* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BENCH, A TEMPLE, A VILLAGE, PEOPLE LIKE YOU OR ME AND A BLIND OLD MAN-THESE ARE SOME OF THE SET UPS IN MRS. SUDHA MURTY`S COMPILATION OF SHORT STORIES FROM PEOPLE ACROSS INDIA. THE OLD MAN AND HIS GOD: DISCOVERING THE SPIRIT OF INDIA IS A COLLECTION OF INDIVIDUAL ACCOUNTS GATHERED BY THE WRITER FROM PEOPLE WHO HAVE THEIR OWN STORIES TO TELL. THE STORIES ARE SUCH THAT THEY ARE VERY SIMPLE TO UNDERSTAND AND WRITTEN IN A SIMPLE WAY. THEY DESCRIBE THE INCIDENTS THAT ARE RECORDED BY MRS. MURTY DURING HER JOURNEY, WHICH SHE SUBSEQUENTLY SUMMARIZED IN HER EASY TO READ BOOK. HER STORIES ARE A PART OF THE VERY SOUL OF HUMAN BEINGS. FOR INSTANCE, THERE IS ONE ABOUT HOW AN OLD BLIND MAN GAVE HER SHELTER IN A STORM WHEN THERE WAS NOWHERE ELSE TO GO. ANOTHER STORY IS ABOUT HOW BROTHERS TURNED AWAY FROM EACH OTHER WHEN SOMEWHERE ELSE TWO PEOPLE, WHO WERE NOT EVEN RELATED BECAME CLOSER THAN BROTHERS. THERE ARE ALSO STORIES OF YOUNG PEOPLE TRYING TO MAKE A CAREER FOR THEMSELVES AND ALSO ABOUT THE OPPRESSION OF WOMEN WHO STRUGGLE FOR THEIR RIGHTS. MANY DIFFERENT LIVES TOUCHED THE HEART OF MRS. SUDHA MURTY AND ENTITLED HER TO WRITE THE OLD MAN AND HIS GOD. MRS. MURTY HAS EXPLORED THE SPIRIT OF INDIA WITH HER SET OF SHORT STORIES. THE SPIRIT OF INDIA IS IN THE PEOPLE, THEIR LIVES AND THEIR STORIES WHICH CAN IMPACT THE WAY OF THE WORLD. THE OLD MAN AND HIS GOD: DISCOVERING THE SPIRIT OF INDIA WAS PUBLISHED BY PENGUIN IN 2006. IT IS AVAILABLE IN PAPERBACK EDITIONS.
‘‘लोक मला अनेकदा विचारतात, ‘एवढ्या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी नेमक्या तुमच्याच बाबतीत कशा काय घडतात?’ त्यावर त्या सर्वांना माझं एकच सांगणं असतं– जीवनाच्या या प्रवासात आपल्याला सर्वांनाच नानाविध माणसं भेटतात, कितीतरी अनुभवांना सामोरं जावं लागतं... त्यातले काही अनुभव आपल्याला स्पर्शून जातात, काही अंतर्बाह्य बदलूनसुद्धा टाकतात. तुमच्यापाशी जर संवेदनाक्षम मन असेल आणि तुम्ही या अनुभवांची नियमितपणे नोंद करून ठेवत असाल, तर तुमच्याही लक्षात येईल... तुमचं आयुष्य हासुद्धा एक विविध कथांचा खजिना आहे...’’ खेड्यापाड्यात जाऊन तेथील गोरगरिबांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी आणि सामान्य माणसांसाठी कार्य करत असताना सुधा मूर्ती, एक समाजसेविका, लेखिका आणि प्राध्यापिका– त्या सर्वांशी बोलतात, त्या लोकांचं म्हणणं त्या नोंदवून ठेवतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधीतरी त्या संकटांपुढे त्यांनी मानलेली हार... हे सगळं लेखिकेने आपल्या प्रवाही भाषेत या पुस्तकात मांडलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या ठायी लेखिकेला दिसून आलेल्या असामान्य दातृत्वाच्या, नि:स्वार्थी वृत्तीच्या कथा यात आहेत. सुनामीसारख्या निसर्गाच्या प्रकोपाशी झुंज देणारी माणसं असोत, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उभ्या राहिलेल्या सबला असोत, स्पर्धेच्या युगात वरवर जाण्याची धडपड करणारे तरुण असोत– या सर्वांच्या गोष्टीतून मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीच्या विविध पैलूंचं नेमकं चित्रण आपल्याला दिसतं. भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रूपानं प्रतिबिंबित झाला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarCA Priya Kulkarni

    लेखिके बद्दल: सुधा मुतीॅ या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्या इन्फोसिस या प्रसिध्द संस्थेचे सहसंचालक एन.आर.नारायण मुतीॅ यांच्या पत्नी आहेत. आपण सगळेच जण आपल्या दैनंदीन जीवनात खूप बरे वाईट अनुभव घेतच असतो आणी यातूनच आपण वेगवेगळ्या माणसांबद्दल, जागाबद्दल, विषयांबद्दल आपली मत बनवतो. सौ. सुधा मुतीॅ हे आपणा सगळ्यांच्या परिचयाच नाव आहे. इन्फोसिस फौंडेशेन या नावाने काम करत असताना त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात आहेत. वाचताना जाणवतं की एखाद्या गोष्टी बद्दल आपली मत किती साचेबध्द असतात आणी वास्तवात गोष्टी किती वेगळ्या असतात. मोलमजूरी करून आपल्या पाच मुलांचा सांभाळ करणारी एक स्त्री जेव्हा परत एका बाळाला जन्म देते तेव्हा तिच्याकडे एक प्रस्ताव येतो ते बाळ एका मुलबाळ नसलेल्या श्रीमंत दांपत्याला दत्तक देण्याचा. बाळाच्या बदल्यात मिळणारे खूप पैसे तिचे आयुष्य सुलभ करणारे असतात पण जेव्हा ते दांपत्य ते बाळ घेऊन जाण्यास येतात तेव्हा पाच मुलं असून सुद्ध तिचं मन कातरतं आणी ती बाळाला अंतर देऊ शकत नाही. तर एकीकडे अशाच एका गरीब घरातली मुलगी वारंवार आपल्या आई बाबांना सांगत असते की मला डोळ्याला अंधुक दिसतं, पण अशिक्षीत आई वडील याकडे सतत कानाडोळा करत असतात. शेवटी एकदा ते तिला डाॅक्टरकडे घेऊन जातात. डाॅक्टर तिचे ॲापरेशन करावे असा सल्ला देतात, पण खर्चाचा आकडा खूप असतो. मग आई वडील तिला दवाखान्यातून बस स्टॅडवर घेऊन जातात. आई वडील आपापसात चर्चा करतात व मुलीच्या हातात एक बिस्कीटचा पुडा देऊन सांगतात, तू हे बिस्कीट खा, आम्ही पाच मिनिटांत येतो. बिस्कीटं संपतात, असाह्य, घाबरलेली मुलगी हाका मारू लागते...पण तिच्या हाकेला ओ देणारे कोणी येतच नाही! आता मी कधीकधी विचार करते...मातृत्व म्हणजे काय? खोट्या कॅन्सर ची माहिती सांगून आथिॅक मदत मिळवणारी एक व्यक्ती, तर दुसरीकडे मिळाळेल्या आथिॅक मदतीपेक्षा कमी खर्चात उपचार झाले म्हणून उरलेले पैसे फोैंडेशनला परत करणारे कुटंब... या आणी अशा अनेक अनुभवांची सफर आहे..पुण्यभूमी भारत! ...Read more

  • Rating Starशितल सुधाकर मुळे

    आदरणीय लीनाजी, स.न.वि.वि. मी इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी तुम्ही अनुवाद केलेले ‘पुण्यभुमी भारत’ हे पुस्तक वाचून खूप आनंद झाला. मला मातृत्व ही गोष्ट खूप आवडली. या वेगवेगळ्या गोष्टीतून मला खूप काही शिकायला मिळालं. मला या पुस्तकातून खूप ्रेरणा मिळाली. या गोष्टीतून काहीना काही शिकण्यासारखं आहे आणि ते मी माझ्या अंगात सगळे गुण घेतले. हे पुस्तक मला खूप आवडलं आणि तुम्हाला पत्र पाठवण्याची इच्छा झाली. मी तुम्ही अनुवाद केलेली खूप पुस्तके वाचली आणि ती सगळी पुस्तके मला खूप आवडली. मला तुम्हाला आमच्या शाळेत वार्षिकउत्सव या कार्यक्रमात उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तुम्हाला हे पत्र पोहचले की आमच्या शाळेला फोन करा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि आमच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, हीच विनंती. कळावे, आपली विश्वासू, शितल सुधाकर मुळे हरंगुळ, लातूर ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 18-11-2007

    अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख... सुधा म्हणजे मध. मूर्ती म्हणजे प्रकट झालेले. जीवनातील मधासमान दृष्टी आणि अनुभव एकत्र होऊन शब्दरूपाने प्रकट होतात तेव्हा सुधा मूर्तीचे लेख जन्म घेतात. सुधा मूर्तींनी समाजात वावरताना आलेल्या अनुभवांचे, मधमाशीच्या मध गोा करण्याच्या वृत्तीने संकलन केले आहे. हे करताना त्या चांगल्या गोष्टींचे भरभरून कौतुक करतात तर चांगल्या गोष्टी दाखवून देताना त्यांच्यातील अनुकंपा आणि दया यांचे दर्शन होते. प्रत्येक लेखाला मानवी स्वभावाच्या विश्लेषणाचे अस्तर आहे. हे विश्लेषण कोरडे आणि शुष्क नाही; त्याला दयार्द्र दृष्टीचा ओलावा आहे. लेखिकेला आलेल्या अनुभवांचे चित्रण सर्वच्या सर्व खरंखुरं आहे... प्रामाणिकपणे जसंच्या तसं लिहिलं आहे... काही लोकांना त्यामुळे ते भावलं आहे... असं सुधा मूर्ती मनमोकळेपणानं सांगतात. मातृत्व, वात्सल्य, संतानप्रेम हे एकाच भावनेचे अनेक पैलू. निरनिराळ्या अनुभवातून त्याचे वेगवेगळे कंगोरे दिसून येतात. कधी आनंदाने मन उचंबळून येतं. तर कधी विदारक अनुभव वाचताना मन विषण्ण होतं. मानवी मनोव्यापाराचे विश्लेषण हेच या सबंध पुस्तकाचे मूलसूत्र आहे. नोकरी ही कहाणी अशीच आहे. मुलाखतीतून निरनिराळ्या उमेदवारांची मनोवृत्ती कळते. एक हुशार, सधन घरातली मुलगी, ‘मला स्वतंत्रपणे रहायचे आहे, कार ठेवायची आहे, तेव्हा जास्त पगार हवा’ असे सांगते, तर दुसरा हुशार, श्रीमंत डॉक्टरचा मुलगा मात्र ‘मला याच गावात दुसरं देखील काम होतं, मी आत्याच्या घरी उरतलो होतो’ असे कारण सांगून प्रवासभत्ता घेण्याचे नाकारतो. या संदर्भात ‘वाइज अ‍ॅण्ड अदरवाइज’ या सुधा मूर्तींच्या दुसऱ्या पुस्तकांतील एका हुशार पण बढाईखोर सॉफ्टवेअर इंजिनीयरची आठवण होते. धारवाडच्या इंजिनीअरींग कॉलेजात सुवर्णपदक मिळाल्याचे खोटंच सांगणाऱ्यांची मनोवृत्ती लेखिकेला आणि वाचकांनासुद्धा कोड्यात टाकते. परस्पर विरोधी घटना समोरासमोर उभ्या करून जणू वाचकांपुढे सुधा मूर्ती प्रश्न उभा करतात. त्या प्रतिपादनात कुठेही समस्या सोडविण्याचा अभिनिवेश असतं नाही पण वाचकांच्या मनात खळबळ मात्र जरूर निर्माण होते. हुशार दत्तक मुलीच्या शिक्षणासाठी स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या गहाण टाकायला निघालेली लीलाम्मा बघून आनंद होतो. त्याच लेखात अमानुष रामप्पा या बापाचे वर्णन येते. रामप्पा स्वत:च्या लहान मुलाच्या कॅन्सरचे भांडवल करतो, लाखो रुपये चंदा गोळा करतो. मुलाच्या इलाजासाठी एक पैसाही खर्च करीत नाही. घर-वाहन विकत घेऊन मौज करतो हे वाचून मन खिन्न होते. फाटके कपडे घालून फुकट वैद्यकीय सेवेसाठी दोन गाड्यांची श्रीमंत मालकीण त्या पाहतात. गरीब वस्तीत ब्लँकेट वाटताना परत मागण्यासाठी पण श्रीमंतांची क्षुद्र वृत्ती आणि मनाची गरीबी त्यांना जास्त दु:ख देते. एका पाकिस्तान भेटीच्या वेळी, तेथील लोक, हिंदी सिनेमाच्या गाण्याची धून गुणगुणारा टॅक्सी ड्रायव्हर, मेजवानीतील चना-भटुरा, आलू पराठा, जिलेबी, सगळं सगळं कसं घरच्यासारखं वाटत होतं. त्या तक्षशीला येथे म्युझियम पाहायला जातात. तिथे परदेशी पाहुण्यांसाठी तिकीट जास्त आहे. आपण जणू भारतातच आहे असं समजून त्या विचारतात, ‘माझ्याकडून दोनशे का घेतले?’ तेव्हा ‘तुम्ही भारतीय म्हणजे परदेशी’ हे उत्तर त्यांना वास्तवाची जाणीव करून देते. दुसऱ्या एका भेटीच्या वेळी चेन्नईच्या मिसेस कपूर त्यांच्याबरोबर असतात. मिसेस कपूरचं बाळपण, खेळणं बागडणं सुरुवातीचं शिक्षण, फाळणीपूर्व पंजाबात झालं. त्यांची जन्मस्थानाला - पिंडीला भेट देण्याची अनावर ओढ, ते घर आता तिथे नसल्यामुळे व्यथित झालेल्या मिसेस कपूर, शेजारी डॉ. सलीम यांचे अगत्यशील वागणं, हे सगळं सुधा मूर्ती अत्यंत भावूकपणे वर्णन करतात. इन्फोसिस ही कॉम्प्युटर क्षेत्रातील फक्त भारतातील नव्हे तर जगातील अग्रगण्य व श्रीमंत कंपनी आहे. इन्फोसिस फौंडेशन ही त्या कंपनीची समाजिक आणि धर्मादाय कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या प्रमुख या नात्याने सुधा मूर्तींचा विविध क्षेत्रातील संस्थांचा आणि व्यक्तींचा संबंध येतो. हिरालाल जैन हे व्यावसायिक नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर फौंडेशनला मदत पाठवित असतात. त्यांच्यानंतर दुसरी पिढी व्यवसायाची धुरा सांभाळते. नवीन व्यवस्थापन इन्फोसिस फौंडेशनला विचारते, आम्हाला या मदतीमुळे काय प्रसिद्धी मिळेल? बदलत्या व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसायिक मूल्यांची चुणूक या लेखाद्वारे आपणास कळून येते. या पुस्तकातील प्रत्येक लेख एक आरसा आहे. प्रत्येकात वेगवेगळे प्रतिबिंब आहे. पण प्रत्येकात माणसांच्या वृत्ती प्रवृत्तींच्या वेगवेगळ्या रंगाचे दर्शन आहे, जणू भारत दर्शन आहे. या साऱ्या गोष्टी मनाला स्पर्शून जातात; सरळ सच्चेपणा भावतो. सगळ्याच लेखांचा परिचय देणे शब्दमर्यादेत बसत नाही. पण ‘तू शंभर मुलांची आई हो!’ हा त्यांच्या आजीचा आशीर्वाद त्यांनी वेगळ्या संदर्भात अनेकांना मदत करून सार्थ केला असे वाटते. कर्मठ आणि प्रगत विचारसरणी एकत्र नांदू शकतात याचा सुधा मूर्तींच्या आजीमध्ये सुंदर संगम आढळतो. असा आहे सुधा मूर्तींच्या अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख! द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड हिज गॉड (डिस्कव्हरींग द स्पिरीट ऑफ इंडिया) या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद लीना सोहोनी यांनी सरसरित्या केला आहे. तळमळीने लिहिलेले अनुभव आणि ओघवती भाषा यामुळे हाती घेतलेले पुस्तक केव्हा संपते ते कळतच नाही. उगाच नाही एकवीस भाषात भाषांतर झालं! कॉम्प्युटर युग माणसाला समाजापासून अलग करते आहे असं म्हणतात पण ही बाई तर पूर्णपणे समाजमय झाली आहे. लेखनाचे मानधन सुधा मूर्ती सामाजिक कार्याला अर्पण करतात. -मधुसूदन आदवाणीकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 13-05-2007

    समाजमनाची गमतीदार निरीक्षणे... सुधा मूर्ती या मूळच्या सुधा कुलकर्णी. म्हणजे मराठी नव्हे; कानडी भाषिक. इन्फोसिस या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम संगणक कंपनीचे जनक नारायणमूर्ती यांच्या त्या पत्नी. आपण मराठी माणसं जरासं दक्षिणी वळणाचं नाव दिसलं की ‘मद्रासी’ कंवा ‘साऊथ इंडियन’ असा एक शेरा मारून मोकळे होतो. प्रत्यक्षात दक्षिण हिंदुस्थानात कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र आणि केरळ असे चार प्रांत आहेत. तिथल्या भाषा वेगवेगळ्या आहेत. किंबहुना कोटेकोरपणे बोलायचं तर आपला महाराष्ट्रही दक्षिण हिंदुस्थानातच मोडतो ही सगळी वस्तुस्थिती आपल्या गावीही नसते. तर सुधा मूर्ती या कन्नड भाषिक असून स्वत: अव्वल दर्जाच्या सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. इन्फोसिसच्या उत्तुंग यशात आपल्या पतीइतकाच त्यांचाही वाटा आहे. अलीकडे त्या समाजकार्य आणि लेखनाकडे वळल्या आहेत. वेगवेगळ्या इंग्रजी नियतकालिकांमधून त्यांचे स्तंभ नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांचे लेखन लोकप्रिय आहे. श्रीमंताच्या बायकांना वेळ घालवण्यासाठी समाजकार्य करणं आणि इंग्रजीतून(च) लेखन करणं यात नवीन काहीच नाही. हा ब्रिटिश मडमांचा वारसा आहे. आपल्याकडे त्यांची ‘अतिविशाल महिला मंडळ’ म्हणून टिंगल होत असते. पण सुधा मूर्तीचे काम आणि लेखन या दोहोंची जातकुळी वेगळी आहे. एकतर त्या श्रीमंत नवऱ्याची कर्तृत्वशून्य बायको नाहीत. उलट प्रचंड गुणवत्ता आणि प्रचंड कर्तबगारी गाजवून आता त्या सामाजिक कार्यात उतरल्या आहेत. अशा लोकांचं लक्ष बहुधा कायम युरोप-अमेरिकेकडे लागलेलं असतं. तिथलं ते सगळं चांगलं नि इथलं ते सगळं टाकाऊ अशी त्यांची धारणा असते. सुधा मूर्तींची इथल्या समाजासाठी काहीतरी काम करण्याची भावना, तळमळ अस्सल आहे. त्या कामाला त्यांनी पाश्चिमात्त्य पद्धतीच्या शिस्तीची योजनाबद्धतेची उत्तम जोड दिल्यामुळे सोन्याला सुगंध लाभला आहे. या सामाजिक कार्यात सतत येणाऱ्या कडू-गोड गमतीदार अनुभवांवरच त्या सतत लिहित असतात. प्रस्तुत ‘पुण्यभूमी भारत’ हे अशाच अनुभवकथांचं अतिशय वाचनीय पुस्तक आहे. हिंदुस्थानला जगाचं लघुरूप (मिनिएचर ऑफ दि वर्ल्ड) म्हटलं जातं. जगातल्या सर्व प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्ती इथे आढळतात. टोकाची बदमाशगिरी आणि टोकाचा प्रामाणिकपणा, आत्यंतिक श्रीमंती आणि आत्यंतिक दारिद्र्य, अस्सल साधू आणि पक्के भोंदू असे सर्व मानवी नमुने इथे सापडतात. सुधाबार्इंच्या अनुभवकथांमधून त्यांच्या स्वत:च्या सुंदर भाष्यासह ते आपल्यासमोर येतात. त्या भाष्यामधून आपल्या हेही लक्षात येतं की, लेखिकेची काही चिरंतन अशा मानवी मूल्यांवर दाट श्रद्धा आहे आणि काळ कितीही बदलला तरी ही मूल्यं अचल, अढळ, शाश्वत अशीच राहणार आहेत. ती मूल्यंच चांगलं जीवन जगू पाहणाऱ्यांना आत्मबळ देणार आहेत. हिंदुस्थान ही पुण्यभूमी असल्याचा हाच तर निकष आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more