MAHADEV MORE

About Author

Birth Date : 22/06/1939
Death Date : 21/08/2024


MAHADEV MORE WAS BORN IN NIPANI, BELGAUM. HE DID HIS EDUCATION UP TO SSC THERE. LATER, HE ENTERED KOLHAPUR TO STUDY INTER ARTS, BUT DUE TO THE HALAKHI CONDITIONS AT HOME, HE HAD TO LEAVE COLLEGE IN 1959. AFTER THAT HE ALSO DID MANY MANUAL LABOR JOBS TO RUN THE HOUSE.

महादेव मोरे यांचा जन्म बेळगाव येथील निपाणी येथे झाला. त्यांचे एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढे इंटर आर्ट्सचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरला दाखल झाले, मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना १९५९ साली कॉलेज शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी घर चालवण्यासाठी अनेक अंगमेहनतीची कामेही केली. मात्र एकीकडे त्यांचे लिखाणही चालूच होते. यादरम्यान त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, प्रासंगिक लेख, दैनिकांच्या पुरवण्यांमधून सदर लेखन, समीक्षा लेखन असे विविधस्वरूपाचे लेखन केले. त्यांची पहिली कथा २२ ऑक्टोबर, १९५९ साली साप्ताहिक स्वराज्यमध्ये प्रकाशित झाली. नवयुग, किर्लोस्कर, गावकरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध कथास्पर्धांमध्येही त्यांच्या कथांना पारितोषिके मिळाली. आजवर त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या आणि ललित गद्य असे साहित्य प्रकाशित झाले आहे. चिताक या त्यांच्या कथासंग्रहास १९७५-७६ सालचा व चेहऱ्यामागचे चेहरे या संग्रहास राज्य पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. झोंबड या त्यांच्या कादंबरीस १९९० सालातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी म्हणून दोन पारितोषिकेही मिळाली. त्यांची थ्रील्स, बेंडल, तिंगाड आदी पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 27 total
AADGAR Rating Star
Add To Cart INR 230
AIN BAHARAT KAIF KAHARAT Rating Star
Add To Cart INR 220
BALI Rating Star
Add To Cart INR 220
BATTASHI Rating Star
Add To Cart INR 180
CHEHRYAMAGCHE CHEHRE Rating Star
Add To Cart INR 220
CHITAK Rating Star
Add To Cart INR 180
EKONISAVI JAT Rating Star
Add To Cart INR 250
FARRI Rating Star
Add To Cart INR 360
GABRU Rating Star
Add To Cart INR 220
GAYGULI Rating Star
Add To Cart INR 320
HEDAM Rating Star
Add To Cart INR 220
IGIN Rating Star
Add To Cart INR 200
123

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more