्वांनाच परिचित आहेत. त्यांनी प्रश्नांची गुगली टाकत अनेकांना बोलते केले आणि गोंधळवून टाकले पण, उद्योगक्षेत्रातील काही मातब्बरांच्या यशोगाथा पडताळून पाहताना ते स्वत:च चकित झाले. त्यातूनच नवभारताच्या ११ रत्नांचा परिचय करून देण्याचे त्यांच्या मनाने धाटले. हे अकराजण म्हणजे नंदन निलेकणी, कुमार मंगलम बिर्ला, सुनील मित्तल, राजीव चंद्रशेखर, अझीम प्रेमजी, सुभाष चंद्रा, बिक्की ओबेरॉय, नसली वाडिया, उदय कोटक, विजय मल्ल्या आणि रतन टाटा. या सर्वांच्या जडणघडणीची कुतुहलजनक गाथा वीर संघवी यांनी मांडली असून त्याचा नेटका अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. संघवी यांनी वर्णन केलेली या अकराजणांची टीम आपल्याला उद्योगजगतातील अनेक बारकावे उलगडून दाखवतेच पण विविध क्षेत्रातील संधींचा फायदा कसा घेतला गेला हे पडताळून दाखवते. भारतीय उद्योगक्षेत्र आणि त्यातील जिद्दीची कहाणी जवळून समजून घ्यायची तर या पुस्तकाला पर्याय नाही. १२४ पानांचे हे पुस्तक १०० रुपयांना उपलब्ध आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKASHA 23 -08 -2009

    नवभारताचे शिल्पकार… भारत स्वतंत्र झाला त्या वेळी ज्यांना खऱ्या अर्थाने उद्योगपती म्हणता येते असे दोनच उद्योगपती देशात होते. उद्योगपती म्हटले की, लोकांना जमशेदजी टाटा आणि बिर्ला कुटुंबीय यांच्या नावाची आठवण व्हायची. नंतरच्या काळात अनेक नवे घराणे या कषेत्रात आले त्यापैकी मफतलाल, नंदा, महेंद्र या कुटुंबांचा विचार करावा लागेल. १९५६ च्या सुमारास देशात खऱ्या अर्थाने औद्योगिकरणाला अनुकूल असे वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. विकास करायचाच या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी सुरू केली. त्याच वेळी पुढील काळात देशातील उत्पादने देशी नसतील अशी काळजी घेण्यात आली. या सुमारास धीरूभाई अंबानी यांनी परदेशातून येऊन रिलायन्सचा पाया घातला. पुढे १९७० च्या सुमारास इलेक्ट्रॉनिक क्रांती झाली. या क्रांतीने उद्योग व्यवसायासाठी किती तरी क्षेत्रे नव्याने उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा घेऊन नारायण मूर्ती यांनी इन्फोसेसचा पाया घातला तर अजीज पे्रमजी यांनी विप्रोचे क्षेत्र वाढविले. सुभाष चंद्रा, उदय कोटक, विजय मल्ल्या, बी. के. ओबेरॉय, कुमार मंगलम बिर्ला आदींनी या क्षेत्रात भरारी घेतली. या लोकांना देशाला औद्योगिक चेहरा मिळवून दिला. खुल्या अर्थव्यवस्थेनंतर यापैकी अनेकांनी आपले उद्योग क्षेत्र देशाबाहेर वाढवले. देशात उत्पादित होणाऱ्या मालाची गुणवत्ता व दर्जा वाढविला. आंतरराट्रीय दर्जेचे उत्पादने देशात सुरू झाली. भारतीय उत्पादने इतर देशातील उत्पादनाच्या तुलनेत सरस असली तरी त्याची किंमत मात्र कमी असते. त्याचा फायदा घेऊन हे उद्योग घराणे वाढत राहिले आणि देशाचा लौकिकही वाढत राहिला. भारताला नवा चेहरा मिळवून देणाऱ्या काही लोकांविषयी वीर संगवी यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न नवभारताचे शिल्पकार या पुस्तकामार्फत बाहेर आला. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला असून मेहता पब्लिकेशन हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. उद्योजक हा जन्मावा लागतो, यशस्वी उद्योजक होण्यासाठी उद्योगधंद्याचे ज्ञान पाहिजे. त्याच वेळी परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. परिश्रम हे योजनाबद्ध असले पाहजे. अलीकडे उद्योगधंद्यात यशस्वी होणाऱ्या लोकांना फार लवकरच प्रचंड पैसा मिळतो, पैसा मिळाला म्हणून माणसे बदलतात. अशी माणसे उद्योग व्यवसाय क्षेत्रात दीर्घकाळ टिकून राहू शकत नाहीत. व्यवसायात टिकून राहण्यासाठी काळाचा वेग घेणे मानवी स्वभावाचे निरीक्षण आणि स्वतःच्या वागण्यात बदल करण्याची तयारी पाहिजे, असे या लोकांचे चरित्र पाहिले तर प्रकर्षाने लक्षात येते. नवभारताचे शिल्पकार या पुस्तकात यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती आहेत. त्यांचे चरित्र नाही. लेखकाने त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून त्यांच्या कामाचे महत्त्व उलगडत जाते. त्यासाठी संबंधितांनी बराच अभ्यास केला असावा असे सहज लक्षात येते. मोठ्या माणसांच्या मुलाखती मिळविणे आणि प्रत्यक्ष मुलाखत घेणे सोपे नाही या बाबीचा प्रत्यय जागोजागी येत असतो. इन्फोसिस ही जगातली एक मोठी आयटी कंपनी. इन्फोसिसची स्थापना करणारे नारायण मूर्ती आणि नंदन नीलकेनी हे पाटणी कॉम्प्युटरमध्ये कर्मचारी होते. एका किरकोळ कारणावरून त्या दोघांनीही पटणी कॉम्युटर्स कंपनी सोडली आणि इन्फोसिसची स्थापना केली. नारायण मूर्ती हे तरुणवयात साम्यवादी विचारांकडे आकर्षित झालेले उद्योजक आहेत. इन्फोसिसची उभारणी करताना त्यांनी आपली साम्यवादी विचारसरणी सोडली असावी असे वाटत नाही. त्यांच्यासाठी इन्फोसिस ही प्रायव्हेट लिमिटेड करणे अवगत नव्हते. तरीही त्यांनी इन्फोसिस ही पब्लिक लिमिटेड कंपनी केली. या एकाच कृतीमधून नारायण मूर्ती आणि नंदन यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. इन्फोसिसबद्दल सांगितले जाते की, या वंâपनीत काम करणारा एकूण एक कामगार हा कंपनीचा मालक आहे. कामगार भरती करताना व्यवस्थापनाने जात-पात-धर्म-राजकीय विचारसरणी यांना थारा दिला नाही. फक्त गुणवत्ता पाहिली. त्यामुळेच आज ही वंâपनी जगातल्या बलाढ्य आणि चांगला नफा मिळविणाऱ्या कंपनीपैकी समजली जाते. अजीज प्रेमजी हे विप्रोचे मालक. विप्रोचा आयटी क्षेत्रात प्रवेश होण्यापूर्वी प्रेमजी यांचा वनस्पती तूप उत्पादनाचा व्यवसाय होता. शिवाय साबण उत्पादनही चालू होते. प्रेमजी यांनी या क्षेत्रात पदार्पण केले आणि आज ते भारतातील सर्वांत श्रीमंत म्हणून ओळखले जातात. उदय कोटक - महिंद्रा, विजय मल्ल्या, कुमार मंगलम बिर्ला, राजीव चंद्रशेखर, ओबेरॉय यांचेही चरित्र अशीच कर्तृत्वांनी भारावलेली आहेत. या लोकांनी उद्योग-व्यवसाय वाढविला आणि हजारो लोकांच्या रोजगाराची सोय केली. उद्योजक हा प्रशिक्षणाने तयार होत नसतो ही बाब त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more