* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HUBEHUB
  • Availability : Available
  • ISBN : 9878184985085
  • Edition : 11
  • Publishing Year : 1960
  • Weight : 125.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BABAN COULD MIMIC ANYONE PERFECTLY (‘HUBEHOOB’), BUT FINALLY HIS LIFE ITSELF BECAME AN IMITATION… THIS MAN IN HIS SELFISHNESS, AND STRUGGLE TO HAVE A SQUARE MEAL MADE GOD SWEAT (‘GHAAM’)! MEET TATYA MHATARA WHO LOVED DUMB ANIMALS WITH HIS HEART, MORE THAN HE LOVED HIS OWN LIFE… ANNA BHAGWAT – THE MAN WHO MADE IT HIS MISSION TO TEACH A LESSON TO EVERY CORRUPT REVENUE OFFICIAL (‘TAGAI’) – A LESSON HE WOULD NEVER FORGET… ABA HAD A HABIT OF SPENDING HIS LUNCHTIME (‘JEVANVEL’) UNDER THE NEEM TREE AND HE WAS RESPONSIBLE FOR A LOT OF INCIDENTS – BOTH GOOD, AND BAD… WHATEVER THE MERITS OR OTHERWISE, OF A CASE – IF DIGUANNA WAS A WITNESS (‘SAKSHIDAAR’), A VERDICT WAS A CERTAINTY! EXPERIENCE THE VAGARIES, AND VARIETY OF HUMAN NATURE IN ‘DA MA’S’ INIMITABLE STYLE!
‘हुबेहूब’ नक्कल करणाया बबनचे वास्तविक आयुष्यही नकलेसारखेच झाले... पोटाची खळगी भरण्यासाठी स्वार्थी माणसाने देवालाही ‘घाम’ फोडायला लावला... स्वत:च्या जिवापेक्षाही मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करणारा तात्या म्हातारा... ‘तगई’साठी पैसे खाणाया प्रत्येक माणसाला जन्मभराची अद्दल घडविणारा अण्णा भागवत... ‘जेवणवेळ’ झाली की, लिंबाखाली बसणाया आबामुळे कितीतरी चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या... केस कोणती अन् कशीही असू दे; दिगुअण्णा ‘साक्षीदार’ असले की, निकाल लागलाच म्हणून समजा... मानवी स्वभावाच्या अशा नाना कळा... अनुभवा द.मांच्या खुमासदार शैलीत!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HUBEHUB #D. #M #MIRASDAR #KATHASANGRAH #GHAM #JODI #TAGAI #SAKSHIDAR #JEWANAVEL #EK #SUKYA #NHAVI #YACHI #GOST #NAKATE #BHUT #TANK #DHADPADNARI #MULE #हुबेहूब #द. #मा. #मिरासदार #कथासंग्रह #घाम #जोडी #तगई #साक्षीदार #जेवणवेळ #एक #सुक्या #न्हावी #ह्याची #गोष्ट #नकटे #भूत #टांक #धडपडणारी #मुले
Customer Reviews
  • Rating StarKrishna Diwate

    विनोदी लेखक द. मा. मिरासदार लिखित विनोदी कथा संग्रह हुबेहूब. दत्तात्रय मारुती मिरासदार यांचा जन्म अकलूज येथला. त्यांचे शिक्षण पंढरपूर आणि पुणे येथे झाले. असे म्हणतात की मराठीत विनोदी गद्यकाव्य लिहिणारे वि.रा. भाटकर हे म्हणजे द.मा. मिरासदारच होते, किंहुना वि.रा. भाटकर हे त्यांचेच टोपणनाव होते. अत्यंत इरसाल गांवरान भाषेत खुसखुशीत विनोद निर्माण करणारे मिरासदार सर हे एक बहू आयामी व्यक्तिमत्व! भुताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी ,माझ्या बापाची पेंड, भोकरवाडीतील रसवंतीगृह हे त्यांचे सुप्रसिद्ध विनोदी कथा संग्रह त्याव्यतिरिक्त अनेक लेख आणि ललित लेख संग्रह त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. शिक्षक,प्राध्यापक अशा निरनिराळ्या पेशांमध्ये रममाण होत असताना लेखनाची कास त्यांनी सोडली नाही. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या सोबत सातत्याने *कथा कथनाचे* कार्यक्रम त्यांनी केले. *व्यंकुची शिकवणी,भुताचा जन्म,माझी पहिली चोरी,शिवाजीचे हस्ताक्षर* या त्यांच्या कथांनी महाराष्ट्राला अगदी खळाळून हसायला भाग पाडले. कथाकथन त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यात तसेच परदेशात पण यशस्वीपणे केले. २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. एक डाव भुताचा, ठकास महाठक या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे पटकथा लेखन यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द.मा. मिरासदारांनी `भुताची गोष्ट` ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. परळी येथे भरलेल्या ७१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. एकूण दहा कथा असलेला त्यांचा हा विनोदी कथा संग्रह असला तरी त्याला कारुण्याची किनार आहे. गावाकडल्या लोकांच्या स्वभावाचा बारकाईने केलेला अभ्यास, त्यांच्या लकबी शहरात घडत असलेल्या घडामोडिंसोबत स्वताला रीलेट करायचा प्रयत्न या साऱ्यांचा आरसा आपल्याला या कथांमध्ये बघायला आणि अनुभवायला मिळतो. *हुबेहूब* *घाम* *जोडी* *तगई* *साक्षीदार* *जेवणवेळ* *एक सुक्या न्हावी त्याची गोष्ट* *नकटे भूत* *टांक* *धडपडणारी मुले* या दहा गोष्टीं मधून गावातल्या निरनिराळ्या गावकऱ्यांच्या कथा आपल्या समोर येतात. आणि मध्येच ओठावर हसू आणताना डोळ्यांच्या कडांना किंचित पाणी येते आणि मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचे मनस्वी दर्शन आपल्याला या शंभर पानांमधून घडत राहाते. *हुबेहूब* गावात नकला करण्यासाठी प्रसिद्ध असलेला बबन, अगदी कोणाचीही नक्कल उत्तम वठवत असतो. आलवण घातलेल्या स्त्रीची, वारकऱ्यांची अशा वेगवेगळ्या माणसांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या बबनचे आयुष्य नकलेसारखेच होऊन जाते. अगदी लांडगा आला रे आला या गोष्टीची आठवण ही कथा वाचताना येते. *घाम* कथेत गावातल्या मारुतीला घाम यायला लागल्यावर लोक कोणत्या तऱ्हेने प्रतिक्रिया देतात हे दमा मोठ्या रंजक पद्धतीने सांगतात. गावातल्या घडणाऱ्या बारीक सारीक घटना त्यांचे गावाच्या जीवनावर होणारे परिणाम, उमटणारे पडसाद, प्रत्येक माणसाचे वेगळेपण, विचार करायची पद्धत हे एव्हढे परिणामकारक रीतीने मांडले आहे की घटना समोरच घडत आहेत असे वाटायला लागते आणि आपण कथेचाच एक भाग होऊन जातो. पोटासाठी देवालाही घाम फोडायला लावणाऱ्या माणसाचे एक वेगळे रूप समोर येते *जोडी* या कठेत एकीकडे देवाला घाम फोडणारा माणूस आपल्या जनावरं वर प्राणा पलीकडे प्रेम करताना दिसतो. म्हणून पैशांची आत्यंतिक निकड असूनही दोघेही बापलेक बाजारात बैलांची जोडी विकायला बसतात पण जनावरांच्या जिव्हाळ्या पोटी पराकोटीच्या अडचणीमध्ये सुद्धा जनावरे विकू शकत नाहीत. लेकीचे लग्न ठरवताना बाप जसा सासरची माणसे आजमावून बघतो तसा म्हातारा तात्या गिऱ्हाइकाला कुठलेही व्यसन नाही म्हणता मालक चिमूटभर पान तंबाखू साठी पण विश्रांती घेणार नाही आणि आपल्या बैलांना राबवून घेईल या काळजीपोटी अपेक्षित सौदा होऊन पण बैल विकत नाही. *तगाई* सरकारी कार्यालयात पैसे खाणे अगदी सार्वत्रिक अनुभव! थोडा का होईना पैसा हाती येईल या आशेवर तलाठी,तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्या कचेरीची पायरी चढून मिळालेल्या शंभरातले सत्तर खाऊ घालून तीस रुपये पदरी पाडून घेणारा केविलवाणा शेतकरी मनाला पिळ पाडतो. पण या साऱ्या खाबुना वठणीवर आणणारा अण्णा भागवत ओलांवलेल्या डोळ्यांना किंचित का होईना हसवून जातो. *जेवणवेळ* शेताच्या बांधावर बसून गावाच्या पंचाईती करणारा परमार्थी आबा माणसामधला निराळाच पैलू दाखवतो. हा परमार्थ करता करता कधी कधी हा स्वता उपाशी पण राहातो. पण यातूनच जगण्याची चांगली मूल्ये मनाला आधार देऊ जातात, आणि कुठेतरी खळखळणारा हा माणुसकीचा इवलासा जरा जग किती सुंदर आहे याचा दाखला देऊन जातो. *साक्षीदार* कोर्ट कज्जे, न्यायालय हे एक निराळेच जग आहे. म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कितीही खरे असले तरी कधी ना कधी ही वेळ कोणावर तरी येतेच आणि मग गावात असणारा एक कायमचा इरसाल साक्षीदार पैसे घेऊन केस कशी जिंकून देतो हे पुस्तकात वाचणे उत्तम. पण मग न्याय, न्याय प्रक्रिया यातले खरे किती आणि खोटे किती हा प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. *नकटे भूत* ही भोकरवाडी मध्ये घडणारी गोष्ट. भोकरवाडी म्हटले कि आपसूक नाना चेंगट, रामा न्हावी, शिवा जमदाडे, गणा मास्तर ,बाबू पैलवान आणि आनशी ही सारी बेरकी, इरसाल पात्रे डोळ्यांसामोर येतात. आनशी वर जीव टाकणारा बारकासा नाना चेंगट, त्याला या ना त्या कारणाने झोडपून काढणारा बाबू, पेपर वाचून गावाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणारे गणा मास्तर याना प्रत्यक्ष न बघताही या प्रत्येकाबाबत एक जिव्हाळा निर्माण होतो. आणि अगदी गावाची चावडी डोळ्यांसामोर उभी राहाते. या गावात येणारे नकट्या रावळाचे भूत बाबूला घोळसून काढते पण आपल्याला मात्र नक्कीच हसवून जाते. *टांक* कथेत अत्यंत हुशार तरीही नाठाळ बादशाह सोनार म्हातारीला हातोहात फसवतो आणि तीही सहजगत्या फसते आणि शेवटी हातात आलेल्या पैशाचा घरासाठी विनियोग करायचं सोडून बादशाह सोनार आम्ही नरहर सोनारांच्या वंशाचे म्हणून आपली पावले बासुंदीच्या दुकानाकडे वळवतो. अतिरेक कशाचाही असो ते शेवटी व्यसनाच मग ते खायचे असो कि प्यायचे पण त्यांच्या विळख्यातून सहजी सुटका नाही हे या कथेतून उद्धृत होते आणि भोळेपणा आणि इरसालकी या दोन स्वभावांचे मनोज्ञ दर्शन घडते. पुन्हा एकदा म्हातारी फसली तरी मन बादशहाच्या चाणाक्ष स्वाभावाला दाद दिल्याशिवाय राहात नाही. शेवटच्या *धडपडणारी मुले* या कथेमध्ये दोघ चौघ पोर चोरून बिडी ओढायचा प्रयत्न करतात त्यांचे ते बालसुलभ वागणे त्यावर मोठ्यांच्या प्रतिक्रिया आणि समाजात शेवटी बळी तो कानपिळी हा न्याय रास्त आहे हे दाखवत पुस्तक संपते. द. मा. मिरासदार यांच्या अचूक निरीक्षणशक्तीने सर्व व्यक्ति ते इतक्या चपखल पणाने रंगावतात कि हे नाट्य आपल्या अवती भोवती घडत असल्याचा भास होतो आणि एका निखळ वेगळ्याच आनंदाचा अनुभव त्यांच्या पुस्तकातून वाचकाला मिळतो हीच त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. हसणे जितके सोपे सखये हासवणे ते अवघड ग लपवून पाणी नयन मधले सुखा शोधणे मुश्किल ग ||१|| मीच मला बघ विदूषक करतो मुखवटा धारण करतो ग माझ्या मधले व्यंग पाहुनी मीच स्वताला हसतो ग ||२|| शब्द संपदा न्यारी घेऊन दुख कमी मी करतो ग विसंगतीतून सुसंगती मी जगण्यामध्ये बघतो ग ||३|| खळी पाहता तूझिया गाली आसवास मी त्यजितो ग दुखाला मी भिडवून डोळे सुख जगाला देतो ग || ४|| निर्मळ माझे मन हे आता निर्मळ सारे करतो ग निखळ विनोद माझा देऊन जगास मी हसवितो ग || ५|| इति रसिकावाणी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो