* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667509
  • Edition : 32
  • Publishing Year : FEBRUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : RELIGIOUS & SPIRITUAL FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ARJUN, THE THIRD AMONGST THE PANDAVAS, STANDS FOR HIS SKILL OF ARCHERY AND IS CONSIDERED AS ONE OF THE GREATEST WARRIORS. THE DISTINGUISHED FIGHTER, HOWEVER, FELT CONFUSED WHEN THE FAMOUS MAHABHARAT WAR WAS ABOUT TO BEGIN ON THE BATTLEFIELD OF KURUKSHETRA. HE TURNED TO HIS CHARIOTEER, LORD KRISHNA, FOR ENLIGHTENMENT. THE LORD CLEARED ALL HIS DOUBTS THROUGH THE MOST INSTRUCTIVE AND INTERESTING DISCOURSES THAT CAME TO BE KNOWN AS THE BHAGVAD GITA. THE AUTHOR BELIEVES THAT IN THE PRESENT TIMES OUR POSITION IS NO BETTER THAN ARJUN. WE FACE VARIOUS PROBLEMS IN DAY TO DAY LIFE AND LIKE ARJUN CAN NOT MAKE UP OUR MINDS ON HOW TO SOLVE THEM. IGNORANCE, MISRULE, CORRUPTION, DOUBLE STANDARDS AND MANY SUCH FACTORS MAKE OUR MUNDANE LIFE DIFFICULT. THE AUTHOR DRAWS UP PARALLEL EXAMPLES FROM THE MAHABHARATA AND ATTEMPTS TO OFFER SOLUTIONS. THE TREATMENT OF THE THEMES IN THE ESSAYS IS LIKE THAT OF ART BUCHWALD WHOSE HUMOUR MAKES ONE SMILE AND BE SERIOUS AT THE SAME TIME.
संसार घरच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारख रंगवता येणार नाही का? आपल्या जल्मापूर्वी हे जग होतच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली एंट्री मध्येच केव्हातरी होते आणि एक्झिट हि. हे नाटक किती वर्षाचं, ते माहित नाही चाळीसी, पन्नाशी, साठी, सत्तरी.... सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार कि जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीच वरदान लाभणार, कि मतिमंद? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व,दंभ,लालसा.... किती सांगाव? कृष्णानं बासरीसहित आपल्याला चढवलं; पण त्या सहा छिद्रातून संगीत जन्माला येत नाही. स्वतःला काहीहि कमी नाही. स्वास्थाला धक्का लागलेला नाही. तरी माणस संसार सजवू शकत नाहीत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarAkshay Tajne

    लेखक , कथाकथनकार , आर्किटेक्ट , व्हायोलिन व हामोनियम - वादक , उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर , सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे , सुंदर रस्ता , सुंदर इमारत , सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते . म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या . मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या . विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा , खरं तर त्या कथा नाहीतच , कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत . एका व्यक्तीच्या विचार - आचारांची पद्धत . वपु त्याला ` पॅटर्न ` म्हणायचे . वपुंनी पॅटर्न्स मांडले . जे आपल्यासहित , आपल्या आवती - भोवती दिसतात . आणि म्हणूनच त्या पॅटर्न्सना दाद मिळते . विनोदी कथांमधून हसवता - हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं . ही अशीच जीवनाची तहा आहे , हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं . महाराष्ट्र सरकारनं त्यांना ` उत्तम लेखक ` म्हणून सन्मानित केलं आहे . CONCERN : गीतेतला , महाभारतामधला अर्जुन आणि मी स्वत : किंवा मला भेटणारी प्रत्येक गोंधळलेली व्यक्ती ह्यांत मला फरकच वाटत नाही . कृष्णावतार संपला , तो संपलाच ! अर्जुनाचा वंश विसाव्या शतकापर्यंत चालूच आहे . अर्जुनाच्या शंभर पटीनं धृतराष्ट्राच्या शंभर मुलांचाही वंश तितक्या पटीनं वाढतोय . निवडणुकीच्या तिकिटांच्या रांगेत उभा आहे . ह्या निवडणुकीपुरता तरी श्रीविष्णूंनी ‘ शेषा`ला रजा देऊन कदाचित डनलॉप घेतला असेल आणि शेषन रूपानं शेषाला पाठवला असेल . पुन्हा मत देताना विचारवंतांचा अर्जुन होणार . अर्जुनाला समोर शत्रू दिसेचना ; आप्त दिसले , कारण ते आप्त होतेच . ज्यांना दाखवण्यासाठी सिंहासन मिळवायचं , त्यांनाच मारल्यावर राज्याभिषेक कुणासमोर करायचा ? ...Read more

  • Rating StarYogesh Ugale

    सर्वसाधारणपणे दोन वर्षांपासून हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे. वपुंच्या पुस्तकांचं आकर्षण प्रत्येक मराठी वाचकाप्रमाणे मलाही आहेच. त्या आकर्षणापोटी वपुंच्या इतर पुस्तकांबरोबर हेही पुस्तक मी घेतलं. कथा-कादंबऱ्यांची पुस्तकं पटापट वाचून झाली. परंतु या वैचरिक पुस्तकाला हात घालण्यास मन धजावत नव्हते. एक वर्षापूर्वी ‘प्रेममयी’ वाचलेलं अजून आठवतंय. आकाराने अतिशय छोट्या असणाऱ्या या पुस्तकाच्या पाना-पानावर जीवनाचे अमूल्य तत्वज्ञान खास वपु काळेंच्या साध्या पण थेट मनाला स्पर्श करुन जाणाऱ्या शैलीतून अवतरले आहे.. कथा-कादंबऱ्यांची पुस्तके कधीच वाचून संपवलेली. वाचनाचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. मग ‘आपण सारे अर्जुन’ हाती घेतलं. सुरुवातीला हे आपल्याला पेलवेल का, याविषयी साशंकता होती. परंतु नंतर पुस्तकानेच माझी पकड घेतली. एकेक लेख वाचताना जाणिवा विस्तारताहेत, असं वाटायला लागलं. हे पुस्तक वाचताना मलाही माझ्यातला अर्जुन दिसायला लागला. वपुंची खिळवून ठेवणारी लेखनशैली, साधी भाषा, अतिशय गहन तत्त्वज्ञानाला आयुष्यातील प्रसंगांशी जोडण्याची ताकद, कुठल्याही प्रकारच्या पांडित्याचा आव न आणता प्रामाणिकपणे गीतातत्वांचा घेतलेला वेध आणि आपल्याला अर्जुन बनवणाऱ्या आपल्या आयुष्यातील क्षणांची होणारी जाणीव, ही या पुस्तकाची खास आकर्षणे.. खरंतर एवढं सुंदर पुस्तक याआधीच वाचायला हवं होतं, याचीही खंत वाटत राहिली. जसजसे आपण पाने उलटत जातो, तसतसा आपल्यामधला अर्जुनच आपल्याला वाचनात खिळवून ठेवतो. माणसाला तेच लेखन सर्वाधिक आवडतं, ज्यातून माणसाच्या व्यथांचा-वेदनांचा आविष्कार झालेला असतो. या कसोटीवर ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक शत प्रतिशत खरे उतरते. ओशोंचे अमृतमय विचार समजण्याची ताकद आपल्याला वपुंच्या प्रेममय लेखनशैलीतून मिळते. अन्यथा ओशोंच्या तेजस्वी विचारांचे आकलन होणे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला जवळ जवळ अशक्यच. वपुंच्या बोटाला धरुन चालल्याने हा प्रवास सुकर होतो. या वाटेवर अधूनमधून गुर्जिएफ, जे. कृष्णमूर्तींसारखी हिरवीगार वळणंही येतात. प्रवास सुरु राहतो. आतला अर्जुन डोकावत राहतो. तत्वविचारांचे सिंचन होत राहते. वाचक आणि लेखक एकरुप होऊन जातात.. माझ्या आयुष्यात अशी फार कमी पुस्तके आहेत, की जी मी परत वाचली असतील. कमी म्हणजे अगदी बोटावर मोजण्याइतकीच. त्या पुस्तकांमध्ये ‘आपण सारे अर्जुन’चा समावेश झाला आहे.. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (MADHURA) 22-06-2005

    ‘माणूस परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती’ - व. पु. काळे यांच्या ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकातील हे पहिले वाक्य. सहजगत्या निसटलेल्या या वाक्यातून माणूस उलगडायचा अयशस्वी प्रयत्न, तरीसुद्धा त्यालाच चिकटून राहून घसट करून कोण माझा आणि कोण माझा नाही असं गणत पुन:पुन्हा मांडूनही नापास होणारा तो माणूस. खरं तर माणूस म्हणजे एक कोडं! आणि एक माणूस एकदाच हे तर महाकोडं. माणूस जन्म घेतो तो एकटाच आणि शेवटपर्यंत एकटाच राहतो; पण आयुष्यभर नात्यांमध्ये लपेटून वावरतो. माणूस माणसाला ओळखतच नाही. अगदी माझी माझी म्हणवणारी माणसं जेव्हा केसानं गळा कापतात, तेव्हा रक्ताचा एक टिपूसही न येता रक्तबंबाळ होणं म्हणजे खरा खून! कोण, केव्हा, का, कधी, कुठे, कुणाशी कसा वागेल? सांगता येतच नाही. उरतात ते प्रश्न निरुत्तरीत. एका प्रश्नानं तर गीतेचा जन्म झाला. श्रीकृष्णाला रणागंणावर गीता सांगावी लागली; पण अर्जुनाला समजतच नव्हतं. प्रश्न, प्रश्न आणि पुन्हा प्रश्न. गुरुवर्य व्यासांनी महाभारात लिहिलं. व.पु.च्या मते तो ग्रंथ इतका परिपूर्ण आहे की त्यानंतर काहीच लिखाण झालं नसतं. तरी चाललं असतं, असं म्हणणाऱ्या व.पु. काळ्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यातील हे एक ‘आपण सारे अर्जुन’. आपली अवस्थाही कायम प्रश्न सोडवताना, ते न सुटता दुसऱ्या प्रश्नाची निर्मिती करणाऱ्याची असते. संजयसारखी दूरदृष्टी आपल्याकडं नाही आणि श्रीकृष्णासारखं निर्विचारी होणं आपल्याला जमत नाही. आपण कायम संभ्रमावस्थेत हेलकावे खात असतो. म्हणूनच अर्जुन होतो. आपण अर्जुनासारखे प्रश्नांच्यात लोंबणारे! निरुत्तरित प्रश्नांचा, मागोवा घेत उत्तराला चाचपडणारे. महाभारतातील घटना, व्यक्ती, गीतासार हे सगळं कसं जसंच्या तसं आजच्या काळात लागू पडतं हे फार हळुवारपणं पण मार्मिकतेनं व.पु.नी या पुस्तकात मांडलंय. अर्जुन म्हटलं की, दुर्योधन आलाच. आंधळ्याचं राज्य आलंच. आज अनेक आंधळ्या राजकर्त्यांची हाताखाली राज्य करतात. आयएएस. प्रामाणिक कस्टम अधिकारी, कमिनशर्स, धृतराष्ट्र जन्मांध आणि आता सारे डोळे असून आंधळे. व.पु. म्हणतात, ‘‘आपल्या मुलाची जन्मत:च नैसर्गिकरित्या लाभलेली कुवत किती आहे हे किती पालकांनी जाणून घेतलंय? प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी; पण अभ्यासक्रम सरसकट एकच. औरंगजेब कसा होता हे कोणाला जाणून घ्यायचं? आपण स्वत: कसे आहोत, याचा अभ्यास का नाही करायचा?’’ या पुस्तकात माणूस, त्याचे आचार-विचार, मानसिक कोंडी, त्याची उकल, पलायनवाद, आत्मीयता, कलेले बहाणे, पांघरलेले पडदे, अपेक्षा, अपेक्षाभंगाचे क्षण, तो झटका, नंतरची तडफड.... हे असं सगळं अपरिहार्य म्हणून स्वीकारार्ह. त्यातूनच सापडणारा प्रकाशकिरण दूरवर दिसणारं यशोशिखर आणि मधील धूसर पाऊलवाट. अशी सारी गंमत या पुस्तकात आहे. आयुष्यातील अनेक घटनांचं एका शब्दात वर्णन म्हणजे - टाळ्या, हशे, चेष्टामस्करी, आनंद, समाधान, चैतन्य, जोम, जोश, उत्साह, लाजणं, सुधारणं, घसरणं, आपटणं, निर्मितीक्षण, राग, क्रोध, संताप, तापटपण, भांडण, हेवेदावे, पश्चात्ताप, मारणं, अश्रू, माया, वात्सल्य, शीतयुद्ध... आणि असेच खूप काही या पुस्तकात आहे. माणसाची अपरिहार्यता, संभ्रमावस्था, असहायता काय असते? आत्मघृणा, आत्मप्रौढी, आत्महत्या, अहंभव हे काय आहे? मैत्री म्हणजे काय? आत्मा, परमात्मा, देव, दैव, प्रारब्ध, दिव्यशक्ती, तपस्या, श्रद्धा्र, भक्ती, संकल्प, व्रतवैकल्य, उपवास, उपासना, गुरू हे कशासाठी? अर्पणभाव, टेलिपथी, पलायनवाद कशाला म्हणतात? या पुस्तकात या सर्वांचा ऊहापोह केला आहे. दिवसेंदिवस कोरड्या होत चाललेल्या समाजाला अत्यावश्यक असलेले मनमंथन केलं आहे आणि ते एका भावनाप्रधान लेखकाने - व.पु.नी त्यांची ख्यातीच आहे की, मनाला हात घालणारे, स्पर्श करून उकल करणारे लेखक. व.पु. काळे म्हणतात, ‘‘विसाव्या शतकातला मी अर्जुन आहे.’ २१वे शतक त्याहून वेगळे नाही. ओशोची गीता प्रवचने ऐकल्यावर व.पु. नी हे पुस्तक आपोआप लिहिलं आणि ते वाचल्यावर माझा अर्जुन झाला. माझ्या आयुष्यातील प्रश्नमालिका एकामागून एक सरकत गेल्या आणि मी हरवले. शेवटी सांगावंस वाटतं गीता, महाभारत, गीतासार, ओशो प्रवचनं वाचाल तर उत्तमच; पण निदान हे १४६ पानाचं ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचावंच वाचावं. लेखक व.पु. काळे म्हणजे हलकंफुलकं पण मनात घुसणारं लिखाण. त्यांनी लिहिलेले सुंदर प्रश्नचिन्हाचं पुस्तकं. -वंदना धर्माधिकारी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more