B. D. KHER

About Author

Birth Date : 12/06/1917
Death Date : 21/06/2012


"B.D.KHER, WHO AUTHORED ABOUT 117 BOOKS DURING HIS LIFE TIME, WROTE HIS FIRST BOOK IN 1939. KHER LEFT MARATHI DAILY KESARI AS AN ASSOCIATE EDITOR AFTER 22 YEARS OF SERVICE. LATER, HE JOINED SAHYADRI AS THE EDITOR AND STAYED IN THAT POSITION FOR 10 YEARS. IN 1976, A JAPANESE FOUNDATION HAD INVITED HIM TO WRITE A NOVEL ON THE HIROSHIMA BOMBING INCIDENT. KHER RECEIVED AWARDS FOR HIS NOVELS LIKE ANANDBHAVAN, HASRE DUKKHA, HIROSHIMA, SAMAGRA LOKMANYA TILAK ETC. HE AUTHORED V D SAVARKARS BIOGRAPHY YADNYA. "

"भा.द. खेर यांचा जन्म अहमदनगरमधील कर्जत येथे झाला. ते वीस वर्षे दैनिक केसरीचे सहसंपादक आणि दहा वर्षे सह्याद्रीचे संपादक होते. समग्र टिळक व सावरकर साहित्य, यांचेही त्यांनी संपादन केले. आजवर त्यांची जवळपास शंभर लहान-मोठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चरित्रात्मक कादंबरी हा वाङ्‌मय प्रकार त्यांनीच प्रथम मराठीत आणला. त्यापैकी सावरकरांवरील यज्ञ, चाफेकर बंधूंवरील क्रांतिफुले, महाभारतावरील कल्पवृक्ष, झाशीच्या राणीवरील समर सौदामिनी, चार्ली चॅप्लिनवरील हसरे दु:ख, श्रीकृष्णावरील सारथी सर्वांचा या कादंबऱ्या विशेष गाजल्या. तसेच जपानमधील अणुसंहारावरील हिरोशिमा ही कादंबरीही गाजली. याशिवाय दि प्रिन्सेस, वादळवारा, अधांतरी ही भाषांतरित पुस्तकेही लोकप्रिय ठरली. त्यांनी पन्नास वर्षे अव्याहत लेखन केले. पुरस्कार : • आनंदभवन कादंबरीला १९७४ चे सोव्हिएत लॅन्ड नेहरू अ‍ॅवॉर्ड. • हिरोशिमाला १९८४ चे सोव्हिएत लॅन्ड नेहरू अ‍ॅवॉर्ड. • हिरोशिमाला १९८४ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार. • हसरे दु:खला १९९३ चा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार."
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 30 total
AAI MAZI AHE Rating Star
Add To Cart INR 200
ANAND JANMALA Rating Star
Add To Cart INR 140
25 %
OFF
B.D.KHER COMBO SET- 27 BOOKS Rating Star
Add To Cart INR 8315 INR 6236
BERLIN GANGELA MILALE Rating Star
Add To Cart INR 180
CHANAKYA Rating Star
Add To Cart INR 495
DIGVIJAY Rating Star
Add To Cart INR 550
GANDHARVAGATHA Rating Star
Add To Cart INR 360
GAON TETHE DEV Rating Star
Add To Cart INR 250
GUNJAN Rating Star
Add To Cart INR 240
KRANTICHYA VATEWAR Rating Star
Add To Cart INR 190
KRANTIKAAL Rating Star
Add To Cart INR 250
KRANTIPHULE Rating Star
Add To Cart INR 340
123

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more