* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MUGHAL HIGH NOON:THE ASCENT OF AURANGZEB
  • Availability : Available
  • Translators : UDAY BHIDE
  • ISBN : 9789353170189
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HISTORICAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IN THE MID-SEVENTEENTH CENTURY, THE SONS OF AILING MUGHAL EMPEROR, SHAH JAHAN—DARA, SHUJA, AURANGZEB AND MURAD—ARE LOCKED IN A FIERCE STRUGGLE FOR SUCCESSION. AS SHAH JAHAN’S TREATMENT IS KEPT UNDER STRICT SUPERVISION, RUMOURS BEGIN TO SWIRL. IS THE EMPEROR ALIVE? OR IS HIS DEATH BEING KEPT A CLOSELY-GUARDED SECRET? IT’S IMPOSSIBLE TO KNOW FOR CERTAIN, SINCE THE SPIES AND AGENTS OF THE KINGDOM TRADE IN MISINFORMATION AND HALF-TRUTHS AND ONLY HEIGHTEN THE TENSION BETWEEN THE BROTHERS. IN THIS ATMOSPHERE OF PALACE INTRIGUE AND CHICANERY—AS MURAD ACQUIRES A REPUTATION FOR OVERINDULGENCE, DARA FOR SENSITIVITY AND SHUJA FOR IMPULSIVENESS—THE STAGE SEEMS SET FOR A POWER-HUNGRY AURANGZEB TO MAKE HIS ASCENT AS EMPEROR. HOWEVER, WILL AURANGZEB’S QUEST FOR DOMINATION BECOME HIS ULTIMATE UNDOING? THE MUGHAL HIGH NOON, WITH MASTER BRUSHSTROKES, EXPLORES QUESTIONS OF POWER, FAITH AND CONTENTMENT. "
मुघल सत्तेचा सारिपाट ही कादंबरी सत्ताग्रहण, श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांचा लेखणीच्या लालित्यपूर्ण फटकाऱ्याद्वारा धांडोळा घेते. या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण, दगाबाज़ मुघल, आणि वासना, वारुणी आणि अफूच्या नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे रेखन आहे. तसेच शिकारीच्या नावाखाली निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांनादेखील सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णनदेखील आहे. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे अतिशय चांगले चित्रण या कथानकातून उलगडते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#AURANGJEB#SHAHAJAHAN#MUGHALS#DARA#SHUJA#17THCENTURY
Customer Reviews
  • Rating StarYashashri Rahalkar

    पुस्तक:- मुघल सत्तेचा सारिपाट प्रकार:- अनुवाद प्रकाशक :- मेहता प्रकाशन मूळ पुस्तक :- The Mughal High Noon मूळ लेखक :- श्रीनिवास राव अडिगे अनुवाद :- उदय भिडे मला मुळातच अनुवादित पुस्तके वाचायला आवडतात, त्यातही मेहताच्या पुस्तकांना प्रथम पसंती सते... ह्या अनुवादाचं वैशिष्ट्य असं की कुठेच वाचताना अडथळा जाणवत नाही... अतिशय प्रभावी ओघवती भाषा. पुस्तकातील घटना, बारकावे, प्रसंग चित्रण खूप अभ्यासपूर्ण ... चित्रमयता आणि छोटे छोटे बारकावे विशेष उल्लेखनीय. हे पुस्तक म्हणजे औरंगजेबाचा सत्तारोहणाचा संघर्ष आहे... मुघलसम्राट शहाजहान प्रकृती अस्वास्थ्याने मृत्यूशय्येवर पडला असतांना त्याचे चार मुले दारा, शुजा, औरंगजेब आणि मुराद ह्यांच्यातील सत्तासंघर्षात... औरंगजेब काय काय करतो आणि कसा यशस्वी होतो ह्याचे वर्णन करणारा साधारण 50 वर्षे कालखंडाचे चित्रण करणारा हा कथाप्रवास... कथा कुठेच रेंगाळली किंवा भरकटली नाही. कुठेही कुणालाच नायक किंवा खलनायक म्हणून रंगवले नाही तर सत्तासंघर्ष आणि सत्तालालसा उत्तम चितारली आहे..👍 पुस्तक आवडले नक्की वाचावे असे..👏👏 ✒️ यशश्री रहाळकर, नाशिक ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 20-03-2020

    सत्तापिपासू राजकारणावर दृष्टिक्षेप... भारताचा राजकीय इतिहास मुघल साम्राज्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. तब्बल ३५० वर्षे दिल्लीच्या तख्तावर मुघलांनी राज्य केले. बाबरपासून सुरू झालेल्या या साम्राज्यात महत्त्वपूर्ण काळ आहे औरंगजेब बादशाहचा. गाबाजी करून आणि आपल्या साऱ्या भावंडांना बाजूला सारून औरंगजेबाने सत्तारोहण केले. ‘मुघल सत्तेचा सारिपाट’ ही कादंबरी औरंगजेब सत्तारूढ होण्यासंदर्भातील घटनांवर सखोल दृष्टिक्षेप टाकते. श्रीनिवास राव अडिगे यांच्या ‘द मुघल हाय नून’ या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद उदय भिडे यांनी केला असून सत्तेच्या लालसेपोटी एकमेकांचा काटा काढणाऱ्या मुघल साम्राज्याविषयी ही कादंबरी माहिती देते. १७व्या शतकाच्या मध्यकाळात प्रकृतिस्वास्थ्य बिघडल्यामुळे मुघल सम्राट शहाजहान मृत्युशय्येवर आहे. मात्र पित्याच्या पश्चात सत्ता कुणी हस्तगत करावी यासाठी शहाजहानची चारही मुले आपापसात झुंजत आहेत. दारा, शुजा, औरंगजेब आणि मुराद ही शहाजहानची चार मुले. या चारही मुलांची स्वभाववैशिष्ट्ये, वागणूक यांचे वर्णन कादंबरीत करण्यात आले आहे. शहाजहानचा थोरला मुलगा दार शुकोह त्याच्या अतिसंवेदनशीलतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्याची ही अतिसंवेदनशीलताच सत्ता हस्तगत करण्यात त्याच्या आड येते, हे या कादंबरीत दाखवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये थांबलेला दारा आपल्या पित्याची नीट काळजी घेत आहे. अत्यंत कडक बंदोबस्तात शहाजहानवर उपचार सुरू असताना पित्याबाबत दार शुकोहला वाटत असलेली काळजी या कादंबरीत दाखवण्यात आली आहे. हकिमाच्या औषधांचा गुण येत नसल्याचे दिसताच तो पित्यावर गुपचूप एका हिंदू वैद्याकडून उपचार करून घेतो. हिंदू वैद्यालाही शहाजहानवर कडेकोट बंदोबस्तात उपचार करावे लागले हे सांगत ही कादंबरी तत्कालीन राजकीय सामाजिक परिस्थिती आपल्यापुढे उभी करते. मुघल बादशहावर अत्यंत कडक बंदोबस्तात उपचार सुरू असल्याने अफवांचे पीक भरमसाठ फोफावते. त्यामुळे दिल्लीपासून दूर असलेल्या अन्य तीन भावंडांना चुकीची आणि अर्धवट माहिती मिळत राहते आणि त्यामुळे त्यांच्यातील सत्तासंघर्ष वाढत जातो. मुघल साम्राज्यातील गुप्तहेर आणि हस्तकांनी चुकीची माहिती आणि त्याबरोबरच अर्धसत्य गोष्टी पसरवल्याने भावाभावांतील तणाव कसा वाढत जातो याचे वर्णन ही कादंबरी करते. या कादंबरीत प्रत्येक पात्राची गुण वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहेत. शहाजहानचा धाकटा मुलगा मुराद याची अतिभोगलालसा आणि शुजा याच्या आतातायीपणाचे वर्णन कादंबरीत करण्यात आले आहे. दारा, मुराद आणि शुजा यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे सम्राट म्हणून दिल्लीच्या तख्ताचे सत्तारोहण करण्यासाठी औरंगजेबासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, याचे वर्णन या कादंबरीत करण्यात आले आहे. सत्ताग्रहण, श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांना या कादंबरीत लालित्यपूर्ण पद्धतीने धांडोळा घेण्यात आला आहे. या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण, दगाबाज मुघल तसेच वासना, नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे चित्रण आहे. शिकारीच्या नावाखाली शुजाकडून निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांना सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णन या कादंबरीत आहे. कादंबरीची भाषा ओघवती असली तरी कादंबरी असल्याने ऐतिहासिक वस्तुस्थितीऐवजी काल्पनिक घटनांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येते. अनेक घटना इतिहासची मोडतोड केलेल्या वाटतात. एखाद्या चित्रपटाप्रमाणे उलगडत जात ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे चांगले चित्रण या कथानकातून करण्यात आले आहे. – संदीप नलावडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 02-09-2018

    सतराव्या शतकाच्या मध्यकाळात मुघल साम्राज्यात घडलेल्या सत्तेच्या सारिपाटाची ही कहाणी. श्रीनिवास राव अडिगे यांनी लिहिलेल्या ‘द मुघल हाय नून’ या मूळ इंग्लिश कादंबरीचा अनुवाद उदय भिडे यांनी केला आहे. सम्राट शहाजहान आजारी पडल्यानंतर दारा शुको, शुजा, औरंगजब आणि मुराद ही मुलं सत्ता हस्तगत करण्यासाठी आपसांत झुंजतात. या काळात झालेली कारस्थानं, घडामोडी आणि औरंगजेबाचा सत्तेपर्यंतचा प्रवास ही कादंबरी मांडते. एखाद्या चित्रपटासारखी उलगडत जाणारी ही कादंबरी गुंतवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more