* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MOHINI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666465
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A STORY OF A MENTALLY ILL PATIENT. THE TREATMENT WHICH SUCH PATIENTS RECEIVE FROM THE SOCIETY MAKES HER MORE ILL, MENTALLY. THE AUTHOR HAS TRIED A VERY DIFFERENT SUBJECT THROUGH THIS BOOK. NOT MUCH IS WRITTEN WITH A MENTAL PATIENT AS THE MAIN CHARACTER OF A STORY. BUT THE AUTHOR HAS DONE SO VERY SUCCESSFULLY. `MOHINI` SUCCEEDS IN CAPTURING THE MINDS OF ALL, FROM START TO END. THE TOPIC ITSELF IS VERY SERIOUS. STILL IT CAPTIVATES THE MINDS; THIS IS THE STRONGEST POINT OF IT. THE AUTHOR HAS RESEARCHED WELL BEFORE WRITING THIS NOVEL. SHE HAS DONE HER HOMEWORK REGARDING THE SYMPTOMS AND THE COURSE OF TREATMENT. SHE HAS SUGGESTED A NEW WAY FOR TREATING SUCH PATIENTS THROUGH MEDITATION AND SPIRITUALITY. NO WONDER, `MOHINI` IS SO EXCLUSIVE.
ही कथा आहे एका मनोरुग्ण स्त्रीमनाची. समाजात मनोरुग्णाला दिली जाणारी वागणूक ‘वेड्याला अधिक वेडं करणारी’ असते. ‘मोहिनी’च्या या कथेत लेखिकेने एक वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला आहे. मनोरुग्णासारखा एक वेगळा ‘पट’ घेऊन साकारणारी ‘मोहिनी’ वाचकाला आपल्या भावभावनांनी खिळवून ठेवते. विषय निवडीपासून लेखिकेनं एका अवघड विषयाचं आव्हान सामथ्र्यानं पेललं आहे. विषय गंभीर असूनही वाचकाला खिळवून ठेवण्याची किमया मोहिनीमध्ये आहे. यामध्येच मोहिनीचं यश सामावलं आहे. मनोरुग्णाची कारणमीमांसा खोलात जाऊन वास्तवाला उजाळा देणारी आहे. त्यावरील मानसशास्त्रीय उपायांचे उपयोजनही लेखिकेच्या अभ्यासपूर्ण चिंतनाची साक्ष देते. मनोरुग्णाच्या मनाचा कल अध्यात्माकडे वळवून मानसशास्त्रीय उपायामध्ये एक दिशा सूचित केली आहे. एका वेगळ्या विषयामुळे मराठी साहित्यक्षेत्रात ‘मोहिनी’ लक्षवेधी ठरली तर नवल नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MOHINI #MOHINI #मोहिनी #FICTION #MARATHI #PARUMADANNAIK #पारूमदननाईक "
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 09-09-2006

    मनोरुग्ण महिलेची कहाणी... पारु मदन नाईक या साहित्यक्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या लेखिकेने वेगळा विषय निवडून कादंबरी लिहिली आहे. याचे कौतुक वाटते. मनोरुग्ण स्त्रीच्या जगण्याचे सहानुभूतिपूर्ण शब्दांत चित्र रेखाटणारी ही कादंबरी आहे. व्यक्तिचित्रणप्धान असलेल्या या कादंबरीचे शीर्षक नायिकेच्या नावावर आधारित आहे. ‘मोहिनी’ हीच कादंबरीची नायिका. मोहिनीच्या विवाहसोहळ्यापासून कादंबरीची सुरुवात होते. लेखिकेने सुरुवात कुतूहलपूर्ण पद्धतीने केली आहे. प्रसंगचित्रण, संवाद, सूक्ष्म नाट्य यांच्या मदतीने मोहिनीचे व्यक्तिचित्रण टळक होत गेले आहे. मोहिनीचे देखणे रूप, अल्लड, निष्पाप स्वभाव, इनामदार वडिलांची लाडकी लेक... ही तिची मुख्य ओळख. जवळच्या गावच्या प्रतापराव इनामदारांची लाडकी पत्नी होण्याचे भाग्यही तिला लाभते. प्रतापराव मान्यवर सतारवादक, प्रतिष्ठित घराण्यातले. यामुळे मोहिनी सुखात असते. ती स्वत: सतार शिकतेही. कालांतराने तिला दोन मुली होतात. पुढे तिसरा मुलगा होतो आणि तो चार महिन्यांचा होऊन जातो. तो धक्का मोहिनी पचवू शकत नाही. मुलाचा-रामचा मृत्यू ही घटना ती मान्यच करत नाही. येथून तिचे मनोरुग्ण म्हणून जगणे सुरू होते. त्यात लादलेले एकटेपण, हिंस्रता, इतरांना मारहाण इत्यादी प्रसंगांचा पुन्हा पुन्हा अनुभव येत राहतो. या गोष्टी सातत्याने सुरू झाल्यावर मोहिनीला औषधोपचार सुरू होतात. सुरुवातीला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये नेऊनही मोहिनी बरी होत नाही, तेव्हा तिला काही काळानंतर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. दरम्यान तिच्या अनावर वागण्यामुळे तिला बांधून ठेवण्याचे प्रयोग घरच्या मंडळींनी करून पाहिलेले असतात. आजारपणाचा बराच काळ असाच गेल्यामुळे ‘केस’ ‘क्रॉनिक’ झालेली असते. येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील वातावरण कादंबरीत जिवंत करण्यात लेखिकेला सर्वसाधारणपणे यश आले आहे. विविध डॉक्टर्स, विविध रुग्ण, त्या रुग्णांच्या परस्परसंबंधांची हकिगत... कादंबरीत या गोष्टींना जागा मिळाली आहे. मोहिनीचे स्पेशल वॉर्डमध्ये न रमणे, नंतर तिला मैत्रिणींची मिळणारी सोबत - या बदलांचा परिणामही सूक्ष्म रीतीने वर्णन केला आहे. तिच्या घरंदाजपणाची ओळख मिटवून टाकणारे तिचे वागणे, त्यामागील निराशा, तसेच तिला प्रेमाने भेटणारे भाऊ-भावजय या प्रसंगांचे चित्रण यात येते. पुढे द्रविडबाई या सामाजिक कार्यकर्त्या तिची केस हाताळण्यात पुढाकार घेतात. त्यांच्या प्रेमळ वागणुकीने मोहिनीत सुधारणा होत जाते. मात्र दरम्यान प्रतापरावांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ते मोहिनीशी घटस्फोट घेतात. यामुळे मोहिनीची संसारात परत जायची स्वप्ने कोसळतात. तरीही भाऊवहिनी तिला माहेरी घेऊन जातात. मनोरुग्णाला लागणारी जिव्हाळ्याची वागणूक मोहिनीला माहेरी सर्वांकडून मिळते. तिच्या मुली, जावई, नातवंडे यांच्या भेटीचे सुखही तिला मिळत जाते. प्रतापरावही तिला आपल्या घरी न्यायला नकार देतात. त्यांचे मोहिनीवरचे प्रेम त्यांना कायमच अस्वस्थ ठेवते. ते दुसऱ्या पत्नीशीही घटस्फोट घेतात. मोहिनीला घरी परतल्यानंतर काही दु:खद घटनांना तोंड द्यावे लागते. आईचा मृत्यू, पतीचा मृत्यू या दोन्ही घटनांना ती कमालीच्या संयमाने तोंड देते. वडिलांच्या इच्छेनुसार ती स्वत:ला अध्यात्म्याच्या विश्वात रमवते. या कादंबरीत काही प्रसंग चांगले चित्रित झाले आहेत. रुग्णालयात मोहिनी आपल्या मोठ्या झालेल्या मुलींना भेटते, तेव्हा त्यांना ओळखत नाही. हा प्रसंग चटका लावून जातो. मोहिनीचे पती प्रतापराव, त्यांची रसिकता, सतारवादनातील कीर्ती, हळवेपणा,मुलींवरील प्रेम, मोहिनीवरील प्रेम, त्यांना सोसावे लागलेले दु:ख - यांचाही ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. मोहिनीच्या भावाला निवडणुकीत यश मिळून मंत्रिपद मिळते आणि स्वप्नात आळंदीला जाऊन आलेली मोहिनी स्वप्न आणि वास्तव यातील सीमारेषा सहज ओलांडते - अशा टप्प्याशी कादंबरीचा शेवट होतो. मनोरुग्ण व्यक्ती वास्तवाचा स्वीकार सहजी कसा करत नाही. तिच्या लेखी वेगळे वास्तव अस्तित्वात असते; बरी झाल्यावरही ही व्यक्ती काही अंशी आपल्या जगात राहणे कसे शक्य असते... इत्यादी बाबी यातून प्रकट होत जातात. मनोरुग्णांना मिळणारी वागणूक, त्यांच्यावरील ट्रीटमेंट यांचेही तपशील येतात. या कादंबरीत काही गोष्टी सुसंगत वाटत नाहीत. २२ वर्षे एवढा मोठा कालखंड मोहिनी हॉस्पिटलमध्ये असते. तो कालखंड कादंबरीत त्यामानाने पटकन संपतो. या काळात तिला तिचे आईवडील, प्रतापराव भेटत नाहीत आणि नंतर स्वत:ला अपराधी समजतात, असे का? वास्तविक ही सर्व माणसे प्रेमळच आहे. बरी झालेली मोहिनी माहेरी परतल्यानंतर कादंबरीत काहीच नज्ञट्यपूर्ण घटना नाहीत. त्यामुळे कादंबरी अकारण पसरट होते. लेखिका वास्तुचित्रणात अजिबात रस घेत नाही. इनामदारांचा वाडा असो वा हॉस्पिटल असे, त्याचे चित्र वाचकाच्या मन:पटलावर उभे राहत नाही. लेखिकेची शैली लाडिक वळणाची आहे. ‘मोहिनी लाजली’ हे वाक्य कादंबरीत अनेकदा, मोहिनीच्या प्रौढ वयातही सतत येत राहते. तरीही पदार्पणात वेगळ्या विषयावर लेखन करायचे धाडस लेखिकेला पेलले आहे. लेखिका रणजित देसाई यांची कन्या असल्यामुळे तिच्याकडे साहित्यगुणांचा वारसा आलेला आहे. कादंबरीतील पात्रे व प्रसंग काल्पनिक असल्याचे सुरुवातीला म्हटले आहे. पण काही ठिकाणी वास्तवाचे कवडसे उमटलेले दिसतात. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 08-04-2006

    छिन्नमनस्कतेचा साहित्यातील मागोवा… काही नावं, काही विषय नेहमीच लक्ष वेधून घेतात. पारू नाईक यांची कादंबरी येते आहे असं कळल्यावर असंच झालं. पण पारू नाईक नाव लक्षात केव्हा आलं? तपशिलात थोडं मागं-पुढं होईल, पण पारू – पारू नाईक असा उल्लेख बहुधा माधवी दसाई यांच्या बहुचर्चित ‘नाच ग घुमा’ या आत्मकथनात आला होता. रणजित देसाई यांची पहिली पत्नी सुनंदा यांच्या मुलीच्या संदर्भात हा उल्लेख होता. सुनंदा यांच्या मनाचा कोंडमारा झाल्यामुळे त्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला, त्यांना झटके यायला लागले. तसे उपचारदेखील सुरू झाले... आणि अशा अस्वस्थ काळातच रणजित देसाई ‘स्वामी’ कादंबरीचं लेखन करीत होते. विशेषत: रमा-माधव यांच्या मुग्ध प्रेमाची कहाणी रंगवताना स्वप्न आणि वास्तव अशा विलक्षण कुतरओढीत ते जगत होते. अशा वावटळीत वाढणारी ती पारू... खरं तिचं नाव पार्वती. या पार्वतीचं प्रेमानं झालं पारू! रणजित देसाई यांच्या आठवणीतदेखील कुठे कुठे पारू आलेली आहे, असं वाटतं. मग पारू नाईक हे नाव आलं ते रणजित देसाई गेल्यानंतर. ‘स्वामी’ची जी आवृत्ती आली त्यात कॉपीराइट देसार्इंच्या दोन मुलींच्या नावावर आहे. त्यातली एक पारू नाईक म्हणजे रणजित देसाई यांच्या कन्येची कादंबरी येते आहे. या कादबंरीचं नाव आहे ‘मोहिनी.’ कथावस्तू आहे ‘मोहिनी’ खानदानी संस्कारांनी संपन्न असलेली स्त्री. पती प्रतापरावांसमवेत पारंपरिक संस्कार, जीवनमूल्ये जपत मनसोक्त आनंद व सुख उपभोगत असते. मोहिनीला एकापाठोपाठ एक अशा दोन मुलीच होतात. मग इनामदारांच्या वंशाला वारस कोण? मोहिनीच्या मनात हे भय खोलवर रुजते. कारण त्यामुळे तिची प्रतिष्ठा पणाला लागते. तिच्या भावी जीवनाचे अस्तित्व त्यावर अवलंबून राहते. बऱ्याच कालावधीनंतर तिला मुलगा होतो. मात्र तो अल्पायुषी ठरतो. त्यामुळे मोहिनी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त होते. मनोरुग्ण नायिकेचे रंगरूप उलगडून दाखवणारी पारू नाईक यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती. पारू नाईक लिखाणाला कशा उद्युक्त झाल्या, हे पाहणं कुतूहलजनक नक्कीच ठरेल. या कादंबरीतील पात्र, घटना, सर्वस्वी काल्पनिक असून, यदाकदाचित कुणाशी त्यात साम्य आढळले, तर तो योगायोग समजावा...’ असा अनेक कादंबऱ्यांमध्ये असलेला खुलासा या कादंबरीमध्ये आहे, हेही बघायला हवे. ‘स्किझोफ्रेनिया’ संबंधात ही कादंबरी आहे हेदेखील त्याचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. ‘स्किझोफ्रेनिया’ हा विषय तसा आपल्याकडे दुर्लक्षित राहिला आहे. काल-परवापर्यंत अशा केसेस वेड, उन्माद, डोक्यावर परिणाम झाला, अशा कप्प्यात टाकून त्यावर इलाज होत असे. साहित्यातदेखील त्याच्या बऱ्या-वाईट खुणा सापडू शकतील. पण ‘स्किझोफ्रेनिया’ असा नेमका उल्लेख होऊन त्याची पाहणी झाली ती ‘स्किझोफ्रेनिया’ कहाणीत. गणेश चौधरी डांभूर्णी या जळगाव जिल्ह्यातल्या गावचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, संपन्न घराण्याचा वारसा लाभलेले आणि बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झालेले. पण दुर्दैवानं असाध्य वेडाने त्यांच्या मनाचा कब्जा घेतला आणि त्यांच्या हातून पत्नीची-मुलांची हत्या घडली. तीही मुसळाने. गणेश चौधरीला फाशीची शिक्षा झाली. मग गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त काही कैद्यांना शिक्षेत माफी मिळाली. त्यात चौधरींना फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप देण्यात आली. ही पहिलीच शोकांतिका आहे, असं म्हणता येणार नाही. अशा केसेस पूर्वीदेखील झाल्या आहेत. गणेश चौधरीच्या बाबतीत एकच गोष्ट झाली की, त्यांना काही डॉक्टर असे भेटले की, त्यांनी त्यांच्यातला माणूस जागा करण्याचा प्रयत्न केला. तसं त्यांना थोडं यशही मिळालं. चौधरींमधील सृजनशक्ती त्यामुळे जागी होऊ लागली. पण मुळात हे सगळं का उद्भवलं? स्वत:चं वेड खुद्द गणेश चौधरी यांनी लपवून ठेवलं. काही डॉक्टरांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी एका असाध्य रोगाचे चौधरी बळी ठरले. त्यातून त्यांची सुटका मृत्यूनेच केली. अर्थात, या घटनेचा ताप सगळ्या चौधरी कुटुंबाला सोसावा आणि भोगावा लागणं अटळ होतं. खचलेली मनं, सामाजिक निंदानालस्ती, न्यायालयात मारावे लागणारे हेलपाटे, त्यातून होणारा खर्च याचे हादरे सगळं घर मोडून पडायला निमित्त होणं स्वाभाविक होतं. हे सगळं सोसलं आणि ही तगमग शब्दबद्ध केली ती गणेश चौधरींच्या बंधूंनी – दिवाकर चौधरींनी. ही कहाणी ‘स्किझोफ्रेनिया’ वाचकांपर्यंत पोचली हे विशेष. गणेश चौधरींना त्यामुळे सहानुभूती मिळाली. त्यामुळेच मग दिवाकर चौधरींनी ‘काचेचं मन’ हे पुस्तक धाडसाने प्रकाशकांकडे दिलं. यामध्ये गणेश चौधरींची पत्रं आहेत. शास्त्रीय, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक अशा गुंतागुंतीत सापडलेला गणेश चौधरी आणि त्याची मानसिक घालमेल त्यांनी विविध लोकांना लिहिलेल्या पत्रांत दिसतं. त्याचे संपादन आणि प्रस्तावना दीपक घारे यांची होती. त्यात त्यांनी नेमकं म्हटलं होतं, ‘क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाच्या अवस्था आणि भास-भ्रम-चक्कर-वेड यांचा सतत फिरणारा पंखा हे या साऱ्याच लेखनाचं वैशिष्ट्य आहे आणि ते वाचकालाही चक्रावून टाकतं!’ ‘स्किझोफ्रेनिया’च्या शेवटी लक्षात राहतो तो दिवाकर चौधरींचा आकांत...’ वादळही संपलेलं आहे; पण आहे एक प्रचंड पोकळी! तिला सामोरं कसं जावं तेच कळत नाही. स्किझोफ्रेनिया – छिन्नमनस्कता यासंबंधातील ललित कलाकृतीचा विचार करताना अमेरिकन गणिती, नोबेल पारितोषिक विजेता जॉन वॅश यांची कर्मकहाणी सांगणारी कहाणी ‘ए ब्युटिफुल माइंड’ ही विसरता येणंच अशक्य. सिल्विया नासर यांनी जॉन वॅशची चरित कहाणी साक्षेपानं लिहिली आहे. स्किझोफ्रेनियानं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन आणि यथायोग्य वेळीच उपचार झाला, तर हा रोग काबूत ठेवता येतो याचा ताळमेळ सिल्वियानं यशस्वीपणे मांडला आहे. ही कहाणी केवळ स्किझोफ्रेनिया पीडितांनाच नव्हे, तर त्यांच्या नातेवाईकांना, ते ज्या समाजात वावरतात, त्या समाजालादेखील प्रेरणादायी ठरेल. म्हणून या कादंबरीचं महत्त्व आहे. या कादंबरीचा संक्षिप्त भावानुवाद कमलिनी फडके यांनी ‘सुंदर ते मन’ नावाने केला आहे. स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशन, पुणे आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांच्यातर्फे तो प्रकाशित झाला आहे, यातच या भावानुवादाचं यश अधोरेखित झालं आहे. स्किझोफ्रेनियासंबंधात विचार करताना ‘देवराईच्या सावली’त पण विसरून चालणार नाही. अशा या मोजक्याच कलाकृती ओझरता उल्लेख करायचं कारण म्हणजे स्किझोफ्रेनियासंबंधात जेवढं ललित लेखन झालं आहे हे पुरुषकेंद्री झालेलं आहे. स्किझोफ्रेनिया ही केवळ पुरुषालाच होणारी व्याधी आहे काय? निश्चितच नाही; पण तसं चित्रण का झालं नाही? ‘मोहिनी’चं वेगळेपण इथंच आहे. खुद्द लेखिका पारू नाईक यांनी ते जीवन जवळून अनुभवलं आहे. साहजिकच त्या खाणाखुणा ‘मोहिनी’च सापडतीलच. ‘मोहिनी’ची मोहिनी ही अशी आहे. आपण त्याची वाट पाहू या. मोहिनीचे वेगळेपण म्हणून राहणार आहे. -रविप्रकाश कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-06-2006

    ‘हृदयस्पर्शी मोहिनी’... जीवनसत्याचे कलापूर्ण आविष्करण करून जीवनदर्शन घडविणारा कादंबरी हा आकृतीबंध पारू मदन नाईक यांनी आपल्या ‘मोहिनी’ कादंबरीत यशस्वीरित्या हाताळला आहे. मोहिनीच्या जीवनावर बेतलेली ही कादंबरी! एका सरळ मनाच्या, निष्पाप, लावण्यवतीच्या ावसौंदर्याचे सौहार्दाने केलेले हे चित्रण! खानदानी कुटुंबात जन्म- संस्कार व प्रेम प्राप्त करून, विवाहानंतर पतीच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी जाणाऱ्या व प्रेमाची प्रसन्न पखरण करणाऱ्या युवतीचे मनाचे विलोभनीय चित्र लेखिकेने ‘मोहिनीत’ शब्दांकित केले आहे. सासर-माहेरच्या नातेसंबंधातील जिव्हाळा, स्नेहस्निग्ध-वात्सल्यपूर्ण-उत्कट प्रेम या कादंबरीत आलेखित होते. परंतु मनोरुग्ण अवस्थेतील नायिकेच्या भावशून्य व भावपूर्ण अनुभवविश्वाचे सूक्ष्म- सखोल व तपशीलात्मक चित्रण या कादंबरीचे बलस्थान ठरते. कारुण्याच्या काजळरेषांतून प्रकर्षाने व प्रभावीपणे प्रस्फुटित होत राहते ती पती-पत्नीच्या प्रेमातील रमणीयता व परिचित आणि कुटुंबीयातील स्नेहबंधांची मधुरता. नियतीच्या आघाताने पती-पत्नीतील जीवनात निर्माण झालेला विरह त्यांच्या परस्परांवरील उत्कट प्रेमासमवेत उदातत्तेचा पारदर्शी आंतरिक पदरही प्रकट करतो. मनोरुग्णांच्या मानसिकतेचे त्यांच्यातील मूलभूत सत्प्रवृत्ती– सद्विचारांच्या आवर्तनांचे आगळे-वेगळे रेखांकन ‘मोहिनी’त प्रत्ययाला येते. नियतीच्या दुर्दैवी फटकाऱ्यांनी होरपळून निघालेली व आपल्या अस्थिर-असुरक्षित जीवनक्षणांची नोंद करणारी ‘मोहिनी’ची जीवनगाथा शृंगार व करुणरसात भिजली आहे. विवाहघटनेमुळे दोन खानदानी कुटुंबांच्या जुळणाऱ्या व दृढ होणाऱ्या नातेसंबंधांचे चित्रण जसे या कादंबरीत आकारते तसेच त्या त्या कुटुंबात वावरणाऱ्या नोकरांचे, परिचितांचे, मित्रांचे, हितचिंतकांचे व्यक्तिचित्रणही लेखिका अशी कौशल्याने करते की त्यातून ती ती व्यक्तिमत्त्वे उमलत जातात. खेळकर, सहजस्वाभाविक प्रेमप्रसंगांचे आलेखन नायक-नायिकेच्या मनातील प्रेम पैलूंना गडद व मनोरम करते तसेच कादंबरीचा सूर घनगंभीर करते. पिता, पती, भावंडे, भावजया, द्रविडबाई, मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर पडलेल्या मैत्रिणी यांची भावनिक उंची अशा स्तरावरची की जिथं स्वार्थाचा गंध नाही परंतु आनंदाचा निर्मळ खळाळ आहे. नायिकेच्या लज्जाशील, मुग्ध हावभावांचे, हालचालींचे हळूवार भावस्पर्शी रेखाटन लेखिकेने जसे केले आहे तसेच मनोरुग्ण अवस्थेतील प्रक्षुब्ध, क्रौर्य व क्रोधाने परिपूर्ण भावावेगांचे, शारीरिक हालचालींचे प्रत्ययकारी रेखाटन लेखिका या कादंबरीत करते. परस्परविरोधी भावावेग, जाणिवा, संवेदना, शारीरिक क्रिया यांच्या ताण्याबाण्यातून नायिकेचे व्यक्तिमत्त्व असे साकारते की वाचकांकडून तिला सहानुभूतीचा ओलावाच मिळावा. परस्परविरोधी भावस्पंदने व तद् नुषंगिक क्रिया दर्शविताना लेखिकेने साधलेला समतोल कौतुकास्पद असून नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाची उंची ढासळू देत नाही. दोन जीवांतील निर्मळ प्रेमाचे व भावावेगांचे गडद चित्र रेखाटणारी ‘मोहिनी’ कादंबरी नाट्याने परिपूर्ण असूनही संघर्षाच्या स्थूल– ठळक रेषा– बिंदू क्वचितच रेखाटते. परंतु नियतीच्या क्रूर आघातामुळे निर्माण झालेला परिस्थितीशी टक्कर देताना व्यक्तिमनात आकारणारा संघर्ष कादंबरीच्या केंद्रस्थानी आपले अस्तित्व राखत अत्यंत टोकदार होतो. व्यथा-वेदनेचे, कारुण्याचे स्रोत आंतरमनात झरते ठेवून प्रेमाचे उदात्त रूप चित्रीत करतो. अनलंकृत, प्रासादिक सरस भाषाशैली, घरंदाज वातावरणातील आदब-प्रसन्नता विवाह समारंभात विविध प्रसंगी गायिल्या जाणाऱ्या गीतांचे आयोजन करून निर्माण केलेले औचित्य, रीतीरिवाज दर्शविणारे कौटुंबिक वातावरण, मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधील वातावरण, चित्रदर्शी शब्दशैली या कादंबरीची लक्षणीय गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. मनोरुग्णांच्या मानसिकतेचा आंतरिक जिव्हाळ्यानं घेतलेला वेध मनोज्ञ असून मनोरुग्णाच्या मनोवस्थेतील भावनिक चढ उतारांचे नेमकेपणाने केलेले रेखांकन लेखिकेच्या सुजाण व संवेदनशील मनाची साक्ष देणारे आहे. रणजित देसार्इंच्या साहित्यिक गुणांचा वारसा जपत स्वतंत्र प्रतिभाशक्तीतून साकारलेली ‘मोहिनी’ क्वचित कुठे ‘स्वामी’ व ‘श्रीमान योगी’ ची आठवण करून देते. एकंदरीत नाट्यपूर्ण, हळूवार भावांदोलनांनी सजलेली ‘मोहिनी’ वाचकांवर मोहिनी घालणारी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 06-08-2006

    खिळवून ठेवणारी ‘मोहिनी’… मनोरुग्ण स्त्रीची कहाणी कादंबरीतून मांडण्याचे मोठे आव्हान पारू मदन नाईक यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीत लेखिकेने या नायिकेचे विश्व ज्या पद्धतीने मांडले आहे, ते पाहता नाईक यांची ही पहिलीच कादंबरी आहे यावर विश्वास बसणार ाही. मोहिनी ही या कादंबरीची नायिका. एका सुखवस्तू इनामदाराची पत्नी. दोन्ही सरकार घराणी असल्यामुळे परंपरागत इनामदारी संस्कारात ती वाढली आहे. खानदानी मोहिनीचा विवाह प्रतापराव या संगीतप्रेमी सतारवादकाशी होतो. मोहिनीलाही ते सतारवादन शिकवतात. त्यांचे आयुष्य सुखाचे सुरू होते. मोहिनीला दोन मुलीच होतात. त्यामुळे वंशाला ‘वारस’ मिळावा यासाठी हे इनामदार दापत्यं झुरत असतात. मोहिनी पुत्रप्राप्तीसाठी वेडीपिशी झालेली आहे. आपली प्रतिष्ठा, भावी जीवनाचे अस्तित्व इनामदार घराण्याचा वंशवेल पुढे वाढावा यावर अवलंबून आहे, अशा भयगंडात मोहिनी जगत असते. त्यासाठी तिचे देवदेवतांना नवस-उपास, तापास सुरूच असतात. अखेर थोड्याफार उशिरानेच तिला दिवस जातात आणि अपेक्षेप्रमाणे गुटगुटीत मुलगा होतो. मोहिनीच्या आनंदाला पारावार राहता नाही. पण चार महिन्यातच या मुलाचा अकल्पित मृत्यू होतो. मोहिनीचे सारे भावविश्वच हादरते. तिच्या आईवेड्या मनावर याचा गंभीर परिणाम होतो. तिला वेडाच झटके येतात. मोहिनीच्या अशा वागण्यामुळे सासर-माहेर उद्ध्वस्त होते. निष्पाप भोळ्या भावनाशील मोहिनीला ‘स्क्रिझोफोलिया’ या दुर्धर रोगाने पछाडले. अधूनमधून त्याचे झटके तिला येतात, तेव्हा ती हिंस्त्र बनते. घरातील सारेजण तिच्या अशा या वागण्यामुळे घाबरून गेलेले असतात. मोहिनीच्या सासर-माहेराकडील घरचे वातावरण पूर्ण बदलून जाते. दोन्ही घरातील भावभावनांचा कल्लोळ लेखिकेने या कादंबरीतून अचूक मांडला आहे. मोहिनीचे आई-वडील, बहीण-भाऊ, मुलं, नोकर-चाकर, सासू-सासरे, पती यांच्या वागण्यात बोलण्यात हळूहळू अंतर पडू लागते. बदललेल्या वातावरणाचा गंभीर परिणाम मोहिनीवर पडत असतोच. शेवटी तिला मनोरुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात येतो. लेखिकेने मोहिनीच्या मनोरुग्णालयातील वास्तवाचे एक वेगळे विश्व या कादंबरीतून उलगडलेले आहे. मोहिनीने या रुग्णालयात एक-दोन नव्हे तर उणीपुरी एकवीस वर्षे काढली. शॉक ट्रिटमेंट, इतर रुग्णांचे वागणे, घरापासून दूर, अनोळखी लोकांमध्ये मोहिनीने काढलेले हे वेगळे आयुष्य वाचले तर तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागते. या काळात मोहिनीने स्वत:चे गोकुळ या रुग्णालयात निर्माण केलेले असते. या संपूर्ण काळात ती घरच्यांना विसरलेली नकळत आपण त्यांच्यातले असूनही ते घर आपल्याला मिळू शकणार नाही ही तिला जाणीव आहे. या साऱ्या प्रवासात ती आपल्या मुला-मुलींना विसरलेली नाही. तो अजूनही जिवंतच आहे, या भ्रमात ती जगत असत. पती प्रतापराव अशा काळातच तिच्याशी घटस्फोट घेतात आणि दुसरा विवाह करतात. मोहिनी हतबल होते. तिने ज्या विश्वासाने आपले रुग्णालयातील आयुष्य सुरू केलेले असते, त्यालाच तडा जातो. मोहिनीचे आई-वडिल, माहेरची सारी माणसे हताश होतात. मोहिनी हा आघात हळूहळू पचवते. लेखिकेने मोहिनीचे वागणे, तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे केलेले वर्णन अप्रतिम आहे. मोहिनीविषयीचा लळा, प्रेम, जिव्हाळा या साऱ्यांचे वर्णन लेखिकेने या कादंबरीतून जिवंत केले आहे. रुग्णालयातून बरे होऊन माहेरच्या घरी येण्याचा प्रसंग भावपूर्ण आहे. मोहिनीची सवत, मोहिनीच्या दोन्ही मुली, त्यांचे पती, नातू या साऱ्या नातेसंबंधात मोहिनी पुन्हा गुरफटते. या काळातही मोहिनी आपल्या पतीला विसरलेली नाही. घटस्फोटानंतरही ती प्रतापरावांवर प्रेम करत असते. प्रतापरावही केवळ वृद्धावस्थेतील सोबत म्हणूनच दुसरा विवाह करतात, पण त्याचे पहिले प्रेम मोहिनीच असते. या काळात प्रतापरावांचाही मृत्यू होतो, तेव्हा मोहिनीवर दुसरा आघात होतो. या धक्क्यातून ती सावरते. वडिलाच्या मायेच्या सावलीत आपले उर्वरित आयुष्य घालवणाऱ्या मोहिनीवर तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा आघात होतो. पण मोहिनी आघातावर आघात झेलूनही आता संयमी बनलेली आहे. संवाद हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. वेगळा व गंभीर विषय हाताळताना लेखिकेने या कादंबरीची गती कमी होऊ दिलेली नाही. गंभीर प्रसंगातून एका मनोरुग्ण स्त्रीचे जीणे उलगडून दाखवलेले आहे. मनोरुग्ण होण्यापूर्वीचा काळ, प्रत्यक्ष मनोरुग्णाचा काळ, त्यातून सावरलेली नायिका, तिचे पूर्ण बरे होणे, त्यानंतर सातत्याने होणारे आघात झेलत जगणाऱ्या नायिकेला हा प्रवास वाचनीय झाला आहे. -संदीप आडनाईक ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more