* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983685
  • Edition : 5
  • Publishing Year : 1994
  • Weight : 190.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THOSE WHO KNOW THE VALUE OF GRAINS VERY MUCH, THEY PICK `SAR WA`. AFTER THE HARVEST OF PLAYS, NOVELS, SHORT STORIES, FINE ARTICLES, THE WRITER REMAINS WITH THE `SARA WA`. I WAS SAYING THAT YOU SHOULD SHOW PERSISTENCE TO PICK IT UP. WHATEVER IS COLLECTED IS PASA-KUDTA. GRAINS WILL COME OUT OF IT, PEBBLES AND SOIL WILL ALSO COME OUT. THIS ALSO COMES IN SARVAYA.
आपल्याकडं आता दोन प्रकारचे वाचक आहेत. एक शहरी वाचक आणि दुसरा ग्रामीण वाचक. ग्रामीण भागातल्या लोकांना काही शहरी शब्द परिचयाचे नसतात आणि शहरी लोकांना ग्रामीण शब्द परिचयाचे नसतात. ‘स र वा’ हा शब्द शहरी लोकांच्या माहितीचा नाही. कोरडवाहू जमिनीत भुईमूग, हरभरा, गहू असलं पीक निघाल्यावर काही शेंगा जमिनीत राहतात; काही लोंब्या, काही घाटे राहतात. ते वेचणं म्हणजे ‘स र वा’ वेचणं. ज्यांना धान्याचं मोल फार कळलेलं असतं, ते ‘स र वा’ वेचतात. नाटक, कादंबरी, लघुकथा, ललित लेख यांचं पीक निघाल्यावर लेखकापाशी ‘स र वा’ पडलेला राहतो. तो वेचण्याची चिकाटी दाखवावी, असं मी म्हणत होतो. जे काही गोळा झालं, ते म्हणजे पसा-कुडता. त्यात दाणे निघतील, खडे-मातीही निघेल. सरव्यात हेही येतंच.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarNiren Apte

    पुणे आकाशवाणीमध्ये नाग आला आणि तो मारायला आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी व्यंकटेश माडगूळकरांना बोलावलं.... माडगूळकर बांबूच्या जंगलात हरवले. दूरदूरपर्यंत कोणी दिसेना, रात्र जंगलात काढायची वेळ आली. पण एका वाटेवर गायीचं शेण दिसलं आणि त्यावरून त्यांनी जवळच्य गावाचा रास्ता शोधला. माडगूळकरांनी एकदा अरण्यवाचन केलं. संपूर्ण रान वाचून आपल्यासमोर उभं केलं. हे सगळं वर्णन वाचायचं असेल तर त्यांचं " सरवा" पुस्तक वाचायला हवं. पुस्तकाचं नाव सरवा ठेवलं आहे. कारण शेत तोडून झाल्यावर खाली जे दाणे, पीक उरतात त्याला सरवा म्हणतात. माडगूळकरांनी विपुल लेखन केलं. त्यातून जे उरलं ते त्यांनी `सामना` दैनिकाची लिहिलं आणि त्याचं हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात प्राणी, वनस्पती ह्यांची अनेक निरीक्षणे आहेत आणि सोबत माणूसही वाचला आहे. त्यामुळे हे पुस्तक एकदा तरी वाचायला हवे. ...Read more

  • Rating StarSmita Patil

    पुस्तक हाती आलं तेव्हा कुतूहलाने `स र वा` हा शब्द नकळतच अनेकवेळा उच्चारावा असा मोह झाला. `सरवा` चा अर्थ तर फारच सुरेख आहे. अनभिज्ञ असलेले अनेक शब्द पुस्तकात गवसले. अर्थ आणि संदर्भासह शब्द संचय समृद्ध करणारं सुंदर पुस्तक.

  • Rating StarRam Bodewar

    ग्रामीण शब्दांचा रानमेवा भरभरुन भरलाय "सारव्यात" जणू वाणीचा हुरडाच.

  • Rating StarSiddheshwar Ashok Tapkir

    भुईमूग,हरभरा,गहू या पिकांची काढणी झाल्यानंतर,अन्नधान्याचे मोल जाणलेला शेतकरी सरवा करतो.म्हणजेच मागे राहिलेल्या भुईमुगाच्या शेंगा,गव्हाच्या लोम्बया, हरभर चे घाटे याची वेचणी करतो. लेखक व्यंकटेश माडगुळकर यांनीही त्यांच्या अनुभवाचा स र वा आपल्यासमोर मांला आहे,जो कि खूप वाचनीय,अंतर्मुख करणारा आहे. आकाशवाणी त नोकरी करत असताना आलेले अनुभव,निसर्गाशी जडलेली मैत्री यासंबंधीचे वर्णन खूप आनंददायी आहे.आकाशवाणी त श्री म माटे आले असता त्यांनी काढलेले उद्गार "बोलवत जा असं अधी मधी मीठ मिरचीची सोय होते"आपले मन हेलावून टाकतात. गडधू, सादील,नसरणी,अजूरा यासारख्या अनोळखी शब्दाची लेखकाला झालेली ओळख आपल्यालाही समृद्ध करते. जॉर्ज ऑर्वेल(मूळ नाव एरीक ब्लेअर)यांच्या अनुभवांचा त्यांनी अनुवाद केला आहे.त्यातील `फाशी `हा अनुभव मृत्यू व जीवन यातील सीमारेषा किती धूसर आहे याची जाणीव करून देतो. पक्षांचा आवाज ऐकणे,झाडांच्या पानांची सळसळ ऐकणे,उगवता सूर्य पाहणे यासाठी आपण कधी आवर्जून वेळ दिला? आपण यंत्रवत जगत असून मनाने निबर होत चाललो आहोत याची जाणीव`अरण्यवाचन` `सकाळी उठोनी` हे अनुभव वाचल्यावर होते. स र वा आवर्जून वाचा ,व्यंकटेश माडगुळकर व जॉर्ज ऑर्वेल यांना भेटल्याचा जीवन समृद्ध करणारा अनुभव मिळेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.