* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DAMN IT ANI BARACH KAHI
  • Availability : Available
  • Editors : MANDAR JOSHI
  • ISBN : 9788195970919
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2023
  • Weight : 1000.00 gms
  • Pages : 304
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MAHESH KOTHARE: A NAME FAMILIAR TO THE MARATHI, HINDI AND GUJRATI CINE WORLD AND DAILY SOAPS. HE STARTED AS A CHILD ARTIST AND IS A VERY POPULAR DIRECTOR TODAY. HE IS FOND OF THE NEWEST TECHNOLOGY, LIKE 3D. A DARING AND DASHING PERSONALITY, HIS JOURNEY FROM A ‘CHILD ARTIST’ TO THE ‘DIRECTOR OF MARATHI CINEMA’ IS IMPRESSIVE. IT IS A COURAGEOUS JUMP IN THE OCEAN OF ENTERTAINMENT. BEING RECOGNISED TRULY BY HIS MOTHER JENMA AND DADDY IS HIS FIRST SUCCESS. THEY WERE HIS STRONG PILLARS. HE WAS LUCKY TO WORSHIP THE ‘ART’ INSPITE OF FACING THE STORMS. HE PROVIDED PURE ENTERTAINMENT FOR THE AUDIENCE. HE IS AN ESTEEMED WITNESS TO THE HISTORY OF CINEMA AND ITS JOURNEY FROM BLACK & WHITE MOVIES TO THE EASTMAN COLOURS. HE WAS LUCKY TO BE IN THE COMPANY OF SENIORS FROM THIS FIELD. HIS EXTENSIVE EXPERIENCE INCREASED HIS KNOWLEDGE BANK FURTHER. ‘DAMN IT ANI BARACH KAHI’ IS A REPRESENTATION OF ALL THE UPS AND DOWNS IN HIS LIFE, HIS PENANCE FOR ART, HIS SENSITIVITY, HIS VICTORY OVER TROUBLES AND HIS TIME-TESTED MANTLE. HIS JOURNEY WAS THAT OF A HUMAN AND AN ARTIST. HE REPENTED FOR HIS MISTAKES. HE HAD TO LOSE HIS DEAR FRIEND ‘LAKSHYA’, A GEM OF A PERSONALITY. HE EXPERIMENTED WITH ALMOST EVERY MOVIE, NEVER STEPPED BACK, AND PUT IN ACTIVE EFFORTS IN BOTH THE HINDI AND MARATHI CINE WORLD. HIS PERSEVERANCE IS BASED ON ‘KEEP ON TRYING’. MAHESH IS A UNIQUE FORMULA HIMSELF. THROUGH HIS BOOK, HE COMMUNICATES WITH US. GETS CONNECTED TO HIS FANS AND ARDENT READERS. HIS SPORTING NATURE IS OBVIOUS. THIS IS THE STRENGTH OF THE BOOK, AND THIS IS THE LIFE SONG OF A TRUE ARTIST.
मराठी, हिंदी व गुजराती चित्रपट-मालिकांतून बालकलाकार ते सिनेदिग्दर्शक म्हणून झेप घेणारे, थ्री-डी सारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत ध्यास घेणारे महेश कोठारे म्हणजे, धाडसी व धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. ‘बालकलाकार’ ते ‘मराठी चित्रपट दिग्दर्शक’ हा त्यांचा प्रवास म्हणजे– ‘मनोरंजन विश्वाच्या समुद्रात घेतलेली धाडसी उडी!’ आई जेनिमा व डॅडींचे आपल्या मुलाला समजून घेणे, भरभक्कम आधार बनणे, हेच महेशजींच्या आयुष्यातील पहिले यशाचे गमक. वादळात स्वत:ला झोकून देऊन ‘कलेची पूजा’ करण्याचं, अस्सल मनोरंजनाचा आनंद रसिकांना देण्याचं भाग्य त्यांना लाभलं. कृष्ण-धवल चित्रपट ते रंगीत चित्रपटांचा प्रवास व इतिहासाचे साक्षीदार म्हणून महेश कोठारे हे नाव गौरवाने घेतले जाते. सिनेसृष्टीतील जेष्ठ-दिग्गजांचा महेशजींना मिळालेला सहवास व प्रदीर्घ अनुभव नवीन ज्ञानात भर घालणाराच ठरला. कलेची साधना, मनाचे हळवेपण, घोर अडचणींवर केलेली मात, एक सच्चा कलावंत कुठल्या मुशीतून घडतो, तावून-सुलाखून निघतो याची साक्ष खर्‍या अर्थाने ‘डॅम इट व बरेच काही’ मधून दिसते. एक कलावंत व माणूस म्हणून उलगडत जाणारा त्यांचा हा प्रवास, झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त, दिलदार मित्र व मनस्वी लक्ष्याचं चटका लावून जाणं, सतत नवीन प्रयोग व अथक कष्ट, हिंदी-मराठी सिनेमांतील कलात्मक योगदान, जिद्द ही प्रयत्नवादाला साद घालणारी. या पुस्तकातून महेशजी आपल्याशी बोलत आहेत, चाहत्यांशी व रसिक वाचकांशी मनापासून, खिलाडूपणे संवाद साधत आहेत... असेच वाटत राहते, हेच या पुस्तकाचे मर्मस्थान व एका सच्च्या कलावंताचे जीवनगाणे...

No Records Found
No Records Found
Keywords
#महेशकोठारे #मराठीचित्रपटसृष्टी #अभिनय #दिग्दर्शन #चित्रपटनिर्मिती #धुमधडाका #धडाकेबाज #झपाटलेला #मराठीमालिका #जयमल्हार #दख्खनचाराजाज्योतिबा #शब्दांकनसंपादन #मंदारजोशी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #MAHESHKOTHARE #MARATHIACTOR #AUTOBIOGRAPHY #MARATHIMOVIES #MARATHISERIALS #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating Star सामना २० ऑगस्ट २०२३

    स्वप्ननांना वास्तवात उतरवण्याची ताकद मनगटात आणि मनात जिद्द असेल तर आयुष्याचा संघर्ष लीलया पार करता येतो. बालकलाकार ते सिनेदिग्दर्शक म्ह्णून झेप घेणारे व नव्या तंत्रज्ञाला आपलेसे करणारे अभिनेता/दिग्दर्शक महेश कोठारे यांचे `डॅम इट आणि बरच काही` हे यशापशाची वळणे असणारे आत्नचरित्र नुसतेच प्रसिद्ध झाले आहे. मंदार जोशी यांचे सुबद्ध शब्दांकन याला लाभले असून प्रवीण दवणे यांची खुमासदार प्रस्तावना लाभली आहे. कलाकाराचे आयुष्य हे बाहेरून कितीही ग्लॅमरस दिसत असले तरी त्या पदापर्यंत जाण्याचा प्रवास मात्र खडतर असतो. महेश कोठारे यांनी स्वतःच्या आयुष्याकडे चंदेरी वाटचालीकडे आणि त्या वाटचालीत सहभागी झालेल्या सगळ्या व्यक्तींबद्दल प्रांजळपणे केलेले कथन प्रवाही तर आहेच पण तितकेच सच्चे झाले आहे. हातून झालेल्या चुकांची कबुली आणि नंतर काही चुकांची जाणीव झाल्यावर मनातली सल कोणताही आडपडदा न ठेवते मांडणे तितकेच महत्वाचे असते जे या आत्मकथनात सापडते. वैशिष्ट्य म्हणजे अनुभवांचे घटनांचे एकेक पैलू साध्या, सोप्या भाषेतून उलगडत जातात तेव्हा तो वाचकांशी साधलेला एक मैत्रीपूर्ण संवाद बनतो. चांगला चाललेला वकिलीचा व्यवसाय बाजूला सारून महेश यांनी मनरंजनाच्या समुद्रात मारलेली उडी आणि पोहण्याचा आवडीपायी नदीच्या पाण्यात उडी मारणारे तेच महेश पहिल्यापासून धाडशी स्वभावाचे असल्याचे जाणवते. मध्यमवर्गीय समाजात संस्कारांना विशेष महत्व आहे. प्रतिकूल परिस्थिती किंवा आयुष्याला कलाटणी देणारी निर्णायक वेळ किंवा मोहाचे क्षण जेव्हा समोर येतात तेव्हा खरी कसोटी लागते ती संस्कारांची लहानपणापासून झालेले संसार कोणत्याही संकटातून, संघर्षातून सुखरूपपणे बाहेर काढतातच. त्याची प्रचिती आत्मचरित्रात वाचताना पदोपदी येते. आई जेनमा व डॅडीची आणि फिल्मफेअरची बाहुली पतीच्या हातात पाहायला आतुरलेली पत्नी नीलिमा यांची साथ अनमोल ठरली आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्पांवर या तिघांनी त्यांना कायम समजून घेतेले, त्यांचा आधार बनले, धीर दिला आणि हेच महेश यांच्या सफलतेचे रहस्य आहे. कृष्ण-धवल चित्रपट ते रंगीत चित्रपट आणि बालकलाकार ते निर्माता-दिग्दर्शक यात हा संपूर्ण मांडलेला प्रवास अतिशय रंजक झाला आहे. बालकलाकार म्हूणून नावाजलेले असतानाही आईवडिलांनी त्यांना सामान्य मुलांप्रमाणे वाढवले, बेस्ट बसने शाळेत पाठवले. खेळणे, पोहणे, धमाल सुट्ट्या घालवणे अगदी सामान्य घरातला मुलांप्रमाणे त्यांचे बालपण गेल्यामुळे आईवडिलांनी रुजवलेली संस्कारांची मूल्ये महेशमध्ये लहानपणापासूनच जोपासली गेली. म्हणूनच घरची शिकवण, संस्कार आणि शिस्त हीच महेश यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. शाळेच्या सुट्टीतच शूटिंग करण्याचा आग्रह आणि शिक्षणात खंड पडू न देण्याचा शिरस्ता हेच सांगतो. पैसा व प्रसिद्धीच्या मागे न धावणारे महेश यांचे जेनमा-डॅडी आजच्या पालकांसाठी नक्कीच आदर्श ठरावेत. बलराज सहानी, सुलोचनादीदी, मनोजकुमार, संजीव कुमार, राजेश खन्ना , ताराचंद बडजात्या, दादा कोंडके, लता मंगेशकर, आशा भोसले... यांसारख्या तत्कालीन दिग्गजांसोबत वावरण्याची व काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ते पाहता नायक म्हणून महेश यांचे पदार्पण दमदार होणे अपेक्षित होते, परंतु परिस्थितीने अनपेक्षित वळण घेतेले. अशा वेळी प्रचंड जिद्द, पाठपुरावा करण्याचा सकारात्मक गुण, अखंड परिश्रम करण्याची तयारी आणि संयम, याच्या जोरावर ते एकेक टप्पा पार करत यशस्वीपणे पुढे जात राहिले. एक सच्चा कलावंत कुठल्या मुशीतून घडतो, तावून-सुलाखून निघतो याची साक्ष `डॅम इट व बरेच काही` मधून दिसते. यशापयशाचा हिंदोळा वरखाली झुलत असताना वेळोवेळी याच जिद्दीच्या जोरावर आलेल्या संकटांवर त्यांनी मात केली. या प्रवासात त्यांनी `सिनेमास्कोप` पासून ते थ्रीडी` पर्यंतचे आधुनिक तंत्राचे दालन मराठी चित्रपटसृष्टीसाठी खुले केले. एक कलावंत व माणूस म्हणून उलगडत जाणारा त्यांचा जीवनप्रवास, दिलदार मित्रपरिवार, प्रेमळ नातेवाईक, नवीन प्रयोग करण्याचे सातत्य, कठोर मेहनत, हिंदी-मराठी सिनेमातले योगदान आणि महेश यांची जिद्द प्रयत्नवादाला साद घालणारी आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा वाट असतो. कोठारे यांचे डॅडी-जेनमा यांची मूल्ये,तत्वे, स्वाभिमान आणि संस्कारांच्या कोंदणाने आकार दिला. पत्नीने तितकीच समर्थपणे साथ दिली. त्यांच्या नातेवाईकांनाही त्यांच्या डॅडीच्या हाकेला ओ देऊन वेळोवेळी साथ दिली हि उल्लेखनीय बाब आहे. पाठारे प्रभू ज्ञातीबद्दलचा सार्थ अभिमान, साजरे होणारे सणवार, पाळल्या जाणाऱ्या चालीरीती यांचाही समावेश यात आहे. या पुस्तकातून महेश कोठारे यांनी रसिक वाचकांशी मनापासून, खिलाडू वृत्तीने संवाद साधला आहे. हा पुस्तकरूपी प्रेरणादायी जीवनप्रवास पुढच्या पिढीसाठी उत्तम दस्तऐवज ठराव असा आहे. नकारात्मकतेला `डॅम इट` म्हणणारे व सकारात्मकता आणि बरच काही आपलेसे करणाऱ्या महेश कोठारे यांचे आत्मचरित्र अतिशय वाचनीय झालेले आहे. एकदा वाचायला घेतले कि, पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेववत नाही हेच त्याचे यश आहे. ...Read more

  • Rating Starमिलिंद पतकी, सांगोला, जि सोलापुर.

    प्रिय मंदारजी, आपले वरील महेश कोठारेंचे आत्मचरीत्र नुकतेच एकहाती वाचून संपवले. आपले मनापासून अभिनंदन. मराठी साहीत्यात एका चांगल्या पुस्तकाची भर आपण घातली आहात. तसे एखाद्या लोकप्रिय व्यक्तीमत्वाचे चरीत्र थोड्या पानात व चांगल्या शब्दात गुंफणे हे का किती खडतर आहे याची थोडी कल्पना मी करु शकतो. पण ही तारेवरची कसरत आपणशेवटपर्यंत न पडता व अतिशय रंजक व वाचनीय पध्दतीने पार पाडलीत. पुस्तकासाठी आपली मेहनत चांगलीच दिसुन येते. महेशजींचा प्रामाणिक पणा व त्यांचे जिवन मर्यादित शब्दात वाचकांसमोर मांडायची धमक आपण यशस्वीपणे पार पाडली आहे. आपली लेखनशैली ही सुंदर आहे, शेवटपर्यंत वाचत राहावस वाटणे ही खुपच अवघड गोष्ट आपल्या शैलीमुळे सोपी झाली आहे. मनापासुन अभिनंदन व असेच नविन नविन पुस्तकांचे लेखन आपणांकडून होवो ही दामाजीपंतांना प्रार्थना. शुभेच्छा. ...Read more

  • Rating StarPratap sapkal

    Dhadakhebaaz

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more