* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666335
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK `VERUL LENYATIL SHILP VAIBHAV` IS BASED ON THE RESEARCH WORK ON THE SCULPTURES OF ELLORA. THE MAGNIFICENT GROUP OF ROCK CUT CAVES OR THE ROCK TEMPLES AT ELLORA REPRESENT THREE DIFFERENT FAITHS. BUDDHISIM, HINDUISM AND JAINISM. IT MARKS THE FINAL STAGE OF CULMINATIONAL ROCK TEMPLE ARCHITECTURE, IN WESTERN INDIA. BEING ONE OF THE GREATEST MONUMENTS OF THE WORLD ELLORA FIGURES IN THE LIST OF THE MONUMENTS OF HUMAN HERITAGE. THE ELLORA CAVES NESTLE IN THE LAP OF THE CHARANADRI HILLS, WHICH IS AN EXTENSION OF THE WESTERN HILLS FAMOUSLY KNOWN AS SAHYADRI, AND ARE SITUATED 26 K.M. AWAY FROM THE FAMOUS HISTORICAL CITY AURANGABAD. THESE CAVES ARE SPREAD IN AND AROUND 2 K.M. OF DISTANCE. THESE ROCK CUT CAVES REPRESENT THREE RELIGIOUS SEATS AND WERE CHIEFLY PATRONIZED BY CHALUKYA AND RASHTRAKUTA RULARS. OUT OF MANY CAVES, 34 CAVES ARE NUMBERED AND ARE DIVIDED IN THE THREE GROUPS, BUDDHIST, HINDU AND JAINS. AT ELLORA, THE MAJOR SIGNIFICANT EXCAVATORY ACTIVITIES WERE CARRIED OUT FROM THE MIDDLE OF THE SIXTH CENTURY TO THE END OF TENTH CENTURY. THE HISTORICAL BACK GROUND, AND THE CULTURAL AND MYTHOLOGICAL IMPORTANCE OF THE SCULPTURES IN ALL THREE GROUPS OF CAVES AT ELLORA HAS BEEN DISCUSSED IN THE BOOK. ALL THE INFORMATION REGARDING THE CAVE ARCHITECTURE AS WELL AS THE DETAILS AT THE ICONOGRAPHIC IMPORTANCE OF THE SCULPTURES HAS BEEN DESCRIBED ELABORATELY IN ALL THE CHAPTERS OF THE BOOK. A MARATHI READER CAN HAVE A PERFECT IDEA ABOUT THE CAVE’S ARCHITECTURE AS WELL AS THE SCULPTURE IN THE CAVES.
‘वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव’ हे पुस्तक लेखिका राधिका टिपरे यांनी इतिहास आणि पुराणे यांचा सूक्ष्म अभ्यास करून लिहिले आहे. शिल्पांच्या मुद्रेवरील भावभावनांचा वेध घेत, त्यांच्याशी संवाद साधत लालित्यपूर्ण शैलीत त्यांनी शिल्पांचे तपशीलवार वर्णन केले आहे. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मीयांनी राजाश्रयाने तीन कालखंडात या लेण्यांची निर्मिती केली आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून प्रारंभ झालेली निर्मिती प्रक्रिया एक हजार सालापर्यंत सुरू होती. अगणित अनाम शिल्पकारांनी पिढ्यांन्पिढ्या परिश्रम करून हे अद्भुत शिल्पविश्व साकारले आहे, तेही मर्यादित साधनांच्या साहाय्याने. भारताला प्राचीन अशी सांस्कृतिक परंपरा आहे. उदार, सहिष्णू आणि चंडप्रतापी राज्यकत्यांचे शासन त्या काळी आQस्तत्वात होते. भारतात अनेक ठिकाणी लेण्यांतील विलोभनीय शिल्पकला तत्कालीन कलेची साक्ष देत आहे. औरंगाबादजवळील वेरूळची लेणी त्यातलीच एक. सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरातील पाषाण खोदून त्यात कोरलेली समूहशिल्पे वेद-उपनिषिदे, पुराणांतील देव-देवता आणि त्यांचे अलौकित्व विषद करतात. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिास्थतीचे प्रतिबिंब या शिल्पकलेतून व्यक्त होते. जीवनमूल्यांना आध्यात्मिक आधार देणारी शिल्पकला आपल्याला जीवन जगण्याची नवी दृष्टी देते. द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण, आकार-निराकार आणि परमेश्वराची निरामयता या गोष्टींना मानवी पातळीवर उद्धृत केले आहे ते या शिल्पकलेनेच. काळ्या पत्थरातून जिवंत झालेला आपला भूतकाळ कोरीव शिल्पांतून मूकपणे आपल्याशी संवाद साधीत असतो. मूर्तीमधून जणू भावनांचा स्रोत निर्माण होतो, तो आपल्या व्यक्त-अव्यक्त अशा कल्पनांना छेद देणारा ‘लोकसंवाद’च असतो. या पुस्तकातील वेरूळ लेण्यातील प्रत्येक शिल्पाचा इतिहास किंवा पौराणिक संदर्भ वाचून लेण्यांचे अवलोकन केले, तर मिळणारा आनंद वैक पटींनी अधिक असेल, यात शंकाच नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VERULCAVES#AJANTACAVES# "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VERULLENYATEELSHILPAVAIBHAV #VERULLENYATEELSHILPAVAIBHAV #वेरूळले‌‍‌णयातीलशील्पवैभव #REFERENCEANDGENERAL #MARATHI #RADHIKATIPARE "
Customer Reviews
  • Rating StarPRIYA DEEPAK KARADKAR, DOMBIVALI

    सौ.राधिका टिपरे यांनी त्यांच्या अभ्यासादरम्यान ‘वेरूळ चे लेणे’ हा विषय लघु प्रबंधासाठी निवडला आणि या शिल्पकलेबद्दल त्यांना ओढ निर्माण झाली व या पुस्तकाद्वारे वेरूळ च्या लहान-मोठ्या शिल्पाबद्दल सामग्र माहिती आपल्या समोर आणली. काळ्या पाषाणातून अनामकलाकारांनी निर्मिलेली ही शिल्पकला इतिहासाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. हिंदू, बौद्ध व जैन धर्माच्या प्रसारासाठी या कलेची निर्मिती झाली असे सर्वमान्य दिसते. या शिल्पकलेचे प्रमुख केंद्र म्हणजे मंदिरे, आणि मंदिरांच्या सुशोभनासाठी या शिल्पकलेचा पुरेपूर वापर केला गेला असे त्या म्हणतात. या पुस्तकात वेरूळ लेण्याची पार्श्वभूमी, घृष्णेश्वर शिवमंदिर, भौगोलिक ओळख, मराठी साहित्यात असलेले उल्लेख, ज्ञानेश्वरीतील उल्लेख, उपलब्ध इतर प्रवास उल्लेख, ऐतिहासिक पार्श्वभूमी, कालखंड इत्यादि नमूद आहे. बऱ्याच शिल्पाचे अगदी बारकाईने वर्णन केले आहे. भिंतीवरील शिल्पाची रेलचेल, आकार, त्यांची वस्त्रे, आभूषणे, चेह-यावरील हावभाव नमूद केले आहे. एके ठिकाणी असे वर्णन आहे की – “अवलोकितेश्वरच्या उजव्या बाजूला कोरलेली उभी स्त्री प्रतिमा एक विलक्षण सुंदर स्त्रीची आहे. अतिशय आकर्षक, कमनीय दहयष्टि असलेल्या या स्त्रीची केशरचनाही आकर्षक असून त्यावर घातलेला रत्नजडित मुकुट ही लक्षणीय आहे.....” तसेच तेथे रामायण व महाभारत मधील काही महत्वाचे शिल्पपट देखील आहेत... रावणानुग्रहमूर्तीस रावण कैलास पर्वत हलवत असतानाचे शिल्प आहे... आपले जागतिक वारसा स्थळ ‘कैलास लेणे’ याची खूपच महत्वपूर्ण माहिती यात आहे..... राग, लोभ, मद, मत्सर, कारुण्य, भय हे सारे विकार या निर्जीव शिल्पांच्या मुखांवर उत्कट रीतीने रेखांकीत आहेत असे त्या सांगतातच परंतु ते जसेच्या तसे लिहून देखील काढतात.... तत्कालीन समाजातील सर्वच स्तरातील जीवनशैलीचे प्रतिबिंब या शिल्पात आढळतात. स्त्रियांचे नाजूक सौंदर्य व पुरुषाचे बलशाली पौरुषत्व तसेच खालच्या वर्गातील दासदसींना त्यांच्या वेगळेपणासह चित्रांकीत केले आहेत.... वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहाते... शिवाय या पुस्तकात काही गुंफेतील रेखाचित्र व त्याचे थोडक्यात वर्णन आहेत ज्यामुळे आपणास ब-यापैकी अंदाज येतो... मला आठवते की मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे पहायचा योग आला होता तेव्हा तेथील गाईड आम्हाला म्हणाला होता की आपल्याला मंदिरा बाहेरील मानवी शिल्प नक्की कोणते आहे कळत नाहीत, अशा वेळी त्यांची आयुधे, मुकुट, आभूषणे यावरून ते नक्की कोणते ते ओळखता येते...... मी स्वतः कधीही वेरूळ लेण्या पहिल्या नाहीत, परंतु हे पुस्तक वाचताना सैर करून आले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more