* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983579
  • Edition : 4
  • Publishing Year : 1998
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 90
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS A COMMON PICTURE TODAY THAT THE THRONE BEARERS DO NOT INITIATE THE WRITERS. IT SEEMS THAT ALL THE GODS AND GODDESSES ARE GONE ON A LONG LEAVE. THIS LEAVES ONLY THE POOR, DOWNTRODDEN AND THE SCIENTIST TO BE THE SUBJECT.WHENEVER THESE POOR FIGHT WITH THEIR POVERTY IT IS INDEED A HEROIC DEED. THEY HAVE TO PAY FINE IF THEY LOSE THIS FIGHT. THIS FINE COMES IN THE FORM OF IMPRISONMENT OR DEATH. NEEDLESS TO SAY THAT A WRITER IS DRAWN TO THE PLACE WHERE SUCH FIGHT IS GOING ON. NOWADAYS, HE IS FINDING THE FIGHTING SPIRIT ONLY IN THE POOR.THIS BOOK IS A COMPILATION OF WORK BY MANY WRITERS AND ARTISTS, FROM ALL OVER THE WORLD.
‘आजचे राजे, महाराजे लेखकाला स्फुर्ती देणारे नाहीतच. देवदेवता तूर्त रजेवर आहेत. आज नायक व्हायला उरले आहेत – गरीब लोक आणि शास्त्रज्ञ. गरीब लोक जेव्हा लढा देतात, तेव्हा तो उपासमारीशी केलेला नायकी लढाच असतो. त्यात हरलं की दंड भरावा लागतो; तो तुरुंगवासाचा किंवा मरणाचा. साहजिकच लेखक लढाऊ-वृत्ती जिथं आढळते, तिथे ओढला जाणारच. आता ही लढाऊ-वृत्ती त्याला फक्त गोरगरीबांच्यातच आढळतेय....’ ...अशाच देश-विदेशातील लेखक, चित्रकार... अन् कलावंतांना अवगत करून देणारे ‘चरित्ररंग’.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating Starविनय वि.कुलकर्णी, नाशिक

    व्यंकटेश माडगुळकर यांचे *चरित्ररंग* हे पुस्तक देश-विदेशातील लेखक, चित्रकार आणि कलावंत यांची ओळख करुन देणारी व्यक्तिचित्रे आहेत. स्वतः लेखक एक प्रतिभावान चित्रकार, कथा, पटकथा, कादंबरी लेखक.निसर्गलेखन हा सुध्दा व्यंकटेश उर्फ तात्या माडगूळकर यांच्या आवडचा विषय होता. मारुती चितमपल्ली यांच्याबरोबर नागझिरा, नवेगाव बांध या जंगलात तात्यांनी भटकंती करून अप्रतिम निसर्गलेखन केले आहे.या अनुभवावर त्यांनी ` नागझिरा हे पुस्तक लिहीले व काझिरंगा अभयारण्याला भेट दिल्यावर त्यांनी जंगलातले दिवस हे पुस्तक लिहीले.बनगरवाडी या पुस्तकात ग्रामीण जीवनाचे सर्व अंतरंग येतात.सत्तांतर या पुस्तकात जंगलातील वानरांच्या टोळीतील अल्फा मेल होण्यासाठीच्या लढाया आणि माणसांचे राजकारण यातील परस्परसंबंध दाखविला आहे.त्यांना शिकारीची सुध्दा आवड होती.गदीमांसारख्या शब्दप्रभू भावाच्या सावलीत राहून सुद्धा आपली स्वतःची वेगळी ओळख असलेले लेखक आहेत. त्यामुळे त्यांनी निवडलेली व्यक्तिचित्रे ही लौकिकार्थाने अश्या सामान्य वाचकांसाठी आहे की ज्यांना हे विदेशी लेखक, चित्रकार यांची फार ओळख नसते व त्यांच्या साहित्य व कलेशी ते अनभिज्ञ असतात, एकूणच सध्याच्या वाचनशत्रु संस्कृतीत हे पुस्तक नव्या वाचकांना जागतिक साहित्य आणि कला यांच्याकडे कसे पहावे याची दृष्टी देतो. “एखाद्या लेखकाचे लेखन मनःपूर्वक वाचने म्हणजे सावकाशीने त्याची घेतलेली गाठभेटच असते" असे जेव्हा माडगुळकर *लिआम ओ फ्लहार्टी* या लेखकाच्या "गळ" या seagull पक्ष्याच्या कथेविषयी सांगतात तेव्हा ती कथा आपल्याकडल्या एखाद्या कोळीवाडयातच घडते असे वाटते आणि कळते की आपल्या भावना ह्या वैश्विक असतात. *लेखकाचे गाव लेखकाचे घर* या लेखात *जॉन स्टाइनबेक* या नोबेल आणि पुलित्जर पारितोषिके मिळवलेल्या अमेरीकन लेखकाचे "सालिनास" हे मूळ गाव आणि "कॅनरी रो" ही त्याची कर्मभूमी असलेल्या गावांना भेटी देण्याचा योग प्रस्तूत लेखकाला आला, स्टाइनबेक च्या कथांमध्ये आढळणाऱ्या पात्रांचे संदर्भ आपल्याला या गावातल्या स्टाइनबेक चे घर आणि परिसरातून दाखवतात. चित्रकार *विन्सेंट व्हॅन गॉग* यांच्या म्युझिअम च्या उद्घाटनानिमित्ताने "केनिथ विल्की" या पत्रकाराला व्हॅन गॉग वर एक लेख लिहायला सांगण्यात आले, त्या निमित्ताने कोणीही आजवर उजेडात न आणलेली माहिती केनिथला मिळाली आणि ती मिळवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न यावर "दी व्हॅन गॉग असाइनमेन्ट"हे पुस्तक लिहिले. त्यातल्या काही सुरस व चमत्कारिक प्रसंग या लेखात माडगुळकर यांनी उधृत केले आहेत. त्या वाचून आपल्या मनात विचार येतो की उपलब्ध चरित्रा पलीकडे सुद्धा एक चरित्र असते, आणि ते लिहिणारे लेखक ही दुर्मिळ असतात. “चित्रकार देउसकर "या लेखात मोठ्या कलावंतांची शासकीय धोरणांमुळे कशी परवड होते हे सांगितले आहे. “चांगला मित्र, चांगला लेखक" आणि शेवटचा प्रवास या लेखांमधुन माडगुळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने *कथाकथन* या त्या वेळी नविनच असलेल्या उपक्रमाचा पायारंभ कोणत्या कारणामुळे झाला हे सांगितले आहे. माडगुळकरांचा चित्रपट सृष्टीतील पटकथाकार आणि संवादलेखक आपल्याला शंकर घाणेकरांवर लिहिलेल्या "भल्याची दुनिया" आणि "मुक्काम पोस्ट ढेबेवाडी" या लेखांमधुन दिसतात. एकूणच एका कलासक्त लेखकाने लिहिलेली ही व्यक्तीचित्रे मनाचा ठाव घेतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.