* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661798
  • Edition : 11
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS A GIRL OF 14 MAY BE 15 YEARS, LIKE ALL OTHERS OF HER AGE, BUSY IN PLAYING, DANCING AROUND, ENJOYING HER LIFE, FULL OF JOY AND ENTHUSIASM. ONE DAY, WITHOUT ANY SIGNAL, FALLS SICK WITH THE BACK PAIN AND IS STUCK TO THE WHEEL CHAIR AS A PARAPLEGIC PATIENT. IN THE BEGINNING, HER LIFE IS SHATTERED, BUT EVENTUALLY, SHE DECIDES TO OVERCOME HER ILLNESS, SHE EMERGES THROUGH IT AS A NEW PERSONALITY, NASIMA HURJUK. SHE IS A LADY WITH A VERY SENSITIVE MIND. TODAY, SHE AIMS ONLY AT THE BETTERMENT OF THE DISABLED. SHE TAKES CARE OF THE DISABLED; SHE GIVES THEM AFFECTION, HELPS TO MAKE LIFE TOLERABLE FOR THEM, MAKES THEM INDEPENDENT, AND AWAKES THEIR SELF-RESPECT. SHE SEES DREAMS, SHE HAS VISIONS BUT SHE DOES NOT FORGET THE FACTS OF LIFE. SHE PURSUES HER DREAMS WITH THE HELP OF HER WHEEL CHAIR. `HELPERS OF THE HANDICAPPED, KOLHAPUR`, IS THE INSTITUTION SHE HAS ESTABLISHED. IT COVERS MANY AREAS LIKE HOSTELS, TRAINING CENTERS, GAS AGENCY. TODAY, THE SPHERE OF HER ACTIVITIES IS INCREASING. SHE HAS BEEN FELICITATED BY MANY AWARDS; ONE IS THE `FI FOUNDATION`. THIS IS THE AUTOBIOGRAPHY OF A VERY STUBBORN LADY IN A NARRATIVE WAY AND IS FULL OF HONEST WORDS HAVING THE ABILITY TO PRESENT THE CLEAR PICTURE IN FRONT OF OUR MINDS.
वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी-बागडणारी-उत्साहानं सळसळणारी एक मुलगी... अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते...! सुरुवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते, पण नंतर त्यातूनच जन्माला येतं एक नवं व्यक्तिमत्त्व. नसीमा हुरजूक.अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. वास्तवाचं उचित भान ठेवून त्या स्वप्नं बघतात आणि मग ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बेभानपणे धावतात, आपल्या चाकाच्या खुर्चीतून... ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था, वसतिगृहं, प्रशिक्षण केंद्रं, गॅस एजन्सी... त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. ‘फाय फाउंंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. ओघवत्या शैलीतलं, निखळ प्रामाणिक, चित्रदर्शी, काळजाला भिडणारं...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarAvinash Jadhav

    संघर्ष म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर हे आत्मचरित्र जरूर वाचावे, प्रत्येक प्रसंग विचार करायला भाग पाडतो आपल्याला... गेल्या काही दिवसांपूर्वी वाचनासाठी एक आत्मचरित्र पर पुस्तक घेतलं. अतिशय थक्क करणारी कहाणी आपल्याला अपंगत्व आले पाहून न थकणारी, आजाराला जुमाणणारी ध्येय गाठण्यासाठी येईल त्या प्रसंगावर मात करणारी एक "स्त्री" आहे. यावर विश्वास बसणे कठीण आहे. हॉस्पिटलमध्ये आजार पणात आपल्या कमरे खाली मुंग्याचं थारोळ झालं आहे, हे कळल्यावर किती तो जीव कासावीस झाला असे, ते वाचूनच अंगावर शहारे आले. अपंगत्वासाठी अनेक प्रवास दौरे मान्यवरांच्या भेटी असे अनेक प्रसंग आणि त्यातील वर्ण हे अचंबित करतात. आपल्याला आलेल्या अपंगत्ववर मात करून दुसऱ्यासाठी जगणारी ती दुसरी "मदर तेरेसा" आहे हे म्हटलेलं सुध्दा वावग नाही. अपंग संस्थे मार्फत अनेकांना त्याच्या स्वाभिमानच आयुष्य जगता यावे आणि त्यांना धौर्य,चिकाटी, प्रेरणा मिळावी. आशा अनेक गोष्टींची उकल नेहमी बाळगून आहे. आशा अनेक अपंगांची "आई" एक "स्त्री" खूप साध्या व सोप्या भाषेत अनेक गोष्टी शिवून बळ देण्याचं काम करते. प्रत्येकाला आपल्या चाकाच्या खुर्चीतुन जग दाखवण्याचं काम करणाऱ्या स्वतःला अभिमानन जगायला लावणाऱ्या या चाकाच्या खुर्ची तुन एक नवीन उमेद,चिकाटी,बळ,प्रेरणा देणार आत्मचरित्र नसून "नवसंजीवनी" देणारं अमृत प्यालाच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी, बागडणारी, उत्साहानं सळसळणारी एक मुलगी... अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते!... सुरुवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते; पण नंतर त्यातूनच जन्माला येतंएक नवं व्यक्तिमत्त्व, नसीमा हुरजूक. अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र, गॅस एजन्सी... त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. ‘फाय फाऊंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 11-08-2002

    धीरोदात्त अपंग स्त्रीची कहाणी... कोल्हापूरच्या अपंग लेखिका नसीमा हुरजूक यांचे हे आत्मकथन. अपंगांनी लिहिलेली आत्मकथनं तसंच कार्य करणाऱ्यांना खूप उपयोगी पडतात. १९९९ मध्ये नसीमाने ‘चाकाची खुर्ची’ हे सदर कोल्हापूर ‘सकाळ’साठी लिहिलं. त्याचंच हे पुस्तकरूप नसीमा जन्मापासून अपंग नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत चांगली उंडारत होती. नृत्यात भाग घेत होती. खेळांमध्ये भाग घेत होती. अभ्यासात उत्तम, घरात भाऊ-बहिणी, आईवडील अशा कुटुंबात रंगलेली. पण अचानक पाठीत दुखू लागलं. दुखण्याचं मूळ स्पाईनल कॉर्ड्समध्ये होतं. ती कुणालाच दोष देत नाही, पण म्हणते, योग्य वेळी, योग्य निदान व योग्य उपचार झाले असते तर आज मी खेळाच्या वा नृत्याच्या क्षेत्रात असते; पण ते नाही झालं. कमरेखाली सर्व अंग लुळं पडलं आणि संवेदनाच नाहीशा झाल्या. तरीही न हरता देशात-परदेशात प्रवास केला. अपंगाच्या स्पर्धेत भाग घेतला. बक्षिसं मिळवली. अपंगांसाठी संस्था स्थापन केली, पण कुंपणानंच शेत खाल्लं. अपंग संस्थेचे पैसे येथे काम करणाऱ्यांनी खाल्ले. त्यांची साधनेसुद्धा विकली नि पैसे खाल्ले. पण न डगमगता ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड कोल्हापूर’ ही संस्था स्थापन केली. आज ही संस्था जोरात काम करत आहे. राजीव गांधी, मनोहर जोशी, मोरारजी देसाई या थोरामोठ्यांनी ही संस्था बघितली आणि मदत केली. हे पुस्तक लिहिताना पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर राहू द्याच, पण दु:खच कारंजासारखं उडत होतं. नसीमाच्या दुखण्याचं नाव पॅराप्लेजिक असं आहे. सतत मदतनीस जवळ असावा लागतो. तिच्या संस्थेसाठी तिचे बहीण-भाऊ, बहिणींचे यजमान व भावांच्या बायका आजही कार्यरत आहेत. सारे घरच काम समजून करतात. एकदा लंडनमध्ये ती तिच्या मदतनीस बाईबरोबर गेली होती. तर ती मदतनीस नसीमाला एकटं टाकून मौजमजा करायला निघून गेली. नसीमाचे तिच्याशिवाय खूप हाल झाले. मदतनीसाशिवाय या माणसांना जगणं अशक्य असतं. पण हीच माणसं माणूसपण अधिक जपतात. जागोजागी याची उदाहरणे आहेत. तिच्या वडिलांनाच त्याच्या हाताखालच्या माणसाने मारलं, पोस्टमार्टम करू दिलं नाही, पण तिची आई म्हणाली, ‘केलं सर्व, कोर्टात गेलो, जिंकलो, तरी तुमचे बाबा येणार का परत? त्या माणसाचं मन आयुष्यभर त्याला स्वस्थ आयुष्य जगू देणार नाही, हीच मोठी शिक्षा नाही का?’ चाकाच्या खुर्चीत बसलेल्या मुलीला पंख फुटले आहेत, आणि ती आनंदाने उडू पाहते आहे, असं मुखपृष्ठावरचं चित्रच नसीमाची विजय कहाणी सांगून जातं. चित्राखाली सुंदर वाक्य आहे, ‘For us too the sky is the limit.’ संस्थेतले अपंग, त्यांच्या व्यथा नि कथा, पैसे मिळवण्यासाठी केलेली धडपड, कधी आलेले अपेक्षाभंगाचे दु:ख, तर कधी अचानक कुणी केलेली मदत यांनी पुस्तकाचा उत्तरार्ध व्यापला आहे. ही कहाणी आहे एका धीरोदत्त अपंग स्त्रीची. शब्दांचे फापटपसारे नाहीत. साधी, सोपी, सरळ भाषा म्हणूनच अंत:करणाला भिडते. आपण अशी पुस्तके वाचली तर आपल्यावरही नि:संशय काही उत्तम संस्कार आपोआप होतात. -प्रभा जोग ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 11-03-2006

    शारीरिक सक्षमतेपेक्षा मन:शक्ती... मनाची उभारी कित्येक पटीनं बलशाली असते. एकवेळ शरीर थकेल, पण मनानं जर उभारी धरली असेल तर शरीरही मनाला आपोआप साथ देईल. याचा प्रत्यत नसीमा हुरजूक यांचं ‘चाकाची खुर्ची’ हे आत्मचरित्र वाचताना येतो. गेली अनेक वर्षें चाकाच्ा खुर्चीला जखडलेल्या नसीमा दीदींची भरारी थक्क करणारी आहे. अपंग म्हणजे दुसऱ्याच्या दयेवर जगणारी ‘बिच्चारी’ व्यक्ती हे आपण गृहितच धरतो. पण इथे नसीमा दीदींच्या कार्यासमोर बाकीचा सगळा शरीराने सक्षम असणारा समाज ‘बिच्चारा’ वाटतो. त्या समाजातले असे अनेक घटक आहेत ज्यांनी त्यांच्या कार्यात अडथळे आणले, त्यांची हेटाळणी केली ते तर अगदी कीव करण्याइतके ‘बिच्चारे’ वाटतात. आपल्या चाकांच्या पायांनी यशोशिखरापर्यंत पोहोचणाऱ्या नसीमा दीदी जन्मापासून अपंग नव्हत्या. त्यांनी मुक्त बालपण, हुंदडणं, खेळणं सगळं अनुभवलंय. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत त्या अगदी तुमच्या-आमच्यासारख्या धडधाकट होत्या. आता इतकी वर्षं सक्षम आयुष्य जगल्यानंतर पुढे आलेल्या आजारपणाला तोंड देणं हे कमनशीब की निदान इतकी वर्षं तरी सक्षम आयुष्य जगायला मिळालं हे नशीब! हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी पाठीच्या दुखण्याचा इलाज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाल्या आणि अचानक कमरेखालील भागाचे चैतन्यच हरवून बसल्या. खेळ आणि नृत्यात कायम आघाडीवर असणाऱ्या नसीमा दीदींचे पाय त्यांची साथ सोडून गेले आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच अंधकारमय झालं. पुढे काय? हा भीषण प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळाले ते बाबूकाकांच्या रूपानं. त्यांच्याचसारखे बाबूकाकाही शरीरानं पॅराप्लेजिक होते, तरी त्यांचा उत्साह, त्यांच्यातील चैतन्य अनन्यसाधारण होते. त्यांना बघूनच नसीमा दीदींच्या मनानं उभारी धरली. आणि अपंगांना मदत करण्याची नवी दिशा त्यांना गवसली. या त्यांच्या कार्यात त्यांचे आई-वडील बहिणी-भाऊ या सगळ्यांची तर त्यांना कायम साथ मिळालीच. याशिवाय समाजातील इतर अनेकांचीही साथ मिळाली. या चांगल्या लोकांबरोबरच अनेक वाईट लोकही त्यांच्या मार्गात आले. चांगल्यांनी जर त्यांना आधार दिला असेल तर वाईट प्रवृत्तींनी त्यांना मानसिक खंबीरता दिली. समोर आल्या प्रसंगाला कणखरपणे समोर जाऊन ध्येयापर्यंत पोहोचायला शिकवलं. मग कोणी त्यांन असं रडत आयुष्य काढण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. प्रमोदसारखी स्वत:ची गरज संपली की, संस्थेकडे पाठ फिरवणारी स्वार्थी, मतलबी लोकं तर त्यांना असंख्य भेटली. माधवासारखा संस्थेच्या पैशावर चैन करणारा मुलगा भेटला. या सगळ्यांना मागे टाकत त्या पुढे जात राहिल्या. त्यांच्या ‘हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ड’ संस्थेने अनेकांना आधार दिला. जगण्याचं बळ दिलं. या आनंदासमोर ते चार वाईट अनुभव त्यांनी खिजगणतीतही धरू नयेत इतके ‘शुल्लक’ होते. अनेक अपंगांचे त्यांनी अनुभव सांगितले आहेत. त्यातला शैलेंद्र जोशींचा अनुभव तर चटका लावण्यासारखा आहे. अतिशय बुद्धिमान, कर्तृत्ववान माणूस डॉक्टरांच्या एका चुकीमुळे त्या माणसाचं सगळं आयुष्य बरबाद झालं. तीन-चार महिन्यांच्या कोमानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्याचं सगळं हिरावून घेतलं गेलं होतं. अगदी स्मरणशक्तीसुद्धा! अशा माणसाला आपलं जग निर्माण करण्यासाठी नसीमा दीदींनी मदतीचा हात दिला... हेच त्यांचं स्वप्न आहे, त्यांच्या जगण्याचं ध्येय आहे... अपंग आणि सुदृढांनी एकमेकांच्या मदतीनं आयुष्यात, समाजात उभं राहावं ही त्यांची इच्छा आहे. -गायत्री ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more