* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GIRISAMMA EK DUNGRI
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788177660319
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2001
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 176
  • Language : TRANSLATED FROM GUJARATI TO MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GAHAN PADLELI TEKADI – A HILL MORTGAGED. ONE OF ITS OWN STYLE, THE SAID COLLECTION OF SHORT STORIES IS BASED ON THE ADIVASI WOMEN. MARIJA SRES HAD STAYED WITH THOSE WOMEN SO AS TO BE ONE OF THEM. EACH OF HER STORY, THUS HAS THE TRUE ESSENCE OF THE LIFE OF THOSE WOMEN. ITHE TAR HE NEHEMICHACH-THIS IS A COMMON THING HERE IS THE STORY OF LALI WHO HAS JUST ENTERED THE BLOSSOMING YOUTH BUT WHO FALLS PREY TO THE LUST OF THE CONTRACTOR AND SUPERVISOR. THEVALELI BAI-THE MISTRESS IS A STORY WHERE KHATAREES HUSBAND DIES. VERY RELUCTANTLY, SHE MARRIES ANOTHER MAN AND LATER COMES TO KNOW THAT HER NEW HUSBAND HAS A MISTRESS. THIS MAKES HER REBELLIOUS. DUBHATI GAAY- A MILCHING COW PICTURIZES THE VILLAGE SCENE WHERE MEERABEN TRIES TO FORM A MILK COLLECTION SOCIETY FOR THE ADIVASI WOMEN AND HAS TO FACE THE MALE CHAUVINISM. JO MAI AISA JANATI- ONLY IF I KNEW THIS IS A STORY OF MAKU. IN HER YOUTH, SHE HAD TAKEN A WRONG STEP. LATER, SHE TURNS A SINCERE HOUSEWIFE. BADALTYA KALACHI PAWALA – THE CHANGING TIMES TELLS US FULI. SHE SUFFERS A LOT MANY ATROCITIES AT THE HANDS OF HER HUSBAND AND HIS PEOPLE. SOMEHOW, SHE MANAGES TO RUN AWAY FROM THAT HOUSE. LATER, SHE MARRIES NANJI AND LEADS A HAPPY MARRIED LIFE. SHE AIMS TO DO CONSTRUCTIVE WORK FOR THE VILLAGE WOMEN. THIS WORLD OF ADIVASI WOMEN IS PENNED DOWN HERE. MANY OF THEM ARE EXPLOITED WHILE A FEW TRY TO REBEL.
गहाण पडलेली टेकडी हा आदिवासी स्त्रियांच्या कहाण्यांचा संग्रह. या कहाण्या मारिजा स्रेस यांनी त्या अदिवासींमध्ये त्यांच्यापैकी एक होऊन, त्यांच्यात राहून लिहिल्या आहेत. ‘इथं तर हे नेहमीचंच’ या कथेतील मुकादम आणि ठेकेदाराच्या पाशवी वासनेला बळी पडून जीव गमवावी लागलेली नुकतीच वयात आलेली लाली...‘ठेवलेली बाई’ कथेतील पहिला नवरा गेल्यावर नाईलाजाने दुसरं लग्न करावं लागलेली आणि दुसऱ्या नवऱ्याने बाई ठेवली आहे, हे कळल्यावर बंड करू पाहणारी खातरी...‘दुभती गाय’ कथेतील आदिवासी स्त्रियांना हाताशी धरून गावात दूध सोसायटी उभी करू पाहणाऱ्या मीराबेनला पुरुषी मानसिकतेचा करावा लागणारा सामना...‘जो मैं ऐसा जानती’ कथेतील तारुण्यात पाय घसरलेली, पण नंतर नेकीने संसार करणारी मकू...‘बदलत्या काळाची पावलं’मधील ठार मारू पाहणाऱ्या नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या तावडीतून सुटून आलेली, नंतर नानजीशी लग्न करून सुखाचा संसार करताना गावातील बायकांचा उद्धार करू पाहणारी फूली...काही शोषित आणि काही संघर्ष करू पाहणाऱ्या आदिवासी स्त्रियांचं वास्तव विश्व.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#गहाणपडलेलीटेकडी #मारिजास्रेस #अंजनीनरवणे #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #GIRISAMMAEKDUNGRI(IN GUJRATHI) #GAHANPADLELITEKADI #MARIJASRES # ANJANINARVANE #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more