* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHY DOES MAN CHANGE WHEN HE GAINS WEALTH? WEALTH EXPOSED THE HIDDEN VICES AND VIRTUES. THE VICES WHICH GENERALLY ARE ROOTED DEEP WITHIN, SURFACE IN THE PRESENCE OF WEALTH. WEALTH CHANGES HUMANS. A MISER BECOMES GREEDY WHEN HE BECOMES RICH. AN AVARICIOUS SPENDS A LOT IN BUYING VAST PROPERTY. A SELFISH BECOMES LUXURIOUS. A GENEROUS PERSON BECOMES ENDOWER. THOSE WHO HAVE NO LUST FOR MONEY ARE LEAST BOTHERED BY THE PRESENCE OR ABSENCE OF MONEY. WEALTH TRULY REVEALS THE COLOURS OF HUMAN NATURE AND RELATIONS
पैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुणअवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अधाशी माणूस जमीनजुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो. ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही. पैशामुळे खयाखुया मानवी संबंधांचं दर्शन घडतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarShubhada Borse

    नुकतेच सुधा मूर्ती यांच परीघ हे पुस्तक वाचलं. खूप छान कादंबरी आहे. ही कादंबरी मृदुला या पात्रांभोवती फिरते जी समाजातील एक सर्वसामान्य तत्वनिष्ठ तसेच कुठलीही भौतिक सुख गौन मानते. कादंबरीत सुधा ताईंनी समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधित्व करणारी पातरे रेखाटली आहेत .त्यामुळे हे कथानक आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी घडलं आहे असं वाटतं. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर संजय, प्रत्येक गोष्टीत केवळ व्यवहार बघणाऱ्या रत्नम्मा, श्रीमंतीचं ढोंग करणारी लक्ष्मी व शंकर, सरकारी कार्यालयातील बाबुंच प्रतिनिधित्व करणारे चिकनांजप्पा इत्यादी पात्र कथेला वास्तव बनवतात. सुधारणा इंची खूप सुंदर व वाचनीय कलाकृती. ...Read more

  • Rating StarChaitali Bandisode

    नमस्कार, नुकतेच सुधा मूर्ती यांचे परीघ हे पुस्तक वाचले . अंतर मनाला स्पर्श करणारी कथा आहे. या कथेतिल प्रमुख पात्र मृदुला आणि संजय जणू आपल्याच परिचयाची आहेत असा भास होतो. पैसा आणि अधिकार आल्यावर व्यक्ती कशी बदलत जाते हे खुप सुंदररित्या लिहले आहे. या ुस्तकातून शिकण्यासारखे खूप काही आहे. आपण आपल्या जवळ च्या माणसांनाबद्दल् आपल्या मनात एक मत तयार केलेले असते आणि आपण त्यावर विश्वास ठेवून एका वर्तुलात् (circle) फ़िरत असतो. पण जेव्हा आपल्या विश्वासाला तडा जातो तेव्हा आपण त्याच वर्तुलात् अडकले जातो व आपली घुसमट होते. पण हे सगळे सहन न करता आपण स्वतःसाठी मोकळा श्वास घेणे देखील आवश्यक असते. स्वतभोवतिचे परीघ ओलांडून स्वतःला संधी देणे सुद्धा गरजेचे आहे. हेच पुस्तकच्या मुखपृष्ठातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटते. नक्की वाचा. ...Read more

  • Rating StarPankaj Datare

    पैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुण-अवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अधाशी माणस जमीनजुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो.ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही.’ पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. पैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खर्‍याखुर्‍या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. हेच परीघ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे. ...Read more

  • Rating StarAtharva Sangita Rajendra Khamkar

    सुधा मूर्ती यांची जीवनशैली जितकी साधी आहे तोच साधेपणा त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये उतरलेला दिसतो. आपल्या समाजामध्ये असणाऱ्या विविध प्रवृत्तीच्या माणसांचे चित्रण त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते . त्याच पठडीतले सुधा मूर्तींचे एक पुस्तक म्हणजे रीघ ! आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसतं की काही माणसं भोगवादाला महत्त्व देतात तर काही जण आदर्शवाद पाळतात. ह्याच दोन वृत्तींच्या मधलं द्वंद्व लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. उत्तर कर्नाटकातल्या एका लहान गावातून आलेल्या , छोट्या गोष्टींमध्ये समाधानी असणाऱ्या मृदुलाची आणि तिच्या जीवनात येणाऱ्या हेलकाव्यांची ही गोष्ट ! गोष्टीचं आशय दिसताना अगदी साधा सरळ वाटतो ; पण त्यातला गभितार्थ खूप गहिरा आहे. साधा विषय अत्यंत खोलात जाऊन मांडणे हे सुधा मूर्तींच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे आणि ते ह्या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते. साध्या सरळ स्वभावाची , सगळ्या गोष्टींच्या मध्ये समाधानी असणारी , आदर्श वादाला प्राधान्य देणारी मृदुला , सुरुवातीला तत्व आणि मूल्य यांची पाठराखण करणारा परंतु काळाच्या ओघात आणि पैशाच्या कैफ चढल्याने भोगवादात सुख मानणारा तिचा नवरा संजय , भौतिक गोष्टींच्या हव्यासापायी पैशाची हवी तशी उधळपट्टी करणारे , थोड्याशा आतल्या गाठीची मृदुलाची नणंद लक्ष्मी आणि तिचा नवरा शंकर , काटकसर आणि पैसे साठवण्याच्या सवयीमुळे साध्या खर्चाला ही उधळपट्टी मानणारी तिची सासू , गावाकडे राहणाऱ्या आणि तेवढ्याच साध्या स्वभावाचे मृदुलाचे आईवडील , सुरुवातीला उत्साह आणि उपभोग यांच्यात रमलेली परंतु काही अपघातांच्या मुळे विरक्ती कडे वळलेली मृदूलाची मैत्रीण अनिता , अतीलाडाने बिघडलेला मृदुलाचा मुलगा शिशिर आणि मृदुला च्या आयुष्यात वेळीच येऊन तिला सावरणारे तिचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राव यांसारख्या कितीतरी परस्पर विरोधी पात्र , त्यांचे संवाद आणि त्यांची अवस्था वाचताना खरच आपण अंतर्मुख होऊन जातो. उत्तर कर्नाटक ते बेंगलोर पर्यंत बदलत्या कर्नाटकाच्या विविध छटांचे आरेखन , माणसाच्या आत चाललेल्या द्वंद्वाचे कथन , एकाच समाजात किंबहुना एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या विविध मनोवृत्तीचे चित्रण आणि कुठेही अतिशयोक्ती वाटणार नाहीत अश्या प्रसंगांची मांडणी ही ह्या पुस्तकांची वैशिष्ट्ये मानायला हवीत. कथेचा शेवट जरी सुखांतिके कडे वळणारा असला तरीही हे पुस्तक ठिकठिकाणी आपल्या मनावर प्रभाव पडून जात. वाचताना ठिकठिकाणी आपल्याला दोन गोष्टींच्या मधली एकची निवड करायला भाग पाडत आणि शेवटी एक मोठा इम्पॅक्ट मनावर ठेऊन जात. आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं ! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more