* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANTARALATIL MRUTYU
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989144
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.SANJAY DHOLE COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR.SANJAY DHOLE, WITH HIS MINDBLOWING SCIENTIFIC STORIES , HAVE BEEN SUCCESSFUL IN MAKING THE SECTION OF MARATHI STORIES MORE WIDE AND PROMINENT. THE STORIES IN THIS BOOK ARE TOTALLY BASED ON SCIENCE AND THE AUTHOR HAS HONESTLY TRIED TO CONVEY THE IMPORTANCE OF MODERN SCIENCE TO EVERYONE OUT THERE.ALONG WITH THE SPACE SCIENCE, RAYS, PHYSICS, NUCLEAR SCIENCE,”PADARTHA VIDNYAN” BOTANY ARE THE SUBJECTS INCLUDED IN THIS STORIES. “PRATISHODH” A BREATHTAKING STORY DESCRIBES THE HORRIFYING CIRCUMSTANCES OF ENERGY CONSUMPTION AND SAVING IN THE NEAR FUTURE. “ANTARALATIL MRUTYU” , “PRATIGHATNA” , “ADBHUT PRAWAS” ARE THE STORIES OF FINDING THE SISTER OF EARTH AND ANALYZING LIFE THERE. “PRAGALBHA” DESCRIBES HOW THE EMOTIONAL SIDE OF A MAN PUTS A HUMAN BRAIN FUNCTIONING IN A ROBOT AND ANALYZES THE TRUTH, ARE THE SCIENTESTS PROVING TO BE A CURSE TO HUMAN KIND ?? BESIDES, EVEN A HUMAN BEING COULD PROVE TO BE A POWERFUL WEAPON , DESCRIBES “AAWISHKAR”. NEGATIVE APPROACH OF A SCIENTIST CAN PROVE FAR MORE HAZARADOUS TO NATURE, NARRATES “ANDHARATIL TIR”
अंतराळ शास्त्रासोबत किरण, भौतिकशास्त्र, अणुशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पती शास्त्रांसारखे विषय या कथांमध्ये हाताळले आहेत. ‘प्रतिशोध’ ही कथा एका थरारक अनुभवातून भविष्यात बिकट होणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न सोडविणारी आहे. तर ‘अंतराळातील मृत्यू’, ‘प्रतिघटना’, ‘अद्भुत प्रवास’ ह्या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रति पृथ्वीचा व समांतर विश्वाच्या शोधाच्या कथा आहेत. ‘प्रगाढ’ ही कथा किरण शास्त्रावर आधारित असून त्यातील शास्त्रज्ञ सुडापोटी विघातक प्रयोग करतो आणि समाजापुढे प्रश्न निर्माण करतो. ‘प्रगल्भ’ ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदूचा दर्जा मिळून देताना, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना? याची दखल घेते. शिवाय मानवसुध्दा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकतो हे ‘आविष्कार’ या कथेत प्रकर्षाने जाणवते. ‘अंधारातील तीर’ ही कथा मात्र शास्त्रज्ञाचा नकारात्मक दृष्टिकोन निसर्गालाच कसे वेठीस धरू शकतो याची जाणीव करून देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANTARALATILMRUTYU #ANTARALATILMRUTYU #अंतराळातीलमृत्यू #SCIENCEFICTION #MARATHI #DR.SANJAYDHOLE #डॉ.संजय ढोले "
Customer Reviews
  • Rating StarTushar Kute

    पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. संजय ढोले यांचे मेहता पब्लिशिंग हाऊसने ५-६ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यातीलच `अंतराळातील मृत्यू` हा एक होय. त्यांच्या डिंभक व अश्मजीव या दोन पुस्तकानंतर वाचलेला हा तिसरा कथासंग्रह होय. त्यांच्या प्त्येक पुस्तकात लेखक म्हणून त्यांची संशोधक वृत्ती सातत्याने जाणवते. प्रत्येक कथेत मुलविज्ञान अर्थात जीव, भौतिक व रासायन यांचा प्रामुख्याने प्रभाव असतो. विशेष म्हणजे त्या विज्ञान संकल्पनांनी ओतप्रोत भरलेल्या असतात. विज्ञान कशा प्रकारे काम करू शकते? या प्रश्नाचे उत्तर ते आपल्या कथांमधून देत राहतात. हे सर्व कल्पनाविलास असले तरी अशक्यतेचा पल्ला कदाचित गाठू शकणार नाही असेच आहेत. प्रयोग, संशोधन व शास्त्रज्ञ/प्राध्यापक हे त्यांच्या प्रत्येक कथेत येणारे शब्द. अर्थात त्याची प्रत्येक कथा ही एका प्रयोगात सारखीच असते. तिच्यात विज्ञानाच्या मूल गाभ्याचा प्रकर्षाने समावेश असतो. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्या पेक्षा वेगळ्या कथा डॉ. ढोले लिहितात. हे मला प्रामुख्याने सांगावेसे वाटते. त्यांच्या सर्वच कथासंग्रहांमध्ये त्यांची शैली व विज्ञान हे समान धागे आहेत. त्यामुळे मुल विज्ञानाची आवड असणाऱ्यांनी त्यांचे कथासंग्रह निश्चितच वाचावेत. http://www.tusharkute ...Read more

  • Rating StarDainik Divya Marathi 13-1-17

    अंतराळशास्त्रासाेबत किरण, भाैतिकशास्त्र, अणूशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पतीशास्त्रासारखे विषय `अंतराळातील मृत्यू` या कथासंग्रहात डाॅ. संजय ढाेले यांनी अत्यंत राेमांचक पद्धतीने रेखाटल्या अाहेत. यातील प्रतिशाेध ही कथा एखाद्या थरारक अनुभवातून भविष्यत बिकट हाेणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न साेडविणारी अाहे. तर अंतराळातील मृत्यू, प्रतिघटना, अद‌्भुत प्रवास या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रतिपृथ्वीचा समांतर विश्वाच्या शाेधाच्या कथा अाहेत. `प्रगाढ` ही कथा किरणशास्त्रावर अाधारित असून, त्यातील शास्त्रज्ञ सुडापाेटी विघातक प्रयाेग करताे अाणि समाजापुढे प्रश्न निर्माण करताे. `प्रगल्भ` ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदूचा दर्जा मिळवून देतात, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना त्याची दखल घेते. शिवाय मानवसुद्धा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकताे. हे `अविष्का` या कथेतून प्रकर्षाने जाणवते. `अंधारातील तीर` ही कथा मात्र शास्त्रज्ञाचा नकारात्मक दृष्टिकाेन निसर्गालाच कसे वेठीस धरू शकताे, याची जाणीव करून देते. अशा वेगवेगळ्या कथालेखकाने कुतुहलता वाढवणाऱ्या लिहिलेल्या अाहेत. लेखक हे ग्रामीण भागातून अाणि सामान्यस्तरातून असल्यामुळे त्यांच्या कथालेखनात या जनजीवनाचे स्वाभाविक प्रतिबिंब पडले अाहे. त्यांच्या कथेचा परिसर, कथेतील वातावरण, कथेतील व्यक्तिरेखा चारचाैघांसारख्याच वाटतात. कथेतील व्यक्तिरेखा जिज्ञासू अाणि हुशार असल्या तरी त्यांची पाळंमुळं ही सामान्य वाचकाला अापल्याजवळची वाटतात. कथेची मांडणी करताना बऱ्याचदा, तिचा पाया हा सामान्य माणसाच्या जीवनातील घटनांवर अाधारित असल्याचे दिसते. त्यामुळे कथेतील घटना त्याचा विकास हा सामान्य माणसाला परिचयाचा वाटताे. वास्तव अाणि कल्पना याचे अद‌्भुत मिश्रण या कथेमध्ये अाढळते. खरेतर विज्ञानकथा लिहिणे ही जाेखीम अाहे. विज्ञान लेखकाला त्यासाठी कसरत करावी लागते. म्हणजे कथेत विज्ञान किती असावे याचे भान लेखकाला असावे लागते. ते येथे दिसून येते. यातील कथानायक अांतरराष्ट्रीय स्तरावर वावरतात. सेमिनारमध्ये अापले संशाेधन सादर करतात. या कथासंग्रहातील कथा वाचकाला खिळवून ठेवतात. विषयाचे वैविध्य, उत्कंठावर्धक प्रसंग अाणि लेखकाचे उत्तम सामाजिक भान यातून दिसून येते. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 3-1-2016

    अंतराळा शास्त्रासोबत किरण, भौतिकशास्त्र, अणूशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पती शास्त्रासारखे विषय या कथांमध्ये हाताळले आहेत. ‘प्रतिशोध’ ही कथा एका थरारक अनुभवातून भविष्यात बिकट होणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न सोडविणारी आहे. तर ‘अंतराळातील मृत्यू’, प्रतघटना, अद्भुत प्रवास या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रतिपृथ्वीचा आणि समांतर विश्वाच्या शोधाच्या कथा आहेत. प्रगाढ ही कथा किरणशास्त्रावर आधारित असून त्यातील शास्त्रज्ञ सुडापोटी विघातक प्रयोग करतो आणि समाजापुढे प्रश्न निर्माण करतो. प्रगल्भ ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदुचा दर्जा मिळवून देताना, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना, याची दखल घेते. शिवाय मानवसुद्धा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकतो. हे अविष्कार या कथेत प्रकर्षाने जाणवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more