* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667509
  • Edition : 32
  • Publishing Year : FEBRUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : RELIGIOUS & SPIRITUAL FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ARJUN, THE THIRD AMONGST THE PANDAVAS, STANDS FOR HIS SKILL OF ARCHERY AND IS CONSIDERED AS ONE OF THE GREATEST WARRIORS. THE DISTINGUISHED FIGHTER, HOWEVER, FELT CONFUSED WHEN THE FAMOUS MAHABHARAT WAR WAS ABOUT TO BEGIN ON THE BATTLEFIELD OF KURUKSHETRA. HE TURNED TO HIS CHARIOTEER, LORD KRISHNA, FOR ENLIGHTENMENT. THE LORD CLEARED ALL HIS DOUBTS THROUGH THE MOST INSTRUCTIVE AND INTERESTING DISCOURSES THAT CAME TO BE KNOWN AS THE BHAGVAD GITA. THE AUTHOR BELIEVES THAT IN THE PRESENT TIMES OUR POSITION IS NO BETTER THAN ARJUN. WE FACE VARIOUS PROBLEMS IN DAY TO DAY LIFE AND LIKE ARJUN CAN NOT MAKE UP OUR MINDS ON HOW TO SOLVE THEM. IGNORANCE, MISRULE, CORRUPTION, DOUBLE STANDARDS AND MANY SUCH FACTORS MAKE OUR MUNDANE LIFE DIFFICULT. THE AUTHOR DRAWS UP PARALLEL EXAMPLES FROM THE MAHABHARATA AND ATTEMPTS TO OFFER SOLUTIONS. THE TREATMENT OF THE THEMES IN THE ESSAYS IS LIKE THAT OF ART BUCHWALD WHOSE HUMOUR MAKES ONE SMILE AND BE SERIOUS AT THE SAME TIME.
संसार घरच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारख रंगवता येणार नाही का? आपल्या जल्मापूर्वी हे जग होतच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली एंट्री मध्येच केव्हातरी होते आणि एक्झिट हि. हे नाटक किती वर्षाचं, ते माहित नाही चाळीसी, पन्नाशी, साठी, सत्तरी.... सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार कि जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीच वरदान लाभणार, कि मतिमंद? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व,दंभ,लालसा.... किती सांगाव? कृष्णानं बासरीसहित आपल्याला चढवलं; पण त्या सहा छिद्रातून संगीत जन्माला येत नाही. स्वतःला काहीहि कमी नाही. स्वास्थाला धक्का लागलेला नाही. तरी माणस संसार सजवू शकत नाहीत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarAkshay Tajne

    लेखक , कथाकथनकार , आर्किटेक्ट , व्हायोलिन व हामोनियम - वादक , उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर , सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे , सुंदर रस्ता , सुंदर इमारत , सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते . म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या . मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या . विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा , खरं तर त्या कथा नाहीतच , कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत . एका व्यक्तीच्या विचार - आचारांची पद्धत . वपु त्याला ` पॅटर्न ` म्हणायचे . वपुंनी पॅटर्न्स मांडले . जे आपल्यासहित , आपल्या आवती - भोवती दिसतात . आणि म्हणूनच त्या पॅटर्न्सना दाद मिळते . विनोदी कथांमधून हसवता - हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं . ही अशीच जीवनाची तहा आहे , हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं . महाराष्ट्र सरकारनं त्यांना ` उत्तम लेखक ` म्हणून सन्मानित केलं आहे . CONCERN : गीतेतला , महाभारतामधला अर्जुन आणि मी स्वत : किंवा मला भेटणारी प्रत्येक गोंधळलेली व्यक्ती ह्यांत मला फरकच वाटत नाही . कृष्णावतार संपला , तो संपलाच ! अर्जुनाचा वंश विसाव्या शतकापर्यंत चालूच आहे . अर्जुनाच्या शंभर पटीनं धृतराष्ट्राच्या शंभर मुलांचाही वंश तितक्या पटीनं वाढतोय . निवडणुकीच्या तिकिटांच्या रांगेत उभा आहे . ह्या निवडणुकीपुरता तरी श्रीविष्णूंनी ‘ शेषा`ला रजा देऊन कदाचित डनलॉप घेतला असेल आणि शेषन रूपानं शेषाला पाठवला असेल . पुन्हा मत देताना विचारवंतांचा अर्जुन होणार . अर्जुनाला समोर शत्रू दिसेचना ; आप्त दिसले , कारण ते आप्त होतेच . ज्यांना दाखवण्यासाठी सिंहासन मिळवायचं , त्यांनाच मारल्यावर राज्याभिषेक कुणासमोर करायचा ? ...Read more

  • Rating StarYogesh Ugale

    सर्वसाधारणपणे दोन वर्षांपासून हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे. वपुंच्या पुस्तकांचं आकर्षण प्रत्येक मराठी वाचकाप्रमाणे मलाही आहेच. त्या आकर्षणापोटी वपुंच्या इतर पुस्तकांबरोबर हेही पुस्तक मी घेतलं. कथा-कादंबऱ्यांची पुस्तकं पटापट वाचून झाली. परंतु या वैचरिक पुस्तकाला हात घालण्यास मन धजावत नव्हते. एक वर्षापूर्वी ‘प्रेममयी’ वाचलेलं अजून आठवतंय. आकाराने अतिशय छोट्या असणाऱ्या या पुस्तकाच्या पाना-पानावर जीवनाचे अमूल्य तत्वज्ञान खास वपु काळेंच्या साध्या पण थेट मनाला स्पर्श करुन जाणाऱ्या शैलीतून अवतरले आहे.. कथा-कादंबऱ्यांची पुस्तके कधीच वाचून संपवलेली. वाचनाचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. मग ‘आपण सारे अर्जुन’ हाती घेतलं. सुरुवातीला हे आपल्याला पेलवेल का, याविषयी साशंकता होती. परंतु नंतर पुस्तकानेच माझी पकड घेतली. एकेक लेख वाचताना जाणिवा विस्तारताहेत, असं वाटायला लागलं. हे पुस्तक वाचताना मलाही माझ्यातला अर्जुन दिसायला लागला. वपुंची खिळवून ठेवणारी लेखनशैली, साधी भाषा, अतिशय गहन तत्त्वज्ञानाला आयुष्यातील प्रसंगांशी जोडण्याची ताकद, कुठल्याही प्रकारच्या पांडित्याचा आव न आणता प्रामाणिकपणे गीतातत्वांचा घेतलेला वेध आणि आपल्याला अर्जुन बनवणाऱ्या आपल्या आयुष्यातील क्षणांची होणारी जाणीव, ही या पुस्तकाची खास आकर्षणे.. खरंतर एवढं सुंदर पुस्तक याआधीच वाचायला हवं होतं, याचीही खंत वाटत राहिली. जसजसे आपण पाने उलटत जातो, तसतसा आपल्यामधला अर्जुनच आपल्याला वाचनात खिळवून ठेवतो. माणसाला तेच लेखन सर्वाधिक आवडतं, ज्यातून माणसाच्या व्यथांचा-वेदनांचा आविष्कार झालेला असतो. या कसोटीवर ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक शत प्रतिशत खरे उतरते. ओशोंचे अमृतमय विचार समजण्याची ताकद आपल्याला वपुंच्या प्रेममय लेखनशैलीतून मिळते. अन्यथा ओशोंच्या तेजस्वी विचारांचे आकलन होणे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला जवळ जवळ अशक्यच. वपुंच्या बोटाला धरुन चालल्याने हा प्रवास सुकर होतो. या वाटेवर अधूनमधून गुर्जिएफ, जे. कृष्णमूर्तींसारखी हिरवीगार वळणंही येतात. प्रवास सुरु राहतो. आतला अर्जुन डोकावत राहतो. तत्वविचारांचे सिंचन होत राहते. वाचक आणि लेखक एकरुप होऊन जातात.. माझ्या आयुष्यात अशी फार कमी पुस्तके आहेत, की जी मी परत वाचली असतील. कमी म्हणजे अगदी बोटावर मोजण्याइतकीच. त्या पुस्तकांमध्ये ‘आपण सारे अर्जुन’चा समावेश झाला आहे.. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (MADHURA) 22-06-2005

    ‘माणूस परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती’ - व. पु. काळे यांच्या ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकातील हे पहिले वाक्य. सहजगत्या निसटलेल्या या वाक्यातून माणूस उलगडायचा अयशस्वी प्रयत्न, तरीसुद्धा त्यालाच चिकटून राहून घसट करून कोण माझा आणि कोण माझा नाही असं गणत पुन:पुन्हा मांडूनही नापास होणारा तो माणूस. खरं तर माणूस म्हणजे एक कोडं! आणि एक माणूस एकदाच हे तर महाकोडं. माणूस जन्म घेतो तो एकटाच आणि शेवटपर्यंत एकटाच राहतो; पण आयुष्यभर नात्यांमध्ये लपेटून वावरतो. माणूस माणसाला ओळखतच नाही. अगदी माझी माझी म्हणवणारी माणसं जेव्हा केसानं गळा कापतात, तेव्हा रक्ताचा एक टिपूसही न येता रक्तबंबाळ होणं म्हणजे खरा खून! कोण, केव्हा, का, कधी, कुठे, कुणाशी कसा वागेल? सांगता येतच नाही. उरतात ते प्रश्न निरुत्तरीत. एका प्रश्नानं तर गीतेचा जन्म झाला. श्रीकृष्णाला रणागंणावर गीता सांगावी लागली; पण अर्जुनाला समजतच नव्हतं. प्रश्न, प्रश्न आणि पुन्हा प्रश्न. गुरुवर्य व्यासांनी महाभारात लिहिलं. व.पु.च्या मते तो ग्रंथ इतका परिपूर्ण आहे की त्यानंतर काहीच लिखाण झालं नसतं. तरी चाललं असतं, असं म्हणणाऱ्या व.पु. काळ्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यातील हे एक ‘आपण सारे अर्जुन’. आपली अवस्थाही कायम प्रश्न सोडवताना, ते न सुटता दुसऱ्या प्रश्नाची निर्मिती करणाऱ्याची असते. संजयसारखी दूरदृष्टी आपल्याकडं नाही आणि श्रीकृष्णासारखं निर्विचारी होणं आपल्याला जमत नाही. आपण कायम संभ्रमावस्थेत हेलकावे खात असतो. म्हणूनच अर्जुन होतो. आपण अर्जुनासारखे प्रश्नांच्यात लोंबणारे! निरुत्तरित प्रश्नांचा, मागोवा घेत उत्तराला चाचपडणारे. महाभारतातील घटना, व्यक्ती, गीतासार हे सगळं कसं जसंच्या तसं आजच्या काळात लागू पडतं हे फार हळुवारपणं पण मार्मिकतेनं व.पु.नी या पुस्तकात मांडलंय. अर्जुन म्हटलं की, दुर्योधन आलाच. आंधळ्याचं राज्य आलंच. आज अनेक आंधळ्या राजकर्त्यांची हाताखाली राज्य करतात. आयएएस. प्रामाणिक कस्टम अधिकारी, कमिनशर्स, धृतराष्ट्र जन्मांध आणि आता सारे डोळे असून आंधळे. व.पु. म्हणतात, ‘‘आपल्या मुलाची जन्मत:च नैसर्गिकरित्या लाभलेली कुवत किती आहे हे किती पालकांनी जाणून घेतलंय? प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी; पण अभ्यासक्रम सरसकट एकच. औरंगजेब कसा होता हे कोणाला जाणून घ्यायचं? आपण स्वत: कसे आहोत, याचा अभ्यास का नाही करायचा?’’ या पुस्तकात माणूस, त्याचे आचार-विचार, मानसिक कोंडी, त्याची उकल, पलायनवाद, आत्मीयता, कलेले बहाणे, पांघरलेले पडदे, अपेक्षा, अपेक्षाभंगाचे क्षण, तो झटका, नंतरची तडफड.... हे असं सगळं अपरिहार्य म्हणून स्वीकारार्ह. त्यातूनच सापडणारा प्रकाशकिरण दूरवर दिसणारं यशोशिखर आणि मधील धूसर पाऊलवाट. अशी सारी गंमत या पुस्तकात आहे. आयुष्यातील अनेक घटनांचं एका शब्दात वर्णन म्हणजे - टाळ्या, हशे, चेष्टामस्करी, आनंद, समाधान, चैतन्य, जोम, जोश, उत्साह, लाजणं, सुधारणं, घसरणं, आपटणं, निर्मितीक्षण, राग, क्रोध, संताप, तापटपण, भांडण, हेवेदावे, पश्चात्ताप, मारणं, अश्रू, माया, वात्सल्य, शीतयुद्ध... आणि असेच खूप काही या पुस्तकात आहे. माणसाची अपरिहार्यता, संभ्रमावस्था, असहायता काय असते? आत्मघृणा, आत्मप्रौढी, आत्महत्या, अहंभव हे काय आहे? मैत्री म्हणजे काय? आत्मा, परमात्मा, देव, दैव, प्रारब्ध, दिव्यशक्ती, तपस्या, श्रद्धा्र, भक्ती, संकल्प, व्रतवैकल्य, उपवास, उपासना, गुरू हे कशासाठी? अर्पणभाव, टेलिपथी, पलायनवाद कशाला म्हणतात? या पुस्तकात या सर्वांचा ऊहापोह केला आहे. दिवसेंदिवस कोरड्या होत चाललेल्या समाजाला अत्यावश्यक असलेले मनमंथन केलं आहे आणि ते एका भावनाप्रधान लेखकाने - व.पु.नी त्यांची ख्यातीच आहे की, मनाला हात घालणारे, स्पर्श करून उकल करणारे लेखक. व.पु. काळे म्हणतात, ‘‘विसाव्या शतकातला मी अर्जुन आहे.’ २१वे शतक त्याहून वेगळे नाही. ओशोची गीता प्रवचने ऐकल्यावर व.पु. नी हे पुस्तक आपोआप लिहिलं आणि ते वाचल्यावर माझा अर्जुन झाला. माझ्या आयुष्यातील प्रश्नमालिका एकामागून एक सरकत गेल्या आणि मी हरवले. शेवटी सांगावंस वाटतं गीता, महाभारत, गीतासार, ओशो प्रवचनं वाचाल तर उत्तमच; पण निदान हे १४६ पानाचं ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचावंच वाचावं. लेखक व.पु. काळे म्हणजे हलकंफुलकं पण मनात घुसणारं लिखाण. त्यांनी लिहिलेले सुंदर प्रश्नचिन्हाचं पुस्तकं. -वंदना धर्माधिकारी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more