* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VASUDEVE NELA KRISHNA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980479
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 244
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SCIENCE FICTION IS NO MORE A NOVEL TYPE IN MARATHI LITERATURE. MANY HAVE USED THIS FORMAT TO ENTERTAIN THE READERS. NOW THIS TYPE HAS GAINED SOME NAME AND FAME IN THE FIELD OF LITERATURE. THIS TYPE GIVES AN OPPORTUNITY TO THE INQUISITIVE HUMAN MIND TO TRY TO LOOK INTO THE FUTURE, TRY TO GIVE A DEFINITE FORM TO THE IDEAS THAT MIGHT COME TO BE TRUE IN THE FUTURE. THIS PEEPING INTO THE FUTURE IS NOT JUST ENTERTAINING, IT OFFERS A CHANCE TO REVEAL MANY A THINGS HIDDEN IN THE PAST AS WELL. SHUBHADA GOGATE IS NO MORE AN AMATEUR IN THIS FIELD. SHE HAS VERY SUCCESSFULLY TRIED HER HANDS ON SCIENCE FICTION IN THE FORM OF SHORT STORIES, LONG STORIES, AND NOVELS. MANY OF HER FICTIONS ARE AWARD WINNING. THE NATIONAL BOOK TRUST HAS PUBLISHED A COLLECTION OF SCIENCE FICTION WRITTEN IN VARIOUS INDIAN LANGUAGES. SHUBHADA`S FICTION VASUDEVE NELA KRISHNA HAS BEEN INCLUDED IN THAT. THIS BOOK CONTAINS THE FICTIONS BASED ON CLONING, ROBOT, AND TIME-JOURNEY.
‘विज्ञानकथा’ हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. नॅशनल बुक ट्रस्टनं सर्व भारतीय भाषांमधील विज्ञानकथांचा एक संग्रह प्रकाशित केला आहे. ‘वसुदेवे नेला कृष्ण’ ही त्यांची कथा त्या संग्रहात समाविष्ट केलेली आहे. क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. ‘अभिहरण’मध्ये परग्रहवासियांच्या भेटीत अडकलेला नायक दिसतो, क्लोनिंगमुळे उडालेली गंमत ‘पिनी’मध्ये बघायला मिळते तर ‘वसुदेवे नेला कृष्ण’मध्ये अतिप्रगत विज्ञान-तंत्रज्ञानामुळे मिळणा-या सुखसोयी आणि त्यासोबतचं मानसिक दास्य नाकारून अपत्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यासाठी कष्ट व धोका पत्करणारे माता-पिता दिसतात. मानवी मूल्यं आणि मानवी भाव-भावना या सर्व कथांच्या केंद्रस्थानी आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VASUDEVE NELA KRISHNA #SHUBHADA GOGATE #PINATARKACHE BOT DHARUN #FRIEND IN NEED #JAMEEN MALKACHE AKASH? #PRADNYECHA SHODH #KALDAMAN #JANYITRI # ABHIHARAN # EK SHEPUT APLYALAHI #KELE TUKA… #HA HANT HANT… #PEEK #HUKALELI SANDHI #VARUNASTR #NIRANKUSH
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 20-12-2009

    विज्ञानकथांचे, गूढकथांचे अनोखे विश्व… शुभदा गोगटे यांनी विज्ञानकथा, विज्ञान कादंबरी, विज्ञानलेख लिहिले आहेत. ‘वसुदेवे नेला कृष्ण’ हा त्यांचा विज्ञान कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. घर हा त्यांचा गूढकथासंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. विजया गोगटे यांच्याविज्ञानकथांमध्ये क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव, कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान, उल्कापात, डीएनएच्या संदर्भातील प्रयोग आणि संशोधन हे विज्ञानविषय आलेले आहेत. विज्ञान क्षेत्रातील नवनवीन संकल्पनांचा किंवा शोधांचा उपयोग करून विज्ञानकथांचे लेखन होत असते. चांगली विज्ञानकथा ही चांगली रहस्यकथा, चांगली प्रेमकथा किंवा चांगली विनोदी कथाही होण्याची शक्यता असते. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधनाचा हा आधार घेऊन कल्पनाशक्तीच्या आधारे उभे केलेले माणसांचे जग, मानवी व्यवहार, माणसांची नाती यांचे चित्रण गोगटे यांच्या विज्ञान कथांमध्ये दिसते. आकाशाला आणि अवकाशाला गवसणी घालणारे मानवी विज्ञान, तंत्रज्ञान, मानवी बुद्धिमत्ता ही बाजू त्यांच्या कथेत समर्थपणे व्यक्त होते, परंतु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेणाऱ्या माणसाचे पाय अखेरीस मातीचे असतात, ही जाणिवही या कथांमधून उमटते. मानवी बुद्धीची झेप आणि मानवी मनाचा संकुचितपणा, कोतेपणा या दोन्हीचा प्रत्यय या विज्ञानकथांमधून समर्थपणे येतो. - रुपाली शिंदे ...Read more

  • Rating StarRATNAGIRI EXPRESS 16-11-2009

    विज्ञानकथा हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञान कथेने आता चांगलंच बाळसं धरलं आहे. आज ज्ञान असणाऱ्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातील शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न विज्ञान कथांमधून झालेला दिसतो. ा वाङमय प्रकार मराठीत चांगलाच लोकप्रिय झाला आहे. असं भविष्यात डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतच शिवाय, ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे यांच्या ‘वसुदेवे नेला कृष्ण’ या कथासंग्रहातून अशाच काही रंजक विज्ञानकथा वाचायला मिळतात. विज्ञानाने माणसाच्या आयुष्यात कशी प्रगती केली हे सांगतानाच त्याच्यातील माणूसपण कसं हरवलं, यावरही या कथा भाष्य करतात. ‘अभिहरण’सारख्या कथेतून परग्रहावासियांचं वेगळंच विश्व उलगडत जातं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more