* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHARITRARANG
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983579
  • Edition : 4
  • Publishing Year : 1998
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 90
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 41 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS A COMMON PICTURE TODAY THAT THE THRONE BEARERS DO NOT INITIATE THE WRITERS. IT SEEMS THAT ALL THE GODS AND GODDESSES ARE GONE ON A LONG LEAVE. THIS LEAVES ONLY THE POOR, DOWNTRODDEN AND THE SCIENTIST TO BE THE SUBJECT.WHENEVER THESE POOR FIGHT WITH THEIR POVERTY IT IS INDEED A HEROIC DEED. THEY HAVE TO PAY FINE IF THEY LOSE THIS FIGHT. THIS FINE COMES IN THE FORM OF IMPRISONMENT OR DEATH. NEEDLESS TO SAY THAT A WRITER IS DRAWN TO THE PLACE WHERE SUCH FIGHT IS GOING ON. NOWADAYS, HE IS FINDING THE FIGHTING SPIRIT ONLY IN THE POOR.THIS BOOK IS A COMPILATION OF WORK BY MANY WRITERS AND ARTISTS, FROM ALL OVER THE WORLD.
‘आजचे राजे, महाराजे लेखकाला स्फुर्ती देणारे नाहीतच. देवदेवता तूर्त रजेवर आहेत. आज नायक व्हायला उरले आहेत – गरीब लोक आणि शास्त्रज्ञ. गरीब लोक जेव्हा लढा देतात, तेव्हा तो उपासमारीशी केलेला नायकी लढाच असतो. त्यात हरलं की दंड भरावा लागतो; तो तुरुंगवासाचा किंवा मरणाचा. साहजिकच लेखक लढाऊ-वृत्ती जिथं आढळते, तिथे ओढला जाणारच. आता ही लढाऊ-वृत्ती त्याला फक्त गोरगरीबांच्यातच आढळतेय....’ ...अशाच देश-विदेशातील लेखक, चित्रकार... अन् कलावंतांना अवगत करून देणारे ‘चरित्ररंग’.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating Starविनय वि.कुलकर्णी, नाशिक

    व्यंकटेश माडगुळकर यांचे *चरित्ररंग* हे पुस्तक देश-विदेशातील लेखक, चित्रकार आणि कलावंत यांची ओळख करुन देणारी व्यक्तिचित्रे आहेत. स्वतः लेखक एक प्रतिभावान चित्रकार, कथा, पटकथा, कादंबरी लेखक.निसर्गलेखन हा सुध्दा व्यंकटेश उर्फ तात्या माडगूळकर यांच्या आवडचा विषय होता. मारुती चितमपल्ली यांच्याबरोबर नागझिरा, नवेगाव बांध या जंगलात तात्यांनी भटकंती करून अप्रतिम निसर्गलेखन केले आहे.या अनुभवावर त्यांनी ` नागझिरा हे पुस्तक लिहीले व काझिरंगा अभयारण्याला भेट दिल्यावर त्यांनी जंगलातले दिवस हे पुस्तक लिहीले.बनगरवाडी या पुस्तकात ग्रामीण जीवनाचे सर्व अंतरंग येतात.सत्तांतर या पुस्तकात जंगलातील वानरांच्या टोळीतील अल्फा मेल होण्यासाठीच्या लढाया आणि माणसांचे राजकारण यातील परस्परसंबंध दाखविला आहे.त्यांना शिकारीची सुध्दा आवड होती.गदीमांसारख्या शब्दप्रभू भावाच्या सावलीत राहून सुद्धा आपली स्वतःची वेगळी ओळख असलेले लेखक आहेत. त्यामुळे त्यांनी निवडलेली व्यक्तिचित्रे ही लौकिकार्थाने अश्या सामान्य वाचकांसाठी आहे की ज्यांना हे विदेशी लेखक, चित्रकार यांची फार ओळख नसते व त्यांच्या साहित्य व कलेशी ते अनभिज्ञ असतात, एकूणच सध्याच्या वाचनशत्रु संस्कृतीत हे पुस्तक नव्या वाचकांना जागतिक साहित्य आणि कला यांच्याकडे कसे पहावे याची दृष्टी देतो. “एखाद्या लेखकाचे लेखन मनःपूर्वक वाचने म्हणजे सावकाशीने त्याची घेतलेली गाठभेटच असते" असे जेव्हा माडगुळकर *लिआम ओ फ्लहार्टी* या लेखकाच्या "गळ" या seagull पक्ष्याच्या कथेविषयी सांगतात तेव्हा ती कथा आपल्याकडल्या एखाद्या कोळीवाडयातच घडते असे वाटते आणि कळते की आपल्या भावना ह्या वैश्विक असतात. *लेखकाचे गाव लेखकाचे घर* या लेखात *जॉन स्टाइनबेक* या नोबेल आणि पुलित्जर पारितोषिके मिळवलेल्या अमेरीकन लेखकाचे "सालिनास" हे मूळ गाव आणि "कॅनरी रो" ही त्याची कर्मभूमी असलेल्या गावांना भेटी देण्याचा योग प्रस्तूत लेखकाला आला, स्टाइनबेक च्या कथांमध्ये आढळणाऱ्या पात्रांचे संदर्भ आपल्याला या गावातल्या स्टाइनबेक चे घर आणि परिसरातून दाखवतात. चित्रकार *विन्सेंट व्हॅन गॉग* यांच्या म्युझिअम च्या उद्घाटनानिमित्ताने "केनिथ विल्की" या पत्रकाराला व्हॅन गॉग वर एक लेख लिहायला सांगण्यात आले, त्या निमित्ताने कोणीही आजवर उजेडात न आणलेली माहिती केनिथला मिळाली आणि ती मिळवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न यावर "दी व्हॅन गॉग असाइनमेन्ट"हे पुस्तक लिहिले. त्यातल्या काही सुरस व चमत्कारिक प्रसंग या लेखात माडगुळकर यांनी उधृत केले आहेत. त्या वाचून आपल्या मनात विचार येतो की उपलब्ध चरित्रा पलीकडे सुद्धा एक चरित्र असते, आणि ते लिहिणारे लेखक ही दुर्मिळ असतात. “चित्रकार देउसकर "या लेखात मोठ्या कलावंतांची शासकीय धोरणांमुळे कशी परवड होते हे सांगितले आहे. “चांगला मित्र, चांगला लेखक" आणि शेवटचा प्रवास या लेखांमधुन माडगुळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने *कथाकथन* या त्या वेळी नविनच असलेल्या उपक्रमाचा पायारंभ कोणत्या कारणामुळे झाला हे सांगितले आहे. माडगुळकरांचा चित्रपट सृष्टीतील पटकथाकार आणि संवादलेखक आपल्याला शंकर घाणेकरांवर लिहिलेल्या "भल्याची दुनिया" आणि "मुक्काम पोस्ट ढेबेवाडी" या लेखांमधुन दिसतात. एकूणच एका कलासक्त लेखकाने लिहिलेली ही व्यक्तीचित्रे मनाचा ठाव घेतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more