* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HUBEHUB
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985085
  • Edition : 12
  • Publishing Year : 1960
  • Weight : 125.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BABAN COULD MIMIC ANYONE PERFECTLY (‘HUBEHOOB’), BUT FINALLY HIS LIFE ITSELF BECAME AN IMITATION… THIS MAN IN HIS SELFISHNESS, AND STRUGGLE TO HAVE A SQUARE MEAL MADE GOD SWEAT (‘GHAAM’)! MEET TATYA MHATARA WHO LOVED DUMB ANIMALS WITH HIS HEART, MORE THAN HE LOVED HIS OWN LIFE… ANNA BHAGWAT – THE MAN WHO MADE IT HIS MISSION TO TEACH A LESSON TO EVERY CORRUPT REVENUE OFFICIAL (‘TAGAI’) – A LESSON HE WOULD NEVER FORGET… ABA HAD A HABIT OF SPENDING HIS LUNCHTIME (‘JEVANVEL’) UNDER THE NEEM TREE AND HE WAS RESPONSIBLE FOR A LOT OF INCIDENTS – BOTH GOOD, AND BAD… WHATEVER THE MERITS OR OTHERWISE, OF A CASE – IF DIGUANNA WAS A WITNESS (‘SAKSHIDAAR’), A VERDICT WAS A CERTAINTY! EXPERIENCE THE VAGARIES, AND VARIETY OF HUMAN NATURE IN ‘DA MA’S’ INIMITABLE STYLE!
‘हुबेहूब’ नक्कल करणाऱ्या बबनचे वास्तविक आयुष्यही नकलेसारखेच झाले... पोटाची खळगी भरण्यासाठी स्वार्थी माणसाने देवालाही ‘घाम’ फोडायला लावला... स्वत:च्या जिवापेक्षाही मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करणारा तात्या म्हातारा... ‘तगई’साठी पैसे खाणाया प्रत्येक माणसाला जन्मभराची अद्दल घडविणारा अण्णा भागवत... ‘जेवणवेळ’ झाली की, लिंबाखाली बसणाया आबामुळे कितीतरी चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या... केस कोणती अन् कशीही असू दे; दिगुअण्णा ‘साक्षीदार’ असले की, निकाल लागलाच म्हणून समजा... मानवी स्वभावाच्या अशा नाना कळा... अनुभवा द.मांच्या खुमासदार शैलीत!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HUBEHUB #D. #M #MIRASDAR #KATHASANGRAH #GHAM #JODI #TAGAI #SAKSHIDAR #JEWANAVEL #EK #SUKYA #NHAVI #YACHI #GOST #NAKATE #BHUT #TANK #DHADPADNARI #MULE #हुबेहूब #द. #मा. #मिरासदार #कथासंग्रह #घाम #जोडी #तगई #साक्षीदार #जेवणवेळ #एक #सुक्या #न्हावी #ह्याची #गोष्ट #नकटे #भूत #टांक #धडपडणारी #मुले
Customer Reviews
  • Rating StarKrishna Diwate

    विनोदी लेखक द. मा. मिरासदार लिखित विनोदी कथा संग्रह हुबेहूब. दत्तात्रय मारुती मिरासदार यांचा जन्म अकलूज येथला. त्यांचे शिक्षण पंढरपूर आणि पुणे येथे झाले. असे म्हणतात की मराठीत विनोदी गद्यकाव्य लिहिणारे वि.रा. भाटकर हे म्हणजे द.मा. मिरासदारच होते, किंहुना वि.रा. भाटकर हे त्यांचेच टोपणनाव होते. अत्यंत इरसाल गांवरान भाषेत खुसखुशीत विनोद निर्माण करणारे मिरासदार सर हे एक बहू आयामी व्यक्तिमत्व! भुताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी ,माझ्या बापाची पेंड, भोकरवाडीतील रसवंतीगृह हे त्यांचे सुप्रसिद्ध विनोदी कथा संग्रह त्याव्यतिरिक्त अनेक लेख आणि ललित लेख संग्रह त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. शिक्षक,प्राध्यापक अशा निरनिराळ्या पेशांमध्ये रममाण होत असताना लेखनाची कास त्यांनी सोडली नाही. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या सोबत सातत्याने *कथा कथनाचे* कार्यक्रम त्यांनी केले. *व्यंकुची शिकवणी,भुताचा जन्म,माझी पहिली चोरी,शिवाजीचे हस्ताक्षर* या त्यांच्या कथांनी महाराष्ट्राला अगदी खळाळून हसायला भाग पाडले. कथाकथन त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यात तसेच परदेशात पण यशस्वीपणे केले. २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. एक डाव भुताचा, ठकास महाठक या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे पटकथा लेखन यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द.मा. मिरासदारांनी `भुताची गोष्ट` ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. परळी येथे भरलेल्या ७१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. एकूण दहा कथा असलेला त्यांचा हा विनोदी कथा संग्रह असला तरी त्याला कारुण्याची किनार आहे. गावाकडल्या लोकांच्या स्वभावाचा बारकाईने केलेला अभ्यास, त्यांच्या लकबी शहरात घडत असलेल्या घडामोडिंसोबत स्वताला रीलेट करायचा प्रयत्न या साऱ्यांचा आरसा आपल्याला या कथांमध्ये बघायला आणि अनुभवायला मिळतो. *हुबेहूब* *घाम* *जोडी* *तगई* *साक्षीदार* *जेवणवेळ* *एक सुक्या न्हावी त्याची गोष्ट* *नकटे भूत* *टांक* *धडपडणारी मुले* या दहा गोष्टीं मधून गावातल्या निरनिराळ्या गावकऱ्यांच्या कथा आपल्या समोर येतात. आणि मध्येच ओठावर हसू आणताना डोळ्यांच्या कडांना किंचित पाणी येते आणि मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचे मनस्वी दर्शन आपल्याला या शंभर पानांमधून घडत राहाते. *हुबेहूब* गावात नकला करण्यासाठी प्रसिद्ध असलेला बबन, अगदी कोणाचीही नक्कल उत्तम वठवत असतो. आलवण घातलेल्या स्त्रीची, वारकऱ्यांची अशा वेगवेगळ्या माणसांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या बबनचे आयुष्य नकलेसारखेच होऊन जाते. अगदी लांडगा आला रे आला या गोष्टीची आठवण ही कथा वाचताना येते. *घाम* कथेत गावातल्या मारुतीला घाम यायला लागल्यावर लोक कोणत्या तऱ्हेने प्रतिक्रिया देतात हे दमा मोठ्या रंजक पद्धतीने सांगतात. गावातल्या घडणाऱ्या बारीक सारीक घटना त्यांचे गावाच्या जीवनावर होणारे परिणाम, उमटणारे पडसाद, प्रत्येक माणसाचे वेगळेपण, विचार करायची पद्धत हे एव्हढे परिणामकारक रीतीने मांडले आहे की घटना समोरच घडत आहेत असे वाटायला लागते आणि आपण कथेचाच एक भाग होऊन जातो. पोटासाठी देवालाही घाम फोडायला लावणाऱ्या माणसाचे एक वेगळे रूप समोर येते *जोडी* या कठेत एकीकडे देवाला घाम फोडणारा माणूस आपल्या जनावरं वर प्राणा पलीकडे प्रेम करताना दिसतो. म्हणून पैशांची आत्यंतिक निकड असूनही दोघेही बापलेक बाजारात बैलांची जोडी विकायला बसतात पण जनावरांच्या जिव्हाळ्या पोटी पराकोटीच्या अडचणीमध्ये सुद्धा जनावरे विकू शकत नाहीत. लेकीचे लग्न ठरवताना बाप जसा सासरची माणसे आजमावून बघतो तसा म्हातारा तात्या गिऱ्हाइकाला कुठलेही व्यसन नाही म्हणता मालक चिमूटभर पान तंबाखू साठी पण विश्रांती घेणार नाही आणि आपल्या बैलांना राबवून घेईल या काळजीपोटी अपेक्षित सौदा होऊन पण बैल विकत नाही. *तगाई* सरकारी कार्यालयात पैसे खाणे अगदी सार्वत्रिक अनुभव! थोडा का होईना पैसा हाती येईल या आशेवर तलाठी,तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्या कचेरीची पायरी चढून मिळालेल्या शंभरातले सत्तर खाऊ घालून तीस रुपये पदरी पाडून घेणारा केविलवाणा शेतकरी मनाला पिळ पाडतो. पण या साऱ्या खाबुना वठणीवर आणणारा अण्णा भागवत ओलांवलेल्या डोळ्यांना किंचित का होईना हसवून जातो. *जेवणवेळ* शेताच्या बांधावर बसून गावाच्या पंचाईती करणारा परमार्थी आबा माणसामधला निराळाच पैलू दाखवतो. हा परमार्थ करता करता कधी कधी हा स्वता उपाशी पण राहातो. पण यातूनच जगण्याची चांगली मूल्ये मनाला आधार देऊ जातात, आणि कुठेतरी खळखळणारा हा माणुसकीचा इवलासा जरा जग किती सुंदर आहे याचा दाखला देऊन जातो. *साक्षीदार* कोर्ट कज्जे, न्यायालय हे एक निराळेच जग आहे. म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कितीही खरे असले तरी कधी ना कधी ही वेळ कोणावर तरी येतेच आणि मग गावात असणारा एक कायमचा इरसाल साक्षीदार पैसे घेऊन केस कशी जिंकून देतो हे पुस्तकात वाचणे उत्तम. पण मग न्याय, न्याय प्रक्रिया यातले खरे किती आणि खोटे किती हा प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. *नकटे भूत* ही भोकरवाडी मध्ये घडणारी गोष्ट. भोकरवाडी म्हटले कि आपसूक नाना चेंगट, रामा न्हावी, शिवा जमदाडे, गणा मास्तर ,बाबू पैलवान आणि आनशी ही सारी बेरकी, इरसाल पात्रे डोळ्यांसामोर येतात. आनशी वर जीव टाकणारा बारकासा नाना चेंगट, त्याला या ना त्या कारणाने झोडपून काढणारा बाबू, पेपर वाचून गावाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणारे गणा मास्तर याना प्रत्यक्ष न बघताही या प्रत्येकाबाबत एक जिव्हाळा निर्माण होतो. आणि अगदी गावाची चावडी डोळ्यांसामोर उभी राहाते. या गावात येणारे नकट्या रावळाचे भूत बाबूला घोळसून काढते पण आपल्याला मात्र नक्कीच हसवून जाते. *टांक* कथेत अत्यंत हुशार तरीही नाठाळ बादशाह सोनार म्हातारीला हातोहात फसवतो आणि तीही सहजगत्या फसते आणि शेवटी हातात आलेल्या पैशाचा घरासाठी विनियोग करायचं सोडून बादशाह सोनार आम्ही नरहर सोनारांच्या वंशाचे म्हणून आपली पावले बासुंदीच्या दुकानाकडे वळवतो. अतिरेक कशाचाही असो ते शेवटी व्यसनाच मग ते खायचे असो कि प्यायचे पण त्यांच्या विळख्यातून सहजी सुटका नाही हे या कथेतून उद्धृत होते आणि भोळेपणा आणि इरसालकी या दोन स्वभावांचे मनोज्ञ दर्शन घडते. पुन्हा एकदा म्हातारी फसली तरी मन बादशहाच्या चाणाक्ष स्वाभावाला दाद दिल्याशिवाय राहात नाही. शेवटच्या *धडपडणारी मुले* या कथेमध्ये दोघ चौघ पोर चोरून बिडी ओढायचा प्रयत्न करतात त्यांचे ते बालसुलभ वागणे त्यावर मोठ्यांच्या प्रतिक्रिया आणि समाजात शेवटी बळी तो कानपिळी हा न्याय रास्त आहे हे दाखवत पुस्तक संपते. द. मा. मिरासदार यांच्या अचूक निरीक्षणशक्तीने सर्व व्यक्ति ते इतक्या चपखल पणाने रंगावतात कि हे नाट्य आपल्या अवती भोवती घडत असल्याचा भास होतो आणि एका निखळ वेगळ्याच आनंदाचा अनुभव त्यांच्या पुस्तकातून वाचकाला मिळतो हीच त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. हसणे जितके सोपे सखये हासवणे ते अवघड ग लपवून पाणी नयन मधले सुखा शोधणे मुश्किल ग ||१|| मीच मला बघ विदूषक करतो मुखवटा धारण करतो ग माझ्या मधले व्यंग पाहुनी मीच स्वताला हसतो ग ||२|| शब्द संपदा न्यारी घेऊन दुख कमी मी करतो ग विसंगतीतून सुसंगती मी जगण्यामध्ये बघतो ग ||३|| खळी पाहता तूझिया गाली आसवास मी त्यजितो ग दुखाला मी भिडवून डोळे सुख जगाला देतो ग || ४|| निर्मळ माझे मन हे आता निर्मळ सारे करतो ग निखळ विनोद माझा देऊन जगास मी हसवितो ग || ५|| इति रसिकावाणी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more