LEENA DAMALE

About Author

Birth Date : 04/08/1959


INDIAS PARTICIPATION IN THE STARS OF ASIA PROJECT HELD IN JAPAN-TOKYO. THE PROJECT COLLECTED MYTHOLOGICAL STORIES RELATED TO ASTRONOMY IN ASIAN COUNTRIES. BOOKS ON THIS ARE PUBLISHED IN ENGLISH AND OTHER ASIAN LANGUAGES.

एम. एस्सी. (न्युक्लिअर फिजिक्स) जर्मन भाषा (सर्टिफिकेट कोर्स - ३ वर्षे) लीना दामले यांनी माहेर , मानिनी , स्त्री , किर्लोस्कर व गृहशोभा ह्या लोकप्रिय मासिकांमधून लघुकथा आणि उद्याची पिढी आणि टीनातली मुले याविषयांवर माहेर ह्या मासिकामधून लेख मालिका प्रकाशित केल्या आहेत. पुरुषस्य:चरित्रम निवडक मराठी लघुकथासंग्रह, प्रपंच प्रकाशन (२००४) त्याशिवाय ताऱ्यांची जीवन कथा मालिका, लोकसत्ता (२००५) आणि लहान मुलांसाठी खगोलशास्त्रावर आधारित मालिका, सकाळ (२००२) च्या सदरात प्रकाशित. आकाशमित्र पुणे, खगोलशास्त्र विषयक संस्थेच्या सदस्या. २००५ साली कथारुपी खगोलशास्त्र , ह्या पुस्तकाची मेहता पब्लिशिंग हाऊसची प्रथमावृत्ती लगेच संपली व २००८ साली द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली. २००६ साली ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (बालसाहित्य) मिळाला. साहित्य प्रेमी भगिनी मंडळ , पुणे या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या. विज्ञान मंथन विज्ञान मालिका, विपुलश्री मासिकातून (२००८) प्रसिद्ध. जपान-टोकियोमध्ये झालेल्या स्टार्स ऑफ एशिया प्रकल्पात भारताच्यावतीने सहभाग. प्रकल्पाद्वारे एशियाई देशांतील खगोलशास्त्राशी निगडीत पौराणिक कथांचा संग्रह करण्यात आला. इंग्लिश आणि अन्य एशियाई भाषांमध्ये यावर पुस्तके प्रसिद्ध.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ANTARIKSHACHYA ANTARANGAT Rating Star
Add To Cart INR 180
ASHAKYA BHAUTIKI Rating Star
Add To Cart INR 350
KATHARUPI KHAGOLSHASTRA Rating Star
Add To Cart INR 170
NATE BRAHMANDACHE Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more