* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEVDAS
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177663310
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 124
  • Language : TRANSLATED FROM BENGALI TO MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MRUNALINI GADKARI BIRTHDAY OFFER-14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FIRST PUBLISHED IN BENGALI IN 1917, THE TRAGIC TALE OF DEVDAS HAS ENTHRALLED READERS AND FILMGOING AUDIENCES ALIKE FOR THE BETTER PART OF A CENTURY. THIS NEW TRANSLATION BRINGS THE CLASSIC TALE OF STAR-CROSSED LOVERS ALIVE FOR A NEW GENERATION OF READERS.
‘देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांना शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #DEVDAS #DEVDAS #देवदास #FICTION #TRANSLATEDFROMBENGALITOMARATHI #MRUNALINIGADKARI #मृणालिनी गडकरी #SARATCHANDRACHATTOPADHYAY "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DEVDAS by Sarat Chandra Chattopadhyay देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांन शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे.चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 17-11-2002

    ‘देवदास’चा सरस अनुवाद... प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आरंभ काळातील लेखन प्रक्रियेत ‘देवदास’ ही कादंबरी लिहिली. (सुमारे शंभर वर्षांपूर्वी) ती कादंबरी निव्वळ बंगाली वाचकांपुरतीच मर्यादित न राहता इतर भाषांतील रसिकांच्याही संतीस उतरली. ‘देवदास’ या छोट्याशा कादंबरीचे अनेक अनुवाद प्रकाशित झाले. मराठी रसिकांनी तिचे मनापासून स्वागत केले. ‘देवदास’ कादंबरी चित्रपट रूपातूनही अनेकदा भेटली. रसिकांनी तिचेही अगदी मनापासून स्वागत केले. शरदबाबूंनी रेखाटलेल्या हळुवार प्रेमकथेला वेगवेगळी परिमाणे लाभली. कथेचा मूळ आत्माच सशक्त असल्याने कादंबरीचा गाभाच रसिकांसमोर येत राहिला. देवदासची प्रीती म्हणूनच कुठे तरी प्रत्येकालाच भावली. निरागस बाल्यावस्थेत असणारी बालसुलभ ओढ तारुण्यात पदार्पण करताना प्रेमात परावर्तित होते आणि विलक्षण तरल प्रेमकहाणी आकाराला येते. शेवट देवदासच्या मृत्यूने होतो; पण तो शेवट नसतोच मुळी. तेथेच त्याग, संवेदनक्षमता, उत्कटता, अनिवार्यता यांची रूपे स्पष्ट होतात. तारुण्यात पदार्पण केलेला देवदास कोलकत्याला पोहोचता. तेथे त्याला पारूला विसरल्याचा भास होतो, भ्रम होतो; मात्र तेथेच त्याला पारूच्या ओढीतील आर्तता समजते. तिच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असल्याची जाणीव होते आणि इकडे पारू विजोड भुवनबाबूचा स्वीकार करून त्याचा संसार सावरायला लागते. लग्न करून ती भुवनच्या घरात जाते खरी; पण तिच्या मनावर मात्र देवदासचे नाव कायमचे कोरले गेलेले आहे. विवाहाचा उपचार सहजपणे स्वीकारून ती जगत आहे. ती जबाबदारी तिने पेलली आहे. तिचा संयम, त्याग थक्क करणारा आहे. नवऱ्याबरोबर खोट्या प्रतिष्ठेची झूल पांघरून, खोट्या कल्पना जपत ती जगत आहे; मात्र स्वत:च्या कोमल भावनाही तिनं त्याच ताकदीने दाबून ठेवलेल्या आहेत. खोट्या प्रतिष्ठेपायी तिची देवदासशी ताटातूट होते; मात्र याला देवदासही तितकाच जबाबदार आहे. तो दुबळ्या स्वभावामुळे निर्णय घेऊ शकत नाही. पारूच्या भावनेतील अस्सलपणा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच त्याला स्वत:चं मनही ओळखता येत नाही. त्याच्यात अहंकार आहे, जमीनदारामध्ये असणारी मग्रुरी त्याच्यात आहे, मात्र परंपरेची चौकट मोडण्याचे धैर्य, बंडखोरपणा त्याच्यात नाही आणि म्हणूनच तो स्वत:ची वंचना करून घेतो आणि व्यसनात स्वत:लाच बुडवून घेऊन आत्मनाश ओढवून घेतो. चंद्रमुखी पतिता जरूर आहे. पण सवंग नाही. तिच्या स्वच्छ मनात देवदासबद्दल अपार प्रीती आहे आणि म्हणूनच ती पारूचं त्याच्यावरचं प्रेम ओळखू शकलेली आहे. त्या काळातही तिच्यात असणारी अकृत्रिम भावना म्हणूनच वेगळी ठरते. नि:स्वार्थी चंद्रमुखी म्हणूनच लक्ष वेधून घेते. शंभर वर्षांपूर्वीच्या कालखंडातील ती म्हणूनच लक्षात राहते. मुख्य तिन्ही व्यक्तिरेखा वेगवेगळ्या आहेत; मात्र एकमेकांशी अनामिक बंधने बांधलेल्या आहेत, हे जाणवत राहते. साध्या साध्या शब्दांतून त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य उभे केले आहे. हळुवार संवाद मनाला साद घालत राहतात. तुटलेला दाह, फुलणारे मन, जळणारे हृदय, भीषण वास्तवातून आलेली व्याकुळता हे सारे अगदी ओघाने येत राहून मनाची पकड घेत राहते. मृणालिनी गडकरी यांनी देवदासचा अनुवाद करताना सरळसं अनुवाद केलेला नाही. मूळ कादंबरीचा पोत स्पष्ट करण्यात त्या यशस्वी ठरल्यात भाषेची लय, कथेचा अंत:स्वर, मूळे कथेचा प्रवाह जपताना त्यांनी सरस अनुवाद केला आहे. संवादात असणारा सोपेपणा भिडण्याची वृत्ती जशीच्या तशी ठेवण्यात त्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे एकाच बैठकीत कादंबरी पूर्ण करण्याची अनावर इच्छा रोखता येत नाही. -प्रसाद इनामदार ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 16-02-2003

    अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. ‘देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे. चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 06-10-2002

    प्रेम करायलाही हवा असतो एक ‘देवदास’... खूप गाजावाजा होऊन प्रदर्शित झालेला आणि अगदी काल परवापर्यंत चर्चेत राहिलेला ‘देवदास’ चित्रपट प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ या छोटेखानी कादंबरीवरून साकारला. या कादंबरीचा मृालिनी गडकरी यांनी केलेला हा मराठी अनुवाद चांगला उतरला आहे. चित्रपटामुळे ‘देवदास’ बाबत लोकांमध्ये जे आकर्षण निर्माण झाले आहे त्याचे औचित्य साधून हा अनुवाद प्रसिद्ध करून मेहता पब्लिशिंग हाऊसने व्यावसायिक कौशल्य तर साधले आहेच, शिवाय चित्रपट पाहिल्यानंतर किंवा चर्चेमुळे म्हणा, मूळ कादंबरी वाचण्याची जिज्ञासा ज्या मराठी वाचकांत निर्माण झाली असेल ती यामुळे पूर्ण होईल. या अगोदर या कादंबरीचा मराठी अनुवाद मामा वरेरकर यांनी केला होता. १९३०-४० असा तो जुना काळ आहे. त्यांनी केलेल्या अनुवादाचे पुस्तक सध्या सापडत नाही. ते दुर्मिळच आहे. त्यानंतर म्हणजे सुमार ६२ वर्षांच्या काळानंतर हा मराठी अनुवाद प्रसिद्ध होतो आहे. अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेची ‘नजाकत’ काय असते याचा अनुभव हा अनुवाद वाचताना लक्षात आल्याशिवाय राहत नाही. भाषेचा डामडौल न मिरवता सहज, उत्स्फूर्त अशी शरदबाबूंची भाषा अनुवादातही कायम ठेवण्यात गडकरी या यशस्वी झालेल्या आहेत. त्या-त्या भाषेचा आपला असा खास जामानिमा असतो. तो तसाच ठेवून अर्थाला आणि वळणाला धक्का न लावता अनुवाद साधणे हे कौशल्यच असते. ‘देवदास’ ही प्रेमकहाणी आहे हे सांगायला नको. प्रेमाच्या अनुषंगाने वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जो संघर्ष या कादंबरीमध्ये दाखविला आहे. त्यामधून मानवी परस्पर विरोधी भावनांचे विलोभनीय दर्शन अनुभवायला मिळते. देवदासची दुर्दशा प्रेमभंग झाल्याने झाली. ती तशी होणं किंवा करून घेणं याला जबाबदर कोण या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीसापेक्ष असू शकेल. मात्र शरदबाबूंनी कादंबरीच्या शेवटी त्यांचं मत सांगून टाकलंय. तेच खरं मनाला चटका लावून जाते. देवदासच्या मृत्यूनंतर त्यांनी शेवटी लिहिलंय. ‘‘आता पार्वती कशी आहे? तिचं पुढं काय झालं माहीत नाही. विचारायचीही इच्छा नाही. फक्त देवदासबद्दल खूप वाईट वाटतं तुम्ही कोणीही कथा वाचलीत तर आमच्यासारखं तुम्हालाही दु:ख होईल. जर देवदाससारख्या दुर्दैवी, मद्यासक्त, पाप्याबरोबर तुमची ओळख झाली तर त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासारखं मरण दुसऱ्या कोणाला कधीही येऊ नये, अशी प्रार्थना करा. मरणात हानी काही नाही. पण त्या वेळी एखादा प्रेमळ हात त्याच्या कपाळावर असावा, एखादा ममताळू स्नेहशील चेहरा पाहत-पाहत जीवनाचा अंत व्हावा, कोणाच्यातरी डोळ्यांतील अश्रू पाहता पाहता डोळे मिटावेत.’’ कादंबरीतील कथानकांच्या तोंडून जे संवाद घडतात ते वाचकाला विचार करायला लावतात. तशा प्रकारच्या संवादातूनच कथानक हळू-हळू फुलले आहे. देवदास आणि पारू, देवदास आणि चंद्रमुखी यांच्यातील संवाद त्यापैकीच. चंद्रमुखी आणि देवदास यांची अखेरची भेट होते. त्यावेळचा दोघांमधील संवाद साधा, सरळ वाटला तरी अर्थपूर्णतेमुळे तो वाचकांना निश्चितच भावतो. चंद्रमुखी थोडी थांबली. मग आवंढा गिळून म्हणाली, ‘‘मी आयुष्याचा बराच काळ प्रीतीचा धंदा करण्यात घालवलाय. पण प्रेम एकदाच केलंय, ते प्रेम फार किमती आहे. ती खूप शिकले. प्रेम वेगळं आणि रुपाचा मोह वेगळा. ह्या दोघांत गोंधळ केला जातो. पुरूषच तो जास्त करतात. रुपाचा मोह तुमच्यापेक्षा आम्हाला कमी असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या मस्तवाल होत नाही. तुम्ही बोलण्यावागण्यातून प्रेम दाखविता. पण आम्ही बोलत नाही. आमच्या मनातलं दु:ख कोणाला दिसत नाही.’’ (पृष्ठ ८५) ही प्रेमकहाणी असूनही भाषेतील सुसंस्कृतपणा शेवटपर्यंत थोडाही ढळलेली नाही. विसाव्या शतकाच्या आरंभीचा बंगाली ढाच्याचा काळाचा संदर्भ असल्याने त्या काळातील सामाजिक रुपरेषाही ही कादंबरी वाचताना लक्षात येते. ‘देवदास’बद्दलची केवळ जिज्ञासा म्हणूनच नव्हे तर प्रासादिक शैलीतील एका उत्तम साहित्यकृतीचा अनुभव घेण्यासाठी मराठी वाचकांनी हा अनुवाद वाचायलाच हवा. -प्रसाद शां. पोतदार ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more