* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AN EYE FOR AN EYE
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980219
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 150.00 gms
  • Pages : 150
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SAYEED NEVER DOUBTS THE INNOCENCE OF LATIFA, THE BEAUTIFUL VILLAGE GIRL HE BROUGHT TO THE CITY AS HIS WIFE. BUT THERE IS NO WAY HE CAN SAVE HER FROM HER FATE.SET IN THE DESERT KINGDOM HE PORTRAYED SO VIVIDLY IN MIRAGE, BANDULA CHANDRARATNA TELLS THE TRAGIC STORY OF SAYEED AND LATIFA; THE LITTLE GIRL WHO PICTURES HER MOTHER LOST IN THE DESERT; THE FATHER WHO TRAVELS TO THE CITY TO RETRIEVE THE BODY OF HIS DAUGHTER. AND THROUGH IT ALL RUNS THE DISTANT ECHO OF LATIFA`S OWN STORY, THE TRUTH THAT LIES BEYOND THE TRAGEDY. A FINE ACHIEVEMENT, AS MOVING IN ITS EVOCATIONS OF INTENSE GRIEF AS IT IS HEARTENING IN ITS DEMONSTRATIONS OF UNSOLICITED, TOTALLY ALTRUISTIC ACTS OF KINDNESS.FRANCIS KING, LITERARY REVIEW CHANDRARATNA WRITES WITH THE BRACING CLARITY AND AUSTERITY OF A CHILLY DESERT DAWN... WRITTEN WITH A QUIET, UNAFFECTED GRACE AND SYMPATHY THAT COMPEL BOTH ATTENTION AND ACCLAIM BOYD TONKIN, INDEPENDENT A LITTLE MASTERPIECE DORIS LESSING, TLS
खेड्यातल्या एका सुंदर मुलीशी लग्न करून सईद तिला शहरात घेऊन आला. तिच्या निष्कलंक चारित्र्याबद्दल त्याला कधी स्वप्नातही शंका आली नाही; पण तो तिला वाचवू मात्र शकला नाही. एका सुडाने पेटलेल्या जिवाचा स्वत:शी आणि आजूबाजूच्या रानटी प्रवृत्तींशी चाललेला संघर्ष, त्याच्या मनाचा उडालेला गोंधळ या सगळ्यांना बंडूला चंद्ररत्ना मोठ्या नजाकतीने हात घालतात. आपली आई वाळवंटात हरवली असल्याची कल्पना करणारी छोटी मुलगी, चांगुलपणाने सईदच्या बिकट प्रसंगी त्याला निरपेक्ष मदत करणारे त्याचे मित्र, आपल्या मुलीचा दगडांनी ठेचलेला मृतदेह स्वत: शहरात जाऊन घेऊन येणारे समंजस वडील, हे सगळे तपशील कथेत सुसंगत भर घालतात. लतीफाच्या दु:खान्त जीवनकहाणीचा पडसाद कांदबरीवर उमटत राहतो तरी वस्तुस्थिती मात्र शोकांतिकेच्या पलीकडे जीवंतच राहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ANEYEFORANEYE #ANEYEFORANEYE #अ‍ॅनआयफॉरअ‍ॅनआय #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #BANDULACHANDRARATNA "
Customer Reviews
  • Rating StarDAILY TARUN BHARAT 13-9-2010

    श्रीलंकेत जन्मलेल्या बंडुला चंद्ररत्ना यांनी सौदी अरेबिया आणि इंग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये काम केले आहे. त्यांची पहिली कादंबरी ‘मिराज’ इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीतील कथानक ‘अॅन आय फॉर अॅन आय’ या कादंबरीत चालू राहते. मिराज कादंबरीच्या वेळी थोड्या कारणासाठी त्यांचे बुकर पुरस्काराच्या यादीत नाव येणे हुकले असले, तरी कमिटीतील अनेक परीक्षकांना या कादंबरीने भुरळ घातली. २०००मध्ये लंडनच्या एका मोठ्या प्रकाशकाने जेव्हा या पुस्तकाची पेपरबॅक स्वरूपातील आवृत्ती काढली, तेव्हा ती त्या वर्षीच्या समीक्षकांच्या दृष्टीने सर्वाेत्कृष्ट कादंबरी ठरली. सौदी अरेबिया येथील हॉस्पिटलमध्ये काही वर्षे काम करत असताना बंडूला चंद्ररत्ना यांनी पाहिलेले, अनुभवलेले आखाती देशातले जनजीवन तिथली राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, सामाजिक रूढी, चालीरीती हे अतिशय अस्सलपणे आणि अपरिहार्यपणे त्यांच्या लेखनात आलेले आहे. अनेक लोक आखाती देशात नोकरी धंद्यानिमित्त, पर्यटनासाठी जाऊन येतात. त्यांच्याकडून आपल्याला तिथल्या जीवनाबद्दलचे तुटक तुटक तपशील समजत असतात, पण तिथे राहून प्रत्यक्ष अनुभव घेऊन, नंतर त्याकडे अलिप्तपणे पाहून ते कादंबरी रूपात आपल्यापुढे आल्यामुळे, सर्व काही सुसंगत समजल्यासारखे वाटते. मुख्य कथा आहे सौदी अरेबियातील न्याय पध्दतीची व त्यामुळे होणा-या परिणामांची कोर्टाची सुनावणी होऊन लतीफाला व्यभिचारी ठरविण्यात आले. हुसैन हाशमीला रंगेहाथ पकडले होते. लतीफला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. हुसैन हाशमीला शिरच्छेदाची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यांची अंमलबजावणी होणार होती आणि ते पाहण्यासाठी अथांग जनसमूह लोटला होता. हुसैनने आपला मित्र सईदचा विश्वासघात केला होता. त्याचीच शिक्षा त्याला शिरच्छेदाच्या रूपाने मिळत होती. अब्दुल रेहमानच्या आजोबांच्या मते, हाशमी जमातच वाईट वर्तणुकीची कचराच ही जमात म्हणजे मूळ रक्तातच खराबी असलेली. लतीफाला दगडांनी ठेचून मारण्याच्या शिक्षेचाही अंमलबजावणी झाली आणि तिचा पती सर्वार्थाने कोसळून गेला. लतीफाच्या मुलीला लैलाला-सईदच्या दयाळू अंत:करणाचा मित्र, अब्दुल मुबारकने सांभाळले आहे. अलफौजींचा विश्वास आहे की चांगले हे नेहमीच वाईटावर विजय मिळवते. अब्दुल मुबारक त्यांना अरबांचे औदार्य आणि प्रेमळपण यांचे मूर्तिमंत आदर्श प्रतीक वाटतो. त्यांना वाटते आपले राज्यकर्ते जर त्यांच्यासारखे असते तर... पण ते सगळेच स्वार्थी आहेत. संपूर्ण अरब देशाला लागलेला कलंक आहेत ते. सईदचा बालपणीचा मित्र यासेर त्याला भेटतो आणि त्याच्या सांगण्यावरून सईदचे मन बायकोच्या वधाचा सूड घ्यायच्या कल्पनेने पेटून उठते. यासेरच्या मते, मानवी संस्कृतीच्या संपूर्ण इतिहासात घडला नसेल असा दुराचार आणि नीतिभ्रष्ट व्यवहार आपल्या इथे चालू आहे. व्यसनाधीन बादशहा आणि त्यांचे शेकडो नातेवाईक जनतेची संपत्ती लुबाडत आहेत. सगळीकडे झोपडपट्ट्या वाढत चालल्यात. मुतव्वा म्हणजे सरकारचे नोकर आहेत. आता तुझा न्याय तू स्वत:च मिळवला पाहिजेस. त्या झोपडपट्टीतल्या ज्या लोकांनी तुझ्या बायकोवर झालेल्या अन्यायाचा बदला घे. सईद, लक्षात ठेव. ‘अॅन आय फॉर अॅन आय’, असे ओरडत यासेरने तो खंजीर उंचावला. हवेत नाचवला आणि मग सईदच्या हातात दिला. विचारांच्या भोवNयात आवार्त घेणाऱ्या मनानेच सईदने खंजीरासह मुतव्वाच्या झोपडीकडे प्रयान केले. मुतव्वा वयस्कर चेहरा, पांढरी दाढी आणि लाल चौकड्यांचा गन्ना सईदला स्पष्ट दिसला. सईदने खंजिराचा हात वर उचलला आणि आता धावत जाऊन खंजीर खुपसणार, तोच पाठीमागून एक मुलगी धावत आली. त्याला घराकडे ओढू लागली. सईदने खंजीर म्यानात घालून खिशात ठेवला. पुढे गेल्यानंतर खंजिराच्या साहाय्याने खड्डा खणला. आणि खंजीर खड्ड्यात पुरून टाकला. घरी गेल्यावर मित्राला म्हणाला, ‘हो, आता मी आनंदात आहे.’ सौदी अरेबियातील अमानुष उपचार पध्दती, वेशभूषा, खान-पान चाली रीती या सर्वांचे दर्शन अनेक लहान मोठ्या प्रसंगातून कादंबरीत चित्रित झाले आहे. एक मोठा अॅल्युमिनियमचा थाळा, त्यात भाताचा मोठा ढीग आणि चिकन रस्सा होता. ते सगळेजण त्या एकाच थाळ्यातून सावकाश, शांतपणे जेवत होते, हे आज वाचतानासुध्दा विचित्र वाटते. लेखकाची साधी सोपी भाषा, कुठलेही अलंकार घालून न सजवता वाचकांपुढे येते. पण त्यातून अधोरेखित झालेले वास्तव अचंबित करते. विचार करायला भाग पाडते आणि वाटते हेच या कादंबरीचे बलस्थान आहे. याच कारणाने सुनंदा अमरापूरकर यांना या कादंबरीचा अनुवाद करण्यास प्रवृत्त केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more