DR. H.V. SARDESAI

About Author

Birth Date : 10/04/1933
Death Date : 15/03/2020


SARDESAI WAS BORN ON 10 APRIL 1933. AFTER GRADUATING FROM MUMBAI IN 1955 WITH MBBS AND MD (MEDICINE) IN 1958, SARDESAI MOVED TO LONDON FOR HIGHER EDUCATION. MBBS, HE SPECIALIZED IN PREVENTIVE MEDICINE AND FORENSIC MEDICINE.

सरदेसाई यांचा जन्म १० एप्रिल १९३३ रोजी झाला. मुंबईत १९५५ मध्ये एमबीबीएस आणि १९५८ मध्ये एमडी (मेडिसीन) ही पदवी घेतल्यानंतर सरदेसाई उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. एमबीबीएस ला त्यांना प्रीव्हेंटिव्ह मेडिसीन आणि फॉरेन्सिक मेडिसीन या विषयांत विशेष प्रावीण्य मिळाले. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विषयात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एमडी पदवी घेऊन ते १९६०मध्ये भारतात परतले. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी लक्ष्मी रस्त्यावर कुंटे चौकात दवाखाना सुरू केला. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच लेखन आणि व्याख्यान या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याबद्दल व्यापक जागृती घडवली. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाशी एकरूप होऊन ते शहराच्या आरोग्य व्यवस्थेचे आधारवड झाले. वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जायचे. डॉ. सरदेसाई यांनी १९८५पर्यंत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. या काळात त्यांनी अनेक वैद्यकीय तज्ज्ञ घडवले. महाविद्यालयात शिकवताना इंग्रजी भाषा; मात्र लोकांना व्याख्यान देताना पूर्णपणे मराठी भाषेचा वापर ते करत. ते सूचनापत्रे, म्हणजेच प्रीस्क्रिप्शनही मराठीत लिहीत. औषध कसे घ्यावे, या सूचना ते मराठीत लिहीत. सरदेसाई यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. मेहता पब्लिशिंग हाऊसमार्फत त्यांचे धन्वंतरी घरोघरी पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी इतरही सुमारे ३० पुस्तके लिहिली; तसेच त्यांचे अनेक संशोधनपर लेखही प्रसिद्ध झाले. पुण्यभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DHANVANTARI GHAROGHARI Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more