LEENA DAMALE

About Author

Birth Date : 04/08/1959


INDIAS PARTICIPATION IN THE STARS OF ASIA PROJECT HELD IN JAPAN-TOKYO. THE PROJECT COLLECTED MYTHOLOGICAL STORIES RELATED TO ASTRONOMY IN ASIAN COUNTRIES. BOOKS ON THIS ARE PUBLISHED IN ENGLISH AND OTHER ASIAN LANGUAGES.

एम. एस्सी. (न्युक्लिअर फिजिक्स) जर्मन भाषा (सर्टिफिकेट कोर्स - ३ वर्षे) लीना दामले यांनी माहेर , मानिनी , स्त्री , किर्लोस्कर व गृहशोभा ह्या लोकप्रिय मासिकांमधून लघुकथा आणि उद्याची पिढी आणि टीनातली मुले याविषयांवर माहेर ह्या मासिकामधून लेख मालिका प्रकाशित केल्या आहेत. पुरुषस्य:चरित्रम निवडक मराठी लघुकथासंग्रह, प्रपंच प्रकाशन (२००४) त्याशिवाय ताऱ्यांची जीवन कथा मालिका, लोकसत्ता (२००५) आणि लहान मुलांसाठी खगोलशास्त्रावर आधारित मालिका, सकाळ (२००२) च्या सदरात प्रकाशित. आकाशमित्र पुणे, खगोलशास्त्र विषयक संस्थेच्या सदस्या. २००५ साली कथारुपी खगोलशास्त्र , ह्या पुस्तकाची मेहता पब्लिशिंग हाऊसची प्रथमावृत्ती लगेच संपली व २००८ साली द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली. २००६ साली ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (बालसाहित्य) मिळाला. साहित्य प्रेमी भगिनी मंडळ , पुणे या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या. विज्ञान मंथन विज्ञान मालिका, विपुलश्री मासिकातून (२००८) प्रसिद्ध. जपान-टोकियोमध्ये झालेल्या स्टार्स ऑफ एशिया प्रकल्पात भारताच्यावतीने सहभाग. प्रकल्पाद्वारे एशियाई देशांतील खगोलशास्त्राशी निगडीत पौराणिक कथांचा संग्रह करण्यात आला. इंग्लिश आणि अन्य एशियाई भाषांमध्ये यावर पुस्तके प्रसिद्ध.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ANTARIKSHACHYA ANTRANAGAT Rating Star
Add To Cart INR 180
ASHAKYA BHAUTIKI Rating Star
Add To Cart INR 350
KATHARUPI KHAGOLSHASTRA Rating Star
Add To Cart INR 170
NATE BRAHMANDACHE Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more