U.R.ANANTMURTY

About Author

Birth Date : 21/12/1932
Death Date : 22/08/2014


UDUPI RAJAGOPALACHARYA ANANTHAMURTHY WAS AN INDIAN CONTEMPORARY WRITER AND CRITIC IN THE KANNADA LANGUAGE. HE WAS BORN IN THIRTAHALLI TALUK AND IS CONSIDERED ONE OF THE PIONEERS OF THE NAVYA MOVEMENT.

२१ डिसेंबर १९३२ मध्ये शिमोगा जिल्ह्यातल्या तीर्थहळ्ळी तालुक्यात मेलिंगे इथं अनंतमूर्तींचा जन्म झाला. सुरुवातीचं शिक्षण पारंपरिक संस्कृत शाळेत झालं. एम. ए. झाल्यानंतर इंग्रजीचे प्रोफेसर म्हणून काम करतानाच कॉमनवेल्थची शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठातून १९६६ मध्ये ‘पॉलिटिक्स अ‍ॅण्ड फिक्शन इन द नाइंटीन थर्टीज’ हा प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. केरळच्या कोट्टायम इथल्या महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून १९८७ ते १९९१ पर्यंत त्यांनी काम पाहिलं. १९९२ला नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन म्हणून, तसंच १९९३ला साहित्य अकादमीचे प्रेसिंडेट म्हणून त्यांची नेमणूक झाली. ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे’ चेअरमन म्हणून दोन वेळा त्यांची निवड झाली होती. २०१२ मध्ये कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीचे ते पहिले कुलगुरू म्हणून निवडले गेले. भारतात तसंच भारताबाहेर अनेक परिसंवादांत त्यांनी लेखक, तसंच उत्तम वक्ता म्हणून भाषणं दिली आहेत. संस्कार, भव, भारतीपुरा आणि अवस्थे या त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती. निरनिराळ्या घटनांमध्ये, परिस्थितीमध्ये माणसाचे मनोव्यापार काय पद्धतीनं चालतात, याबद्दल अनंतमूर्तीचं लेखन प्रामुख्यानं भाष्य करतं. कर्नाटकातल्या ब्राह्मण समाजापुढची आव्हानं आणि घडत असणारे बदल याविषयी त्यांच्या साहित्यात ऊहापोह केलेला आढळतो. त्यांच्या बऱ्याचशा कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. उदा. संस्कारा, बारा, अवास्ते, मौनी आणि दीक्षा. बायको इस्थर तसंच दोन मुलं शरत आणि अनुराधा असं त्यांचं कुटुंब आहे. १९९४ला ज्ञानपीठ पुरस्कार, १९९८ला पद्मभूषण, २००४ला साहित्य अकादमी फेलोशिप, २०१३ला मॅनबुकर इंटरनॅशनल प्राईजसाठी नामांकन आणि याशिवाय असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. २२ ऑगस्ट २०१४ रोजी हृदयविकारांनं त्यांचं निधन झालं. ‘सुरागी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AVASTHA Rating Star
Add To Cart INR 160
SANSKAR Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more