* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE REVOLUTIONARY DISCOVERIES IN SCIENCE AND TECHNOLOGY, IN PARTICULAR BIOTECHNOLOGY AND INFORMATION TECHNOLOGY IMPACT IN A MAJOR WAY LIFE OF HUMAN BEINGS IN THE TWENTY-FIRST CENTURY. THIS HAS ALSO LED TO CUT THROAT COMPETITION IN ALMOST ALL WALKS OF LIFE. NOT ONLY HAS LIFESTYLE UNDERGONE UNPRECEDENTED TRANSFORMATION BUT ALSO THE VALUE SYSTEM. FAMILY STRUCTURE, SOCIAL FABRIC, CULTURAL FOUNDATIONS HAVE ALL BEEN CAUGHT IN A MAELSTROM. THIS DOES NOT LEAVE ANY MEMBER OF SOCIETY ALONE, NOT EVEN THE SCIENTISTS THEMSELVES. THEIR PERSONAL AND MORE IMPORTANTLY THE PROFESSIONAL LIFE ARE GREATLY AFFECTED TAKING THEM INTO MINDBOGGLING VIRTUAL REALITY. THAT IS THE BASIC THEME OF ALL THE STORIES IN THIS ANTHOLOGY.
" विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आज होत असलेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळं एकविसाव्या शतकातील जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्या जोडीला असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि बाजारपेठांचा विस्तार यामुळं एक नव्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा आज रूढ होत आहे. त्यापोटी आपली जीवनशैली तसेच मूल्यव्यवस्था तळापासून ढवळून निघत आहे. त्यांच्यात होत असलेल्या आमूलाठा बदलाचा कॅनव्हास डॉ. बाळ फोंडके यांच्या या कथांना लाभलेला आहे. कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सांस्कृतिक वातावरण असं झंझावातात सापडल्यावर त्याच कुटुंबाचा, समाजाचा, संस्कृतीचा घटक असणार्‍या वैज्ञानिकाचं व्यावसायिक आयुष्यही झपाटल्यावाचून राहत नाही. त्याच चक्रावर्ताचं प्रतिबिंब या कथांमध्ये पडलेलं आहे. विज्ञानातील नवनव्या आविष्कारांची सांगड राजकारण, अर्थकारण, व्यापारी स्पर्धा यांच्याशी घातली गेली की, त्यातून तयार होणारं विलक्षण मिश्रण माणसांचे विविध स्तरांवरचे परस्परसंबंध, त्यांचं भावजीवन, त्यांची जिद्द, अहंभाव, मत्सर आणि महत्त्वाकांक्षा, प्रसिद्धीची झिंग आणि पैशाचा लोभ यांनाही व्यापून टाकते. षड्रिपुंचे तांडव सुरू होते. विज्ञानाच्या घोडदौडीपायी अस्तित्वात येत असलेल्या, या बीभत्स वास्तवाची भेदक अनुभूती देणार्‍या या कथा `व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी`च्या गूढरम्य प्रांगणात नेऊन सोडतात, स्थल आणि काल यांना छेद देणार्‍या पाचव्या डायमेन्शनमध्ये घेऊन जातात. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIRTUALREALITY #VIRTUALREALITY #व्हर्च्युअलरिअ‍ॅलिटी #SCIENCEFICTION #MARATHI #DR.BALPHONDKE #डॉ.बाळफोंडके "
Customer Reviews
  • Rating StarAmruta Chougule

    विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आज होत असलेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळं एकविसाव्या शतकातील जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्या जोडीला असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि बाजारपेठांचा विस्तार याुळं एक नव्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा आज रूढ होत आहे. त्यापोटी आपली जीवनशैली तसेच मूल्यव्यवस्था तळापासून ढवळून निघत आहे. त्यांच्यात होत असलेल्या आमूलाठा बदलाचा कॅनव्हास डॉ. बाळ फोंडके यांच्या या कथांना लाभलेला आहे. कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सांस्कृतिक वातावरण असं झंझावातात सापडल्यावर त्याच कुटुंबाचा, समाजाचा, संस्कृतीचा घटक असणार्‍या वैज्ञानिकाचं व्यावसायिक आयुष्यही झपाटल्यावाचून राहत नाही. त्याच चक्रावर्ताचं प्रतिबिंब या कथांमध्ये पडलेलं आहे. विज्ञानातील नवनव्या आविष्कारांची सांगड राजकारण, अर्थकारण, व्यापारी स्पर्धा यांच्याशी घातली गेली की, त्यातून तयार होणारं विलक्षण मिश्रण माणसांचे विविध स्तरांवरचे परस्परसंबंध, त्यांचं भावजीवन, त्यांची जिद्द, अहंभाव, मत्सर आणि महत्त्वाकांक्षा, प्रसिद्धीची झिंग आणि पैशाचा लोभ यांनाही व्यापून टाकते. षड्रिपुंचे तांडव सुरू होते. विज्ञानाच्या घोडदौडीपायी अस्तित्वात येत असलेल्या, या बीभत्स वास्तवाची भेदक अनुभूती देणार्‍या या कथा `व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी`च्या गूढरम्य प्रांगणात नेऊन सोडतात, स्थल आणि काल यांना छेद देणार्‍या पाचव्या डायमेन्शनमध्ये घेऊन जातात. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 17-11-2002

    भयावह वास्तवाचे दर्शन... ‘व्हर्च्युअल रिटॅलिटी’ म्हणजे सत्याभास, व्हर्च्युअलचा अर्थ मिथ्या अथवा जवळचा, निकटचा असाही होऊ शकतो. आभासी वास्तवाचा फेरफटका केला तर त्या वास्तवात टिकून राहण्याचे उपाय आपण शोधू शकू. अशा प्रेरणेतून कथानिर्मिती लेखक करतो. या वज्ञानकथा भयावह वास्तवाचे भेदक चित्रण सौम्यपणे पण नेमकेपणाने करतात. या सर्व कथांतून लेखकाचा जो दृष्टिकोन प्रगट होतो, जी भूमिका प्रगट होते ती अत्यंत लक्षणीय आहे. लेखकाच्या मनातील भारतीय व भारत यांच्याविषयीची आत्मियतेबरोबरच आदराची दृष्टी ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’तील अनेक कथात प्रतिबिंबित होते. विदेशी वा अमेरिकन लोकांना स्वत:च्या बुद्धीवर, कर्तृत्वावर विश्वास असला तरी भारतीयांच्या ज्ञानाविषयी, बौद्धिक कुवतीविषयी दबदबा आहे हेही या कथांतून आलेखित होते. कथाविषयांना साकार व सजीव करणाऱ्या भाषाशैलीचा प्रयोग डॉ. फोंडके करतात. विषयऔचित्य सांभाळण्यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शब्दशैलीचा वापर तसेच सुविद्य व्यक्तिचित्रणांमुळे येणारे इंग्लिश शब्दप्रयोग कथेतील वातावरणात सहजता व अकृत्रिमता निर्माण करतात. औद्योगिक, शास्त्रीय, तांत्रिक क्षेत्रातील संकल्पना लेखक संवादातून स्वाभाविकपणे स्पष्ट करतो. ‘ब्रेन-ड्रेन’सारख्या कथेची मांडणी पत्रात्मक स्वरूपात केल्याने कथेचा आशय अत्यंत स्वाभाविक शैलीत साकारतो. ‘कालकूट’सारख्या कथेवर असणारा ‘टाइम मशीच’चा प्रभाव कथाशयाचे नाविन्य थोडे कमी करतो. एकंदरीत कथासंग्रह वाचनीय असून आजच्या वास्तवाची जाणीव तीव्रपणे करून देणारा आहे. -डॉ. शुभदा शहा ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 16-12-2001

    वेगळ्या पण वाचनीय कथा... विज्ञानकथा नामक एक प्रकारे कथा-वाङ्मयात सध्या रुजू पाहतोय. तो रुजवण्यात ज्यांचा हात आहे वा महत्त्वाचा वाटा आहे त्यात डॉ. बाळ फोंडके हे एक! सायन्स टुडेचे संपादक आणि द इमॉनॉमिक टाइम्स व महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ संपादक म्हणूनकाम केलेल्या फोंडके यांनी ज्या कथा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी संग्रहात समाविष्ट केल्या आहेत, त्यासंबंधी म.टा.चे माजी संपादक कुमार केतकर म्हणतात, डॉ. फोंडके यांचे विविध शास्त्रज्ञांचे ज्ञान आणि आजूबाजूच्या सर्वंकष वास्तवाचे भान यामुळे त्यांच्या या कथांना त्रिमितीच्या पलीकडचे लाभले आहे. संग्रहात एकूण बारा कथा आहेत. या सर्व कथांना जसा सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक बेस आहे तसा तो माहिती तंत्रज्ञान व स्पर्धायुक्त जीवनाचाही आहे. पूर्वी स्पर्धा नव्हती असे नाही. पण् त्या स्पर्धेला जीवघेणी म्हणता येईल इतपत ती (क्रूर) नव्हती. त्यासंबंधी लेखक म्हणतो, गेल्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा जैवतंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांची घोडदौड सुरू झाली तेव्हा तर या तंत्रज्ञानाच्या उत्पादनांनी राहत्या घरांचे उंबरठे ओलांडून माजघरातच नव्हे तर शेजघरातही प्रवेश करायला सुरुवात केली. माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात, अगदी त्या जीवनाच्या खासगी मानल्या जाणाऱ्या दालनांमध्येही घुसखोरी आरंभली. त्यापोटी व्यक्तीव्यक्तींची आयुष्यं तर ढवळून निघालीच, पण नीतिमूल्यांची चौकटच विस्कटू लागली. जागतिकीकरणाच्या अनावर ओढीनं तर जीवनकलहाला जीवघेण्या स्पर्धेने परिमाण प्राप्त करून दिलं. –चंद्रकांत भंडारी ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आज होत असलेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळे एकविसाव्या शतकातील जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्या जोडीला असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि बाजारपेठांचा विस्तार याुळे एक नव्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा आज रुढ होत आहे. त्यापोटी आपली जीवनशैली तसेच मूल्यव्यवस्था तळापासून ढवळून निघत आहे. त्यांच्यात होत असलेल्या आमूलाग्र बदलाचा कॅनव्हास डॉ. बाळ फोंडके यांच्या या कथांना लाभलेला आहे. कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सांस्कृतिक वातावरण असं झंझावातात सापडल्यावर त्याच कुटुंबाचा, समाजाचा, संस्कृतीचा घटक असणाऱ्या वैज्ञानिकाचं व्यावसायिक आयुष्यही झपाटल्यावाचून राहत नाही. त्याच चक्रावर्ताचं प्रतिबिंब या कथांमध्ये घडलेलं आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more