BERNIE SIEGEL

About Author


HE WANTS TO BE ADDRESSED AS BERNIE. HE PRACTICED AS A GENERAL AND PEDIATRIC PHYSICIAN IN NEW HAVEN, CONNECTICUT UNTIL 1989. IN 1978, HE STARTED PRESENTING ON THE THEME OF EMPOWERING PATIENTS AND FACING DEATH WITH PEACE OF MIND WHILE ENJOYING LIFE. HE FOUNDED A GROUP OF EXCEPTIONAL CANCER PATIENTS CALLED CAREFRONTATION-CARE & CONFRONTATION.

स्वत:ला ‘बर्नी’ या नावाने संबोधित केले जावे असे त्यांना वाटते. न्यू हेवन येथील कनेक्टिकट येथे १९८९ पर्यंत जनरल व लहान मुलांचे चिकित्सक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७८ मध्ये त्यांनी रुग्णांचे सशक्तीकरण व जीवनातील आनंद घेत शांत चित्ताने मृत्यूला सामोरे जाणे या विषयावर मांडणी करायला सुरुवात केली. त्यांनी ‘केअरफ्रन्टेशन’ (CAREFRONTATION-CARE & CONFRONTATION) नावाने कर्करोग झालेल्या अपवादात्मक रुग्णांच्या गटाची स्थापना केली. बर्नी यांची ज्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा आहे ते तत्त्वज्ञान त्यांनी वैद्यकीय नीतिमत्ता व अध्यात्मिक बाबींमुळे गोंधळून गेलेल्या समाजासमोर ठेवले. त्यांची १९८६ साली ‘लव्ह, मेडिसिन अ‍ॅण्ड मिरॅकल्स’, १९८९ साली ‘पीस, लव्ह अ‍ॅण्ड हीलिंग’, १९९३ साली ‘हाऊ टू लिव्ह बिट्विन ऑफिस व्हिजिट्स’ आणि १९९८ साली ‘प्रिस्क्रीप्शन फॉर लिव्हींग’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांद्वारे आजारातून बरे होणे या विषयांवरील नवीन संकल्पना त्यांनी सादर केल्या आहेत. आता बर्नी आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणात मानवतावादी दृष्टिकोन आणण्यासाठी झटत आहेत. ते व त्यांची पत्नी बॉबी सध्या या विषयावर व्याख्यान देणे, कार्यशाळा आयोजित करणे याबद्दलचे तंत्र व अनुभव सर्वांसमोर आणणे यासाठी अविरत प्रवास करीत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
LOVE, MEDICINE & MIRACLES Rating Star
Add To Cart INR 250
PEACE, LOVE & HEALING Rating Star
Add To Cart INR 320
PRESCRIPTIONS FOR LIVING Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more