* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665314
  • Edition : 3
  • Publishing Year : MARCH 2005
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GYANBA IS A BRILLIANT BOY WHO CANNOT SUPPRESS HIS INNATE CURIOSITY. THE QUESTIONS HE ASKS WHILE LOOKING AT HIS SURROUNDINGS ARE REALLY THOUGHT PROVOKING. BUT SOME PEOPLE LABEL HIM RUDE OR INSOLENT FOR NOT BEING ABLE TO ANSWER HIS QUESTIONS OR NOT BEING PREPARED TO THINK ABOUT THEM. EVEN THOUGH HIS QUESTIONS SEEMED TO BE LOPSIDED, ONLY DADASAHEB PANDIT, WHO HAD JUST ARRIVED IN THE VILLAGE, REALIZED THAT THERE WAS SOME LOGIC BEHIND THEM. HE WAS TRYING TO FIND ANSWERS TO HIS QUESTIONS WITH HIM. HE ALSO URGED HIM TO DO SOME EXPERIMENTS. BECAUSE OF THIS, GYANBA, WHO WAS CONSIDERED CRAZY OR STUPID BY OTHERS, BEGAN TO ACQUIRE KNOWLEDGE IN A DIFFERENT WAY. THE STORIES OF HIS KNOWLEDGE QUEST WILL ANSWER MANY OF OUR QUESTIONS TOO.
ग्यानबा हा एक आपलं उपजत कुतूहल दाबू न शकणारा तल्लख बुद्धीचा मुलगा. आपला परिसर न्याहाळत न्याहाळत त्याला पडणारे प्रश्‍न खरं तर कोणालाही विचार करायला लावणारेच. पण त्याच प्रश्‍नांची उत्तरं न देता आल्यामुळे किंवा त्यासाठी विचार करण्याची तयारी नसल्यामुळे त्या प्रश्‍नांना अंटसंट मानून त्याला खुळचट किंवा उद्धट ठरवण्याचीच घाई जो तो करत असे. त्याचे सवाल वरवर तिरपागडे वाटले तरी त्यापाठी खरोखरच काही तर्कसंगती आहे हे ओळखलं होतं ते फक्त गावात नव्यानंच आलेल्या दादासाहेब पंडितांनी. तेच त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं शोधून काढण्याचा प्रयत्न त्याच्यासोबतच करत. त्यापायी त्याला काही प्रयोग करायलाही उद्युक्त करत. त्यामुळेच इतरांना वेडपट किंवा मूर्ख वाटणारा ग्यानबा वेगळ्याच प्रकारे ज्ञान आत्मसात करायला लागला होता. त्याच्या आगळ्यावेगळ्या ज्ञानसाधनेच्या या कहाण्या आपल्याही अनेक प्रश्‍नांची उत्तरं देतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#GYANBACHA VIDNYAN# DR. BAL PHONDAKE#डॉ. बाळ फोंडके# ग्यानबाचं विज्ञान# उंटाची पावलं # कोसळणारी वीज # थंड माथा # वर जाणारी आग # समूळ नायनाट # गोफ दुहेरी # इंद्रधनुष्याचा पाठलाग # झोपेचे प्रकार # काळे आणि पांढरे # उकिरड्यावरची दुर्गंधी # नको असलेले पाहुणे # ...म्येंढरं बरी! # म्हातारं केळं! # अश्रूंची किमत # न रडवणारा कांदा # चिंब पावसात! # पावसाचा थेंब # पावसाचा वास # आँक छी! # अंगदेशची लढाई # तापाची मदत # केसांची वाढ # जागते रहो–! # काल रातीला... # झणझणीत # तिखटजाळ # लोखंडाचे रंग # उलटी सुलटी # पक्ष्यांची झोप # झाडांचं पाणी # एका कोळियाने # पंख्यांची पाती # इस्त्रीची जादू # घड्याळाचे काटे # नदीकाठचा प्रकार # पोटातले कावळे # कपड्यांचा सुवास # बोटांमधले बुडबुडे # जांभयांची साथ# वाघाची मावशी "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.