* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEVDAS
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177663310
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 124
  • Language : TRANSLATED FROM BENGALI TO MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MRUNALINI GADKARI BIRTHDAY OFFER-14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FIRST PUBLISHED IN BENGALI IN 1917, THE TRAGIC TALE OF DEVDAS HAS ENTHRALLED READERS AND FILMGOING AUDIENCES ALIKE FOR THE BETTER PART OF A CENTURY. THIS NEW TRANSLATION BRINGS THE CLASSIC TALE OF STAR-CROSSED LOVERS ALIVE FOR A NEW GENERATION OF READERS.
‘देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांना शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #DEVDAS #DEVDAS #देवदास #FICTION #TRANSLATEDFROMBENGALITOMARATHI #MRUNALINIGADKARI #मृणालिनी गडकरी #SARATCHANDRACHATTOPADHYAY "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DEVDAS by Sarat Chandra Chattopadhyay देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांन शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे.चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 17-11-2002

    ‘देवदास’चा सरस अनुवाद... प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आरंभ काळातील लेखन प्रक्रियेत ‘देवदास’ ही कादंबरी लिहिली. (सुमारे शंभर वर्षांपूर्वी) ती कादंबरी निव्वळ बंगाली वाचकांपुरतीच मर्यादित न राहता इतर भाषांतील रसिकांच्याही संतीस उतरली. ‘देवदास’ या छोट्याशा कादंबरीचे अनेक अनुवाद प्रकाशित झाले. मराठी रसिकांनी तिचे मनापासून स्वागत केले. ‘देवदास’ कादंबरी चित्रपट रूपातूनही अनेकदा भेटली. रसिकांनी तिचेही अगदी मनापासून स्वागत केले. शरदबाबूंनी रेखाटलेल्या हळुवार प्रेमकथेला वेगवेगळी परिमाणे लाभली. कथेचा मूळ आत्माच सशक्त असल्याने कादंबरीचा गाभाच रसिकांसमोर येत राहिला. देवदासची प्रीती म्हणूनच कुठे तरी प्रत्येकालाच भावली. निरागस बाल्यावस्थेत असणारी बालसुलभ ओढ तारुण्यात पदार्पण करताना प्रेमात परावर्तित होते आणि विलक्षण तरल प्रेमकहाणी आकाराला येते. शेवट देवदासच्या मृत्यूने होतो; पण तो शेवट नसतोच मुळी. तेथेच त्याग, संवेदनक्षमता, उत्कटता, अनिवार्यता यांची रूपे स्पष्ट होतात. तारुण्यात पदार्पण केलेला देवदास कोलकत्याला पोहोचता. तेथे त्याला पारूला विसरल्याचा भास होतो, भ्रम होतो; मात्र तेथेच त्याला पारूच्या ओढीतील आर्तता समजते. तिच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असल्याची जाणीव होते आणि इकडे पारू विजोड भुवनबाबूचा स्वीकार करून त्याचा संसार सावरायला लागते. लग्न करून ती भुवनच्या घरात जाते खरी; पण तिच्या मनावर मात्र देवदासचे नाव कायमचे कोरले गेलेले आहे. विवाहाचा उपचार सहजपणे स्वीकारून ती जगत आहे. ती जबाबदारी तिने पेलली आहे. तिचा संयम, त्याग थक्क करणारा आहे. नवऱ्याबरोबर खोट्या प्रतिष्ठेची झूल पांघरून, खोट्या कल्पना जपत ती जगत आहे; मात्र स्वत:च्या कोमल भावनाही तिनं त्याच ताकदीने दाबून ठेवलेल्या आहेत. खोट्या प्रतिष्ठेपायी तिची देवदासशी ताटातूट होते; मात्र याला देवदासही तितकाच जबाबदार आहे. तो दुबळ्या स्वभावामुळे निर्णय घेऊ शकत नाही. पारूच्या भावनेतील अस्सलपणा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच त्याला स्वत:चं मनही ओळखता येत नाही. त्याच्यात अहंकार आहे, जमीनदारामध्ये असणारी मग्रुरी त्याच्यात आहे, मात्र परंपरेची चौकट मोडण्याचे धैर्य, बंडखोरपणा त्याच्यात नाही आणि म्हणूनच तो स्वत:ची वंचना करून घेतो आणि व्यसनात स्वत:लाच बुडवून घेऊन आत्मनाश ओढवून घेतो. चंद्रमुखी पतिता जरूर आहे. पण सवंग नाही. तिच्या स्वच्छ मनात देवदासबद्दल अपार प्रीती आहे आणि म्हणूनच ती पारूचं त्याच्यावरचं प्रेम ओळखू शकलेली आहे. त्या काळातही तिच्यात असणारी अकृत्रिम भावना म्हणूनच वेगळी ठरते. नि:स्वार्थी चंद्रमुखी म्हणूनच लक्ष वेधून घेते. शंभर वर्षांपूर्वीच्या कालखंडातील ती म्हणूनच लक्षात राहते. मुख्य तिन्ही व्यक्तिरेखा वेगवेगळ्या आहेत; मात्र एकमेकांशी अनामिक बंधने बांधलेल्या आहेत, हे जाणवत राहते. साध्या साध्या शब्दांतून त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य उभे केले आहे. हळुवार संवाद मनाला साद घालत राहतात. तुटलेला दाह, फुलणारे मन, जळणारे हृदय, भीषण वास्तवातून आलेली व्याकुळता हे सारे अगदी ओघाने येत राहून मनाची पकड घेत राहते. मृणालिनी गडकरी यांनी देवदासचा अनुवाद करताना सरळसं अनुवाद केलेला नाही. मूळ कादंबरीचा पोत स्पष्ट करण्यात त्या यशस्वी ठरल्यात भाषेची लय, कथेचा अंत:स्वर, मूळे कथेचा प्रवाह जपताना त्यांनी सरस अनुवाद केला आहे. संवादात असणारा सोपेपणा भिडण्याची वृत्ती जशीच्या तशी ठेवण्यात त्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे एकाच बैठकीत कादंबरी पूर्ण करण्याची अनावर इच्छा रोखता येत नाही. -प्रसाद इनामदार ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 16-02-2003

    अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. ‘देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे. चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 06-10-2002

    प्रेम करायलाही हवा असतो एक ‘देवदास’... खूप गाजावाजा होऊन प्रदर्शित झालेला आणि अगदी काल परवापर्यंत चर्चेत राहिलेला ‘देवदास’ चित्रपट प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ या छोटेखानी कादंबरीवरून साकारला. या कादंबरीचा मृालिनी गडकरी यांनी केलेला हा मराठी अनुवाद चांगला उतरला आहे. चित्रपटामुळे ‘देवदास’ बाबत लोकांमध्ये जे आकर्षण निर्माण झाले आहे त्याचे औचित्य साधून हा अनुवाद प्रसिद्ध करून मेहता पब्लिशिंग हाऊसने व्यावसायिक कौशल्य तर साधले आहेच, शिवाय चित्रपट पाहिल्यानंतर किंवा चर्चेमुळे म्हणा, मूळ कादंबरी वाचण्याची जिज्ञासा ज्या मराठी वाचकांत निर्माण झाली असेल ती यामुळे पूर्ण होईल. या अगोदर या कादंबरीचा मराठी अनुवाद मामा वरेरकर यांनी केला होता. १९३०-४० असा तो जुना काळ आहे. त्यांनी केलेल्या अनुवादाचे पुस्तक सध्या सापडत नाही. ते दुर्मिळच आहे. त्यानंतर म्हणजे सुमार ६२ वर्षांच्या काळानंतर हा मराठी अनुवाद प्रसिद्ध होतो आहे. अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेची ‘नजाकत’ काय असते याचा अनुभव हा अनुवाद वाचताना लक्षात आल्याशिवाय राहत नाही. भाषेचा डामडौल न मिरवता सहज, उत्स्फूर्त अशी शरदबाबूंची भाषा अनुवादातही कायम ठेवण्यात गडकरी या यशस्वी झालेल्या आहेत. त्या-त्या भाषेचा आपला असा खास जामानिमा असतो. तो तसाच ठेवून अर्थाला आणि वळणाला धक्का न लावता अनुवाद साधणे हे कौशल्यच असते. ‘देवदास’ ही प्रेमकहाणी आहे हे सांगायला नको. प्रेमाच्या अनुषंगाने वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जो संघर्ष या कादंबरीमध्ये दाखविला आहे. त्यामधून मानवी परस्पर विरोधी भावनांचे विलोभनीय दर्शन अनुभवायला मिळते. देवदासची दुर्दशा प्रेमभंग झाल्याने झाली. ती तशी होणं किंवा करून घेणं याला जबाबदर कोण या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीसापेक्ष असू शकेल. मात्र शरदबाबूंनी कादंबरीच्या शेवटी त्यांचं मत सांगून टाकलंय. तेच खरं मनाला चटका लावून जाते. देवदासच्या मृत्यूनंतर त्यांनी शेवटी लिहिलंय. ‘‘आता पार्वती कशी आहे? तिचं पुढं काय झालं माहीत नाही. विचारायचीही इच्छा नाही. फक्त देवदासबद्दल खूप वाईट वाटतं तुम्ही कोणीही कथा वाचलीत तर आमच्यासारखं तुम्हालाही दु:ख होईल. जर देवदाससारख्या दुर्दैवी, मद्यासक्त, पाप्याबरोबर तुमची ओळख झाली तर त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासारखं मरण दुसऱ्या कोणाला कधीही येऊ नये, अशी प्रार्थना करा. मरणात हानी काही नाही. पण त्या वेळी एखादा प्रेमळ हात त्याच्या कपाळावर असावा, एखादा ममताळू स्नेहशील चेहरा पाहत-पाहत जीवनाचा अंत व्हावा, कोणाच्यातरी डोळ्यांतील अश्रू पाहता पाहता डोळे मिटावेत.’’ कादंबरीतील कथानकांच्या तोंडून जे संवाद घडतात ते वाचकाला विचार करायला लावतात. तशा प्रकारच्या संवादातूनच कथानक हळू-हळू फुलले आहे. देवदास आणि पारू, देवदास आणि चंद्रमुखी यांच्यातील संवाद त्यापैकीच. चंद्रमुखी आणि देवदास यांची अखेरची भेट होते. त्यावेळचा दोघांमधील संवाद साधा, सरळ वाटला तरी अर्थपूर्णतेमुळे तो वाचकांना निश्चितच भावतो. चंद्रमुखी थोडी थांबली. मग आवंढा गिळून म्हणाली, ‘‘मी आयुष्याचा बराच काळ प्रीतीचा धंदा करण्यात घालवलाय. पण प्रेम एकदाच केलंय, ते प्रेम फार किमती आहे. ती खूप शिकले. प्रेम वेगळं आणि रुपाचा मोह वेगळा. ह्या दोघांत गोंधळ केला जातो. पुरूषच तो जास्त करतात. रुपाचा मोह तुमच्यापेक्षा आम्हाला कमी असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या मस्तवाल होत नाही. तुम्ही बोलण्यावागण्यातून प्रेम दाखविता. पण आम्ही बोलत नाही. आमच्या मनातलं दु:ख कोणाला दिसत नाही.’’ (पृष्ठ ८५) ही प्रेमकहाणी असूनही भाषेतील सुसंस्कृतपणा शेवटपर्यंत थोडाही ढळलेली नाही. विसाव्या शतकाच्या आरंभीचा बंगाली ढाच्याचा काळाचा संदर्भ असल्याने त्या काळातील सामाजिक रुपरेषाही ही कादंबरी वाचताना लक्षात येते. ‘देवदास’बद्दलची केवळ जिज्ञासा म्हणूनच नव्हे तर प्रासादिक शैलीतील एका उत्तम साहित्यकृतीचा अनुभव घेण्यासाठी मराठी वाचकांनी हा अनुवाद वाचायलाच हवा. -प्रसाद शां. पोतदार ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो