* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EAST OF THE SUN
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL KULKARNI
  • ISBN : 9788184984811
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 612
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AUTUMN 1928. THREE YOUNG WOMEN ARE ON THEIR WAY TO INDIA, EACH WITH A NEW LIFE IN MIND. ROSE, A BEAUTIFUL BUT NAIVE BRIDE-TO-BE, IS ANXIOUS ABOUT LEAVING HER FAMILY AND MARRYING A MAN SHE HARDLY KNOWS.
१९२८ तीन तरुणी भारतात यायला निघतात. प्रत्येकीचे येण्याचे कारण वेगवेगळे असते. नव्या आयुष्याबद्दलच्या अपेक्षा, इच्छा आणि आकांक्षा भिन्न असतात. बॉम्बेला रोझचं लग्न एका इंग्रज अधिकाऱ्याशी होणार असतं, पण सोबत आई-वडील नसल्याने एका अनोळखी माणसाशी अनोळखी प्रदेशात लग्न करायचा ताण तिच्या मनावर येतो. इंग्लंडमध्ये लग्न जमत नाही म्हणून व्हिक्टोरियाची आई व्हिक्टोरियाला जोडीदार शोधण्यासाठी रोझसोबत भारतात पाठवते, तर लेखिका होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी व्हिवा, तिच्यावर ओझे झालेल्या भूतकाळाची मुळे शोधायला भारतात येते. बॉम्बेमधील उच्चभ्रू समाज, गरीब वस्त्या, भारतातले इंग्रज, त्यांची भारताबद्दलची मते, तत्कालीन भारतीय समाजाची इंग्रजांबद्दलची मते, भारतीय स्वातंत्र्यलढा अशा व्यापक पाश्र्वभूमीवर विणलेला हा कादंबरीचा पट खिळवून ठेवतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UGAWTICHYADISHELA #EASTOFTHESUN #उगवतीच्यादिशेला #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHYAMALKULKARNI #JULIAGREGSON "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - JULY 2016

    काचेपलीकडचं जग… ही गोष्ट आहे तीन ब्रिटिश मुलींची. त्यांच्याभोवती गुंफल्या गेलेल्या नातेसंबंधांची. एक माणूस आणि त्याच्याभोवतीचं जग, त्याचं अनुभवविश्व, त्याचं आयुष्य ही एक कादंबरी असते असं मानलं तर चीन मुली आणि त्यांच आयुष्य असं सगळं मिळून किती गुंतागंतीचं, नाट्यमय असू शकेल याची कल्पना करता येते. त्यातही या तीन मुली स्वत:च्या आयुष्याचा शोध घेत स्वातंत्र्यपूर्व भारतात आलेल्या असतील तर... हाच सगळा पट मांडला आहे, ईस्ट ऑफ द सन या ज्युलिया ग्रेसमन यांच्या पुस्तकात. श्यामल कुलकर्णी यांनी उगवतीच्या दिशेने त्याचा सुंदर अनुवाद केला आहे. सुरुवात करताक्षणी आपल्याला खिळवून ठेवणारं हे पुस्तक शेवटपर्यंत आपली उत्कंठा वाढवत नेतं. त्याला असलेली वसाहतकालीन भारताची, भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आपल्याला या पुस्तकापासून जराही बाजूला होऊ देत नाही. तीन मैत्रिणींचं निखळ विश्व मांडणारं हे पुस्तक आपल्याला शांता शेळके अनुवादित चौघीजणी (लिट्ल विमेन) या पुस्तकाची आठवण करून देत राहतं. ही कहाणी आहे विवा, रोझ आणि टॉर या तीन मुलींची. विशीच्या आतल्या रोझ आणि टॉर एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. विवाची आणि त्यांची ओळखही नाही. पण काच बोटीतून त्या तिघीजणी भारतात यायला निघतात आणि त्यांची एकमेकांशी ओळख होते. सुरुवातीला एकमेकींच्या जवळ जायला फारशा उत्सुक नसलेल्या या मुली बोटीवरून उतरेपर्यंत, म्हणजे भारतात पोहोचेपर्यंत एकमेकींच्या छान मैत्रिणी होतात. नंतरही या ना त्या कारणाने भेटत राहतात आणि त्यांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे बंध जुळतात. त्या सगळ्या नातेसंबधांचा तरल आलेख हे पुस्तक मांडतं. भारतात येणारा तत्कालीन ब्रिटिश समाज, त्यांचं जगणं, तत्कालीन भारतीय समाज या दोन्ही समूहांचे एकमेकांशी असलेले लागेबांधे, ताणेबाणे, स्वातंत्र्यपूर्व काळाची ती धगधग ही सगळी पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. १९२८ साली लंडनमधील ‘लेडी’ नावाच्या एका मासिकात आलेल्या जाहिरातपासून ही कादंबरी सुरू होते. विवा होलावे या अठ्ठाविशीच्या तरुणीने कुणाला भारतात आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी आपण आया म्हणून उपलब्ध आहोत अशी जाहिरात दिलेली असते. या जाहिरातीवरूनच आपल्याला त्या काळात काय चालत असणार याची कल्पना येते आणि पुढे पुढे ती वृfद्धंगत होत जाते. भारतात नोकरीसाठी येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची मुलं सुट्टीसाठी संपवून भारतात जात असतं. त्यांना सोबत म्हणून जाण्याचं काम त्या काळी मिळत असे. विवा होलावेला भारतात जायचं असतं ते भारतात मरण पावलेल्या तिच्या आई - वडिलांची एक टंक मसुरीला जाऊन परत घेण्यासाठी. त्या टंकमध्ये आपल्यासाठी घबाड नाही. आणि त्यात जे असेल ते आता खराब झालं असेल हे तिला माहिती आहे, पण तरीही गेली अनेक वर्षे ती मसुरीला जायचं नियोजन करते आहे. आई -वडील-बहीण यांच्या मृत्यूनंतर ती एकटी वाढली आहे. एकटेपणाच्या अपरिहार्यतेतून एक अपयशी प्रेमप्रकरणही तिच्या खाती जमा आहे. त्यामुळे अविश्वास, सावधवपणा, भूतकाळाची भेट म्हणून मिळालेला अस्वस्थपणा या सगळ्यासह ही विवा गाये नावाच्या सोळा वर्षांच्या मुलाची आया किंवा सोबतीण म्हणून भारतात यायला निघते. लेखिका व्हायचं हे तिचं स्वप्न आणि जगण्यासाठी सतत पैसे मिळवण्याची सक्ती या कात्रीत ती अडकलेली आहे. ती ज्याची सोबतीण म्हणून निघाली आहे, तो सोळा वर्षांचा गाय हा मुलगा कुणालाच नको आहे. अतिशय अस्वस्थ, घुसमटलेलं बालपण वाट्याला आलेलो हा मुलगा शाळेत रँगिंगला बळी पडला आहे. तिथून त्याला नाकारलं गेलंय. भारतात असलेल्या आई-वडिलांकडे त्याला पाठवलं जातंय. पण त्यांनाही तो खरं तर नकोच आहे. तो बोटीवर विचित्र वागून, विचित्र परिस्थिती ओढवून घेतो. विवालही अडचणीत आणतो. पण नंतर तिच्यात आणि त्याच्यात एक समृद्ध नातं तयार होतं. असं असलं तरी पौगंडावस्थेतल्या या मुलाची फरफट आपल्याला अस्वस्थ करत राहते. रोझ आणि टॉरे या दोन मैत्रिणी भारतात यायलो निघाल्या आहेत, त्या रोझच्या लग्नासाठी. भारतात ब्रिटिश सैन्यात काम करणाऱ्या जॅकशी रोझ लग्न करणार आहे. जॅक सुनीता नावाच्या एका सुंदर भारतीय मुलीत गुंतलेला आहे. त्या काळात इंग्लंडमध्ये लग्न जमत नसे अशा उपवर मुलींना त्यांचे आई-वडील भारतात आलेल्या तरुणावर गळ टाकण्यासाठी भारतात पाठवून देत. रोझने जॅकशी आधीच जमवलंय. पण तिचे आई-वडील तिच्या लग्नाला येऊ शकणार नाहीयेत म्हणून टॉर ही तिची जिवलग मैत्रिण करवली म्हणून तिच्यासोबत आली आहे. भारतातच असलेली तिची एक नातेवाईक स्त्री हे लग्न लावून देणार आहे.’’ टॉर ही एक टिपिकल बायकीपणाने वागण्याचा तिरस्कार करणारी, आपल्याला हवं तसं वागणारी बिनधास्त, पण गोड मुलगी आहे. प्रेमप्रकरणात सतत अपयशी होणारी टॉर पुन्हा तितक्याच उत्कटतेने प्रेमात पडत राहते. बोटीवर ती फ्रॅंक या डॉक्टरच्या प्रेमात पडते. पण फ्रॅंक विवामध्ये गुंतत जातो आणि स्वत:च्या स्वाभिमानाची, स्वच्छंदी जगण्याची आस असलेली विवा त्याच्यात गुंतूनही त्याला झिडकारत राहते. भारतात उतरल्यानंतरचं सगळ्यांचं जगणं, भारतात त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव, त्यांचं हळूहळू बदलत गेलेलं आयुष्य आणि ते एकमेकांशी शेअर करण्याची त्यांची आच या सगळ्यांतून ही कादंबरी एक विलोभनीय दुनिया आपल्यासमोर उभी करते. एरवी आपण तत्कालीन ब्रिटिशांकडे राज्यकर्ते या एकाच नजरेने पाहतो पण या राज्यकर्त्या वर्गातले वेगवेगळे थर, त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं हे सगळं कसं होतं ते या कादंबरीमुळे आपल्याला काचेच्या त्या बाजूकडून समजतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more