* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KHIDKILAHI DOLE ASTAT
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666915
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
CAN THE MURDERER BE CAUGHT WITH PROOF ONE YEAR AFTER THE MURDER? CAN THE LIVES OF THOUSANDS OF INNOCENT PEOPLE BE SAVED BY DECODING THE MESSAGE RECEIVED BY THE SUPER COMPUTER THROUGH EMAIL? CAN A WITNESS BE AVAILABLE EXCEPT THE FOUR SUSPECTS AT THE TIME OF THE MURDER IN THE GARDEN? CAN THE TRUTH BEHIND THE FATHERINLAWS WORDS SAYING THAT HE WAS NOT PRESENT AT THE CRIME WHEN HIS DAUGHTERINLAW WAS BURNT TO DEATH BE REVEALED? THE BUSINESSMAN DIED OF HEART ATTACK, CAN THE TRUTH BE FOUND ABOUT HIS ATTACK, WHETHER IT WAS NATURAL OR ...? CAN WE PROVE THAT THE 2500 YEARS OLD GOLDEN RING IS MADE FROM 24 CARAT OF GOLD? CAN WE TELL WHY THE HEN RAN AWAY FROM HER PEN? POLICE COMMISSIONER AMRITRAO MOHITE IS UNABLE TO FIND ANSWERS TO MANY SUCH QUESTIONS. HE APPROACHES HIS SCIENTIST FRIEND DR. KAUSHIK. TOGETHER THEY WORK ON THESE QUESTIONS MAKING USE OF THE ADVANCED SCIENCE AND TECHNOLOGY AND THEN IT BECOMES EASY TO FIND OUT THE ANSWERS TO SUCH QUESTIONS. AFTER THAT, NOT ONLY THIS DUO BUT ALSO THE CULPRITS AND OTHERS COME TO KNOW THAT AS EVERY WALL HAS EARS, EVERY WINDOW HAS EYES. DR. BAL PHONDKE HAS BEEN FELICITATED BY INDIRA GANDHI AWARD, VEER SAWARKAR AWARD, AND MANY OTHER AWARDS BY THE GOVT. OF INDIA, GOVT. OF MAHARASHTRA, AND THE MAHARASHTRA SAHITYA PARISHAD AS WELL.
खून झाल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर खुन्याला रंगेहात पकडता येईल?संगणकाद्वारे इमेलमधून मिळालेल्या संदेशाचा अर्थ दोन तास पस्तीस मिनिटांमध्ये लावून हजारो निरपराध नागरिकांचे जीव वाचवता येतील? बागेमध्ये झालेल्या खुनाच्या वेळी तिथं हजर असलेल्या चौघांवरही संशय असताना त्यांच्या व्यतिरिक्त कोणी चष्मदीद गवाह सापडू शकेल? सून जळाली तेव्हा आपण दुसरीकडेच होतो असा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून सादर केलेला सासऱ्यांच्या पुराव्याची सत्यासत्यता पडताळून पाहता येईल? हृदयविकाराचा झटका येऊन शेटजींचा मृत्यू झाला तो खरोखरच नैसर्गिक होता की घडवून आणला होता? संग्रहालयात ठेवलेली अडीच हजार वर्षांपूर्वीची अंगठी खरोखरच त्या काळातल्या शंभर नंबरी सोन्याची आहे हे ठामपणे सिद्ध करता येईल? आपलं घरटं सोडून कोंबडी का पळाली हे सांगता येईल? या आणि अशा मति गुंग करणाया सवालांनी बेचैन झालेले पोलिस कमिशनर अमृतराव मोहिते, जेव्हा त्यांचे मित्र असलेल्या वैज्ञानिक डॉक्टर कौशिकांकडे जातात; तेव्हा विज्ञानाच्या मदतीनं त्या दोघांना गुन्हेगारांना थांगपत्ता लावायला वेळ लागत नाह. कारण मग त्यांना, गुन्हेगारांना आणि इतरांनाही कळून चुकतं की विज्ञानाच्या नजरेतून बघितल्यावर लक्षात येईल, `खिडकीलाही डोळे असतात`. इंदिरा गांधी पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, तसंच भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र साहित्य परिषद यासारख्या संस्थांचे पुरस्कार यांनी सन्मानित झालेल्या डॉक्टर बाळ फोंडके यांच्या ओघवत्या शैलीतील आगळ्यावेगळ्या रहस्यविज्ञानकथांचा हा ताजा संग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BALPHONDAKE #KHIDAKILAHIDOLEASATAT#DRUSHTIBHRAM #KARNAPISHACCHA#SUGARANICHVIDNYAN #
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more