* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663259
  • Edition : 4
  • Publishing Year : OCTOBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BOOK DEPICTING OUR PRESENT-DAY STRESSFUL LIFE AND SUGGESTING SOME SIMPLE WAYS OF REDUCING STRAIN AND LEADING A MORE RELAXED LIFE.
आजच्या आपल्या जीवनपद्धतीचा आपल्या मनावर जो परिणाम होत आहे, त्यासंबंधी विचार मांडून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न लेखिकेनं या पुस्तकात केला आहे. आज समाजातल्या सर्व थरांतली माणसं मानसिक ताणतणावाखाली वावरताना दिसतात; घरात आणि बाहेर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना मनानं थकून जातात. मात्र लेखिकेच्या मते, हा ताण कमी करणं आणि आयुष्य अधिक सुखद व आनंदमय करणं, हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती असतं. हे कसं साध्य करायचं? सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि ‘ताण व आनंद’ या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड काल्र्सन यांचे विचार व लेखिकेचे स्वत:चे विचार यांची गुंफण करून लिहिलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित नवी दिशा देणारे ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating Starश्रीकांत नाईक

    ‘आपण, आपले ताणतणाव- एक चिंतन’ या पुस्तकाच्या रूपाने मला परीसच सापडला. पुस्तकातील तुम्ही दिलेली उदाहरणे आमच्या रोजच्या जीवनातीलच आहेत. ती लगेच भावतात. एका चांगल्या विषयाला आपण चालना दिली आहे.

  • Rating StarLOKSATTA 16-3-2003

    घाई आपल्या पाचवीलाच पुजलेली असते. विकासाची सांगड आपण शहरीकरणाशी घातली आणि प्रदूषण, धावपळ, दगदग, चिंता यांना मुक्तद्वारं दिलं. डॉ. रिचर्ड कार्ल्सन हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध स्ट्रेस कन्सल्टंट. ‘आपण आणि आपले ताणतणाव’ हे पुस्तक त्यांच्या या विषयावरच्या पु्तकांवर आधारित आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांनी कौटुंबिक स्वास्थ्यावर भर दिला आहे. कुटुंब हा आपल्या जीवनपद्धतीशी मिळतेजुळते असल्याने ते मराठीत आणण्याचा विचार झाला, तरी हा अनुवाद नव्हे, हे लेखकाने मुद्दाम नमूद केले आहे. यातील घटना-प्रसंग आपल्याच आजूबाजूच्या वातावरणातून घेतलेले आहेत. लेखनही सोप्या, संवाद साधणाऱ्या भाषेत केलेले असल्याने नवे विचारही चटकन आपलेसे होतात. ‘आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या प्रमाणावर आपलं व्यक्तिमत्त्व ठरत असतं.’ हे लक्षात घेतलं, की आधी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा बागुलबोवा पळून जाईल. चुका होणारच. त्यांच (पश्चत्तापाचंही) अवडंबर किती माजवायचं, तेही आपणच ठरवायला हवं. ध्यानधारणेचं महत्त्व आता बहुतेकांना पटू लागलंय. आपल्याच मनाला थोडं वेगळं वळण लावण्यानेही बरेच ताण नाहीसे होतात, हे लेखकाने प्रत्यक्ष प्रसंग सांगून छान सांगून छान समजावून दिलं आहे. सुबत्तेचा आणि संतोषाचा काहीही संबंध नाही, हे तर स्वच्छच आहे. कृतज्ञ असणं हा एक मोठाच अॅसेट आहे. जिब्राननं लग्नाबद्दल लिहिताना म्हटलेलं ‘आपली हृदयं परस्परांना द्या, पण ती परस्परांच्या अधीन करू नका’ - लग्नालाच नव्हे, तर प्रत्येक नातेसंबंधाला लागू पडतं. घरची माणसं हक्काची आहेत, असं म्हणत बाहेरचा राग त्यांच्यावर काढताना त्यांनाही याचा त्रास होईल, याचा विचार आपण करत नाही. अशाच छोट्या-छोट्या गोष्टींना नव्या कोनातून बघण्याची जादू आपलं आयुष्य आनंददायी करू शकते, हा मोठाच दिलासा या पुस्तकानं दिला आहे. ...Read more

  • Rating StarMUMBAI TARUN BHARAT 17-11-2002

    आजच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीत माणसाचे मन अधिक तणावग्रस्त होत चालले आहे. परिणामी मानसिक आजारांना निमंत्रण मिळत आहे. मन हे आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक. मनाचं हे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून संतांनी मन प्रसन्न करण्याचे मार्ग सांगितले आहे. रामदास स्वामी तर म्हणतात, मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे साधन. मानसिक रोगाने पछाडलेले अनेक लोक आपल्याला भेटतात. समाजातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाखाली वावरत असते. घरात आणि घराबाहेर प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. नेमके हेच हेरून अंजनी नरवणे यांनी ‘आपण, आपले ताणतणाव - एक चिंतन’ या पुस्तकात मनावर होणाऱ्या ताणावर विचार मांडले आहेत व वाचकांशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तकात लेखिकेने अमेरिकन लेखक आणि ताण व आनंद या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड कार्ल्सन यांचे विचार व स्वत:चे विचार यांची गुंफण केली आहे. मनावरील ताणतणाव कमी करणं आणि जीवन अधिक सुखद व आनंदमय करणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हातात असतं असं लेखिकेचं म्हणणं आहे. पहिल्या भागात आपल्या मनाबाबत विचार करताना ‘आपण आणि आपलं मन’ या प्रकरणाखाली आपण आणि परिस्थिती, आपली वागणूक यात चुका आपण करतो आहोत का, तणावांना तोंड कसं द्यावं, आपण असे वागलो तर अशा अनेक मार्गांचा विचार केला आहे. लेखिकेने प्रसंग उद्धृत करून त्या समस्या कशा सोडवू शकू याचा विचार केला आहे. ‘आपण आणि आपलं कुटुंब’ या प्रकरणात कुटुंबातील समस्यांचा विचार करताना लेखक म्हणतो, कृतज्ञ आणि आनंदी असणं किती फायदेशीर आहे, दुसऱ्याला दोष देत राहण्यापेक्षा आपुलकीनं समजुतीनं कसं वागावं, आपलं कौटुंबिक वातावरण कसं असावं तसंच मुलांचं संगोपन, आपलं घर, घरातली कामं, आपलं वागणं कसं सुधारावं याबद्दल लेखिका सांगते. ‘आपण, नातीगोती आणि मित्रपरिवार’ या प्रकरणात आपलं इतरांशी वागणं कसं असावं त्यातील छोट्या छोट्या गोष्टींची माहिती लेखिका देते. ‘आपण आणि भोवतालचं वातावरण’ या प्रकरणात आपलं काम, आपल्या तक्रारी, आपले ताण कमी करणं, ते करताना समोरच्या माणसाच्या बौद्धिक पातळीचा अंदाज घेऊन बोलणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. सर्वांनी असेल त्या परिस्थितीत समजुतीनं, आनंदानं राहण्याचा प्रयत्न करावा, आपल्या आणि इतरांच्याही मनावरील ताण कमी किंवा दूर करण्यासाठी झटावं तसेच लहानसहान अडचणींचा बाऊ न करता त्या सोडविण्याकडे कल असावा असा लेखिका सल्ला देते. सदर पुस्तक वाचून जीवनातील ताणतणाव दूर करावेत व आपले जीवन अधिक सुखकर करावे, त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more