* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663259
  • Edition : 4
  • Publishing Year : OCTOBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BOOK DEPICTING OUR PRESENT-DAY STRESSFUL LIFE AND SUGGESTING SOME SIMPLE WAYS OF REDUCING STRAIN AND LEADING A MORE RELAXED LIFE.
आजच्या आपल्या जीवनपद्धतीचा आपल्या मनावर जो परिणाम होत आहे, त्यासंबंधी विचार मांडून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न लेखिकेनं या पुस्तकात केला आहे. आज समाजातल्या सर्व थरांतली माणसं मानसिक ताणतणावाखाली वावरताना दिसतात; घरात आणि बाहेर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना मनानं थकून जातात. मात्र लेखिकेच्या मते, हा ताण कमी करणं आणि आयुष्य अधिक सुखद व आनंदमय करणं, हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती असतं. हे कसं साध्य करायचं? सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि ‘ताण व आनंद’ या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड काल्र्सन यांचे विचार व लेखिकेचे स्वत:चे विचार यांची गुंफण करून लिहिलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित नवी दिशा देणारे ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating Starश्रीकांत नाईक

    ‘आपण, आपले ताणतणाव- एक चिंतन’ या पुस्तकाच्या रूपाने मला परीसच सापडला. पुस्तकातील तुम्ही दिलेली उदाहरणे आमच्या रोजच्या जीवनातीलच आहेत. ती लगेच भावतात. एका चांगल्या विषयाला आपण चालना दिली आहे.

  • Rating StarLOKSATTA 16-3-2003

    घाई आपल्या पाचवीलाच पुजलेली असते. विकासाची सांगड आपण शहरीकरणाशी घातली आणि प्रदूषण, धावपळ, दगदग, चिंता यांना मुक्तद्वारं दिलं. डॉ. रिचर्ड कार्ल्सन हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध स्ट्रेस कन्सल्टंट. ‘आपण आणि आपले ताणतणाव’ हे पुस्तक त्यांच्या या विषयावरच्या पु्तकांवर आधारित आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांनी कौटुंबिक स्वास्थ्यावर भर दिला आहे. कुटुंब हा आपल्या जीवनपद्धतीशी मिळतेजुळते असल्याने ते मराठीत आणण्याचा विचार झाला, तरी हा अनुवाद नव्हे, हे लेखकाने मुद्दाम नमूद केले आहे. यातील घटना-प्रसंग आपल्याच आजूबाजूच्या वातावरणातून घेतलेले आहेत. लेखनही सोप्या, संवाद साधणाऱ्या भाषेत केलेले असल्याने नवे विचारही चटकन आपलेसे होतात. ‘आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या प्रमाणावर आपलं व्यक्तिमत्त्व ठरत असतं.’ हे लक्षात घेतलं, की आधी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा बागुलबोवा पळून जाईल. चुका होणारच. त्यांच (पश्चत्तापाचंही) अवडंबर किती माजवायचं, तेही आपणच ठरवायला हवं. ध्यानधारणेचं महत्त्व आता बहुतेकांना पटू लागलंय. आपल्याच मनाला थोडं वेगळं वळण लावण्यानेही बरेच ताण नाहीसे होतात, हे लेखकाने प्रत्यक्ष प्रसंग सांगून छान सांगून छान समजावून दिलं आहे. सुबत्तेचा आणि संतोषाचा काहीही संबंध नाही, हे तर स्वच्छच आहे. कृतज्ञ असणं हा एक मोठाच अॅसेट आहे. जिब्राननं लग्नाबद्दल लिहिताना म्हटलेलं ‘आपली हृदयं परस्परांना द्या, पण ती परस्परांच्या अधीन करू नका’ - लग्नालाच नव्हे, तर प्रत्येक नातेसंबंधाला लागू पडतं. घरची माणसं हक्काची आहेत, असं म्हणत बाहेरचा राग त्यांच्यावर काढताना त्यांनाही याचा त्रास होईल, याचा विचार आपण करत नाही. अशाच छोट्या-छोट्या गोष्टींना नव्या कोनातून बघण्याची जादू आपलं आयुष्य आनंददायी करू शकते, हा मोठाच दिलासा या पुस्तकानं दिला आहे. ...Read more

  • Rating StarMUMBAI TARUN BHARAT 17-11-2002

    आजच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीत माणसाचे मन अधिक तणावग्रस्त होत चालले आहे. परिणामी मानसिक आजारांना निमंत्रण मिळत आहे. मन हे आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक. मनाचं हे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून संतांनी मन प्रसन्न करण्याचे मार्ग सांगितले आहे. रामदास स्वामी तर म्हणतात, मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे साधन. मानसिक रोगाने पछाडलेले अनेक लोक आपल्याला भेटतात. समाजातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाखाली वावरत असते. घरात आणि घराबाहेर प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. नेमके हेच हेरून अंजनी नरवणे यांनी ‘आपण, आपले ताणतणाव - एक चिंतन’ या पुस्तकात मनावर होणाऱ्या ताणावर विचार मांडले आहेत व वाचकांशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तकात लेखिकेने अमेरिकन लेखक आणि ताण व आनंद या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड कार्ल्सन यांचे विचार व स्वत:चे विचार यांची गुंफण केली आहे. मनावरील ताणतणाव कमी करणं आणि जीवन अधिक सुखद व आनंदमय करणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हातात असतं असं लेखिकेचं म्हणणं आहे. पहिल्या भागात आपल्या मनाबाबत विचार करताना ‘आपण आणि आपलं मन’ या प्रकरणाखाली आपण आणि परिस्थिती, आपली वागणूक यात चुका आपण करतो आहोत का, तणावांना तोंड कसं द्यावं, आपण असे वागलो तर अशा अनेक मार्गांचा विचार केला आहे. लेखिकेने प्रसंग उद्धृत करून त्या समस्या कशा सोडवू शकू याचा विचार केला आहे. ‘आपण आणि आपलं कुटुंब’ या प्रकरणात कुटुंबातील समस्यांचा विचार करताना लेखक म्हणतो, कृतज्ञ आणि आनंदी असणं किती फायदेशीर आहे, दुसऱ्याला दोष देत राहण्यापेक्षा आपुलकीनं समजुतीनं कसं वागावं, आपलं कौटुंबिक वातावरण कसं असावं तसंच मुलांचं संगोपन, आपलं घर, घरातली कामं, आपलं वागणं कसं सुधारावं याबद्दल लेखिका सांगते. ‘आपण, नातीगोती आणि मित्रपरिवार’ या प्रकरणात आपलं इतरांशी वागणं कसं असावं त्यातील छोट्या छोट्या गोष्टींची माहिती लेखिका देते. ‘आपण आणि भोवतालचं वातावरण’ या प्रकरणात आपलं काम, आपल्या तक्रारी, आपले ताण कमी करणं, ते करताना समोरच्या माणसाच्या बौद्धिक पातळीचा अंदाज घेऊन बोलणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. सर्वांनी असेल त्या परिस्थितीत समजुतीनं, आनंदानं राहण्याचा प्रयत्न करावा, आपल्या आणि इतरांच्याही मनावरील ताण कमी किंवा दूर करण्यासाठी झटावं तसेच लहानसहान अडचणींचा बाऊ न करता त्या सोडविण्याकडे कल असावा असा लेखिका सल्ला देते. सदर पुस्तक वाचून जीवनातील ताणतणाव दूर करावेत व आपले जीवन अधिक सुखकर करावे, त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more