* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980493
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ASMANI, WHICH LITERALLY MEANS `FROM THE SKY` ,IS A COLLECTION OF THIRTEEN SCIENCE FICTION STORIES BY RENOWNED WRITER SHUBHADA GOGATE. THE STORIES COVER VARIOUS SUBJECTS LIKE SPACE TRAVEL, GENETIC ENGINEERING, ALIENS,ROBOTICS, TIME TRAVEL ETC. THEY TELL US OF POSSIBLE SITUATIONS WHICH CAN ARISE OUT OF THE GALLOPING ADVANCEMENT OF VARIOUS BRANCHES OF SCIENCE, HUMAN RESPONSE AND EMOTIONAL INVOLVEMENT IN THESE SITUATIONS, AND POSSIBLE SOLUTIONS TO THEM.
विज्ञानकथा’ हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत.गवत खाऊन काम करणाNया यंत्रमानवाची गंमत ‘बकाबक’मध्ये आहे, वंशशास्त्राच्या घोडदौडीत निर्माण होऊ शकणारी शक्यता ‘मार्जिनल्स’मध्ये दिसते तर कालप्रवासाचा उपयोग करणारे चोर-पोलीस ‘कालचतुराची चित्तरकथा’मध्ये भेटतात. भविष्यातल्या शक्यतांमध्ये संभाव्य मानवी भावभावनांचं चित्रण करणाऱ्या या कथा आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
ASMANI #SHUBHADA #GOGATE #BAKABAK #MARGINALS #PRAVASIDAS #YANTRSAJEEVACHA #VARAS #KALPADI #SAKHA #AVER #JANM-JANMANTAR #PAHUNI #KALCHATURACHI CHITTARKATHA #DHAVAT BHET
Customer Reviews
  • Rating StarRATNAGIRI EXPRESS 16-11-2009

    ‘अस्मानी’ या कथासंग्रहात रंजक विज्ञानकथांचा समावेश करण्यात आला आहे. गवत खाऊन काम करणाऱ्या यंत्रमानवाची गंमत ‘बकाबक’ या कथेत दिसते. वंशशस्त्राच्या घोडदौडीत निर्माण होऊ शकणारी शक्यता ‘मार्जिनल्स’ या कथेमध्ये आढळते तर कालप्रवासाचा उपयोग करणारे चोर-पोलीस‘कालचतुराची चित्तरकथा’मध्ये भेटतात. भविष्यातील शक्यतांमध्ये संभाव्य मानवी भावनांचं चित्रण करणाऱ्या या कथा आहेत. अस्मानी या शीर्षककथेमध्ये एका शेतकऱ्याची कथा चितारली आहे. या शेतकऱ्याच्या शेतात एके दिवशी अचानक भूकंप होतो. नंतर दररोज ठरलेल्या वेळी असा भूकंप होतो. या दरम्यान त्याच्या शेतातील पिकांची वाढ राक्षसी वाटावी अशी होते आणि एक दिवस सारं शेत उद्ध्वस्त होतं. रोज ठराविक वेळी होणाऱ्या या भूकंपाचं रहस्य काय हे शोधून काढण्यासाठी मंत्र-तंत्राबरोबरच पोलिसांचीही मदत घेतली जाते. अखेर जमिनीला बसणारे हे धक्के म्हणजे भूकंप नसून जमिनीत गडप झालेल्या आणि उड्डाण करू इच्छिणाऱ्या एका यानाची ती करामत असल्याचं लक्षात येतं. या साऱ्या कथांची मांडणी गोगटे यांनी त्याचे तपशील अगदी तर्काला पटतील, असे दिले आहेत. सामान्य वाचकालाही सहज खिळवून ठेवतील अशा या कथा आहेत. बारीकसारीक तपशिलामुळे जणू आपण तो अनुभव घेत आहोत अशी जाणीव कथा वाचताना होते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKASHA 11-10-2009

    इंग्रजी साहित्यात विज्ञान कथेचे दालन समृद्ध आहे. मराठी साहित्यात आता कुठे या कथाक्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. ललित साहित्यात कथा लिहिताना कल्पनेचे प्रचंड स्वातंत्र्य असते. विज्ञानकथेबद्दल तसे म्हणता येत नाही. विज्ञानात वैज्ञानिक तथ्य बाजूला ठेवून था लिहिता येत नाहीत. विज्ञानकथा लिहिताना विज्ञानाचे निकष पाळावेच लागतात हे एक अत्यंत अवघड असे काम आहे. वैज्ञानिक शोधात स्वतःच्या कल्पना घुसवता येत नाहीत किंवा वैज्ञानिक शोधाचे जे निकष आहेत ते त्याची तोडफोड करता येत नाहीत. अलीकडच्या काळात विज्ञानविषयक कथा लिहिणारे ललित साहित्यिक पुढे आले आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ. जयंत नारळीकर यांचा विज्ञानविषयक कथासंग्रह खूपच लोकप्रिय झाला होता. आता या क्षेत्रात शुभदा गोगटे नावरूपाला आल्या आहेत. इंग्रजी साहित्यात विज्ञानाच्या दृष्टीतून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो. चार-सहा शतकानंतर माणूस कसा असेल, माणसाची अवस्था कशी असेल, समाजरचना, घर बांधणी, सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात काय काय बदल झाले असतील अशा अनेक विषयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. अलीकडेच इंग्रजीतील मार्कर ही कादंबरी जगभरात गाजली. मार्कर या कादंबरीत कर्करोगाचा विषाणू आपल्या शरीरात आहे असे लक्षात आल्यानंतर संबंधित नायिका या घटनेला कशी सामोरं जाते त्याचे वर्णन आलेले आहे. विज्ञानकथेला एक विशिष्ट असा वाचक वर्ग लाभलेला आहे. त्यातील बहुतांशी लोक विज्ञान या विषयात रस घेणारे असतात. काही लोक विज्ञान विषयात शिक्षण घेतलेले असतात. ज्यांना थोडीफार विज्ञानाची माहिती आहे अशा लोकांसाठी एक काल्पनिक जग उभे करून त्यांची करमणूक करणे आणि करमणूक करताना भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणे हे एक अवघड काम आहे. शुभदा गोगटे यांनी आपल्या ‘अस्मानी’ या कथासंग्रहात हे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडले आहे असे म्हणावे लागेल. विज्ञानकथा लिहिणाऱ्यांनी स्वतःहून काही बंधने घालून घेतली पाहिजेत. काही वर्षांपूर्वी विज्ञानाचा गंधही नसलेल्या एका लेखिकेने विज्ञानविषयक कथा लिहिल्या आणि प्रकाशकाने त्या पुस्तकरूपाने छापल्याही. ते पुस्तक डॉ. जयंत नारळीकर यांच्या पाहण्यात आले त्यांनी चाळले आणि विज्ञानकथेच्या नावावर काल्पनिक कथा लिहिणाऱ्या लेखिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. विज्ञान म्हणजे सत्य वैज्ञानिक कथाचा उपयोग समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी झाला पाहिजे. विज्ञानविषयक लेखनातून अंधश्रद्धा वाढता कामा नये. असे काही निकष विज्ञानविषयक कथा लिहिणाऱ्या लेखकाने पाळावेत. तसे झाले तरच विज्ञानविषयक कथांची लोकप्रियता वाढेल आणि विज्ञानविषयक कथांतून भविष्याचा वेध घेऊ पाहणारा एक वर्ग निर्माण होईल. तसे वातावरण निर्माण होईल. आता विज्ञानातील शोध अति सूक्ष्म पातळीवर गेले आहेत, त्यामुळे विज्ञानविषयक कथाही तशाच ताकदीच्या असल्या पाहिजेत. अशा कथा लिहायच्या झाल्या तर संबंधित विषयाची माहिती करून घेणे गरजेचे आहे. कोणताही मनुष्य सर्वच क्षेत्रात निष्णात असतो असे नाही. विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या साहित्यिकाने पाश्चात्य देशातील लेखकांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. पाश्चात्य लेखक ज्या विषयावर लेखन करायचे असते त्या विषयाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करतात. माहिती मिळवितात. संबंधित विषयांबाबत जगभरात काय संशोधन चालू आहे त्याची माहिती घेतात आणि नंतरच लेखन करतात. शुभदा गोगटे यांच्या या ‘अस्मानी’ कथासंग्रहातील काही कथा निश्चितच प्रचंड परिश्रम घेऊन लिहिल्या आहेत असे जाणवते. या कथा विज्ञानाची आवड असलेल्या लोकांना आवडणार आहेत. हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. मेहताचे पुस्तक म्हणजे चांगलेच असतात याबद्दल चर्चा होण्याचे कारण नाही. पुस्तकाचे मुद्रण सुबक आहे. मुखपृष्ठ कथासंग्रहाला साजेसं आहे. पृष्ठसंख्या २२८ असून या अत्यंत चांगल्या पुस्तकाची किंमत फक्त १८० रुपये आहे. एकूणच पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.