* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989533
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 180
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
  • Discount : RAJBHASHA DIVAS(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
“WHO KILLED YOU? TAKE A NEAT LOOK; TELL ME WHAT YOU CAN SEE IN YOUR PREVIOUS BIRTH?” “AHHH..! MY STOMACH… THE SICKLE IS ENCIRCLING MY WAIST, THE POINTED END IS DIGGING INTO MY STOMACH, THE PAIN… IT IS UNBEARABLE…GOSH! SO MUCH BLOOD…HOW CAN IT BE?” “WHO KILLED YOU, TELL ME SHAGIRD… “I AM SCREAMING…RAJA…” “DID RAJA KILL YOU?” “NO, HE IS STEADYING ME. HE IS TERRIBLY SCARED. HIS FACE IS DISTORTED WITH PAINS… HE IS CRYING… THESE ARE MY LAST FEW MOMENTS…HE IS STANDING IN FRONT OF ME. I AM STARING AT HIM… CONTINUOUSLY.” “WHO IS HE? IS HE AROUND IN THIS BIRTH AS WELL?” “YES.” “DO YOU KNOW HIM?” “SPEAK UP SHAGIRD.” “THE WHITE KUMKUM ON HIS FOREHEAD…IS BECOME BLOODY, HE IS TRYING TO WIPE THE BLOOD, NOW IT IS REVEALING THE BLACK AND WHITE MARK ON HIS FOREHEAD…HE IS KRISHNA.” “NO, THIS IS IMPOSSIBLE, KRISHNA LOVES YOU, I MEAN HE LOVES INDU. HE WON’T BE DOING ANYTHING LIKE…” “YES, IT IS HIM… SURELY. HE IS HERE IN THIS BIRTH AS WELL.” “NO, THIS IS NOT POSSIBLE. HOW CAN HE BE AROUND IN THIS BIRTH?” “YES, HE IS. THE BLACK AND WHITE MARK IS PRESENT ON HER FOREHEAD IN THIS BIRTH.” SHAGIRD, ENOUGH! COME, GET UP, GET UP…”
‘कोणी, कोणी मारलं तुला? काय दिसतंय तुला सांग... नीट बघ तुझ्या पूर्वजन्मात...’ ‘आईगंऽऽ! माझ्या पोटात, माझ्या नाजूक कमरेला कोयत्याचा विळखा पडलाय... त्याचं धारदार टोक माझ्या पोटात रुततंय... वेदना... कळा... आईगं... रक्ताची चिळकांडी... धार...’ ‘कोणी मारलं तुला सांग... सांगशागीर्द...’ ‘मीविंÂ काळी फोडली... राजाऽऽ’ ‘राजानं मारलं?’ ‘नाही. त्यानं धरलं मला. तो घाबरलाय. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना... तोरडतोय... मी माझे शेवटचे क्षण... समोर तो उभा आहे. मी त्याच्याकडे बघत्येय. एकटक. रोखून...’ ‘कोण आहे? आत्ता ह्या जन्मातही आहे तो?’ ‘हो’ ‘तू ओळखतोस?’ ‘हो’ ‘सांगशागीर्द...’ ‘त्याचा पांढरा टिळा.. रक्तानं माखला आहे. तो ते रक्त पुसतोय. त्या टिळ्याखाली एक काळा-पांढरा डाग दिसतोय... तो कृष्णा आहे.’ ‘शक्य नाही. कृष्णाचं तुझ्यावर... म्हणजे इंदूवर प्रेम आहे. तो तसं नाही...’ ‘त्यानंच... त्यानंच. तोे या जन्मातही आहे...’ ‘नाही. शक्य नाही. तो या जन्मात कसा असणार...?’ ‘आहे. त्याच्या कपाळा वरचा तो काळा डाग याही जन्मात तिच्या कपाळावर आहे...’ ‘पुरे. शागीर्द. जागाहो... जागाहो... जागा...’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UTKHANAN #UTKHANAN #उत्खनन #FICTION #MARATHI #SWATICHANDORKAR #स्वातीचांदोरकर "
Customer Reviews
  • Rating StarVinamra Bhabal

    `उत्खनन` म्हणजे गतजन्म. पूर्वजन्म खणून काढल्यामुळे होणारे परिणाम. प्रत्येक संत, ज्ञानी असं सांगतात की, हा आताचा क्षण महत्वाचा. तो पूर्णपणे जगा, कारण पुढचा क्षण तुमचा असेलच असं नाही. मग नक्की काय पाळायचं ? गतजन्माची सफर आणि त्यामुळे ढवळून गेलेला आज की फक्त हाच क्षण ? - Swati Chandorkar हे पुस्तक म्हणजे मानवी मनाच्या पूर्वजन्मातील आठवणींवर आधारित असे उत्खनन आहे. या पुस्तकाच्या वाचनाने, अभ्यासाने, प्रत्येक मनाची कवाडे उघडतील; इतकेच नव्हे, तर स्वतःबाबत एक वेगळीच व विस्तृत अशी जाणीव प्रत्येकाला होईल. आपले अनेक पुनर्जन्म तर होणारच आहेत; परंतु, आपल्याला सध्या फक्त या जन्मातली भूमिका नीट जगायची आहे, हे ध्यानात येईल. या जन्मातली दुःखे, क्लेश, वेदना, आजार याचे मूळ गतजन्मात सापडू शकते; परंतु ते जाणून घेण्याची गरज नॉर्मल (सर्वसामान्य) माणसाला अजिबात नाही. - डॉ. विद्याधर गोपाळ ओक(प्रस्तावनेतून) ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    पूर्वजन्मातील आठवणी… अमेरिकेतील डॉ. ब्रायन वाईज या अमेरिकन सायकिअ‍ॅट्री असोसिएशनच्या माजी अध्यक्षाला स्वत:च्या आयुष्यात शास्त्रापलीकडील अनुभव आल्यामुळे, या विषयावर काही हजार केसेसचे असे प्रचंड संशोधन करता आले आहे. भारतातही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंट हेल्थ या सरकारी संस्थेमधील डॉ. पासरिचा यांनी ५०० भारतीय केसेस तपासल्या आहेत आणि अशासारख्या अभ्यासामधून पास्ट लाईफ रिग्रेशन (पूर्वजन्म अवलोकन) पद्धती विकसित झाली आहे. या पद्धतीमध्ये माणसाला हिप्नॉसिस (संमोहन) या पातळीपेक्षा थोडे जास्त खोलवर नेले जाते, आणि मात्र कोणाची जन्माचे दार केव्हा उघडेल, हे सांगता येत नाही. म्हणून जन्माशी निगडीत आजार असेल त्या जन्माचे दार उघडण्यासाठी बराच काळ थांबावे लागू शकते. या जन्मातील परिस्थिती माणसाला प्रत्यक्ष दिसते. आठवणी जाग्या होतात, पूर्वानुभवाचे स्मरण होते आणि सध्याच्या जन्मातील आजाराचे पूर्वजन्मातील कारण कळू शकते... कळतेच असेही नाही. जगातील अनेक माणसांनी या पद्धतीचा उपयोग करून सध्याच्या जन्मातील आजाराचे निराकरण करून घेतले आहे म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन (पूर्वजन्म अवलोकन) ही उपचार पद्धती खरी आणि उपयुक्त आहे. हे पुस्तक म्हणजे मानवी मनाच्या पूर्वजन्मातील आठवणींवर आधारित असे उत्खनन आहे. माणसाचे मन म्हणजे अथांग समुद्र. त्यामध्ये काय काय व किती सामावलेले असेल, याचा पत्ताही कुणाला लागत नाही. मात्र काही ज्ञानी (आणि डॉक्टर नसलेल्या) लोकांनी स्वत:चेच काय, पण इतर कुणाचेही पूर्वजन्म उलगडून पाहण्याची विद्या अवगत केली आहे, असा दावा भारतात केलेला दिसतो. ‘ध्यानावस्थेत गेले की त्यांना कुणाचेही पूर्वजन्म कळतात, असे म्हणतात. हे कितपत खरे आहे. ते अनेकांना स्वानुभव आल्याशिवाय ठरवणे कठीणच. पण या पुस्तकात अशी विद्या अवगत झालेल्या विदुषीची उत्कंठावर्धक कहाणी आहे. एका सामान्य व हलाखीच्या अवस्थेतून स्वत: गेलेल्या एका स्त्रीचे एका संताच्या सान्निध्यात आल्यामुळे तशा व्यक्तीमध्ये झालेले परिवर्तन, आणि ते झाल्यानंतरही जिच्या मनामध्ये उठणाऱ्या अनंत मनोतरंगांचे चित्रण आहे. तिला तिच्या पूर्वजन्माचे ज्ञान होते आणि शांत, स्वच्छ होऊ पाहणारे पाणी पुन्हा पुन्हा गढूळ होत राहते. ती इतरांनाही त्यांचे पूर्वजन्म दाखवून त्यांनाही अशांत करते. संत झाला, ज्ञानी झाला, तरी माणूस तो माणूसच राहतो. त्याचे अंतरंग त्याला कळते. इतरांना महान उपदेश करणाऱ्या माणसांमध्येही भावनांचे उसळणारे निद्रिस्त ज्वालामुखी असतात. ते या पुस्तकात दिसतील. शेवटी माणूस स्वत:पासून स्वत:चे खोटे संरक्षण करू शकत नाही, म्हणजेच स्वत:ला फसवू शकत नाही. म्हणूनच शांती ही मानवामध्ये बाहेरून आत जाऊ शकत नाही, तर आतच जागी व्हावी लागते आणि कदाचित, या शांतीच्या महासागरातील पाण्याच्या वजनानेच त्याच्या तळातील ज्वालामुखींना, विझवलेल्या अवस्थेत कायमचे दाबून ठेवावे लागते. अवस्थेपासून अशा शांतीच्या आणि सांसरिक व अटळ अशा परिस्थितीजन्य दु:खांपासून समतोल साधण्याच्या मानवी मनाच्या सर्कसचे प्रभावी असे दर्शन या पुस्तकामध्ये मांडले गेले आहे. पुस्तकाची भाषा सहज-सुंदर आणि जिवंत अशी आहे. आशय अर्थपूर्ण आहे. सगळी पात्रे आपल्यालाही भेटलेली आहेत, असे वाचकांना सतत जाणवेल. पुस्तकात सादर झालेले प्रसंग अतिशय अकृत्रिम, भावनोत्कट आणि परिणामकारक आहेत. माणसानं सध्याचा जन्म जरी जमेल तेवढा समजून घेतला, तरी मोठेच काम झाले. आपण एका कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, मानवतेचा, निसर्गाचा, आकाशगंगेचा, अनेक आकाशगंगांच्या समुहाचा एक छोटा भाग आहोत हे सत्य. आपण एकटे नाही आणि स्वतंत्रही नाही. तसेच, जगात ‘परमेश्वर’ अशी आपणास भेटू शकणारी शक्ती वा व्यक्ती नाही, ते आपण मानवांनीच वैश्विक अस्तित्वाला दिलेले नाव आहे. आपण स्वत:ही याच वैश्विक अस्तित्वाचा एक भाग असल्यामुळे आपल्यातही परमेश्वर आहे, असे म्हणतात. मात्र आपण ‘आहोत’ ही जाणीव, आणि त्या सकट असलेला या क्षणाचा निसर्ग हे आपले ‘सत्य अस्तित्व’ म्हणजे आपल्याला आपल्यासकट सर्वांचे, सर्व निसर्गाचे जीवन निभवायचे आहे. पर्यायाने, आपण जमेल तेवढा आपल्याकसट जगातील सर्व गोष्टींचा विचार करीत राहिलो. त्यांच्याबद्दल मनात आपुलकी ठेवून त्यांच्या भल्यासाठीही आपले विचार व कृती राखू शकलो. तरच आंतरिक शांतीचा अनुभव आपण घेऊ शकतो. यालाच मनाची तरलता म्हणता येईल. मानवी जीवनात तरी याहून अधिक मौलीक काय असावं! हे एक नवीन विषयाला हात घालणारे सुंदर पुस्तक सौ. स्वाती चांदोरकरांनी लिहिल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन! – डॉ. विद्याधर गोपाळ ओक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो