* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAHASAMRAT RANKHAINDAL
  • Availability : Available
  • ISBN : 9789357200424
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2023
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 460
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IN THIS THRILLING NOVEL VISHVAS PATIL TAKES US INTO THE MOST ENGAGING ERA OF THE MARATHA HISTORY. THE GREAT WARRIOR CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HAS SHOWN THE WORLD THE TRUE MEANING OF RANKHAINDAL. AFTER ZANZAVAT, THIS IS THE SECOND PART OF THE SERIES, MAHASAMRAT, BASED ON SHIVAJI MAHARAJ. "IN THIS THRILLING NOVEL VISHVAS PATIL TAKES US INTO THE MOST ENGAGING ERA OF THE MARATHA HISTORY. THE GREAT WARRIOR CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HAS SHOWN THE WORLD THE TRUE MEANING OF RANKHAINDAL. AFTER ZANZAVAT, THIS IS THE SECOND PART OF THE SERIES, MAHASAMRAT, BASED ON SHIVAJI MAHARAJ. THE THRILL OF PAWANKHIND, THE LOOTING OF SURAT, THE DISARMAMENT OF THIRTY THOUSAND MOGLI FORCES IN UMBARKHIND, THE CONQUEST OF SHAHISTEKHAN, THE GREAT WAR OF KUDAL AND THE ETERNAL DREAM OF CREATING SINDHUDURG IN THE HEART OF THE SEA! SHIVRAI AT HIS 35 WEILDING `RANKHAINDAL`!"
पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MAHASAMRAT #RANKHAIDAL #VISHWASPATIL #CHATRAPATI #NOVEL #SHAHAJIMAHARAJ #JIJAU #ZANZAVAT #SHIVAJI #HISTORICALNOVEL #HISTORY #छत्रपती #शिवाजी #शिवाजीमहाराज #विश्वासपाटील #रणखैंदळ #महासम्राट #कादंबरी #ऐतिहासिककादंबरी #इतिहासपरकादंबरी "
Customer Reviews
  • Rating Starगंधार

    नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

  • Rating Starसुनील माने

    प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. त्याच्या सोबत असलेल्या फौजेची दाणादाण उडवली. आदिलशाहीची भरपूर दौलत, हत्ती-घोडे मिळाले. आणि बरोबर तीन दिवसांनी विजापूरच्या तटबंदीवर मराठ्यांची सेना “हर हर महादेव” च्या ललकारीने जबरदस्त धडकली! नेताजी पाकरांनी सात हजार फौजेनिशी एकशेसाठ मैलांचे अंतर दिनरात न थांबता विजापूर गाठले. जोरदार हल्ला चढवला. पण अभेद्य तटबंदीमुळे विजापूर वाचले. विजापूरची हरलेली वीस हजार फौज परत जवळ आल्यामुळे नेताजींना माघार घ्यावी लागली. अशी जबरदस्त सुरूवात आहे श्री विश्वास पाटील यांच्या “महासम्राट” या महाकादंबरीच्या दुसऱ्या खंडाची, म्हणजे “रणखैंदळ”ची! या कादंबरी मालिकेतला पहिला खंड “झंझावात”ने खळबळ उडवल्यानंतर बहुप्रतिक्षित दुसरा खंड दि २१-०५-२०२३ रोजी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने दिमाखदार सोहळ्यात खासदार श्री अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतरच्या काळापासून ही कादंबरी सुरू होते. विजापूरचा एव्हढा मोठा सरदार मारला गेल्यामुळे माजलेली खळबळ. बंकापूरातून बंडाची तयारी करणारी मोठी मराठी फौज. शहाजीराजांचा ही असाच डाव, विजापूरची बडी बेगम वेळीच मोडते. इकडे शिवाजी राजांनी विजापूराचे नाक असलेला पन्हाळा जिंकलेला. म्हणून चिडलेल्या सुलतानाने कर्नूलच्या सिद्दी जोहरला चाळीस हजारांची सेना, अनेक सरदार देऊन पन्हाळा पुन्हा जिंकण्यास व शिवाजी राजांना कैद किंवा मारावयास पाठविले. पन्हाळ्यास पडलेला विशाल वेढा आणि अडकलेले शिवाजी राजे. त्याच वेळेस दिल्लीपती औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानास जवळपास सव्वा लाख फौजफाटा देऊन मराठ्यांचा बिमोड करण्यास पाठविले. आणि तो पुण्यात येऊन लालमहालात ठाणं मांडून बसला. त्याने चाकणचा किल्ल्यावर हल्ला केला. तर इकडे पन्हाळ्याचा पाडाव करण्यासाठी इंग्रज राजापुरहून मोठी तोफ घेऊन येतात. पावसाळा सुरू होतो. आषाढातल्या मुसळधार पावसाला न जुमानता जोहर वेढा अजून बळकट करतो. पन्हाळ्याहून सुटका कशी करायची याचा खल सुरू होतो. बाजी प्रभू, फुलाजी, शिवा काशिद, शंभुजी जाधव, सिद्दी हिलाल, त्र्यंबक पंत, आणि इतर सर्व सरदारांमधे चर्चा होऊन महाराज तिथून कसे निसटतात, मुसळधार पावसात जंगलातून, पहाडांतून, नद्यानाल्यातून, पाठीवर दुश्मनांची फ़ौज घेऊन पन्हाळा ते विशालगढ हे अंतर फक्त सातशे सौनिक बरोबर घेऊन कसे पार करतात आणि घोडखिंडीतला चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन अप्रतिम केलंय. कारण लेखकाने ही संपूर्ण पायवाट भर पावसात नऊ वेळा अनुभवली आहे! या कार्यात बलिदान देणारे शिवा काशिद, बाजी प्रभू, फुलाजी, शंभुजी आणि बांदल सेना यांनी पावन केलेली ती पावनखिंड! इकडे शाहिस्ताखानाने पुण्याच्या लालमहालात टाकलेला डेरा आणि चाकणचा किल्ला ही जिंकला होता. त्याच्यापर्यंत शिवरायांच्या पन्हाळगडावरची कामगिरी पोहोचली होती. औरंगझेब ही पत्रांतून सारखा दबाव टाकत होता. शाहिस्तेखानाने राजगडावर सरळ हल्ला करण्यापेक्षा कोकणावर हल्ला करण्यासाठी कारतलबखान व रायबागन यांना तीस हजार फौज व लाखोंचा खजिना देऊन पाठवले. शिवरायांनी चतुराईने त्या फौजेला उंबरखिंडीत उतरायला भाग पाडले. तहानभुकेने बेजार झालेल्या सैन्यावर घनदाट जंगलातून त्यांच्या नजरेआडून बाणांचा, दगडगोट्यांचा हल्ला चढवला. रणभेऱ्या व तुताऱ्यांनी जंगल हादरवून सोडले. कारतलबखानाला शरण येण्यास भाग पाडले. नेसत्या वस्त्रांनिशी त्याची सुटका केली. अर्ध्या बाराशे मावळ्यांना हाताशी घेऊन तीस हजार सैन्यावर गनिमी कावा वापरून मिळवलेला विजय इतिहासात प्रथमच असेल! शिवराय तेथून कोकणात उतरतात. दापोली-पालवणच्या जशवंत दळवी आणि श्रृंगारपूरच्या सूर्यराव सुर्व्यांचा बिमोड करतात. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून उध्वस्त करतात कारण ते पन्हाळ्यावर असताना याच वखारीतील रेव्हिंगटनने मोठी तोफ आणुन किल्ल्यावर डागली होती. सर्व इंग्रजांना पकडून कैदेत टाकतात. कोकणची किनारपट्टी स्वराज्यात आणायची, मजबूत किल्ले व बंदर बनवायचे, जहाजांचे कारखाने आणि स्वराज्याचे आरमार बनविण्याच्या तयारीला लागतात. ही केव्हढी दूरदृष्टी होती शिवरायांची! याच सुमारास जवळपास बावीस वर्षांनंतर आपल्या मातृभूमीत आलेले त्यांचे पिता शहाजीराजांची भेट होते. आपल्या पुत्राचे कर्तृत्व पाहून सुखावून परततात पुन्हा बेंगरूळाला पुन्हा न भेटण्यासाठी! शाहिस्तेखानही शिवाजी महाराजांवर हल्ला करायच्या तयारीस लागतो. काही फौज कोकणात तर काही फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालायला पाठवतो. राजगडावर शिवरायांना जेरबंद करायचा आराखडा तयार करतो. तो आपल्यावर कोसळण्यापूर्वीच शाहिस्त्याचा बंदोबस्त करायचे ठरवतात. सिंहगडावरचे फितुरीचे कारस्थान मोडून तिथूनच पुण्यातील लालमहालावर हल्ला करायचा जबरदस्त मोहीम आखतात. बाराशे मावळ्यांना बरोबर घेऊन शिवराय रात्रीच्या अंधारात कसे लालमहालात शिरतात व हमाधुमीत शाहिस्त्याची तीन बोटे कलम करतात, त्याचा जावई व पुत्राला ठार करतात आणि निसटतात. त्यांच्या मागावर येणाऱ्या सैन्याला गुमराह करण्यासाठी कात्रजच्या घाटात तीनशे बैलांच्या शिंगांना मशाली बांधून जंगलात पळवतात. गनिमी काव्याचे हे दुसरे उदाहरण- जगातील एकमेव! या हल्ल्यानंतर शाहिस्ता तीन दिवसात चंबुगबाळे गुंडाळून पुणे सोडून पळाला. शिवरायांचे मोठे स्वप्न साकार करण्यासाठी अपार धनराशीची गरज होती. किल्ले बळकट करणे, सागरी किनारा व आरमार बळकट करणे, शस्त्रे व दारूगोळा जमविणे, इत्यादी अनेक कामासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा? यासाठी शिवरायांनी गुप्त मोहिम ठरवली. त्याची जोरदार तयारी सुरू केली जशी-राजगडाखाली कातड्यांच्या पखाली शिवणे, नवे दमदार सैन्य भरती करणे, नव्या दमाचे घोडे जमविणे. लोहगडाजवळ चार हजार घोडे जमा केले, राजगडाहून दहा हजार सैन्य निघाले. चौदा हजार घोडे रात्रीच्या अंधारात पळायचे व दिवसा जंगलात लपायचे. त्र्यंबकच्या किल्लेदाराने चारशे दमदार बैल जमा केले होते. राजगडापासून साडेतीनशे मैल दूर असलेली सोन्याची लंका लुटण्याचं ते स्वप्न! सुरतेची बदसुरत करायची ती योजना! सर्व प्रवास दुश्मनाच्या मुलखातून करायचा होता. आणि शिवाजी महाराज सुरतेला पोहोचतात. तिथला सुभेदार इनायतखान व सुरतेतील बड्या व्यापाऱ्यांना खंडणी देण्यासाठी स्वार पाठवतात. पण ते दाद देत नाहीत असे पाहून नेताजींसह लुटालुट करायला सुरूवात करतात. सुरतेची संपूर्ण माहिती बहिर्जींनी एक वर्षांपासून गोळा केली होती. इंग्रजांची वखार सोडून सर्व सुरत लुटून, जाळून चार दिवसांनंतर परतीच्या प्रवासाला निघतात. मोघलांची फौज जवळ येण्यापूर्वीच आपल्या मुलुखात परततात. घेऊन करोडो रूपयांची लूट! जसे राजे राजगडावर येतात तसे त्यांना आपले पिता शहाजीराजांच्या अपघाती निधनाची वार्ता कळते. जिजाऊसाहेब सती जाणार असतात. त्यांना बड्या मुश्कीलीने थांबवतात! आनंदाच्या क्षणांत दुःखाचा पहाड कोसळतो! आपल्या हातातून कोकणची किनारपट्टी शिवाजीराजे घेत असलेले पाहून आदिलशाह चवताळून जातो. वजीर खवासखान व बाजीराव घोरपडे यांना शिवरायांवर संयुक्त हल्ला करण्यास कुडाळला पाठवतो. खवासखान वीस हजार फौज घेऊन पोहोचतो आणि बाजीराव मुधोळहून दहा हजार फौज घेऊन येणार असतो. या बाजीरावाने शहाजीराजांना अटक करण्यात, पन्हाळ्यावर सिद्दिला मदत करण्यात मोठा हात असतो. त्याच्या मनांत शिवरायंविषयी जहरी तिरस्कार भरलेला. कुडाळच्या रणांगणावर खवासखानाला गाफील ठेऊन शिवराय मुधोळवर हल्ला करून बाजीरावास ठार करतात आणि त्याच भागातून येऊन खवासखानावर दुहेरी हल्ला करतात आणि जबरदस्त हानी करून पळवून लावतात. जंजिऱ्याच्या तोडीचा सागरीकिल्ला बांधायचा व डच, इंग्रज, सिद्दि यांचेवर वचक ठेवायचा. त्यासाठी त्यांना मालवणच्या किनारी समुद्रात एक बेट सापडतं-कुरट्याचे बेट. चारी बाजूने पहाणी करून एक अभेद्य किल्ला बनविण्याचे आदेश देतात. पायभरणीच्या महापूजेसाठी अनपेक्षितपणे राजगडाहून जिजाऊसाहेब व सर्व राणीवसा तिथे येतो. समुद्रात वसविली जाते शिवलंका… म्हणजेच सिंधुदुर्ग! छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे- विजापूरच्या तटबंदीवर हल्ला, पावनखिंडीतला थरार, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीतले निःशस्त्रीकरण, शाहिस्तेखानावर थेट हल्ला करून पळवून लावणे, सुरतेची महालूट, मुधोळच्या बाजीरावाचा वध, कुडाळचा महासंग्राम, कोकणचा किनारा स्वराज्यात आणणे आणि सिंधुदुर्गाचे निर्माण, असा विशाल पट “महासम्राट”च्या दुसऱ्या खंडात “रणखैंदळ” मधे विश्वास पाटीलांनी आपल्या जबरदस्त लेखणीने रंगवला आहे. मुख्य म्हणजे या कादंबरीतली भाषा ही बखरीतली न वाटतां आजची भाषा आहे म्हणून लगेच वाचकांच्या मनाची पकड घेते. शिवरायांच्या या सर्व कामगिरीमध्ये नेताजी पालकरांचा प्रत्यक्ष सहभाग प्रथमच दाखवला गेला आहे. विश्वास पाटील यांनी शिवरायांवर भरपूर अभ्यास करून जवळपास इतिहासातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. या कादंबरीत पिता-पुत्र, माझा-पुत्र यांचे जिव्हाळ्याचा संबंध, शिवरायांचे त्यांचे सहकारी नेताजी, तानाजी, बाजी प्रभू, बहिर्जी, विश्वास दिघे आणि इतरांबरोबर असलेले जिवाशिवाचे नाते यावरही सुंदर प्रकाश टाकण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. आता प्रतिक्षा आहे या कादंबरी मालिकेतील तिसरा खंड “अस्मान भरारी” याची! *सुनील माने* ०४-०८-२०२३ ...Read more

  • Rating Starसदानंद कदम

    शिवरायांच्या पार्थ पराक्रमाची गाथा : रणखैंदळ ---------------------------------------------------------- राजा शिवछत्रपती. मऱ्हाष्ट्र राज्याचा इतिहासही आणि वर्तमानही. इथल्या मातीत जन्मलेल्या हरेक जीवाचा श्वासही आणि कित्येकांचा आयुष्यभराचा ध्यासही. मरठ्यांच्या इतिहासातली ही एकमेव अशी व्यक्तिरेखा आहे की तिनं भूत, वर्तमान आणि भविष्यावरही आपल्या असीम कर्तृत्वाची छाप टाकली आहे. तिच्या पार्थ पराक्रमाची गाथा तर इतिहासाच्या पानापानांवर. वर्तमानातल्या हरेक पक्षाच्या हरेक नेत्याला आजही त्यांच्याच नावाचा आश्रय घ्यावा लागतो, तर भविष्यातही कुणी त्यांच्या जयजयकाराशिवाय आपले पाय इथल्या राजकारणात घट्ट रोवून उभा राहील अशी स्थिती नाही... ती कधी निर्माणही होणार नाही. स्थल, काल, भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून गेलेलं हे या देशीचं नेतृत्व. हयातीतच त्यानं परदेशस्थ माध्यमांतही जागा मिळवलेली. राजा शिवछत्रपती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनानी. भारतीय आरमाराचे जनक. इथल्या भूमीत स्वत्व आणि स्वाभिमानाचं रोपटं रुजविणारे. त्यांच्या कर्तृत्वाच्या नौबती चहुदिशात घुमल्या. त्यांच्या पराक्रमाचे डंके सर्वदूर वाजत राहिले. त्याच्या पाऊलखुणा इथल्या दऱ्याखोऱ्यात उमटल्या. सह्याद्रीतल्या गडकोटांच्या तटाबुरुजांवर विसावल्या. त्याचा धांडोळा घेत या देशीचा हरेक पुत्र इथल्या मावळभूमीत दौडतोय. गेली साडेतीनशे वर्ष. यात इथली तरुणाई आहे, इथले प्रतिभावंत आहेत, इथले कलावंत आहेत आणि इतिहासानं झपाटलेले बुजुर्गही. इथल्या कलावंतांनी त्यांना रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला,तर इथल्या प्रतिभावंतांनी त्यांची शब्दपूजा बांधली. शाहिरांनी त्यांचे पवाड गायिले, तर तुम्हीआम्ही हरेक श्वासाबरोबर त्यांचा जयजयकार केला... आजही करतोय. गेल्या पिढीतल्या कवींनी त्यांच्यावर खंडकाव्यं लिहिली, नाटककारांनी नाटकं लिहिली तर लेखकांनी कादंबरीमाला लिहिल्या. खंडीत झालेली ती परंपरा पुन्हा सुरू केलीय विश्वास पाटील यांनी. `महासम्राट` या नावानं ते शिवाजीराजांचा जीवनपट उलगडून सांगताहेत. तोही चार खंडात. त्यातला पहिला खंड `झंझावात` गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला आणि तो हिंदी, इंग्रजी, कन्नडमध्येही गेला. आता त्या कादंबरीमालेतला दुसरा खंड नुकताच प्रकाशित झालाय... `रणखैंदळ` ! नावातच सर्वकाही सांगून जाणारी ही कादंबरी. पावनखिंडीतला थरार, सुरतेची लूट, तीस हजार मोगली फौजेचं उंबरखिंडीत केलेलं नि:शस्त्रीकरण, शाहिस्तेखानला वेसण, कुडाळचं युध्द आणि सागराच्या पोटातलं `शिवलंका` सिंधुदुर्ग निर्मितीचं अचाट स्वप्न ! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली `रणखैंदळ` हा या कादंबरीचा पट. हा पट मांडताना लेखकानं समकालीन साधनांचा धांडोळा घेतल्याचं पानोपानी जाणवत राहतं. सरदेसाई यांची मराठी रियासत, मराठीतील बखर वाङ्मय, शिवकालीन पत्रसारसंग्रह, सुरतकर इंग्रजांचा कंपनीशी झालेला पत्रव्यवहार, परदेशी इतिहासकारांनी केलेल्या नोंदी या साऱ्यांचा पुरेसा धांडोळा घेतल्याचंही प्रत्ययास येतंं. शिवाय शिवचरित्रातील या घटना जिथं घडल्या त्या परिसरात तर गेली दहा-बारा वर्षं लेखकाची भटकंती सुरूच होती आणि आहे. हे सगळं असूनही `रणखैंदळ`ची भाषा बखर वाङ्मयाच्या जवळ जाणारी नसून ती आधुनिक मराठी आहे, आजच्या वाचकाला सहज समजणारी आणि ओघवती आहे. काही नवख्या वाचकांना या कादंबरीत आलेले... तेही अगदी थोडकेच तत्कालिन शब्द समजणं सोपं जावं म्हणून त्यांच्या अर्थाचं परिशिष्ट शेवटी द्यायला हवं होतं ते मात्र दिसत नाही. १० नोव्हेंबर, १६५९ या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या `जनीच्या टेंब्या`वर शिवाजीराजांनी अफझलखानाची भेट घेतली आणि त्याचा कोथळा काढला. या एकाच घटनेनंतर त्यांचं नाव देशभरात तर गेलंच, शिवाय ते परदेशातही पोहोचलं. या घटनेनं स्वराज्याचं बळ चहुअंगानी वाढलं. त्यानंतर अठराव्या दिवशीच शिवाजीराजांनी पन्हाळगड हस्तगत केला. विजापूरकरांची ही दक्षिणेतली राजधानी... शहानबीदुर्ग. यामुळं आदिलशाही सत्ता हादरली, पण तिला जास्त धक्के बसले ते नेताजी पालकरांनी विजापूरवर केलेल्या चढाईनं. अफझलखानाच्या वधानंतर चौथ्या दिवशी नेताजींनी `दारुल सल्तनत` विजापूरच्या भिंतीला दिलेली धडक आदिलशाहीच्या काळजातच कळ उठवून गेली या घटनेनं `रणखैंदळ`ची सुरुवात होते. अवघ्या वीस-पंचवीस हजारांच्या नेताजींच्या तुकडीनं दीड-दोन दिवसातच विजापूरची भिंत खिळखिळी केली आणि अवघं विजापूर हादरून गेलं. गंमत म्हणजे नंतर औरंगजेबाच्या दोन-अडीच लाखाच्या फौजेनं याच भिंतीला वर्ष-सव्वावर्ष टक्कर दिली होती. तरीही त्याला यश मिळालं नव्हतं. नेताजींचा हा पराक्रम विश्वास पाटलांच्या शब्दांत वाचताना वेगळंच स्फुरण चढतं. नेताजींच्या या पराक्रमाविषयी आजवर फारसं लिहिलं गेलं नव्हतं. ती उणीव `रणखैंदळ`नं भरून काढली आहे. एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असा हा नेताजी पालकरांचा पराक्रम. वाचकाला खिळवून ठेवणारा. सिद्दी जौहरचा वेढा आणि पन्हाळ्यावर १३३ दिवस अडकून पडलेले शिवाजीराजे, वेढ्यातून निसटून जाताना भर पावसात त्यांनी केलेली ती रात्रीची दौड, बाजी-फुलाजी आणि बदलांच्या सैन्यानं गाजवलेला गजापूरच्या खिंडीतला तो पराक्रम, शिवा काशिद, बाजी-फुलाजी आणि सिद्दी वाहवाहचं बलिदान यांचं वर्णन केवळ अंगावर काटा आणणारं. पन्हाळगड ते विशाळगड... पडत्या पावसात राजांनी केलेला तो थरारक प्रवास अनुभवण्यासाठी आजची तरुणाई धावत असते. लेखकानंही कित्येकदा हा अनुभव त्याच तिथीला घेतलेला असल्यानं तो वाचतांना त्यांनी लिहिलेले शब्द जिवंत होतात, अंगावर रोमांच उभे राहतात. उत्कंठा, भीती, कुतूहल... भावनांची दाटी होते. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांची `पावनखिंडीचा गाझी` ही कविता आठवते आणि खिंडीतला तो रणसंग्राम नजरेसमोर उभा राहतो. या रणसंग्रामाचं वर्णन मराठी वाचकानं आजवर अनेकदा वाचलेलं असतं, पण सिद्दी वाहवाह आणि सेनापती धनाजी जाधवांचे वडील शंभुजी जाधव यांचा कागदपत्रातच सीमित राहिलेला पराक्रम क्वचितच वाचलेला असतो. इतिहासाच्या पानातच राहिलेली अशी अनेक मंडळी `रणखैंदळ`च्या पानापानांवर भेटत राहतात... सिद्दी वाहवाह, दोरोजी फाकडे, `हेर` विश्वासराव दिघे... अशा अनेकांच्या कर्तृत्वाला `रणखैंदळ`नं न्याय दिला आहे. उंबरखिंडी`तली लढाई आणि कारतलबखान-रायबाघनशी लढण्यासाठी शिवाजीराजांनी आखलेले डावपेच आणि प्रत्यक्षातील लढाई यांचं वर्णन केवळ अप्रतिम. खरंतर या एवढ्या एकाच विषयावर युद्धपट काढता येईल. ही लढाई सर्वार्थानं वेगळी आणि जगभरातल्या लढायांच्या इतिहासात उठून दिसणारी. ती तितक्याच समर्थ शब्दांत आपल्यासमोर उभी राहते. त्यापाठोपाठ राजापूरच्या इंग्रजांना दिलेला जबरदस्त तडाखा वाचायला मिळतो. शाहिस्तेखानावरील हल्ल्यापूर्वी नेताजींवर झालेला हल्ला, रुस्तुमेजमाननं त्यांना दिलेला मदतीचा हात आणि जखमी अवस्थेतही नेताजी पालकर शाहिस्तेखानावरील हल्ल्यावेळी आंबील ओढ्यावर जातीनं उपस्थित असल्याचा निर्वाळा देणारी पत्रं या गोष्टींकडं जसं आजवर दुर्लक्ष झालं, तसंच शहाजी-शिवाजी या पितापुत्रांनी विजापूरवर संयुक्तपणे हल्ला करण्यासाठी केलेल्या नियोजनाकडेही. `रणखैंदळ`मध्ये ही सारी हकीकत विस्तारानं वाचायला मिळते. शहाजी-शिवाजी या पितापुत्रांनी आखलेला तो डाव यशस्वी झाला असता तर चित्र बदललं असतं... पण तसं घडलं नाही याची हुरहूर लागून राहते. सुरतेची लूट म्हणजे शिवाजीराजांनी केवळ औरंगजेबाला नव्हे, तर इंग्रजांनीही दिलेला तडाखाच होता. या लुटीची नोंद तर लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या `लंडन गॅझेट`नं पान एकवर घेतलेली. `सुरत वॉज ट्रंबल्ड बाय द नेम ऑफ शिवाजी` ही त्यांच्या गव्हर्नरची नंतरच्या काळातील नोंद म्हणजे नेमकं काय हे `रणखैंदळ` मधली सुरतेची लूट वाचताना कळतं. वीरजी व्होरा लुटला गेला त्याची झालेली लूट तर त्यानं स्वत:च नोंदवून ठेवलेली. या सगळ्या समकालीन साधनांचा धांडोळा आणि वापर पाटलांनी आपल्या लेखनात मुक्तहस्तानं केला आहे. तळकोकणात झालेली कुडाळची लढाई आजवर तशी दुर्लक्षितच राहिलेली. ती लढाई आणि ती संपल्यानंतर अवघ्या वीस दिवसांनी राजांनी सुरू केलेली सिंधुदुर्गाची बांधणी या दोन्ही घटना रोमहर्षक आणि अभिमानास्पद. शिवाजीराजांच्या उद्यमशीलतेचा आणि धाडसाचा दाखला देणाऱ्या. `रणखैंदळ`च्या अखेरच्या पर्वात आहे शिवाजीराजांची मुधोळवरची स्वारी आणि `शिवलंका` सिंधुदुर्गाची पायाभरणी. मुधोळचे बाजीराजे घोरपडे हे भोसल्यांच्याच कुळीचे. शिवाजीराजांचे आप्तच. पण मराठ्यांत असलेल्या अंगभूत भाऊबंदकीनं पछाडलेले. त्यांनी शहाजीराजांना अनेकदा अडचणीत आणलेलं. त्याचा सूड घ्यावा अशी मनीषा शहाजीराजांनी व्यक्त केलेली आणि जिजाऊंनी तर तशी आज्ञाच राजांना केलेली. त्यांच्यावर शिवाजीराजांनी केलेल्या स्वारीचं वर्णन वाचताना पुन्हा दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी १९२८मध्ये लिहिलेली कविताच आठवली. `जरि असाल अमुचे पुत्र, भोसले मर्द वंशाचे बाजीला शासन द्यावे, आमुच्या प्राण-वैराचे` कर्णांत शब्द हे घुमती, पूज्य त्या जन्मदात्याचे बाजूच्या गृहवासाची साधून संधी मोलाची भ्रुकुटी चढली शिवबाची डहुळला सिंधु कोणाचा, घेतला सूड जनकाचा... वळवाचे जैसे मेघ, उसळती नभी एकाकी वैशाख ऋतूचे पूर, आकस्मिक सिंधु तटाकी ठाकली मुधोळा पुढती, मावळी फौजही बाकी होऊन परांचे दास स्वजनांच्याही कंठास लाविती नीच जे फास गाठला समूह तयांचा, घेतला सूड जनकाचा... तरवारी घोरपड्यांच्या, जणु मृत्यू मुखांतिल रसना कोषांतुनि बाहिर आल्या, की क्रुद्ध भुजंगम ललना इकडे तर घेइ भरारी, गरुडाची केवळ सेना ढालीस लागली ढाल नाचले तीक्ष्ण करवाल एकेक पडे घायाळ घातला सडा रुधिराचा, घेतला सूड जनकाचा... शिव-शंकर दोघांमध्ये, कांहीही नव्हता भेद पाहवे न मुख रायाचे, सूडाचा नयनी क्रोध एकेक गजासुर योद्धा, गाठून करी तद्भेद खड्गाच्या घाटावरचे पाणी जे प्याले साचे रणशूर मुधोळावरचे केला नि:पात तयांचा, घेतला सूड जनकाचा... `तो कुठे? जयाने धरिले, निजजनकाला कपटाने लाविली गळ्याला चीप, भोसलेकुल-द्वेषाने` शोधीत फिरे जो भूप, ठाकला तोहि शौर्याने उसळले हात दोघांचे शौर्यात चपलता नाचे यश थोर जिजापुत्राचे लाविला टिळा रक्ताचा, घेतला सूड जनकाचा... हा भाऊ घोरपड्यांचा, हा भाचा घोरपड्यांचा हा कुमार हा तो पुतण्या, ठेवला वंश सापाचा तीनशे मारिले खासे, केला उच्छेद खलांचा वैऱ्यांचे झाले सत्र वाचला एकचि पुत्र तेथे तो नव्हता मात्र हा प्रभाव शिवकोपाचा, घेतला सूड जनकाचा... जीवितही तृण मानावे, जननि जनक यांच्यासाठी तळ हातावर शिर घ्यावे, आपुल्या जन्मभूसाठी काळासह झुंज करावी, प्राणप्रिय धर्मासाठी हा क्षत्रिय-धर्म पवित्र गाववी यदीय चरित्र तो पूज्य असे सर्वत्र पाळिला धर्म पुत्राचा, घेतला सूड जनकाचा... मुधोळच्या स्वारीनंतर सिंधुदुर्गाच्या उभारणीची कथा `रणखैंदळ`मध्ये येते. सिंधुदुर्गाच्या पायाभरणीसाठी शिवाजीराजांबरोबरच जिजाऊसाहेब आणि राजांचा बहुतेक सर्व राणीवसा उपस्थित होता असं पाटील यांनी दाखवलं आहे. असेच काही नवे मुद्दे `रणखैंदळ`मधून पुढे आणले आहेत. कोल्हापुरच्या लढाईत परमानंद नेवासकरांची उपस्थिती, बडी बेगम आणि शहाजीराजे यांच्यातील भावसंबंध, शिवा काशीद आणि सिद्दी जौहरची भेट, खंडोजी खोपडेंसाठी हैबतराव शिळीमकरांची रदबदली असे. शिवा काशिदचा पाठलाग सिद्दी मसूदनं केल्याचं आजवर वाचलेलं. पण इथं त्याची शिवा काशिदशी झालेली भेट येते आणि तोच त्यांना सिद्दी जौहरच्या तळाची वाट दाखवतो. ( पृष्ठ १६१ ) खंडोजीसाठी कान्होजी जेध्यांनी केलेली सर्वज्ञात रदबदली येतेच, पण आधी त्यासाठी हैबतराव शिळीमकर येतात. पृष्ठ २०४ व २०७ वर `राज्यसभा` वाचायला मिळते. तिथं `राजसभा` हवं. रुस्तुमेजमाननं शिवा काशिदला ओळखणंही तसं नवंच. आजवर ही ओळख पटवण्याची कामगिरी अफझलखानाचा पुत्र फाजलखानानं केल्याचं वाचनात आलेलं. या सगळ्या घटना लिहिताना पन्हाळ्याच्या घेरातल्या सगळ्या रानवाटा आणि वाड्यावस्त्यांची नोंद अतिशय बारकाईनं केली आहे. अर्थात याचं श्रेय या सगळ्या परिसरात लेखकानं केलेल्या भटकंतीलाच द्यायला हवं. अफझलखान वध, सुरतेची लूट अशा काही घटनांनी शिवाजीराजांभोवती एक वलय निर्माण केलेलं आहे. या वलयामुळं एतद्देशियांइतकेच परकीयही अचंबित झालेले. त्याच्या नोंदी परकीयांच्या पत्र व्यवहारातून आणि शिवकाळात इथं येऊन गेलेल्या परकीय प्रवाशांच्या लेखनातून आढळतात. त्याची दखल घेत केलेलं हे लेखन. इतिहासाच्या रुमालात दडून राहिलेल्या अनेक व्यक्तिरेखांना समोर आणणारं. दारोजी फाकडे, मल्हारी मोरे, विश्वासराव दिघे अशी एरवी न दिसणारी पण प्रत्यक्षात असणारी पात्रं इथं भेटतात. `रणखैंदळ` शिवचरित्रातील काही प्रसंगांची नवी मांडणी करते. शिवरायांच्या पार्थ पराक्रमाची गाथा सांगते. शिवाजीराजाचं सह्याद्रीशी असणारं नातं नव्यानं उलगडते. खरंतर राजांच्या इतर सेनानायकांसारखाच आणि तितकीच मोलाची कामगिरी पार पाडणारा सह्याद्री इथं वाचकाला उराउरी भेटतो. शिवाजीराजांचं व्यक्तिमत्त्व आणि त्याभोवती असलेलं वलय आजवर मोजक्या चार-पाच घटनांवर आधारलेलं. `श्रीमानयोगी`बाबत रणजित देसाईंना नरहर कुरुंदकरांनी जे पत्र लिहिलं होतं, त्यातही याकडं लक्ष वेधलेलं. जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या त्या मोजक्या घटना म्हणजेच शिवाजीराजांचं कर्तृत्व असं समजून लोक लिहीत राहिले. पण त्याहीपलिकडं जात, शोध घेत विश्वास पाटील यांनी `रणखैंदळ`चा पट मांडलाय. तो विलोभनीय तर आहेच, शिवाय नवं काहीतरी हाती देणाराही आहे. `रणखैंदळ` आपल्या हाती देऊन पाटील यांनी शिवकाळाचा एक महत्त्वाचा तुकडा आपल्यापुढं उभा केला आहे. आता प्रतिक्षा आणि उत्सुकता आहे ती `महासम्राट`च्या तिसऱ्या खंडाची... `अस्मानभरारी`ची. `रणखैंदळ` अर्पण केली आहे संयुक्त महाराष्ट्र आणि मायमराठीच्या अस्तित्वासाठी असामान्य झुंज दिलेल्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना. `रणखैंदळ`चं देखणं आणि समर्पक मुखपृष्ठ केलं आहे विजयराव बोधनकर यांनी तर `महासम्राट`च्या कादंबरी चतुष्ट्याचे प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. `रणखैंदळ` ही त्यांचीच देखणी निर्मिती. © सदानंद कदम, सांगली. ९४२०७९१६८० ...Read more

  • Rating Starललित अंक जुलै २०२३

    ही महत्त्वाकांक्षी, साहित्यात निर्मितीगड सर करणारी अशी `महासम्राट` कादंबरी मालिकेतील दुसरी मालिका किंवा दुसरा भाग पहिला `झंझावात`; तर हा दुसरा `रणखैंदळ`,खैंदळहा इतिहास गोवणारा, कालदर्शक शब्द म्हणजे रणधुमाळी. महानायक, महासम्राट शिवाजीराजे म्हणजे मरठी मनांचे स्फूर्तिदैवत. त्यांची इतिहास घडविणारी कारकीर्द आतापर्यंत अनेकांनी स्फूर्तिचैतन्य घेऊन शब्दबद्ध केली आहे. तरीही काही व्यक्ती, काही तपशील, काही घटिते यांचा एकमेकांत गुंतून घडलेला इतिहास अनेकांना सांगावासा वाटतो. कारण तो कधीही जुनाच (इतिहास ) होत नाही. शिवाजीमहाराजांचे "आठवावे रूप आठवावा प्रताप।` असे वाटणे अगदी सहज असते.` पाहिलेंचि पहावे पुन्हा पुन्हा` ही अंतरीची भावना त्यामागे असते. `नेथ धरिता राजकारणा। प्रसंग पाहोनि चालावे ।।` हा समर्थ रामदासस्वामींचा मंत्र स्वीकारून राजांनी जे राजकारण केले, जो इतिहास घडवला त्याचे महत्त्व आजही आहेच. हे जाणून विश्वास पाटील यांनी `महासम्राट` कादंबरी मालिका सुरू केली. राजांच्या कर्तृत्वावर आधारलेली, त्यांच्या कर्तृत्वाइतकीच भव्य दिव्य पहिली `झंझावात` तर हिंदी, इंग्रजी, कन्नड या भाषांतही अनुवादित होऊन स्वीकारली गेली. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अफझलखानाच्या वधापासून सिंधुदुर्गाच्या पायाभरणीपर्यंतची शिवरायांची कर्तृत्वाची इथे या कादंबरीत घोडदौड येते. नेताजी पालकरांचा पराक्रम येतो. बाजी प्रभू यांचे योगदान येते, `पन्हाळ्याच्या वेढ्यावेळी, शिलांगण या आपल्या मनोगतात, विश्वास पाटील म्हणतात त्याप्रमाणे `पहिला इस्लामधर्मीय हुतात्मा` सिद्दी वाहवाह येतो. या सिद्दीचे वडील हिलालही हुतात्माच झाले होते. रणदुल्लाखान त्याचा मुलगा रुस्तुमजमा यांनीही शहाजी, शिवाजी यांची सेवा केली... हे सगळे "शिलांगणात पाटील सांगतात. तो ऐतिहासिक प्रदेश ते भर पावसात पायांखाली घालतात, छायाचित्रे मिळवतात, परिसरातील दुर्गमता आणि स्पंदने समजून घेतात. म्हणूनच ते म्हणतात, अभ्यासकांनी अनेक गोष्टी पुरावे असूनही दुर्लक्ष केले. दस्तऐवजांकडे पण सध्याचे राजकारण `निवडणूकप्रवण झाल्याने शिवप्रदेश आणि शिवकाळ यांकडे आत्मीयतेने पाहिले जात नाही. सह्याद्रीबाबतचे शिवरायांचे निसर्गभान, गनिमाला धडा शिकवणे असलेल्या साहित्याला अधिक धार देणे, `लोक राखणे`... आणि आजचे वास्तव यांचे भान राखत लेखकाने हे चरित्रखंड लिहिल्याने त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. विजापूर, आग्रा, सुरतेत शिवरायांचे अश्वारूढ पुतळे आहेत. लेखकाने नकाशे, प्रदेशाचे गडकिल्ल्यांचे महत्त्व, भटकंती करून कुणाकुणाकडून जमविले आणि म्हणूनच या पुस्तकात मर्यादित कालखंड मोठा आयाम घेऊन जणू महाकादंबरीच बनतो. या पुस्तकातील शिवरायांचे कर्तृत्व आणि ऐतिहासिक कार्य त्यांच्या चरित्रातून पाहण्यासाठी लेखकाचे `शिलांगण` महत्त्वाचे ठरते. कादंबरी सुरू होते ती नेताजी पालकरांनी केलेल्या विजापुरावरील हमल्यापासून आणि संपते ती सूरतेची लूट करून, सिंधुदुर्गाची निर्मितिस्वप्नं प्रत्यक्षात आणण्याच्या धडपडीने. अगदी पहिल्या प्रकरणापासून वाचकाला आधी नकाशाच्या मदतीने प्रदेश ओळखीचा होतो. मग हालचाली, घटना, परस्परसंबंध, धोरण, व्यक्ती यांच्या चित्रणातून साकारलेली घटना भूतकाळाला पालाण घालून प्रत्यक्षात उतरते जणू. वाचक या हालचालीत, घटनांत प्रत्यक्ष साक्षीदारच असतो. वाचकाला असे वाटणे ही लेखकाने जिंकलेली लढाई आहे. त्यासाठी इतिहासकार, कादंबरीकार म्हणून येणे कसब फार प्रभावी आहे. इथे थोड्या अवकाशात त्या संदर्भात सफर करायची तर सर्व इतिहास पुनरावृत्त करणे अशक्यच. शिवाय पन्हाळा, विशालगडावरील तोफांची सलामी, काशीदने प्रतिशिवाजी बनून फसगत करणे, `लाखांचा पोशिंदा जगण्यासाठी बाजीने छातीची ढाल करणे, नेताजी पालकरचे कर्तृत्व, सुरतेची लूट, जंजिरा उभारण्याची रायांची मनसा, आबासाहेब व्यंकोजी- शिवाजी यांचे संबंध, जिजाबाईंना सती जाण्यापासून शिवबांनी रोखण्याचा पाडलेला सुधारणेचा पायंडा, शाहिस्तेखानाला लालमहालात गमवावी लागलेली बोटे कात्रजचा घाट, मुस्लीम बांधवांना शिवरायांनी दिलेल्या अधिकाराच्या जागा, शाही लढाया आणि शिवरायांची युद्धनीती... या सगळ्यांची मराठी मनाने अभिमानाने केलेली उजळणीच असते. अशा वेळी विश्वास पाटील यांचे कसब असे की इतिहासाला कुठेही धक्का न लावता वाचकाला साक्षीदार म्हणून गुंतवत गुंगवत ठेवणे. या अर्थाने पाटील खरेच महाकादंबरीकार आहेत. इतिहासकाळाला जागून त्यांनी पात्रांची भाषा वापरली आहे. दाखला म्हणून (पृ. १७) नेतोबा आणि मोरेमामांचा संवाद पाहावा. मामा नेतोबाला म्हणतात, `नेतोबा कसा `रणपागल` आहे. हे सुदीक माझ्या राजाला ठाव हाय रे` इथे `ठाव` नाही येत. `ठाव` येते. `रणपागल` हे नेतोबाचे विशेषण त्याच्या वीरश्रीचा अर्क दाखवते. दोन पराक्रमीमधील हा संवाद राजांचे जागरूक भान आणि प्रजादक्षता दाखवतो. भाषेचा असा लहेजा ऐतिहासिकता मुखर करतो. पाटीलांची शैली किल्ल्याच्या तटबंदीचा भक्कम चिरा असावा तशी कांदंबरीभर प्रत्ययाला येते. वानोळा म्हणून पहा. (पृ.३१३ वर) वर्णन कसे आहे, सायंकाळी घराच्या ओढीने खिलार झपाट्याने रानातून खाली निघावे, तसाच मावळ्यांच्या पायांना जोराचा वेग आला होता. किंवा संवादात सहजतेने नाट्य येते, भाष्य येते तेही भाषावैभवाची पताका मिरवणेच ठरते. बाजीराजाला आदिलशहा स्तंभित होऊन म्हणतोय. `बाजीराजे, तुमच्या भूमीतच भाऊबंदकीच्या देवाचं अस खतरनाक पीक का वाढत असावं बरं (पृ. ३७५) या संवादात भाऊबंदकीवर बोट ठेवले आहेच; शिवाय शेतीप्रधान हो भाषा आहे. विलक्षण प्रभावी वस्तुस्थिती, प्रदेशभान, हालचालींचा वेग आणि व्यक्तीचे लढवैय्या वा मातीतून आलेले स्वभाववैशिष्ट्य नेमकेपणाने चितारण्याच्या अनेक खुणा जागोजागी दिसतात. त्यामुळे इतिहास जसा काही वर्तमानात अवतरतो. नायक शिवरायांची तर अनेक घटनांतून अनेक वैशिष्ट्ये दिसतात. रयतेचा सर्वकाळ विचार करणारा लोकनायक. रंणागण दुसरीकडे गेल तर त्या भागातल्या रतयतेच्या पिकांना, जित्रापांना आणि वस्त्यांना झळ पोचायला नको. ही बरबादी टाळण्यासाठीच आम्ही हवं ठाणबंद झालो आहोत. " (पृ. ८२) किंवा शत्रूला `वानरवळा` चा हिसका दाखवू पाहणारे (पृ. ८९) शिवराय किंवा जिजाबाईशी सोयराबाईशी आबासाहेबांशी होणाऱ्या संवादांतून दिसणारी त्यांची राजधारणा... या सगळ्यात वाचक मनाने मावळ्यांसारखा शिवरायांच्या समीप वावरतो. (पू. २०८ पहावे.) रायबाधन, जिजाबाई, नेताजी पालकर, शाहिस्तेखान आदींच्या शारीरवर्णनापेक्षा पाटलांनी त्यांची व्यक्तिमत्त्वत्वृत्तीच प्रभावीपणे दाखवली आहे. एकूणातच असे पानक्रमांक देऊन काही शाबीत करणे पोरमनाचेच. संपूर्ण कादंबरी हा एका कर्तृत्वाचा आलेख आहे. आखलेल्या डावपेचांचा पट आहे. सागरकिल्ला उभारण्याची निकड, शत्रूशी केलेले गनिमीकावे, माणसांची केलेली पारख, राज्यउभारणीसाठी तयार केलेला माहौल भविष्यवेधी आखणी राखलेले अष्टावधान, महाराष्ट्राच्या मातीशी राखलेले इमान केलेल्या कड़क सजा, केलेल गौरव लोकसंग्रह... भूतकाळाला पालाण घालून वर्तमानकाळ गाठतात. म्हणूनच हो ऐतिहासिक कादंबरी असूनही तिला गूढरम्य अशा गोष्टींचे वलय सहजतेने लाभले आहे. जणू नाथमाधवांच्या कादंबरीजगात विश्वास पाटलांचे बोट धरून वाचक शिरतो, रंजकतेला जवळ करून इतिहासात रमतो. `नेम धरिता राजकारणा प्रसंग पाहोन चालावे` असे शिवरायांचे वागणे, त्यांची कर्तबगारी, त्यांनी घडवलेला इतिहास म्हणजे `रणखैंदळ` च आहे जशी. ही घमासान घटनांची एकामागोमाग येणारी वावटळच नेटके सूत्र घेऊन विश्वास पाटील यांनी वाचकांसमोर उभी केली आहे. मात्र या वावटळीत वाचक भ्रमित होत नाही. याचे कारण ती कुठेही संथ (कंटाळवाणी) नाही. महाराष्ट्रधर्म वाढवावा` म्हणजे काय; ते त्याला महाकादंबरीतील महातुकड्यांतून आपोआपच कळते. तो पुढील भागाची निश्चितच प्रतीक्षा करू लागतो. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more