* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663259
  • Edition : 4
  • Publishing Year : OCTOBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BOOK DEPICTING OUR PRESENT-DAY STRESSFUL LIFE AND SUGGESTING SOME SIMPLE WAYS OF REDUCING STRAIN AND LEADING A MORE RELAXED LIFE.
आजच्या आपल्या जीवनपद्धतीचा आपल्या मनावर जो परिणाम होत आहे, त्यासंबंधी विचार मांडून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न लेखिकेनं या पुस्तकात केला आहे. आज समाजातल्या सर्व थरांतली माणसं मानसिक ताणतणावाखाली वावरताना दिसतात; घरात आणि बाहेर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना मनानं थवूÂन जातात. मात्र लेखिकेच्या मते, हा ताण कमी करणं आणि आयुष्य अधिक सुखद व आनंदमय करणं, हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती असतं. हे कसं साध्य करायचं? सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि ‘ताण व आनंद’ या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड काल्र्सन यांचे विचार व लेखिकेचे स्वत:चे विचार यांची गुंफण करून लिहिलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित नवी दिशा देणारे ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating Starश्रीकांत नाईक

    ‘आपण, आपले ताणतणाव- एक चिंतन’ या पुस्तकाच्या रूपाने मला परीसच सापडला. पुस्तकातील तुम्ही दिलेली उदाहरणे आमच्या रोजच्या जीवनातीलच आहेत. ती लगेच भावतात. एका चांगल्या विषयाला आपण चालना दिली आहे.

  • Rating StarLOKSATTA 16-3-2003

    घाई आपल्या पाचवीलाच पुजलेली असते. विकासाची सांगड आपण शहरीकरणाशी घातली आणि प्रदूषण, धावपळ, दगदग, चिंता यांना मुक्तद्वारं दिलं. डॉ. रिचर्ड कार्ल्सन हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध स्ट्रेस कन्सल्टंट. ‘आपण आणि आपले ताणतणाव’ हे पुस्तक त्यांच्या या विषयावरच्या पु्तकांवर आधारित आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांनी कौटुंबिक स्वास्थ्यावर भर दिला आहे. कुटुंब हा आपल्या जीवनपद्धतीशी मिळतेजुळते असल्याने ते मराठीत आणण्याचा विचार झाला, तरी हा अनुवाद नव्हे, हे लेखकाने मुद्दाम नमूद केले आहे. यातील घटना-प्रसंग आपल्याच आजूबाजूच्या वातावरणातून घेतलेले आहेत. लेखनही सोप्या, संवाद साधणाऱ्या भाषेत केलेले असल्याने नवे विचारही चटकन आपलेसे होतात. ‘आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या प्रमाणावर आपलं व्यक्तिमत्त्व ठरत असतं.’ हे लक्षात घेतलं, की आधी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा बागुलबोवा पळून जाईल. चुका होणारच. त्यांच (पश्चत्तापाचंही) अवडंबर किती माजवायचं, तेही आपणच ठरवायला हवं. ध्यानधारणेचं महत्त्व आता बहुतेकांना पटू लागलंय. आपल्याच मनाला थोडं वेगळं वळण लावण्यानेही बरेच ताण नाहीसे होतात, हे लेखकाने प्रत्यक्ष प्रसंग सांगून छान सांगून छान समजावून दिलं आहे. सुबत्तेचा आणि संतोषाचा काहीही संबंध नाही, हे तर स्वच्छच आहे. कृतज्ञ असणं हा एक मोठाच अॅसेट आहे. जिब्राननं लग्नाबद्दल लिहिताना म्हटलेलं ‘आपली हृदयं परस्परांना द्या, पण ती परस्परांच्या अधीन करू नका’ - लग्नालाच नव्हे, तर प्रत्येक नातेसंबंधाला लागू पडतं. घरची माणसं हक्काची आहेत, असं म्हणत बाहेरचा राग त्यांच्यावर काढताना त्यांनाही याचा त्रास होईल, याचा विचार आपण करत नाही. अशाच छोट्या-छोट्या गोष्टींना नव्या कोनातून बघण्याची जादू आपलं आयुष्य आनंददायी करू शकते, हा मोठाच दिलासा या पुस्तकानं दिला आहे. ...Read more

  • Rating StarMUMBAI TARUN BHARAT 17-11-2002

    आजच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीत माणसाचे मन अधिक तणावग्रस्त होत चालले आहे. परिणामी मानसिक आजारांना निमंत्रण मिळत आहे. मन हे आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक. मनाचं हे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून संतांनी मन प्रसन्न करण्याचे मार्ग सांगितले आहे. रामदास स्वामी तर म्हणतात, मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे साधन. मानसिक रोगाने पछाडलेले अनेक लोक आपल्याला भेटतात. समाजातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाखाली वावरत असते. घरात आणि घराबाहेर प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. नेमके हेच हेरून अंजनी नरवणे यांनी ‘आपण, आपले ताणतणाव - एक चिंतन’ या पुस्तकात मनावर होणाऱ्या ताणावर विचार मांडले आहेत व वाचकांशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तकात लेखिकेने अमेरिकन लेखक आणि ताण व आनंद या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड कार्ल्सन यांचे विचार व स्वत:चे विचार यांची गुंफण केली आहे. मनावरील ताणतणाव कमी करणं आणि जीवन अधिक सुखद व आनंदमय करणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हातात असतं असं लेखिकेचं म्हणणं आहे. पहिल्या भागात आपल्या मनाबाबत विचार करताना ‘आपण आणि आपलं मन’ या प्रकरणाखाली आपण आणि परिस्थिती, आपली वागणूक यात चुका आपण करतो आहोत का, तणावांना तोंड कसं द्यावं, आपण असे वागलो तर अशा अनेक मार्गांचा विचार केला आहे. लेखिकेने प्रसंग उद्धृत करून त्या समस्या कशा सोडवू शकू याचा विचार केला आहे. ‘आपण आणि आपलं कुटुंब’ या प्रकरणात कुटुंबातील समस्यांचा विचार करताना लेखक म्हणतो, कृतज्ञ आणि आनंदी असणं किती फायदेशीर आहे, दुसऱ्याला दोष देत राहण्यापेक्षा आपुलकीनं समजुतीनं कसं वागावं, आपलं कौटुंबिक वातावरण कसं असावं तसंच मुलांचं संगोपन, आपलं घर, घरातली कामं, आपलं वागणं कसं सुधारावं याबद्दल लेखिका सांगते. ‘आपण, नातीगोती आणि मित्रपरिवार’ या प्रकरणात आपलं इतरांशी वागणं कसं असावं त्यातील छोट्या छोट्या गोष्टींची माहिती लेखिका देते. ‘आपण आणि भोवतालचं वातावरण’ या प्रकरणात आपलं काम, आपल्या तक्रारी, आपले ताण कमी करणं, ते करताना समोरच्या माणसाच्या बौद्धिक पातळीचा अंदाज घेऊन बोलणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. सर्वांनी असेल त्या परिस्थितीत समजुतीनं, आनंदानं राहण्याचा प्रयत्न करावा, आपल्या आणि इतरांच्याही मनावरील ताण कमी किंवा दूर करण्यासाठी झटावं तसेच लहानसहान अडचणींचा बाऊ न करता त्या सोडविण्याकडे कल असावा असा लेखिका सल्ला देते. सदर पुस्तक वाचून जीवनातील ताणतणाव दूर करावेत व आपले जीवन अधिक सुखकर करावे, त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more