* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIDNYANATIL SARAS ANI SURAS
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980387
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE CHRONICLES OF SCIENTIFIC DEVELOPMENT ARE FILLED WITH LIVES AND TIMES OF SCIENTISTS AND RESEARCHERS, AND THRILLING MOMENTS OF DISCOVERIES AND INVENTIONS. THE DISCOVERIES AND INVENTIONS OVER CENTURIES, RANGING FROM THOSE OF SAFETY PIN TO ATOM BOMB PAY TESTIMONIALS TO THE SCIENTIFIC ACUMEN, THE INTELLIGENCE AND THE DEDICATION OF THESE RESEARCHERS, WHO WORKED TIRELESSLY TO ACHIEVE THE PROGRESS. HISTORY, THOUGH CONSISTS OF DATES AND YEARS, THIS ALONE DOES NOT MEAN HISTORY. THIS IS APPLICABLE TO SCIENCE HISTORY ALSO. THE HISTORY OF SCIENTIFIC DEVELOPMENT IS FULL OF MOMENTS OF ENTHUSIASM, EXCITEMENT AND THRILL, AS EQUALLY OF DESPAIR. ‘VIDNYANATEEL SARAS ANI SURAS’ – THROWS LIGHT ON SOME PAGES OF THE HISTORY OF SCIENTIFIC DEVELOPMENT, THE INVENTIONS AND DISCOVERIES. READERS WILL COME ACROSS THE INVENTOR IN THE ARTIST LEONARDO DA VINCI, LIFE AND TIMES OF ALFRED NOBEL, PAULING, SAKHAROV, BHATNAGAR AND EXCITING HISTORY OF DISCOVERY OF ASPIRIN TO ELECTRIC BULB. BOOK PRESENTS THIS HISTORY WITHOUT ENGULFING INTO ANY TECHNICAL FORMULAE OR CHRONOLOGIES. IT JUST TELLS THE STONES OF EXCITEMENT AND EXCELLENCE.
विज्ञानइतिहासाची पाने ही शास्त्रज्ञांच्या जीवनकथांनी आणि शोधांच्या रंजक कथांनी नटली आहेत. साध्या सेफ्टी पिनपासून अणुबाँबपर्यंत अनेकविध जे शोध लागले, ते संशोधकांच्या– शास्त्रज्ञांच्या परिश्रमांची, चिकाटीची आणि मुख्यत: त्यांच्या प्रतिमेची साक्ष पुरवितात. विज्ञानइतिहासातील अशीच काही पाने उलगडून दाखविण्याचा हा प्रयत्न. या पुस्तकात लिओनार्दो द विंची या प्रख्यात चित्रकारातील संशोधक भेटेल, नोबेल, पॉलिंग, साखारॉव्ह, भटनागर हे संशोधक-शास्त्रज्ञ भेटतील, तसेच अ‍ॅस्पिरीनपासून विजेच्या दिव्यांपर्यंत अनेक शोधांच्या रंजक कथा वाचायला मिळतील. विज्ञानातील हे सारे ‘सरस’ तितकेच ‘सुरस’ही आहे. ते तितक्याच रंजक पद्धतीने मांडलेले या पुस्तकात आढळतील.
महाराष्ट्र शासनाचा र.धो.कर्वे पुरस्कार- २०११
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIDNYANATILSARASANISURAS #VIDNYANATILSARASANISURAS #विज्ञानातीलसरसआणिसुरस #SCIENCEFICTION #MARATHI #RAHULGOKHALE #राहुलगोखले "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAGAR 04-07-2010

    खरोखरच सरस आणि सुरस !... विज्ञान म्हटलं की, क्लिष्टपणा नि किचकटपणा याच गोष्टी आठवतात. तथापि राहुल गोखले यांचं ‘विज्ञानातील सरस आणि सुरस’ हे पुस्तक वाचलं की, आपला चांगल्या अर्थानं भ्रमनिरास’ होतो. खरोखरच विज्ञानात खरोखरच सरस आणि सुरस बरंच काही असतं. ाचा सुखद प्रत्यय येतो. अगदी टाचणीपासून अणुबॉम्बपर्यंत नानाविध शोधांच्या पार्श्वभूमीवर इथं विविध शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचं आणि परिश्रमांचं स्पष्ट दर्शन घडून येतं. शास्त्रज्ञ, शोध आणि संकीर्ण अशा तीन विभागांमध्ये ५२ शास्त्रीय शोधांविषयी हसतखेळत विवेचन केलंय. शास्त्रज्ञांचे स्वभाव, त्यांचे दृष्टिकोन आणि त्यांची चिकाटी यांविषयी भरभरून लिहिण्यात आलंय. त्यामुळे ‘शास्त्रज्ञांमधला माणूस’ इथं दाखवून देण्यात लेखकाला यश लाभलंय. त्यामुळेच हे निव्वळ रटाळ शास्त्रीय लेखन न ठरता रसाळ ललित लेखन ठरलंय. लेखकाला याबद्दल धन्यवाद द्यावेत तितके थोडेच ठरतील. समाजामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशाच लालित्यपूर्ण तरीही ‘शास्त्र’शुद्ध लिखाणाची गरज आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 04-06-2010

    विशेषत्वाने ‘सुरस’हे विशेषण कथा या वाङ्मयीन प्रकारासाठी वापरले जाते. बालकथांमधील परीकथा, जादूच्या कथा, साहसी कथा, बिरबल, तेनालीराम च्या कथा या सर्वच कथा सुरस या श्रेणीत मोडतात. पण विज्ञानकथांनाही सुरस म्हणणे म्हणजे जरा धक्कादायकच.पण विज्ञान जगतात सुर अशा काही घटना घडले, घडत आहेत की ज्यामुळे त्यांच्याही सुरस कथा बनल्या. विज्ञान हे शोध, प्रयोग यांनी खच्चून भरलेले. सेफ्टीपिनपासून अणुबॉम्बपर्यंत जे शोध गेल्या काही शतकांत लागले ते संशोधकांच्या शास्त्रज्ञांच्या परिश्रम, चिकाटीमुळेच आणि या शास्त्रज्ञांच्या जीवनकथा, शोधांच्या रंजक कहाण्या यामुळेच विज्ञानाचा इतिहास निर्माण झाला. पण हा विज्ञान इतिहास क्लिष्ट बोजड, अवघड, समीकरणे-सूत्रे यांत हरवू नये म्हणूनच राहुल गोखले यांनी विज्ञानातील शोध, प्रयोग, संशोधक शास्त्रज्ञ यांच्याबद्दल काहा ‘सरस’ आणि ‘सुरस’ कथा या पुस्तकातून अतिशय रंजक पद्धतीने वाचकांपुढे आणल्या आहेत. विज्ञानात असे काही शोध आहेत की जे एकाच सुमारास दोन शस्त्रज्ञांनी स्वतंत्रपणाने लावूनही त्यातील एकाच्या नावावर शोधाचे श्रेय गेले आणि दुसऱ्याच्या वाट्याला मात्र उपेक्षा आली अशा काही शोधांचा आणि शास्त्रज्ञांचा लेखकाने या पुस्तकातून घेतला आहे. त्याचप्रमाणे कला व विज्ञान क्षेत्रात लीलया संचार करून एक प्रतिभवंत म्हणून आपला ठसा उमटवणारा जगतविख्यात लिओनार्दो- द- दा विंची हा चित्रकलेबरोबरच आदर्श गावाची रचना कशी असावी याच्या अभ्यासाबरोबरच हवेतील आर्द्रतेच्या मोजणीचेही प्रयोग करायचा यावरकोणाचा विश्वासही बसणार नाही. लिओनार्दोप्रमाणेच रॉबर्ट हुक, देवीच्या लसीची प्रचारक मेरी माँटेग्यू, होमिओपॅथीचे जनक हानोमान, थॉमस एडिसन, नोबेल यांसह अनेक शास्त्रज्ञांच्या सुरस कथा वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. विज्ञान हे प्रवाही असल्याने अनेक वेळा जुन्या सिद्धांतांना धक्का लागतो आणि त्या संकल्पना सोडून द्याव्या लागतात. पण मग धर्मग्रंथ आणि वैज्ञानिक यांच्यात कलह निर्माण होतात. अशीच परिस्थिती १६ व्या १७ व्या शतकात युरोपात होती. पण अशा परिस्थितीतही ज्या संशोधकानी जीवावर उदार होऊन काही वैज्ञानिक सत्ये मांडून विज्ञानाला धर्माच्या जाचातून मुक्त केले असे काही शोधही लेखकाने आपल्यापुढे मांडले आहेत. म्हणूनच मानवी शरीरातील रक्त, भूलशास्त्र, शिवणयंत्राचा विकास, अ‍ॅस्पिरिन,दिवे या सर्वांबद्दलची हकीकत आपल्याला समजत आहे. त्याचप्रमाणे विज्ञानाने गुन्हेगारीचा माग काढण्यासाठी पोलिसांना कसा मदतीचा हात दिला आहे. तर सर्वांना थक्क करणारे आहे. संगीत, राजकारण या क्षेत्रात जशी घराणेशाही आहे तशीच जगात सर्वत्र घराणेशाही दिसून येते त्याचाही लेखकाने या पुस्तकातून वेध घेतला आहे. क्युरी, नोबेल, यांच्याप्रमाणेच बेक्वेरेल हे भौतिकशास्त्रातील संशोधक घराणे. या सर्वांच्याच धमन्यांमधून विज्ञान वहात होते हे दिसून येते. विज्ञानातील हे सर्वच सरस आणि सुरस आपल्याला या पुस्तकात एकत्रितपणाने वाचायला मिळते पण तेही अतिशय रंजकपद्धतीने, कथारूपाने, म्हणूनच वाचक विज्ञानप्रेमी या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more