* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAHASAMRAT RANKHAINDAL
  • Availability : Available
  • ISBN : 9789357200424
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2023
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 460
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IN THIS THRILLING NOVEL VISHVAS PATIL TAKES US INTO THE MOST ENGAGING ERA OF THE MARATHA HISTORY. THE GREAT WARRIOR CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HAS SHOWN THE WORLD THE TRUE MEANING OF RANKHAINDAL. AFTER ZANZAVAT, THIS IS THE SECOND PART OF THE SERIES, MAHASAMRAT, BASED ON SHIVAJI MAHARAJ. "IN THIS THRILLING NOVEL VISHVAS PATIL TAKES US INTO THE MOST ENGAGING ERA OF THE MARATHA HISTORY. THE GREAT WARRIOR CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HAS SHOWN THE WORLD THE TRUE MEANING OF RANKHAINDAL. AFTER ZANZAVAT, THIS IS THE SECOND PART OF THE SERIES, MAHASAMRAT, BASED ON SHIVAJI MAHARAJ. THE THRILL OF PAWANKHIND, THE LOOTING OF SURAT, THE DISARMAMENT OF THIRTY THOUSAND MOGLI FORCES IN UMBARKHIND, THE CONQUEST OF SHAHISTEKHAN, THE GREAT WAR OF KUDAL AND THE ETERNAL DREAM OF CREATING SINDHUDURG IN THE HEART OF THE SEA! SHIVRAI AT HIS 35 WEILDING `RANKHAINDAL`!"
पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MAHASAMRAT #RANKHAIDAL #VISHWASPATIL #CHATRAPATI #NOVEL #SHAHAJIMAHARAJ #JIJAU #ZANZAVAT #SHIVAJI #HISTORICALNOVEL #HISTORY #छत्रपती #शिवाजी #शिवाजीमहाराज #विश्वासपाटील #रणखैंदळ #महासम्राट #कादंबरी #ऐतिहासिककादंबरी #इतिहासपरकादंबरी "
Customer Reviews
  • Rating Starसुनील माने, हडपसर

    पुणे प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. त्याच्या सोबत असलेल्या फौजेची दाणादाण उडवली. आदिलशाहीची भरपूर दौलत, हत्ती-घोडे मिळाले. आणि बरोबर तीन दिवसांनी विजापूरच्या तटबंदीवर मराठ्यांची सेना “हर हर महादेव” च्या ललकारीने जबरदस्त धडकली! नेताी पालकरांनी सात हजार फौजेनिशी एकशेसाठ मैलांचे अंतर दिनरात न थांबता विजापूर गाठले. जोरदार हल्ला चढवला. पण अभेद्य तटबंदीमुळे विजापूर वाचले. विजापूरची हरलेली वीस हजार फौज परत जवळ आल्यामुळे नेताजींना माघार घ्यावी लागली. अशी जबरदस्त सुरूवात आहे श्री विश्वास पाटील यांच्या “महासम्राट” या महाकादंबरीच्या दुसऱ्या खंडाची, म्हणजे “रणखैंदळ”ची! या कादंबरी मालिकेतला पहिला खंड “झंझावात”ने खळबळ उडवल्यानंतर बहुप्रतिक्षित दुसरा खंड दि २१-०५-२०२३ रोजी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने दिमाखदार सोहळ्यात खासदार श्री अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशित केला. या कार्यक्रमाचे पाटील सरांनी निमंत्रण पाठवले होते. तिथे जमलेल्या अफाट गर्दीत माझी ओळख सांगताच शेजारी बसवून पुस्तकावर स्वाक्षरी दिली. महासम्राटच्या पहिल्या खंडाचा (झंझावात) परिचय मी तिसऱ्या सत्रात करून दिला होता. तो पुस्तक परिचय कृष्णा सरांनी पाटील सरांना पाठवला. तो त्यांना आवडला व त्यांनी फोनवर माझे अभिनंदन केले. लगेच ते या समूहाचे सदस्यही झाले. आणखी सांगायचे म्हणजे विश्वास पाटील सरांची अॅानलाइन मुलाखत “लेखक आपल्या दारी” यामधे घेण्याचे भाग्य मला लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतरच्या काळापासून ही कादंबरी सुरू होते. विजापूरचा एव्हढा मोठा सरदार मारला गेल्यामुळे माजलेली खळबळ. बंकापूरातून बंडाची तयारी करणारी मोठी मराठी फौज. शहाजीराजांचा ही असाच डाव, विजापूरची बडी बेगम वेळीच मोडते. इकडे शिवाजी राजांनी विजापूराचे नाक असलेला पन्हाळा जिंकलेला. म्हणून चिडलेल्या सुलतानाने कर्नूलच्या सिद्दी जोहरला चाळीस हजारांची सेना, अनेक सरदार देऊन पन्हाळा पुन्हा जिंकण्यास व शिवाजी राजांना कैद किंवा मारावयास पाठविले. पन्हाळ्यास पडलेला विशाल वेढा आणि अडकलेले शिवाजी राजे. त्याच वेळेस दिल्लीपती औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानास जवळपास सव्वा लाख फौजफाटा देऊन मराठ्यांचा बिमोड करण्यास पाठविले. आणि तो पुण्यात येऊन लालमहालात ठाणं मांडून बसला. त्याने चाकणचा किल्ल्यावर हल्ला केला. तर इकडे पन्हाळ्याचा पाडाव करण्यासाठी आदिलशाही फौजेला मदत म्हणून इंग्रज राजापुरहून मोठी तोफ घेऊन येतात. पावसाळा सुरू होतो. आषाढातल्या मुसळधार पावसाला न जुमानता जोहर वेढा अजून बळकट करतो. पन्हाळ्याहून सुटका कशी करायची याचा खल सुरू होतो. बाजी प्रभू, फुलाजी, शिवा काशिद, शंभुजी जाधव, सिद्दी हिलाल, त्र्यंबक पंत, आणि इतर सर्व सरदारांमधे चर्चा होऊन महाराज तिथून कसे निसटतात, मुसळधार पावसात जंगलातून, पहाडांतून, नद्यानाल्यातून, पाठीवर दुश्मनांची फ़ौज घेऊन पन्हाळा ते विशालगढ हे अंतर फक्त सातशे सौनिक बरोबर घेऊन कसे पार करतात आणि घोडखिंडीतला चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन अप्रतिम केलंय. कारण लेखकाने ही संपूर्ण पायवाट भर पावसात नऊ वेळा अनुभवली आहे! या कार्यात बलिदान देणारे शिवा काशिद, बाजी प्रभू, फुलाजी, शंभुजी आणि बांदल सेना यांनी पावन केलेली ती पावनखिंड! इकडे शाहिस्ताखानाने पुण्याच्या लालमहालात टाकलेला डेरा आणि तसेच चाकणचा किल्ला ही जिंकला होता. त्याच्यापर्यंत शिवरायांच्या पन्हाळगडावरची कामगिरी पोहोचली होती. औरंगझेब ही पत्रांतून सारखा दबाव टाकत होता. शाहिस्तेखानाने राजगडावर सरळ हल्ला करण्यापेक्षा कोकणावर हल्ला करण्यासाठी कारतलबखान व रायबागन यांना तीस हजार फौज व लाखोंचा खजिना देऊन पाठवले. शिवरायांनी चतुराईने त्या फौजेला उंबरखिंडीत उतरायला भाग पाडले. तहानभुकेने बेजार झालेल्या सैन्यावर घनदाट जंगलातून त्यांच्या नजरेआडून बाणांचा, दगडगोट्यांचा हल्ला चढवला. रणभेऱ्या व तुताऱ्यांनी जंगल हादरवून सोडले. कारतलबखानाला शरण येण्यास भाग पाडले. नेसत्या वस्त्रांनिशी त्याची सुटका केली. अवघ्या बाराशे मावळ्यांना हाताशी घेऊन तीस हजार सैन्यावर गनिमी कावा वापरून मिळवलेला विजय इतिहासात प्रथमच असेल! शिवराय तेथून कोकणात उतरतात. दापोली-पालवणच्या जशवंत दळवी आणि श्रृंगारपूरच्या सूर्यराव सुर्व्यांचा बिमोड करतात. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून उध्वस्त करतात कारण ते पन्हाळ्यावर असताना याच वखारीतील रेव्हिंगटनने मोठी तोफ आणुन किल्ल्यावर डागली होती. सर्व इंग्रजांना पकडून कैदेत टाकतात. कोकणची किनारपट्टी स्वराज्यात आणायची, मजबूत किल्ले व बंदर बनवायचे, जहाजांचे कारखाने आणि स्वराज्याचे आरमार बनविण्याच्या तयारीला लागतात. ही केव्हढी दूरदृष्टी होती शिवरायांची! याच सुमारास जवळपास बावीस वर्षांनंतर आपल्या मातृभूमीत आलेले त्यांचे पिता शहाजीराजांची भेट जेजुरी गडावर होते. अनेक गोष्टींवर चर्चा करतात. राजगडाला परतताना स्वराज्यातील बदल पाहून हरखून जातात. आपल्या शूर पुत्राचे कर्तृत्व पाहून सुखावून परततात बेंगरूळाला पुन्हा न भेटण्यासाठी! शाहिस्तेखानही शिवाजी महाराजांवर हल्ला करायच्या तयारीस लागतो. काही फौज कोकणात तर काही फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालायला पाठवतो. राजगडावर शिवरायांना जेरबंद करायचा आराखडा तयार करतो. तो आपल्यावर कोसळण्यापूर्वीच महाराज शाहिस्त्याचा बंदोबस्त करायचे ठरवतात. सिंहगडावरचे फितुरीचे कारस्थान मोडून तिथूनच पुण्यातील लालमहालावर हल्ला करायचा जबरदस्त मोहीम आखतात. बाराशे मावळ्यांना बरोबर घेऊन शिवराय रात्रीच्या अंधारात कसे लालमहालात शिरतात व हमाधुमीत शाहिस्त्याची तीन बोटे कलम करतात, त्याचा जावई व पुत्राला ठार करतात आणि निसटतात. त्यांच्या मागावर येणाऱ्या सैन्याला गुमराह करण्यासाठी कात्रजच्या घाटात तीनशे बैलांच्या शिंगांना मशाली बांधून जंगलात पळवतात. गनिमी काव्याचे हे दुसरे उदाहरण- जगातील एकमेव! या हल्ल्यानंतर शाहिस्ता तीन दिवसात चंबुगबाळे गुंडाळून पुणे सोडून पळाला होता. शिवरायांचे मोठे स्वप्न साकार करण्यासाठी अपार धनराशीची गरज होती. किल्ले बळकट करणे, सागरी किनारा व आरमार बळकट करणे, शस्त्रे व दारूगोळा जमविणे, इत्यादी अनेक कामासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा? यासाठी शिवरायांनी गुप्त मोहिम ठरवली. त्याची जोरदार तयारी सुरू केली जशी-राजगडाखाली कातड्यांच्या पखाली शिवणे, नवे दमदार सैन्य भरती करणे, नव्या दमाचे घोडे जमविणे. लोहगडाजवळ चार हजार घोडे जमा केले, राजगडाहून दहा हजार सैन्य निघाले. चौदा हजार घोडे रात्रीच्या अंधारात पळायचे व दिवसा जंगलात लपायचे. त्र्यंबकच्या किल्लेदाराने चारशे दमदार बैल जमा केले होते. राजगडापासून साडेतीनशे मैल दूर असलेली सोन्याची लंका लुटण्याचं ते स्वप्न! सुरतेची बदसुरत करायची ती योजना! सर्व प्रवास दुश्मनाच्या मुलखातून करायचा होता. आणि अपेक्षेपेक्षा कमी वेळात शिवाजी महाराज सुरतेला पोहोचतात. तिथला सुभेदार इनायतखान व सुरतेतील बड्या व्यापाऱ्यांना खंडणी देण्यासाठी स्वार पाठवतात. पण ते दाद देत नाहीत असे पाहून नेताजींसह लुटालुट करायला सुरूवात करतात. सुरतेची संपूर्ण माहिती बहिर्जींनी एक वर्षांपासून गोळा केली होती. इंग्रजांची वखार सोडून सर्व सुरत लुटून, जाळून चार दिवसांनंतर परतीच्या प्रवासाला निघतात. मोघलांची फौज जवळ येण्यापूर्वीच आपल्या मुलुखात परततात. घेऊन करोडो रूपयांची लूट! जसे राजे राजगडावर येतात तसे त्यांना आपले पिता शहाजीराजांच्या अपघाती निधनाची वार्ता कळते. जिजाऊसाहेब सती जाणार असतात. त्यांना बड्या मुश्कीलीने थांबवतात! आनंदाच्या क्षणांत दुःखाचा पहाड कोसळतो! आपल्या हातातून कोकणची किनारपट्टी शिवाजीराजे घेत असलेले पाहून आदिलशाह चवताळून जातो. वजीर खवासखान व बाजीराव घोरपडे यांना शिवरायांवर संयुक्त हल्ला करण्यास कुडाळला पाठवतो. खवासखान वीस हजार फौज घेऊन पोहोचतो आणि बाजीराव मुधोळहून दहा हजार फौज घेऊन येणार असतो. या बाजीरावाने शहाजीराजांना अटक करण्यात, पन्हाळ्यावर सिद्दिला मदत करण्यात मोठा हात असतो. त्याच्या मनांत शिवरायंविषयी जहरी तिरस्कार भरलेला. कुडाळच्या रणांगणावर खवासखानाला गाफील ठेऊन शिवराय मुधोळवर हल्ला करून बाजीरावास ठार करतात आणि त्याच भागातून येऊन खवासखानावर दुहेरी हल्ला करतात आणि जबरदस्त हानी करून पळवून लावतात. शिवाजी महाराज ठरवतात की जंजिऱ्याच्या तोडीचा सागरीकिल्ला बांधायचा व डच, इंग्रज, सिद्दि यांचेवर वचक ठेवायचा. त्यासाठी त्यांना मालवणच्या किनारी समुद्रात एक बेट सापडतं-कुरट्याचे बेट. चारी बाजूने पहाणी करून एक अभेद्य किल्ला बनविण्याचे आदेश देतात. पायभरणीच्या महापूजेसाठी अनपेक्षितपणे राजगडाहून जिजाऊसाहेब व सर्व राणीवसा तिथे येतो. समुद्रात वसविली जाते शिवलंका… म्हणजेच सिंधुदुर्ग! छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे- विजापूरच्या तटबंदीवर हल्ला, पावनखिंडीतला थरार, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीतले निःशस्त्रीकरण, शाहिस्तेखानावर थेट हल्ला करून पळवून लावणे, सुरतेची महालूट, मुधोळच्या बाजीरावाचा वध, कुडाळचा महासंग्राम, कोकणचा किनारा स्वराज्यात आणणे आणि सिंधुदुर्गाचे निर्माण, असा विशाल पट “महासम्राट”च्या दुसऱ्या खंडात “रणखैंदळ” मधे विश्वास पाटीलांनी आपल्या जबरदस्त लेखणीने रंगवला आहे. मुख्य म्हणजे या कादंबरीतली भाषा ही बखरीतली न वाटतां आजची भाषा आहे म्हणून लगेच वाचकांच्या मनाची पकड घेते. शिवरायांच्या या सर्व कामगिरीमध्ये नेताजी पालकरांचा प्रत्यक्ष सहभाग प्रथमच दाखवला गेला आहे. विश्वास पाटील यांनी शिवरायांवर भरपूर अभ्यास करून जवळपास इतिहासातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. या कादंबरीत पिता-पुत्र, माता-पुत्र यांचे जिव्हाळ्याचा संबंध, शिवरायांचे त्यांचे सहकारी नेताजी, तानाजी, बाजी प्रभू, बहिर्जी, विश्वास दिघे आणि इतरांबरोबर असलेले जिवाशिवाचे नाते यावरही सुंदर प्रकाश टाकण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. अप्रतिम कादंबरी. आता प्रतिक्षा आहे या कादंबरी मालिकेतील तिसरा खंड “अस्मान भरारी” याची! ...Read more

  • Rating Starगंधार

    नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

  • Rating Starसुनील माने

    प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. त्याच्या सोबत असलेल्या फौजेची दाणादाण उडवली. आदिलशाहीची भरपूर दौलत, हत्ती-घोडे मिळाले. आणि बरोबर तीन दिवसांनी विजापूरच्या तटबंदीवर मराठ्यांची सेना “हर हर महादेव” च्या ललकारीने जबरदस्त धडकली! नेताजी पाकरांनी सात हजार फौजेनिशी एकशेसाठ मैलांचे अंतर दिनरात न थांबता विजापूर गाठले. जोरदार हल्ला चढवला. पण अभेद्य तटबंदीमुळे विजापूर वाचले. विजापूरची हरलेली वीस हजार फौज परत जवळ आल्यामुळे नेताजींना माघार घ्यावी लागली. अशी जबरदस्त सुरूवात आहे श्री विश्वास पाटील यांच्या “महासम्राट” या महाकादंबरीच्या दुसऱ्या खंडाची, म्हणजे “रणखैंदळ”ची! या कादंबरी मालिकेतला पहिला खंड “झंझावात”ने खळबळ उडवल्यानंतर बहुप्रतिक्षित दुसरा खंड दि २१-०५-२०२३ रोजी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने दिमाखदार सोहळ्यात खासदार श्री अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतरच्या काळापासून ही कादंबरी सुरू होते. विजापूरचा एव्हढा मोठा सरदार मारला गेल्यामुळे माजलेली खळबळ. बंकापूरातून बंडाची तयारी करणारी मोठी मराठी फौज. शहाजीराजांचा ही असाच डाव, विजापूरची बडी बेगम वेळीच मोडते. इकडे शिवाजी राजांनी विजापूराचे नाक असलेला पन्हाळा जिंकलेला. म्हणून चिडलेल्या सुलतानाने कर्नूलच्या सिद्दी जोहरला चाळीस हजारांची सेना, अनेक सरदार देऊन पन्हाळा पुन्हा जिंकण्यास व शिवाजी राजांना कैद किंवा मारावयास पाठविले. पन्हाळ्यास पडलेला विशाल वेढा आणि अडकलेले शिवाजी राजे. त्याच वेळेस दिल्लीपती औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानास जवळपास सव्वा लाख फौजफाटा देऊन मराठ्यांचा बिमोड करण्यास पाठविले. आणि तो पुण्यात येऊन लालमहालात ठाणं मांडून बसला. त्याने चाकणचा किल्ल्यावर हल्ला केला. तर इकडे पन्हाळ्याचा पाडाव करण्यासाठी इंग्रज राजापुरहून मोठी तोफ घेऊन येतात. पावसाळा सुरू होतो. आषाढातल्या मुसळधार पावसाला न जुमानता जोहर वेढा अजून बळकट करतो. पन्हाळ्याहून सुटका कशी करायची याचा खल सुरू होतो. बाजी प्रभू, फुलाजी, शिवा काशिद, शंभुजी जाधव, सिद्दी हिलाल, त्र्यंबक पंत, आणि इतर सर्व सरदारांमधे चर्चा होऊन महाराज तिथून कसे निसटतात, मुसळधार पावसात जंगलातून, पहाडांतून, नद्यानाल्यातून, पाठीवर दुश्मनांची फ़ौज घेऊन पन्हाळा ते विशालगढ हे अंतर फक्त सातशे सौनिक बरोबर घेऊन कसे पार करतात आणि घोडखिंडीतला चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन अप्रतिम केलंय. कारण लेखकाने ही संपूर्ण पायवाट भर पावसात नऊ वेळा अनुभवली आहे! या कार्यात बलिदान देणारे शिवा काशिद, बाजी प्रभू, फुलाजी, शंभुजी आणि बांदल सेना यांनी पावन केलेली ती पावनखिंड! इकडे शाहिस्ताखानाने पुण्याच्या लालमहालात टाकलेला डेरा आणि चाकणचा किल्ला ही जिंकला होता. त्याच्यापर्यंत शिवरायांच्या पन्हाळगडावरची कामगिरी पोहोचली होती. औरंगझेब ही पत्रांतून सारखा दबाव टाकत होता. शाहिस्तेखानाने राजगडावर सरळ हल्ला करण्यापेक्षा कोकणावर हल्ला करण्यासाठी कारतलबखान व रायबागन यांना तीस हजार फौज व लाखोंचा खजिना देऊन पाठवले. शिवरायांनी चतुराईने त्या फौजेला उंबरखिंडीत उतरायला भाग पाडले. तहानभुकेने बेजार झालेल्या सैन्यावर घनदाट जंगलातून त्यांच्या नजरेआडून बाणांचा, दगडगोट्यांचा हल्ला चढवला. रणभेऱ्या व तुताऱ्यांनी जंगल हादरवून सोडले. कारतलबखानाला शरण येण्यास भाग पाडले. नेसत्या वस्त्रांनिशी त्याची सुटका केली. अर्ध्या बाराशे मावळ्यांना हाताशी घेऊन तीस हजार सैन्यावर गनिमी कावा वापरून मिळवलेला विजय इतिहासात प्रथमच असेल! शिवराय तेथून कोकणात उतरतात. दापोली-पालवणच्या जशवंत दळवी आणि श्रृंगारपूरच्या सूर्यराव सुर्व्यांचा बिमोड करतात. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून उध्वस्त करतात कारण ते पन्हाळ्यावर असताना याच वखारीतील रेव्हिंगटनने मोठी तोफ आणुन किल्ल्यावर डागली होती. सर्व इंग्रजांना पकडून कैदेत टाकतात. कोकणची किनारपट्टी स्वराज्यात आणायची, मजबूत किल्ले व बंदर बनवायचे, जहाजांचे कारखाने आणि स्वराज्याचे आरमार बनविण्याच्या तयारीला लागतात. ही केव्हढी दूरदृष्टी होती शिवरायांची! याच सुमारास जवळपास बावीस वर्षांनंतर आपल्या मातृभूमीत आलेले त्यांचे पिता शहाजीराजांची भेट होते. आपल्या पुत्राचे कर्तृत्व पाहून सुखावून परततात पुन्हा बेंगरूळाला पुन्हा न भेटण्यासाठी! शाहिस्तेखानही शिवाजी महाराजांवर हल्ला करायच्या तयारीस लागतो. काही फौज कोकणात तर काही फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालायला पाठवतो. राजगडावर शिवरायांना जेरबंद करायचा आराखडा तयार करतो. तो आपल्यावर कोसळण्यापूर्वीच शाहिस्त्याचा बंदोबस्त करायचे ठरवतात. सिंहगडावरचे फितुरीचे कारस्थान मोडून तिथूनच पुण्यातील लालमहालावर हल्ला करायचा जबरदस्त मोहीम आखतात. बाराशे मावळ्यांना बरोबर घेऊन शिवराय रात्रीच्या अंधारात कसे लालमहालात शिरतात व हमाधुमीत शाहिस्त्याची तीन बोटे कलम करतात, त्याचा जावई व पुत्राला ठार करतात आणि निसटतात. त्यांच्या मागावर येणाऱ्या सैन्याला गुमराह करण्यासाठी कात्रजच्या घाटात तीनशे बैलांच्या शिंगांना मशाली बांधून जंगलात पळवतात. गनिमी काव्याचे हे दुसरे उदाहरण- जगातील एकमेव! या हल्ल्यानंतर शाहिस्ता तीन दिवसात चंबुगबाळे गुंडाळून पुणे सोडून पळाला. शिवरायांचे मोठे स्वप्न साकार करण्यासाठी अपार धनराशीची गरज होती. किल्ले बळकट करणे, सागरी किनारा व आरमार बळकट करणे, शस्त्रे व दारूगोळा जमविणे, इत्यादी अनेक कामासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा? यासाठी शिवरायांनी गुप्त मोहिम ठरवली. त्याची जोरदार तयारी सुरू केली जशी-राजगडाखाली कातड्यांच्या पखाली शिवणे, नवे दमदार सैन्य भरती करणे, नव्या दमाचे घोडे जमविणे. लोहगडाजवळ चार हजार घोडे जमा केले, राजगडाहून दहा हजार सैन्य निघाले. चौदा हजार घोडे रात्रीच्या अंधारात पळायचे व दिवसा जंगलात लपायचे. त्र्यंबकच्या किल्लेदाराने चारशे दमदार बैल जमा केले होते. राजगडापासून साडेतीनशे मैल दूर असलेली सोन्याची लंका लुटण्याचं ते स्वप्न! सुरतेची बदसुरत करायची ती योजना! सर्व प्रवास दुश्मनाच्या मुलखातून करायचा होता. आणि शिवाजी महाराज सुरतेला पोहोचतात. तिथला सुभेदार इनायतखान व सुरतेतील बड्या व्यापाऱ्यांना खंडणी देण्यासाठी स्वार पाठवतात. पण ते दाद देत नाहीत असे पाहून नेताजींसह लुटालुट करायला सुरूवात करतात. सुरतेची संपूर्ण माहिती बहिर्जींनी एक वर्षांपासून गोळा केली होती. इंग्रजांची वखार सोडून सर्व सुरत लुटून, जाळून चार दिवसांनंतर परतीच्या प्रवासाला निघतात. मोघलांची फौज जवळ येण्यापूर्वीच आपल्या मुलुखात परततात. घेऊन करोडो रूपयांची लूट! जसे राजे राजगडावर येतात तसे त्यांना आपले पिता शहाजीराजांच्या अपघाती निधनाची वार्ता कळते. जिजाऊसाहेब सती जाणार असतात. त्यांना बड्या मुश्कीलीने थांबवतात! आनंदाच्या क्षणांत दुःखाचा पहाड कोसळतो! आपल्या हातातून कोकणची किनारपट्टी शिवाजीराजे घेत असलेले पाहून आदिलशाह चवताळून जातो. वजीर खवासखान व बाजीराव घोरपडे यांना शिवरायांवर संयुक्त हल्ला करण्यास कुडाळला पाठवतो. खवासखान वीस हजार फौज घेऊन पोहोचतो आणि बाजीराव मुधोळहून दहा हजार फौज घेऊन येणार असतो. या बाजीरावाने शहाजीराजांना अटक करण्यात, पन्हाळ्यावर सिद्दिला मदत करण्यात मोठा हात असतो. त्याच्या मनांत शिवरायंविषयी जहरी तिरस्कार भरलेला. कुडाळच्या रणांगणावर खवासखानाला गाफील ठेऊन शिवराय मुधोळवर हल्ला करून बाजीरावास ठार करतात आणि त्याच भागातून येऊन खवासखानावर दुहेरी हल्ला करतात आणि जबरदस्त हानी करून पळवून लावतात. जंजिऱ्याच्या तोडीचा सागरीकिल्ला बांधायचा व डच, इंग्रज, सिद्दि यांचेवर वचक ठेवायचा. त्यासाठी त्यांना मालवणच्या किनारी समुद्रात एक बेट सापडतं-कुरट्याचे बेट. चारी बाजूने पहाणी करून एक अभेद्य किल्ला बनविण्याचे आदेश देतात. पायभरणीच्या महापूजेसाठी अनपेक्षितपणे राजगडाहून जिजाऊसाहेब व सर्व राणीवसा तिथे येतो. समुद्रात वसविली जाते शिवलंका… म्हणजेच सिंधुदुर्ग! छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे- विजापूरच्या तटबंदीवर हल्ला, पावनखिंडीतला थरार, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीतले निःशस्त्रीकरण, शाहिस्तेखानावर थेट हल्ला करून पळवून लावणे, सुरतेची महालूट, मुधोळच्या बाजीरावाचा वध, कुडाळचा महासंग्राम, कोकणचा किनारा स्वराज्यात आणणे आणि सिंधुदुर्गाचे निर्माण, असा विशाल पट “महासम्राट”च्या दुसऱ्या खंडात “रणखैंदळ” मधे विश्वास पाटीलांनी आपल्या जबरदस्त लेखणीने रंगवला आहे. मुख्य म्हणजे या कादंबरीतली भाषा ही बखरीतली न वाटतां आजची भाषा आहे म्हणून लगेच वाचकांच्या मनाची पकड घेते. शिवरायांच्या या सर्व कामगिरीमध्ये नेताजी पालकरांचा प्रत्यक्ष सहभाग प्रथमच दाखवला गेला आहे. विश्वास पाटील यांनी शिवरायांवर भरपूर अभ्यास करून जवळपास इतिहासातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. या कादंबरीत पिता-पुत्र, माझा-पुत्र यांचे जिव्हाळ्याचा संबंध, शिवरायांचे त्यांचे सहकारी नेताजी, तानाजी, बाजी प्रभू, बहिर्जी, विश्वास दिघे आणि इतरांबरोबर असलेले जिवाशिवाचे नाते यावरही सुंदर प्रकाश टाकण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. आता प्रतिक्षा आहे या कादंबरी मालिकेतील तिसरा खंड “अस्मान भरारी” याची! *सुनील माने* ०४-०८-२०२३ ...Read more

  • Rating Starसदानंद कदम

    शिवरायांच्या पार्थ पराक्रमाची गाथा : रणखैंदळ ---------------------------------------------------------- राजा शिवछत्रपती. मऱ्हाष्ट्र राज्याचा इतिहासही आणि वर्तमानही. इथल्या मातीत जन्मलेल्या हरेक जीवाचा श्वासही आणि कित्येकांचा आयुष्यभराचा ध्यासही. मरठ्यांच्या इतिहासातली ही एकमेव अशी व्यक्तिरेखा आहे की तिनं भूत, वर्तमान आणि भविष्यावरही आपल्या असीम कर्तृत्वाची छाप टाकली आहे. तिच्या पार्थ पराक्रमाची गाथा तर इतिहासाच्या पानापानांवर. वर्तमानातल्या हरेक पक्षाच्या हरेक नेत्याला आजही त्यांच्याच नावाचा आश्रय घ्यावा लागतो, तर भविष्यातही कुणी त्यांच्या जयजयकाराशिवाय आपले पाय इथल्या राजकारणात घट्ट रोवून उभा राहील अशी स्थिती नाही... ती कधी निर्माणही होणार नाही. स्थल, काल, भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून गेलेलं हे या देशीचं नेतृत्व. हयातीतच त्यानं परदेशस्थ माध्यमांतही जागा मिळवलेली. राजा शिवछत्रपती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनानी. भारतीय आरमाराचे जनक. इथल्या भूमीत स्वत्व आणि स्वाभिमानाचं रोपटं रुजविणारे. त्यांच्या कर्तृत्वाच्या नौबती चहुदिशात घुमल्या. त्यांच्या पराक्रमाचे डंके सर्वदूर वाजत राहिले. त्याच्या पाऊलखुणा इथल्या दऱ्याखोऱ्यात उमटल्या. सह्याद्रीतल्या गडकोटांच्या तटाबुरुजांवर विसावल्या. त्याचा धांडोळा घेत या देशीचा हरेक पुत्र इथल्या मावळभूमीत दौडतोय. गेली साडेतीनशे वर्ष. यात इथली तरुणाई आहे, इथले प्रतिभावंत आहेत, इथले कलावंत आहेत आणि इतिहासानं झपाटलेले बुजुर्गही. इथल्या कलावंतांनी त्यांना रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला,तर इथल्या प्रतिभावंतांनी त्यांची शब्दपूजा बांधली. शाहिरांनी त्यांचे पवाड गायिले, तर तुम्हीआम्ही हरेक श्वासाबरोबर त्यांचा जयजयकार केला... आजही करतोय. गेल्या पिढीतल्या कवींनी त्यांच्यावर खंडकाव्यं लिहिली, नाटककारांनी नाटकं लिहिली तर लेखकांनी कादंबरीमाला लिहिल्या. खंडीत झालेली ती परंपरा पुन्हा सुरू केलीय विश्वास पाटील यांनी. `महासम्राट` या नावानं ते शिवाजीराजांचा जीवनपट उलगडून सांगताहेत. तोही चार खंडात. त्यातला पहिला खंड `झंझावात` गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला आणि तो हिंदी, इंग्रजी, कन्नडमध्येही गेला. आता त्या कादंबरीमालेतला दुसरा खंड नुकताच प्रकाशित झालाय... `रणखैंदळ` ! नावातच सर्वकाही सांगून जाणारी ही कादंबरी. पावनखिंडीतला थरार, सुरतेची लूट, तीस हजार मोगली फौजेचं उंबरखिंडीत केलेलं नि:शस्त्रीकरण, शाहिस्तेखानला वेसण, कुडाळचं युध्द आणि सागराच्या पोटातलं `शिवलंका` सिंधुदुर्ग निर्मितीचं अचाट स्वप्न ! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली `रणखैंदळ` हा या कादंबरीचा पट. हा पट मांडताना लेखकानं समकालीन साधनांचा धांडोळा घेतल्याचं पानोपानी जाणवत राहतं. सरदेसाई यांची मराठी रियासत, मराठीतील बखर वाङ्मय, शिवकालीन पत्रसारसंग्रह, सुरतकर इंग्रजांचा कंपनीशी झालेला पत्रव्यवहार, परदेशी इतिहासकारांनी केलेल्या नोंदी या साऱ्यांचा पुरेसा धांडोळा घेतल्याचंही प्रत्ययास येतंं. शिवाय शिवचरित्रातील या घटना जिथं घडल्या त्या परिसरात तर गेली दहा-बारा वर्षं लेखकाची भटकंती सुरूच होती आणि आहे. हे सगळं असूनही `रणखैंदळ`ची भाषा बखर वाङ्मयाच्या जवळ जाणारी नसून ती आधुनिक मराठी आहे, आजच्या वाचकाला सहज समजणारी आणि ओघवती आहे. काही नवख्या वाचकांना या कादंबरीत आलेले... तेही अगदी थोडकेच तत्कालिन शब्द समजणं सोपं जावं म्हणून त्यांच्या अर्थाचं परिशिष्ट शेवटी द्यायला हवं होतं ते मात्र दिसत नाही. १० नोव्हेंबर, १६५९ या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या `जनीच्या टेंब्या`वर शिवाजीराजांनी अफझलखानाची भेट घेतली आणि त्याचा कोथळा काढला. या एकाच घटनेनंतर त्यांचं नाव देशभरात तर गेलंच, शिवाय ते परदेशातही पोहोचलं. या घटनेनं स्वराज्याचं बळ चहुअंगानी वाढलं. त्यानंतर अठराव्या दिवशीच शिवाजीराजांनी पन्हाळगड हस्तगत केला. विजापूरकरांची ही दक्षिणेतली राजधानी... शहानबीदुर्ग. यामुळं आदिलशाही सत्ता हादरली, पण तिला जास्त धक्के बसले ते नेताजी पालकरांनी विजापूरवर केलेल्या चढाईनं. अफझलखानाच्या वधानंतर चौथ्या दिवशी नेताजींनी `दारुल सल्तनत` विजापूरच्या भिंतीला दिलेली धडक आदिलशाहीच्या काळजातच कळ उठवून गेली या घटनेनं `रणखैंदळ`ची सुरुवात होते. अवघ्या वीस-पंचवीस हजारांच्या नेताजींच्या तुकडीनं दीड-दोन दिवसातच विजापूरची भिंत खिळखिळी केली आणि अवघं विजापूर हादरून गेलं. गंमत म्हणजे नंतर औरंगजेबाच्या दोन-अडीच लाखाच्या फौजेनं याच भिंतीला वर्ष-सव्वावर्ष टक्कर दिली होती. तरीही त्याला यश मिळालं नव्हतं. नेताजींचा हा पराक्रम विश्वास पाटलांच्या शब्दांत वाचताना वेगळंच स्फुरण चढतं. नेताजींच्या या पराक्रमाविषयी आजवर फारसं लिहिलं गेलं नव्हतं. ती उणीव `रणखैंदळ`नं भरून काढली आहे. एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असा हा नेताजी पालकरांचा पराक्रम. वाचकाला खिळवून ठेवणारा. सिद्दी जौहरचा वेढा आणि पन्हाळ्यावर १३३ दिवस अडकून पडलेले शिवाजीराजे, वेढ्यातून निसटून जाताना भर पावसात त्यांनी केलेली ती रात्रीची दौड, बाजी-फुलाजी आणि बदलांच्या सैन्यानं गाजवलेला गजापूरच्या खिंडीतला तो पराक्रम, शिवा काशिद, बाजी-फुलाजी आणि सिद्दी वाहवाहचं बलिदान यांचं वर्णन केवळ अंगावर काटा आणणारं. पन्हाळगड ते विशाळगड... पडत्या पावसात राजांनी केलेला तो थरारक प्रवास अनुभवण्यासाठी आजची तरुणाई धावत असते. लेखकानंही कित्येकदा हा अनुभव त्याच तिथीला घेतलेला असल्यानं तो वाचतांना त्यांनी लिहिलेले शब्द जिवंत होतात, अंगावर रोमांच उभे राहतात. उत्कंठा, भीती, कुतूहल... भावनांची दाटी होते. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांची `पावनखिंडीचा गाझी` ही कविता आठवते आणि खिंडीतला तो रणसंग्राम नजरेसमोर उभा राहतो. या रणसंग्रामाचं वर्णन मराठी वाचकानं आजवर अनेकदा वाचलेलं असतं, पण सिद्दी वाहवाह आणि सेनापती धनाजी जाधवांचे वडील शंभुजी जाधव यांचा कागदपत्रातच सीमित राहिलेला पराक्रम क्वचितच वाचलेला असतो. इतिहासाच्या पानातच राहिलेली अशी अनेक मंडळी `रणखैंदळ`च्या पानापानांवर भेटत राहतात... सिद्दी वाहवाह, दोरोजी फाकडे, `हेर` विश्वासराव दिघे... अशा अनेकांच्या कर्तृत्वाला `रणखैंदळ`नं न्याय दिला आहे. उंबरखिंडी`तली लढाई आणि कारतलबखान-रायबाघनशी लढण्यासाठी शिवाजीराजांनी आखलेले डावपेच आणि प्रत्यक्षातील लढाई यांचं वर्णन केवळ अप्रतिम. खरंतर या एवढ्या एकाच विषयावर युद्धपट काढता येईल. ही लढाई सर्वार्थानं वेगळी आणि जगभरातल्या लढायांच्या इतिहासात उठून दिसणारी. ती तितक्याच समर्थ शब्दांत आपल्यासमोर उभी राहते. त्यापाठोपाठ राजापूरच्या इंग्रजांना दिलेला जबरदस्त तडाखा वाचायला मिळतो. शाहिस्तेखानावरील हल्ल्यापूर्वी नेताजींवर झालेला हल्ला, रुस्तुमेजमाननं त्यांना दिलेला मदतीचा हात आणि जखमी अवस्थेतही नेताजी पालकर शाहिस्तेखानावरील हल्ल्यावेळी आंबील ओढ्यावर जातीनं उपस्थित असल्याचा निर्वाळा देणारी पत्रं या गोष्टींकडं जसं आजवर दुर्लक्ष झालं, तसंच शहाजी-शिवाजी या पितापुत्रांनी विजापूरवर संयुक्तपणे हल्ला करण्यासाठी केलेल्या नियोजनाकडेही. `रणखैंदळ`मध्ये ही सारी हकीकत विस्तारानं वाचायला मिळते. शहाजी-शिवाजी या पितापुत्रांनी आखलेला तो डाव यशस्वी झाला असता तर चित्र बदललं असतं... पण तसं घडलं नाही याची हुरहूर लागून राहते. सुरतेची लूट म्हणजे शिवाजीराजांनी केवळ औरंगजेबाला नव्हे, तर इंग्रजांनीही दिलेला तडाखाच होता. या लुटीची नोंद तर लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या `लंडन गॅझेट`नं पान एकवर घेतलेली. `सुरत वॉज ट्रंबल्ड बाय द नेम ऑफ शिवाजी` ही त्यांच्या गव्हर्नरची नंतरच्या काळातील नोंद म्हणजे नेमकं काय हे `रणखैंदळ` मधली सुरतेची लूट वाचताना कळतं. वीरजी व्होरा लुटला गेला त्याची झालेली लूट तर त्यानं स्वत:च नोंदवून ठेवलेली. या सगळ्या समकालीन साधनांचा धांडोळा आणि वापर पाटलांनी आपल्या लेखनात मुक्तहस्तानं केला आहे. तळकोकणात झालेली कुडाळची लढाई आजवर तशी दुर्लक्षितच राहिलेली. ती लढाई आणि ती संपल्यानंतर अवघ्या वीस दिवसांनी राजांनी सुरू केलेली सिंधुदुर्गाची बांधणी या दोन्ही घटना रोमहर्षक आणि अभिमानास्पद. शिवाजीराजांच्या उद्यमशीलतेचा आणि धाडसाचा दाखला देणाऱ्या. `रणखैंदळ`च्या अखेरच्या पर्वात आहे शिवाजीराजांची मुधोळवरची स्वारी आणि `शिवलंका` सिंधुदुर्गाची पायाभरणी. मुधोळचे बाजीराजे घोरपडे हे भोसल्यांच्याच कुळीचे. शिवाजीराजांचे आप्तच. पण मराठ्यांत असलेल्या अंगभूत भाऊबंदकीनं पछाडलेले. त्यांनी शहाजीराजांना अनेकदा अडचणीत आणलेलं. त्याचा सूड घ्यावा अशी मनीषा शहाजीराजांनी व्यक्त केलेली आणि जिजाऊंनी तर तशी आज्ञाच राजांना केलेली. त्यांच्यावर शिवाजीराजांनी केलेल्या स्वारीचं वर्णन वाचताना पुन्हा दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी १९२८मध्ये लिहिलेली कविताच आठवली. `जरि असाल अमुचे पुत्र, भोसले मर्द वंशाचे बाजीला शासन द्यावे, आमुच्या प्राण-वैराचे` कर्णांत शब्द हे घुमती, पूज्य त्या जन्मदात्याचे बाजूच्या गृहवासाची साधून संधी मोलाची भ्रुकुटी चढली शिवबाची डहुळला सिंधु कोणाचा, घेतला सूड जनकाचा... वळवाचे जैसे मेघ, उसळती नभी एकाकी वैशाख ऋतूचे पूर, आकस्मिक सिंधु तटाकी ठाकली मुधोळा पुढती, मावळी फौजही बाकी होऊन परांचे दास स्वजनांच्याही कंठास लाविती नीच जे फास गाठला समूह तयांचा, घेतला सूड जनकाचा... तरवारी घोरपड्यांच्या, जणु मृत्यू मुखांतिल रसना कोषांतुनि बाहिर आल्या, की क्रुद्ध भुजंगम ललना इकडे तर घेइ भरारी, गरुडाची केवळ सेना ढालीस लागली ढाल नाचले तीक्ष्ण करवाल एकेक पडे घायाळ घातला सडा रुधिराचा, घेतला सूड जनकाचा... शिव-शंकर दोघांमध्ये, कांहीही नव्हता भेद पाहवे न मुख रायाचे, सूडाचा नयनी क्रोध एकेक गजासुर योद्धा, गाठून करी तद्भेद खड्गाच्या घाटावरचे पाणी जे प्याले साचे रणशूर मुधोळावरचे केला नि:पात तयांचा, घेतला सूड जनकाचा... `तो कुठे? जयाने धरिले, निजजनकाला कपटाने लाविली गळ्याला चीप, भोसलेकुल-द्वेषाने` शोधीत फिरे जो भूप, ठाकला तोहि शौर्याने उसळले हात दोघांचे शौर्यात चपलता नाचे यश थोर जिजापुत्राचे लाविला टिळा रक्ताचा, घेतला सूड जनकाचा... हा भाऊ घोरपड्यांचा, हा भाचा घोरपड्यांचा हा कुमार हा तो पुतण्या, ठेवला वंश सापाचा तीनशे मारिले खासे, केला उच्छेद खलांचा वैऱ्यांचे झाले सत्र वाचला एकचि पुत्र तेथे तो नव्हता मात्र हा प्रभाव शिवकोपाचा, घेतला सूड जनकाचा... जीवितही तृण मानावे, जननि जनक यांच्यासाठी तळ हातावर शिर घ्यावे, आपुल्या जन्मभूसाठी काळासह झुंज करावी, प्राणप्रिय धर्मासाठी हा क्षत्रिय-धर्म पवित्र गाववी यदीय चरित्र तो पूज्य असे सर्वत्र पाळिला धर्म पुत्राचा, घेतला सूड जनकाचा... मुधोळच्या स्वारीनंतर सिंधुदुर्गाच्या उभारणीची कथा `रणखैंदळ`मध्ये येते. सिंधुदुर्गाच्या पायाभरणीसाठी शिवाजीराजांबरोबरच जिजाऊसाहेब आणि राजांचा बहुतेक सर्व राणीवसा उपस्थित होता असं पाटील यांनी दाखवलं आहे. असेच काही नवे मुद्दे `रणखैंदळ`मधून पुढे आणले आहेत. कोल्हापुरच्या लढाईत परमानंद नेवासकरांची उपस्थिती, बडी बेगम आणि शहाजीराजे यांच्यातील भावसंबंध, शिवा काशीद आणि सिद्दी जौहरची भेट, खंडोजी खोपडेंसाठी हैबतराव शिळीमकरांची रदबदली असे. शिवा काशिदचा पाठलाग सिद्दी मसूदनं केल्याचं आजवर वाचलेलं. पण इथं त्याची शिवा काशिदशी झालेली भेट येते आणि तोच त्यांना सिद्दी जौहरच्या तळाची वाट दाखवतो. ( पृष्ठ १६१ ) खंडोजीसाठी कान्होजी जेध्यांनी केलेली सर्वज्ञात रदबदली येतेच, पण आधी त्यासाठी हैबतराव शिळीमकर येतात. पृष्ठ २०४ व २०७ वर `राज्यसभा` वाचायला मिळते. तिथं `राजसभा` हवं. रुस्तुमेजमाननं शिवा काशिदला ओळखणंही तसं नवंच. आजवर ही ओळख पटवण्याची कामगिरी अफझलखानाचा पुत्र फाजलखानानं केल्याचं वाचनात आलेलं. या सगळ्या घटना लिहिताना पन्हाळ्याच्या घेरातल्या सगळ्या रानवाटा आणि वाड्यावस्त्यांची नोंद अतिशय बारकाईनं केली आहे. अर्थात याचं श्रेय या सगळ्या परिसरात लेखकानं केलेल्या भटकंतीलाच द्यायला हवं. अफझलखान वध, सुरतेची लूट अशा काही घटनांनी शिवाजीराजांभोवती एक वलय निर्माण केलेलं आहे. या वलयामुळं एतद्देशियांइतकेच परकीयही अचंबित झालेले. त्याच्या नोंदी परकीयांच्या पत्र व्यवहारातून आणि शिवकाळात इथं येऊन गेलेल्या परकीय प्रवाशांच्या लेखनातून आढळतात. त्याची दखल घेत केलेलं हे लेखन. इतिहासाच्या रुमालात दडून राहिलेल्या अनेक व्यक्तिरेखांना समोर आणणारं. दारोजी फाकडे, मल्हारी मोरे, विश्वासराव दिघे अशी एरवी न दिसणारी पण प्रत्यक्षात असणारी पात्रं इथं भेटतात. `रणखैंदळ` शिवचरित्रातील काही प्रसंगांची नवी मांडणी करते. शिवरायांच्या पार्थ पराक्रमाची गाथा सांगते. शिवाजीराजाचं सह्याद्रीशी असणारं नातं नव्यानं उलगडते. खरंतर राजांच्या इतर सेनानायकांसारखाच आणि तितकीच मोलाची कामगिरी पार पाडणारा सह्याद्री इथं वाचकाला उराउरी भेटतो. शिवाजीराजांचं व्यक्तिमत्त्व आणि त्याभोवती असलेलं वलय आजवर मोजक्या चार-पाच घटनांवर आधारलेलं. `श्रीमानयोगी`बाबत रणजित देसाईंना नरहर कुरुंदकरांनी जे पत्र लिहिलं होतं, त्यातही याकडं लक्ष वेधलेलं. जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या त्या मोजक्या घटना म्हणजेच शिवाजीराजांचं कर्तृत्व असं समजून लोक लिहीत राहिले. पण त्याहीपलिकडं जात, शोध घेत विश्वास पाटील यांनी `रणखैंदळ`चा पट मांडलाय. तो विलोभनीय तर आहेच, शिवाय नवं काहीतरी हाती देणाराही आहे. `रणखैंदळ` आपल्या हाती देऊन पाटील यांनी शिवकाळाचा एक महत्त्वाचा तुकडा आपल्यापुढं उभा केला आहे. आता प्रतिक्षा आणि उत्सुकता आहे ती `महासम्राट`च्या तिसऱ्या खंडाची... `अस्मानभरारी`ची. `रणखैंदळ` अर्पण केली आहे संयुक्त महाराष्ट्र आणि मायमराठीच्या अस्तित्वासाठी असामान्य झुंज दिलेल्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना. `रणखैंदळ`चं देखणं आणि समर्पक मुखपृष्ठ केलं आहे विजयराव बोधनकर यांनी तर `महासम्राट`च्या कादंबरी चतुष्ट्याचे प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. `रणखैंदळ` ही त्यांचीच देखणी निर्मिती. © सदानंद कदम, सांगली. ९४२०७९१६८० ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more