* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661798
  • Edition : 11
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS A GIRL OF 14 MAY BE 15 YEARS, LIKE ALL OTHERS OF HER AGE, BUSY IN PLAYING, DANCING AROUND, ENJOYING HER LIFE, FULL OF JOY AND ENTHUSIASM. ONE DAY, WITHOUT ANY SIGNAL, FALLS SICK WITH THE BACK PAIN AND IS STUCK TO THE WHEEL CHAIR AS A PARAPLEGIC PATIENT. IN THE BEGINNING, HER LIFE IS SHATTERED, BUT EVENTUALLY, SHE DECIDES TO OVERCOME HER ILLNESS, SHE EMERGES THROUGH IT AS A NEW PERSONALITY, NASIMA HURJUK. SHE IS A LADY WITH A VERY SENSITIVE MIND. TODAY, SHE AIMS ONLY AT THE BETTERMENT OF THE DISABLED. SHE TAKES CARE OF THE DISABLED; SHE GIVES THEM AFFECTION, HELPS TO MAKE LIFE TOLERABLE FOR THEM, MAKES THEM INDEPENDENT, AND AWAKES THEIR SELF-RESPECT. SHE SEES DREAMS, SHE HAS VISIONS BUT SHE DOES NOT FORGET THE FACTS OF LIFE. SHE PURSUES HER DREAMS WITH THE HELP OF HER WHEEL CHAIR. `HELPERS OF THE HANDICAPPED, KOLHAPUR`, IS THE INSTITUTION SHE HAS ESTABLISHED. IT COVERS MANY AREAS LIKE HOSTELS, TRAINING CENTERS, GAS AGENCY. TODAY, THE SPHERE OF HER ACTIVITIES IS INCREASING. SHE HAS BEEN FELICITATED BY MANY AWARDS; ONE IS THE `FI FOUNDATION`. THIS IS THE AUTOBIOGRAPHY OF A VERY STUBBORN LADY IN A NARRATIVE WAY AND IS FULL OF HONEST WORDS HAVING THE ABILITY TO PRESENT THE CLEAR PICTURE IN FRONT OF OUR MINDS.
वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी-बागडणारी-उत्साहानं सळसळणारी एक मुलगी... अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते...! सुरुवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते, पण नंतर त्यातूनच जन्माला येतं एक नवं व्यक्तिमत्त्व. नसीमा हुरजूक.अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. वास्तवाचं उचित भान ठेवून त्या स्वप्नं बघतात आणि मग ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बेभानपणे धावतात, आपल्या चाकाच्या खुर्चीतून... ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था, वसतिगृहं, प्रशिक्षण केंद्रं, गॅस एजन्सी... त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. ‘फाय फाउंंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. ओघवत्या शैलीतलं, निखळ प्रामाणिक, चित्रदर्शी, काळजाला भिडणारं...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarAvinash Jadhav

    संघर्ष म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर हे आत्मचरित्र जरूर वाचावे, प्रत्येक प्रसंग विचार करायला भाग पाडतो आपल्याला... गेल्या काही दिवसांपूर्वी वाचनासाठी एक आत्मचरित्र पर पुस्तक घेतलं. अतिशय थक्क करणारी कहाणी आपल्याला अपंगत्व आले पाहून न थकणारी, आजाराला जुमाणणारी ध्येय गाठण्यासाठी येईल त्या प्रसंगावर मात करणारी एक "स्त्री" आहे. यावर विश्वास बसणे कठीण आहे. हॉस्पिटलमध्ये आजार पणात आपल्या कमरे खाली मुंग्याचं थारोळ झालं आहे, हे कळल्यावर किती तो जीव कासावीस झाला असे, ते वाचूनच अंगावर शहारे आले. अपंगत्वासाठी अनेक प्रवास दौरे मान्यवरांच्या भेटी असे अनेक प्रसंग आणि त्यातील वर्ण हे अचंबित करतात. आपल्याला आलेल्या अपंगत्ववर मात करून दुसऱ्यासाठी जगणारी ती दुसरी "मदर तेरेसा" आहे हे म्हटलेलं सुध्दा वावग नाही. अपंग संस्थे मार्फत अनेकांना त्याच्या स्वाभिमानच आयुष्य जगता यावे आणि त्यांना धौर्य,चिकाटी, प्रेरणा मिळावी. आशा अनेक गोष्टींची उकल नेहमी बाळगून आहे. आशा अनेक अपंगांची "आई" एक "स्त्री" खूप साध्या व सोप्या भाषेत अनेक गोष्टी शिवून बळ देण्याचं काम करते. प्रत्येकाला आपल्या चाकाच्या खुर्चीतुन जग दाखवण्याचं काम करणाऱ्या स्वतःला अभिमानन जगायला लावणाऱ्या या चाकाच्या खुर्ची तुन एक नवीन उमेद,चिकाटी,बळ,प्रेरणा देणार आत्मचरित्र नसून "नवसंजीवनी" देणारं अमृत प्यालाच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी, बागडणारी, उत्साहानं सळसळणारी एक मुलगी... अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते!... सुरुवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते; पण नंतर त्यातूनच जन्माला येतंएक नवं व्यक्तिमत्त्व, नसीमा हुरजूक. अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र, गॅस एजन्सी... त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. ‘फाय फाऊंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 11-08-2002

    धीरोदात्त अपंग स्त्रीची कहाणी... कोल्हापूरच्या अपंग लेखिका नसीमा हुरजूक यांचे हे आत्मकथन. अपंगांनी लिहिलेली आत्मकथनं तसंच कार्य करणाऱ्यांना खूप उपयोगी पडतात. १९९९ मध्ये नसीमाने ‘चाकाची खुर्ची’ हे सदर कोल्हापूर ‘सकाळ’साठी लिहिलं. त्याचंच हे पुस्तकरूप नसीमा जन्मापासून अपंग नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत चांगली उंडारत होती. नृत्यात भाग घेत होती. खेळांमध्ये भाग घेत होती. अभ्यासात उत्तम, घरात भाऊ-बहिणी, आईवडील अशा कुटुंबात रंगलेली. पण अचानक पाठीत दुखू लागलं. दुखण्याचं मूळ स्पाईनल कॉर्ड्समध्ये होतं. ती कुणालाच दोष देत नाही, पण म्हणते, योग्य वेळी, योग्य निदान व योग्य उपचार झाले असते तर आज मी खेळाच्या वा नृत्याच्या क्षेत्रात असते; पण ते नाही झालं. कमरेखाली सर्व अंग लुळं पडलं आणि संवेदनाच नाहीशा झाल्या. तरीही न हरता देशात-परदेशात प्रवास केला. अपंगाच्या स्पर्धेत भाग घेतला. बक्षिसं मिळवली. अपंगांसाठी संस्था स्थापन केली, पण कुंपणानंच शेत खाल्लं. अपंग संस्थेचे पैसे येथे काम करणाऱ्यांनी खाल्ले. त्यांची साधनेसुद्धा विकली नि पैसे खाल्ले. पण न डगमगता ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड कोल्हापूर’ ही संस्था स्थापन केली. आज ही संस्था जोरात काम करत आहे. राजीव गांधी, मनोहर जोशी, मोरारजी देसाई या थोरामोठ्यांनी ही संस्था बघितली आणि मदत केली. हे पुस्तक लिहिताना पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर राहू द्याच, पण दु:खच कारंजासारखं उडत होतं. नसीमाच्या दुखण्याचं नाव पॅराप्लेजिक असं आहे. सतत मदतनीस जवळ असावा लागतो. तिच्या संस्थेसाठी तिचे बहीण-भाऊ, बहिणींचे यजमान व भावांच्या बायका आजही कार्यरत आहेत. सारे घरच काम समजून करतात. एकदा लंडनमध्ये ती तिच्या मदतनीस बाईबरोबर गेली होती. तर ती मदतनीस नसीमाला एकटं टाकून मौजमजा करायला निघून गेली. नसीमाचे तिच्याशिवाय खूप हाल झाले. मदतनीसाशिवाय या माणसांना जगणं अशक्य असतं. पण हीच माणसं माणूसपण अधिक जपतात. जागोजागी याची उदाहरणे आहेत. तिच्या वडिलांनाच त्याच्या हाताखालच्या माणसाने मारलं, पोस्टमार्टम करू दिलं नाही, पण तिची आई म्हणाली, ‘केलं सर्व, कोर्टात गेलो, जिंकलो, तरी तुमचे बाबा येणार का परत? त्या माणसाचं मन आयुष्यभर त्याला स्वस्थ आयुष्य जगू देणार नाही, हीच मोठी शिक्षा नाही का?’ चाकाच्या खुर्चीत बसलेल्या मुलीला पंख फुटले आहेत, आणि ती आनंदाने उडू पाहते आहे, असं मुखपृष्ठावरचं चित्रच नसीमाची विजय कहाणी सांगून जातं. चित्राखाली सुंदर वाक्य आहे, ‘For us too the sky is the limit.’ संस्थेतले अपंग, त्यांच्या व्यथा नि कथा, पैसे मिळवण्यासाठी केलेली धडपड, कधी आलेले अपेक्षाभंगाचे दु:ख, तर कधी अचानक कुणी केलेली मदत यांनी पुस्तकाचा उत्तरार्ध व्यापला आहे. ही कहाणी आहे एका धीरोदत्त अपंग स्त्रीची. शब्दांचे फापटपसारे नाहीत. साधी, सोपी, सरळ भाषा म्हणूनच अंत:करणाला भिडते. आपण अशी पुस्तके वाचली तर आपल्यावरही नि:संशय काही उत्तम संस्कार आपोआप होतात. -प्रभा जोग ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 11-03-2006

    शारीरिक सक्षमतेपेक्षा मन:शक्ती... मनाची उभारी कित्येक पटीनं बलशाली असते. एकवेळ शरीर थकेल, पण मनानं जर उभारी धरली असेल तर शरीरही मनाला आपोआप साथ देईल. याचा प्रत्यत नसीमा हुरजूक यांचं ‘चाकाची खुर्ची’ हे आत्मचरित्र वाचताना येतो. गेली अनेक वर्षें चाकाच्ा खुर्चीला जखडलेल्या नसीमा दीदींची भरारी थक्क करणारी आहे. अपंग म्हणजे दुसऱ्याच्या दयेवर जगणारी ‘बिच्चारी’ व्यक्ती हे आपण गृहितच धरतो. पण इथे नसीमा दीदींच्या कार्यासमोर बाकीचा सगळा शरीराने सक्षम असणारा समाज ‘बिच्चारा’ वाटतो. त्या समाजातले असे अनेक घटक आहेत ज्यांनी त्यांच्या कार्यात अडथळे आणले, त्यांची हेटाळणी केली ते तर अगदी कीव करण्याइतके ‘बिच्चारे’ वाटतात. आपल्या चाकांच्या पायांनी यशोशिखरापर्यंत पोहोचणाऱ्या नसीमा दीदी जन्मापासून अपंग नव्हत्या. त्यांनी मुक्त बालपण, हुंदडणं, खेळणं सगळं अनुभवलंय. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत त्या अगदी तुमच्या-आमच्यासारख्या धडधाकट होत्या. आता इतकी वर्षं सक्षम आयुष्य जगल्यानंतर पुढे आलेल्या आजारपणाला तोंड देणं हे कमनशीब की निदान इतकी वर्षं तरी सक्षम आयुष्य जगायला मिळालं हे नशीब! हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी पाठीच्या दुखण्याचा इलाज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाल्या आणि अचानक कमरेखालील भागाचे चैतन्यच हरवून बसल्या. खेळ आणि नृत्यात कायम आघाडीवर असणाऱ्या नसीमा दीदींचे पाय त्यांची साथ सोडून गेले आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच अंधकारमय झालं. पुढे काय? हा भीषण प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळाले ते बाबूकाकांच्या रूपानं. त्यांच्याचसारखे बाबूकाकाही शरीरानं पॅराप्लेजिक होते, तरी त्यांचा उत्साह, त्यांच्यातील चैतन्य अनन्यसाधारण होते. त्यांना बघूनच नसीमा दीदींच्या मनानं उभारी धरली. आणि अपंगांना मदत करण्याची नवी दिशा त्यांना गवसली. या त्यांच्या कार्यात त्यांचे आई-वडील बहिणी-भाऊ या सगळ्यांची तर त्यांना कायम साथ मिळालीच. याशिवाय समाजातील इतर अनेकांचीही साथ मिळाली. या चांगल्या लोकांबरोबरच अनेक वाईट लोकही त्यांच्या मार्गात आले. चांगल्यांनी जर त्यांना आधार दिला असेल तर वाईट प्रवृत्तींनी त्यांना मानसिक खंबीरता दिली. समोर आल्या प्रसंगाला कणखरपणे समोर जाऊन ध्येयापर्यंत पोहोचायला शिकवलं. मग कोणी त्यांन असं रडत आयुष्य काढण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. प्रमोदसारखी स्वत:ची गरज संपली की, संस्थेकडे पाठ फिरवणारी स्वार्थी, मतलबी लोकं तर त्यांना असंख्य भेटली. माधवासारखा संस्थेच्या पैशावर चैन करणारा मुलगा भेटला. या सगळ्यांना मागे टाकत त्या पुढे जात राहिल्या. त्यांच्या ‘हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ड’ संस्थेने अनेकांना आधार दिला. जगण्याचं बळ दिलं. या आनंदासमोर ते चार वाईट अनुभव त्यांनी खिजगणतीतही धरू नयेत इतके ‘शुल्लक’ होते. अनेक अपंगांचे त्यांनी अनुभव सांगितले आहेत. त्यातला शैलेंद्र जोशींचा अनुभव तर चटका लावण्यासारखा आहे. अतिशय बुद्धिमान, कर्तृत्ववान माणूस डॉक्टरांच्या एका चुकीमुळे त्या माणसाचं सगळं आयुष्य बरबाद झालं. तीन-चार महिन्यांच्या कोमानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्याचं सगळं हिरावून घेतलं गेलं होतं. अगदी स्मरणशक्तीसुद्धा! अशा माणसाला आपलं जग निर्माण करण्यासाठी नसीमा दीदींनी मदतीचा हात दिला... हेच त्यांचं स्वप्न आहे, त्यांच्या जगण्याचं ध्येय आहे... अपंग आणि सुदृढांनी एकमेकांच्या मदतीनं आयुष्यात, समाजात उभं राहावं ही त्यांची इच्छा आहे. -गायत्री ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more