* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
CAN THE MURDERER BE CAUGHT WITH PROOF ONE YEAR AFTER THE MURDER? CAN THE LIVES OF THOUSANDS OF INNOCENT PEOPLE BE SAVED BY DECODING THE MESSAGE RECEIVED BY THE SUPER COMPUTER THROUGH EMAIL? CAN A WITNESS BE AVAILABLE EXCEPT THE FOUR SUSPECTS AT THE TIME OF THE MURDER IN THE GARDEN? CAN THE TRUTH BEHIND THE FATHERINLAWS WORDS SAYING THAT HE WAS NOT PRESENT AT THE CRIME WHEN HIS DAUGHTERINLAW WAS BURNT TO DEATH BE REVEALED? THE BUSINESSMAN DIED OF HEART ATTACK, CAN THE TRUTH BE FOUND ABOUT HIS ATTACK, WHETHER IT WAS NATURAL OR ...? CAN WE PROVE THAT THE 2500 YEARS OLD GOLDEN RING IS MADE FROM 24 CARAT OF GOLD? CAN WE TELL WHY THE HEN RAN AWAY FROM HER PEN? POLICE COMMISSIONER AMRITRAO MOHITE IS UNABLE TO FIND ANSWERS TO MANY SUCH QUESTIONS. HE APPROACHES HIS SCIENTIST FRIEND DR. KAUSHIK. TOGETHER THEY WORK ON THESE QUESTIONS MAKING USE OF THE ADVANCED SCIENCE AND TECHNOLOGY AND THEN IT BECOMES EASY TO FIND OUT THE ANSWERS TO SUCH QUESTIONS. AFTER THAT, NOT ONLY THIS DUO BUT ALSO THE CULPRITS AND OTHERS COME TO KNOW THAT AS EVERY WALL HAS EARS, EVERY WINDOW HAS EYES. DR. BAL PHONDKE HAS BEEN FELICITATED BY INDIRA GANDHI AWARD, VEER SAWARKAR AWARD, AND MANY OTHER AWARDS BY THE GOVT. OF INDIA, GOVT. OF MAHARASHTRA, AND THE MAHARASHTRA SAHITYA PARISHAD AS WELL.
खून झाल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर खुन्याला रंगेहात पकडता येईल?संगणकाद्वारे इमेलमधून मिळालेल्या संदेशाचा अर्थ दोन तास पस्तीस मिनिटांमध्ये लावून हजारो निरपराध नागरिकांचे जीव वाचवता येतील? बागेमध्ये झालेल्या खुनाच्या वेळी तिथं हजर असलेल्या चौघांवरही संशय असताना त्यांच्या व्यतिरिक्त कोणी चष्मदीद गवाह सापडू शकेल? सून जळाली तेव्हा आपण दुसरीकडेच होतो असा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून सादर केलेला सासयांच्या पुराव्याची सत्यासत्यता पडताळून पाहता येईल? हृदयविकाराचा झटका येऊन शेटजींचा मृत्यू झाला तो खरोखरच नैसर्गिक होता की घडवून आणला होता? संग्रहालयात ठेवलेली अडीच हजार वर्षांपूर्वीची अंगठी खरोखरच त्या काळातल्या शंभर नंबरी सोन्याची आहे हे ठामपणे सिद्ध करता येईल? आपलं घरटं सोडून कोंबडी का पळाली हे सांगता येईल? या आणि अशा मति गुंग करणाया सवालांनी बेचैन झालेले पोलिस कमिशनर अमृतराव मोहिते, जेव्हा त्यांचे मित्र असलेल्या वैज्ञानिक डॉक्टर कौशिकांकडे जातात; तेव्हा विज्ञानाच्या मदतीनं त्या दोघांना गुन्हेगारांना थांगपत्ता लावायला वेळ लागत नाह. कारण मग त्यांना, गुन्हेगारांना आणि इतरांनाही कळून चुकतं की विज्ञानाच्या नजरेतून बघितल्यावर लक्षात येईल, `खिडकीलाही डोळे असतात`. इंदिरा गांधी पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, तसंच भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र साहित्य परिषद यासारख्या संस्थांचे पुरस्कार यांनी सन्मानित झालेल्या डॉक्टर बाळ फोंडके यांच्या ओघवत्या शैलीतील आगळ्यावेगळ्या रहस्यविज्ञानकथांचा हा ताजा संग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BALPHONDAKE #KHIDAKILAHIDOLEASATAT#DRUSHTIBHRAM #KARNAPISHACCHA#SUGARANICHVIDNYAN #
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more