* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EK PAYARI VAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983371
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DREAMS ARE DREAMS AND CANNOT BE NAMED AS TRUTH OF LIFE, NONETHELESS EVERYONE ENJOYS THEM. STILL, SOMEONE SOMEWHERE GATHERS THE STRENGTH TO COME OUT OF THESE DREAMS AND START JOURNEY IN THE UPWARD DIRECTION, IN SEARCH OF EVOLUTION JUST ONE STEP AT A TIME ON THE STEEP STAIRCASE, DIFFICULT, BREATHTAKING, TIRING STILL JUST ONE MORE STEP EVERY TIME .THAT IS LIFE A FEELING OF SUFFOCATION FROM EVERY SIDE, AND NO IT IS NOT JUST A FEELING. IT IS THE FAILING OF MIND AND BODY AND SOUL. WHAT IS NEEDED THE MOST? JUST SOME FRESH AIR TO FILL MY LUNGS. I WANT TO COME OUT OF ALL THE SUFFERINGS. I AM DYING FOR A TOUCH OF LOVE, A GESTURE OF CONCERN. AND HOW I WANT IT; I AM TRUDGING ALONG THE WAY, MY FEET ARE SWOLLEN, MY SOLES ARE CRACKED. HOW I WISH TO FLOAT ON THE AIR NOW, LIKE A FREE BIRD. I AM TIRED OF THESE BOMBARDING WORDS AND FIGHTS THAT FOLLOW. I AM DYING FOR THE WORDS FULL OF CARE.. THERE IS NO END TO THESE HOPES AND YET THEY ALL SEEM TO BE VACUOUS, I JUST WANT A FIRM MIND AND SOME LIFE AROUND ME JUST TELL ME ONE THING, WILL YOU GIVE ME SOME FREE AIR, SOME LOVE AND SOME CONCERN AND NO MORE INDIFFERENCE WILL YOU OFFER ME A PATH LINED WITH PETALS AND NOT THORNS WILL YOU WHISPER IN MY EARS WITH LOVE AND NOT SHOUT WITH HATREDS. WILL YOU TAKE ME WITH YOU FAR AWAY FROM FEAR.? WILL YOU?
हा संसार! इतकुसा, एवढासा! अनादि-अनंत काळापासून सुरू झालेला सांसार. ह्या संसारात अगणित लहान लहान संसार! ह्या संपूर्ण संसाराची, चराचराची समजा एक मोठ्ठी रेषा आखली ती रेषा म्हणजे काळाची रेषा! ह्या रेषेला प्रत्येकाच्या संसाराची एक रेषा, इवलीशी, तुटक-तुटक! खरं तर रेषा आखता येणारच नाह एखादं टिंबच द्यावं लागेल. त्या टिंबात शिरायचं. तो स्वत:चा संसार! त्यासाठी मग घर, अन्न, धान्य, कपडा-लत्ता, मुलं. मग मुलांची लग्नं. म्हणजे अजून एक टिंब तयार करायचं. त्यात जा-ये करायची. त्या टिंबाला स्वतंत्र आयुष्य द्यायचं नाही आणि आपलं टिंब सोडायचं नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarGauri Savale

    अगदीच अचानकपणे वाचनात आलेले हे पुस्तक. कथा तर उत्तम. शेवटपर्यंत खिळवून ठेवते. एखाद्याचा संसार नीट होण्यात किंवा मोडण्यासाठी फक्त पती पत्नी कारणीभूत नसतात. तसेच केलेल्या चुका सुधारून पण स्वतःचा स्वाभिमान जपून केलेल्या तडजोडी लेखिकेने खूप बारकाईने या स्व गोष्टी उत्तम वर्णनासहित मांडल्या आहेत. नक्की वाचा. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 18 MAY 2018

    अनुभवांचे अवकाश... आपल्या प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. लहानपणापासून आपल्याला आलेले अनुभव, आपलं राहणं, जगणं, भवताल यातून तो तयार झालेला असतो. एखादी गोष्ट एकाला चुकीची वाटत असेल, तर तीच गोष्ट दुसऱ्याला अगदी बरोबर वाटत असते, कारण तयामागे असणारे आपापले अनुभव. जीवनाविषयी, अनुभवाविषयी आणि त्यातून घडत जाणाऱ्या व्यक्तींविषयी स्वाती चांदोरकर यांनी आपल्या ‘एक पायरी वर’ या कादंबरीमध्ये लिहिले आहे. ‘एक पायरी वर’ या कादंबरीत वैष्णवीची गोष्ट सांगितली आहे. वैष्णवी ही आजच्या कनिष्ठ वर्गात वाढलेल्या मुलींचे प्रतिनिधित्व करते. मुंबईहून दूरच्या उपनगरात जन्मलेली, एका खोलीत आई-वडील, भावंडांसह मोठी झालेली देखणी वैष्णवी, मात्र महत्त्वाकांक्षी. कॉलेजमध्ये गेल्यावर मुंबईतल्या चकचकीत वातावरणाला भुललेली. त्यातून ती शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्नाच निर्णय घेते. पुढे तिला मुलं होणं, तिच्या नवऱ्याचं वागणं, सासू-सासऱ्यांच्या अपेक्षा, वैष्णवीच्या अपेक्षा आणि त्यातून तिचं घराबाहेर पडणं अशी कथा पुढे सरकत राहते. कथेच्या अनुषंगाने वैष्णवी, तिची मैत्रीण शमी, शमीचा नवरा विहंग, वैष्णवीचा मित्र मिहिर, नवरा प्रतोष, मुलं सागर आणि सुषमा, तिच्या सासूबाई, नणंद गौरी, तिचा नवरा अशी पात्रं या इथे वाचायला मिळतात. प्रत्येकाचा स्वत:च्या आयुष्याबद्दल तसाच वैष्णवीबद्दल एक दृष्टिकोन आहे, तो त्यांच्या त्यांच्या अनुभवातून आलेला. वैष्णवीने तरुणपणापासून ते कादंबरीच्या अखेरपर्यंत घेतलेले निर्णय आणि त्यामागची भूमिका तिच्या विचारांतून उलगडत जाते, मात्र लेखिकेने कुठेही तिच्या विचारांचे समर्थन केले नाही की तिला पूर्ण चुकीची ठरवलेली नाही. फक्त ती कशी हे तिच्या आणि इतरांच्या नजरेतून, विचारांतून समजत जाते. वैष्णवीला तिच्या वयोपरत्वे आलेले अनुभव, त्यातून तिला आलेली समज, तिच्या प्रत्येक कृतीमागचं वास्तव यातून ती एक एक पायरी वरवर चढत असते. ही पायरी तिला अनुभवांतून मिळालेली असते तशीच तिने केलेल्या चुकांमधूनही. स्वाती चांदोरकर या व.पु. काळे यांच्या कन्या. त्यांच्या लेखनावर वपुंच्या लेखनशैलीचा प्रभाव जाणवत राहतो. कादंबरीतल्या प्रत्येक पात्राचं स्वत:चं असं तत्त्वज्ञान आहे. कथेत स्वामीजीही आहेत, त्यांचं तत्त्वज्ञानही आहे. वपुंच्या लेखनात त्यांचे प्रत्येक पात्र काही ना काही तत्त्वज्ञान सांगून जातं, तसाच वाचनानुभव ‘एक पायरी वर’ वाचताना येतो. -रेश्मा भुजबळ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more