* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AADIPARVA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981773
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘AADIPARV’ IS A HISTORICAL NOVEL WRITTEN BY DR. PRAMILA JARAG IS BASED ON LIFE OF MALOJIRAJE BHOSLE, A WARRIOR, ADMINISTRATOR AND STATESMAN AT HIS TIME AND GRANDFATHER OF ‘CHHATRAPATI SHIVAJI’ THE GREAT. THE NOVEL DEPICTS SOCIAL AND POLITICAL SCENARIO OF DECCAN INDIA DURING END OF 16TH CENTURY AND BEGINNING OF 17TH CENTURY, SPREAD OVER PERIOD OF 18 YEARS DURING WHICH MALOJIRAJE ASCENDED FROM A SOLDIER TO CHIEF OF ARMY. THESE 18 YEARS WERE THE MOST TURBULENT YEARS IN THE HISTORY AT ‘NIJAMSHAHI OF AHMADNAGAR’, THAT RULED OVER THE PART OF LAND, WHICH IS TODAY’S MAHARASHTRA, FOR A CENTURY DURING WHICH THERE WERE TWO WARS BETWEEN MUGHULS UNDER LEADERSHIP OF EMPEROR AKBAR AND CHANDBIBI, THE FIRST EMPRESS OF DECCAN. DR. PRAMILA JARAG HAS DONE A LOT OF STUDY OF LITERATURE ON THE SUBJECT IN DIFFERENT LANGUAGES INCLUDING URDU & PERSIAN AND HAS USED WORDS IN THESE LANGUAGES SO APTLY TO RELIVE THAT ERA TO THE READERS. EVENTS OF THE PERSONAL LIFE AND HISTORICAL EVENTS ARE INTERTWINED VERY INTRICATELY. THE MOST INSPIRING PART OF THE BOOK IS MAIN CHARACTER ‘MALOJIRAJE’, AS HIS WORK HAS DEFINITELY FOUNDED THE ROOTS OF VELOUR OF HIS SUCCESSORS ‘SHAHAJI MAHARAJ’ AND ‘CHHATRAPATI SHIVAJI’ WHO FOUNDED A SOVEREIGN MARATHA EMPIRE IN DECCAN.
मालोजीराजे- छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते. विध्वंस होत होता इथल्या भूमीचा. विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळात होरपळणारी रयत, श्रद्धास्थानांची होणारी दुरावस्था, याचा सल उरात ठेवूनच हा पराक्रमी योद्धा त्या काळाच्या निजामशाहीत वावरला. स्वपराक्रमाने `सरगु-हो`सारख्या सर्वोच्च दरबारी पदावर गेला. शहाजी महाराजांनी सहा वर्षे चालवलेली प्रतिनिजामशाही, स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवण्याचा केलेला धाडसी प्रयत्न; पुढे त्यांच्या व जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी स्थापन केलेले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य- यामागे मालोजीराजेंच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीतून साकारलेल्या सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा धागा मालोजीराजेंपर्यंत जातो. मालोजीराजेंच्या कर्तृत्वाची ओळख मराठी वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आजवर झालेला नाही. `आदिपर्व` या कादंबरीने ही उणीव भरून काढलेली आहे. इतिहासाशी प्रामाणिक राहून लिहिलेली ही अभ्यासपूर्ण कादंबरी मराठी ऐतिहासिक कादंबरीची परंपरा समृद्ध करणारी आहे.
* जेष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार २०१० . * करवीर साहित्य परिषद पुरस्कार २०११. * कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार २०११.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AADIPARVA(MALOJIRAOBHOSALE) #AADIPARVA #आदिपर्व #BIOGRAPHY #MARATHI #DR.PRAMILAJARAG #डॉ.प्रमिलाजरग "
Customer Reviews
  • Rating StarDevdutt Kamat

    छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते. विध्वंस होत होता इथल्या भूमीचा. विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळात होरपळणारी रयत, श्रद्धस्थानांची होणारी दुरावस्था, याचा सल उरात ठेवूनच हा पराक्रमी योद्धा त्या काळाच्या निजामशाहीत वावरला. स्वपराक्रमाने `सरगु-हो`सारख्या सर्वोच्च दरबारी पदावर गेला. शहाजी महाराजांनी सहा वर्षे चालवलेली प्रतिनिजामशाही, स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवण्याचा केलेला धाडसी प्रयत्न; पुढे त्यांच्या व जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी स्थापन केलेले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य- यामागे मालोजीराजेंच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीतून साकारलेल्या सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा धागा मालोजीराजेंपर्यंत जातो. मालोजीराजेंच्या कर्तृत्वाची ओळख मराठी वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आजवर झालेला नाही. `आदिपर्व` या कादंबरीने ही उणीव भरून काढलेली आहे. इतिहासाशी प्रामाणिक राहून लिहिलेली ही अभ्यासपूर्ण कादंबरी मराठी ऐतिहासिक कादंबरीची परंपरा समृद्ध करणारी आहे. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 2-1-2011

    आदिपर्व या ऐतिहासिक कादंबरीने धुक्यात लपेटलेल्या मध्ययुगीन कालखंडाला प्रकाशात आणले आहे. छत्रपती शिवाजीराजे यांचे प्रपितामह मालोजीराजे भोसले यांचा कालखंड १५७४ ते सप्टेंबर १६०६. म्हणजे बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यानंतरचा. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशही, इमादशाही,बरीदशाही यांच्यातल्या लढाया व सत्तासंघर्ष यांचा कालखंड. मराठा सरदार व शिलेदार यांच्यात महाराष्ट्रात हिंदुपद बादशाही स्थापन करता येण्याच्या शक्यतेचा विचारही कधी मनात न येण्याचा कालखंड. परकीय सत्तेची इमानाने चाकरी करण्याचा, वतनासाठी एकमेकांशी झुंजण्याचा आणि महाराष्ट्राच्या, भल्याचा विचार मनात नसण्याचा हा कालखंड होता. त्यातील एक मोठे राज्य म्हणजे निजामशाही. अहमदनगर ही त्याची राजधानी वऱ्हाड, बीड, पुणे, नाशिक हे चार प्रांत, कोकणातील चौल व रेवदंडा आणि कल्याण हा भूभाग निजामशाहीत मोडत असे. वेरूळला भोसले घराणे राहायचे. घृष्णेश्वर हे भोसल्यांचे दैवत. मालकर्ण भोसले हे मूळ पुरुष. त्यांना मालोजी व विठोजी असे दोन मुलगे. दोन वर्षांच्या अंतराचे. मालोजी उर्फ बाबाजी तीन वर्षांचे असताना त्यांचे वडील मालकर्ण एका जुझात मारले गेले तेव्हा विठोजी जेमतेम एक वर्षांचा होता. मालकर्ण यांच्याकडे वेरूळगाव वावी, मुंगी, बनसेंद्रे, देऊळगाव, जिंती, हिंगणी, बेरडी यांचे निजामशाही वतन होते. मालकर्ण वारल्यावर शहाने हा सरंजाम जप्त केला. पदरात दोन मुले असलेल्या आऊसाहेबांकडे खासगीतला काही भाग, वाड्या, मोकादम्या एवढे उरले. त्यानी त्या आधारावर पतिमागे घर सांभाळले. मुलांना मोठे केले. बाबाजींच्या पत्नीचे नाव रेखाऊ. मालोजी वसुलीचे काम बघत. तर धाकटा भाऊ विठोजी फडाचे जमाखर्चाचे काम करायचा. मालोजी सोळा वर्षांचे असताना आजीकडे हट्ट धरून त्यांनी शिलेदार बनण्याचा विचार स्पष्ट केला. त्यावेळी निजामशाहीत सिंदखेडचे जाधवराव, मुधोळचे घोरपडे, म्हसवडचे माने, मलवडीचे घाटगे, फलटणचे वणगोजी राजे नाईक निंबाळकर असे नामवंत सरदार होते. फलटणचे वणगोजीराव, (मूळ नाव अनंगपाळ) यांचा दरारा मोठा होता. राव वणंगपाळ बारा वजिरांचा काळ, असा त्यांचा लौकिक होता. निजामशाहीत त्यांचा दरारा होता. बाबाजींनी त्यांच्या कानांवर मुलाचा हट्ट घातला. मालोजी व विठोजी लवकरच वणगोजीराजांकडे शिलेदारीत दाखल झाले. कोल्हापूर मुक्कामी मालोजींनी अचानक घाला घालू पाहाणा-या आदिलशाही तुकडीला पेचात पकडून प्रसंग निभावून नेला. निजामशहीवरचे संकट समूळ नष्ट वेâले. वणगोजी राजेंनी निजामशाहीकडे मालोजी, विठोजींची शिफारस केली. त्यांच्या आजोबांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना पुन्हा देण्यात यावा, असा तोंडी अर्ज केला. शहाने भोसलेबंधूंना, प्रत्येकी १५०० शिलेदारांची सरदारी, राजे ही किताबत शिवनेरी किल्ला व पुण्याचे वतन तर दिलेच आणि आजोबांच्या जप्त केलेला सरंजामही दिला. इथून भोसलेबंधुंच्या कर्तबगारीला वाव मिळत गेला. योजकता, झुंजाची आखणी, सैन्याची व्यूहरचना, शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेणे, नजरबाजांची योजना करणे, रयतेवर प्रेम करणे, परोपकारी वृत्ती, देव धर्म, संतमहंत यांच्यापुढे लीन होणे यामुळे मालोजी सर्वांना प्रिय होत गेले. बघता बघता त्यांचे नाव मोेठे झाले. त्यातच त्यांचे लग्न वणगोजी राजेंची कन्या दीपा हिच्याशी झाले. हा संबंध उभयपक्षी हिताचा झाला. निजामशाही नेकजात मराठा सरदारांवर अवलंबून होती. त्यात आता मालोजी राजे भोसले यांची गणना होऊ लागली. मालोजीराजे यांनी नगरचे सावकार शेषाप्पा यांचा विश्वास संपादन केला तर निजामशाहीतील महत्त्वाची व्यक्ती व दफ्तरातील जबाबदार व एकूणच माहीतगार अशी महत्त्वाची व्यक्ती निळोपंत यांच्याशीही संबंध वाढवले. त्यामुळे निजामशाहीत कोठे काय चालले आहे. याची त्यांना खबर मिळायची. हा काळ अंदाधुंदीचा होता. मनगटशाहीचा होता. दगाबाजी, फंदाफितुरीचा होता. निजामशाहीत खुद्द शहाला आणि त्याच्या सरदारांनी सदैव जागृत राहावे लागे. त्यात निजामशाहीत खुद्द वजिराने बगावतीचे वर्तन केले. पंधराव्या शतकात भारतात पोर्तुगीजांचे पाऊल पडले. दीवदमण ते गोवा हा सागरी भाग निजामशाहीचा. चौल, रेवदंडा, कल्याण (खाडीमार्गे) इथे पोर्तुगीजांचा सतत त्रास असे. (त्याबरोबर जंजि-याच्या शिद्दीचा त्रास तर कानीकपाळी ठेवलेलाच. त्यावेळी स्त्रियांच्या तोंडी नेहमी म्हटले जायचे, ‘आजबाई सारवा । उद्या बाई तारवा’ म्हणजे आज तुम्ही तुमच्या घरी सुखरुप आहात. हौस म्हणून घर, अंगण सारवा. त्यावर रांगोळी रेखा. पण शिद्दीचे सैनिक कधी छापा टाकतील आणि पुरुषांची कत्तल करून, लुटालूट करून, घरांना आगी लावून बायकांना फरपटत आपल्या गलबतांकडे नेतील याचा काही नेम नाही. आदिलशहाचा एक सरदार फितूर होऊन निजामशहाला ३०० हत्तींची भेट आणि शेकडो होन घेऊन शहाकडे त्याने आसरा मागितला. शहाने त्याचा मोठा गौरव केला. मनसब दिली. शाही किताब दिला. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेटवून दिले. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेâवूâन दिले. आदिलशहाने चिडून नगरकडे फौजा वळवा, यावर तह करताना निजामशहांना नवीन बांधलेला किल्ला पाडण्याची अट आदिलशहाने घातली. शाहजादा मुराद दक्षिणेत चार वर्षे निजामशाही बुडवण्यासाठी मुक्काम ठोकून राहिला. तो अयशस्वी झाला. चांदबिबीने बालराजाच्या नावाने उत्तम कारभार केला. पण अंतर्गत बंडाळी व असहकार यामुळे ती अयशस्वी ठरली. पुढे तर तिची हत्या झाली. या सगळ्यांमुळे आणि त्यात सतत दोन वर्षे दुष्काळ पडल्याचे केवळ जगण्यासाठी वीस हजार माणसे विजापूरला गेली. मालोजीराजे हताश झाले. ते अतिशय दयावत्सल होते. श्री गोंद्याजवळ वाड्यासाठी पाया खोदताना त्यांना गुप्तधनाचे हंडे मिळाले. या धनातून त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचे नूतनीकरण केले. सूफी साधू शेख महंमद बाबांना मठ बांधून दिला. शिखर शिंगणापूर इथे तळे बांधले. ओसाड गावे पुन्हा नांदती केली. शेतीला उत्तेजन दिले. डॉ. प्रमिला जरग यांनी ऐतिहासिक ढंगाची भाषा निवेदनात वापरली आहे. करीणा, बितपशील, सुक्रांना नमाज, निहाल होणे, सुलतानढवा, तजुबी, गौर, बगावत, सर्पâराजी, शुक्रगुजार, फिकरमं, हिफाजत, वल्द, रिश्ता, पैगाम, फरमानवाडी, खद्याल, तरक्की, अमन, इत्तेफाक असे उर्दू अरबी फारसी शब्द लोकांच्या तोंडी रूळून गेले होते. शिया, सुनी, मेहदवी यांच्यात वैर धुमसायचे. खंडेनवमी, नवरात्र, दसरा असे सण साजरे होत. फराह, बाग, ई रहुजा हाश्त बहिश्त या बागा नगरमध्ये होत्या. भिंगार खेड्याजवळ कुत्रे कोल्ह्यांचा पाठलाग करीत असता चिडलेल्या कोल्ह्याने कुत्र्यांवर चाल केलेली शहाने पाहिली तेव्हा ही जागा शकुनाची समजूत भिंगारला अहमदनगर वसवले. प्रसिद्ध मुलुख मैदान तोफ रुमीखानने घडवली. कोल्हापूरला तेव्हा २१ तळी होती. युवराज मुराद विजयी झाला तर दिल्लीला त्याचे वजन वाढेल म्हणून त्याचे सरदार वेढा अंगचोरपणे लढतात, अशी आवश्यक माहिती लेखिका देते. डॉक्टर, प्रमिला जरग पंधराव्या आणि सोळाव्या शतकाचे शब्दचित्र काढतात. या कादंबरीतला लेखिकेने कन्सिव्ह केलेला तिला स्पुâरलेला एक प्रसंग मला कळसाध्याय वाटतो. मालोजीराजे यांचे लग्न दीपाशी झाले तेव्हा ती केवळ आठ वर्षाची होती. वेरूळला सासरी आली होती. आजेसासूबाई पुजेला बसल्या होत्या आणि ही उमा पूर्वेकडून भिंतीवर पडणारे, नाचणारे तेजाचे पट्टे हातात धरू पाहात होती. तिचा पती मालोजी, त्याचे आजोबा मालकर्ण जुझात लढता लढता मारले गेले तेव्हा मालोजीचे वडील बाबाजी केवळ तीन वर्षांचे होते. उभा जन्म वैधव्यात करपलेल्या, कर्तव्यकठोर आऊसाहेब मुठीत सूर्याचे तेज पकडू पाहाणाNया नातसुनेला म्हणतात, मुली, आपल्या हातातून तेज निसटते. ते मुठीत पकडता येत नाही. त्या तेजाला प्रपंचात जखडून ठेवता येत नाही...’ आणि पुढे तेच घडते. जुझात मालोजी मारला जातो. उमाच्या मुठीतून तेज निसटते. सरलष्कर उर्फ सर गु-हो ही शाही, अति दुर्मिळ किताबत निजामशहाकडून मिळवलेले मालोजी राजे शहाजी व शरीफजी या बालकांना आणि उमेला पकडून ठेवता आले नाहीत. मला हा प्रसंग स्वामीच्या शेवटी रमा सती जाते. या प्रसंगाच्या व त्यातील शेवटच्या वाक्याच्या उंचीचा वाटतो. मेहता पब्लिशिंगने राजहंसच्या द्रोहपर्व नंतर लगेचच एक उत्तम ऐतिहासिक कादंबरी पेश केलीय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more