* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SALT AND HONEY
  • Availability : Available
  • Translators : VAIJAYANTI PENDSE
  • ISBN : 9788184982558
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN A SOUTHERN AFRICA VIOLENTLY SPLIT DURING APARTHEID, KOBA IS TAKEN AWAY FROM HER KALAHARI DESERT-TRIBE AFTER WITHNESSING HER PARENTS BEING MURDERED BY A PARTY OF WHITE HUNTERS. SHE SLOWLY LEARNS TO ADAPT AND SURVIVE IN A DANGEROUS BUT BEAUTIFUL ENVIRONMENT. HOWEVER, SHE IS PLAGUED BY THE KNOWLEDGE THAT UNLESS SHE LEAVES THOSE WHO HAVE GROW TO LOVE HER, SHE FACES EXILE FROM HER OWN PEOPLE. THE ONLY ANSWER MAY BE TO RISK ALL THROUGH THE BRUTAL LAWS THAT CONDEMN HER. OFFERING A RARE GLIMPSE INTO AN ENDANGERED CULTURE,SALT & HONEY IS AN EPIC, MOVING AND FASCINATING STORY OF ENDURANCE AND UNDERSTAINDING. ""CANDI MILLER`S ACHIEVEMENT IS TO HAVE WRITTEN A SMALL BOOK WITH TRULY BIG THEMES. IT`S AN AMBITIOUS NOVEL WITH IMPRESSIVE RANGE AND A VERY AUTHENTIC FEEL.`` BARBARA TRAPIDO
कोबा! वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणाऱ्या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी! गोऱ्या लोकांच्या एका शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या स्वत:च्या जगापासून दूर, त्या गोऱ्यांच्या जगात नेलं जातं. त्यांच्या त्या सुंदर पण तिच्यासाठी धोक्याच्या असलेल्या जगाशी जुळवून घ्यायला. त्यात टिकाव धरायला ती हळूहळू शिकते. तरीही एक जीवघेणी जाणीव तिला सतत टोचणी लावून असते ती म्हणजे जर तिला स्वत:च्या जमातीकडून बहिष्कृत व्हायचे असेल, त्यांच्यापासून पूर्णपणे तोडले जायचे नसेल तर तिला त्या माणसांचा, ज्यांच्यावर तिचा जीव जडला आहे, त्यांचा त्याग करावाच लागेल. अखेर तिलाच दोषी ठरवणाऱ्या गोऱ्यांच्या त्या अत्याग्य कायद्यांच्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावणे हाच कदाचित त्यावर उपाय असू शकतो. एका नष्ट होऊ घातलेल्या संस्कृतीच्या जीवनशैलीच्या अंतरंगाची दुर्मिळ झलक दाखवणारी ही कादंबरी हे महाकाव्यच आहे सहनशक्ती आणि चिवटपणा तसेच सामंजस्य व सहिष्णुतेची ही एक मन हेलावून टाकणारी रोमहर्षक कहाणी आहे. वँÂडी मिलरचं श्रेय हेच आहे की एका छोट्याश्या पुस्तकात तिने फार मोठा आशय व्यक्त केला आहे. ह्या महत्वाकांक्षी कादंबरीचा आवाका फार मोठा आहे आणि तिला मातीचा स्पर्श आहे. – बार्बरा ट्राजिडो

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SALTANDHONEY(MARATHI) #सॉल्ट अ‍ॅण्ड हनी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VAIJYANTIPENDSE #CANDI MILLER #कॅंडी मिलर "
Customer Reviews
  • Rating StarRavindra Chavan

    सॉल्ट अॅंड हनी... कॅंडी मिलर.. अनुवाद :वैजयंती पेंडसे. लॉकडाऊन काळात अचानक हाती लागलेले रत्न.. दक्षिण आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातील भटक्या आदिवासी आणि वर्णद्वेषी (तथाकथित शहरी) घुसखोरी संघर्षांतील भीषण कॅनव्हासवर उभी राहिलेली एक सुंदर प्रेमकथा.. आपल्या जमातीपासुन तोडल्या गेलेल्या "कोबा" या लहानग्या मुली विषयीच हे पुस्तक. एका विलक्षण सौंदर्याने नटलेल्या आणि त्याचवेळी भीतीदायक क्रौयाने भरलेल्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले. कोबा!वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमाती पैकी एक लहानगी.! गोर्‍या लोकांच्या एका शिकारी चमुकडून आपल्या आईवडिलांची झालेली निघृण हत्या स्वतः च्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या स्वतःच्या जगापासून दूर, त्या गोर्‍यांच्या जगात नेलं जात. नंतर सुरु होतो एक संघर्ष त्या जगाशी जुळवून घेण्यासाठी आणि आपली संस्कृती आपल्याला बहिष्कृत करणार नाही ना ह्याची टोचणारी जाणीव... संघर्षांतच फुलणारे प्रेम... ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तिच्याशी च मैत्री करावी. ह्या अनुबंधावर हेलकावे खात असणारी "कोबा"..! अनुवाद एवढा समरसून झालाय कि कुठेही प्रवाही कथेला बांध नाहीच.. नुसते खळखळुन वाहतोय प्रवाह.. धाडसी विधानं पण कथेला वेगळीच खुमारी देतात.. पुरूष तर नेहमीच स्वतः ला कोणताही त्रास करून न घेता लैंगिक सुख मिळवत असतात, नाही का? हळुवार फुलणारी प्रेमकथा आणि अंगावर गोड शहारे आणणारे प्रसंग नसतील अस होईल का ?त्या चोरट्या प्रणय प्रसंगांची एक वेगळीच हुरहुर आहे.! प्रेम आले म्हणजे व्हिलन आले. एक मस्त मसालापट बघण्याचा आनंद घ्यायचा असेल तर हे दूर्लक्षित महाकाव्य नक्की वाचा. सहनशक्ती आणि चिवटपणा तसेच सामंजस्य व सहिष्णुतेची ही एक मन हेलावून टाकणारी रोमहर्षक कहाणी आहे. कॅंडी मिलरचे श्रेय हेच आहे कि एका छोट्याश्या पुस्तकात तिने फार मोठा आशय व्यक्त केला आहे. ह्या महत्वाकांक्षी कादंबरीचा आवाका फार मोठा आहे आणि तीला ओघवत्या अनुवादाने मातीचा स्पर्श आलेला आहे.. आपलाच RC. 😊. ११/०५/२०२०. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more