* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK IS BASED ON LIFE OF CATTLE BREEDERS; THEY ARE CALLED MALDHARIS IN GUJARATI WHO LIVES IN GIR FOREST, WHICH IS KNOWN FOR LAST SURVIVAL OF ASIATIC LION. THE AUTHOR HAS VERY WELL DESCRIBED THE LIFE AND TRADITION OF MALDHARIS. THE WAY OF CONVERSATION, PHILOSOPHY OF LIFE AND RELATIONSHIP WITH NATURE AND ANIMALS, ESPECIALLY WITH LION IS THOROUGHLY DESCRIBED. THE BOOK IS A GOOD EXAMPLE TO URBAN PEOPLE, HOW THESE TRIBAL TAKING UTMOSTS CARE TO PRESERVE THIS NATURE. THE AUTHOR HAS SO AUTHENTICALLY PRESENTED THE ENTIRE NOVEL IT SEEMS YOU ARE WATCHING A MOVIE. THE CENTRAL THEME OF THE BOOK IS ABOUT SYMBIOTIC RELATIONSHIP BETWEEN HUMANS, LIONS AND NATURE. THE PEOPLES SEE GIR AS A LIVING ENTITY THEY TALK WITH JUNGLE, GIVES NAME TO THE HILLS. ONE OF THE BEST STORIES I LIKED AMONG THE ENTIRE BOOK IS ABOUT RAILWAY STATION MANAGER FROM SOUTH INDIA WHO STAYS AT KAASIYA NES AND CONSTRUCTS CONCRETE WATER TANK FOR LEOPARD AND OTHER ANIMALS.
‘माज्या बाळांनु, तुमी समदं ह्ये समजून घ्यावा, की हितं पक्क्या घरात -हातुया म्हून कोनीबी अमर व्हनार न्हाई हाये. हितं ह्या रस्त्यांवर मोटरी, टरक, फटफट्या, टेम्पा, ह्या समद्यांखाली सापडून जेवडी मानसं मरत्यात, त्यवड्यांना तितं स्हावजानं, बिबट्यानं का साप विंचवांनी मारलं असं कदी आयकलं न्हाई.’ आईमाचं बोलणं ऐकल्याबरोबर मी खोल विचारात पडलो. ह्या रमणीय पृथ्वीवर जीवन तर सगळीकडे फुललेलं-फळलेलं आहे, आणि जिथं म्हणून जीवन आलं, तिथं अनिश्चितता आलीच. इथं शहरात भीती वाटेल अशी अनिश्चितता. तिकडं गीरच्या जंगलात, नैसर्गिक वातावरणात असणारी अनिश्चितता रम्य, सुंदर! पुढे काही विचार मनात येण्यापूर्वीच आईमांचा आवाज खोलीभर पुन्हा गुंजला. ‘समदे सिकलेले लोक दररोज पेपरात वाचून आमाला सांगत्यात, तं उगाच उगाच भांडनं करून आनि लडाया करून मानसं कुटं न्हाई मरत? आनि तरीबी प्रिथिवीला ‘खमा’ म्हनायला पन हितं येळ हाये कोनाला?’ सरळ शांत वाहात जाणारी हीरण नदी एकाएकी काळ्या खडकांचा किनारा ओलांडून बाहेर यावी, तसं माझं मन उचंबळून आलं. गीरमध्ये आलो त्या पहिल्या संध्याकाळी आईमांच्या तोंडून ऐकलेल्या ‘खमा’चे अनेक अर्थ आज, अचानक अशा तNहेनं, फुलून-पांघरून माझ्या लक्षात येतील ह्याची मला कल्पनाही नव्हती.... एका चित्रकाराच्या आत्मशोधाची – त्याला सापडलेल्या ‘गीर’ची बहुपेडी व विलक्षण कादंबरी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #AKOOPAR #AKOOPAR #अकुपार #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITO #MARATHI #ANJANINARAVANE #अंजनीनरवणे #DHRUVBHATT #ध्रुवभट्ट
Customer Reviews
  • Rating StarUday R. Thombare

    ध्रुव भट्ट हे मूळ गुजराती लेखक. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय, एखादा प्रदेश पाहिल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय काहीही न लिहिणारे व लिहिण्यासाठी प्रत्यक्ष त्या जागी जाऊन राहणारे लेखक. त्यांची अशाच अनुभवी भटकंती मधून साकार झालेली कादंबरी `अकुपार ` अंजली नरवे अनुवादित. अकुपार चा अर्थ इथे सांगणं उचित नाही. ते प्रत्यक्ष वाचून उमजून घेणं योग्य ठरेल. गुजरात मधील ` गीर ` बद्दल तिथल्या सांस्कृतिक, सामाजिक,पर्यावरणपूरक वैभवाबद्दल भाष्य करणारी कादंबरी. जंगलच्या राजा विषयीच्या प्रत्यक्षदर्शी घटना, त्याचं राजेपण, त्याच्या व्यथा नकळत मनात उतरत जातात.गीर मधील रहिवाशांची आपल्या परिसराबद्दलची समर्पण वृत्ती अनेक प्रसंगातून व्यक्त होते. एक अंध व्यक्ती अनेक मैल चालत जाऊन सावजांची (सिंहांची)शिकार करू नका अशी विनवणी नवाब व इंग्रज अधिकाऱ्यास करणारा , तसेच डोंगर दत्तक घेऊन त्यांचं थाटामाटात लग्न लावणारा गीरवासी खूप मोठी शिकवण देऊन जातो. आपल्या लग्नात मिळालेली गाय एका प्रसंगी सिंहांचं भक्ष्य होताना पाहणारी व तिचं समर्पण करणारी गीरवासी स्त्री भेटते. अहोरात्र भटकंती करून पर्यटकांचं रक्षण करून सिंहाचा हल्ला अंगावर घेणारा गीरवासी समर्पण भाव शिकवून जातो. तसेच गीर साठी सतत भटकत राहणारे, सर्व जंगल संपत्ती, प्राणी यांची काळजी घेणारे, स्वतः अनेक दुःखाचा सामना करत असताना सुद्धा गीर च्या भल्याचा विचार करून अहोरात्र झटणारे गीरवासी आपल्याला भेटून काहीतरी शिकवून जातात. असे अनेक प्रसंग खुप वाचनीय आहेत. एखादी अशिक्षित व्यक्ती सुद्धा खूप सोप्या शब्दांत, आपल्या वागण्या बोलण्यातून जीवन विषयक तत्वज्ञान सांगून जाते. वैयक्तिक हेवेदावे स्वार्थी वृत्ती, खून, मारामाऱ्या, कपट या सर्वांपासून मुक्त असं शांतता लाभावी असं लिखाण. प्रेमाचा,आपुलकीचा निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी अनेक उदाहरणे वाचण्यास मिळतात म्हणूनच संपू नये व वाचतच रहावं असं वाटतं. प्रत्येक पर्यावरण प्रेमीनी आणि सर्वांनी वाचायला हवं असं वाचनीय, वेगळे अनुभव देणारं पुस्तक. - धन्यवाद 🙏🏻 ...Read more

  • Rating StarSumit Dutte Jain

    गुजरात मधील घनदाट अरण्यात एक रेल्वे स्टेशन होते. आता आजूबाजूचा परिसर, घनदाट अरण्याने वेढलेला असल्यावर आपण कल्पना करु शकतो कि, त्या स्टेशनवर जास्त गर्दि कधीच नसणार. नव्हतीही..! स्टेशनवरच कशाला, तर ज्या गावात स्टेशन आहे, तो भागही दुर्गम व विरळ वस्तीचा.दिवसभरात मोजून पंधरा-वीस माणसाचं दर्शन व्हायचा, ऐवढा निर्मनुष्य. दिवसातून एक रेल्वेगाडी यायची व तीच परत जायची. अशाच एका छोट्याशा रेल्वेस्टेशनला एक करेळचा मनुष्य स्टेशनमास्तर ह्या पोस्टवर येतो. साहजिकच सर्वात मोठी अडचण होते ते भाषेची..! एक तर त्याला मल्याळम व इंग्रजीसोडुन काही येत नव्हत, अन त्या गावातल्या आदिवासीला गुजरातीही नीट येत नव्हती. ते त्यांच्याच स्वत:च्या भाषेत बोलायचे. मग ह्या दोघांत संभाषण कसं होणार...? शिवाय, साप विंचवासोबत खेळणारे आदिवासी लेकर ह्या सुटाबोटातील माणसाला पाहीले कि पळून जायचे. ते रेल्वे स्टेशन होत सिंहासाठी आजही प्रसिद्ध असलेल्या गिर अभयारण्यात. मध्यवर्ती भागात.!! ह्या एकांतवासात जीवन कसं जगायच..? ह्यावर त्याने एक उपाय काढला. तो जास्तीत जास्त प्राण्यां सोबत मैत्री करु लागला. प्राण्यांच्या आवडी निवडी जाणू लागला. त्यांच्यासाठी त्याने स्टेशनवरच एक पाणवठा तयार केला. अक्षरक्ष: चित्ता देखील त्याचा मित्र झाला. अरण्याला खेटुन असणाऱ्या समुद्रात एका विशिॆष्ट मोसमात परदेशातून ,लांबून मासे येत असत. ईथे ते फक्त प्रजनन करण्यासाठी यायचे. स्थानिक मासेमारी करणारे ते मासे पकडुन जास्तीत जास्त उत्पन्न करत असत. परंतु त्या माश्याचा नैसर्गिक पर्यावरणावर, समु्द्री जीवनावर कसा वाईट परिणाम होतो ह्याची त्या मच्छमाऱ्याच्या प्रमुख असलेल्या स्त्रिला कळत, तेव्हा " ते मासे म्हणजे बाळांतपणासाठी माहेरी आलेली माहेरवाशीण असते. अशा माहेरवासीणीला मारुन आपण दोन जीवाचा बळी घेत आहोत." अस म्हणून ती इतरांना समजावून सांगते. तेव्हा ते आपल्या मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडतात. रोज दोन वेळेस येणाऱ्या रेल्वेमुळे आपल पंगु पोरगं चालायला लागल, म्हणून रेल्वेच्या इंजिनालाच देव मानून त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या आदिवासी बाया... विदेशातून आलेल्या अभ्यासु पर्यटकासोबत फिरताना स्थानिक गाईडचं वागण, वेळप्रसंगी जीवही धोक्यात घालण... गिरमध्ये सिंहाबरोबरच, सिंह ज्या प्राण्यावर जीवन जगतो ते प्राणी जगले पाहीजे. त्यासाठी मर्यादित क्षेत्राच्या पलिकडे कोणीही आपली म्हैस, गाय चरायला न्यायची नाही. तिकडील कुरण हे जंगली हरिण, निलगाय ह्यासाठी राखीव ठेवणारे आदिवासी..`स्थानिक राजाकडुन गिरला काही त्रास होऊ नये, त्यांनी काही हस्तक्षेप करु नये म्हणून, दोन टेकड्यांच लग्न देखील लावतात.` हि कथाही वाचनीय आहे. गिरच जंगल हे स्वत:मध्येच एक अद्भूत जीवन आहे. त्याला त्याची वेगळी भाषा, संस्कृती आहे.. गिरच्या जंगलात राहणारे आदिवासी, त्यांची जंगलाकडे पाहण्याची नजर, सिंहाबद्दल प्रेम, आपुलकी, निसर्गाबद्दलच ज्ञान , ह्या सर्वाबद्दल श्री धुव्र भट्ट ह्यांनी आपल्या "अकुपार" ह्या कांदबरीमध्ये वर्णन केल आहे. अस वाचनीय पुस्तक "अकुपार" पर्यावरण, मनुष्य आणि इतर प्राणी ह्यांच्यामधील संबध ह्यांच्यासंबधी विचार करायला लावणारी एक गुढकथा...!! ज्यात, आपल्याला कथानायक कथा सांगत असतो. पण शेवटपर्यंत त्यांच नाव आपल्याला कळत नाही. दुसरी महत्वाची लेखकाबद्दल गोष्ट म्हणजे, हे लेखक कथा जरी काल्पनिक लिहीत असले तरी त्यांच्या कथेमध्ये वर्णन केलेल्या भागात ते वर्षानुवर्ष राहतात. त्याचा अभ्यास करुनच लिहतात. त्यामुळे कथेमध्ये वास्तवतेच दर्शन वाचकाला होत असत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more