* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I SHALL NOT HATE
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL KULKARNI
  • ISBN : 9789386175083
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 202
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HEART-BREAKING, HOPEFUL AND HORRIFYING, I SHALL NOT HATE IS A PALESTINIAN DOCTOR`S INSPIRING ACCOUNT OF HIS EXTRAORDINARY LIFE, GROWING UP IN POVERTY BUT DETERMINED TO TREAT HIS PATIENTS IN GAZA AND ISRAEL REGARDLESS OF THEIR ETHNIC ORIGIN. ABUELAISH IS AN INFERTILITY SPECIALIST WHO LIVES IN GAZA BUT WORKS IN ISRAEL. AND, MOST RECENTLY, AS THE FATHER WHOSE THREE DAUGHTERS WERE KILLED BY ISRAELI SHELLS ON 16 JANUARY 2009, DURING ISRAEL`S INCURSION INTO THE GAZA STRIP. IT WAS HIS RESPONSE TO THIS TRAGEDY THAT MADE NEWS AND WON HIM HUMANITARIAN AWARDS AROUND THE WORLD. INSTEAD OF SEEKING REVENGE OR SINKING INTO HATRED, IZZELDIN ABUELAISH CALLED FOR THE PEOPLE IN THE REGION TO START TALKING TO EACH OTHER. HIS DEEPEST HOPE IS THAT HIS DAUGHTERS WILL BE `THE LAST SACRIFICE ON THE ROAD TO PEACE BETWEEN PALESTINIANS AND ISRAELIS`. THE EXTRAORDINARY STORY OF A PALESTINIAN DOCTOR WHO, DESPITE WITNESSING THE DEATH OF THREE OF HIS DAUGHTERS IN THE ISRAELI INCURSION INTO GAZA IN JANUARY 2009, CONTINUED HIS MEDICAL AND HUMANITARIAN WORK AIMED AT BRINGING THE PEOPLE OF THE REGION TOGETHER IN PEACE. IHIS WEBSITE AND FOUNDATION CAN BE FOUND AT WWW.DAUGHTERSFORLIFE.COM
डॉ. इझेलदिन अबुइलेश- ज्यांना आता ‘तोगाझा डॉक्टर’ असे ओळखले जाते, त्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या भयानक दुर्घटनेनंतर जगातील सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. १६ जानेवारी, २००९ रोजी त्यांच्या घरावर झालेल्या इस्राईलच्या बॉम्ब हल्ल्यात त्यांच्या तीन मुली आणि पुतणी बळी पडल्या. गाझामधील लोकांच्या धडपडीचा आणि हलाखीच्या जीवनाचा अबुइलेश यांनी सांगितलेला वृत्तान्त वाचताना कधी स्फूर्तिदायक, तर कधी हृदय द्रावक वाटतो. गाझामध्ये राहणारा आणि इस्रायली इस्पितळात काम करणारा हा पॅलेस्टिनी असलेला वंध्यत्वोपचार तज्ज्ञ डॉक्टर आयुष्यभर या दोन विभागांतील सीमा रेषा दररोज पार करत असे. एक डॉक्टर याना त्याने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधारणे आणि स्त्रियांचे शिक्षण यावर भर देणे, हे मध्य पूर्वेतील एकूण परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. त्यांच्या मुलींचे बॉम्ब हल्ल्यात बलिदान पडल्यावर त्यांनी जो जगावेगळा प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचे नाव सर्व जगात झाले. त्यांना जगभरातून मानवतावादी पारितोषिके दिली गेली. या घटनेचा सूड घेण्याऐवजी, इस्रायलींबद्दल तिरस्काराची भावना बाळगण्याऐवजी, अबुइलेशचे मध्य पूर्वेतील लोकांना सांगणे आहे की, एकमेकांत संवाद सुरू करा. पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांमधील वैराची भावना संपून शांतता प्रस्थापित होण्याच्या मार्गावरील त्यांच्या मुलींचे बलिदान शेवटचे ठरावे, अशी त्यांना आशा वाटते
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MITIRASKARKARNARNAHI #ISHALLNOTHATE #मीतिरस्कारकरणारनाही #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHYAMALKULKARNI #IZZELDINABUELAISH "
Customer Reviews
  • Rating StarDainik Divya Marathi 30-12-16

    एका मनस्वी डॅक्टरचा थक्क करणारा जीवनप्रवास ! ईझेलादिन अबुइलेश हे एक पॅलेस्टिनी डॉक्टर आहेत. त्यांचे बालपण गाझापाट्टीतील जबलिया निर्वासित छावणीत गेले. जिथे जन्मदेखील झाला. ते स्त्रीरोगतज्ज्ञ होते. शिवाय ‘वंध्यत्वावर उपाय’ या शास्त्रावर त्यांचे विशेष ्रभुत्व आहे ते गाजत राहत होते; परंतु कमला ते इस्रायलच्या हॉस्पिटलला जात असत. तिथे त्यांचे बहुतांश आयुष्य गेले. हॉर्वर्डमध्ये त्यांनी ‘सार्वजनिक आरोग्य’ या विषयात प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवले. या विषयावरील त्यांची मते आणि त्यांचे संशोधन जगभरात प्रमाण मानले जाते. टोरोंटो विश्वविद्यालयातील डल्ला लाना प्रशालेत ते सहप्राध्यापक आहेत. ही प्रशाला सार्वजनिक आरोग्य या विषयाचे प्रशिक्षण देते. गाझापट्टीला डॉक्टर आपली मायभूमी मानतात. संबंध मध्य पूर्वेत त्यांनी सुचवलेला औषधोपचार प्रमाण मानला जातो. त्यांनी मायभूमी मानत असलेल्या प्रदेशाला जग मात्र जगातील सर्वांत मोठ छळछावणी मानते. या भागात पंधरा लाख पॅलेस्टिनी हे तीनशे साठ चौरस किलोमीटर एवढ्या जमिनीवर दाटीवाटीने राहत होते त्यामुळे अशा भागाची प्रगती होऊ शकेल, असे मत या पुस्तकात मांडले. डॉक्टर या नात्याने ते सीमेच्या दोन्ही बाजूकडील रोग्यांना औषधोपचार तसेच वयात येणाऱ्या मलींना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचा अनुभव यात मांडले आहेत. त्याचप्रमाणे मुलींना स्त्रियांना उत्तम शिक्षण मिळावे याचे महत्त्व आणि गरज या गोष्टी त्यांनी तेथील लोकांना पटवून दिले आणि शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. १६ जानेवारी २००९ मध्ये इस्रायल बॉम्बहल्ल्यात ईझेलादिन यांच्या मुली आणि पुतणी मारल्या गेल्यामुळे त्यांनी हे कार्य जोमाणे अंगीकारले. त्यांच्यावर झालेल्या या आघाताला त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याचे वर्णन केले. त्यामुळे त्यांचे कार्य जगातील सर्व लोकांच्या अंतकरणात ठसले गेले. विशेषत: इस्रायलमध्ये याचा परिणाम जास्त प्रकर्षाने दिसून आला याबद्दलची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी त्या भागातील लोकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे आणि शांततेकरता योग्य कृती करण्याचे आव्हान केल्याचे स्पष्ट केले होते. ते सध्या आपल्या मुलीच्या स्मरणार्थ धर्मार्थ संस्था उभी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. मुली आणि स्त्रिया यांना आरोग्य आणि शिक्षण या द्वारामुळे शारीरिक आणि मानसिक ताकद मिळून त्या प्रबळ भाव्यात उद्देशाने या लेखकांनी केलेल्या कार्याचे लेखन या पुस्तकात आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 27-11-2016

    ज्याचे घर आगीत होरपळते अशा व्यक्तीने द्वेषाचा अथवा बदला घेण्याची भावना व्यक्त करण्याऐवजी तो मानवतेचा संदेश देतो आणि वैराची भावना संपवण्याचे आवाहन करतो तेव्हा त्याच्यातील माणूस जागा झालेला असतो. डॉ. इझेलदिन अबुइलेश हे नाव आता जगभरात सन्मानाने घेतले जाे. इस्राईलच्या बॉम्बहल्ल्यात त्यांच्या तीन मुली आणि भाची बळी पडल्या. तरीही त्यांनी जगाला दिलेला प्रतिसाद खूप वेगळा होता. पॅलेस्टीनी आणि इस्राईली यांनी वैराची भूमिका संपवून शांतता प्रस्थापित करावी व त्यांच्या मुलीचे बलिदान हे शेवटचे ठरावे ही त्यांची भावना उदात्त ठरली व जगभरातून मानवतावादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. त्यांची कहाणी मराठीतून आलेली आहे. डॉक्टर अबुइलेश यांचे आत्मकथन श्यामल कुलकणीं यांनी अनुवादीत केलेले आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES PUNE 13-11-2016

    इझेलदिन अबुइलेश या पॅलेस्टिनी डॉक्टरची ही चित्तथरारक कथा आहे. गाझापट्टीतील छावणीत त्यांचे बालपण गेले. ते निर्वासिताचे जगणे वाट्याला येऊनही त्यांनी पुढे मोठी कामगिरी बजावली. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे ते तज्ज्ञ होते. या विषयावरील त्यांची मते जगभरात परमाण मानली जातात. टोरोंटो विश्वविद्यालयात ते अध्यापन करतात. या ध्येयवादी डॉक्टरने आपली आत्मकथा या पुस्तकातून सांगितली आहे. ‘वैद्यकीय उपचार हे लोकांना समजून घेण्याचे आणि एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याचे उत्तम साधन आहेत,’ असे ते म्हणतात. याच वृत्तीने त्यांनी काम केले. त्यामुळेच सोरोको रुग्णालयात त्यांनी ज्या स्त्रियांवर उपचार केले, त्या त्यांच्या जणू नातलगच झाल्या. या प्रकारचे अनेक प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतात; तसेच त्या अनुषंगाने गाझापट्टीतील जगणेही समजते. ...Read more

  • Rating StarSAKAL SAPATRANG 30-10-16

    गाझा पट्टीत काम करणारे डॉ. इझेलदिन अबुइलेश यांची ही आत्मकहाणी. अतिशय प्रेरणादायी आणि वास्तवदर्शी कहाणी आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more