JEFFREY ARCHER

About Author

Birth Date : 15/04/1940


JEFFREY ARCHER WAS EDUCATED AT OXFORD UNIVERSITY. HE WAS ELECTED TO THE HOUSE OF COMMONS IN 1969, APPOINTED DEPUTY CHAIRMAN OF THE CONSERVATIVE PARTY IN 1985, AND ELEVATED TO THE HOUSE OF LORDS IN 1992. JEFFREY ARCHER HAS TOPPED THE BESTSELLER LISTS AROUND THE WORLD, WITH SALES OF OVER 250 MILLION COPIES IN 97 COUNTRIES AND MORE THAN 37 LANGUAGES, OF HIS SIXTEEN NOVELS (INCLUDING KANE AND ABEL NOW ON ITS 93RD REPRINT, A PRISONER OF BIRTH AND PATHS OF GLORY), SIX COLLECTIONS OF SHORT STORIES, THREE PLAYS, THREE VOLUMES OF HIS PRISON DIARIES AND A GOSPEL. HE IS THE ONLY AUTHOR EVER TO HAVE BEEN A NUMBER ONE BESTSELLER IN FICTION (FIFTEEN TIMES), SHORT STORIES (FOUR TIMES) AND NON-FICTION (THE PRISON DIARIES). HIS LATEST PROJECT IS A FIVE-BOOK SERIES CALLED THE CLIFTON CHRONICLES BOOKS ONE, ONLY TIME WILL TELL AND TWO, THE SINS OF THE FATHER, HAVE BOTH BEEN INTERNATIONAL BESTSELLERS AND BOOK THREE, BEST KEPT SECRET, WILL BE AVAILABLE IN MARCH 2013. ARCHER IS MARRIED TO DAME MARY ARCHER DBE, THEY HAVE TWO SONS AND DIVIDE THEIR TIME BETWEEN LONDON AND CAMBRIDGE.

जेफ्री आर्चर यांचा जन्म १५ एप्रिल, १९४० रोजी लंडन येथे झाला. शिक्षणानंतर त्यांनी लष्करी आणि पोलीस प्रशिक्षण घेतले. कंपनीत गुंतविलेले पैसे बुडाल्याने ते दिवाळखोर झाले होते. ते संसदसदस्य होते, महापौरपदाचे उमेदवारही होते आणि फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवासही भोगला. अशा रोमांचकारी घटनांनी भरलेले त्यांचे आयुष्य हाच एका मोठ्या आणि लोकप्रिय कादंबरीचा विषय होऊ शकतो. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा, लघुकथा आणि नाटकेही लिहिली. आपल्या सावकारांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस ही कादंबरी लिहिली. त्यांची ही पहिली कादंबरी वर्षभरातच सतरा देशांमध्ये विकली गेली आणि त्या कादंबरीवर आधारित एक लोकप्रिय मालिकाही बनली. सध्या ते आपली पत्नी डॉ. मेरी आर्चर आणि दोन मुलांबरोबर लंडन आणि केंब्रिजमध्ये आलटूनपालटून राहतात. अधिक माहितीसाठी WWW.JEFFREYARCHER.COM या संकेतस्थळाला भेट द्या.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 12 of 33 total
38 %
OFF
A MATTER OF HONOUR Rating Star
Add To Cart INR 700 INR 434
38 %
OFF
A PRISONER OF BIRTH Rating Star
Add To Cart INR 500 INR 310
TBC Classic Book
38 %
OFF
A QUIVER FULL OF ARROWS Rating Star
Add To Cart INR 250 INR 155
TBC Classic Book
38 %
OFF
A TWIST IN THE TALE Rating Star
Add To Cart INR 300 INR 186
TBC Classic Book
38 %
OFF
AND THEREBY HANGS A TALE Rating Star
Add To Cart INR 220 INR 136
TBC Classic Book
38 %
OFF
AS THE CROW FLIES Rating Star
Add To Cart INR 1299 INR 805
38 %
OFF
BE CAREFUL WHAT YOU WISH FOR - CLIF... Rating Star
Add To Cart INR 500 INR 310
TBC Classic Book
38 %
OFF
BEST KEPT SECRET - CLIFTON CHRONICLES 3 Rating Star
Add To Cart INR 500 INR 310
TBC Classic Book
38 %
OFF
BY ROYAL APPOINTMENT, WILLY ANI KHUN... Rating Star
Add To Cart INR 450 INR 279
38 %
OFF
CAT O NINE TALES Rating Star
Add To Cart INR 200 INR 124
TBC Classic Book
38 %
OFF
COMETH THE HOUR Rating Star
Add To Cart INR 660 INR 409
TBC Classic Book
38 %
OFF
FALSE IMPRESSION Rating Star
Add To Cart INR 300 INR 186
TBC Classic Book
123

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more