* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK IS BASED ON LIFE OF CATTLE BREEDERS; THEY ARE CALLED MALDHARIS IN GUJARATI WHO LIVES IN GIR FOREST, WHICH IS KNOWN FOR LAST SURVIVAL OF ASIATIC LION. THE AUTHOR HAS VERY WELL DESCRIBED THE LIFE AND TRADITION OF MALDHARIS. THE WAY OF CONVERSATION, PHILOSOPHY OF LIFE AND RELATIONSHIP WITH NATURE AND ANIMALS, ESPECIALLY WITH LION IS THOROUGHLY DESCRIBED. THE BOOK IS A GOOD EXAMPLE TO URBAN PEOPLE, HOW THESE TRIBAL TAKING UTMOSTS CARE TO PRESERVE THIS NATURE. THE AUTHOR HAS SO AUTHENTICALLY PRESENTED THE ENTIRE NOVEL IT SEEMS YOU ARE WATCHING A MOVIE. THE CENTRAL THEME OF THE BOOK IS ABOUT SYMBIOTIC RELATIONSHIP BETWEEN HUMANS, LIONS AND NATURE. THE PEOPLES SEE GIR AS A LIVING ENTITY THEY TALK WITH JUNGLE, GIVES NAME TO THE HILLS. ONE OF THE BEST STORIES I LIKED AMONG THE ENTIRE BOOK IS ABOUT RAILWAY STATION MANAGER FROM SOUTH INDIA WHO STAYS AT KAASIYA NES AND CONSTRUCTS CONCRETE WATER TANK FOR LEOPARD AND OTHER ANIMALS.
‘माज्या बाळांनु, तुमी समदं ह्ये समजून घ्यावा, की हितं पक्क्या घरात -हातुया म्हून कोनीबी अमर व्हनार न्हाई हाये. हितं ह्या रस्त्यांवर मोटरी, टरक, फटफट्या, टेम्पा, ह्या समद्यांखाली सापडून जेवडी मानसं मरत्यात, त्यवड्यांना तितं स्हावजानं, बिबट्यानं का साप विंचवांनी मारलं असं कदी आयकलं न्हाई.’ आईमाचं बोलणं ऐकल्याबरोबर मी खोल विचारात पडलो. ह्या रमणीय पृथ्वीवर जीवन तर सगळीकडे फुललेलं-फळलेलं आहे, आणि जिथं म्हणून जीवन आलं, तिथं अनिश्चितता आलीच. इथं शहरात भीती वाटेल अशी अनिश्चितता. तिकडं गीरच्या जंगलात, नैसर्गिक वातावरणात असणारी अनिश्चितता रम्य, सुंदर! पुढे काही विचार मनात येण्यापूर्वीच आईमांचा आवाज खोलीभर पुन्हा गुंजला. ‘समदे सिकलेले लोक दररोज पेपरात वाचून आमाला सांगत्यात, तं उगाच उगाच भांडनं करून आनि लडाया करून मानसं कुटं न्हाई मरत? आनि तरीबी प्रिथिवीला ‘खमा’ म्हनायला पन हितं येळ हाये कोनाला?’ सरळ शांत वाहात जाणारी हीरण नदी एकाएकी काळ्या खडकांचा किनारा ओलांडून बाहेर यावी, तसं माझं मन उचंबळून आलं. गीरमध्ये आलो त्या पहिल्या संध्याकाळी आईमांच्या तोंडून ऐकलेल्या ‘खमा’चे अनेक अर्थ आज, अचानक अशा तNहेनं, फुलून-पांघरून माझ्या लक्षात येतील ह्याची मला कल्पनाही नव्हती.... एका चित्रकाराच्या आत्मशोधाची – त्याला सापडलेल्या ‘गीर’ची बहुपेडी व विलक्षण कादंबरी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #AKOOPAR #AKOOPAR #अकुपार #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITO #MARATHI #ANJANINARAVANE #अंजनीनरवणे #DHRUVBHATT #ध्रुवभट्ट
Customer Reviews
  • Rating StarUday R. Thombare

    ध्रुव भट्ट हे मूळ गुजराती लेखक. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय, एखादा प्रदेश पाहिल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय काहीही न लिहिणारे व लिहिण्यासाठी प्रत्यक्ष त्या जागी जाऊन राहणारे लेखक. त्यांची अशाच अनुभवी भटकंती मधून साकार झालेली कादंबरी `अकुपार ` अंजली नरवे अनुवादित. अकुपार चा अर्थ इथे सांगणं उचित नाही. ते प्रत्यक्ष वाचून उमजून घेणं योग्य ठरेल. गुजरात मधील ` गीर ` बद्दल तिथल्या सांस्कृतिक, सामाजिक,पर्यावरणपूरक वैभवाबद्दल भाष्य करणारी कादंबरी. जंगलच्या राजा विषयीच्या प्रत्यक्षदर्शी घटना, त्याचं राजेपण, त्याच्या व्यथा नकळत मनात उतरत जातात.गीर मधील रहिवाशांची आपल्या परिसराबद्दलची समर्पण वृत्ती अनेक प्रसंगातून व्यक्त होते. एक अंध व्यक्ती अनेक मैल चालत जाऊन सावजांची (सिंहांची)शिकार करू नका अशी विनवणी नवाब व इंग्रज अधिकाऱ्यास करणारा , तसेच डोंगर दत्तक घेऊन त्यांचं थाटामाटात लग्न लावणारा गीरवासी खूप मोठी शिकवण देऊन जातो. आपल्या लग्नात मिळालेली गाय एका प्रसंगी सिंहांचं भक्ष्य होताना पाहणारी व तिचं समर्पण करणारी गीरवासी स्त्री भेटते. अहोरात्र भटकंती करून पर्यटकांचं रक्षण करून सिंहाचा हल्ला अंगावर घेणारा गीरवासी समर्पण भाव शिकवून जातो. तसेच गीर साठी सतत भटकत राहणारे, सर्व जंगल संपत्ती, प्राणी यांची काळजी घेणारे, स्वतः अनेक दुःखाचा सामना करत असताना सुद्धा गीर च्या भल्याचा विचार करून अहोरात्र झटणारे गीरवासी आपल्याला भेटून काहीतरी शिकवून जातात. असे अनेक प्रसंग खुप वाचनीय आहेत. एखादी अशिक्षित व्यक्ती सुद्धा खूप सोप्या शब्दांत, आपल्या वागण्या बोलण्यातून जीवन विषयक तत्वज्ञान सांगून जाते. वैयक्तिक हेवेदावे स्वार्थी वृत्ती, खून, मारामाऱ्या, कपट या सर्वांपासून मुक्त असं शांतता लाभावी असं लिखाण. प्रेमाचा,आपुलकीचा निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी अनेक उदाहरणे वाचण्यास मिळतात म्हणूनच संपू नये व वाचतच रहावं असं वाटतं. प्रत्येक पर्यावरण प्रेमीनी आणि सर्वांनी वाचायला हवं असं वाचनीय, वेगळे अनुभव देणारं पुस्तक. - धन्यवाद 🙏🏻 ...Read more

  • Rating StarSumit Dutte Jain

    गुजरात मधील घनदाट अरण्यात एक रेल्वे स्टेशन होते. आता आजूबाजूचा परिसर, घनदाट अरण्याने वेढलेला असल्यावर आपण कल्पना करु शकतो कि, त्या स्टेशनवर जास्त गर्दि कधीच नसणार. नव्हतीही..! स्टेशनवरच कशाला, तर ज्या गावात स्टेशन आहे, तो भागही दुर्गम व विरळ वस्तीचा.दिवसभरात मोजून पंधरा-वीस माणसाचं दर्शन व्हायचा, ऐवढा निर्मनुष्य. दिवसातून एक रेल्वेगाडी यायची व तीच परत जायची. अशाच एका छोट्याशा रेल्वेस्टेशनला एक करेळचा मनुष्य स्टेशनमास्तर ह्या पोस्टवर येतो. साहजिकच सर्वात मोठी अडचण होते ते भाषेची..! एक तर त्याला मल्याळम व इंग्रजीसोडुन काही येत नव्हत, अन त्या गावातल्या आदिवासीला गुजरातीही नीट येत नव्हती. ते त्यांच्याच स्वत:च्या भाषेत बोलायचे. मग ह्या दोघांत संभाषण कसं होणार...? शिवाय, साप विंचवासोबत खेळणारे आदिवासी लेकर ह्या सुटाबोटातील माणसाला पाहीले कि पळून जायचे. ते रेल्वे स्टेशन होत सिंहासाठी आजही प्रसिद्ध असलेल्या गिर अभयारण्यात. मध्यवर्ती भागात.!! ह्या एकांतवासात जीवन कसं जगायच..? ह्यावर त्याने एक उपाय काढला. तो जास्तीत जास्त प्राण्यां सोबत मैत्री करु लागला. प्राण्यांच्या आवडी निवडी जाणू लागला. त्यांच्यासाठी त्याने स्टेशनवरच एक पाणवठा तयार केला. अक्षरक्ष: चित्ता देखील त्याचा मित्र झाला. अरण्याला खेटुन असणाऱ्या समुद्रात एका विशिॆष्ट मोसमात परदेशातून ,लांबून मासे येत असत. ईथे ते फक्त प्रजनन करण्यासाठी यायचे. स्थानिक मासेमारी करणारे ते मासे पकडुन जास्तीत जास्त उत्पन्न करत असत. परंतु त्या माश्याचा नैसर्गिक पर्यावरणावर, समु्द्री जीवनावर कसा वाईट परिणाम होतो ह्याची त्या मच्छमाऱ्याच्या प्रमुख असलेल्या स्त्रिला कळत, तेव्हा " ते मासे म्हणजे बाळांतपणासाठी माहेरी आलेली माहेरवाशीण असते. अशा माहेरवासीणीला मारुन आपण दोन जीवाचा बळी घेत आहोत." अस म्हणून ती इतरांना समजावून सांगते. तेव्हा ते आपल्या मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडतात. रोज दोन वेळेस येणाऱ्या रेल्वेमुळे आपल पंगु पोरगं चालायला लागल, म्हणून रेल्वेच्या इंजिनालाच देव मानून त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या आदिवासी बाया... विदेशातून आलेल्या अभ्यासु पर्यटकासोबत फिरताना स्थानिक गाईडचं वागण, वेळप्रसंगी जीवही धोक्यात घालण... गिरमध्ये सिंहाबरोबरच, सिंह ज्या प्राण्यावर जीवन जगतो ते प्राणी जगले पाहीजे. त्यासाठी मर्यादित क्षेत्राच्या पलिकडे कोणीही आपली म्हैस, गाय चरायला न्यायची नाही. तिकडील कुरण हे जंगली हरिण, निलगाय ह्यासाठी राखीव ठेवणारे आदिवासी..`स्थानिक राजाकडुन गिरला काही त्रास होऊ नये, त्यांनी काही हस्तक्षेप करु नये म्हणून, दोन टेकड्यांच लग्न देखील लावतात.` हि कथाही वाचनीय आहे. गिरच जंगल हे स्वत:मध्येच एक अद्भूत जीवन आहे. त्याला त्याची वेगळी भाषा, संस्कृती आहे.. गिरच्या जंगलात राहणारे आदिवासी, त्यांची जंगलाकडे पाहण्याची नजर, सिंहाबद्दल प्रेम, आपुलकी, निसर्गाबद्दलच ज्ञान , ह्या सर्वाबद्दल श्री धुव्र भट्ट ह्यांनी आपल्या "अकुपार" ह्या कांदबरीमध्ये वर्णन केल आहे. अस वाचनीय पुस्तक "अकुपार" पर्यावरण, मनुष्य आणि इतर प्राणी ह्यांच्यामधील संबध ह्यांच्यासंबधी विचार करायला लावणारी एक गुढकथा...!! ज्यात, आपल्याला कथानायक कथा सांगत असतो. पण शेवटपर्यंत त्यांच नाव आपल्याला कळत नाही. दुसरी महत्वाची लेखकाबद्दल गोष्ट म्हणजे, हे लेखक कथा जरी काल्पनिक लिहीत असले तरी त्यांच्या कथेमध्ये वर्णन केलेल्या भागात ते वर्षानुवर्ष राहतात. त्याचा अभ्यास करुनच लिहतात. त्यामुळे कथेमध्ये वास्तवतेच दर्शन वाचकाला होत असत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more