* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989144
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.SANJAY DHOLE COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR.SANJAY DHOLE, WITH HIS MINDBLOWING SCIENTIFIC STORIES , HAVE BEEN SUCCESSFUL IN MAKING THE SECTION OF MARATHI STORIES MORE WIDE AND PROMINENT. THE STORIES IN THIS BOOK ARE TOTALLY BASED ON SCIENCE AND THE AUTHOR HAS HONESTLY TRIED TO CONVEY THE IMPORTANCE OF MODERN SCIENCE TO EVERYONE OUT THERE.ALONG WITH THE SPACE SCIENCE, RAYS, PHYSICS, NUCLEAR SCIENCE,”PADARTHA VIDNYAN” BOTANY ARE THE SUBJECTS INCLUDED IN THIS STORIES. “PRATISHODH” A BREATHTAKING STORY DESCRIBES THE HORRIFYING CIRCUMSTANCES OF ENERGY CONSUMPTION AND SAVING IN THE NEAR FUTURE. “ANTARALATIL MRUTYU” , “PRATIGHATNA” , “ADBHUT PRAWAS” ARE THE STORIES OF FINDING THE SISTER OF EARTH AND ANALYZING LIFE THERE. “PRAGALBHA” DESCRIBES HOW THE EMOTIONAL SIDE OF A MAN PUTS A HUMAN BRAIN FUNCTIONING IN A ROBOT AND ANALYZES THE TRUTH, ARE THE SCIENTESTS PROVING TO BE A CURSE TO HUMAN KIND ?? BESIDES, EVEN A HUMAN BEING COULD PROVE TO BE A POWERFUL WEAPON , DESCRIBES “AAWISHKAR”. NEGATIVE APPROACH OF A SCIENTIST CAN PROVE FAR MORE HAZARADOUS TO NATURE, NARRATES “ANDHARATIL TIR”
अंतराळ शास्त्रासोबत किरण, भौतिकशास्त्र, अणुशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पती शास्त्रांसारखे विषय या कथांमध्ये हाताळले आहेत. ‘प्रतिशोध’ ही कथा एका थरारक अनुभवातून भविष्यात बिकट होणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न सोडविणारी आहे. तर ‘अंतराळातील मृत्यू’, ‘प्रतिघटना’, ‘अद्भुत प्रवास’ ह्या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रति पृथ्वीचा व समांतर विश्वाच्या शोधाच्या कथा आहेत. ‘प्रगाढ’ ही कथा किरण शास्त्रावर आधारित असून त्यातील शास्त्रज्ञ सुडापोटी विघातक प्रयोग करतो आणि समाजापुढे प्रश्न निर्माण करतो. ‘प्रगल्भ’ ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदूचा दर्जा मिळून देताना, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना? याची दखल घेते. शिवाय मानवसुध्दा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकतो हे ‘आविष्कार’ या कथेत प्रकर्षाने जाणवते. ‘अंधारातील तीर’ ही कथा मात्र शास्त्रज्ञाचा नकारात्मक दृष्टिकोन निसर्गालाच कसे वेठीस धरू शकतो याची जाणीव करून देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANTARALATILMRUTYU #ANTARALATILMRUTYU #अंतराळातीलमृत्यू #SCIENCEFICTION #MARATHI #DR.SANJAYDHOLE #डॉ.संजय ढोले "
Customer Reviews
  • Rating StarTushar Kute

    पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. संजय ढोले यांचे मेहता पब्लिशिंग हाऊसने ५-६ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यातीलच `अंतराळातील मृत्यू` हा एक होय. त्यांच्या डिंभक व अश्मजीव या दोन पुस्तकानंतर वाचलेला हा तिसरा कथासंग्रह होय. त्यांच्या प्त्येक पुस्तकात लेखक म्हणून त्यांची संशोधक वृत्ती सातत्याने जाणवते. प्रत्येक कथेत मुलविज्ञान अर्थात जीव, भौतिक व रासायन यांचा प्रामुख्याने प्रभाव असतो. विशेष म्हणजे त्या विज्ञान संकल्पनांनी ओतप्रोत भरलेल्या असतात. विज्ञान कशा प्रकारे काम करू शकते? या प्रश्नाचे उत्तर ते आपल्या कथांमधून देत राहतात. हे सर्व कल्पनाविलास असले तरी अशक्यतेचा पल्ला कदाचित गाठू शकणार नाही असेच आहेत. प्रयोग, संशोधन व शास्त्रज्ञ/प्राध्यापक हे त्यांच्या प्रत्येक कथेत येणारे शब्द. अर्थात त्याची प्रत्येक कथा ही एका प्रयोगात सारखीच असते. तिच्यात विज्ञानाच्या मूल गाभ्याचा प्रकर्षाने समावेश असतो. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्या पेक्षा वेगळ्या कथा डॉ. ढोले लिहितात. हे मला प्रामुख्याने सांगावेसे वाटते. त्यांच्या सर्वच कथासंग्रहांमध्ये त्यांची शैली व विज्ञान हे समान धागे आहेत. त्यामुळे मुल विज्ञानाची आवड असणाऱ्यांनी त्यांचे कथासंग्रह निश्चितच वाचावेत. http://www.tusharkute ...Read more

  • Rating StarDainik Divya Marathi 13-1-17

    अंतराळशास्त्रासाेबत किरण, भाैतिकशास्त्र, अणूशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पतीशास्त्रासारखे विषय `अंतराळातील मृत्यू` या कथासंग्रहात डाॅ. संजय ढाेले यांनी अत्यंत राेमांचक पद्धतीने रेखाटल्या अाहेत. यातील प्रतिशाेध ही कथा एखाद्या थरारक अनुभवातून भविष्यत बिकट हाेणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न साेडविणारी अाहे. तर अंतराळातील मृत्यू, प्रतिघटना, अद‌्भुत प्रवास या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रतिपृथ्वीचा समांतर विश्वाच्या शाेधाच्या कथा अाहेत. `प्रगाढ` ही कथा किरणशास्त्रावर अाधारित असून, त्यातील शास्त्रज्ञ सुडापाेटी विघातक प्रयाेग करताे अाणि समाजापुढे प्रश्न निर्माण करताे. `प्रगल्भ` ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदूचा दर्जा मिळवून देतात, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना त्याची दखल घेते. शिवाय मानवसुद्धा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकताे. हे `अविष्का` या कथेतून प्रकर्षाने जाणवते. `अंधारातील तीर` ही कथा मात्र शास्त्रज्ञाचा नकारात्मक दृष्टिकाेन निसर्गालाच कसे वेठीस धरू शकताे, याची जाणीव करून देते. अशा वेगवेगळ्या कथालेखकाने कुतुहलता वाढवणाऱ्या लिहिलेल्या अाहेत. लेखक हे ग्रामीण भागातून अाणि सामान्यस्तरातून असल्यामुळे त्यांच्या कथालेखनात या जनजीवनाचे स्वाभाविक प्रतिबिंब पडले अाहे. त्यांच्या कथेचा परिसर, कथेतील वातावरण, कथेतील व्यक्तिरेखा चारचाैघांसारख्याच वाटतात. कथेतील व्यक्तिरेखा जिज्ञासू अाणि हुशार असल्या तरी त्यांची पाळंमुळं ही सामान्य वाचकाला अापल्याजवळची वाटतात. कथेची मांडणी करताना बऱ्याचदा, तिचा पाया हा सामान्य माणसाच्या जीवनातील घटनांवर अाधारित असल्याचे दिसते. त्यामुळे कथेतील घटना त्याचा विकास हा सामान्य माणसाला परिचयाचा वाटताे. वास्तव अाणि कल्पना याचे अद‌्भुत मिश्रण या कथेमध्ये अाढळते. खरेतर विज्ञानकथा लिहिणे ही जाेखीम अाहे. विज्ञान लेखकाला त्यासाठी कसरत करावी लागते. म्हणजे कथेत विज्ञान किती असावे याचे भान लेखकाला असावे लागते. ते येथे दिसून येते. यातील कथानायक अांतरराष्ट्रीय स्तरावर वावरतात. सेमिनारमध्ये अापले संशाेधन सादर करतात. या कथासंग्रहातील कथा वाचकाला खिळवून ठेवतात. विषयाचे वैविध्य, उत्कंठावर्धक प्रसंग अाणि लेखकाचे उत्तम सामाजिक भान यातून दिसून येते. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 3-1-2016

    अंतराळा शास्त्रासोबत किरण, भौतिकशास्त्र, अणूशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पती शास्त्रासारखे विषय या कथांमध्ये हाताळले आहेत. ‘प्रतिशोध’ ही कथा एका थरारक अनुभवातून भविष्यात बिकट होणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न सोडविणारी आहे. तर ‘अंतराळातील मृत्यू’, प्रतघटना, अद्भुत प्रवास या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रतिपृथ्वीचा आणि समांतर विश्वाच्या शोधाच्या कथा आहेत. प्रगाढ ही कथा किरणशास्त्रावर आधारित असून त्यातील शास्त्रज्ञ सुडापोटी विघातक प्रयोग करतो आणि समाजापुढे प्रश्न निर्माण करतो. प्रगल्भ ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदुचा दर्जा मिळवून देताना, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना, याची दखल घेते. शिवाय मानवसुद्धा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकतो. हे अविष्कार या कथेत प्रकर्षाने जाणवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more