* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PATHER PANCHALI
  • Availability : Available
  • Translators : PRASAD THAKUR
  • ISBN : 9789353173890
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PATHER PANCHALI, TRANSLATED AS SONG OF THE ROAD IS A NOVEL WRITTEN BY BIBHUTIBHUSHAN BANDYOPADHYAY AND WAS LATER ADAPTED INTO A FILM OF THE SAME NAME BY SATYAJIT RAY. PATHER PANCHALI DEALS WITH THE LIFE OF THE ROY FAMILY, BOTH IN THEIR ANCESTRAL VILLAGE IN RURAL BENGAL AND LATER WHEN THEY MOVE TO VARANASI IN SEARCH OF A BETTER LIFE, AS WELL AS THE ANGUISH AND LOSS THEY FACE DURING THEIR TRAVELS. IT FIRST APPEARED AS A SERIAL IN A CALCUTTA PERIODICAL IN 1928 AND WAS PUBLISHED AS A BOOK THE NEXT YEAR; IT WAS THE FIRST PUBLISHED NOVEL WRITTEN BY THE AUTHOR.IT WAS FOLLOWED IN 1932 BY A SEQUEL APARAJITO, WHICH WAS LATER ALSO ADAPTED INTO A FILM OF THE SAME NAME BY SATYAJIT RAY.
बिभूतिभूषण बॅनर्जी यांची अभिजात कांदबरी. जवळपास शतकापूर्वीच्या बंगाली ग्रामीण जीवनाचं अनोखं चित्रण वाचकाला वेगळ्या विश्वात नेतं. दारिद्र्यग्रस्त जीवनात एका उमलत्या वयातल्या मुलाचा होत जाणारा मानसिक विकास आणि त्याचे मोहून टाकणारे चित्रण या कादंबरीची सशक्त बाजू आहे. तिचं सिनेमाच्या रूपातील माध्यमांतरही अभिजात कलाकृती म्हणून नावाजलं गेलं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पथेरपांचाली #बिभूतिभूषणबॅनर्जी #प्रसादठाकूर #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #बंगालीक्लासिक्स #सत्यजितरे #PATHERPANCHALI #BHIBUTIBHUSHANBANERJEE #PRASADTHAKUR #BENGALICLASSICS #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarArchana Nagawade

    आजवर अनेक दिग्गजांनी या महान कलाकृती बद्दल लिहलेले आहे.. थोडासा प्रयत्न वाचलेला अनुभव सांगण्याचा. प्रसाद ठाकूर यांनी अप्रतिम, सामान्य वाचकाला समजेल असा सुंदर अनुवाद केला आहे.. हरिहर रे या गरिब ब्राह्मणाच्या कुटुंबात त्याची दोन मुले दुर्गा _अपू,प्नी सर्वजया आणि एक दुरच्या नात्यातील वृद्ध आतल्या इंदिरा आहेत. कांदबरी ची सुरूवात या वृद्ध आत्यापासून होते जवळचे कोणीच नसलेली शरीराने थकलेली आणि केवळ नाईलाज म्हणून हरीहरच्या घरी राहणारी ही इंदिरा आपल्याला क्षणोक्षणी हेलावून सोडते! कारण सर्वजयाला ती क्षणभरही नजरेसमोर नको असते घासभर अन्नासाठी ती सर्व सहन करत राहते! दुर्गा ला मात्र इंदिराचा लळा असतो.शेवटी उपासमारीमुळे तिचा मृत्यू होतो. अठराविश्व दारिद्र्यातही दोन्ही मुले आपल्या परीने आपला आनंद शोधत असतात.मग नीळकंठ पक्षी पाहण्याची अपूची बाळबोध इच्छा असो की नीळ कारखाना पाहून त्याला वाटलेले अप्रूप असो! लेखकाची शब्दशैली बघा, `घरापासून दूर जायची अपूची ही पहिलीच वेळ होती.आपला गाव आणि नदीकाठ त्याला माहित होता. पण नवाबगंजकडे जाणारा पक्का रस्ता त्याने अजून पाहिला नव्हता`. दुर्गा अपूपेक्षा मोठी.दिवसभर रानावनात, नदीकाठी मिळतील ती फळे शोधत फिरणारी. हे वाक्य मनाला चटका लावून जाते `मिठाई खरेदी करून मुलांना खाऊ घालणं ही गोष्ट दुर्गाच्या आई_वडिलांना का परवडण्यासारखी होती? निश्चंडीपूरच्या रानात जणू निसर्गानंच तिच्यासाठी मिठाईच हे दुकान उघडलं होतं. असे निसर्गच्रक धावत असते.कुटुंबासाठी हरीहर पौराहित्य करत गावोगावी फिरत असतो.कित्येक दिवस त्याची काही खबरबात नसते. आणि अखेर तो जीवघेणा क्षण येतो.खूप दिवस चाललेल्या वादळी पावसाने सर्वजयावर उपासमारीची वेळ येते.त्यात दुर्गा तापाने फणफणते आणि ओल्या अथंरूणातच प्राण सोडते! दुर्गा अपूजवळ आगगाडी पाहण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा अपूबरोबर आपलेही डोळे पाणावतात. हरीहर कुटुंबाला घेऊन बनारसला येतो.काही दिवस बरे जातात परंतू इथेही दैव पाठलाग सोडत नाही आणि हरीहरचा मृत्यू होतो.सर्वजया स्वंयपाकाची काहीबाही कामे करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते. अपूही लिहण वाचण शिकत असतो.या सगळ्या प्रवासात त्याला अनेक भलीबुरी माणसे भेटत जातात.अमलादी,रानूदी या दुर्गाच्या वयाच्या मुली,निरेनबाबू, राजपुत्र अजय,छोटी बहू प्रेमळ अशी बहुदी ! सर्व पात्रे कांदबरी मधे वेगवेगळे रंग भरतात. शेवटी `बोरोबाबूंकडून`वेताचा मार खाल्लेला अपू पुन्हा एकाकी होतो.त्याला जन्मगावी जाण्याची अनिवार इच्छा होते तरीही लेखक म्हणतात की, `आता तू थांबू शकत नाहीस. आता तू मागे जाऊ शकत नाहीस.तुला पुढेच चाललं पाहिजे`. वाचकांची उत्कंठा अशीच जिवंत ठेऊन कांदबरीचा शेवट होतो. ...Read more

  • Rating StarMedha Phadke Marathe

    मला अनुवाद खूप आवडतात. कारण त्यांद्वारा होणारी विविध ठिकाणांच्या संस्कृतींची ओळख. बिभूतिभूषण बॅनर्जी या बंगाली लेखकाचं पुस्तक. ज्यावर महान चित्रकर्मी सत्यजीत रे यांनी `पथेर पांचाली` हा अजरामर चित्रपट बनवला. पुस्तक चाळलं.. आवडलं.. लगेच घेतलं.. इके दिवस वाचू वाचू म्हणून राहिलं होतं.. काल रात्री जे वाचायला घेतलं ते खाली ठेववलंच नाही... एका बैठकीत पूर्ण केलं.. पथेर पांचाली म्हणजे रस्त्याचं गाणं..😊 प्रा. प्रसाद ठाकूर यांनी अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. अपू व त्याची बहीण दुर्गा यांचे गरीबीतले पण त्यातही छोट्या गोष्टींमधून आनंद शोधणारे निरागस बालपण.. बहीण भावांचे एकमेकांवरील प्रेम.. एक रम्य खेडे.. तिथला निसर्ग.. इच्छामती नदी.. वेळूबन.. अपूची छोट्या छोट्या गोष्टींमधील प्रचंड जिज्ञासा.. हे सर्व कसे आपल्याला रमवून.. खिळवून ठेवणारे.. दुर्गाचा मृत्यू.. हरिहर, सर्वजया व अपूने सोडलेले गाव.. बनारसमधला जीवनसंघर्ष.. हरिहरचा मृत्यू.. हे डोळ्यांत पाणी आणतं.. परंतु शेवटचा परिच्छेद.. हा अपूबरोबर आपल्याला सुद्धा उभारी देणारा.. मागे वळू नका.. पुढे चला👍👍 Hats off Prasad Thakur.. असेच सुंदर अनुवाद वाचायला मिळोत.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.