* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I SHALL NOT HATE
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL KULKARNI
  • ISBN : 9789386175083
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 202
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HEART-BREAKING, HOPEFUL AND HORRIFYING, I SHALL NOT HATE IS A PALESTINIAN DOCTOR`S INSPIRING ACCOUNT OF HIS EXTRAORDINARY LIFE, GROWING UP IN POVERTY BUT DETERMINED TO TREAT HIS PATIENTS IN GAZA AND ISRAEL REGARDLESS OF THEIR ETHNIC ORIGIN. ABUELAISH IS AN INFERTILITY SPECIALIST WHO LIVES IN GAZA BUT WORKS IN ISRAEL. AND, MOST RECENTLY, AS THE FATHER WHOSE THREE DAUGHTERS WERE KILLED BY ISRAELI SHELLS ON 16 JANUARY 2009, DURING ISRAEL`S INCURSION INTO THE GAZA STRIP. IT WAS HIS RESPONSE TO THIS TRAGEDY THAT MADE NEWS AND WON HIM HUMANITARIAN AWARDS AROUND THE WORLD. INSTEAD OF SEEKING REVENGE OR SINKING INTO HATRED, IZZELDIN ABUELAISH CALLED FOR THE PEOPLE IN THE REGION TO START TALKING TO EACH OTHER. HIS DEEPEST HOPE IS THAT HIS DAUGHTERS WILL BE `THE LAST SACRIFICE ON THE ROAD TO PEACE BETWEEN PALESTINIANS AND ISRAELIS`. THE EXTRAORDINARY STORY OF A PALESTINIAN DOCTOR WHO, DESPITE WITNESSING THE DEATH OF THREE OF HIS DAUGHTERS IN THE ISRAELI INCURSION INTO GAZA IN JANUARY 2009, CONTINUED HIS MEDICAL AND HUMANITARIAN WORK AIMED AT BRINGING THE PEOPLE OF THE REGION TOGETHER IN PEACE. HIS WEBSITE AND FOUNDATION CAN BE FOUND AT WWW.DAUGHTERSFORLIFE.COM
डॉ. इझेलदिन अबुइलेश- ज्यांना आता ‘तोगाझा डॉक्टर’ असे ओळखले जाते, त्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या भयानक दुर्घटनेनंतर जगातील सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. १६ जानेवारी, २००९ रोजी त्यांच्या घरावर झालेल्या इस्राईलच्या बॉम्ब हल्ल्यात त्यांच्या तीन मुली आणि पुतणी बळी पडल्या. गाझामधील लोकांच्या धडपडीचा आणि हलाखीच्या जीवनाचा अबुइलेश यांनी सांगितलेला वृत्तान्त वाचताना कधी स्फूर्तिदायक, तर कधी हृदय द्रावक वाटतो. गाझामध्ये राहणारा आणि इस्रायली इस्पितळात काम करणारा हा पॅलेस्टिनी असलेला वंध्यत्वोपचार तज्ज्ञ डॉक्टर आयुष्यभर या दोन विभागांतील सीमा रेषा दररोज पार करत असे. एक डॉक्टर याना त्याने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधारणे आणि स्त्रियांचे शिक्षण यावर भर देणे, हे मध्य पूर्वेतील एकूण परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. त्यांच्या मुलींचे बॉम्ब हल्ल्यात बलिदान पडल्यावर त्यांनी जो जगावेगळा प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचे नाव सर्व जगात झाले. त्यांना जगभरातून मानवतावादी पारितोषिके दिली गेली. या घटनेचा सूड घेण्याऐवजी, इस्रायलींबद्दल तिरस्काराची भावना बाळगण्याऐवजी, अबुइलेशचे मध्य पूर्वेतील लोकांना सांगणे आहे की, एकमेकांत संवाद सुरू करा. पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांमधील वैराची भावना संपून शांतता प्रस्थापित होण्याच्या मार्गावरील त्यांच्या मुलींचे बलिदान शेवटचे ठरावे, अशी त्यांना आशा वाटते
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MITIRASKARKARNARNAHI #ISHALLNOTHATE #मीतिरस्कारकरणारनाही #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHYAMALKULKARNI #IZZELDINABUELAISH "
Customer Reviews
  • Rating StarDainik Divya Marathi 30-12-16

    एका मनस्वी डॅक्टरचा थक्क करणारा जीवनप्रवास ! ईझेलादिन अबुइलेश हे एक पॅलेस्टिनी डॉक्टर आहेत. त्यांचे बालपण गाझापाट्टीतील जबलिया निर्वासित छावणीत गेले. जिथे जन्मदेखील झाला. ते स्त्रीरोगतज्ज्ञ होते. शिवाय ‘वंध्यत्वावर उपाय’ या शास्त्रावर त्यांचे विशेष ्रभुत्व आहे ते गाजत राहत होते; परंतु कमला ते इस्रायलच्या हॉस्पिटलला जात असत. तिथे त्यांचे बहुतांश आयुष्य गेले. हॉर्वर्डमध्ये त्यांनी ‘सार्वजनिक आरोग्य’ या विषयात प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवले. या विषयावरील त्यांची मते आणि त्यांचे संशोधन जगभरात प्रमाण मानले जाते. टोरोंटो विश्वविद्यालयातील डल्ला लाना प्रशालेत ते सहप्राध्यापक आहेत. ही प्रशाला सार्वजनिक आरोग्य या विषयाचे प्रशिक्षण देते. गाझापट्टीला डॉक्टर आपली मायभूमी मानतात. संबंध मध्य पूर्वेत त्यांनी सुचवलेला औषधोपचार प्रमाण मानला जातो. त्यांनी मायभूमी मानत असलेल्या प्रदेशाला जग मात्र जगातील सर्वांत मोठ छळछावणी मानते. या भागात पंधरा लाख पॅलेस्टिनी हे तीनशे साठ चौरस किलोमीटर एवढ्या जमिनीवर दाटीवाटीने राहत होते त्यामुळे अशा भागाची प्रगती होऊ शकेल, असे मत या पुस्तकात मांडले. डॉक्टर या नात्याने ते सीमेच्या दोन्ही बाजूकडील रोग्यांना औषधोपचार तसेच वयात येणाऱ्या मलींना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचा अनुभव यात मांडले आहेत. त्याचप्रमाणे मुलींना स्त्रियांना उत्तम शिक्षण मिळावे याचे महत्त्व आणि गरज या गोष्टी त्यांनी तेथील लोकांना पटवून दिले आणि शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. १६ जानेवारी २००९ मध्ये इस्रायल बॉम्बहल्ल्यात ईझेलादिन यांच्या मुली आणि पुतणी मारल्या गेल्यामुळे त्यांनी हे कार्य जोमाणे अंगीकारले. त्यांच्यावर झालेल्या या आघाताला त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याचे वर्णन केले. त्यामुळे त्यांचे कार्य जगातील सर्व लोकांच्या अंतकरणात ठसले गेले. विशेषत: इस्रायलमध्ये याचा परिणाम जास्त प्रकर्षाने दिसून आला याबद्दलची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी त्या भागातील लोकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे आणि शांततेकरता योग्य कृती करण्याचे आव्हान केल्याचे स्पष्ट केले होते. ते सध्या आपल्या मुलीच्या स्मरणार्थ धर्मार्थ संस्था उभी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. मुली आणि स्त्रिया यांना आरोग्य आणि शिक्षण या द्वारामुळे शारीरिक आणि मानसिक ताकद मिळून त्या प्रबळ भाव्यात उद्देशाने या लेखकांनी केलेल्या कार्याचे लेखन या पुस्तकात आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 27-11-2016

    ज्याचे घर आगीत होरपळते अशा व्यक्तीने द्वेषाचा अथवा बदला घेण्याची भावना व्यक्त करण्याऐवजी तो मानवतेचा संदेश देतो आणि वैराची भावना संपवण्याचे आवाहन करतो तेव्हा त्याच्यातील माणूस जागा झालेला असतो. डॉ. इझेलदिन अबुइलेश हे नाव आता जगभरात सन्मानाने घेतले जाे. इस्राईलच्या बॉम्बहल्ल्यात त्यांच्या तीन मुली आणि भाची बळी पडल्या. तरीही त्यांनी जगाला दिलेला प्रतिसाद खूप वेगळा होता. पॅलेस्टीनी आणि इस्राईली यांनी वैराची भूमिका संपवून शांतता प्रस्थापित करावी व त्यांच्या मुलीचे बलिदान हे शेवटचे ठरावे ही त्यांची भावना उदात्त ठरली व जगभरातून मानवतावादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. त्यांची कहाणी मराठीतून आलेली आहे. डॉक्टर अबुइलेश यांचे आत्मकथन श्यामल कुलकणीं यांनी अनुवादीत केलेले आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES PUNE 13-11-2016

    इझेलदिन अबुइलेश या पॅलेस्टिनी डॉक्टरची ही चित्तथरारक कथा आहे. गाझापट्टीतील छावणीत त्यांचे बालपण गेले. ते निर्वासिताचे जगणे वाट्याला येऊनही त्यांनी पुढे मोठी कामगिरी बजावली. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे ते तज्ज्ञ होते. या विषयावरील त्यांची मते जगभरात परमाण मानली जातात. टोरोंटो विश्वविद्यालयात ते अध्यापन करतात. या ध्येयवादी डॉक्टरने आपली आत्मकथा या पुस्तकातून सांगितली आहे. ‘वैद्यकीय उपचार हे लोकांना समजून घेण्याचे आणि एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याचे उत्तम साधन आहेत,’ असे ते म्हणतात. याच वृत्तीने त्यांनी काम केले. त्यामुळेच सोरोको रुग्णालयात त्यांनी ज्या स्त्रियांवर उपचार केले, त्या त्यांच्या जणू नातलगच झाल्या. या प्रकारचे अनेक प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतात; तसेच त्या अनुषंगाने गाझापट्टीतील जगणेही समजते. ...Read more

  • Rating StarSAKAL SAPATRANG 30-10-16

    गाझा पट्टीत काम करणारे डॉ. इझेलदिन अबुइलेश यांची ही आत्मकहाणी. अतिशय प्रेरणादायी आणि वास्तवदर्शी कहाणी आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more