U.R.ANANTMURTY

About Author

Birth Date : 21/12/1932
Death Date : 22/08/2014


UDUPI RAJAGOPALACHARYA ANANTHAMURTHY WAS AN INDIAN CONTEMPORARY WRITER AND CRITIC IN THE KANNADA LANGUAGE. HE WAS BORN IN THIRTAHALLI TALUK AND IS CONSIDERED ONE OF THE PIONEERS OF THE NAVYA MOVEMENT.

२१ डिसेंबर १९३२ मध्ये शिमोगा जिल्ह्यातल्या तीर्थहळ्ळी तालुक्यात मेलिंगे इथं अनंतमूर्तींचा जन्म झाला. सुरुवातीचं शिक्षण पारंपरिक संस्कृत शाळेत झालं. एम. ए. झाल्यानंतर इंग्रजीचे प्रोफेसर म्हणून काम करतानाच कॉमनवेल्थची शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठातून १९६६ मध्ये ‘पॉलिटिक्स अ‍ॅण्ड फिक्शन इन द नाइंटीन थर्टीज’ हा प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. केरळच्या कोट्टायम इथल्या महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून १९८७ ते १९९१ पर्यंत त्यांनी काम पाहिलं. १९९२ला नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन म्हणून, तसंच १९९३ला साहित्य अकादमीचे प्रेसिंडेट म्हणून त्यांची नेमणूक झाली. ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे’ चेअरमन म्हणून दोन वेळा त्यांची निवड झाली होती. २०१२ मध्ये कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीचे ते पहिले कुलगुरू म्हणून निवडले गेले. भारतात तसंच भारताबाहेर अनेक परिसंवादांत त्यांनी लेखक, तसंच उत्तम वक्ता म्हणून भाषणं दिली आहेत. संस्कार, भव, भारतीपुरा आणि अवस्थे या त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती. निरनिराळ्या घटनांमध्ये, परिस्थितीमध्ये माणसाचे मनोव्यापार काय पद्धतीनं चालतात, याबद्दल अनंतमूर्तीचं लेखन प्रामुख्यानं भाष्य करतं. कर्नाटकातल्या ब्राह्मण समाजापुढची आव्हानं आणि घडत असणारे बदल याविषयी त्यांच्या साहित्यात ऊहापोह केलेला आढळतो. त्यांच्या बऱ्याचशा कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. उदा. संस्कारा, बारा, अवास्ते, मौनी आणि दीक्षा. बायको इस्थर तसंच दोन मुलं शरत आणि अनुराधा असं त्यांचं कुटुंब आहे. १९९४ला ज्ञानपीठ पुरस्कार, १९९८ला पद्मभूषण, २००४ला साहित्य अकादमी फेलोशिप, २०१३ला मॅनबुकर इंटरनॅशनल प्राईजसाठी नामांकन आणि याशिवाय असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. २२ ऑगस्ट २०१४ रोजी हृदयविकारांनं त्यांचं निधन झालं. ‘सुरागी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AVASTHA Rating Star
Add To Cart INR 160
SANSKAR Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more