* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EAST OF THE SUN
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL KULKARNI
  • ISBN : 9788184984811
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 612
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AUTUMN 1928. THREE YOUNG WOMEN ARE ON THEIR WAY TO INDIA, EACH WITH A NEW LIFE IN MIND. ROSE, A BEAUTIFUL BUT NAIVE BRIDE-TO-BE, IS ANXIOUS ABOUT LEAVING HER FAMILY AND MARRYING A MAN SHE HARDLY KNOWS.
१९२८ तीन तरुणी भारतात यायला निघतात. प्रत्येकीचे येण्याचे कारण वेगवेगळे असते. नव्या आयुष्याबद्दलच्या अपेक्षा, इच्छा आणि आकांक्षा भिन्न असतात. बॉम्बेला रोझचं लग्न एका इंग्रज अधिकाऱ्याशी होणार असतं, पण सोबत आई-वडील नसल्याने एका अनोळखी माणसाशी अनोळखी प्रदेशात लग्न करायचा ताण तिच्या मनावर येतो. इंग्लंडमध्ये लग्न जमत नाही म्हणून व्हिक्टोरियाची आई व्हिक्टोरियाला जोडीदार शोधण्यासाठी रोझसोबत भारतात पाठवते, तर लेखिका होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी व्हिवा, तिच्यावर ओझे झालेल्या भूतकाळाची मुळे शोधायला भारतात येते. बॉम्बेमधील उच्चभ्रू समाज, गरीब वस्त्या, भारतातले इंग्रज, त्यांची भारताबद्दलची मते, तत्कालीन भारतीय समाजाची इंग्रजांबद्दलची मते, भारतीय स्वातंत्र्यलढा अशा व्यापक पाश्र्वभूमीवर विणलेला हा कादंबरीचा पट खिळवून ठेवतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UGAWTICHYADISHELA #EASTOFTHESUN #उगवतीच्यादिशेला #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHYAMALKULKARNI #JULIAGREGSON "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - JULY 2016

    काचेपलीकडचं जग… ही गोष्ट आहे तीन ब्रिटिश मुलींची. त्यांच्याभोवती गुंफल्या गेलेल्या नातेसंबंधांची. एक माणूस आणि त्याच्याभोवतीचं जग, त्याचं अनुभवविश्व, त्याचं आयुष्य ही एक कादंबरी असते असं मानलं तर चीन मुली आणि त्यांच आयुष्य असं सगळं मिळून किती गुंतागंतीचं, नाट्यमय असू शकेल याची कल्पना करता येते. त्यातही या तीन मुली स्वत:च्या आयुष्याचा शोध घेत स्वातंत्र्यपूर्व भारतात आलेल्या असतील तर... हाच सगळा पट मांडला आहे, ईस्ट ऑफ द सन या ज्युलिया ग्रेसमन यांच्या पुस्तकात. श्यामल कुलकर्णी यांनी उगवतीच्या दिशेने त्याचा सुंदर अनुवाद केला आहे. सुरुवात करताक्षणी आपल्याला खिळवून ठेवणारं हे पुस्तक शेवटपर्यंत आपली उत्कंठा वाढवत नेतं. त्याला असलेली वसाहतकालीन भारताची, भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आपल्याला या पुस्तकापासून जराही बाजूला होऊ देत नाही. तीन मैत्रिणींचं निखळ विश्व मांडणारं हे पुस्तक आपल्याला शांता शेळके अनुवादित चौघीजणी (लिट्ल विमेन) या पुस्तकाची आठवण करून देत राहतं. ही कहाणी आहे विवा, रोझ आणि टॉर या तीन मुलींची. विशीच्या आतल्या रोझ आणि टॉर एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. विवाची आणि त्यांची ओळखही नाही. पण काच बोटीतून त्या तिघीजणी भारतात यायला निघतात आणि त्यांची एकमेकांशी ओळख होते. सुरुवातीला एकमेकींच्या जवळ जायला फारशा उत्सुक नसलेल्या या मुली बोटीवरून उतरेपर्यंत, म्हणजे भारतात पोहोचेपर्यंत एकमेकींच्या छान मैत्रिणी होतात. नंतरही या ना त्या कारणाने भेटत राहतात आणि त्यांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे बंध जुळतात. त्या सगळ्या नातेसंबधांचा तरल आलेख हे पुस्तक मांडतं. भारतात येणारा तत्कालीन ब्रिटिश समाज, त्यांचं जगणं, तत्कालीन भारतीय समाज या दोन्ही समूहांचे एकमेकांशी असलेले लागेबांधे, ताणेबाणे, स्वातंत्र्यपूर्व काळाची ती धगधग ही सगळी पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. १९२८ साली लंडनमधील ‘लेडी’ नावाच्या एका मासिकात आलेल्या जाहिरातपासून ही कादंबरी सुरू होते. विवा होलावे या अठ्ठाविशीच्या तरुणीने कुणाला भारतात आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी आपण आया म्हणून उपलब्ध आहोत अशी जाहिरात दिलेली असते. या जाहिरातीवरूनच आपल्याला त्या काळात काय चालत असणार याची कल्पना येते आणि पुढे पुढे ती वृfद्धंगत होत जाते. भारतात नोकरीसाठी येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची मुलं सुट्टीसाठी संपवून भारतात जात असतं. त्यांना सोबत म्हणून जाण्याचं काम त्या काळी मिळत असे. विवा होलावेला भारतात जायचं असतं ते भारतात मरण पावलेल्या तिच्या आई - वडिलांची एक टंक मसुरीला जाऊन परत घेण्यासाठी. त्या टंकमध्ये आपल्यासाठी घबाड नाही. आणि त्यात जे असेल ते आता खराब झालं असेल हे तिला माहिती आहे, पण तरीही गेली अनेक वर्षे ती मसुरीला जायचं नियोजन करते आहे. आई -वडील-बहीण यांच्या मृत्यूनंतर ती एकटी वाढली आहे. एकटेपणाच्या अपरिहार्यतेतून एक अपयशी प्रेमप्रकरणही तिच्या खाती जमा आहे. त्यामुळे अविश्वास, सावधवपणा, भूतकाळाची भेट म्हणून मिळालेला अस्वस्थपणा या सगळ्यासह ही विवा गाये नावाच्या सोळा वर्षांच्या मुलाची आया किंवा सोबतीण म्हणून भारतात यायला निघते. लेखिका व्हायचं हे तिचं स्वप्न आणि जगण्यासाठी सतत पैसे मिळवण्याची सक्ती या कात्रीत ती अडकलेली आहे. ती ज्याची सोबतीण म्हणून निघाली आहे, तो सोळा वर्षांचा गाय हा मुलगा कुणालाच नको आहे. अतिशय अस्वस्थ, घुसमटलेलं बालपण वाट्याला आलेलो हा मुलगा शाळेत रँगिंगला बळी पडला आहे. तिथून त्याला नाकारलं गेलंय. भारतात असलेल्या आई-वडिलांकडे त्याला पाठवलं जातंय. पण त्यांनाही तो खरं तर नकोच आहे. तो बोटीवर विचित्र वागून, विचित्र परिस्थिती ओढवून घेतो. विवालही अडचणीत आणतो. पण नंतर तिच्यात आणि त्याच्यात एक समृद्ध नातं तयार होतं. असं असलं तरी पौगंडावस्थेतल्या या मुलाची फरफट आपल्याला अस्वस्थ करत राहते. रोझ आणि टॉरे या दोन मैत्रिणी भारतात यायलो निघाल्या आहेत, त्या रोझच्या लग्नासाठी. भारतात ब्रिटिश सैन्यात काम करणाऱ्या जॅकशी रोझ लग्न करणार आहे. जॅक सुनीता नावाच्या एका सुंदर भारतीय मुलीत गुंतलेला आहे. त्या काळात इंग्लंडमध्ये लग्न जमत नसे अशा उपवर मुलींना त्यांचे आई-वडील भारतात आलेल्या तरुणावर गळ टाकण्यासाठी भारतात पाठवून देत. रोझने जॅकशी आधीच जमवलंय. पण तिचे आई-वडील तिच्या लग्नाला येऊ शकणार नाहीयेत म्हणून टॉर ही तिची जिवलग मैत्रिण करवली म्हणून तिच्यासोबत आली आहे. भारतातच असलेली तिची एक नातेवाईक स्त्री हे लग्न लावून देणार आहे.’’ टॉर ही एक टिपिकल बायकीपणाने वागण्याचा तिरस्कार करणारी, आपल्याला हवं तसं वागणारी बिनधास्त, पण गोड मुलगी आहे. प्रेमप्रकरणात सतत अपयशी होणारी टॉर पुन्हा तितक्याच उत्कटतेने प्रेमात पडत राहते. बोटीवर ती फ्रॅंक या डॉक्टरच्या प्रेमात पडते. पण फ्रॅंक विवामध्ये गुंतत जातो आणि स्वत:च्या स्वाभिमानाची, स्वच्छंदी जगण्याची आस असलेली विवा त्याच्यात गुंतूनही त्याला झिडकारत राहते. भारतात उतरल्यानंतरचं सगळ्यांचं जगणं, भारतात त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव, त्यांचं हळूहळू बदलत गेलेलं आयुष्य आणि ते एकमेकांशी शेअर करण्याची त्यांची आच या सगळ्यांतून ही कादंबरी एक विलोभनीय दुनिया आपल्यासमोर उभी करते. एरवी आपण तत्कालीन ब्रिटिशांकडे राज्यकर्ते या एकाच नजरेने पाहतो पण या राज्यकर्त्या वर्गातले वेगवेगळे थर, त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं हे सगळं कसं होतं ते या कादंबरीमुळे आपल्याला काचेच्या त्या बाजूकडून समजतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more