BIBHUTIBHUSHAN BANERJEE

About Author

Birth Date : 12/09/1894
Death Date : 01/11/1950


BIBHUTIBHUSHAN BANDYOPADHYAY WAS AN INDIAN BENGALI AUTHOR, AND ONE OF THE LEADING WRITERS OF MODERN BENGALI LITERATURE. HIS BEST KNOWN WORK IS THE AUTOBIOGRAPHICAL NOVEL, PATHER PANCHALI (THE SONG OF THE ROAD). HE WAS POSTHUMOUSLY AWARDED THE RABINDRA PURASKAR IN 1951, THE MOST PRESTIGIOUS LITERARY AWARD IN WEST BENGAL, FOR HIS NOVEL ICHHAMATI.

बिभूतीभूषण बॅनर्जी हे बंगाली साहित्यातील अग्रणी नाव. त्यांचा जन्म पशम बंगाल येथील मूर्तिपूर येथे झाला. ब्रिटिशकालीन भारतातील कोलकत्त्यातील नावाजलेल्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयातून (तत्कालीन रिपॉन महाविद्यालय) त्यांनी इतिहास,अर्थशास्त्र आणि संस्कृतमधील पदवी शिक्षण घेतले. चरितार्थासाठी त्यांना पदव्युत्तर शिक्षण सोडून जंगिपारा येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारावी लागली. शैक्षणिक सेवा बजावत असतानाच त्यांनी लेखनाची कास धरली. 1921 साली त्यांची पहिली कथा ‘उपेक्षिता’ प्रसिद्ध झाली. पण 1928 साली प्रकाशित झालल्या ‘पाथेर पांचाली’ कादंबरीने त्यांना भारतीय साहित्यात महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं. याच मालिकेतील त्यांची पुढील कादंबरी ‘अपराजिता’ ही विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली. या दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित आणि सत्यजित रे दिग्दर्शित ‘अपूर संसार’ या सिनेमाने कादंबरीच्या नायकाला नवी ओळख दिली. बिभूतीभूषण बॅनर्जी यांनी विपूल कादंबरी लेखन केलं. ज्यातील अनेक कादंबऱ्या रूपांतरणाच्या माध्यमातून सिनेमाच्या पडद्यावर झळकल्या. 1951 साली त्यांना पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेच्या ‘रबिंद्र पुरस्कारा’ने (मरणोत्तर) गौरवण्यात आलं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PATHER PANCHALI Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more