* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AADIPARVA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981773
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘AADIPARV’ IS A HISTORICAL NOVEL WRITTEN BY DR. PRAMILA JARAG IS BASED ON LIFE OF MALOJIRAJE BHOSLE, A WARRIOR, ADMINISTRATOR AND STATESMAN AT HIS TIME AND GRANDFATHER OF ‘CHHATRAPATI SHIVAJI’ THE GREAT. THE NOVEL DEPICTS SOCIAL AND POLITICAL SCENARIO OF DECCAN INDIA DURING END OF 16TH CENTURY AND BEGINNING OF 17TH CENTURY, SPREAD OVER PERIOD OF 18 YEARS DURING WHICH MALOJIRAJE ASCENDED FROM A SOLDIER TO CHIEF OF ARMY. THESE 18 YEARS WERE THE MOST TURBULENT YEARS IN THE HISTORY AT ‘NIJAMSHAHI OF AHMADNAGAR’, THAT RULED OVER THE PART OF LAND, WHICH IS TODAY’S MAHARASHTRA, FOR A CENTURY DURING WHICH THERE WERE TWO WARS BETWEEN MUGHULS UNDER LEADERSHIP OF EMPEROR AKBAR AND CHANDBIBI, THE FIRST EMPRESS OF DECCAN. DR. PRAMILA JARAG HAS DONE A LOT OF STUDY OF LITERATURE ON THE SUBJECT IN DIFFERENT LANGUAGES INCLUDING URDU & PERSIAN AND HAS USED WORDS IN THESE LANGUAGES SO APTLY TO RELIVE THAT ERA TO THE READERS. EVENTS OF THE PERSONAL LIFE AND HISTORICAL EVENTS ARE INTERTWINED VERY INTRICATELY. THE MOST INSPIRING PART OF THE BOOK IS MAIN CHARACTER ‘MALOJIRAJE’, AS HIS WORK HAS DEFINITELY FOUNDED THE ROOTS OF VELOUR OF HIS SUCCESSORS ‘SHAHAJI MAHARAJ’ AND ‘CHHATRAPATI SHIVAJI’ WHO FOUNDED A SOVEREIGN MARATHA EMPIRE IN DECCAN.
मालोजीराजे- छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते. विध्वंस होत होता इथल्या भूमीचा. विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळात होरपळणारी रयत, श्रद्धास्थानांची होणारी दुरावस्था, याचा सल उरात ठेवूनच हा पराक्रमी योद्धा त्या काळाच्या निजामशाहीत वावरला. स्वपराक्रमाने `सरगु-हो`सारख्या सर्वोच्च दरबारी पदावर गेला. शहाजी महाराजांनी सहा वर्षे चालवलेली प्रतिनिजामशाही, स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवण्याचा केलेला धाडसी प्रयत्न; पुढे त्यांच्या व जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी स्थापन केलेले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य- यामागे मालोजीराजेंच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीतून साकारलेल्या सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा धागा मालोजीराजेंपर्यंत जातो. मालोजीराजेंच्या कर्तृत्वाची ओळख मराठी वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आजवर झालेला नाही. `आदिपर्व` या कादंबरीने ही उणीव भरून काढलेली आहे. इतिहासाशी प्रामाणिक राहून लिहिलेली ही अभ्यासपूर्ण कादंबरी मराठी ऐतिहासिक कादंबरीची परंपरा समृद्ध करणारी आहे.
* जेष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार २०१० . * करवीर साहित्य परिषद पुरस्कार २०११. * कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार २०११.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AADIPARVA(MALOJIRAOBHOSALE) #AADIPARVA #आदिपर्व #BIOGRAPHY #MARATHI #DR.PRAMILAJARAG #डॉ.प्रमिलाजरग "
Customer Reviews
  • Rating StarDevdutt Kamat

    छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते. विध्वंस होत होता इथल्या भूमीचा. विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळात होरपळणारी रयत, श्रद्धस्थानांची होणारी दुरावस्था, याचा सल उरात ठेवूनच हा पराक्रमी योद्धा त्या काळाच्या निजामशाहीत वावरला. स्वपराक्रमाने `सरगु-हो`सारख्या सर्वोच्च दरबारी पदावर गेला. शहाजी महाराजांनी सहा वर्षे चालवलेली प्रतिनिजामशाही, स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवण्याचा केलेला धाडसी प्रयत्न; पुढे त्यांच्या व जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी स्थापन केलेले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य- यामागे मालोजीराजेंच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीतून साकारलेल्या सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा धागा मालोजीराजेंपर्यंत जातो. मालोजीराजेंच्या कर्तृत्वाची ओळख मराठी वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आजवर झालेला नाही. `आदिपर्व` या कादंबरीने ही उणीव भरून काढलेली आहे. इतिहासाशी प्रामाणिक राहून लिहिलेली ही अभ्यासपूर्ण कादंबरी मराठी ऐतिहासिक कादंबरीची परंपरा समृद्ध करणारी आहे. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 2-1-2011

    आदिपर्व या ऐतिहासिक कादंबरीने धुक्यात लपेटलेल्या मध्ययुगीन कालखंडाला प्रकाशात आणले आहे. छत्रपती शिवाजीराजे यांचे प्रपितामह मालोजीराजे भोसले यांचा कालखंड १५७४ ते सप्टेंबर १६०६. म्हणजे बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यानंतरचा. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशही, इमादशाही,बरीदशाही यांच्यातल्या लढाया व सत्तासंघर्ष यांचा कालखंड. मराठा सरदार व शिलेदार यांच्यात महाराष्ट्रात हिंदुपद बादशाही स्थापन करता येण्याच्या शक्यतेचा विचारही कधी मनात न येण्याचा कालखंड. परकीय सत्तेची इमानाने चाकरी करण्याचा, वतनासाठी एकमेकांशी झुंजण्याचा आणि महाराष्ट्राच्या, भल्याचा विचार मनात नसण्याचा हा कालखंड होता. त्यातील एक मोठे राज्य म्हणजे निजामशाही. अहमदनगर ही त्याची राजधानी वऱ्हाड, बीड, पुणे, नाशिक हे चार प्रांत, कोकणातील चौल व रेवदंडा आणि कल्याण हा भूभाग निजामशाहीत मोडत असे. वेरूळला भोसले घराणे राहायचे. घृष्णेश्वर हे भोसल्यांचे दैवत. मालकर्ण भोसले हे मूळ पुरुष. त्यांना मालोजी व विठोजी असे दोन मुलगे. दोन वर्षांच्या अंतराचे. मालोजी उर्फ बाबाजी तीन वर्षांचे असताना त्यांचे वडील मालकर्ण एका जुझात मारले गेले तेव्हा विठोजी जेमतेम एक वर्षांचा होता. मालकर्ण यांच्याकडे वेरूळगाव वावी, मुंगी, बनसेंद्रे, देऊळगाव, जिंती, हिंगणी, बेरडी यांचे निजामशाही वतन होते. मालकर्ण वारल्यावर शहाने हा सरंजाम जप्त केला. पदरात दोन मुले असलेल्या आऊसाहेबांकडे खासगीतला काही भाग, वाड्या, मोकादम्या एवढे उरले. त्यानी त्या आधारावर पतिमागे घर सांभाळले. मुलांना मोठे केले. बाबाजींच्या पत्नीचे नाव रेखाऊ. मालोजी वसुलीचे काम बघत. तर धाकटा भाऊ विठोजी फडाचे जमाखर्चाचे काम करायचा. मालोजी सोळा वर्षांचे असताना आजीकडे हट्ट धरून त्यांनी शिलेदार बनण्याचा विचार स्पष्ट केला. त्यावेळी निजामशाहीत सिंदखेडचे जाधवराव, मुधोळचे घोरपडे, म्हसवडचे माने, मलवडीचे घाटगे, फलटणचे वणगोजी राजे नाईक निंबाळकर असे नामवंत सरदार होते. फलटणचे वणगोजीराव, (मूळ नाव अनंगपाळ) यांचा दरारा मोठा होता. राव वणंगपाळ बारा वजिरांचा काळ, असा त्यांचा लौकिक होता. निजामशाहीत त्यांचा दरारा होता. बाबाजींनी त्यांच्या कानांवर मुलाचा हट्ट घातला. मालोजी व विठोजी लवकरच वणगोजीराजांकडे शिलेदारीत दाखल झाले. कोल्हापूर मुक्कामी मालोजींनी अचानक घाला घालू पाहाणा-या आदिलशाही तुकडीला पेचात पकडून प्रसंग निभावून नेला. निजामशहीवरचे संकट समूळ नष्ट वेâले. वणगोजी राजेंनी निजामशाहीकडे मालोजी, विठोजींची शिफारस केली. त्यांच्या आजोबांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना पुन्हा देण्यात यावा, असा तोंडी अर्ज केला. शहाने भोसलेबंधूंना, प्रत्येकी १५०० शिलेदारांची सरदारी, राजे ही किताबत शिवनेरी किल्ला व पुण्याचे वतन तर दिलेच आणि आजोबांच्या जप्त केलेला सरंजामही दिला. इथून भोसलेबंधुंच्या कर्तबगारीला वाव मिळत गेला. योजकता, झुंजाची आखणी, सैन्याची व्यूहरचना, शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेणे, नजरबाजांची योजना करणे, रयतेवर प्रेम करणे, परोपकारी वृत्ती, देव धर्म, संतमहंत यांच्यापुढे लीन होणे यामुळे मालोजी सर्वांना प्रिय होत गेले. बघता बघता त्यांचे नाव मोेठे झाले. त्यातच त्यांचे लग्न वणगोजी राजेंची कन्या दीपा हिच्याशी झाले. हा संबंध उभयपक्षी हिताचा झाला. निजामशाही नेकजात मराठा सरदारांवर अवलंबून होती. त्यात आता मालोजी राजे भोसले यांची गणना होऊ लागली. मालोजीराजे यांनी नगरचे सावकार शेषाप्पा यांचा विश्वास संपादन केला तर निजामशाहीतील महत्त्वाची व्यक्ती व दफ्तरातील जबाबदार व एकूणच माहीतगार अशी महत्त्वाची व्यक्ती निळोपंत यांच्याशीही संबंध वाढवले. त्यामुळे निजामशाहीत कोठे काय चालले आहे. याची त्यांना खबर मिळायची. हा काळ अंदाधुंदीचा होता. मनगटशाहीचा होता. दगाबाजी, फंदाफितुरीचा होता. निजामशाहीत खुद्द शहाला आणि त्याच्या सरदारांनी सदैव जागृत राहावे लागे. त्यात निजामशाहीत खुद्द वजिराने बगावतीचे वर्तन केले. पंधराव्या शतकात भारतात पोर्तुगीजांचे पाऊल पडले. दीवदमण ते गोवा हा सागरी भाग निजामशाहीचा. चौल, रेवदंडा, कल्याण (खाडीमार्गे) इथे पोर्तुगीजांचा सतत त्रास असे. (त्याबरोबर जंजि-याच्या शिद्दीचा त्रास तर कानीकपाळी ठेवलेलाच. त्यावेळी स्त्रियांच्या तोंडी नेहमी म्हटले जायचे, ‘आजबाई सारवा । उद्या बाई तारवा’ म्हणजे आज तुम्ही तुमच्या घरी सुखरुप आहात. हौस म्हणून घर, अंगण सारवा. त्यावर रांगोळी रेखा. पण शिद्दीचे सैनिक कधी छापा टाकतील आणि पुरुषांची कत्तल करून, लुटालूट करून, घरांना आगी लावून बायकांना फरपटत आपल्या गलबतांकडे नेतील याचा काही नेम नाही. आदिलशहाचा एक सरदार फितूर होऊन निजामशहाला ३०० हत्तींची भेट आणि शेकडो होन घेऊन शहाकडे त्याने आसरा मागितला. शहाने त्याचा मोठा गौरव केला. मनसब दिली. शाही किताब दिला. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेटवून दिले. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेâवूâन दिले. आदिलशहाने चिडून नगरकडे फौजा वळवा, यावर तह करताना निजामशहांना नवीन बांधलेला किल्ला पाडण्याची अट आदिलशहाने घातली. शाहजादा मुराद दक्षिणेत चार वर्षे निजामशाही बुडवण्यासाठी मुक्काम ठोकून राहिला. तो अयशस्वी झाला. चांदबिबीने बालराजाच्या नावाने उत्तम कारभार केला. पण अंतर्गत बंडाळी व असहकार यामुळे ती अयशस्वी ठरली. पुढे तर तिची हत्या झाली. या सगळ्यांमुळे आणि त्यात सतत दोन वर्षे दुष्काळ पडल्याचे केवळ जगण्यासाठी वीस हजार माणसे विजापूरला गेली. मालोजीराजे हताश झाले. ते अतिशय दयावत्सल होते. श्री गोंद्याजवळ वाड्यासाठी पाया खोदताना त्यांना गुप्तधनाचे हंडे मिळाले. या धनातून त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचे नूतनीकरण केले. सूफी साधू शेख महंमद बाबांना मठ बांधून दिला. शिखर शिंगणापूर इथे तळे बांधले. ओसाड गावे पुन्हा नांदती केली. शेतीला उत्तेजन दिले. डॉ. प्रमिला जरग यांनी ऐतिहासिक ढंगाची भाषा निवेदनात वापरली आहे. करीणा, बितपशील, सुक्रांना नमाज, निहाल होणे, सुलतानढवा, तजुबी, गौर, बगावत, सर्पâराजी, शुक्रगुजार, फिकरमं, हिफाजत, वल्द, रिश्ता, पैगाम, फरमानवाडी, खद्याल, तरक्की, अमन, इत्तेफाक असे उर्दू अरबी फारसी शब्द लोकांच्या तोंडी रूळून गेले होते. शिया, सुनी, मेहदवी यांच्यात वैर धुमसायचे. खंडेनवमी, नवरात्र, दसरा असे सण साजरे होत. फराह, बाग, ई रहुजा हाश्त बहिश्त या बागा नगरमध्ये होत्या. भिंगार खेड्याजवळ कुत्रे कोल्ह्यांचा पाठलाग करीत असता चिडलेल्या कोल्ह्याने कुत्र्यांवर चाल केलेली शहाने पाहिली तेव्हा ही जागा शकुनाची समजूत भिंगारला अहमदनगर वसवले. प्रसिद्ध मुलुख मैदान तोफ रुमीखानने घडवली. कोल्हापूरला तेव्हा २१ तळी होती. युवराज मुराद विजयी झाला तर दिल्लीला त्याचे वजन वाढेल म्हणून त्याचे सरदार वेढा अंगचोरपणे लढतात, अशी आवश्यक माहिती लेखिका देते. डॉक्टर, प्रमिला जरग पंधराव्या आणि सोळाव्या शतकाचे शब्दचित्र काढतात. या कादंबरीतला लेखिकेने कन्सिव्ह केलेला तिला स्पुâरलेला एक प्रसंग मला कळसाध्याय वाटतो. मालोजीराजे यांचे लग्न दीपाशी झाले तेव्हा ती केवळ आठ वर्षाची होती. वेरूळला सासरी आली होती. आजेसासूबाई पुजेला बसल्या होत्या आणि ही उमा पूर्वेकडून भिंतीवर पडणारे, नाचणारे तेजाचे पट्टे हातात धरू पाहात होती. तिचा पती मालोजी, त्याचे आजोबा मालकर्ण जुझात लढता लढता मारले गेले तेव्हा मालोजीचे वडील बाबाजी केवळ तीन वर्षांचे होते. उभा जन्म वैधव्यात करपलेल्या, कर्तव्यकठोर आऊसाहेब मुठीत सूर्याचे तेज पकडू पाहाणाNया नातसुनेला म्हणतात, मुली, आपल्या हातातून तेज निसटते. ते मुठीत पकडता येत नाही. त्या तेजाला प्रपंचात जखडून ठेवता येत नाही...’ आणि पुढे तेच घडते. जुझात मालोजी मारला जातो. उमाच्या मुठीतून तेज निसटते. सरलष्कर उर्फ सर गु-हो ही शाही, अति दुर्मिळ किताबत निजामशहाकडून मिळवलेले मालोजी राजे शहाजी व शरीफजी या बालकांना आणि उमेला पकडून ठेवता आले नाहीत. मला हा प्रसंग स्वामीच्या शेवटी रमा सती जाते. या प्रसंगाच्या व त्यातील शेवटच्या वाक्याच्या उंचीचा वाटतो. मेहता पब्लिशिंगने राजहंसच्या द्रोहपर्व नंतर लगेचच एक उत्तम ऐतिहासिक कादंबरी पेश केलीय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more