* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHY DOES MAN CHANGE WHEN HE GAINS WEALTH? WEALTH EXPOSED THE HIDDEN VICES AND VIRTUES. THE VICES WHICH GENERALLY ARE ROOTED DEEP WITHIN, SURFACE IN THE PRESENCE OF WEALTH. WEALTH CHANGES HUMANS. A MISER BECOMES GREEDY WHEN HE BECOMES RICH. AN AVARICIOUS SPENDS A LOT IN BUYING VAST PROPERTY. A SELFISH BECOMES LUXURIOUS. A GENEROUS PERSON BECOMES ENDOWER. THOSE WHO HAVE NO LUST FOR MONEY ARE LEAST BOTHERED BY THE PRESENCE OR ABSENCE OF MONEY. WEALTH TRULY REVEALS THE COLOURS OF HUMAN NATURE AND RELATIONS
पैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुणअवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अधाशी माणूस जमीनजुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो. ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही. पैशामुळे खयाखुया मानवी संबंधांचं दर्शन घडतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarShubhada Borse

    नुकतेच सुधा मूर्ती यांच परीघ हे पुस्तक वाचलं. खूप छान कादंबरी आहे. ही कादंबरी मृदुला या पात्रांभोवती फिरते जी समाजातील एक सर्वसामान्य तत्वनिष्ठ तसेच कुठलीही भौतिक सुख गौन मानते. कादंबरीत सुधा ताईंनी समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधित्व करणारी पातरे रेखाटली आहेत .त्यामुळे हे कथानक आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी घडलं आहे असं वाटतं. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर संजय, प्रत्येक गोष्टीत केवळ व्यवहार बघणाऱ्या रत्नम्मा, श्रीमंतीचं ढोंग करणारी लक्ष्मी व शंकर, सरकारी कार्यालयातील बाबुंच प्रतिनिधित्व करणारे चिकनांजप्पा इत्यादी पात्र कथेला वास्तव बनवतात. सुधारणा इंची खूप सुंदर व वाचनीय कलाकृती. ...Read more

  • Rating StarChaitali Bandisode

    नमस्कार, नुकतेच सुधा मूर्ती यांचे परीघ हे पुस्तक वाचले . अंतर मनाला स्पर्श करणारी कथा आहे. या कथेतिल प्रमुख पात्र मृदुला आणि संजय जणू आपल्याच परिचयाची आहेत असा भास होतो. पैसा आणि अधिकार आल्यावर व्यक्ती कशी बदलत जाते हे खुप सुंदररित्या लिहले आहे. या ुस्तकातून शिकण्यासारखे खूप काही आहे. आपण आपल्या जवळ च्या माणसांनाबद्दल् आपल्या मनात एक मत तयार केलेले असते आणि आपण त्यावर विश्वास ठेवून एका वर्तुलात् (circle) फ़िरत असतो. पण जेव्हा आपल्या विश्वासाला तडा जातो तेव्हा आपण त्याच वर्तुलात् अडकले जातो व आपली घुसमट होते. पण हे सगळे सहन न करता आपण स्वतःसाठी मोकळा श्वास घेणे देखील आवश्यक असते. स्वतभोवतिचे परीघ ओलांडून स्वतःला संधी देणे सुद्धा गरजेचे आहे. हेच पुस्तकच्या मुखपृष्ठातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटते. नक्की वाचा. ...Read more

  • Rating StarPankaj Datare

    पैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुण-अवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अधाशी माणस जमीनजुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो.ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही.’ पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. पैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खर्‍याखुर्‍या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. हेच परीघ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे. ...Read more

  • Rating StarAtharva Sangita Rajendra Khamkar

    सुधा मूर्ती यांची जीवनशैली जितकी साधी आहे तोच साधेपणा त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये उतरलेला दिसतो. आपल्या समाजामध्ये असणाऱ्या विविध प्रवृत्तीच्या माणसांचे चित्रण त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते . त्याच पठडीतले सुधा मूर्तींचे एक पुस्तक म्हणजे रीघ ! आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसतं की काही माणसं भोगवादाला महत्त्व देतात तर काही जण आदर्शवाद पाळतात. ह्याच दोन वृत्तींच्या मधलं द्वंद्व लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. उत्तर कर्नाटकातल्या एका लहान गावातून आलेल्या , छोट्या गोष्टींमध्ये समाधानी असणाऱ्या मृदुलाची आणि तिच्या जीवनात येणाऱ्या हेलकाव्यांची ही गोष्ट ! गोष्टीचं आशय दिसताना अगदी साधा सरळ वाटतो ; पण त्यातला गभितार्थ खूप गहिरा आहे. साधा विषय अत्यंत खोलात जाऊन मांडणे हे सुधा मूर्तींच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे आणि ते ह्या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते. साध्या सरळ स्वभावाची , सगळ्या गोष्टींच्या मध्ये समाधानी असणारी , आदर्श वादाला प्राधान्य देणारी मृदुला , सुरुवातीला तत्व आणि मूल्य यांची पाठराखण करणारा परंतु काळाच्या ओघात आणि पैशाच्या कैफ चढल्याने भोगवादात सुख मानणारा तिचा नवरा संजय , भौतिक गोष्टींच्या हव्यासापायी पैशाची हवी तशी उधळपट्टी करणारे , थोड्याशा आतल्या गाठीची मृदुलाची नणंद लक्ष्मी आणि तिचा नवरा शंकर , काटकसर आणि पैसे साठवण्याच्या सवयीमुळे साध्या खर्चाला ही उधळपट्टी मानणारी तिची सासू , गावाकडे राहणाऱ्या आणि तेवढ्याच साध्या स्वभावाचे मृदुलाचे आईवडील , सुरुवातीला उत्साह आणि उपभोग यांच्यात रमलेली परंतु काही अपघातांच्या मुळे विरक्ती कडे वळलेली मृदूलाची मैत्रीण अनिता , अतीलाडाने बिघडलेला मृदुलाचा मुलगा शिशिर आणि मृदुला च्या आयुष्यात वेळीच येऊन तिला सावरणारे तिचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राव यांसारख्या कितीतरी परस्पर विरोधी पात्र , त्यांचे संवाद आणि त्यांची अवस्था वाचताना खरच आपण अंतर्मुख होऊन जातो. उत्तर कर्नाटक ते बेंगलोर पर्यंत बदलत्या कर्नाटकाच्या विविध छटांचे आरेखन , माणसाच्या आत चाललेल्या द्वंद्वाचे कथन , एकाच समाजात किंबहुना एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या विविध मनोवृत्तीचे चित्रण आणि कुठेही अतिशयोक्ती वाटणार नाहीत अश्या प्रसंगांची मांडणी ही ह्या पुस्तकांची वैशिष्ट्ये मानायला हवीत. कथेचा शेवट जरी सुखांतिके कडे वळणारा असला तरीही हे पुस्तक ठिकठिकाणी आपल्या मनावर प्रभाव पडून जात. वाचताना ठिकठिकाणी आपल्याला दोन गोष्टींच्या मधली एकची निवड करायला भाग पाडत आणि शेवटी एक मोठा इम्पॅक्ट मनावर ठेऊन जात. आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं ! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more