* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666335
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK `VERUL LENYATIL SHILP VAIBHAV` IS BASED ON THE RESEARCH WORK ON THE SCULPTURES OF ELLORA. THE MAGNIFICENT GROUP OF ROCK CUT CAVES OR THE ROCK TEMPLES AT ELLORA REPRESENT THREE DIFFERENT FAITHS. BUDDHISIM, HINDUISM AND JAINISM. IT MARKS THE FINAL STAGE OF CULMINATIONAL ROCK TEMPLE ARCHITECTURE, IN WESTERN INDIA. BEING ONE OF THE GREATEST MONUMENTS OF THE WORLD ELLORA FIGURES IN THE LIST OF THE MONUMENTS OF HUMAN HERITAGE. THE ELLORA CAVES NESTLE IN THE LAP OF THE CHARANADRI HILLS, WHICH IS AN EXTENSION OF THE WESTERN HILLS FAMOUSLY KNOWN AS SAHYADRI, AND ARE SITUATED 26 K.M. AWAY FROM THE FAMOUS HISTORICAL CITY AURANGABAD. THESE CAVES ARE SPREAD IN AND AROUND 2 K.M. OF DISTANCE. THESE ROCK CUT CAVES REPRESENT THREE RELIGIOUS SEATS AND WERE CHIEFLY PATRONIZED BY CHALUKYA AND RASHTRAKUTA RULARS. OUT OF MANY CAVES, 34 CAVES ARE NUMBERED AND ARE DIVIDED IN THE THREE GROUPS, BUDDHIST, HINDU AND JAINS. AT ELLORA, THE MAJOR SIGNIFICANT EXCAVATORY ACTIVITIES WERE CARRIED OUT FROM THE MIDDLE OF THE SIXTH CENTURY TO THE END OF TENTH CENTURY. THE HISTORICAL BACK GROUND, AND THE CULTURAL AND MYTHOLOGICAL IMPORTANCE OF THE SCULPTURES IN ALL THREE GROUPS OF CAVES AT ELLORA HAS BEEN DISCUSSED IN THE BOOK. ALL THE INFORMATION REGARDING THE CAVE ARCHITECTURE AS WELL AS THE DETAILS AT THE ICONOGRAPHIC IMPORTANCE OF THE SCULPTURES HAS BEEN DESCRIBED ELABORATELY IN ALL THE CHAPTERS OF THE BOOK. A MARATHI READER CAN HAVE A PERFECT IDEA ABOUT THE CAVE’S ARCHITECTURE AS WELL AS THE SCULPTURE IN THE CAVES.
‘वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव’ हे पुस्तक लेखिका राधिका टिपरे यांनी इतिहास आणि पुराणे यांचा सूक्ष्म अभ्यास करून लिहिले आहे. शिल्पांच्या मुद्रेवरील भावभावनांचा वेध घेत, त्यांच्याशी संवाद साधत लालित्यपूर्ण शैलीत त्यांनी शिल्पांचे तपशीलवार वर्णन केले आहे. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मीयांनी राजाश्रयाने तीन कालखंडात या लेण्यांची निर्मिती केली आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून प्रारंभ झालेली निर्मिती प्रक्रिया एक हजार सालापर्यंत सुरू होती. अगणित अनाम शिल्पकारांनी पिढ्यांन्पिढ्या परिश्रम करून हे अद्भुत शिल्पविश्व साकारले आहे, तेही मर्यादित साधनांच्या साहाय्याने. भारताला प्राचीन अशी सांस्कृतिक परंपरा आहे. उदार, सहिष्णू आणि चंडप्रतापी राज्यकत्यांचे शासन त्या काळी आQस्तत्वात होते. भारतात अनेक ठिकाणी लेण्यांतील विलोभनीय शिल्पकला तत्कालीन कलेची साक्ष देत आहे. औरंगाबादजवळील वेरूळची लेणी त्यातलीच एक. सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरातील पाषाण खोदून त्यात कोरलेली समूहशिल्पे वेद-उपनिषिदे, पुराणांतील देव-देवता आणि त्यांचे अलौकित्व विषद करतात. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिाQस्थतीचे प्रतिबिंब या शिल्पकलेतून व्यक्त होते. जीवनमूल्यांना आध्यात्मिक आधार देणारी शिल्पकला आपल्याला जीवन जगण्याची नवी दृष्टी देते. द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण, आकार-निराकार आणि परमेश्वराची निरामयता या गोष्टींना मानवी पातळीवर उद्धृत केले आहे ते या शिल्पकलेनेच. काळ्या पत्थरातून जिवंत झालेला आपला भूतकाळ कोरीव शिल्पांतून मूकपणे आपल्याशी संवाद साधीत असतो. मूर्तीमधून जणू भावनांचा स्रोत निर्माण होतो, तो आपल्या व्यक्त-अव्यक्त अशा कल्पनांना छेद देणारा ‘लोकसंवाद’च असतो. या पुस्तकातील वेरूळ लेण्यातील प्रत्येक शिल्पाचा इतिहास किंवा पौराणिक संदर्भ वाचून लेण्यांचे अवलोकन केले, तर मिळणारा आनंद वैÂक पटींनी अधिक असेल, यात शंकाच नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VERULCAVES#AJANTACAVES# "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VERULLENYATEELSHILPAVAIBHAV #VERULLENYATEELSHILPAVAIBHAV #वेरूळले‌‍‌णयातीलशील्पवैभव #REFERENCEANDGENERAL #MARATHI #RADHIKATIPARE "
Customer Reviews
  • Rating StarPRIYA DEEPAK KARADKAR, DOMBIVALI

    सौ.राधिका टिपरे यांनी त्यांच्या अभ्यासादरम्यान ‘वेरूळ चे लेणे’ हा विषय लघु प्रबंधासाठी निवडला आणि या शिल्पकलेबद्दल त्यांना ओढ निर्माण झाली व या पुस्तकाद्वारे वेरूळ च्या लहान-मोठ्या शिल्पाबद्दल सामग्र माहिती आपल्या समोर आणली. काळ्या पाषाणातून अनामकलाकारांनी निर्मिलेली ही शिल्पकला इतिहासाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. हिंदू, बौद्ध व जैन धर्माच्या प्रसारासाठी या कलेची निर्मिती झाली असे सर्वमान्य दिसते. या शिल्पकलेचे प्रमुख केंद्र म्हणजे मंदिरे, आणि मंदिरांच्या सुशोभनासाठी या शिल्पकलेचा पुरेपूर वापर केला गेला असे त्या म्हणतात. या पुस्तकात वेरूळ लेण्याची पार्श्वभूमी, घृष्णेश्वर शिवमंदिर, भौगोलिक ओळख, मराठी साहित्यात असलेले उल्लेख, ज्ञानेश्वरीतील उल्लेख, उपलब्ध इतर प्रवास उल्लेख, ऐतिहासिक पार्श्वभूमी, कालखंड इत्यादि नमूद आहे. बऱ्याच शिल्पाचे अगदी बारकाईने वर्णन केले आहे. भिंतीवरील शिल्पाची रेलचेल, आकार, त्यांची वस्त्रे, आभूषणे, चेह-यावरील हावभाव नमूद केले आहे. एके ठिकाणी असे वर्णन आहे की – “अवलोकितेश्वरच्या उजव्या बाजूला कोरलेली उभी स्त्री प्रतिमा एक विलक्षण सुंदर स्त्रीची आहे. अतिशय आकर्षक, कमनीय दहयष्टि असलेल्या या स्त्रीची केशरचनाही आकर्षक असून त्यावर घातलेला रत्नजडित मुकुट ही लक्षणीय आहे.....” तसेच तेथे रामायण व महाभारत मधील काही महत्वाचे शिल्पपट देखील आहेत... रावणानुग्रहमूर्तीस रावण कैलास पर्वत हलवत असतानाचे शिल्प आहे... आपले जागतिक वारसा स्थळ ‘कैलास लेणे’ याची खूपच महत्वपूर्ण माहिती यात आहे..... राग, लोभ, मद, मत्सर, कारुण्य, भय हे सारे विकार या निर्जीव शिल्पांच्या मुखांवर उत्कट रीतीने रेखांकीत आहेत असे त्या सांगतातच परंतु ते जसेच्या तसे लिहून देखील काढतात.... तत्कालीन समाजातील सर्वच स्तरातील जीवनशैलीचे प्रतिबिंब या शिल्पात आढळतात. स्त्रियांचे नाजूक सौंदर्य व पुरुषाचे बलशाली पौरुषत्व तसेच खालच्या वर्गातील दासदसींना त्यांच्या वेगळेपणासह चित्रांकीत केले आहेत.... वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहाते... शिवाय या पुस्तकात काही गुंफेतील रेखाचित्र व त्याचे थोडक्यात वर्णन आहेत ज्यामुळे आपणास ब-यापैकी अंदाज येतो... मला आठवते की मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे पहायचा योग आला होता तेव्हा तेथील गाईड आम्हाला म्हणाला होता की आपल्याला मंदिरा बाहेरील मानवी शिल्प नक्की कोणते आहे कळत नाहीत, अशा वेळी त्यांची आयुधे, मुकुट, आभूषणे यावरून ते नक्की कोणते ते ओळखता येते...... मी स्वतः कधीही वेरूळ लेण्या पहिल्या नाहीत, परंतु हे पुस्तक वाचताना सैर करून आले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.