* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIMUKTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980110
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 209
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF YOU REALLY CARE A BIT ABOUT JUSTICE THEN DO NOT INDULGE YOURSELF IN VAIN DISCUSSIONS OR DO NOT EVEN SIT IDEALLY. SOMEONE SOMEWHERE HAS TO START THE CONTEST AGAINST THE EVIL PRACTICES. ONCE THE WAR STARTS THEN NATURALLY THERE ARE GOING TO BE BLOWS AND ATTACKS ON EACH OTHER BY BOTH SIDES. IF YOU REALLY INTEND TO START THE FIGHT, THEN YOU WILL HAVE TO PREPARE YOURSELF FOR GETTING HURT. IF YOU REALLY WANT TO ESTABLISH THE ETERNAL TRUTH THEN YOU WILL HAVE TO SEE BEYOND YOUR OWN PROFITS, YOU WILL HAVE TO WIDEN THE HORIZONS OF YOUR UNDERSTANDING.
न्यायाची चाड बाळगायची तर केवळ चर्चा करून, सोयीस्करपणे गप्प बसून भागत नसते. दुष्पप्रवृत्तीविरुद्ध कधी ना कधी लढा पुकारावाच लागतो. आणि लढाई झाली की वार होणारच! ते झेलण्याची, प्रसंगी होणा-या जखमा सहन करण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रासंगिक फायद्यावर नजर ठेवून सर्वांनी वागायचे ठरवल्यास सत्य कधीच प्रस्थापित होणार नाही!
* अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिप्रतिष्ठान,कराड यांच्यातर्फे `साहित्यरत्न` पुरस्कार २०१० * आठवे ग्रामीण साहित्य संमेलन, अहमदनगर -`शब्दगंध साहित्य पुरस्कार`२०१० * सोमेश्वर वाचनालय व साखर कारखाना यांच्या विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात `साहित्य साधना`पुरस्कार २०१० * संगमनेर इतिहास संशोधन मंडळातर्फे देण्यात येणारा `कवी अनंत फंदी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार`२०१०
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIMALMORE #विमल मोरे #TEENDAGADACHICHUL #तीनदगडाचीचूल #AUTOBIOGRAPHY #DIPAMAHANVAR #VIMUKTI #BHATAKYAJAMATI #PER #BAHAR #KAHAR
Customer Reviews
  • Rating Starपद्मश्री डॉ. शां.ब. मुजुमदार, सिंबायोसिस, पुणे

    आपले आत्मकथन `विमुक्ती` आवडले. एकूण जीवनप्रवास आपण अत्यंत हलक्या-फुलक्या भाषेत चितारला आहे. `रयत` मधील अनुभव, पुणे विद्यापीठातील राजकारण व प्राध्यापक संघटनेच्या माध्यमातून काम करतानाच्या अनोख्या आठवणी यांचे ओघवते वर्णन आपण पुस्तकात केले आहे. माझ्या नवाचा अधूनमधून केलेला शिडकावा सुखद वाटला. तुम्हाला आणि पुस्तकाला सदिच्छा! ...Read more

  • Rating Starवसंत आपटे, किर्लोस्करवाडी

    `विमुक्ती` वाचले. आवडले. सुरवातीच्या पाच-सात पानातच पुस्तकाने पकड घेतली. त्यातील `आईनं साखर वाढल्याचा बहाणा आवडायचा, नकार मात्र नको वाटायचा` अशी वाक्ये छान वाटली. जातीयतेचे चटके बसले त्याबद्दल आक्रोश न करता, आपली लेखणी संयत राहिली याचे समाधान वाटत. पुस्तकाची भट्टी एकूणच चांगली जमली आहे. आपले लेखन परिचित होते, पण त्यात इतके लालित्य प्रथमच दिसले. त्याचा आनंद झाला. विवेचनात ओघ चांगला आहे. तो रेंगाळत नाही आणि धांदलही करीत नाही. आपली कार्यपद्धती तशीच होती हे लक्षात आहे. भाषा पूर्णत: नागर चालली असती, असे मला वाटते. मेहतांनी निर्मिती छान केली आहे. एक चांगली कलाकृती त्यांनी वाचकांपुढे आणली त्याचे समाधान आहे. मन:पूर्वक अभिनंदन! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SANGLI 18-05-2009

    `दाहक आत्मकथा`… अलीकडे विविध सामाजिक व सांस्कृतिक घटकांची आत्मकथेने मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत आहेत. पण त्यामध्ये साहित्यिक आणि कलात्मक कस किती असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. तरीही तळागाळातील मंडळी आपल्या भोगवट्याच्या सात-बारा कसलाही आडपडदा नठेवता उघड करीत आहेत, त्यामुळे एक सामाजिक इतिवृत्त म्हणून अशा प्रयत्नांची किमान दखल घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर, अक्षरांचा उच्चार करण्याचा प्रबळ आत्मविश्वास जागविणाऱ्या कर्मवीर भाऊरावपाटील यांचे ऐिितहासिक ऋण निर्विवाद ठरावे. या पार्श्वभूमीवर रयत कुलातील सध्याची आत्मकथांची लाट बरेच काही सांगून जाते. दीपा महानवरांचे आत्मकथन याच परंपरेत मोडणारे असले तरी एकूण गुणवत्ता, कलात्मकता व दर्जा इ. कसोट्यांवर ते एकदम उजवे नि उत्तम आहे. एका आडवळणी वाडीत धनगर कुटुंबात जन्मलेल्या धोंडीराम (दीपा) दु:ख-दैन्य आणि द्रारिद्र्याशी निकराचा लढा देत. आत्मविश्वासाचा पैसा कवेत घेऊन शिक्षण, साहित्य, लोककला, संघटन, प्रशासन, संपादन, स्तंभलेखन, अध्यापन, समाजकारण आणि राजकारणही अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपली विशेष अशी उल्लेखनीय मुद्रा उमटवितो हा या आत्मकथानाचा गाभारा; नि त्यात समरस होऊन, प्रगल्भ आणि प्रौढ लेखणीचे अभिजात वरदान लाभलेल्या दीपाने मूळ ऐवजाचा मोठा सुरेख `साज` घडविला आहे. काय, किती नी कसे सांगावे हे शहाण्या लेखकाला आधीच कळावे लागते. सामासिक आणि चित्रात्मक शैलीच्या दीपाच्या बाबतीत हा प्रश्नच आला नाही. वाड्यापाड्यातीलजातीपातीची जुनाट जळमटे, अंधश्रद्धांचा धाक, रुढी परंपरांचे साखळदंड अशा कोंदट व कुबट परिस्थितीतून ज्ञानाच्या दिशेने झेपवणारा धोंडीराम त्याला लाभलेले सखे-सोबती, समर्थक, शिक्षक व सोयरेधायरे, शिक्षणसंस्था, सहकारी सोसायटी, बँक, ग्रामपंचायतीतील ठेंगू मंडळींचे विखारी राजकारण, नीतीमूल्यांची घसरण, पंच-सरपंच, आमदार, चेअरमन, प्राचार्य, प्रध्यापक, विभागप्रमुख, आजीव सेवक, संचालक, कुलगुरु इ. पदावर केवळ खुर्ची उठविणाऱ्यांचे `अस्सल` मातीचे पाय असे नानाविध पात्र प्रसंग परिस्थिती वगैरेचा कलापूर्ण व साक्षेपी आलेख दीपाने मोठ्या कलाकुसरीने रंगविला आहे. सिनेमातील संकलकासारखा एक समर्थ नी सजग संकलक चांगल्या लेखकातही वास करुन असतो. याचा पुरेपुर प्रत्यय या आत्मकथेत येतो. प्रवाही आणि प्रभावशाली भाषाशैली एकेका शब्दासाठी घेतलेले कष्ट, मोळीबंद वाक्यरचना, विस्मरणाच्या वाटेवरील म्हणी, घटना-प्रसंगातील चमकदार बारकावे. अशा अनेक गोष्टींमुळे दीपाचे हे लेखन वाचकाला खिळवून टाकते. नास्तिकता, मार्क्सवादी विचारांचा पगडा, संस्था संघटनांतील लढाऊ नेतृत्व, विधायक टिका-टिप्पणीची सुरसुरी आणि फिरकीदार वाणी, लेखणी हा सगळा तोफगोळा खरे तर शत्रू निर्माण करणारा, परंतु दीपाने कितीतरी माणसे आणि मनेही जोडली आणि हे त्या अव्वल मानवी मूल्यांनी ओथंबलेल्या पुस्तकाकारात येण्याच्या केलेला हा प्रयत्नही एकूणच पुस्तकाची गती-रिती उलटीपालटी करणारा. साहित्य, कला क्षेत्रातील `पोटदुखी`चे दीपाने नोंदविलेले काही प्रसंग खूपच खुमासदार आहेत. पेर-बहर-कहर अशा तीन भागात विभागलेली `विमुक्ती` अनुक्रमे दीपातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यादींचा विकास, विस्तार आणि प्रसंगी विस्कोट सुध्दा समरसून सांगते. ना खेद ना खंत अशी तटस्थता अवघडच असते. दीपाला हे जाम जमले आहे. नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागूंची प्रस्तावना आणि लेखनातील मोक्याच्या टप्प्यावर सॉक्रेटिस, सार्थ, देकार्ट, डी गॉल, जी.ए. कुलकर्णी यांनी पेरलेली अवतरणे, केवळ सूचक नि समर्पकच नाहीत. तर ती चिंतनोत्संजकही आहेत. तसेच दीपाच्या विचार व्यूहाची जातकुळी व्यंजित करणारी आहे. मेहता पब्लिशिंगच्या निर्मिती आणि चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ म्हटल्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. शाळा महाविद्यालयातून नुसतेच छापाचे गणपती बाहेर पडत नसत, अशा वेगळ्या घडण्या-बिघडण्याच्या काळाचे अपत्य असलेल्या दीपा महानवरांच्या स्वभावाची नि कार्यकर्तुत्वाची मूस नी कूसही केवढी विलक्षण आहे हे इथे पानापानावर प्रकट झाले आहे. - प्रा.वसंत पाटील ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more