* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DAAHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989861
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 532
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
INTERACTIONS BETWEEN HUMANS ARE ALWAYS OF PRIME IMPORTANCE. THEY HELP TO BUILD PERSONALITIES. THE SAME APPLIES TO ANIMALS. PERSPECTIVE MAY VARY. THERE IS ALWAYS SOME KIND OF DIALOGUE BETWEEN TWO LIVING THINGS. TWO MINDS COME TOGETHER WITH PROFOUND INTEREST BASED ON HUES OF EMOTIONS AND FEELINGS. LOVE, AFFECTION, HOPES, ANTICIPATION, JEALOUSY, COMPETITION, RIVALRY…THE LIST IS ENDLESS, ALL PART OF A GAME, A VERY UNPREDICTABLE ONE. THE MILIEU INITIATES AND MAKES US PLAY. VERY FEW ARE ABLE TO TOTALLY IGNORE THE RULES AND CONSEQUENCES. THEY EMERGE AS THE CONQUERORS. OTHERS WHO FAIL TO OVERCOME THE MILIEU REMAIN CONFINED TO THE GAME, PLAYING, WORKING, WEARING THEMSELVES OUT. THEY KEEP ON WALKING AND TRUDGING. THEY CANNOT STOP EVEN IF THEY SLIP OR FALL OR BREAK; EVEN IF THEIR MINDS FLARE WITH PIERCING AND TORMENTING FIRE.
’’माणसामाणसांमध्ये घडणाऱ्या आंतरक्रियांना कमालीचं महत्त्व असतं. माणसाची जडण-घडण यांच्या माध्यमातून होत असते. जनावराचंही असंच असतं. भलेत्याचे माप दंडवेगळे असतील; पण दोन घटकांत संवाद हा घडतच असतो. दोन माणसं कधी एकत्र येताना दिसतील, तर कधी एकमेकांच्या बोकांडी बसलेलीही आढळतील. प्रेम, वात्सल्य, आशा-आकांक्षा, ईर्षा, स्पर्धा, संघर्ष अशा अनेक निर्यांचा हा हुतूतू. तो कधी कोणतं वळण घेईल, याचं अनुमान बांधणंही कठीण. मात्र, या सर्व बाहुल्यांना खेळवण्याचं काम करतेती भोवतालची परिस्थिती! तिला पायदळी तुडवून एखादं पुढे गेलं तर ते महानायक/महानायिका ठरतं. इतरांसाठी मात्र असतं ते तेच रिंगण. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं; झापडबंद...! कधी झापड सरकलं, घसरलं, तुटलं, खाली पडलं तरी चालत राहायचं, ऊरफाटंस्तोवर!...तोच हा मराठी मनाचा दाह!’’

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DAAHA #DAAHA #दाह #FICTION #MARATHI #SURESHPATIL "
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    मुखपृष्ठ बघितले की लगेच त्याचा विषय मुंबईच्या चाळ संस्कृतीचा असणार हे लक्षात येते. ही महाकादंबरी नावाप्रमाणेच दाहक आहे. ज्यांनी "बटाट्याची चाळ वाचली" आहे त्यांना चाळीतले धगधगीत वास्तव, दाहकता पचनी पडायला जड जाईल. या कधीही कोसळेल अशा चाळीत अनेक मराठ कुटुंबे आयुष्याची लढाई निकराने लढत आहेत. चांगले, वाईट, खरे ,खोटे, सत्य , असत्य यात कशातही अडकून न पडता चाळकरी आयुष्याची लढाई लढत आहेत. मालकाची चाळ पाडायची कारस्थाने, चाळीत खानावळ चालवणाऱ्या खानावळी, त्यांचे नवरे, त्यांची मुले, त्यांच्या कडे जेवायला येणारे खानावळे, त्यांचे परस्पर कडू, वाईट, गोड संबंध, 10 x 10 मध्ये फुलणारे प्रेम प्रेम कधी रांगडे कधी वासनेने बरबटलेले, दारुडे , फुटलेली गटारे, तुंबलेले संडास, पाण्यासाठीची हातघाई, लफडी, कारस्थाने, कुत्री, मांजरी, उंदीर, घुशी, सणावाराच्या दिवशी असणारा थाट, भोंदू स्वामी व त्याच्या नादाला लागून उद्ध्वस्त होणारी कुटुंबे , पोलीस, गल्लीतले नेते.. असे अनेक चांगले वाईट, भले बुरे प्रसंग, लेखक आपल्या साक्षी भावनेने दाखवून आणतो. कादंबरीत नायक किंवा नायिका अशी कोणीच नाही. पण तरीही कमळ जायकर ही खानावळी शेवटी चाळ पाडत असलेल्या जे सी बी खाली येवून मरते हा शेवट अस्वस्थ करून सोडतो. मुंबईत आता चाळी फारशा उरल्या सुद्धा नसतील. कादंबरीत आलेला काळ साधारण 1990 च्या दशकातला असावा. चाळ संस्कृतीच्या अनेक वैशिष्ट्यांचे कंगोरे घ्यायचा पुरेपूर प्रयत्न लेखकाने या महा कादंबरीत केलेला आहे. एकदा वाचायला घेतली की खाली झपाटून पुरी करावी अशी आहे. लॉक डाऊन काळात जरूर वाचा. ...Read more

  • Rating Starमुबई, प्रहार २४ एप्रिल २०१६

    लेखक सुरेश पाटील यांची ‘दाह’ कादंबरी वाचायला हाती घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटत नाही. याचं कारण कादंबरीची वास्तवाशी जुळलेली नाळ. आपण सुरुवातीची जी सण, उत्सव, मयत, साखरपुडा, बारशी लग्न सारख्याच उत्साहानं पार पाडणारी मराठी माणसं पाहिली ती या कादंबरीत आपल्याला भेटतात. सुरेश पाटील यांनी रेखाटलेली प्रतीक व्यक्तिरेखा कुठेतरी, कधीतरी आपल्याला भेटलेली आहे. त्यामुळे वाचक कादंबरीशी चट्कन जोडला जातो. दक्षिण मुंबईतील ‘चण्याचा माळा’ नावाची चाळ. त्या चाळीत राहणारे चाळकरी त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यातील गुंतागुंत सुरेश पाटील यांनी उत्कटपणे लिहिली आहे. मुंबईतील प्रत्येक चाळ, गल्ली, बोळ यांच्या नावासोबत त्यांचा गतकाळ जोडला गेला आहे. मूळ नाव आणि लोकांनी ठेवलेलं नाव यात जमीन अस्मानचा फरक आहे. लोकांनी ठेवलेली नावचं जास्त रूढ आहेत. असंच ‘चण्याचा माळा’ चाळीचं आहे. सात मजली इमारतीतील प्रत्येक बिNहाडाचं अंतरंग ‘दाह’ कादंबरी उलगडतना लेखक सुरेश पाटील यांनी त्यांच्या वैविध्यातूनही त्यांचा माणूस असण्याचा धागा पकडून ठेवला आहे. मुळात तोच ‘दाह’चा गाभा आहे. माणसाचं इतरांशी आणि स्वतःशी असलेलं नातं. त्यांचं अनेकदा सुसंगत तर अनेकदा अतार्विâक वागणं याने वाचकही कुटुंबाशी जोडला जातो. कादंबरीची भाषा ही आपल्या नित्य वापराची आणि मराठी माणसांच्या सवयीची आहे. ओघात येणाNया शिव्या, स्त्रियांनी एकमेकांना सहजच ‘ए राडेऽऽ’ म्हणत अशी अनेक तपशिलामुळे कादंबरीतली माणसं आपल्याला आपली वाटतात. एकेकाळची मराठी माणसांची त्यांच्या हेव्यादाव्यांनी, सण उत्सवांनी गजबजलेली मुंबई त्यांच्याच चुकांमुळे कशी धनदांडग्याच्या हातात गेली याचं इत्थंभूत वर्णन ‘दाह’ कादंबरीमध्ये आहे. साधारण १९६० सालापासून ते टीव्ही, मोबाईलचे आगमन, माणसातील बदलत जाणारे नातेसंबंध, व्यवहार न कळल्यामुळे खानदान आणि गावातच जीव अडवूâन राहून स्वतःचीच प्रगती न होऊ दिलेली मराठी माणसं यात भेटतात. जागतिकीकरणाचा रेटा, जागेला आलेल्या विंâमती यामुळे मुंबईतून हद्दपार झालेल्या उपनगरात विखुलेला मराठी माणूस ‘दाह’ कादंबरीत पावलोपावली भेटतो. ऐतिहासिक गिरणी संप त्यामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणीगाव आणि पर्यायाने संपलेला मराठी माणूस याचं सामाजिक दस्ताऐवजीकरण या कादंबरीतून हाती लागतं. मुंबईतल्या स्थित्यंतराचा अत्यंत डोळसपणे कुठलाही आव न आणता घेतलेला धांडोळा असं एका वाक्यात दाह कादंबरीचं वर्णन करता येईल. नवोदित क्रिकेटपटूने पहिल्या बॉलमध्ये षट्कार ठोकावा आणि साNयांनी अवाव्â व्हावं अशी सुरेश पाटील यांच्या लेखक म्हणून पहिल्या कादंबरीने वाचकांची अवस्था केली आहे. मेहता पाqब्लशिंग सारख्या प्रकाशकांनी अतिशय बांधेसूद आणि देखण्या स्वरूपात कादंबरी सादर केली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ चितारताना डोळ्यांवर येणारा लालरंग कादंबरीच्या ‘दाह’ नावातील तीव्रता व्यक्त करणारा आहे. मनाचा ठाव घेणारी आणि काळजाशी जवळीक सांगणारी प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे अशी ‘दाह’ कादंबरी आहे. दै. प्रहार, मुंबई २४/४/२०१६ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more