* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669510
  • Edition : 5
  • Publishing Year : MARCH 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MY EXISTENCE WAS DENIED NOT AFTER I WAS BORN, ON THE CONTRARY IT WAS DENIED BEFORE I WAS BORN. I WAS NEGLECTED THROUGHOUT. I WAS CURSED WITH MANY WORDS, OFTEN, ALWAYS. I WAS HOLD RESPONSIBLE FOR THE THINGS WHICH I HAD NOT DONE, IN WHICH I WAS NOT INVOLVED IN ANY WAY. MY OWN MOTHER WAS THE ONE WHO HARASSED ME; SHE NEVER TOOK PITY OF MY TEARS, MY PLEADINGS. SHE TRAMPLED MY HOPES, FEELINGS, RIGHTS, PRIVILEGE; WHATEVER SHE COULD AND TOOK A PRIDE IN THAT. FOR HER, MY LIFE WAS NOT A LIFE, IT WAS A THING, WHICH SHE COULD USE AS AND HOW SHE WISHED, AND SHE PRACTICED IT, ALWAYS. SHE EVEN PLEDGED ME FOR HER HAPPINESS, FOR HER SATISFACTION. MY LIFE WAS ACTUALLY PLEDGED IN HER HANDS. I REALISED MY SLAVERY, STRONGLY. I WANTED TO COME OUT OF IT; FOREVER. I KEPT ON ENCOURAGING MYSELF, `ASHA, YOU HAVE TO COME OUT OF THIS, NOW OR NEVER. DO NOT LET THE LIFE FLICKER OUT OF YOU, COME ON, STRIVE, STRUGGLE, SET YOURSELF FREE.`
माझ्या जन्मापासून नाही तर माझ्या जन्माअगोदरही माझ्या अस्तित्वावर नकारात्मक शब्दांचे आसूड ओढले गेले. पांढऱ्या पायाची, अपशकुनी, काळी, कुरूप, काळ्या जिभेची अशी कितीतरी अभद्र लेबलं मला लावली गेली. अनेक घटनांना, परिस्थितीला मलाच जबाबदार धरून माझा छळ केला. जन्मदात्री आई असूनही माझ्या आसवांनी तिचं हृदय कधीही हेलावलं नाही. माझी प्रत्येक आशा, आकांक्षा, भावना, हक्क, अधिकार आपल्या टाचेखाली ती तुडवत आली. माझं अख्खं आयुष्य जणू तिनं आपल्यासाठी एक वस्तू मानली. केवळ एक वस्तू, जी गहाण ठेवून त्यावर कर्ज काढता येतं. स्वत:साठी, स्वत:च्या गरजपूर्तीसाठी. मा नं माझं आयुष्य आपल्याकडं गहाण ठेवलं. मला माझ्या गुलामीची प्रखरतेनं जाणीव झाली. यातून आपण सुटायला हवं, नव्हे सुटका करून घ्यायला हवी. ‘घाबरू नकोस. कितीही वादळ होऊ दे, विझू देऊ नकोस त्या आशेच्या पणतीला. आत्ता हरलीस तर मग पुढं कधीच नाही. कधीही नाही.’ मी स्वत:ला पुनःपुन्हा बजावत होते. स्वत:च स्वत:ला धीर देत होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे कीर्तनसंजीवनी डॉ. पुष्पलता रानडे पुरस्कृत `लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार` २००८ * गाडगीळ भगिनीतर्फे दिल्या जाणाऱ्या `मातृ पितृ` पुरस्कारांतर्गत कै. काकासाहेब गाडगीळ पुरस्कार * भैरू रतन दमाणी पुरस्कार २००९ * महाराष्ट्र राज्य पुरस्कार-यशवंतराव चव्हाण पुरस्कार- २००८-२००९ * साहित्यप्रेमी भगिनी मंडळ , पुणे तर्फे `सुधाताई जोशी जी.ए.` पुरस्कार २००९ * जागतिक महिला दिनानिमित्त उल्लेखनीय कार्याबद्दल आशा आपराद यांस २०१० सालचा `हॉटेल व्हिक्टर पॅलेस पुरस्कार` कोल्हापूर *आर्य महिला समाज तर्फे काशीबाई नवरंगे पुरस्कार २०१०
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #भोगलेजेदु:खत्याला… #आशाआपराद #ASHAAPARAD #BHOGALEJEDUKHA TYALA… #AUTOBIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मूर्तिमंत जिद्द उभी!... कुरूप, अपशकुनी, पांढऱ्या पायांची, पालीच्या तोंडाची, दळभद्री, रडकी, तुटक्या चपलेच्या तोंडाची. टांग्याच्या टपासारखी मरतुकडी, बिसरी, बेअकली अशी काही विशेषणे घेऊन मुस्लीम समाजातल्या एका मुलीनं आपलं आयुष्य गळ्यातल्या ओढण्यासारखं अेक वर्षे वाहून नेलं. तिच्या ठेचकाळलेल्या जीवनाच्या पूर्वार्धात ना आनंदाचे क्षण आले. ना शरीर वा मनाला विश्रांती लाभली. शिक्षणाला बंदी. त्यातच मन वा शरीराची कोणतीही तयारी नसताना लग्न करून दिलेलं आणि वयाच्या वीस वर्षांच्या आतच पदरात चार मुली. या मुलीनं उभारी तरी धरायची कोणाच्या आधारानं. कारण त्या मुलीवर हा अन्याय कोणी शत्रू, शेजारी, सावत्र आई वा परके नातेवाईक करीत नव्हते, तर खुद्द तिच्या सख्ख्या आईनंच तिचं आयुष्याच आपल्याकडं ‘गहाण’ ठेवलं होतं. तिच्या ‘व्यक्तिमत्त्वा’चा जणू ‘बोन्साय’च करून टाकला होता. त्या मुलीनं वडिलांकडे मदतीसाठी बघावं तर आईनं त्यांचाही पालापाचोळा केलेला. सतत कानांवर पडणाऱ्या तू कुरूप, अपशकुनी आणि पांढऱ्या पायांची अशा शब्दांनी ती घायाळ होत होती. असले टोमणे आई अन्य मुलींना न मारता आपला व वडिलांचाच पाणउतारा का करते या प्रश्नाचा भुंगा पुढे आयुष्यभर काही सोडवता आला नाही. पण एक टप्पा असा येतो की, गुलामीची तिला जाणीव होते, ती शिकते, नोकरी करते. अपमानाचे असंख्य प्रसंग येतात. पण सर्व जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडते... तिच्या मुलींनाही शिक्षाणात गोडी असते आणि तिची सारी स्वप्ने त्या पूर्ण करतात... ज्या आईनं तिचं आयुष्य नकोसं मानलं. त्या आईला तिनं स्वत:च्या घरातून ‘हद्दपार’ केलं असलं तरी देखभाल करण्यात ती कुचराई करीत नाही. तीच आई नंतर लोकांना सांगू लागली, ‘मेरी बडी बेटी पोपेसर हाय. उन्हेच सब मेरा देखतिया.’ खरंच कोण होती ही मुलगी? स्वत्त्वाची जाणीव होताच आपली ‘स्पेस’ तयार करणारी ही मुलगी होती तरी कोण? आशा आपराद हीच ती मुलगी. आता आयुष्याचं अर्धशतक पार केलेल्या आशानं जीवनाचे अनेक रंग अनुभवलेत. त्या अनुभवानं कधी ती थरारली. उद्ध्वस्त झाली संघर्षमय कालखंडाचा हा पट तिनं गहिरेपणानं मांडलाय. संवेदनशील वडील आणि असंवेदनशील आईच्या पोटी जन्मलेली ही आशा वडिलांची आवडती; पण आईची तितकीच नावडती. आशा म्हणते, ‘आईला वस्तू गहाण ठेवून गरज भागविण्याची सवय. तिनं कधी भांडी, दागिने, वडिलांचा लग्नातला जरीचा पटका, कधी मंगळसूत्रही गहाण ठेवलं. तिनं गहाण ठेवलेल्या वस्तू मी सोडवत आले. मला आईपाशी ‘गहाण’ ठेवलेलं आयुष्यही सोडवून घ्यावं लागलं. वडील असेतो आशा शिकत गेली आणि ती नववीत असताना तिचे प्राणप्रिय ‘भई’ मरण पावले. त्याच क्षणी आई पाटी-दप्तर फेकून देऊन तिचं शिक्षणच संपूवन संसाराला जुंपते. ऐन लग्नात सासरच्या मंडळींशी भांडते आणि आशा नवऱ्यासह आईकडेच राहायला लागते. वस्ताद आई त्यांचंही पोतेरं करते. आशाची सारी स्वप्ने आईच्या काळजाच्या दगडावर चक्काचूर होत जातात. धर्म, रूढी, परंपरा दहशत आणि दरारा अशा अनेक दगडांच्या तुरुंगात ती चिणून जाते; पण सभोवतालची चार चांगली माणसं मदतीला धावतात आणि आशाची जडणघडण होते... तिची प्रेरणा घेऊन तिच्या चारही मुली स्वत:च्या पायांवर उभ्या राहतात. नवरेही समजूतदार मिळतात आणि आयुष्याच्या उताराच्या वळणावर तीच आशा त्याच अबोल आणि समजून घेतलेल्या नवऱ्याच्या साथीनं स्वत:च्या गाडी-बंगल्यासह राहते आहे... अलौकिक नात्यानं भोवतालच्या समाजानं जे प्रेम आणि साथ दिली त्या स्नेहसंबंधाचं प्रतीकही पुस्तकातून उमटत राहतं... ही लोकं तरी कोण होती? तिचे शिक्षक, गल्लीतले लोक, कॉलेजातले गुरुवर्य, आधारवड बनलेल्या प्राचार्या लीला पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील, रवींद्र सबनीस, अनेक संस्था, महिला दक्षता समिती आणि असंख्य मायेची माणसं. ती ज्या हिंदू गल्लीत जन्मली आणि वाढली तेथल्या संस्काराने ती कवेळ मुस्लीम न राहता भारतीय मुस्लीम बनली. जाती आणि धर्मभेदाच्या पलीकडच्या समाजाच्या प्रेमातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत गेली... पण त्यासाठी जन्म ते नंतरची पंचवीस वर्षे अक्षरश: नकारात्मक शब्दांचे आसूड आणि अभद्र लेबलं सोसावी लागली. त्या लेबलातून वाट काढण्यासाठी जी धडपड झाली त्या धडपडीची कहाणी म्हणजे ‘भोगले जे दु:ख त्याला... हे पुस्तक. १४ एप्रिल १९५२ रोजी मुस्लीम कुटुंबात कोल्हापुरात आशाचा जन्म झाला. वडील इस्माईल देसाई त्याकाळच्या इंग्रजी विषयातले एम. ए. व इतर भाषांचे जाणकार. इंग्रजांकडे ते दुभाषा आणि खजिनदार म्हणून काम पाहत. स्वातंत्र्यानंतर इंग्रज परतले आणि इकडे नोकरी-जमीन सारेच गेले. मित्राची जामिनकी अंगावर येऊन प्रेसचा व्यवहार संकटाचा ठरला. गांधी हत्येनंतरच्या कोल्हापुरातल्या दंगलीत सायकलीचं दुकानही लुटलं गेलं. आशाची आई पन्हाळ्याची. तिचे वडील तलाठी. घरात आबादी. सोनं-नाणं भरपूर. सर्व्हिस मोटारीच्या धंद्यातल्या भागीदारीसाठी अम्माचे सगळे दागिने सादोबा मुलावरच्या चुलत भावाकडं दिले जातात आणि शिकारीच्या दौऱ्यावर आईच्या वडिलांचा हृदयविकारानं मृत्यू होतो. नातलग हुसकावून लावतात आणि पहिल्यांदाच ती घरकामासाठी म्हणून घराबाहेर पडते. पुढली तीस वर्षे वडलांच्या श्रीमंतीचा विषय निघाला की, ‘क्या जलाने की उनकी शिरमंती, बडेजावी? बडा घर, पैसा, दागिना हामना क्या मिला?’ अशी ती उपेक्षा करीत राहिली. नवऱ्यावरचा राग मुलीवर काढीत राहिली. आशाचे वडील भई मेहता कंपनीत नोकरीला लागले असले तरी पैसा पुरायचा नाही. भई कविमनाचे तर आई ‘की गे कुत्ते’ असं म्हणून बोलणारी, ‘आगे ए छिनाल इधर आ’ असा ओरडा तर दिवसातून हजारवेळा होई. कोणाकडून आणा घेतला म्हणून तापलेलं उलथनं तळहातावर चर्रकन ओढण्याचीही तिनं तमा बाळगली नव्हती. आठव्या वर्षीच सकाळी लवकर उठून असंख्य कामं मागं लागलेली. थोडा कंटाळा केला की, ‘क्या गे चिपलककी मूँ की’ अशी शेरेबाजी. कामानं थकायला व्हायचं. कधी ताप यायचा, गालगुंडही होत असे, पण आईनं हात लावून कधी विचारपूसही केली नाही. एकदा तर चुलीच्या कोपऱ्यातले जळणाचं लाकूड तिने दोनही पायांवर इतक्या जोरात मारलं की, ती कुत्र्यासारखी केकाटत घराबाहेर पळाली. कधी घरात मटणरस्सा असला तरी भईच्या ताटात मात्र डाळ-आमटीच. अचानक भई आजारी पडून मरण पावतात आणि त्याबाबत आशा म्हणते, ‘आईकडून होणारी उपेक्षा, छळ ते बघत, सोसत आले होते. ते मुकाट राहत. भर्इंनी प्रेम निर्माण केलं, तर आईनं निर्माण केली दहशत. भीती.’ पंधरा दिवसांनी आशा शाळेत निघाली तर आईनं दप्तर ओढलं आणि फेकून देताना ती म्हणाली, ‘चुल्हे में चाल तेरी साळा.’ भर्इंची इच्छा होती. आशानं बॅरिस्टर व्हावं, पण आता शज्ञळा सुटली, शाळेत निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचा चषक मिळाला तर आईने तो रस्त्यावर फेकून दिला. चेपलेला तो चषक नंतर पेटते कोळसे घालून धूप म्हणून वापरला. आईनं आशाचं लग्न लावून दिलं तो दिवस अमावस्येचा. लग्नानंतर नवऱ्याबरोबर ही सिनेमा पाहायला गेली तर आल्यावर नवऱ्यासकट तिची कबख्तीच निघाली. पाच बहिणींना स्वातंत्र्य होतं, नव्हतं फक्त आशालाच. कारण तिच्यादृष्टीनं आशा म्हणजे अपशकुनी. पहिले गरोदरपण, कावीळ, अशक्तपणा आणि दिवसभर कानांवर पडणारे ‘ए टांगे के टप के मूँह की’ असले शब्द. बाळंतपणात तर बघालाही कोणीच नाही आणि अशी चार बाळंतपणं. दवाखान्यात कोणी न्यायचं नाही वा बाळंतपणानंतर कोणी भेटायला गेलेलं आईलाही आवडायचं नाही. एकटीनं खुरडत खुरडत घरी यायचं, चारही बाळंतपणाच्या काळातल्या ज्या आपत्तीचं वर्णन आशा आपराद यांनी पुस्तकात केलं आहेत ते पुढं पुढं वाचवत नाही. कधी विजेचा शॉक बसतो. कधी नाहक चोरीचा आळ घेतला जाऊनही नवरा तिची चौकशीही करीत नाही. बहिणींच्या लग्नात भांडी घासायची पाळी आशावर आली. थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आशा ठरविते तेव्हा माने केलेला घरातला दंगा अभूतपूर्वच; पण सारा जाच आणि त्रास सोसून आशा शिक्षणाला उभी राहते हा तिच्या आयुष्यातला पहिला निर्धार असतो आणि हेच वेगळे वळण ठरते. या पुस्तकात हादरवून सोडणारे अनेक प्रसंग आहेत. करुणा वाटते तसे प्रेमाचे उमाळेही येतात. आत्मकथेत असंख्य व्यक्तिरेखा आहेत. त्या इतक्या ठसठशीत आहेत की, त्यांच्या वर्तनातूनही आशाचं व्यक्तिमत्व काही अंशी उलगडत जातं. यातली हिंदी भाषाही वेगळीच आहे. याआधी मराठी मुस्लिमांची आत्मकथनं मराठीत आली असली तरी हे आत्मकथन त्यातल्या अनुभवानं वेगळं ठरतं. ...Read more

  • Rating Star LOKSATTA 4-1-2009

    आशा आपराद यांचे आत्मचरित्र `भोगले जे दु:ख त्याला...` हे अनेक अर्थांनी वाचनीय आहे. मनोगतातच त्या म्हणतात की, हे एका सामान्य स्त्रीचे आत्मचरित्र आहे. पुस्तक वाचताना मनात आले की कदाचित म्हणूनच ते वेगळे व सच्चे झाले आहे. म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींना आत्मचरत्र लिहिताना अनेकदा स्वत:च्या वागण्याचे समर्थन द्यावेसे वाटते किंवा आजूबाजूच्या व्यक्ती दुखावल्या जाण्याचे भय वाटते. आपराद यांच्या आजूबाजूला कुणीही प्रसिद्ध व्यक्ती - तशा लीलाताई पाटील आहेत - नाहीत. त्यामुळे मनमोकळेपणाने जसे घडले तसे त्या सांगत गेल्या. त्यांच्या आईचा स्वकेंद्री व अकल्पनीय स्वभाव, त्यामुळे त्यांची झालेली घुसमट, वडिलांचा लवकर झालेला मृत्यू परंतु मृत्यूपूर्वीच त्यांनी आशावर केलेले संस्कार यांचे चित्रण मनाला भिडेल असे झाले आहेच; परंतु सुशिक्षित वडिलांच्या प्रेमामुळे व जवळिकीमुळे त्यांच्यात असलेली शिक्षणाची जिद्द व त्यामुळे तेराव्या वर्षी आईने जबरदस्तीने लावलेल्या लग्नानंतर पाठोपाठच्या चार मुलींना जन्म देऊन मग परत शिक्षणाला सुरवात करून प्राध्यापकीपर्यंत मारलेली मजल थक्क करणारी आहेच, परंतु हे सर्व करत असताना त्यांच्या आजूबाजूच्या समाजाचे जे चित्रण आहे ते विलोभनीय आहे. लेखिकेचा समाज म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील मुस्लिम समाज. हा समाज बरीच जमीन बाळगून असणारा खेडवळ समाजही आहे व अशिक्षितपणामुळे गरिबी आलेली कुटुंबेही आहेत. तिचे कुटुंब गरिबी प्राप्त झालेले आहे. परंतु आजोळ हे दरगाहची सेवा करणारे `मुजावर` कुटुंब. दरवर्षीच्या ऊरुसाचे वर्णन वाचताना प्रत्येक ठिकाणाच्या संस्कृतीमुळे विकसित झालेली संमिश्र (कंपोझिट कल्चर) संस्कृती काय असते त्याचा पट आपल्यापुढे उलगडला जातो. उरुसाच्या आधी सर्व मुजावरांनी `संदल` चंदनाचे दाट गंध उगाळून हांडे भरावयाचे - पीराला ते माखायचे. पहिल्या दिवशी सवाष्णींनी शाकाहारी जेवण करून नैवेद्य दाखवायचा. दुसऱ्या दिवशी बकरा कापला तरी इतर जेवण म्हणजे मसालेभात, धपाटे, वाटाण्याची उसळ इत्यादी. पापड - कुरड्या, ओटी भरणे वगैरे गोष्टींचे वर्णन वाचताना गंमत वाटते. त्यांची मुसलमानी भाषाही अशीच, `आशा आटप जल्दी. आज दस्तगीर, तू,मैं, छोऱ्या जंजीर देखने जइंगे, लई भारी पिक्चर हाय, उसमें का एक गाना मुजे लई पसंत आया देक...` त्यांचे शेजारी पाजारी हिंदू अठरापगड जातीचे. त्यांच्याबरोबर लेखिकेवर गौरी-गणपती, हादगा, यांचे संस्कार झालेले. मदतीला हेच शेजारी. त्यांच्याबरोबर भावा-बहिणीचे मनापासून निभावलेले नाते हा खरा आपला समाज. याच समाजातील काही नातेवाईक, शुद्ध शाकाहारी, खुद्द लेखिकेचा नवरा शाकाहारी त्यामुळे त्यांची तब्बेत सुदृढ. हे सर्व सहज. यातलाच एक दीर धर्माची टिंगल उडवणारा तर एक अचानक नमाजी बनलेला. इतके वैविध्य, मान्यता धर्माचा लवचिकपणा याचे मनोरम चित्रण या आधी वाचलेले आठवत नाही. एक स्त्री शिकली की सारे कुटुंब शिकू लागते हे आशा आपराद यांच्याकडे बघून पटते. त्यांच्या शिक्षणाच्या धडपडीला प्रचंड विरोध करणारे नातेवाईक पुढे आपल्या मुलांना शाळेत घातल्यावर त्यांचे उदाहरण देऊन `आशा भाभी कैसे कष्ट में शिखे, तुमना अब्यास करनं क्या जान जातिया क्ता?` म्हणून त्यांना (मुलींनाही) शिकण्यासाठी उत्तेजन दिले. त्यांच्या चारही मुली शिकल्याच, परंतु त्यांच्या बहिणीचीही काही मुलेही उच्च शिक्षणाकडे त्यांच्या उदाहरणावरुन वळली. आशाताई अभ्यास करत असतानाच आजूबाजूच्या शेतमजूर स्त्रियांशी जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित केला. या स्त्रियांना बचत करायला शिकवून जोडधंदा करायला मदत करून त्यांना आत्मनिर्भर केले. याच स्वभावामुळे कॉलेजमधील विद्यार्थी व नंतर कोल्हापुरातील सामाजिक कामाशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. आजही त्या स्वाधारसारख्या संस्थांत काम करत आहेत. लेखिकेने स्वत:च्या लोकांकडून उभे केलेले अडथळे पार करत स्वत:च्या प्रगतीचा प्रवास केला. असा प्रवास आजवर अनेकांनी केला आहे.परंतु एक मुस्लिम स्त्री म्हणून समाजाने त्यांच्या मार्गात जे अडथळे आणले त्यामुळे विचार आला की सर्वसामान्य लोक स्वभावाने एकमेकांशी वागत असतात. हीच आपली संस्कृती आहे. परंतु स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणारे समाजात तेढ निर्माण करतात. हा समाज जो सहजतेने आपला धर्मधारयते इति धर्म - निभवत असतो त्याला कृत्रिमतेने - उर्दूत शिक्षण, पोशाख वगैरे जगायला लावतात. लेखिकेची आई व इतर स्त्रिया नऊवारी नेसत होत्या, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या , पाटल्या घालणे महत्त्वाचे मानत होत्या. त्यांना अलगतावादाचे धडे देऊन व हिंदूंनी त्यांच्यावर आक्रमकपणे बोलण्याने गटाने राहण्याची गरज वाटून, आपणच आपल्या समाजाच्या एकसंधपणाच्या वैविध्याच्या चिरफळ्या करत आहोत का? असो. पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान समाजाच्या जगण्याचे, त्यांच्या प्रश्नाचे व त्यावरील काही मार्गाचे लोभस चित्रण आल्याने आशा आपराद यांची कहाणी सामाजिक चित्रणही झाली आहे. या त्यांच्या समाजाविषयी अभ्यासू दृष्टीकोनातून त्यांनी आणखीही लिहावे. महाराष्ट्राच्या सामाजिक दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक ठरेल. ...Read more

  • Rating StarTANISHKA Jan 2010

    मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या आशा अपराद यांच्या ‘भोगले जे दु:ख त्याला’ या आत्मचरित्राला आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी पुरस्कार, दिल्लीचा काकासाहेब गाडगीळ मातृपितृ पुरस्कार असे सात पुरस्कार मिाले आहेत. आयुष्यात येणाऱ्या संकटांशी सामना करत लढत राहिलं तर जगणं मनासारखं जगता येतं, हा संदेश देणाऱ्या आशा आपराद यांचं हे मनोगत. प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवींचा मला फोन आला. ओलावलेल्या स्नेहमयी आवाजात ते म्हणाले, ‘‘मी तुमचं आत्मचरित्र थांबून थांबून वाचतोय.’’ मला क्षणभर त्याचा अर्थच कळला नाही. ते म्हणाले,‘‘थोडं पुस्तक वाचतो. रडतो. डोळे पुसून पुढचा प्रसंग वाचतो.’’ ते ऐकून माझं मन शब्दांतून त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचं समाधान मिळालं. या पुस्तकामुळे दळवींबरोबर श्रीकांत मोघे यांसारख्या दिग्गजांपर्यंत, चंद्रपूरच्या मनोहर सप्रे यांच्यासारख्या कलंदर व्यक्तीपासून ते मुंबईच्या विद्यासारख्या तरुणींपर्यंत अनेक व्यक्ती आणि घरांशी मी स्नेहाच्या धाग्यांनी जोडली गेले. मी जे भोगलं ते प्रतिनिधिक आहे. माझ्या प्रतिकूल स्थितीतही घराबाहेरच्या अनेक मायेच्या हातांनी मला जाणलं, आधार नि धीर दिला, यथाशक्ती मदत केली. समाजाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. मदत करणाऱ्या असंख्य प्रेमळ ‘हातांना’याच कृतज्ञतेनं मी मोठ्या विश्वासानं माझं पुस्तक अर्पणही केलं आहे. मी समाजावर जितकं प्रेम केलं, समाजानं त्याच्या कैकपटींनी मला अधिक प्रेम दिलं, समृद्ध केलं. समाजात वाईट गोष्टी आहेत, पण सारा समाज कृतघ्न नाही. समाजात चांगल्या माणसांची संख्या खूप मोठी आहे. माझं दु:ख, सोसणं मी मोकळेपणानं व्यक्त केल्यावर समाजानंही मला तितक्याच आपलेपणानं स्वीकारलं, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. माझं पुस्तक वाचून अनेकांना रडू आलं. त्यातल्या शब्दांचा कीस काढावा किंवा त्यांची चिरफाड करावी असं वाटलं नाही, हे त्याचंच प्रतीक नाही काय? कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हिंदी विषय शिकविणारी मी प्राध्यापिका. अत्यंत सामान्य मुस्लिम घरात जन्मले. वडील सुसंस्कृत, पण आई अक्षरशत्रू. लहानपणापासून, किंबहूना जन्मापूर्वीपासूनच तिने माझा रागराग केला, छळ मांडला. माझ्या नवऱ्यासह तिने मला अक्षरश: राबवलं. माझं जीवन पणाला लावण्याचा तिने जणू विडा उचलला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मी चार मुलींची आई बनले होते. प्रतिकूलतेचा कळस सोसत होते. परिस्थितीच्या या वादळी प्रहारातही माझी अभ्यासाची, ज्ञानाची आस जिवंत राहिली हे माझं भाग्य. कठोर निग्रहाच्या आणि अभ्यासानंतर मनाला मिळणाऱ्या अननुभूत आनंदाच्या आधारानं मी सारे चटके सोसत दहावीपासूनचं शिक्षण घेतलं. बी.ए., एम.ए., एम.फिल. झाले. आता प्राध्यापकाची नोकरी करते आहे. माझं स्वत:चं प्रशस्त, सुंदर, मनाजोगतं घर झालं. महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुली शिकल्या-सवरल्या, शहाण्या झाल्या, सुस्थळी पडल्या. माझ्या मनीचं गुज समाजरूपी आईजवळ उघड करताना इतरांना प्रेरणा देण्याची सुप्त इच्छा होती. आपण प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकतो. मी जे भोगलं ते प्रातिनिधिक आहे. माझ्या प्रतिकूल स्थितीतही घराबाहेरच्या अनेक मायेच्या हातांनी मला जाणलं, आधार नि धीर दिला, यथाशक्ती मदत केली. मदत करणाऱ्या असंख्य प्रेमळ ‘हातांना’याच कृतज्ञतेनं मी मोठ्या विश्वासानं माझं पुस्तक अर्पणही केलं आहे. माझा निखळ प्रामाणिकपणा, दु:ख हे धागे मला घराघरांशी जोडणारे ठरले. एका अर्थानं माझं दु:ख वैश्विक ठरलं. मी खरं तेच लिहिल्यामुळे पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच आला नाही. माझं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मला रसिकांकडून मिळणारी दाद मनस्वी आनंद देणारी ठरली. तसंच होऊ शकतं, शिक्षणानं माणूस शहाणा होऊ शकतो, आपली इच्छा प्रामाणिक आणि चांगली असेल तर अडचणी सुटू शकतात, हे मला समाजाला सांगायच होतं. शिवाय आयुष्याच्या आणि वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर गत आयुष्याकडे पाहताना मी तटस्थ राहू शकत होते. त्या त्या वेळी मला जे वाटलं ते मी प्रामाणिकपणे लिहिलं. माझ्या घरची माणसं माझ्याशी वाईट वागलीच होती. त्यांनी मारलेल्या बाणांच्या जखमा मी झेलल्या होत्या. त्यामुळे मी पूर्ण विचार करूनच आत्मचरित्र लिहिलं. माझा निखळ प्रामाणिकपणा, दु:ख हे धागे मला घराघरांशी जोडणारे ठरले. एका अर्थानं माझं दु:ख वैश्विक ठरलं. मी खरं तेच लिहिल्यामुळे पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच आला नाही. माझं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मला रसिकांकडून मिळणारी दाद मनस्वी आनंद देणारी ठरली. मी समाजाप्रति आणखी कृतज्ञ, नम्र झाले आहे. कोकणातल्या एका तरुणाने या पुस्तकामुळे आत्महत्येपासून परावृत्त झाल्याचं सांगितलं. अर्चनाने मनातलं इतरांना सांगता न येण्याजोगं दु:ख माझ्याजवळ बोलून मोकळं केलं. मुंबईची विद्या तर फोन करून रडली. नवऱ्याजवळ हट्ट करून ती कोल्हापूरला आली. माझ्या आवडत्या रंगाची साडी, माझा आवडता मोगऱ्याच्या फुलांचा गजरा दिला. माझ्या कुटुंबीयांना मुंबईला बोलावून तिने यथायोग्य आदरसत्कार केला. चंद्रपूरचे मनोहर सप्रे. त्यांचं सुरेख पत्र आलं आहे. सप्रे यांनी परिचितांना लिहिलेल्या निवडक पत्रांचा संग्रह ‘सांजी’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या आगामी आवृत्तीत मला लिहिलेल्या पत्राचा समावेश ते करणार आहेत. अरुण फडके यांचा ‘मम आत्मा गमला’ असा एक कार्यक्रम आहे. भाषेचा वेगवेगळा लहेजा असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादाचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये माझ्या पुस्तकातील मी ‘ह्यांच्या’ पाया पडून, विनवण्या करून शिकण्याची परवानगी मागते, तो प्रसंग घेतलेला आहे. त्याचं नाट्यरूपांतर सादर केलं जातं. मुंबई-पुण्यात त्याचे प्रयोग झाले आहेत. गेल्या महिन्याभरात मला सतत पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्कारांपासून ते लक्ष्मीबाई टिळक, सोलापूरचा भैरू रतन दमाणी, दिल्लीचा काकासाहेब गाडगीळ मातृपितृ पुरस्कार, अशा दर्जेदार संस्थांच्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. मी सामान्य स्त्री आहे, पुरस्कारांमागे धावणारी तर मुळीच नाही, तरी असे चांगले पुरस्कार मला शोधत आले. लहानपणी माझ्यावर माया करणारी पण मध्यंतरी काही काळ सहवासात नसणारी माणसं पुन्हा भेटली. घरातल्या काही व्यक्तींना त्यांचं काय चुकलं हे कळलं. मुख्य म्हणजे अगदी तरुणवर्गाच्या काळजातही मला जागा मिळाली. काहीजणांना जगण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांना माझ्या भावनांशी समरसता साधता आली. हे सारं माझ्यासाठी आनंदाचं, समाधानाचं, कृतज्ञ आणि नम्र बनविणारं आहे. आज मी कृतार्थ आहे! ...Read more

  • Rating StarLOKSATTA 17-10-2009

    अशिक्षित, अडाणी, अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या आशा अपराद यांचं `भोगले जे दु:ख त्याला...` हे आत्मकथन परिस्थितीच्या कोंडीत सापडलेल्या एका अबलेचं शिक्षणाच्या अविश्रांत ध्यासातून एका सबलेत झालेलं रूपांतर दर्शवितं. आठवीत असतनाच जबरदस्तीनं शाळा सोडायला लावून लग्न झालेल्या आणि अवघ्या १९ व्या वर्षीच चार मुलींची आई बनलेल्या आशा अपराद यांनी सासरच्या प्रतिकूल, कर्मठ व पारंपारिक विचारसरणीच्या कुटुंबीयांना आपल्या शिक्षणासाठी राजी करून मोठ्या जिद्दीनं उच्च शिक्षण घेतलं आणि आपलं व आपल्या कुटुंबाचं भवितव्य घडवलं. ही सगळीच कहाणी आश्चर्यकारक आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more