* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I DARE
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177663556
  • Edition : 14
  • Publishing Year : FEBRUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 404
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :KIRAN BEDI COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
REVISED & ENLARGED EDITION WITH UNPUBLISHED MATERIAL AND BEHIND THE SCENES DETAILS OF THE CRUSADE AGAINST CORRUPTION: CHANGING PEOPLES DESITINY; THE SAGA OF INDIA`S FIRST AND THE HIGHEST RANKED WOMAN OFFICER IN THE INDIAN POLICE SERVICE WHO PIONEERED A HUMANE METHOD OF POLICING MARKED BY WILL POWER, DEVOTION TO DUTY, INNOVATION, COMPASSION AND, ABOVE ALL, A `NEVER SAY DIE` ATTITUDE .THE EYEWITNESS ACCOUNT FORTHRIGHT AND UNSPARING IN THIS FULLY REVISED AND UPDATED EDITION PROVIDES A WELL DOCUMENTED EXPOSURE OF THE SABOTAGE OF POLICE REFORMS (TO BE IMPLEMENTED AS PER A VERDICT OF THE SUPREME COURT OF INDIA) BY CERTAIN BUREAUCRATS AND BY SOME MEMBERS OF OWN SERVICE. THESE PERSONS ALSO BLOCKED HER APPOINTMENT AS POLICE COMMISSIONER. THIS KIND OF SABOTAGE WAS THE PROVERBIAL LAST STRAW THAT COMPELLED HER TO SHAKE OFF THE SHACKLES. AFTER A LONG AND REWARDING INNINGS (35 YEARS IN ALL),DECIDED TO MOVE ON. SHE BELIEVED THAT SHE COULD NO LONGER WORK WITH PERSONS WHO WERE KEEPING THE SYSTEM ENSLAVED. SHE WAS CLEAR IN HER MIND THAT SHE WAS NOT GOING TO BE SUBORDINATED BY THIS TEAM OF SABOTEURS. WHAT DIRECTION AND LEADERSHIP WOULD SUCH PERSONS PROVIDE EXCEPT TO CREATE PYGMIES AND STIFLE INITIATIVE AND CRUSH MORALE? SHE DID NOT WANT TO BE A PART OF SUCH DUBIOUS HISTORY AS SHE ASSERTS:MY SELF RESPECT, MY INNATE SENSE OF JUSTICE AND MY BELIEFS AND VALUES IN LIFE PROPELLED ME TO THROW OFF THE “YOKES” THAT WERE ALREADY OBSTRUCTING MY GROWTH AND I NOW MADE UP MY MIND TO SET MYSELF FREE AND BE A MASTER OF MY OWN TIME.THIS IS A NOHOLDSBARRED NARRATIVE PACKED WITH PUNCH, SPIRIT AND VITALITY.
या सुधारित आणि विस्तारित आवृत्तीत, नोकरशहा आणि अधिकारी यांनीच पोलीसयंत्रणेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या मार्गात अडथळे कसे निर्माण केले, याचे तपशीलवार कथन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु तसे न करता त्या व्यक्तींनी बेदी यांची पोलीस कमिशनरपदी नियुक्ती होऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले. या अडथळ्यांवर मात करत, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बेदी यांनी, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांसोबत काम न करण्याचे ठरवले. अशा लोकांसमोर मान तुकवायची नाही, असा त्यांनी निर्धार केला. पण खरेच या व्यक्तींनी विकासाच्या मार्गात अडथळेअडचणी निर्माण करून, मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करून काय मिळवले? असे अनेक प्रश्न मागे उरतातच. किरण बेदी म्हणतात, ‘माझा आत्मसन्मान, न्यायबुद्धी आणि माझा विश्वास व मूल्ये यांनी माझ्या आत्मविकासामध्ये अडथळे निर्माण करणायांवर मात करण्याची प्रेरणा मला दिली. म्हणूनच मी कोणाच्याही बंधनात न राहण्याचा निर्णय घेतला.’ प्रेरक, अंतर्दृष्टी देणारे आणि जागरूक करणारे कथन!
राज्य पुरस्कार १९९६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#9TH JUNE #I DARE #ITS ALWAYS POSSIBLE #WHAT WENT WRONG AND WHY #MAJAL DARMAJAL #AS I SEE STRIYANCHE SAKSHAMIKARAN #AS I SEE BHARTIYA POLICE SEVA #AS I SEE NETRUTVA AANI PRASHASAN #BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION #KIRAN BEDI #SUPRIYA VAKIL #आय डेअर #इट्स ऑलवेज पॉसिबल #व्हॉट वेंट राँग अ‍ॅण्ड व्हाय #मजल दरमजल #अ‍ॅज आय सी...-स्त्रियांचे सक्षमीकरण...#भारतीय पोलीस सेवा...#नेतृत्व आणि प्रशासन...#भ्रष्टाचाराशी लढा #किरण बेदी #सुप्रिया वकील
Customer Reviews
  • Rating StarRajendra Kavathekar

    एक पोलिस अधिकारी म्हणून आपल्या संपूर्ण कारकिर्दीत डॉ. किरण बेदी यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कामाची नेहमी नवीन क्षेत्रं स्विकारण्याची हिंमत दाखवली. पोलिसांनी केवळ गुन्हा शोधून काढण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय आणि सुधारणांना सर्वाधिक महत्त्व द्यवे, या आपल्या मताचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. सरकारमधील तसेच त्याबाहेरच्याही अनेक मोठमोठ्या प्रस्थांना त्यांनी हादरा दिला. आपल्या कामाला विशाल आणि व्यापक परिमाण देण्याची किरण बेदी यांची वृत्ती सत्तेवरील लोकांनाही दिसून आलेली होती. डॉ. किरण बेदी यांची अभिनव कार्यपद्धती आणि त्यातून निर्माण झालेली वाद-वादळे यांमुळेच सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांना सतत केंद्रस्थानी ठेवले. हे त्यांना त्यांच्या कामातील पारदर्शकतेचे मूल्यमापन वाटते, तर इतर काही जणांना मात्र तो प्रसिद्धीच्या हव्यास वाटतो. सामान्य जनतेला मात्र किरण बेदी `मसिहा` वाटतात. देशात तसेच परदेशातही अनेकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवला आहे.तथापी नाण्याची दुसरी बाजू म्‌हणून बघता, एखाद्याला असेही वाटू शकेल की त्यांच्याबद्दल प्रसृत झालेल्या त्यांच्या मूळच्याच आत्मप्रेमी प्रवृत्तीत ही आणखी एक भर आहे. किरण बेदी कोणत्याही पदावर काम करित असोत, कामावर रुजू होण्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढताच असतो. काही काळानंतर चर्या अशा काही वादळात सापडतात की त्यांचे ते पदच जाते. त्यांना दिल्लीच्या बाहेर पाठवले आले, त्यांनी मिझोराम सोडावे म्हणून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, गोव्यातून फरार म्हणून घोषित करण्यात आले आणि तिहार कारागृहाची सुरक्षिता धोक्यात आणली असा त्यांच्यावल आरोप देखील करण्यात आला. फक्त किरण बेदी `आय् डेअर!` असं म्हणू शकतात. त्या असं का म्हणू शकतात याचा शोध घेणारे हे पुस्तक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (YUVA) 24-01-2002

    हे वाचायलाच हवं... आजच्या युवा पिढीबद्दल कोणीही बोलायला लागलं, की अगदी हमखास ऐकू येणारी वाक्य, ‘आजच्या तरुणांना कसलाही आदर्श नाही. कसलीही मूल्य नाहीत’ त्याचं सगळं आयुष्य स्वत:पुरतं पाहण्यातच जातं. ‘देशप्रेम, समाजाची बांधिलकी या गोष्टी नव्या पिढीला शकवायला हव्यात. आमच्या वेळी, आमच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात वगैरे वगैरे वगैरे. कोणत्याही समाजाला स्वत:च्या तरुण पिढीबद्दल अगदी हेच म्हणायचं असतं आणि गमतीची गोष्ट की, त्यांच्या आधीची पिढी त्यांच्याबद्दलही अगदी हेच म्हणत असते. उदा. ‘चांगली सरकारी नोकरी सोडून त्या गांधीच्या मागे धावायला निघालेत’ किंवा ‘माझ्या हपिसात चिकटवून देतो म्हटलं तर नको म्हणताहेत चिरंजीव’ किंवा ‘पैशाची किंमत नाही’ वगैरे वगैरे वगैरे थोडक्यात काय, कोणत्याच तरुण पिढीला हे चुकलेलं नाही. आणि तरीही एका बाबतीत मात्र आपल्या आधीची पिढी आपल्यापेक्षा अधिक भाग्यवान होती हे मात्र कबूल करावंच लागेल. समोर आदर्श ठेवावी, ज्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा, ज्यांची मूल्यं, जीवननिष्ठ अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा अशी पहाडासारखी माणसं आपल्या आधीच्या पिढीला पाहायला मिळाली. आपल्याला आदर्शवत वाटतील अशी माणसं आज दुर्दैवाने फार थोडी आहेत. या अगदी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या माणसांमध्ये एक स्वयंप्रकाशित नाव ताबडतोब उठून दिसणारं आहे डॉ. किरण बेदी. किरण बेदी यांचं नाव आपण खूप वेळा, खूप ठिकाणी आणि वेगवेगळ्या संदर्भात ऐकतो. वृत्तपत्रांमधून त्यांच्याबद्दल खूप वाचतोही त्यांच्या ठोस वागण्यामुळे निर्माण झालेले वादही आपल्या माहितीचे आहेत, परंतु हे निर्भय, कणखर व्यक्तिमत्व घडलं तरी कसं याबद्दल मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. ही उणीव भरून काढणारं पुस्तक म्हणजे ‘आय डेअर’ हे किरण बेदीचं चरित्र. आशा कर्दळे यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अतिशय सुरेख अनुवाद केला आहे. आशा कर्दळे यांना किरण बेदी यांच्याबद्दल वाटत असलेला आदर, कौतुक, अभिमान हा या सरस अनुवादाच्या पाठीशी असलेला प्रमुख आधार आहे, असं लगेच जाणवतं. किरण बेदीचं बालपण घरातली कठीण आर्थिक परिस्थती आई-वडिलांनी दिलेलं भरपूर प्रेम, मूल्यं आणि उत्तेजन, आई-वडिलांनी मुलींमध्ये संक्रमित केलेल्या जबरदस्त महत्त्वकांक्षा या सर्व गोष्टींबद्दलची सखोल माहिती मिळाली की मग किरण बेदीचं तडफदार, बाणेदार व्यक्तिमत्त्व कसं कसं घडत गेलं हे आपल्याला समजू लागतं. घरातल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे किरणनं लहानपणीच ठरवलं, की आई-वडिलांनी आपल्यासाठी गुंतवलेल्या प्रत्येक पैशाचा जास्तीत जास्त उपयोग व्हायलाच हवा आणि मग तिनं शाळा-कॉलेजमधील टेनिस, एनसीसी, वादविवाद, भाषणे, नाटक, क्रीडास्पर्धा या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या हिरीरीनं भाग घेतला. किरणच्या शालेय जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पुढच्या आयुष्याचा नीट विचार करून आवश्यक तो विषय अभ्यासाला निवडता यावा म्हणून तिनं स्वत:च्या हिमतीवर शाळा बदलण्याचा घेतलेला निर्णय यामध्ये तिची जबाबदारीची जाणीव आणि त्या लहान वयातही पुढच्या आयुष्याचा तयार केलेला आराखडा हे तर जाणवतंच; शिवाय स्वत:च्या निर्णयक्षमतेचा आणि पुढच्या परिणामांना तोंड देण्याचा आत्मविश्वास हेही जाणवतं. गणवेषाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि किरणनं पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला. १९७२मध्ये आशियाई महिला विजेतेपद टेनिसमध्ये मिळवल्यानंतर हा खेळ कायम खेळता येणार नाही याची जाणीव ठेवून आपल्या व्यवसायाकडं लक्ष केंद्रित करण्याचा शहाणपणाही किरणनं दाखवला. पोलिसांसारख्या संपूर्णतया पुरुषी क्षेत्राच्या व्यवसायात प्रवेश घेतल्यानंतरचे किरणचे बरेवाईट अनुभव आणि त्या अनुभवांशी त्यांनी दिलेला सामना हे सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. किरण बेदीचा विवाह आणि सहजीवन हेही सर्वसामान्य सहजीवनापेक्षा खूपच वेगळं आहे. त्यांच्या पोलिससेवेतील अत्युच्च पदापर्यंतचा प्रवास, मिळालेले धकके आणि पारितोषिकं त्यांच्यावर केले गेलेले आरोप, खटले आणि असंख्य मान-सन्मान, तिहार तुरुंगातील त्यांचे अनुभव आणि प्रयोग या सर्व गोष्टींबद्दलची अतिशय रंजक आणि तरीही विचारांना चालना देणारी माहिती ‘आय डेअर’ या त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळते आणि आजच्या खुज्या कोत्या समाजातील फार थोड्या उत्तुंग व्यक्तिमत्वापैकी एकाची ओळख झाल्याचा आनंद वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more