* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EK PAYARI VAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983371
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DREAMS ARE DREAMS AND CANNOT BE NAMED AS TRUTH OF LIFE, NONETHELESS EVERYONE ENJOYS THEM. STILL, SOMEONE SOMEWHERE GATHERS THE STRENGTH TO COME OUT OF THESE DREAMS AND START JOURNEY IN THE UPWARD DIRECTION, IN SEARCH OF EVOLUTION JUST ONE STEP AT A TIME ON THE STEEP STAIRCASE, DIFFICULT, BREATHTAKING, TIRING STILL JUST ONE MORE STEP EVERY TIME .THAT IS LIFE A FEELING OF SUFFOCATION FROM EVERY SIDE, AND NO IT IS NOT JUST A FEELING. IT IS THE FAILING OF MIND AND BODY AND SOUL. WHAT IS NEEDED THE MOST? JUST SOME FRESH AIR TO FILL MY LUNGS. I WANT TO COME OUT OF ALL THE SUFFERINGS. I AM DYING FOR A TOUCH OF LOVE, A GESTURE OF CONCERN. AND HOW I WANT IT; I AM TRUDGING ALONG THE WAY, MY FEET ARE SWOLLEN, MY SOLES ARE CRACKED. HOW I WISH TO FLOAT ON THE AIR NOW, LIKE A FREE BIRD. I AM TIRED OF THESE BOMBARDING WORDS AND FIGHTS THAT FOLLOW. I AM DYING FOR THE WORDS FULL OF CARE.. THERE IS NO END TO THESE HOPES AND YET THEY ALL SEEM TO BE VACUOUS, I JUST WANT A FIRM MIND AND SOME LIFE AROUND ME JUST TELL ME ONE THING, WILL YOU GIVE ME SOME FREE AIR, SOME LOVE AND SOME CONCERN AND NO MORE INDIFFERENCE WILL YOU OFFER ME A PATH LINED WITH PETALS AND NOT THORNS WILL YOU WHISPER IN MY EARS WITH LOVE AND NOT SHOUT WITH HATREDS. WILL YOU TAKE ME WITH YOU FAR AWAY FROM FEAR.? WILL YOU?
हा संसार! इतकुसा, एवढासा! अनादि-अनंत काळापासून सुरू झालेला सांसार. ह्या संसारात अगणित लहान लहान संसार! ह्या संपूर्ण संसाराची, चराचराची समजा एक मोठ्ठी रेषा आखली ती रेषा म्हणजे काळाची रेषा! ह्या रेषेला प्रत्येकाच्या संसाराची एक रेषा, इवलीशी, तुटक-तुटक! खरं तर रेषा आखता येणारच नाह एखादं टिंबच द्यावं लागेल. त्या टिंबात शिरायचं. तो स्वत:चा संसार! त्यासाठी मग घर, अन्न, धान्य, कपडा-लत्ता, मुलं. मग मुलांची लग्नं. म्हणजे अजून एक टिंब तयार करायचं. त्यात जा-ये करायची. त्या टिंबाला स्वतंत्र आयुष्य द्यायचं नाही आणि आपलं टिंब सोडायचं नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarGauri Savale

    अगदीच अचानकपणे वाचनात आलेले हे पुस्तक. कथा तर उत्तम. शेवटपर्यंत खिळवून ठेवते. एखाद्याचा संसार नीट होण्यात किंवा मोडण्यासाठी फक्त पती पत्नी कारणीभूत नसतात. तसेच केलेल्या चुका सुधारून पण स्वतःचा स्वाभिमान जपून केलेल्या तडजोडी लेखिकेने खूप बारकाईने या स्व गोष्टी उत्तम वर्णनासहित मांडल्या आहेत. नक्की वाचा. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 18 MAY 2018

    अनुभवांचे अवकाश... आपल्या प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. लहानपणापासून आपल्याला आलेले अनुभव, आपलं राहणं, जगणं, भवताल यातून तो तयार झालेला असतो. एखादी गोष्ट एकाला चुकीची वाटत असेल, तर तीच गोष्ट दुसऱ्याला अगदी बरोबर वाटत असते, कारण तयामागे असणारे आपापले अनुभव. जीवनाविषयी, अनुभवाविषयी आणि त्यातून घडत जाणाऱ्या व्यक्तींविषयी स्वाती चांदोरकर यांनी आपल्या ‘एक पायरी वर’ या कादंबरीमध्ये लिहिले आहे. ‘एक पायरी वर’ या कादंबरीत वैष्णवीची गोष्ट सांगितली आहे. वैष्णवी ही आजच्या कनिष्ठ वर्गात वाढलेल्या मुलींचे प्रतिनिधित्व करते. मुंबईहून दूरच्या उपनगरात जन्मलेली, एका खोलीत आई-वडील, भावंडांसह मोठी झालेली देखणी वैष्णवी, मात्र महत्त्वाकांक्षी. कॉलेजमध्ये गेल्यावर मुंबईतल्या चकचकीत वातावरणाला भुललेली. त्यातून ती शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्नाच निर्णय घेते. पुढे तिला मुलं होणं, तिच्या नवऱ्याचं वागणं, सासू-सासऱ्यांच्या अपेक्षा, वैष्णवीच्या अपेक्षा आणि त्यातून तिचं घराबाहेर पडणं अशी कथा पुढे सरकत राहते. कथेच्या अनुषंगाने वैष्णवी, तिची मैत्रीण शमी, शमीचा नवरा विहंग, वैष्णवीचा मित्र मिहिर, नवरा प्रतोष, मुलं सागर आणि सुषमा, तिच्या सासूबाई, नणंद गौरी, तिचा नवरा अशी पात्रं या इथे वाचायला मिळतात. प्रत्येकाचा स्वत:च्या आयुष्याबद्दल तसाच वैष्णवीबद्दल एक दृष्टिकोन आहे, तो त्यांच्या त्यांच्या अनुभवातून आलेला. वैष्णवीने तरुणपणापासून ते कादंबरीच्या अखेरपर्यंत घेतलेले निर्णय आणि त्यामागची भूमिका तिच्या विचारांतून उलगडत जाते, मात्र लेखिकेने कुठेही तिच्या विचारांचे समर्थन केले नाही की तिला पूर्ण चुकीची ठरवलेली नाही. फक्त ती कशी हे तिच्या आणि इतरांच्या नजरेतून, विचारांतून समजत जाते. वैष्णवीला तिच्या वयोपरत्वे आलेले अनुभव, त्यातून तिला आलेली समज, तिच्या प्रत्येक कृतीमागचं वास्तव यातून ती एक एक पायरी वरवर चढत असते. ही पायरी तिला अनुभवांतून मिळालेली असते तशीच तिने केलेल्या चुकांमधूनही. स्वाती चांदोरकर या व.पु. काळे यांच्या कन्या. त्यांच्या लेखनावर वपुंच्या लेखनशैलीचा प्रभाव जाणवत राहतो. कादंबरीतल्या प्रत्येक पात्राचं स्वत:चं असं तत्त्वज्ञान आहे. कथेत स्वामीजीही आहेत, त्यांचं तत्त्वज्ञानही आहे. वपुंच्या लेखनात त्यांचे प्रत्येक पात्र काही ना काही तत्त्वज्ञान सांगून जातं, तसाच वाचनानुभव ‘एक पायरी वर’ वाचताना येतो. -रेश्मा भुजबळ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more