* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AN EYE FOR AN EYE
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980219
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 150.00 gms
  • Pages : 150
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SAYEED NEVER DOUBTS THE INNOCENCE OF LATIFA, THE BEAUTIFUL VILLAGE GIRL HE BROUGHT TO THE CITY AS HIS WIFE. BUT THERE IS NO WAY HE CAN SAVE HER FROM HER FATE.SET IN THE DESERT KINGDOM HE PORTRAYED SO VIVIDLY IN MIRAGE, BANDULA CHANDRARATNA TELLS THE TRAGIC STORY OF SAYEED AND LATIFA; THE LITTLE GIRL WHO PICTURES HER MOTHER LOST IN THE DESERT; THE FATHER WHO TRAVELS TO THE CITY TO RETRIEVE THE BODY OF HIS DAUGHTER. AND THROUGH IT ALL RUNS THE DISTANT ECHO OF LATIFA`S OWN STORY, THE TRUTH THAT LIES BEYOND THE TRAGEDY. A FINE ACHIEVEMENT, AS MOVING IN ITS EVOCATIONS OF INTENSE GRIEF AS IT IS HEARTENING IN ITS DEMONSTRATIONS OF UNSOLICITED, TOTALLY ALTRUISTIC ACTS OF KINDNESS.FRANCIS KING, LITERARY REVIEW CHANDRARATNA WRITES WITH THE BRACING CLARITY AND AUSTERITY OF A CHILLY DESERT DAWN... WRITTEN WITH A QUIET, UNAFFECTED GRACE AND SYMPATHY THAT COMPEL BOTH ATTENTION AND ACCLAIM BOYD TONKIN, INDEPENDENT A LITTLE MASTERPIECE DORIS LESSING, TLS
खेड्यातल्या एका सुंदर मुलीशी लग्न करून सईद तिला शहरात घेऊन आला. तिच्या निष्कलंक चारित्र्याबद्दल त्याला कधी स्वप्नातही शंका आली नाही; पण तो तिला वाचवू मात्र शकला नाही. एका सुडाने पेटलेल्या जिवाचा स्वत:शी आणि आजूबाजूच्या रानटी प्रवृत्तींशी चाललेला संघर्ष, त्याच्या मनाचा उडालेला गोंधळ या सगळ्यांना बंडूला चंद्ररत्ना मोठ्या नजाकतीने हात घालतात. आपली आई वाळवंटात हरवली असल्याची कल्पना करणारी छोटी मुलगी, चांगुलपणाने सईदच्या बिकट प्रसंगी त्याला निरपेक्ष मदत करणारे त्याचे मित्र, आपल्या मुलीचा दगडांनी ठेचलेला मृतदेह स्वत: शहरात जाऊन घेऊन येणारे समंजस वडील, हे सगळे तपशील कथेत सुसंगत भर घालतात. लतीफाच्या दु:खान्त जीवनकहाणीचा पडसाद कांदबरीवर उमटत राहतो तरी वस्तुस्थिती मात्र शोकांतिकेच्या पलीकडे जीवंतच राहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ANEYEFORANEYE #ANEYEFORANEYE #अ‍ॅनआयफॉरअ‍ॅनआय #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #BANDULACHANDRARATNA "
Customer Reviews
  • Rating StarDAILY TARUN BHARAT 13-9-2010

    श्रीलंकेत जन्मलेल्या बंडुला चंद्ररत्ना यांनी सौदी अरेबिया आणि इंग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये काम केले आहे. त्यांची पहिली कादंबरी ‘मिराज’ इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीतील कथानक ‘अॅन आय फॉर अॅन आय’ या कादंबरीत चालू राहते. मिराज कादंबरीच्या वेळी थोड्या कारणासाठी त्यांचे बुकर पुरस्काराच्या यादीत नाव येणे हुकले असले, तरी कमिटीतील अनेक परीक्षकांना या कादंबरीने भुरळ घातली. २०००मध्ये लंडनच्या एका मोठ्या प्रकाशकाने जेव्हा या पुस्तकाची पेपरबॅक स्वरूपातील आवृत्ती काढली, तेव्हा ती त्या वर्षीच्या समीक्षकांच्या दृष्टीने सर्वाेत्कृष्ट कादंबरी ठरली. सौदी अरेबिया येथील हॉस्पिटलमध्ये काही वर्षे काम करत असताना बंडूला चंद्ररत्ना यांनी पाहिलेले, अनुभवलेले आखाती देशातले जनजीवन तिथली राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, सामाजिक रूढी, चालीरीती हे अतिशय अस्सलपणे आणि अपरिहार्यपणे त्यांच्या लेखनात आलेले आहे. अनेक लोक आखाती देशात नोकरी धंद्यानिमित्त, पर्यटनासाठी जाऊन येतात. त्यांच्याकडून आपल्याला तिथल्या जीवनाबद्दलचे तुटक तुटक तपशील समजत असतात, पण तिथे राहून प्रत्यक्ष अनुभव घेऊन, नंतर त्याकडे अलिप्तपणे पाहून ते कादंबरी रूपात आपल्यापुढे आल्यामुळे, सर्व काही सुसंगत समजल्यासारखे वाटते. मुख्य कथा आहे सौदी अरेबियातील न्याय पध्दतीची व त्यामुळे होणा-या परिणामांची कोर्टाची सुनावणी होऊन लतीफाला व्यभिचारी ठरविण्यात आले. हुसैन हाशमीला रंगेहाथ पकडले होते. लतीफला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. हुसैन हाशमीला शिरच्छेदाची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यांची अंमलबजावणी होणार होती आणि ते पाहण्यासाठी अथांग जनसमूह लोटला होता. हुसैनने आपला मित्र सईदचा विश्वासघात केला होता. त्याचीच शिक्षा त्याला शिरच्छेदाच्या रूपाने मिळत होती. अब्दुल रेहमानच्या आजोबांच्या मते, हाशमी जमातच वाईट वर्तणुकीची कचराच ही जमात म्हणजे मूळ रक्तातच खराबी असलेली. लतीफाला दगडांनी ठेचून मारण्याच्या शिक्षेचाही अंमलबजावणी झाली आणि तिचा पती सर्वार्थाने कोसळून गेला. लतीफाच्या मुलीला लैलाला-सईदच्या दयाळू अंत:करणाचा मित्र, अब्दुल मुबारकने सांभाळले आहे. अलफौजींचा विश्वास आहे की चांगले हे नेहमीच वाईटावर विजय मिळवते. अब्दुल मुबारक त्यांना अरबांचे औदार्य आणि प्रेमळपण यांचे मूर्तिमंत आदर्श प्रतीक वाटतो. त्यांना वाटते आपले राज्यकर्ते जर त्यांच्यासारखे असते तर... पण ते सगळेच स्वार्थी आहेत. संपूर्ण अरब देशाला लागलेला कलंक आहेत ते. सईदचा बालपणीचा मित्र यासेर त्याला भेटतो आणि त्याच्या सांगण्यावरून सईदचे मन बायकोच्या वधाचा सूड घ्यायच्या कल्पनेने पेटून उठते. यासेरच्या मते, मानवी संस्कृतीच्या संपूर्ण इतिहासात घडला नसेल असा दुराचार आणि नीतिभ्रष्ट व्यवहार आपल्या इथे चालू आहे. व्यसनाधीन बादशहा आणि त्यांचे शेकडो नातेवाईक जनतेची संपत्ती लुबाडत आहेत. सगळीकडे झोपडपट्ट्या वाढत चालल्यात. मुतव्वा म्हणजे सरकारचे नोकर आहेत. आता तुझा न्याय तू स्वत:च मिळवला पाहिजेस. त्या झोपडपट्टीतल्या ज्या लोकांनी तुझ्या बायकोवर झालेल्या अन्यायाचा बदला घे. सईद, लक्षात ठेव. ‘अॅन आय फॉर अॅन आय’, असे ओरडत यासेरने तो खंजीर उंचावला. हवेत नाचवला आणि मग सईदच्या हातात दिला. विचारांच्या भोवNयात आवार्त घेणाऱ्या मनानेच सईदने खंजीरासह मुतव्वाच्या झोपडीकडे प्रयान केले. मुतव्वा वयस्कर चेहरा, पांढरी दाढी आणि लाल चौकड्यांचा गन्ना सईदला स्पष्ट दिसला. सईदने खंजिराचा हात वर उचलला आणि आता धावत जाऊन खंजीर खुपसणार, तोच पाठीमागून एक मुलगी धावत आली. त्याला घराकडे ओढू लागली. सईदने खंजीर म्यानात घालून खिशात ठेवला. पुढे गेल्यानंतर खंजिराच्या साहाय्याने खड्डा खणला. आणि खंजीर खड्ड्यात पुरून टाकला. घरी गेल्यावर मित्राला म्हणाला, ‘हो, आता मी आनंदात आहे.’ सौदी अरेबियातील अमानुष उपचार पध्दती, वेशभूषा, खान-पान चाली रीती या सर्वांचे दर्शन अनेक लहान मोठ्या प्रसंगातून कादंबरीत चित्रित झाले आहे. एक मोठा अॅल्युमिनियमचा थाळा, त्यात भाताचा मोठा ढीग आणि चिकन रस्सा होता. ते सगळेजण त्या एकाच थाळ्यातून सावकाश, शांतपणे जेवत होते, हे आज वाचतानासुध्दा विचित्र वाटते. लेखकाची साधी सोपी भाषा, कुठलेही अलंकार घालून न सजवता वाचकांपुढे येते. पण त्यातून अधोरेखित झालेले वास्तव अचंबित करते. विचार करायला भाग पाडते आणि वाटते हेच या कादंबरीचे बलस्थान आहे. याच कारणाने सुनंदा अमरापूरकर यांना या कादंबरीचा अनुवाद करण्यास प्रवृत्त केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more