DR. H.V. SARDESAI

About Author

Birth Date : 10/04/1933
Death Date : 15/03/2020


SARDESAI WAS BORN ON 10 APRIL 1933. AFTER GRADUATING FROM MUMBAI IN 1955 WITH MBBS AND MD (MEDICINE) IN 1958, SARDESAI MOVED TO LONDON FOR HIGHER EDUCATION. MBBS, HE SPECIALIZED IN PREVENTIVE MEDICINE AND FORENSIC MEDICINE.

सरदेसाई यांचा जन्म १० एप्रिल १९३३ रोजी झाला. मुंबईत १९५५ मध्ये एमबीबीएस आणि १९५८ मध्ये एमडी (मेडिसीन) ही पदवी घेतल्यानंतर सरदेसाई उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. एमबीबीएस ला त्यांना प्रीव्हेंटिव्ह मेडिसीन आणि फॉरेन्सिक मेडिसीन या विषयांत विशेष प्रावीण्य मिळाले. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विषयात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एमडी पदवी घेऊन ते १९६०मध्ये भारतात परतले. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी लक्ष्मी रस्त्यावर कुंटे चौकात दवाखाना सुरू केला. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच लेखन आणि व्याख्यान या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याबद्दल व्यापक जागृती घडवली. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाशी एकरूप होऊन ते शहराच्या आरोग्य व्यवस्थेचे आधारवड झाले. वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जायचे. डॉ. सरदेसाई यांनी १९८५पर्यंत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. या काळात त्यांनी अनेक वैद्यकीय तज्ज्ञ घडवले. महाविद्यालयात शिकवताना इंग्रजी भाषा; मात्र लोकांना व्याख्यान देताना पूर्णपणे मराठी भाषेचा वापर ते करत. ते सूचनापत्रे, म्हणजेच प्रीस्क्रिप्शनही मराठीत लिहीत. औषध कसे घ्यावे, या सूचना ते मराठीत लिहीत. सरदेसाई यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. मेहता पब्लिशिंग हाऊसमार्फत त्यांचे धन्वंतरी घरोघरी पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी इतरही सुमारे ३० पुस्तके लिहिली; तसेच त्यांचे अनेक संशोधनपर लेखही प्रसिद्ध झाले. पुण्यभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DHANVANTARI GHAROGHARI Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more