* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BENCH, A TEMPLE, A VILLAGE, PEOPLE LIKE YOU OR ME AND A BLIND OLD MAN-THESE ARE SOME OF THE SET UPS IN MRS. SUDHA MURTY`S COMPILATION OF SHORT STORIES FROM PEOPLE ACROSS INDIA. THE OLD MAN AND HIS GOD: DISCOVERING THE SPIRIT OF INDIA IS A COLLECTION OF INDIVIDUAL ACCOUNTS GATHERED BY THE WRITER FROM PEOPLE WHO HAVE THEIR OWN STORIES TO TELL. THE STORIES ARE SUCH THAT THEY ARE VERY SIMPLE TO UNDERSTAND AND WRITTEN IN A SIMPLE WAY. THEY DESCRIBE THE INCIDENTS THAT ARE RECORDED BY MRS. MURTY DURING HER JOURNEY, WHICH SHE SUBSEQUENTLY SUMMARIZED IN HER EASY TO READ BOOK. HER STORIES ARE A PART OF THE VERY SOUL OF HUMAN BEINGS. FOR INSTANCE, THERE IS ONE ABOUT HOW AN OLD BLIND MAN GAVE HER SHELTER IN A STORM WHEN THERE WAS NOWHERE ELSE TO GO. ANOTHER STORY IS ABOUT HOW BROTHERS TURNED AWAY FROM EACH OTHER WHEN SOMEWHERE ELSE TWO PEOPLE, WHO WERE NOT EVEN RELATED BECAME CLOSER THAN BROTHERS. THERE ARE ALSO STORIES OF YOUNG PEOPLE TRYING TO MAKE A CAREER FOR THEMSELVES AND ALSO ABOUT THE OPPRESSION OF WOMEN WHO STRUGGLE FOR THEIR RIGHTS. MANY DIFFERENT LIVES TOUCHED THE HEART OF MRS. SUDHA MURTY AND ENTITLED HER TO WRITE THE OLD MAN AND HIS GOD. MRS. MURTY HAS EXPLORED THE SPIRIT OF INDIA WITH HER SET OF SHORT STORIES. THE SPIRIT OF INDIA IS IN THE PEOPLE, THEIR LIVES AND THEIR STORIES WHICH CAN IMPACT THE WAY OF THE WORLD. THE OLD MAN AND HIS GOD: DISCOVERING THE SPIRIT OF INDIA WAS PUBLISHED BY PENGUIN IN 2006. IT IS AVAILABLE IN PAPERBACK EDITIONS.
‘‘लोक मला अनेकदा विचारतात, ‘एवढ्या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी नेमक्या तुमच्याच बाबतीत कशा काय घडतात?’ त्यावर त्या सर्वांना माझं एकच सांगणं असतं– जीवनाच्या या प्रवासात आपल्याला सर्वांनाच नानाविध माणसं भेटतात, कितीतरी अनुभवांना सामोरं जावं लागतं... त्यातले काही अनुभव आपल्याला स्पर्शून जातात, काही अंतर्बाह्य बदलूनसुद्धा टाकतात. तुमच्यापाशी जर संवेदनाक्षम मन असेल आणि तुम्ही या अनुभवांची नियमितपणे नोंद करून ठेवत असाल, तर तुमच्याही लक्षात येईल... तुमचं आयुष्य हासुद्धा एक विविध कथांचा खजिना आहे...’’ खेड्यापाड्यात जाऊन तेथील गोरगरिबांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी आणि सामान्य माणसांसाठी कार्य करत असताना सुधा मूर्ती, एक समाजसेविका, लेखिका आणि प्राध्यापिका– त्या सर्वांशी बोलतात, त्या लोकांचं म्हणणं त्या नोंदवून ठेवतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधीतरी त्या संकटांपुढे त्यांनी मानलेली हार... हे सगळं लेखिकेने आपल्या प्रवाही भाषेत या पुस्तकात मांडलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या ठायी लेखिकेला दिसून आलेल्या असामान्य दातृत्वाच्या, नि:स्वार्थी वृत्तीच्या कथा यात आहेत. सुनामीसारख्या निसर्गाच्या प्रकोपाशी झुंज देणारी माणसं असोत, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उभ्या राहिलेल्या सबला असोत, स्पर्धेच्या युगात वरवर जाण्याची धडपड करणारे तरुण असोत– या सर्वांच्या गोष्टीतून मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीच्या विविध पैलूंचं नेमकं चित्रण आपल्याला दिसतं. भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रूपानं प्रतिबिंबित झाला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarCA Priya Kulkarni

    लेखिके बद्दल: सुधा मुतीॅ या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्या इन्फोसिस या प्रसिध्द संस्थेचे सहसंचालक एन.आर.नारायण मुतीॅ यांच्या पत्नी आहेत. आपण सगळेच जण आपल्या दैनंदीन जीवनात खूप बरे वाईट अनुभव घेतच असतो आणी यातूनच आपण वेगवेगळ्या माणसांबद्दल, जागाबद्दल, विषयांबद्दल आपली मत बनवतो. सौ. सुधा मुतीॅ हे आपणा सगळ्यांच्या परिचयाच नाव आहे. इन्फोसिस फौंडेशेन या नावाने काम करत असताना त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात आहेत. वाचताना जाणवतं की एखाद्या गोष्टी बद्दल आपली मत किती साचेबध्द असतात आणी वास्तवात गोष्टी किती वेगळ्या असतात. मोलमजूरी करून आपल्या पाच मुलांचा सांभाळ करणारी एक स्त्री जेव्हा परत एका बाळाला जन्म देते तेव्हा तिच्याकडे एक प्रस्ताव येतो ते बाळ एका मुलबाळ नसलेल्या श्रीमंत दांपत्याला दत्तक देण्याचा. बाळाच्या बदल्यात मिळणारे खूप पैसे तिचे आयुष्य सुलभ करणारे असतात पण जेव्हा ते दांपत्य ते बाळ घेऊन जाण्यास येतात तेव्हा पाच मुलं असून सुद्ध तिचं मन कातरतं आणी ती बाळाला अंतर देऊ शकत नाही. तर एकीकडे अशाच एका गरीब घरातली मुलगी वारंवार आपल्या आई बाबांना सांगत असते की मला डोळ्याला अंधुक दिसतं, पण अशिक्षीत आई वडील याकडे सतत कानाडोळा करत असतात. शेवटी एकदा ते तिला डाॅक्टरकडे घेऊन जातात. डाॅक्टर तिचे ॲापरेशन करावे असा सल्ला देतात, पण खर्चाचा आकडा खूप असतो. मग आई वडील तिला दवाखान्यातून बस स्टॅडवर घेऊन जातात. आई वडील आपापसात चर्चा करतात व मुलीच्या हातात एक बिस्कीटचा पुडा देऊन सांगतात, तू हे बिस्कीट खा, आम्ही पाच मिनिटांत येतो. बिस्कीटं संपतात, असाह्य, घाबरलेली मुलगी हाका मारू लागते...पण तिच्या हाकेला ओ देणारे कोणी येतच नाही! आता मी कधीकधी विचार करते...मातृत्व म्हणजे काय? खोट्या कॅन्सर ची माहिती सांगून आथिॅक मदत मिळवणारी एक व्यक्ती, तर दुसरीकडे मिळाळेल्या आथिॅक मदतीपेक्षा कमी खर्चात उपचार झाले म्हणून उरलेले पैसे फोैंडेशनला परत करणारे कुटंब... या आणी अशा अनेक अनुभवांची सफर आहे..पुण्यभूमी भारत! ...Read more

  • Rating Starशितल सुधाकर मुळे

    आदरणीय लीनाजी, स.न.वि.वि. मी इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी तुम्ही अनुवाद केलेले ‘पुण्यभुमी भारत’ हे पुस्तक वाचून खूप आनंद झाला. मला मातृत्व ही गोष्ट खूप आवडली. या वेगवेगळ्या गोष्टीतून मला खूप काही शिकायला मिळालं. मला या पुस्तकातून खूप ्रेरणा मिळाली. या गोष्टीतून काहीना काही शिकण्यासारखं आहे आणि ते मी माझ्या अंगात सगळे गुण घेतले. हे पुस्तक मला खूप आवडलं आणि तुम्हाला पत्र पाठवण्याची इच्छा झाली. मी तुम्ही अनुवाद केलेली खूप पुस्तके वाचली आणि ती सगळी पुस्तके मला खूप आवडली. मला तुम्हाला आमच्या शाळेत वार्षिकउत्सव या कार्यक्रमात उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तुम्हाला हे पत्र पोहचले की आमच्या शाळेला फोन करा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि आमच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, हीच विनंती. कळावे, आपली विश्वासू, शितल सुधाकर मुळे हरंगुळ, लातूर ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 18-11-2007

    अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख... सुधा म्हणजे मध. मूर्ती म्हणजे प्रकट झालेले. जीवनातील मधासमान दृष्टी आणि अनुभव एकत्र होऊन शब्दरूपाने प्रकट होतात तेव्हा सुधा मूर्तीचे लेख जन्म घेतात. सुधा मूर्तींनी समाजात वावरताना आलेल्या अनुभवांचे, मधमाशीच्या मध गोा करण्याच्या वृत्तीने संकलन केले आहे. हे करताना त्या चांगल्या गोष्टींचे भरभरून कौतुक करतात तर चांगल्या गोष्टी दाखवून देताना त्यांच्यातील अनुकंपा आणि दया यांचे दर्शन होते. प्रत्येक लेखाला मानवी स्वभावाच्या विश्लेषणाचे अस्तर आहे. हे विश्लेषण कोरडे आणि शुष्क नाही; त्याला दयार्द्र दृष्टीचा ओलावा आहे. लेखिकेला आलेल्या अनुभवांचे चित्रण सर्वच्या सर्व खरंखुरं आहे... प्रामाणिकपणे जसंच्या तसं लिहिलं आहे... काही लोकांना त्यामुळे ते भावलं आहे... असं सुधा मूर्ती मनमोकळेपणानं सांगतात. मातृत्व, वात्सल्य, संतानप्रेम हे एकाच भावनेचे अनेक पैलू. निरनिराळ्या अनुभवातून त्याचे वेगवेगळे कंगोरे दिसून येतात. कधी आनंदाने मन उचंबळून येतं. तर कधी विदारक अनुभव वाचताना मन विषण्ण होतं. मानवी मनोव्यापाराचे विश्लेषण हेच या सबंध पुस्तकाचे मूलसूत्र आहे. नोकरी ही कहाणी अशीच आहे. मुलाखतीतून निरनिराळ्या उमेदवारांची मनोवृत्ती कळते. एक हुशार, सधन घरातली मुलगी, ‘मला स्वतंत्रपणे रहायचे आहे, कार ठेवायची आहे, तेव्हा जास्त पगार हवा’ असे सांगते, तर दुसरा हुशार, श्रीमंत डॉक्टरचा मुलगा मात्र ‘मला याच गावात दुसरं देखील काम होतं, मी आत्याच्या घरी उरतलो होतो’ असे कारण सांगून प्रवासभत्ता घेण्याचे नाकारतो. या संदर्भात ‘वाइज अ‍ॅण्ड अदरवाइज’ या सुधा मूर्तींच्या दुसऱ्या पुस्तकांतील एका हुशार पण बढाईखोर सॉफ्टवेअर इंजिनीयरची आठवण होते. धारवाडच्या इंजिनीअरींग कॉलेजात सुवर्णपदक मिळाल्याचे खोटंच सांगणाऱ्यांची मनोवृत्ती लेखिकेला आणि वाचकांनासुद्धा कोड्यात टाकते. परस्पर विरोधी घटना समोरासमोर उभ्या करून जणू वाचकांपुढे सुधा मूर्ती प्रश्न उभा करतात. त्या प्रतिपादनात कुठेही समस्या सोडविण्याचा अभिनिवेश असतं नाही पण वाचकांच्या मनात खळबळ मात्र जरूर निर्माण होते. हुशार दत्तक मुलीच्या शिक्षणासाठी स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या गहाण टाकायला निघालेली लीलाम्मा बघून आनंद होतो. त्याच लेखात अमानुष रामप्पा या बापाचे वर्णन येते. रामप्पा स्वत:च्या लहान मुलाच्या कॅन्सरचे भांडवल करतो, लाखो रुपये चंदा गोळा करतो. मुलाच्या इलाजासाठी एक पैसाही खर्च करीत नाही. घर-वाहन विकत घेऊन मौज करतो हे वाचून मन खिन्न होते. फाटके कपडे घालून फुकट वैद्यकीय सेवेसाठी दोन गाड्यांची श्रीमंत मालकीण त्या पाहतात. गरीब वस्तीत ब्लँकेट वाटताना परत मागण्यासाठी पण श्रीमंतांची क्षुद्र वृत्ती आणि मनाची गरीबी त्यांना जास्त दु:ख देते. एका पाकिस्तान भेटीच्या वेळी, तेथील लोक, हिंदी सिनेमाच्या गाण्याची धून गुणगुणारा टॅक्सी ड्रायव्हर, मेजवानीतील चना-भटुरा, आलू पराठा, जिलेबी, सगळं सगळं कसं घरच्यासारखं वाटत होतं. त्या तक्षशीला येथे म्युझियम पाहायला जातात. तिथे परदेशी पाहुण्यांसाठी तिकीट जास्त आहे. आपण जणू भारतातच आहे असं समजून त्या विचारतात, ‘माझ्याकडून दोनशे का घेतले?’ तेव्हा ‘तुम्ही भारतीय म्हणजे परदेशी’ हे उत्तर त्यांना वास्तवाची जाणीव करून देते. दुसऱ्या एका भेटीच्या वेळी चेन्नईच्या मिसेस कपूर त्यांच्याबरोबर असतात. मिसेस कपूरचं बाळपण, खेळणं बागडणं सुरुवातीचं शिक्षण, फाळणीपूर्व पंजाबात झालं. त्यांची जन्मस्थानाला - पिंडीला भेट देण्याची अनावर ओढ, ते घर आता तिथे नसल्यामुळे व्यथित झालेल्या मिसेस कपूर, शेजारी डॉ. सलीम यांचे अगत्यशील वागणं, हे सगळं सुधा मूर्ती अत्यंत भावूकपणे वर्णन करतात. इन्फोसिस ही कॉम्प्युटर क्षेत्रातील फक्त भारतातील नव्हे तर जगातील अग्रगण्य व श्रीमंत कंपनी आहे. इन्फोसिस फौंडेशन ही त्या कंपनीची समाजिक आणि धर्मादाय कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या प्रमुख या नात्याने सुधा मूर्तींचा विविध क्षेत्रातील संस्थांचा आणि व्यक्तींचा संबंध येतो. हिरालाल जैन हे व्यावसायिक नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर फौंडेशनला मदत पाठवित असतात. त्यांच्यानंतर दुसरी पिढी व्यवसायाची धुरा सांभाळते. नवीन व्यवस्थापन इन्फोसिस फौंडेशनला विचारते, आम्हाला या मदतीमुळे काय प्रसिद्धी मिळेल? बदलत्या व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसायिक मूल्यांची चुणूक या लेखाद्वारे आपणास कळून येते. या पुस्तकातील प्रत्येक लेख एक आरसा आहे. प्रत्येकात वेगवेगळे प्रतिबिंब आहे. पण प्रत्येकात माणसांच्या वृत्ती प्रवृत्तींच्या वेगवेगळ्या रंगाचे दर्शन आहे, जणू भारत दर्शन आहे. या साऱ्या गोष्टी मनाला स्पर्शून जातात; सरळ सच्चेपणा भावतो. सगळ्याच लेखांचा परिचय देणे शब्दमर्यादेत बसत नाही. पण ‘तू शंभर मुलांची आई हो!’ हा त्यांच्या आजीचा आशीर्वाद त्यांनी वेगळ्या संदर्भात अनेकांना मदत करून सार्थ केला असे वाटते. कर्मठ आणि प्रगत विचारसरणी एकत्र नांदू शकतात याचा सुधा मूर्तींच्या आजीमध्ये सुंदर संगम आढळतो. असा आहे सुधा मूर्तींच्या अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख! द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड हिज गॉड (डिस्कव्हरींग द स्पिरीट ऑफ इंडिया) या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद लीना सोहोनी यांनी सरसरित्या केला आहे. तळमळीने लिहिलेले अनुभव आणि ओघवती भाषा यामुळे हाती घेतलेले पुस्तक केव्हा संपते ते कळतच नाही. उगाच नाही एकवीस भाषात भाषांतर झालं! कॉम्प्युटर युग माणसाला समाजापासून अलग करते आहे असं म्हणतात पण ही बाई तर पूर्णपणे समाजमय झाली आहे. लेखनाचे मानधन सुधा मूर्ती सामाजिक कार्याला अर्पण करतात. -मधुसूदन आदवाणीकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 13-05-2007

    समाजमनाची गमतीदार निरीक्षणे... सुधा मूर्ती या मूळच्या सुधा कुलकर्णी. म्हणजे मराठी नव्हे; कानडी भाषिक. इन्फोसिस या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम संगणक कंपनीचे जनक नारायणमूर्ती यांच्या त्या पत्नी. आपण मराठी माणसं जरासं दक्षिणी वळणाचं नाव दिसलं की ‘मद्रासी’ कंवा ‘साऊथ इंडियन’ असा एक शेरा मारून मोकळे होतो. प्रत्यक्षात दक्षिण हिंदुस्थानात कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र आणि केरळ असे चार प्रांत आहेत. तिथल्या भाषा वेगवेगळ्या आहेत. किंबहुना कोटेकोरपणे बोलायचं तर आपला महाराष्ट्रही दक्षिण हिंदुस्थानातच मोडतो ही सगळी वस्तुस्थिती आपल्या गावीही नसते. तर सुधा मूर्ती या कन्नड भाषिक असून स्वत: अव्वल दर्जाच्या सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. इन्फोसिसच्या उत्तुंग यशात आपल्या पतीइतकाच त्यांचाही वाटा आहे. अलीकडे त्या समाजकार्य आणि लेखनाकडे वळल्या आहेत. वेगवेगळ्या इंग्रजी नियतकालिकांमधून त्यांचे स्तंभ नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांचे लेखन लोकप्रिय आहे. श्रीमंताच्या बायकांना वेळ घालवण्यासाठी समाजकार्य करणं आणि इंग्रजीतून(च) लेखन करणं यात नवीन काहीच नाही. हा ब्रिटिश मडमांचा वारसा आहे. आपल्याकडे त्यांची ‘अतिविशाल महिला मंडळ’ म्हणून टिंगल होत असते. पण सुधा मूर्तीचे काम आणि लेखन या दोहोंची जातकुळी वेगळी आहे. एकतर त्या श्रीमंत नवऱ्याची कर्तृत्वशून्य बायको नाहीत. उलट प्रचंड गुणवत्ता आणि प्रचंड कर्तबगारी गाजवून आता त्या सामाजिक कार्यात उतरल्या आहेत. अशा लोकांचं लक्ष बहुधा कायम युरोप-अमेरिकेकडे लागलेलं असतं. तिथलं ते सगळं चांगलं नि इथलं ते सगळं टाकाऊ अशी त्यांची धारणा असते. सुधा मूर्तींची इथल्या समाजासाठी काहीतरी काम करण्याची भावना, तळमळ अस्सल आहे. त्या कामाला त्यांनी पाश्चिमात्त्य पद्धतीच्या शिस्तीची योजनाबद्धतेची उत्तम जोड दिल्यामुळे सोन्याला सुगंध लाभला आहे. या सामाजिक कार्यात सतत येणाऱ्या कडू-गोड गमतीदार अनुभवांवरच त्या सतत लिहित असतात. प्रस्तुत ‘पुण्यभूमी भारत’ हे अशाच अनुभवकथांचं अतिशय वाचनीय पुस्तक आहे. हिंदुस्थानला जगाचं लघुरूप (मिनिएचर ऑफ दि वर्ल्ड) म्हटलं जातं. जगातल्या सर्व प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्ती इथे आढळतात. टोकाची बदमाशगिरी आणि टोकाचा प्रामाणिकपणा, आत्यंतिक श्रीमंती आणि आत्यंतिक दारिद्र्य, अस्सल साधू आणि पक्के भोंदू असे सर्व मानवी नमुने इथे सापडतात. सुधाबार्इंच्या अनुभवकथांमधून त्यांच्या स्वत:च्या सुंदर भाष्यासह ते आपल्यासमोर येतात. त्या भाष्यामधून आपल्या हेही लक्षात येतं की, लेखिकेची काही चिरंतन अशा मानवी मूल्यांवर दाट श्रद्धा आहे आणि काळ कितीही बदलला तरी ही मूल्यं अचल, अढळ, शाश्वत अशीच राहणार आहेत. ती मूल्यंच चांगलं जीवन जगू पाहणाऱ्यांना आत्मबळ देणार आहेत. हिंदुस्थान ही पुण्यभूमी असल्याचा हाच तर निकष आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more