* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PATHER PANCHALI
  • Availability : Available
  • Translators : PRASAD THAKUR
  • ISBN : 9789353173890
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PATHER PANCHALI, TRANSLATED AS SONG OF THE ROAD IS A NOVEL WRITTEN BY BIBHUTIBHUSHAN BANDYOPADHYAY AND WAS LATER ADAPTED INTO A FILM OF THE SAME NAME BY SATYAJIT RAY. PATHER PANCHALI DEALS WITH THE LIFE OF THE ROY FAMILY, BOTH IN THEIR ANCESTRAL VILLAGE IN RURAL BENGAL AND LATER WHEN THEY MOVE TO VARANASI IN SEARCH OF A BETTER LIFE, AS WELL AS THE ANGUISH AND LOSS THEY FACE DURING THEIR TRAVELS. IT FIRST APPEARED AS A SERIAL IN A CALCUTTA PERIODICAL IN 1928 AND WAS PUBLISHED AS A BOOK THE NEXT YEAR; IT WAS THE FIRST PUBLISHED NOVEL WRITTEN BY THE AUTHOR.IT WAS FOLLOWED IN 1932 BY A SEQUEL APARAJITO, WHICH WAS LATER ALSO ADAPTED INTO A FILM OF THE SAME NAME BY SATYAJIT RAY.
बिभूतिभूषण बॅनर्जी यांची अभिजात कांदबरी. जवळपास शतकापूर्वीच्या बंगाली ग्रामीण जीवनाचं अनोखं चित्रण वाचकाला वेगळ्या विश्वात नेतं. दारिद्र्यग्रस्त जीवनात एका उमलत्या वयातल्या मुलाचा होत जाणारा मानसिक विकास आणि त्याचे मोहून टाकणारे चित्रण या कादंबरीची सशक्त बाजू आहे. तिचं सिनेमाच्या रूपातील माध्यमांतरही अभिजात कलाकृती म्हणून नावाजलं गेलं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पथेरपांचाली #बिभूतिभूषणबॅनर्जी #प्रसादठाकूर #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #बंगालीक्लासिक्स #सत्यजितरे #PATHERPANCHALI #BHIBUTIBHUSHANBANERJEE #PRASADTHAKUR #BENGALICLASSICS #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarArchana Nagawade

    आजवर अनेक दिग्गजांनी या महान कलाकृती बद्दल लिहलेले आहे.. थोडासा प्रयत्न वाचलेला अनुभव सांगण्याचा. प्रसाद ठाकूर यांनी अप्रतिम, सामान्य वाचकाला समजेल असा सुंदर अनुवाद केला आहे.. हरिहर रे या गरिब ब्राह्मणाच्या कुटुंबात त्याची दोन मुले दुर्गा _अपू,प्नी सर्वजया आणि एक दुरच्या नात्यातील वृद्ध आतल्या इंदिरा आहेत. कांदबरी ची सुरूवात या वृद्ध आत्यापासून होते जवळचे कोणीच नसलेली शरीराने थकलेली आणि केवळ नाईलाज म्हणून हरीहरच्या घरी राहणारी ही इंदिरा आपल्याला क्षणोक्षणी हेलावून सोडते! कारण सर्वजयाला ती क्षणभरही नजरेसमोर नको असते घासभर अन्नासाठी ती सर्व सहन करत राहते! दुर्गा ला मात्र इंदिराचा लळा असतो.शेवटी उपासमारीमुळे तिचा मृत्यू होतो. अठराविश्व दारिद्र्यातही दोन्ही मुले आपल्या परीने आपला आनंद शोधत असतात.मग नीळकंठ पक्षी पाहण्याची अपूची बाळबोध इच्छा असो की नीळ कारखाना पाहून त्याला वाटलेले अप्रूप असो! लेखकाची शब्दशैली बघा, `घरापासून दूर जायची अपूची ही पहिलीच वेळ होती.आपला गाव आणि नदीकाठ त्याला माहित होता. पण नवाबगंजकडे जाणारा पक्का रस्ता त्याने अजून पाहिला नव्हता`. दुर्गा अपूपेक्षा मोठी.दिवसभर रानावनात, नदीकाठी मिळतील ती फळे शोधत फिरणारी. हे वाक्य मनाला चटका लावून जाते `मिठाई खरेदी करून मुलांना खाऊ घालणं ही गोष्ट दुर्गाच्या आई_वडिलांना का परवडण्यासारखी होती? निश्चंडीपूरच्या रानात जणू निसर्गानंच तिच्यासाठी मिठाईच हे दुकान उघडलं होतं. असे निसर्गच्रक धावत असते.कुटुंबासाठी हरीहर पौराहित्य करत गावोगावी फिरत असतो.कित्येक दिवस त्याची काही खबरबात नसते. आणि अखेर तो जीवघेणा क्षण येतो.खूप दिवस चाललेल्या वादळी पावसाने सर्वजयावर उपासमारीची वेळ येते.त्यात दुर्गा तापाने फणफणते आणि ओल्या अथंरूणातच प्राण सोडते! दुर्गा अपूजवळ आगगाडी पाहण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा अपूबरोबर आपलेही डोळे पाणावतात. हरीहर कुटुंबाला घेऊन बनारसला येतो.काही दिवस बरे जातात परंतू इथेही दैव पाठलाग सोडत नाही आणि हरीहरचा मृत्यू होतो.सर्वजया स्वंयपाकाची काहीबाही कामे करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते. अपूही लिहण वाचण शिकत असतो.या सगळ्या प्रवासात त्याला अनेक भलीबुरी माणसे भेटत जातात.अमलादी,रानूदी या दुर्गाच्या वयाच्या मुली,निरेनबाबू, राजपुत्र अजय,छोटी बहू प्रेमळ अशी बहुदी ! सर्व पात्रे कांदबरी मधे वेगवेगळे रंग भरतात. शेवटी `बोरोबाबूंकडून`वेताचा मार खाल्लेला अपू पुन्हा एकाकी होतो.त्याला जन्मगावी जाण्याची अनिवार इच्छा होते तरीही लेखक म्हणतात की, `आता तू थांबू शकत नाहीस. आता तू मागे जाऊ शकत नाहीस.तुला पुढेच चाललं पाहिजे`. वाचकांची उत्कंठा अशीच जिवंत ठेऊन कांदबरीचा शेवट होतो. ...Read more

  • Rating StarMedha Phadke Marathe

    मला अनुवाद खूप आवडतात. कारण त्यांद्वारा होणारी विविध ठिकाणांच्या संस्कृतींची ओळख. बिभूतिभूषण बॅनर्जी या बंगाली लेखकाचं पुस्तक. ज्यावर महान चित्रकर्मी सत्यजीत रे यांनी `पथेर पांचाली` हा अजरामर चित्रपट बनवला. पुस्तक चाळलं.. आवडलं.. लगेच घेतलं.. इके दिवस वाचू वाचू म्हणून राहिलं होतं.. काल रात्री जे वाचायला घेतलं ते खाली ठेववलंच नाही... एका बैठकीत पूर्ण केलं.. पथेर पांचाली म्हणजे रस्त्याचं गाणं..😊 प्रा. प्रसाद ठाकूर यांनी अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. अपू व त्याची बहीण दुर्गा यांचे गरीबीतले पण त्यातही छोट्या गोष्टींमधून आनंद शोधणारे निरागस बालपण.. बहीण भावांचे एकमेकांवरील प्रेम.. एक रम्य खेडे.. तिथला निसर्ग.. इच्छामती नदी.. वेळूबन.. अपूची छोट्या छोट्या गोष्टींमधील प्रचंड जिज्ञासा.. हे सर्व कसे आपल्याला रमवून.. खिळवून ठेवणारे.. दुर्गाचा मृत्यू.. हरिहर, सर्वजया व अपूने सोडलेले गाव.. बनारसमधला जीवनसंघर्ष.. हरिहरचा मृत्यू.. हे डोळ्यांत पाणी आणतं.. परंतु शेवटचा परिच्छेद.. हा अपूबरोबर आपल्याला सुद्धा उभारी देणारा.. मागे वळू नका.. पुढे चला👍👍 Hats off Prasad Thakur.. असेच सुंदर अनुवाद वाचायला मिळोत.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more