* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PATHER PANCHALI
  • Availability : Available
  • Translators : PRASAD THAKUR
  • ISBN : 9789353173890
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : TRANSLATED FROM BENGALI TO MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PATHER PANCHALI, TRANSLATED AS SONG OF THE ROAD IS A NOVEL WRITTEN BY BIBHUTIBHUSHAN BANDYOPADHYAY AND WAS LATER ADAPTED INTO A FILM OF THE SAME NAME BY SATYAJIT RAY. PATHER PANCHALI DEALS WITH THE LIFE OF THE ROY FAMILY, BOTH IN THEIR ANCESTRAL VILLAGE IN RURAL BENGAL AND LATER WHEN THEY MOVE TO VARANASI IN SEARCH OF A BETTER LIFE, AS WELL AS THE ANGUISH AND LOSS THEY FACE DURING THEIR TRAVELS. IT FIRST APPEARED AS A SERIAL IN A CALCUTTA PERIODICAL IN 1928 AND WAS PUBLISHED AS A BOOK THE NEXT YEAR; IT WAS THE FIRST PUBLISHED NOVEL WRITTEN BY THE AUTHOR.IT WAS FOLLOWED IN 1932 BY A SEQUEL APARAJITO, WHICH WAS LATER ALSO ADAPTED INTO A FILM OF THE SAME NAME BY SATYAJIT RAY.
बिभूतिभूषण बॅनर्जी यांची अभिजात कांदबरी. जवळपास शतकापूर्वीच्या बंगाली ग्रामीण जीवनाचं अनोखं चित्रण वाचकाला वेगळ्या विश्वात नेतं. दारिद्र्यग्रस्त जीवनात एका उमलत्या वयातल्या मुलाचा होत जाणारा मानसिक विकास आणि त्याचे मोहून टाकणारे चित्रण या कादंबरीची सशक्त बाजू आहे. तिचं सिनेमाच्या रूपातील माध्यमांतरही अभिजात कलाकृती म्हणून नावाजलं गेलं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पथेरपांचाली #बिभूतिभूषणबॅनर्जी #प्रसादठाकूर #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #बंगालीक्लासिक्स #सत्यजितरे #PATHERPANCHALI #BHIBUTIBHUSHANBANERJEE #PRASADTHAKUR #BENGALICLASSICS #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarArchana Nagawade

    आजवर अनेक दिग्गजांनी या महान कलाकृती बद्दल लिहलेले आहे.. थोडासा प्रयत्न वाचलेला अनुभव सांगण्याचा. प्रसाद ठाकूर यांनी अप्रतिम, सामान्य वाचकाला समजेल असा सुंदर अनुवाद केला आहे.. हरिहर रे या गरिब ब्राह्मणाच्या कुटुंबात त्याची दोन मुले दुर्गा _अपू,प्नी सर्वजया आणि एक दुरच्या नात्यातील वृद्ध आतल्या इंदिरा आहेत. कांदबरी ची सुरूवात या वृद्ध आत्यापासून होते जवळचे कोणीच नसलेली शरीराने थकलेली आणि केवळ नाईलाज म्हणून हरीहरच्या घरी राहणारी ही इंदिरा आपल्याला क्षणोक्षणी हेलावून सोडते! कारण सर्वजयाला ती क्षणभरही नजरेसमोर नको असते घासभर अन्नासाठी ती सर्व सहन करत राहते! दुर्गा ला मात्र इंदिराचा लळा असतो.शेवटी उपासमारीमुळे तिचा मृत्यू होतो. अठराविश्व दारिद्र्यातही दोन्ही मुले आपल्या परीने आपला आनंद शोधत असतात.मग नीळकंठ पक्षी पाहण्याची अपूची बाळबोध इच्छा असो की नीळ कारखाना पाहून त्याला वाटलेले अप्रूप असो! लेखकाची शब्दशैली बघा, `घरापासून दूर जायची अपूची ही पहिलीच वेळ होती.आपला गाव आणि नदीकाठ त्याला माहित होता. पण नवाबगंजकडे जाणारा पक्का रस्ता त्याने अजून पाहिला नव्हता`. दुर्गा अपूपेक्षा मोठी.दिवसभर रानावनात, नदीकाठी मिळतील ती फळे शोधत फिरणारी. हे वाक्य मनाला चटका लावून जाते `मिठाई खरेदी करून मुलांना खाऊ घालणं ही गोष्ट दुर्गाच्या आई_वडिलांना का परवडण्यासारखी होती? निश्चंडीपूरच्या रानात जणू निसर्गानंच तिच्यासाठी मिठाईच हे दुकान उघडलं होतं. असे निसर्गच्रक धावत असते.कुटुंबासाठी हरीहर पौराहित्य करत गावोगावी फिरत असतो.कित्येक दिवस त्याची काही खबरबात नसते. आणि अखेर तो जीवघेणा क्षण येतो.खूप दिवस चाललेल्या वादळी पावसाने सर्वजयावर उपासमारीची वेळ येते.त्यात दुर्गा तापाने फणफणते आणि ओल्या अथंरूणातच प्राण सोडते! दुर्गा अपूजवळ आगगाडी पाहण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा अपूबरोबर आपलेही डोळे पाणावतात. हरीहर कुटुंबाला घेऊन बनारसला येतो.काही दिवस बरे जातात परंतू इथेही दैव पाठलाग सोडत नाही आणि हरीहरचा मृत्यू होतो.सर्वजया स्वंयपाकाची काहीबाही कामे करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते. अपूही लिहण वाचण शिकत असतो.या सगळ्या प्रवासात त्याला अनेक भलीबुरी माणसे भेटत जातात.अमलादी,रानूदी या दुर्गाच्या वयाच्या मुली,निरेनबाबू, राजपुत्र अजय,छोटी बहू प्रेमळ अशी बहुदी ! सर्व पात्रे कांदबरी मधे वेगवेगळे रंग भरतात. शेवटी `बोरोबाबूंकडून`वेताचा मार खाल्लेला अपू पुन्हा एकाकी होतो.त्याला जन्मगावी जाण्याची अनिवार इच्छा होते तरीही लेखक म्हणतात की, `आता तू थांबू शकत नाहीस. आता तू मागे जाऊ शकत नाहीस.तुला पुढेच चाललं पाहिजे`. वाचकांची उत्कंठा अशीच जिवंत ठेऊन कांदबरीचा शेवट होतो. ...Read more

  • Rating StarMedha Phadke Marathe

    मला अनुवाद खूप आवडतात. कारण त्यांद्वारा होणारी विविध ठिकाणांच्या संस्कृतींची ओळख. बिभूतिभूषण बॅनर्जी या बंगाली लेखकाचं पुस्तक. ज्यावर महान चित्रकर्मी सत्यजीत रे यांनी `पथेर पांचाली` हा अजरामर चित्रपट बनवला. पुस्तक चाळलं.. आवडलं.. लगेच घेतलं.. इके दिवस वाचू वाचू म्हणून राहिलं होतं.. काल रात्री जे वाचायला घेतलं ते खाली ठेववलंच नाही... एका बैठकीत पूर्ण केलं.. पथेर पांचाली म्हणजे रस्त्याचं गाणं..😊 प्रा. प्रसाद ठाकूर यांनी अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. अपू व त्याची बहीण दुर्गा यांचे गरीबीतले पण त्यातही छोट्या गोष्टींमधून आनंद शोधणारे निरागस बालपण.. बहीण भावांचे एकमेकांवरील प्रेम.. एक रम्य खेडे.. तिथला निसर्ग.. इच्छामती नदी.. वेळूबन.. अपूची छोट्या छोट्या गोष्टींमधील प्रचंड जिज्ञासा.. हे सर्व कसे आपल्याला रमवून.. खिळवून ठेवणारे.. दुर्गाचा मृत्यू.. हरिहर, सर्वजया व अपूने सोडलेले गाव.. बनारसमधला जीवनसंघर्ष.. हरिहरचा मृत्यू.. हे डोळ्यांत पाणी आणतं.. परंतु शेवटचा परिच्छेद.. हा अपूबरोबर आपल्याला सुद्धा उभारी देणारा.. मागे वळू नका.. पुढे चला👍👍 Hats off Prasad Thakur.. असेच सुंदर अनुवाद वाचायला मिळोत.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more