* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VERUL LENYATEEL SHILPAVAIBHAV
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666335
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK `VERUL LENYATIL SHILP VAIBHAV` IS BASED ON THE RESEARCH WORK ON THE SCULPTURES OF ELLORA. THE MAGNIFICENT GROUP OF ROCK CUT CAVES OR THE ROCK TEMPLES AT ELLORA REPRESENT THREE DIFFERENT FAITHS. BUDDHISIM, HINDUISM AND JAINISM. IT MARKS THE FINAL STAGE OF CULMINATIONAL ROCK TEMPLE ARCHITECTURE, IN WESTERN INDIA. BEING ONE OF THE GREATEST MONUMENTS OF THE WORLD ELLORA FIGURES IN THE LIST OF THE MONUMENTS OF HUMAN HERITAGE. THE ELLORA CAVES NESTLE IN THE LAP OF THE CHARANADRI HILLS, WHICH IS AN EXTENSION OF THE WESTERN HILLS FAMOUSLY KNOWN AS SAHYADRI, AND ARE SITUATED 26 K.M. AWAY FROM THE FAMOUS HISTORICAL CITY AURANGABAD. THESE CAVES ARE SPREAD IN AND AROUND 2 K.M. OF DISTANCE. THESE ROCK CUT CAVES REPRESENT THREE RELIGIOUS SEATS AND WERE CHIEFLY PATRONIZED BY CHALUKYA AND RASHTRAKUTA RULARS. OUT OF MANY CAVES, 34 CAVES ARE NUMBERED AND ARE DIVIDED IN THE THREE GROUPS, BUDDHIST, HINDU AND JAINS. AT ELLORA, THE MAJOR SIGNIFICANT EXCAVATORY ACTIVITIES WERE CARRIED OUT FROM THE MIDDLE OF THE SIXTH CENTURY TO THE END OF TENTH CENTURY. THE HISTORICAL BACK GROUND, AND THE CULTURAL AND MYTHOLOGICAL IMPORTANCE OF THE SCULPTURES IN ALL THREE GROUPS OF CAVES AT ELLORA HAS BEEN DISCUSSED IN THE BOOK. ALL THE INFORMATION REGARDING THE CAVE ARCHITECTURE AS WELL AS THE DETAILS AT THE ICONOGRAPHIC IMPORTANCE OF THE SCULPTURES HAS BEEN DESCRIBED ELABORATELY IN ALL THE CHAPTERS OF THE BOOK. A MARATHI READER CAN HAVE A PERFECT IDEA ABOUT THE CAVE’S ARCHITECTURE AS WELL AS THE SCULPTURE IN THE CAVES.
‘वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव’ हे पुस्तक लेखिका राधिका टिपरे यांनी इतिहास आणि पुराणे यांचा सूक्ष्म अभ्यास करून लिहिले आहे. शिल्पांच्या मुद्रेवरील भावभावनांचा वेध घेत, त्यांच्याशी संवाद साधत लालित्यपूर्ण शैलीत त्यांनी शिल्पांचे तपशीलवार वर्णन केले आहे. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मीयांनी राजाश्रयाने तीन कालखंडात या लेण्यांची निर्मिती केली आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून प्रारंभ झालेली निर्मिती प्रक्रिया एक हजार सालापर्यंत सुरू होती. अगणित अनाम शिल्पकारांनी पिढ्यांन्पिढ्या परिश्रम करून हे अद्भुत शिल्पविश्व साकारले आहे, तेही मर्यादित साधनांच्या साहाय्याने. भारताला प्राचीन अशी सांस्कृतिक परंपरा आहे. उदार, सहिष्णू आणि चंडप्रतापी राज्यकत्यांचे शासन त्या काळी आQस्तत्वात होते. भारतात अनेक ठिकाणी लेण्यांतील विलोभनीय शिल्पकला तत्कालीन कलेची साक्ष देत आहे. औरंगाबादजवळील वेरूळची लेणी त्यातलीच एक. सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरातील पाषाण खोदून त्यात कोरलेली समूहशिल्पे वेद-उपनिषिदे, पुराणांतील देव-देवता आणि त्यांचे अलौकित्व विषद करतात. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिाQस्थतीचे प्रतिबिंब या शिल्पकलेतून व्यक्त होते. जीवनमूल्यांना आध्यात्मिक आधार देणारी शिल्पकला आपल्याला जीवन जगण्याची नवी दृष्टी देते. द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण, आकार-निराकार आणि परमेश्वराची निरामयता या गोष्टींना मानवी पातळीवर उद्धृत केले आहे ते या शिल्पकलेनेच. काळ्या पत्थरातून जिवंत झालेला आपला भूतकाळ कोरीव शिल्पांतून मूकपणे आपल्याशी संवाद साधीत असतो. मूर्तीमधून जणू भावनांचा स्रोत निर्माण होतो, तो आपल्या व्यक्त-अव्यक्त अशा कल्पनांना छेद देणारा ‘लोकसंवाद’च असतो. या पुस्तकातील वेरूळ लेण्यातील प्रत्येक शिल्पाचा इतिहास किंवा पौराणिक संदर्भ वाचून लेण्यांचे अवलोकन केले, तर मिळणारा आनंद वैÂक पटींनी अधिक असेल, यात शंकाच नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VERULCAVES#AJANTACAVES# "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VERULLENYATEELSHILPAVAIBHAV #VERULLENYATEELSHILPAVAIBHAV #वेरूळले‌‍‌णयातीलशील्पवैभव #REFERENCEANDGENERAL #MARATHI #RADHIKATIPARE "
Customer Reviews
  • Rating StarPRIYA DEEPAK KARADKAR, DOMBIVALI

    सौ.राधिका टिपरे यांनी त्यांच्या अभ्यासादरम्यान ‘वेरूळ चे लेणे’ हा विषय लघु प्रबंधासाठी निवडला आणि या शिल्पकलेबद्दल त्यांना ओढ निर्माण झाली व या पुस्तकाद्वारे वेरूळ च्या लहान-मोठ्या शिल्पाबद्दल सामग्र माहिती आपल्या समोर आणली. काळ्या पाषाणातून अनामकलाकारांनी निर्मिलेली ही शिल्पकला इतिहासाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. हिंदू, बौद्ध व जैन धर्माच्या प्रसारासाठी या कलेची निर्मिती झाली असे सर्वमान्य दिसते. या शिल्पकलेचे प्रमुख केंद्र म्हणजे मंदिरे, आणि मंदिरांच्या सुशोभनासाठी या शिल्पकलेचा पुरेपूर वापर केला गेला असे त्या म्हणतात. या पुस्तकात वेरूळ लेण्याची पार्श्वभूमी, घृष्णेश्वर शिवमंदिर, भौगोलिक ओळख, मराठी साहित्यात असलेले उल्लेख, ज्ञानेश्वरीतील उल्लेख, उपलब्ध इतर प्रवास उल्लेख, ऐतिहासिक पार्श्वभूमी, कालखंड इत्यादि नमूद आहे. बऱ्याच शिल्पाचे अगदी बारकाईने वर्णन केले आहे. भिंतीवरील शिल्पाची रेलचेल, आकार, त्यांची वस्त्रे, आभूषणे, चेह-यावरील हावभाव नमूद केले आहे. एके ठिकाणी असे वर्णन आहे की – “अवलोकितेश्वरच्या उजव्या बाजूला कोरलेली उभी स्त्री प्रतिमा एक विलक्षण सुंदर स्त्रीची आहे. अतिशय आकर्षक, कमनीय दहयष्टि असलेल्या या स्त्रीची केशरचनाही आकर्षक असून त्यावर घातलेला रत्नजडित मुकुट ही लक्षणीय आहे.....” तसेच तेथे रामायण व महाभारत मधील काही महत्वाचे शिल्पपट देखील आहेत... रावणानुग्रहमूर्तीस रावण कैलास पर्वत हलवत असतानाचे शिल्प आहे... आपले जागतिक वारसा स्थळ ‘कैलास लेणे’ याची खूपच महत्वपूर्ण माहिती यात आहे..... राग, लोभ, मद, मत्सर, कारुण्य, भय हे सारे विकार या निर्जीव शिल्पांच्या मुखांवर उत्कट रीतीने रेखांकीत आहेत असे त्या सांगतातच परंतु ते जसेच्या तसे लिहून देखील काढतात.... तत्कालीन समाजातील सर्वच स्तरातील जीवनशैलीचे प्रतिबिंब या शिल्पात आढळतात. स्त्रियांचे नाजूक सौंदर्य व पुरुषाचे बलशाली पौरुषत्व तसेच खालच्या वर्गातील दासदसींना त्यांच्या वेगळेपणासह चित्रांकीत केले आहेत.... वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहाते... शिवाय या पुस्तकात काही गुंफेतील रेखाचित्र व त्याचे थोडक्यात वर्णन आहेत ज्यामुळे आपणास ब-यापैकी अंदाज येतो... मला आठवते की मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे पहायचा योग आला होता तेव्हा तेथील गाईड आम्हाला म्हणाला होता की आपल्याला मंदिरा बाहेरील मानवी शिल्प नक्की कोणते आहे कळत नाहीत, अशा वेळी त्यांची आयुधे, मुकुट, आभूषणे यावरून ते नक्की कोणते ते ओळखता येते...... मी स्वतः कधीही वेरूळ लेण्या पहिल्या नाहीत, परंतु हे पुस्तक वाचताना सैर करून आले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more