BERNIE SIEGEL

About Author


HE WANTS TO BE ADDRESSED AS BERNIE. HE PRACTICED AS A GENERAL AND PEDIATRIC PHYSICIAN IN NEW HAVEN, CONNECTICUT UNTIL 1989. IN 1978, HE STARTED PRESENTING ON THE THEME OF EMPOWERING PATIENTS AND FACING DEATH WITH PEACE OF MIND WHILE ENJOYING LIFE. HE FOUNDED A GROUP OF EXCEPTIONAL CANCER PATIENTS CALLED CAREFRONTATION-CARE & CONFRONTATION.

स्वत:ला ‘बर्नी’ या नावाने संबोधित केले जावे असे त्यांना वाटते. न्यू हेवन येथील कनेक्टिकट येथे १९८९ पर्यंत जनरल व लहान मुलांचे चिकित्सक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७८ मध्ये त्यांनी रुग्णांचे सशक्तीकरण व जीवनातील आनंद घेत शांत चित्ताने मृत्यूला सामोरे जाणे या विषयावर मांडणी करायला सुरुवात केली. त्यांनी ‘केअरफ्रन्टेशन’ (CAREFRONTATION-CARE & CONFRONTATION) नावाने कर्करोग झालेल्या अपवादात्मक रुग्णांच्या गटाची स्थापना केली. बर्नी यांची ज्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा आहे ते तत्त्वज्ञान त्यांनी वैद्यकीय नीतिमत्ता व अध्यात्मिक बाबींमुळे गोंधळून गेलेल्या समाजासमोर ठेवले. त्यांची १९८६ साली ‘लव्ह, मेडिसिन अ‍ॅण्ड मिरॅकल्स’, १९८९ साली ‘पीस, लव्ह अ‍ॅण्ड हीलिंग’, १९९३ साली ‘हाऊ टू लिव्ह बिट्विन ऑफिस व्हिजिट्स’ आणि १९९८ साली ‘प्रिस्क्रीप्शन फॉर लिव्हींग’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांद्वारे आजारातून बरे होणे या विषयांवरील नवीन संकल्पना त्यांनी सादर केल्या आहेत. आता बर्नी आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणात मानवतावादी दृष्टिकोन आणण्यासाठी झटत आहेत. ते व त्यांची पत्नी बॉबी सध्या या विषयावर व्याख्यान देणे, कार्यशाळा आयोजित करणे याबद्दलचे तंत्र व अनुभव सर्वांसमोर आणणे यासाठी अविरत प्रवास करीत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
LOVE, MEDICINE & MIRACLES Rating Star
Add To Cart INR 250
PEACE, LOVE & HEALING Rating Star
Add To Cart INR 320
PRESCRIPTIONS FOR LIVING Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more