DR. H.V. SARDESAI

About Author

Birth Date : 10/04/1933
Death Date : 15/03/2020


SARDESAI WAS BORN ON 10 APRIL 1933. AFTER GRADUATING FROM MUMBAI IN 1955 WITH MBBS AND MD (MEDICINE) IN 1958, SARDESAI MOVED TO LONDON FOR HIGHER EDUCATION. MBBS, HE SPECIALIZED IN PREVENTIVE MEDICINE AND FORENSIC MEDICINE.

सरदेसाई यांचा जन्म १० एप्रिल १९३३ रोजी झाला. मुंबईत १९५५ मध्ये एमबीबीएस आणि १९५८ मध्ये एमडी (मेडिसीन) ही पदवी घेतल्यानंतर सरदेसाई उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. एमबीबीएस ला त्यांना प्रीव्हेंटिव्ह मेडिसीन आणि फॉरेन्सिक मेडिसीन या विषयांत विशेष प्रावीण्य मिळाले. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विषयात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एमडी पदवी घेऊन ते १९६०मध्ये भारतात परतले. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी लक्ष्मी रस्त्यावर कुंटे चौकात दवाखाना सुरू केला. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच लेखन आणि व्याख्यान या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याबद्दल व्यापक जागृती घडवली. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाशी एकरूप होऊन ते शहराच्या आरोग्य व्यवस्थेचे आधारवड झाले. वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जायचे. डॉ. सरदेसाई यांनी १९८५पर्यंत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. या काळात त्यांनी अनेक वैद्यकीय तज्ज्ञ घडवले. महाविद्यालयात शिकवताना इंग्रजी भाषा; मात्र लोकांना व्याख्यान देताना पूर्णपणे मराठी भाषेचा वापर ते करत. ते सूचनापत्रे, म्हणजेच प्रीस्क्रिप्शनही मराठीत लिहीत. औषध कसे घ्यावे, या सूचना ते मराठीत लिहीत. सरदेसाई यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. मेहता पब्लिशिंग हाऊसमार्फत त्यांचे धन्वंतरी घरोघरी पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी इतरही सुमारे ३० पुस्तके लिहिली; तसेच त्यांचे अनेक संशोधनपर लेखही प्रसिद्ध झाले. पुण्यभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DHANVANTARI GHAROGHARI Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more