* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEVDAS
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177663310
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 124
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FIRST PUBLISHED IN BENGALI IN 1917, THE TRAGIC TALE OF DEVDAS HAS ENTHRALLED READERS AND FILMGOING AUDIENCES ALIKE FOR THE BETTER PART OF A CENTURY. THIS NEW TRANSLATION BRINGS THE CLASSIC TALE OF STAR-CROSSED LOVERS ALIVE FOR A NEW GENERATION OF READERS.
‘देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांना शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #DEVDAS #DEVDAS #देवदास #FICTION #TRANSLATEDFROMBENGALITOMARATHI #MRUNALINIGADKARI #मृणालिनी गडकरी #SARATCHANDRACHATTOPADHYAY "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DEVDAS by Sarat Chandra Chattopadhyay देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांन शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे.चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 17-11-2002

    ‘देवदास’चा सरस अनुवाद... प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आरंभ काळातील लेखन प्रक्रियेत ‘देवदास’ ही कादंबरी लिहिली. (सुमारे शंभर वर्षांपूर्वी) ती कादंबरी निव्वळ बंगाली वाचकांपुरतीच मर्यादित न राहता इतर भाषांतील रसिकांच्याही संतीस उतरली. ‘देवदास’ या छोट्याशा कादंबरीचे अनेक अनुवाद प्रकाशित झाले. मराठी रसिकांनी तिचे मनापासून स्वागत केले. ‘देवदास’ कादंबरी चित्रपट रूपातूनही अनेकदा भेटली. रसिकांनी तिचेही अगदी मनापासून स्वागत केले. शरदबाबूंनी रेखाटलेल्या हळुवार प्रेमकथेला वेगवेगळी परिमाणे लाभली. कथेचा मूळ आत्माच सशक्त असल्याने कादंबरीचा गाभाच रसिकांसमोर येत राहिला. देवदासची प्रीती म्हणूनच कुठे तरी प्रत्येकालाच भावली. निरागस बाल्यावस्थेत असणारी बालसुलभ ओढ तारुण्यात पदार्पण करताना प्रेमात परावर्तित होते आणि विलक्षण तरल प्रेमकहाणी आकाराला येते. शेवट देवदासच्या मृत्यूने होतो; पण तो शेवट नसतोच मुळी. तेथेच त्याग, संवेदनक्षमता, उत्कटता, अनिवार्यता यांची रूपे स्पष्ट होतात. तारुण्यात पदार्पण केलेला देवदास कोलकत्याला पोहोचता. तेथे त्याला पारूला विसरल्याचा भास होतो, भ्रम होतो; मात्र तेथेच त्याला पारूच्या ओढीतील आर्तता समजते. तिच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असल्याची जाणीव होते आणि इकडे पारू विजोड भुवनबाबूचा स्वीकार करून त्याचा संसार सावरायला लागते. लग्न करून ती भुवनच्या घरात जाते खरी; पण तिच्या मनावर मात्र देवदासचे नाव कायमचे कोरले गेलेले आहे. विवाहाचा उपचार सहजपणे स्वीकारून ती जगत आहे. ती जबाबदारी तिने पेलली आहे. तिचा संयम, त्याग थक्क करणारा आहे. नवऱ्याबरोबर खोट्या प्रतिष्ठेची झूल पांघरून, खोट्या कल्पना जपत ती जगत आहे; मात्र स्वत:च्या कोमल भावनाही तिनं त्याच ताकदीने दाबून ठेवलेल्या आहेत. खोट्या प्रतिष्ठेपायी तिची देवदासशी ताटातूट होते; मात्र याला देवदासही तितकाच जबाबदार आहे. तो दुबळ्या स्वभावामुळे निर्णय घेऊ शकत नाही. पारूच्या भावनेतील अस्सलपणा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच त्याला स्वत:चं मनही ओळखता येत नाही. त्याच्यात अहंकार आहे, जमीनदारामध्ये असणारी मग्रुरी त्याच्यात आहे, मात्र परंपरेची चौकट मोडण्याचे धैर्य, बंडखोरपणा त्याच्यात नाही आणि म्हणूनच तो स्वत:ची वंचना करून घेतो आणि व्यसनात स्वत:लाच बुडवून घेऊन आत्मनाश ओढवून घेतो. चंद्रमुखी पतिता जरूर आहे. पण सवंग नाही. तिच्या स्वच्छ मनात देवदासबद्दल अपार प्रीती आहे आणि म्हणूनच ती पारूचं त्याच्यावरचं प्रेम ओळखू शकलेली आहे. त्या काळातही तिच्यात असणारी अकृत्रिम भावना म्हणूनच वेगळी ठरते. नि:स्वार्थी चंद्रमुखी म्हणूनच लक्ष वेधून घेते. शंभर वर्षांपूर्वीच्या कालखंडातील ती म्हणूनच लक्षात राहते. मुख्य तिन्ही व्यक्तिरेखा वेगवेगळ्या आहेत; मात्र एकमेकांशी अनामिक बंधने बांधलेल्या आहेत, हे जाणवत राहते. साध्या साध्या शब्दांतून त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य उभे केले आहे. हळुवार संवाद मनाला साद घालत राहतात. तुटलेला दाह, फुलणारे मन, जळणारे हृदय, भीषण वास्तवातून आलेली व्याकुळता हे सारे अगदी ओघाने येत राहून मनाची पकड घेत राहते. मृणालिनी गडकरी यांनी देवदासचा अनुवाद करताना सरळसं अनुवाद केलेला नाही. मूळ कादंबरीचा पोत स्पष्ट करण्यात त्या यशस्वी ठरल्यात भाषेची लय, कथेचा अंत:स्वर, मूळे कथेचा प्रवाह जपताना त्यांनी सरस अनुवाद केला आहे. संवादात असणारा सोपेपणा भिडण्याची वृत्ती जशीच्या तशी ठेवण्यात त्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे एकाच बैठकीत कादंबरी पूर्ण करण्याची अनावर इच्छा रोखता येत नाही. -प्रसाद इनामदार ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 16-02-2003

    अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. ‘देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे. चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 06-10-2002

    प्रेम करायलाही हवा असतो एक ‘देवदास’... खूप गाजावाजा होऊन प्रदर्शित झालेला आणि अगदी काल परवापर्यंत चर्चेत राहिलेला ‘देवदास’ चित्रपट प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ या छोटेखानी कादंबरीवरून साकारला. या कादंबरीचा मृालिनी गडकरी यांनी केलेला हा मराठी अनुवाद चांगला उतरला आहे. चित्रपटामुळे ‘देवदास’ बाबत लोकांमध्ये जे आकर्षण निर्माण झाले आहे त्याचे औचित्य साधून हा अनुवाद प्रसिद्ध करून मेहता पब्लिशिंग हाऊसने व्यावसायिक कौशल्य तर साधले आहेच, शिवाय चित्रपट पाहिल्यानंतर किंवा चर्चेमुळे म्हणा, मूळ कादंबरी वाचण्याची जिज्ञासा ज्या मराठी वाचकांत निर्माण झाली असेल ती यामुळे पूर्ण होईल. या अगोदर या कादंबरीचा मराठी अनुवाद मामा वरेरकर यांनी केला होता. १९३०-४० असा तो जुना काळ आहे. त्यांनी केलेल्या अनुवादाचे पुस्तक सध्या सापडत नाही. ते दुर्मिळच आहे. त्यानंतर म्हणजे सुमार ६२ वर्षांच्या काळानंतर हा मराठी अनुवाद प्रसिद्ध होतो आहे. अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेची ‘नजाकत’ काय असते याचा अनुभव हा अनुवाद वाचताना लक्षात आल्याशिवाय राहत नाही. भाषेचा डामडौल न मिरवता सहज, उत्स्फूर्त अशी शरदबाबूंची भाषा अनुवादातही कायम ठेवण्यात गडकरी या यशस्वी झालेल्या आहेत. त्या-त्या भाषेचा आपला असा खास जामानिमा असतो. तो तसाच ठेवून अर्थाला आणि वळणाला धक्का न लावता अनुवाद साधणे हे कौशल्यच असते. ‘देवदास’ ही प्रेमकहाणी आहे हे सांगायला नको. प्रेमाच्या अनुषंगाने वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जो संघर्ष या कादंबरीमध्ये दाखविला आहे. त्यामधून मानवी परस्पर विरोधी भावनांचे विलोभनीय दर्शन अनुभवायला मिळते. देवदासची दुर्दशा प्रेमभंग झाल्याने झाली. ती तशी होणं किंवा करून घेणं याला जबाबदर कोण या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीसापेक्ष असू शकेल. मात्र शरदबाबूंनी कादंबरीच्या शेवटी त्यांचं मत सांगून टाकलंय. तेच खरं मनाला चटका लावून जाते. देवदासच्या मृत्यूनंतर त्यांनी शेवटी लिहिलंय. ‘‘आता पार्वती कशी आहे? तिचं पुढं काय झालं माहीत नाही. विचारायचीही इच्छा नाही. फक्त देवदासबद्दल खूप वाईट वाटतं तुम्ही कोणीही कथा वाचलीत तर आमच्यासारखं तुम्हालाही दु:ख होईल. जर देवदाससारख्या दुर्दैवी, मद्यासक्त, पाप्याबरोबर तुमची ओळख झाली तर त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासारखं मरण दुसऱ्या कोणाला कधीही येऊ नये, अशी प्रार्थना करा. मरणात हानी काही नाही. पण त्या वेळी एखादा प्रेमळ हात त्याच्या कपाळावर असावा, एखादा ममताळू स्नेहशील चेहरा पाहत-पाहत जीवनाचा अंत व्हावा, कोणाच्यातरी डोळ्यांतील अश्रू पाहता पाहता डोळे मिटावेत.’’ कादंबरीतील कथानकांच्या तोंडून जे संवाद घडतात ते वाचकाला विचार करायला लावतात. तशा प्रकारच्या संवादातूनच कथानक हळू-हळू फुलले आहे. देवदास आणि पारू, देवदास आणि चंद्रमुखी यांच्यातील संवाद त्यापैकीच. चंद्रमुखी आणि देवदास यांची अखेरची भेट होते. त्यावेळचा दोघांमधील संवाद साधा, सरळ वाटला तरी अर्थपूर्णतेमुळे तो वाचकांना निश्चितच भावतो. चंद्रमुखी थोडी थांबली. मग आवंढा गिळून म्हणाली, ‘‘मी आयुष्याचा बराच काळ प्रीतीचा धंदा करण्यात घालवलाय. पण प्रेम एकदाच केलंय, ते प्रेम फार किमती आहे. ती खूप शिकले. प्रेम वेगळं आणि रुपाचा मोह वेगळा. ह्या दोघांत गोंधळ केला जातो. पुरूषच तो जास्त करतात. रुपाचा मोह तुमच्यापेक्षा आम्हाला कमी असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या मस्तवाल होत नाही. तुम्ही बोलण्यावागण्यातून प्रेम दाखविता. पण आम्ही बोलत नाही. आमच्या मनातलं दु:ख कोणाला दिसत नाही.’’ (पृष्ठ ८५) ही प्रेमकहाणी असूनही भाषेतील सुसंस्कृतपणा शेवटपर्यंत थोडाही ढळलेली नाही. विसाव्या शतकाच्या आरंभीचा बंगाली ढाच्याचा काळाचा संदर्भ असल्याने त्या काळातील सामाजिक रुपरेषाही ही कादंबरी वाचताना लक्षात येते. ‘देवदास’बद्दलची केवळ जिज्ञासा म्हणूनच नव्हे तर प्रासादिक शैलीतील एका उत्तम साहित्यकृतीचा अनुभव घेण्यासाठी मराठी वाचकांनी हा अनुवाद वाचायलाच हवा. -प्रसाद शां. पोतदार ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more