* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UTKHANAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989533
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 180
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
“WHO KILLED YOU? TAKE A NEAT LOOK; TELL ME WHAT YOU CAN SEE IN YOUR PREVIOUS BIRTH?” “AHHH..! MY STOMACH… THE SICKLE IS ENCIRCLING MY WAIST, THE POINTED END IS DIGGING INTO MY STOMACH, THE PAIN… IT IS UNBEARABLE…GOSH! SO MUCH BLOOD…HOW CAN IT BE?” “WHO KILLED YOU, TELL ME SHAGIRD… “I AM SCREAMING…RAJA…” “DID RAJA KILL YOU?” “NO, HE IS STEADYING ME. HE IS TERRIBLY SCARED. HIS FACE IS DISTORTED WITH PAINS… HE IS CRYING… THESE ARE MY LAST FEW MOMENTS…HE IS STANDING IN FRONT OF ME. I AM STARING AT HIM… CONTINUOUSLY.” “WHO IS HE? IS HE AROUND IN THIS BIRTH AS WELL?” “YES.” “DO YOU KNOW HIM?” “SPEAK UP SHAGIRD.” “THE WHITE KUMKUM ON HIS FOREHEAD…IS BECOME BLOODY, HE IS TRYING TO WIPE THE BLOOD, NOW IT IS REVEALING THE BLACK AND WHITE MARK ON HIS FOREHEAD…HE IS KRISHNA.” “NO, THIS IS IMPOSSIBLE, KRISHNA LOVES YOU, I MEAN HE LOVES INDU. HE WON’T BE DOING ANYTHING LIKE…” “YES, IT IS HIM… SURELY. HE IS HERE IN THIS BIRTH AS WELL.” “NO, THIS IS NOT POSSIBLE. HOW CAN HE BE AROUND IN THIS BIRTH?” “YES, HE IS. THE BLACK AND WHITE MARK IS PRESENT ON HER FOREHEAD IN THIS BIRTH.” SHAGIRD, ENOUGH! COME, GET UP, GET UP…”
‘कोणी, कोणी मारलं तुला? काय दिसतंय तुला सांग... नीट बघ तुझ्या पूर्वजन्मात...’ ‘आईगंऽऽ! माझ्या पोटात, माझ्या नाजूक कमरेला कोयत्याचा विळखा पडलाय... त्याचं धारदार टोक माझ्या पोटात रुततंय... वेदना... कळा... आईगं... रक्ताची चिळकांडी... धार...’ ‘कोणी मारलं तुला सांग... सांगशागीर्द...’ ‘मीविंÂ काळी फोडली... राजाऽऽ’ ‘राजानं मारलं?’ ‘नाही. त्यानं धरलं मला. तो घाबरलाय. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना... तोरडतोय... मी माझे शेवटचे क्षण... समोर तो उभा आहे. मी त्याच्याकडे बघत्येय. एकटक. रोखून...’ ‘कोण आहे? आत्ता ह्या जन्मातही आहे तो?’ ‘हो’ ‘तू ओळखतोस?’ ‘हो’ ‘सांगशागीर्द...’ ‘त्याचा पांढरा टिळा.. रक्तानं माखला आहे. तो ते रक्त पुसतोय. त्या टिळ्याखाली एक काळा-पांढरा डाग दिसतोय... तो कृष्णा आहे.’ ‘शक्य नाही. कृष्णाचं तुझ्यावर... म्हणजे इंदूवर प्रेम आहे. तो तसं नाही...’ ‘त्यानंच... त्यानंच. तोे या जन्मातही आहे...’ ‘नाही. शक्य नाही. तो या जन्मात कसा असणार...?’ ‘आहे. त्याच्या कपाळा वरचा तो काळा डाग याही जन्मात तिच्या कपाळावर आहे...’ ‘पुरे. शागीर्द. जागाहो... जागाहो... जागा...’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UTKHANAN #UTKHANAN #उत्खनन #FICTION #MARATHI #SWATICHANDORKAR #स्वातीचांदोरकर "
Customer Reviews
  • Rating StarVinamra Bhabal

    `उत्खनन` म्हणजे गतजन्म. पूर्वजन्म खणून काढल्यामुळे होणारे परिणाम. प्रत्येक संत, ज्ञानी असं सांगतात की, हा आताचा क्षण महत्वाचा. तो पूर्णपणे जगा, कारण पुढचा क्षण तुमचा असेलच असं नाही. मग नक्की काय पाळायचं ? गतजन्माची सफर आणि त्यामुळे ढवळून गेलेला आज की फक्त हाच क्षण ? - Swati Chandorkar हे पुस्तक म्हणजे मानवी मनाच्या पूर्वजन्मातील आठवणींवर आधारित असे उत्खनन आहे. या पुस्तकाच्या वाचनाने, अभ्यासाने, प्रत्येक मनाची कवाडे उघडतील; इतकेच नव्हे, तर स्वतःबाबत एक वेगळीच व विस्तृत अशी जाणीव प्रत्येकाला होईल. आपले अनेक पुनर्जन्म तर होणारच आहेत; परंतु, आपल्याला सध्या फक्त या जन्मातली भूमिका नीट जगायची आहे, हे ध्यानात येईल. या जन्मातली दुःखे, क्लेश, वेदना, आजार याचे मूळ गतजन्मात सापडू शकते; परंतु ते जाणून घेण्याची गरज नॉर्मल (सर्वसामान्य) माणसाला अजिबात नाही. - डॉ. विद्याधर गोपाळ ओक(प्रस्तावनेतून) ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    पूर्वजन्मातील आठवणी… अमेरिकेतील डॉ. ब्रायन वाईज या अमेरिकन सायकिअ‍ॅट्री असोसिएशनच्या माजी अध्यक्षाला स्वत:च्या आयुष्यात शास्त्रापलीकडील अनुभव आल्यामुळे, या विषयावर काही हजार केसेसचे असे प्रचंड संशोधन करता आले आहे. भारतातही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंट हेल्थ या सरकारी संस्थेमधील डॉ. पासरिचा यांनी ५०० भारतीय केसेस तपासल्या आहेत आणि अशासारख्या अभ्यासामधून पास्ट लाईफ रिग्रेशन (पूर्वजन्म अवलोकन) पद्धती विकसित झाली आहे. या पद्धतीमध्ये माणसाला हिप्नॉसिस (संमोहन) या पातळीपेक्षा थोडे जास्त खोलवर नेले जाते, आणि मात्र कोणाची जन्माचे दार केव्हा उघडेल, हे सांगता येत नाही. म्हणून जन्माशी निगडीत आजार असेल त्या जन्माचे दार उघडण्यासाठी बराच काळ थांबावे लागू शकते. या जन्मातील परिस्थिती माणसाला प्रत्यक्ष दिसते. आठवणी जाग्या होतात, पूर्वानुभवाचे स्मरण होते आणि सध्याच्या जन्मातील आजाराचे पूर्वजन्मातील कारण कळू शकते... कळतेच असेही नाही. जगातील अनेक माणसांनी या पद्धतीचा उपयोग करून सध्याच्या जन्मातील आजाराचे निराकरण करून घेतले आहे म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन (पूर्वजन्म अवलोकन) ही उपचार पद्धती खरी आणि उपयुक्त आहे. हे पुस्तक म्हणजे मानवी मनाच्या पूर्वजन्मातील आठवणींवर आधारित असे उत्खनन आहे. माणसाचे मन म्हणजे अथांग समुद्र. त्यामध्ये काय काय व किती सामावलेले असेल, याचा पत्ताही कुणाला लागत नाही. मात्र काही ज्ञानी (आणि डॉक्टर नसलेल्या) लोकांनी स्वत:चेच काय, पण इतर कुणाचेही पूर्वजन्म उलगडून पाहण्याची विद्या अवगत केली आहे, असा दावा भारतात केलेला दिसतो. ‘ध्यानावस्थेत गेले की त्यांना कुणाचेही पूर्वजन्म कळतात, असे म्हणतात. हे कितपत खरे आहे. ते अनेकांना स्वानुभव आल्याशिवाय ठरवणे कठीणच. पण या पुस्तकात अशी विद्या अवगत झालेल्या विदुषीची उत्कंठावर्धक कहाणी आहे. एका सामान्य व हलाखीच्या अवस्थेतून स्वत: गेलेल्या एका स्त्रीचे एका संताच्या सान्निध्यात आल्यामुळे तशा व्यक्तीमध्ये झालेले परिवर्तन, आणि ते झाल्यानंतरही जिच्या मनामध्ये उठणाऱ्या अनंत मनोतरंगांचे चित्रण आहे. तिला तिच्या पूर्वजन्माचे ज्ञान होते आणि शांत, स्वच्छ होऊ पाहणारे पाणी पुन्हा पुन्हा गढूळ होत राहते. ती इतरांनाही त्यांचे पूर्वजन्म दाखवून त्यांनाही अशांत करते. संत झाला, ज्ञानी झाला, तरी माणूस तो माणूसच राहतो. त्याचे अंतरंग त्याला कळते. इतरांना महान उपदेश करणाऱ्या माणसांमध्येही भावनांचे उसळणारे निद्रिस्त ज्वालामुखी असतात. ते या पुस्तकात दिसतील. शेवटी माणूस स्वत:पासून स्वत:चे खोटे संरक्षण करू शकत नाही, म्हणजेच स्वत:ला फसवू शकत नाही. म्हणूनच शांती ही मानवामध्ये बाहेरून आत जाऊ शकत नाही, तर आतच जागी व्हावी लागते आणि कदाचित, या शांतीच्या महासागरातील पाण्याच्या वजनानेच त्याच्या तळातील ज्वालामुखींना, विझवलेल्या अवस्थेत कायमचे दाबून ठेवावे लागते. अवस्थेपासून अशा शांतीच्या आणि सांसरिक व अटळ अशा परिस्थितीजन्य दु:खांपासून समतोल साधण्याच्या मानवी मनाच्या सर्कसचे प्रभावी असे दर्शन या पुस्तकामध्ये मांडले गेले आहे. पुस्तकाची भाषा सहज-सुंदर आणि जिवंत अशी आहे. आशय अर्थपूर्ण आहे. सगळी पात्रे आपल्यालाही भेटलेली आहेत, असे वाचकांना सतत जाणवेल. पुस्तकात सादर झालेले प्रसंग अतिशय अकृत्रिम, भावनोत्कट आणि परिणामकारक आहेत. माणसानं सध्याचा जन्म जरी जमेल तेवढा समजून घेतला, तरी मोठेच काम झाले. आपण एका कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, मानवतेचा, निसर्गाचा, आकाशगंगेचा, अनेक आकाशगंगांच्या समुहाचा एक छोटा भाग आहोत हे सत्य. आपण एकटे नाही आणि स्वतंत्रही नाही. तसेच, जगात ‘परमेश्वर’ अशी आपणास भेटू शकणारी शक्ती वा व्यक्ती नाही, ते आपण मानवांनीच वैश्विक अस्तित्वाला दिलेले नाव आहे. आपण स्वत:ही याच वैश्विक अस्तित्वाचा एक भाग असल्यामुळे आपल्यातही परमेश्वर आहे, असे म्हणतात. मात्र आपण ‘आहोत’ ही जाणीव, आणि त्या सकट असलेला या क्षणाचा निसर्ग हे आपले ‘सत्य अस्तित्व’ म्हणजे आपल्याला आपल्यासकट सर्वांचे, सर्व निसर्गाचे जीवन निभवायचे आहे. पर्यायाने, आपण जमेल तेवढा आपल्याकसट जगातील सर्व गोष्टींचा विचार करीत राहिलो. त्यांच्याबद्दल मनात आपुलकी ठेवून त्यांच्या भल्यासाठीही आपले विचार व कृती राखू शकलो. तरच आंतरिक शांतीचा अनुभव आपण घेऊ शकतो. यालाच मनाची तरलता म्हणता येईल. मानवी जीवनात तरी याहून अधिक मौलीक काय असावं! हे एक नवीन विषयाला हात घालणारे सुंदर पुस्तक सौ. स्वाती चांदोरकरांनी लिहिल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन! – डॉ. विद्याधर गोपाळ ओक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more