* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788190757430
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OFFERS DIFFERENT EXERCISES FOR WOMEN WHO WANT TO LIVE HEALTHIER LIVES, AS WELL AS LONGER ONES. THE AUTHOR OFFERS A FRIENDLY FITNESS PROGRAM DESIGNED WOMEN IN THEIR MIDDLE AGE.
टेन्शन! तणाव! आजच्या युगाचे हे अगदी परवलीचे शब्द. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, शहरापासून खेड्यापर्यंत ‘टेन्शन’ हा शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी सतत असतो. आजच्या तरुण पिढीचं जीवन तर धावत्या प्रवाहासारखं आहे. हा प्रवाह सतत वाहतो आहे, थांबणं त्याला माहीतच नाही. मग त्यातून कुटुंब, शिक्षण, व्यवसाय या सर्वच ठिकाणी जाणवणारा ताण! ताण कमी करून तरुण पिढीचं जगणं सुकर करण्यासाठी, ‘हितगूज - तणावयुगातील तरुण पिढीशी’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 12-08-2001

    मायलेकीमधील बदलत्या नात्याचा आलेख... मुळात स्त्रीचे जीवन संपूर्ण यशस्वी जगणे कठीण आणि तिचे मन कळणे त्याहून कठीण. मायलेकीचे संबंध प्रेमाचे असावेत असा एक संकेत आहे, पण त्या दोघीही जेव्हा ‘स्त्री’च्या भूमिकेतून बोलतात तेव्हा त्यांना वेगळा अर्थ येतो. त्ांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे विविध कंगोरे स्पष्ट होतात. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेले ‘हितगुज’ हे पुस्तक म्हणजे वृंदा दाभोळकर यांच्या कॅरेन पेन यांच्या पुस्तकाचा अनुवाद आहे. मायलेकींचे संबंध स्पष्ट करताना वापरली गेलेली भूमी पाश्चात्त्य आहे. हिंदुस्थानी नव्हे हे पटकन लक्षात येते. आपल्या समाजात अद्यापही मायलेकीचे संबंध व्यापक स्वरूपात समाजासमोर येत नाहीत. प्रस्तुत पुस्तकात स्त्रियांच्या भावावस्थाच जास्त प्रकट होतात. अक्षम्य उद्रेक, निराशा, भ्रमनिरास, संताप, अलगीकरणाचे तंत्र, दु:ख, राग, विश्वासघात अशा अनेक मूलभूत भावनांचा आविष्कार या पत्रांतून दिसून येतो. विचारांची जत्रा भरलेली वाटत असली तरी विचारांचा मसावि काढता येईल इतके विचार मिळतेजुळते आहेत. स्त्रिया आपल्या चुकांची कबुली देतात हा भागही महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच जगण्यासाठी आवश्यक ते तत्त्वज्ञान देणारा आहे. मूळ लेखिका कॅरन पेन हिच्या ऐंशी पत्रांपैकी चाळीस पत्रे या पुस्तकात आहेत. मायलेकींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची जंत्री वृंदा दाभोळकर या पुस्तकाचा अनुवाद सादर करताना देतात आणि नंतर पत्रे येतात. मायलेकींमधल्या संबंधांची विषयवार मांडणी करून विचारांची एकतानता जपण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. त्यामुळे सिल्विया प्लॅथ, एडिथ समरस्कील इ. पुन्हा येताना दिसतात. व्हर्जिनिया वुल्फने आपल्या लिखाणात अडचण आणणारे भूत एक स्त्री असे सांगून त्यास यक्षिका असे संबोधले. त्याचाच आधार घेऊन पत्रे इथे आली आहेत. माझ्या मुलीने आत्मविश्वासाने समर्थ व्हावे असे हेलन आपल्या मुलीस म्हणते. सिल्विया प्लॅथ आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण आयुष्य जगली. स्वत: आयुष्य खडतर जगूनही ती आईसोबत हिरव्या बगिच्यामधून एकत्र फिरू पाहते. जशी सिल्विया प्लॅथने आत्महत्या केली तशीच अ‍ॅन सेक्सटन हिनेही केली. मात्र अ‍ॅन शांतपणे मरणाला सामोरी गेली. एकाकीपण ही भयानक गोष्ट आहे असे मानूनही हे विशेष. संसारातील आईला आपले अर्धे आयुष्य कुटुंबासाठी खर्च घालून नंतरच आपली स्वप्ने पूर्ण करता येतात हे पुढच्या प्रकरणात सिद्ध होते. १८व्या शतकात लेडी मेरी वर्टले माँटेग्यू हिने भरपूर प्रवास केला. त्या काळात स्त्रीने घर सोडणे टीकास्पद होते हे लक्षात घेतले तर तिचे धाडस लक्षात येईल. फेडरिका ब्रेमर या पत्रकार होत्या आणि त्यांनी स्विडिश स्त्रियांची संपूर्ण मुक्तता करण्यासाठी अथक प्रयत्न केले. हॅरिअट मार्टिना हिनेही स्वातंत्र्य उपभोगले आणि त्याचे परिणामही. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी घेणारी पहिली स्त्री. गुलामगिरीच्या विरुद्ध ती भांडली. आईचे ऋण तिने सतत मान्य केले. डॉक्टर बनले कशी हे तिचे निवेदन छान आहे, लुईसा अ‍ॅलकॉटही यात सामील आहे. आधुनिकतेचे वारे शिरल्यामुळे विचारात झालेला बदल हा स्त्रियांच्या मानसिकतेमधूनही दिसून येऊ लागला. याचे समर्पक दिग्दर्शन पुढील सर्व प्रकरणांमधून होते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-03

    मायलेकीच्या नात्याला अनेक पदर असतात. आई हे कन्येसमोर असलेले स्त्रीचे मुख्य रूप. मायलेकीच्या संवादातून, आईने पेरलेल्या संस्काराच्या बीजातून लेकीचे व्यक्तिमत्त्व घडत असते. स्त्री-स्वातंत्र्याच्या लेकीच्या कल्पना घडवण्यात आईचा वाटा महत्त्वाचा असतो. घरच्ा ऊबदार वातावरणातून बाहेर पडल्यावर स्त्री स्वातंत्र्याचे अधिक पैलू लेकीवर तिच्या स्वत:च्या अनुभूतीनुसार पडत राहतात. तिचा असा आत्मविकास होत असताना आई त्याकडे कशा दृष्टिकोनातून बघते, लेक आईकडे आपल्या नव्या जाणिवा किंवा भावना कशा प्रकारे व्यक्त करते, त्या संवादात दोन पिढ्यांच्या नातेबंधात काय बदल घडतात, दोघी एकमेकींना कशा प्रकारे समजून घेतात हे पाहणे फारच रंजक ठरू शकते. स्त्रीविकासाची ही प्रक्रिया साहित्यात शब्दरूप झालेली क्वचितच आढळते. मुळातच आपल्या इतिहासातून स्त्रियांबद्दल फार कमी कळते. महान व्यक्तिंचा इतिहास वाचताना त्या व्यक्तीचे वडील कोण होते हे सहजतेने समजते, आई कोण होती, कशी होती, हे क्वचितच वाचायला मिळते. त्यामुळे स्त्रीच्या समाजातील बदलत्या स्थानाबद्दलचा, स्त्री-मुक्तीच्या प्रक्रियेबद्दलचा सामाजिक इतिहास वाचायला मिळणे दुरापास्तच! स्त्री-मुक्तीच्या वातावरणात मायलेकींबद्दल नाते कसे असेल या औत्सुक्यापोटी लंडनच्या कॅरन पेन यांनी मायलेकींमधील पत्रे जमवण्याचे संशोधन कार्य हाती घेतले. पत्ररूप संवादातून उलगडणारे मायलेकींमधील नाते हा विषयच मुळात खूप छान आहे. कॅरन पेन यांनी हा विषय संशोधनासाठी निवडला आणि त्यांचे कार्य पूर्ण झाल्यावर या नात्याचा एक रंजक इतिहासच त्याच्यासमोर उभा ठाकला. महत्प्रयासाने कॅरन पेन यांनी जमवलेल्या पत्रांपैकी ८० पत्रे Between Owlrselves Lelters `Between Mothers & Daughters` या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. या इंग्रजी पुस्तकाचा वृन्दा दाभोलकर यांनी केलेला अनुवाद ‘हितगुज’ या नावाने ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ ने प्रसिद्ध केला आहे. अनुवादाच्या परीक्षणापूर्वी मूळ लेखिकेने मायलेकीच्या नात्यांमधले विविध विभ्रम कसे उलगडून दाखवले आहेत हे पाहू. खिस्तीन क्लॉज ही न्यूयॉर्कमधील चित्रकार स्त्री. तिचे आणि तिच्या आईचे हेलनचे नाते फार प्रांजळ होते. खिस्तीन कॉलेजला जाऊ लागल्यानंतर, तिचे स्वतंत्र आयुष्य जगू लागल्यानंतर हेलनने तिला लिहिलेल्या पत्रांतून आई म्हणून लेकीबद्दल वाटणारी काळजी, लेकीचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार ऐकून आईचा उडालेला गोंधळ, तरीही तिच्यावर विश्वास ठेवून लेकीला दिलेले प्रोत्साहन आणि स्वत:त नसलेली धमक मुलीत असावी अशी इच्छा या साऱ्यांचे सुरेख मिश्रण बघायला मिळते. हेलनने कॅरन पेन यांना स्वत:च्या मातृत्वाच्या आदर्शाबाबतचे विचार पत्राद्वारे सांगितले. त्यात या मातेने म्हटले की, सर्कशीत हवेत कसरती करणाऱ्याच्या खाली सुरक्षिततेची तजबीज म्हणून जाळी धरण्याची माझी भूमिका आहे. ही जाळी खाली आहे या जाणिवेने माझ्या एकुलत्या एका लेकीला सुरक्षित वाटावे आणि तिला उंच उडत कसरती करणे शक्य व्हावे अशी माझी तिला वाढवताना धारणा होती. माझ्या मुलीने आत्मविश्वासाने तिच्या आकाशात भराऱ्या माराव्यात. हे करताना तिने या उंच आकाशात माझ्यासाठी जागा ठेवली तर माझ्या संस्कारांचे सार्थक होईल. सिल्व्हिया प्लॅथ ही पुलित्झर पारितोषिक विजेती कवयित्री. ती तिच्या आईला पाठवलेल्या पत्रातून तिच्या यशातील आईचा वाटा किती मोठा आहे हे कृतज्ञतापूर्वक लिहिते. मोठी कवयित्री झाल्यानंतरही तिच्या मनातील आईचे ऋण कायम राहिले. तिच्या विश्वात तुलनेने सामान्य असलेल्या तिच्या आईला कायम अढळपद होते. एडिथ समरस्किल ही ब्रिटिश संसद सदस्य. एक व्यग्र राजकारणी व पेशाने डॉक्टर असलेल्या एडिथला कायम भीती होती शर्ले या आपल्या कन्येला आपण न्याय देऊ शकू की नाही. आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे शर्लेच्या मनात राजकारणाबद्दल द्वेषाची बीजे पेरली जातील, अशीही धाकधूक तिच्या मनात होती. पण शर्लेही राजकारणात उतरली आणि एडिथचा ताण दूर झाला. शर्लेला लिहिलेल्या पत्रातून एडिथच्या या भावना व्यक्त होतात. प्रेमात पडल्याची बातमी प्रत्यक्ष देण्यापेक्षा पत्रातून सांगण्याचा मार्ग आजही अनेक मुलींना सोयीस्कर वाटतो. प्रेमप्रकरणाची माहिती आईला देणारी काही मुलींची पत्रे आणि त्यांना आयांनी दिलेली उत्तरे यांतून ‘सावर गं!’, ‘जपून टाक पाऊल जरा!’ अशा सल्ल्यांपासून ते आईने केलेल्या टोकाच्या विरोधापर्यंतच्या साऱ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या पत्रांतून व्यक्त झाल्या आहेत. एलिझाबेथ ब्लॅकवेल या आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी घेणाऱ्या पहिल्या स्त्रीच्या तीन पिढ्यांमधील संवाद पत्ररूपाने मांडला आहे. एलिझाबेथ केंटुकी राज्यात राहत होती. तेथील गुलामगिरी पाहून विषण्ण मनाने तिने तिच्या आईला पत्रे लिहिली. पुढे एलिझाबेथ डॉक्टर झाली. तिने तिच्या मुलीला लिहिलेल्या पत्रात आपण वैद्यकीय व्यवसाय कसा निवडला हे सांगितले आहे. हे पत्र म्हणजे या पहिल्या महिला डॉक्टरचे संक्षिप्त आत्मचरित्र ठरावे. या सर्व पत्रांतील आपल्या दृष्टीने एक उल्लेखनीय पत्र म्हणजे मीरा या भारतीय मुलीने तिच्या आईला व मुलीला लिहिलेली पत्रे. मीरा १९६० मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. त्यानंतर तिचा तिच्या आईशी पत्रव्यवहार सुरू झाला. सुरुवातीच्या पत्रात मीरा अमेरिकेत रुळतानाच्या दिवसात आईला वाटणारी काळजी व्यक्त होते. अमेरिकेच्या प्रेमात पडलेल्या व तेथील संस्कृतीत रुळलेल्या मीराने आईला लिहिलेल्या पत्रांतून तिची भारतीय संस्कृतीशी तुटत चालेली नाळ आणि ती व तिची आई यांच्यातील वाढत चाललेला दुरावा यांचे दर्शन घडते. शेवटी तिने तिच्या अमेरिकन मित्राशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिचे पत्र आहे. परस्पर लग्न ठरवण्यापेक्षा तू भारतात येऊन आमच्याशी चर्चा करून मग काय ते ठरव असा सल्ला देणारे आईचे पत्र दुर्लक्षून मीरा लग्न करून मोकळी होते. २० वर्षांनंतर मीराची मुलगी रीटा तिला जे पत्र पाठवते त्यातून मीराचे अमेरिकीकरण किती वरवरचे व बेगडी होते ते सिद्ध होते. रीटाने मीराला लिहिलेल्या पत्रात ती म्हणते, ‘जेव्हा तू माझ्या अमेरिकन वडिलांसमवेत इथली संस्कृती अंगिकारण्याचा निर्णय घेतलास तेव्हा तुझ्या पालकांचा तुला पाठिंबा नव्हता. आज आपण दोघी भौगोलिकदृष्ट्या एकमेकांसमवेत असलो तरीही तू मला पाठबळ देऊ शकत नाहीस. आपल्यात जे अंतर पडले आहे त्याचे कारण आहे ‘भारत’. मीरा व रीटा यांच्यातला संघर्ष आज प्रातिनिधिक ठरावा. भारतातून अमेरिकेत स्वखुशीने स्थायिक झालेल्या मीरातील ‘भारतीय-माता- मात्र वारंवार डोकावते. रीटा तिच्या मित्रांसमवेत काही उथळ गोष्टीत रमते, तेव्हा मीरा आक्षेप घेते. आपण करतो ते सर्व योग्य नव्हे याची जाणीव रीटाला असते. तरीही मित्रपरिवारात आपण स्वीकारले जावे यासाठी रीटा त्यांच्यात असताना त्यांच्यासारखी वागते. मीरा हे समजू शकत नाही आणि म्हणून तिच्या व रीटाच्या नातेसंबंधात कडवटपणा येतो. मला माझे जीवन जगू दे हे रीटा तिला सांगत असते. परदेशातील स्थायिक झालेली पहिली पिढी आणि तिथल्याच मातीत जन्मलेली दुसरी पिढी यांच्यातील संघर्षाचे नेमके चित्रण या पत्रांत आहे, जे आजच्या ‘विश्वचि माझे घर’च्या युगात प्रातिनिधिक ठरू शकते. मायलेकीच्या नातेसंबंधांचा असा हा कोलाज! मात्र ढिसाळ अनुवादामुळे तो पार विस्कटलेल्या स्वरूपात आपल्या हाती आला आहे, हे खेदाने म्हणावे लागते. मुळात कॅरन पेन यांच्या पुस्तकातील ८० पत्रांपैकी फक्त ४० पत्रांचाच अनुवाद या पुस्तकात आहे. कारण दिले आहे विस्तारभयाचे. हे भय कोणाला, लेखिकेला की प्रकाशकाला? अर्थात याचे उत्तर अनुवादिकेने दिलेले नाही. चुकीच्या वाक्यरचना, अयोग्य शब्दवापर अगदी ठायी ठायी सापडतात आणि त्याचा पुस्तक वाचताना त्रास होतो. इतका गुंतवून ठेवणारा विषय, पण वाईट अनुवादामुळे पुस्तक सलग वाचणे कठीण होऊन बसते. कॅरन पेन यांनी मायलेकीच्या प्रत्येक जोडीचा परिचय दिला आहे. नंतर त्यांची पत्रे आणि त्यावरील लेखिकेचे भाष्य असे स्वरूप आहे. लेखिकेचे भाष्यही फार छान आहे. ‘हितगुज’ या पुस्तकात लेखिकेचे शब्द आणि पत्रांचा मजकूर यातील वेगळेपण टाईप आणि मांडणी यांद्वारे स्पष्ट करता आले असते. असे न केल्याने अनेकदा पत्रांतील मजकूर कुठे संपतो आणि लेखिकेचे भाष्य कुठे सुरू होते हे स्पष्ट समजत नाही. ही पत्रे वाचताना आपल्या पाश्चात्य संस्कृतीतील मायलेकींमधला सांस्कृतिक फरक फारसा जाणवत नाही. जग जवळ आल्याने सांस्कृतिक भेद कमी झाले आहेत. ही पत्रे वाचताना हेच प्रकर्षाने जाणवते. मित्रांबरोबरच्या प्रेमसंबंधांना पाश्चिमात्त्य आईही आक्षेप घेते... लग्नाशिवाय एक राहण्याचा लेकीचा निर्णय तेथील आईही स्वीकारू शकत नाही! असे मायलेकींतील सांस्कृतिक संघर्ष जसे विश्वव्यापी तशीच ‘आयुष्यात मला स्वातंत्र्य, स्वाभिमान सारं काही हवं आहे आणि तुलासुद्धा हे हवंसहवंस वाटावं हेच मला अभिप्रेत आहे’, ही मातृसुलभ भावना आणि त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या लेकीला प्रोत्साहन देणे ही कृती विश्वात सर्वत्र सर्रास आढळणारी आहे. असे अधिकाधिक मातांना वाटेल आणि अधिकाधिक लेकी अशा भावनेतून घडतील तेव्हाच स्त्रीयांना खरी मुक्ती लाभेल, हे वैश्विक सत्य आहे. कॅरन पेनने त्याचा उल्लेख प्रस्तावनेत केला आहे. म्हणूनच मायलेकीच्या या नातेसंबंधांचा हा कोलाज सर्वांनी वाचण्यासारखा आहे. तो मराठीत अधिक चांगल्या प्रकारे वाचायला मिळायला हवा होता, तरच या विषयाला आणि मूळ पुस्तकाला न्याय मिळाला असता. -शुभदा चौकर ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 5-4-2009

    सध्याच्या युवा पिढीत `टेन्शन` म्हणजेच ताणतणाव हा शब्द परवलीचा झाला आहे. आपले मूल प्राथमिक शाळेत असल्यापासूनच मेरिटच्या नावाखाली पालक त्याला खाजगी शिकवणीच्या दावणीला बांधून टाकतात. आपल्या मुलाने वर्गात पहिल्या पाचात आलेच पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास अतो. दहावीपर्यंत याच तणावात मुले राहतात. दहावीला तर त्यांच्यावर अभ्यासाचा प्रचंड ताण असतो. आपल्या मुलावर बहुतांश पालक आपल्या महत्वाकांक्षा लादतात. त्याने काय शिकावे, हेही तेच ठरवतात. त्यांच्या मनाचा, त्यांना काय आवडते याचा विचार सुशिक्षित पालकही करीत नाहीत. परिणामी मुले सतत मानसिक तणावाखाली राहिल्याने त्यांच्या आरोग्यावरही वाईट पणिाम होतात. काही मुले चुकीच्या मार्गाला लागतात, बिघडतात. स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लावून, चंगळवादी संस्कृतीच्या नादाला लागतात. व्यसनी होतात. आधुनिकता म्हणजे स्वैराचार नव्हे. याचा विचार पौगंडावस्थेतील मुले करीत नाहीत. पालकांना अश्या मुलांची काळजी वाटते. पण हे सारे का घडते, याचा विचार ते करीत नाहीत. सध्याच्या युवा पिढीच्या मानसिकतेचा आणि वस्तुस्थितीचा अचूक वेध घेत अंजनी नरवणे यांनी विद्यार्थी आणि तणावयुगातील तरुण पिढीशी साधलेला हा सुसंवाद, पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवणारा, ताण तणावातून मुक्ततेची दिशा दाखवणारा आहे. गेल्या काही वर्षात देशात पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याचे खूळ माजले. माध्यमिक शाळेत, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना मोकळेपणाचा खरा अथे समजला नाही. प्रेमाच्या नावाखाली नको ते चाळे करू नयेत, असे भान मुला-मुलींना राहिलेले नाही. शिक्षणाचा धंदा झाल्यामुळे मध्यमवर्गीय पालकांना विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या महत्वाकांक्षा डोनेशन देवून पूर्ण करता येत नाही. विद्यार्थी निराश होतात. हे सारे घडते, त्याचे कारण आपल्या मुलांशी पालकांचा सुसंवाद कमी झाला, काही कुटुंबात तर तो पूर्णपणे तुटला आहे. सुखाच्या कल्पना वेगळ्या झाल्या आहेत. पालकही, तो अमका पाच क्रमांकात आला, तुला का असे गुण मिळत नाहीत, असे मुलांना हिणवतात. त्यांच्यावर टीका करतात. प्रेमाचा अर्थही तरुण पिढीला समजलेला नाही. भारतीय संस्कृतीतील नीतीमूल्यांच्या संकल्पनांचा धाक काही मुलांना राहिलेला नाही. आधुनिक काळातल्या या समस्यांमुळे ताणतणाव तर वाढलेच पण त्यामुळे नव्या समस्याही निर्माण कशा झाल्या आहेत, याचे अचूक विवेचन नरवणे यांनी केले आहे. तुमची मुले नव्या समस्या की आनंदाचा ठेवा, याचा विचार करुनच पालकांनी आपल्या मुलांशी वागायला हवे. नवविवाहित तरुण-तरुणींनी परस्परांना समजून घ्यायला हवे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चंगळवादापासून दूर राहिले पाहिजे. निरामय आयुष्य हाच सुखाचा खरा मूलमंत्र आहे, याचा विसर पडू देऊ नये. पैसा हे सर्वस्व नाही, पार्ट्या म्हणजे आनंद मिळविणे नव्हे, लहान मुलाची जबाबदारी आईवरच असते. त्याला मोठे करणे यातही आनंद असतो, हे नव्या पिढीतल्या मातांनी लक्षात घ्यावे असे नरवणे सांगतात. सर्वांत शेवटी नरवणे यांनी तणावापासून मुक्त होण्याचे १८ उपाय सांगितले आहेत. ते अमलात आणल्यास तणाव कमी होईल, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या बिल गेट यांनी तरुणांना उद्देशून केलेल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे युवा पिढीने वाचून अमलात आणायलाच हवेत. नरवणे यांनी केलेले हे हितगुज सामाजिक समस्येचा वेध घेणारे आणि सुखी जीवनाचा मंत्र सांगणारा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more