* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEST KEPT SECRET
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789386745002
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 416
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 32 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"BEST KEPT SECRET: BOOK THREE OF THE CLIFTON CHRONICLES IS THE THIRD INSTALLMENT IN THE MUCH ACCLAIMED SERIES, THE CLIFTON CHRONICLES, 1945 BY JEFFREY ARCHER. ARCHER DECIDES TO ENTHRALL HIS READERS WITH YET ANOTHER ONE OF HIS WRITING AND HE DOES IT SO MAGNIFICENTLY. THE BOOK STARTS OFF WITH A VOTE TO DETERMINE THE FATE HARRY CLIFTON AND GILES BARRINGTON, AS TO WHO WILL INHERIT THE FAMED BARRINGTON FORTUNE. THE VOTING COMES TO AN END WITH A TIE THAT SERVES AS A CATALYST TO THE DISASTER THAT IS SLOWLY BUT SURELY BREWING. WITH A LONG SHADOW CAST ACROSS THEIR LIVES, HARRY CLIFTON AND GILES BARRINGTON STRUGGLE TO FIND A SOLID FOOTING IN THEIR OWN RESPECTIVE LIVES. HARRY LEAVES FOR AMERICA IN AN ACT OF PROMOTING HIS NEW NOVEL, WHILE HIS WIFE EMMA EMBARKS ON A JOURNEY OF HER OWN, TO FIND THE LITTLE GIRL WHO WAS ABANDONED AT HER FATHER`S OFFICE THE NIGHT OF HIS KILLING. WHEN THE GENERAL ELECTION ANNOUNCEMENT IS MADE, GILES BARRINGTON IS SHOCKED TO FIND THAT SEBASTIAN CLIFTON, HARRY AND EMMA`S SON, IS THE OPPONENT. THE CONSERVATIVES HAVE PUT HIM AGAINST AND ULTIMATELY HOW THE NEPHEW WILL ALTER HIS UNCLE`S LIFE IS DESCRIBED IN DETAIL. "
"बॅरिंग्टन हे लंडनमधील एक सधन आणि नामवंत घराणं. ह्यूगो बॅरिंग्टन हा त्या घराण्याचा वंशज. गाइल्स आणि एमा ही त्याची दोन अपत्यं. हॅरी क्लिप्टन हा ह्यूगोचा अनौरस मुलगा. ह्यूगोची झालेली हत्या, हॅरी क्लिप्टन आणि एमा बॅरिंग्टन यांच्या लग्नाला चर्चने केलेली मनाई, ह्यूगोच्या हत्येनंतर बॅरिंग्टन घराण्याच्या वारसाबाबत न्यायालयात उभा राहिलेला वाद, या प्रकरणात गाइल्सच्या बाजूने लागलेला निकाल, त्यानंतर हॅरी व एमाचा झालेला विवाह, त्यानंतर त्यांच्या मुलाचा सॅबेस्टियनचा जन्म, ह्यूगोच्या एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी जेसिका हिला एमा आणि हॅरीने दत्तक घेणे, यथावकाश सॅबेस्टियनचा तारुण्यात प्रवेश, गाइल्सचा निवडणुकीत विजय, एमा आणि गाइल्सच्या आईचा एलिझाबेथचा मृत्यू, मृत्यूसमयी तिने हॅरीच्या हातात दिलेला लिफाफा, खट्याळ पण अतिशय हुशार असणारा सेबॅस्टियन एका डॉनच्या जाळ्यात सापडणं, डॉनचा सज्जन मुलगा ब्रूनोशी सेबॅस्टियनची चांगली मैत्री होणं, सेबॅस्टियनकडून आपल्या बनावट नोटा रोदिनने बनवलेल्या एका पुतळ्यातून इंग्लंडमध्ये आणण्याचा बेत डॉनने रचणं, सेबॅस्टियनला याची कल्पनाच नसणं, या बेताचा सुगावा पोलिसांसहित हॅरी, एमा आणि गाइल्सलाही लागणं, त्याच वेळी सेबॅस्टियनाला केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमीही सर्वांना समजणं अशा नाट्यपूर्ण घटनांसाठी आणि डॉन या बनावट नोटा इंग्लंडमध्ये आणण्यात यशस्वी होतो का, डॉनच्या तावडीतून सुटून सेबॅस्टियन आपल्या आई-वडिलांचे केंब्रिज विद्यापीठात त्याने शिक्षण घ्यावे हे स्वप्न पूर्ण करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’ हे पुस्तक वाचलं पाहिजे. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
JEFFREY ARCHERM SECRET# HUGO BARRINGTON# GILES BARRINGTON# EMMA BARRINGTON# HARRY CLIFTON# SEBASTIAN# LONDON# JESSICA# NEW YORK BESTSELLER3 DON PEDRO MARTINEZ# THE THINKER# GENERAL ELECTIONS# RODIN STATUE# AUCTION# SHARES# BOOKS # BEST KEPT SCCRET #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarBhagwatkinkar AakashRajnath

    कादंबरीचा तिसरा भाग होता तरीही सुरुवातीला काही कळले नाही पण जेव्हा वाचायला सुरू केले तेंव्हा जेफ्री आर्चर हा सिद्धहस्त लेखक का आहे ते कळाले. त्याचे जवळजवळ सर्वच साहित्य वाचून काढले, केवळ अप्रतिम.

  • Rating StarLOKPRABHA 05-10-2018

    रहस्य आणि थरार... काल्पनिक इंग्रजी साहित्याच्या दुनियेत जेफ्री आर्चर या नावाला लोकप्रियतेचं वलय आहे. वाचकांना गुंगवून टाकणारं कथानक, केवळ शब्दचित्रांतून डोळ्यांसमोर सहज उभी राहणारी पात्रे, सत्यघटना वाटावी अशा पद्धतीने ऐतिहासिक घडामोडीचा केलेला कल्पनविस्तार आणि कथाकथनाची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे आर्चर यांची प्रत्येक कादंबरी वाचकपसंतीच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी राहिली. प्रेम, द्वेष, ईर्षा, असूया, धैर्य आणि नैतिकता या मानवी भावभावनांची सांगड असलेल्या आणि नातेसंबंध, अर्थकारण, राजकारण यांची अचूक गुंफण घेऊन जन्माला आलेल्या आर्चर यांच्या कादंबऱ्या ‘बेस्टसेलर’ ठरतात. ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ ही याच धाटणीची कादंबरी. ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ या मालिकेतील हा तिसरा भाग. इंग्रजीत पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा मराठी अनुवाद काही महिन्यांपूर्वीच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला. लीना सोहोनी यांनी मराठीतून मांडलेली ही कादंबरी म्हणजे थरारप्रेमी मराठी वाचकांनी वाचावे असे पुस्तक आहे. एकूण सात भागांत प्रकाशित झालेल्या ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ मधून क्लिफ्टन आणि बॅरिग्टन या दोन कुटुंबाचा १९२० ते १९९२ या कालखंडातील प्रवास आर्चर यांनी वाचकांसमोर मांडला आहे. एका गोदी कामगाराचा मुलगा असलेला हॅरी क्लिफ्टन आणि ब्रिटिश उमराव कुटुंबात जन्मलेला गाइल्स बॅरिग्टन यांच्या आयुष्याभोवती ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ फिरत राहते. त्यांना केंद्रस्थानी ठेवून ‘ओन्ली टाइम विल टेल’ या पहिल्या भागातून सुरू झालेली ही कथा ‘द सिन्स ऑफ द फादर’ या दुसऱ्या भागात नवीन वळणे घेते आणि त्यातूनच ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ची पार्श्वभूमी तयार होते. त्यामुळे ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ वाचण्यापूर्वी आधीचे दोन भागांतील कथेशी वाचकांचा परिचय होणे गरजेचे आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या हॅरीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याची आई त्याला प्रतिष्ठित आणि महागड्या शाळेत घालते. येथेच हॅरीची भेट गाइल्स बॅरिग्टनशी होते. आडनावातील आद्याक्षरांच्या क्रमामुळे एकमेकांच वसतिगृह सहकारी बनलेले हे दोघे अल्पावधीतच जीवलग मित्र बनतात. गरीब-श्रीमंतीची मोठी दरीही त्यांच्या मैत्रीच्या आड येत नाही. इतकंच काय पुढे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गाइल्सची बहीण एम्मा हॅरीच्या प्रमात पडते आणि दोघे विवाहबंधनात अडकण्याचा निर्णयही घेतात. पण त्याच वेळी हे कथानक धक्कादायक वळण घेतं. ‘गाइल्सचा पिता ह्युगो याच्याशी आपला विवाहपूर्व शरीरसंबंध झाला होता. त्यामुळे तो कदाचित हॅरीचा पिता असू शकतो.’ असा गौप्यस्फोट हॅरीची आई मेसी करते आणि हॅरी-एम्माच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. हताश झालेला हॅरी पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याच्या तयारीसाठी एका अमेरिकन जहाजावर नोकरीस जातो. पण शत्रूच्या हल्ल्यामुळे त्या जहाजाला जलसमाधी मिळते. हॅरीचा मृत्यू झाल्याचे त्याच्या आईला कळविण्यात येते. मात्र प्रत्यक्षात हॅरी जहाजावरील दुसऱ्या एका सहकाऱ्याची ओळख धारण करून अमेरिकेत जातो. इकडे ब्रिटनमध्ये हॅरीशी झालेल्या शरीरसंबंधातून एम्मा मुलाला सेबेस्टीयनला जन्म देते. हॅरीचा मृत्यू झाला असावा, ही कल्पना सहन होत नसल्याने ती त्याचा शोध घेऊ लागते आणि तो शोध तिला अमेरिकेला हॅरीपर्यंत घेऊन जातो. दरम्यानच्या काळात सहकाऱ्याच्या गुन्ह्यासाठी हॅरीला झालेली अटक, तुरुंगात त्याने लिहिलेले पुस्तक, त्या पुस्तकाला भलत्याच व्यक्तीच्या नावाने मिळालेली प्रसिद्धी अशा घडामोडी घडत राहतात. हॅरी आणि एम्मा एकत्र आल्यानंतर ‘सारे काही सुमंगल झाले’ अशी परिस्थिती असतानाच गाइल्सचा पिता ह्युगो याचा मृत्यू होतो आणि ‘हॅरीचा पिता कोण’ हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. वारसाहक्कानुसार ह्युगोची मालमत्ता आणि उमरावपद गाइल्सच्या आधी जन्माला आलेल्या हॅरीला मिळावे, असा सूर एका गटाकडून उमटू लागतो. दोन कुटुंबातील हा पेच ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचतो. ब्रिटिश संसदेने गाइल्सला ह्युगोचा वारसदार ठरवल्यानंतर आधीच्या दोन भागांतील हे कथानक ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ या भागात प्रवेश करते. गाइल्स हा ब्रिटिश संसदेत मजूर पक्षाचा खासदार बनला आहे. गाइल्स ह्युगोचा खरा वारस ठरल्यामुळे हॅरीवरील ‘अनौरस पुत्र’ असल्याचा कलंक मिटला आहे. आता तो एक प्रथितयश लेखक बनला आहे. त्याच्याशी लग्न झाल्यानंतर एम्मा बॅरिग्टन कुटुंबाच्या जहाज उद्योगाची प्रमुख बनली आहे. आधीच्या भागात केंद्रस्थानी असलेल्या या पात्रांचे आयुष्य सरळमार्गी जात असल्याने हॅरी-एम्माचा मुलगो सेबेस्टीयनचे आयुष्य ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’च्या केंद्रस्थानी येते. सेबेस्टीयनचे शालेय शिक्षण आणि किशोरवयात त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग तिसऱ्या भागातील ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ पुढे नेतात. पण या कथानकातही अनेक चढउतार, थरार, रहस्ये आहेत. सेबेस्टियनच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगापर्यंत हे कथानक येऊन ठेपते आणि ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चा तेथे समारोप होतो. आधीच्या दोन भागांमध्ये ब्रिटिश परंपरा, नैतिक मूल्यांचे पालन करणारी पात्रे, समाज यांचे चित्रण होते. तर ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’मध्ये गुन्हेगारी, शहकाटशह, आर्थिक लोभ, द्वेष यांचे दर्शन घडते. गाइल्सची घटस्फोटीत पत्नी व्हिक्टोरिया, सेबेस्टियनच्या जीवलग मित्राचा पिता डॉन पेड्रो मार्टिनेझ, शाळेत असतानापासून हॅरीचा द्वेष करणारा मेजर अ‍ॅलेक्स फिशर ही पात्रे क्लिफ्टन-बॅरिग्टन कुटुंबासमोर नवीन आव्हाने, अडचणी उभ्या करतात. त्यातून ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चे कथानक उभारी घेते. खरंतर ही दोन्ही कुटुंब पूर्णत: काल्पनिक आहेत. मात्र आर्चर यांनी अशाप्रकारे त्यातील पात्रे उभी केली आहेत की, हा सारा खराखुरा इतिहास असावा इतपत वाचक भारून जातात. कथाकथनामध्ये आर्चर यांचा हातखंडा आहे आणि ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’मध्ये पानोपानी तो दिसून येतो. एका गोदी कामागाराच्या मुलाच्या आयुष्यापासून सुरू झालेले हे कथानक तस्करीच्या जाळ्यात पसरलेल्या त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत कसे येऊन ठेपते, हे जाणून घ्यायचे असेल तर ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ वाचायलाच हवे. जेफ्री आर्चर यांच्या मूळ कादंबरीतील सहजसोपी शैली लीना सोहोनी यांच्या अनुवादातूनही जाणवते. इंग्रजी लेखकाने हटकून वापरलेल्या शब्दांचा अचूक अर्थ निवडून त्या प्रसंगात चपखल बसतील अशा शब्दांचा वापर सोहोनी यांनी केला आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर होताना अनेकदा अचूक शब्दांच्या अभावामुळे किंवा अनुवादकाच्या मर्यादांमुळे मूळ कादंबरीचा रसभंग होतो. सुदैवाने ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चा अनुवाद वाचताना तो अनुभव येत नाही. –असिफ बागवान ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 22-04-2018

    जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली ही कादंबरी. ‘द क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ या त्यांच्या कादंबरी मालिकेतला हा तिसरा भाग. बॅरिंग्टन आणि क्लिफ्टन या घराण्यांमधली गुंतागुंत, प्रचंड संपत्तीच्या वारशाचा वाद, अनेक घटना-घडामोडी, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असा सगळा मालमसालाठासून भरलेली ही कादंबरी. जेफ्री आर्चर नेहमी एकेक धक्के देत, मूळ कथेला वळणं देत वाचकांना खिळवून ठेवतात. त्याचं प्रत्यंतर देणारी ही कादंबरी. लीना सोहोनी यांनी तिचा अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more