BIBHUTIBHUSHAN BANERJEE

About Author

Birth Date : 12/09/1894
Death Date : 01/11/1950


BIBHUTIBHUSHAN BANDYOPADHYAY WAS AN INDIAN BENGALI AUTHOR, AND ONE OF THE LEADING WRITERS OF MODERN BENGALI LITERATURE. HIS BEST KNOWN WORK IS THE AUTOBIOGRAPHICAL NOVEL, PATHER PANCHALI (THE SONG OF THE ROAD). HE WAS POSTHUMOUSLY AWARDED THE RABINDRA PURASKAR IN 1951, THE MOST PRESTIGIOUS LITERARY AWARD IN WEST BENGAL, FOR HIS NOVEL ICHHAMATI.

बिभूतीभूषण बॅनर्जी हे बंगाली साहित्यातील अग्रणी नाव. त्यांचा जन्म पशम बंगाल येथील मूर्तिपूर येथे झाला. ब्रिटिशकालीन भारतातील कोलकत्त्यातील नावाजलेल्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयातून (तत्कालीन रिपॉन महाविद्यालय) त्यांनी इतिहास,अर्थशास्त्र आणि संस्कृतमधील पदवी शिक्षण घेतले. चरितार्थासाठी त्यांना पदव्युत्तर शिक्षण सोडून जंगिपारा येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारावी लागली. शैक्षणिक सेवा बजावत असतानाच त्यांनी लेखनाची कास धरली. 1921 साली त्यांची पहिली कथा ‘उपेक्षिता’ प्रसिद्ध झाली. पण 1928 साली प्रकाशित झालल्या ‘पाथेर पांचाली’ कादंबरीने त्यांना भारतीय साहित्यात महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं. याच मालिकेतील त्यांची पुढील कादंबरी ‘अपराजिता’ ही विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली. या दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित आणि सत्यजित रे दिग्दर्शित ‘अपूर संसार’ या सिनेमाने कादंबरीच्या नायकाला नवी ओळख दिली. बिभूतीभूषण बॅनर्जी यांनी विपूल कादंबरी लेखन केलं. ज्यातील अनेक कादंबऱ्या रूपांतरणाच्या माध्यमातून सिनेमाच्या पडद्यावर झळकल्या. 1951 साली त्यांना पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेच्या ‘रबिंद्र पुरस्कारा’ने (मरणोत्तर) गौरवण्यात आलं.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
29 %
OFF
BIBHUTIBHUSHAN BANERJEE BIRTHDAY OFFER Rating Star
Add To Cart INR 395 INR 279
PATHER PANCHALI Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.