* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WILL THE IRON FENCE SAVE A TREE HOLLOWED BY TERMITES?
  • Availability : Available
  • Translators : CAPT. RAJA LIMAYE
  • ISBN : 9788184981780
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 576
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-9 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WITH A WEALTH OF EVIDENCE, ARUN SHOURIE SPELLS OUT IMPERATIVES FOR DEFENCE BEYOND THE MILITARY.A MUST FOR OUR TIMES.
चीन, पाकिस्तान आणि बांगला देश, या शेजारी देशांकडून भारताला दिली जाणारी आव्हाने – विशेषत: लष्करी; हा या पुस्तकाचा गाभा आहे. पाकिस्तानमध्ये धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या दहशतवादाचा उलगडा करून घेताना, तेथे शालेय शिक्षणामध्ये सुरूवातीपासूनच द्वेषमूलक विचार कसे भिनवले जातात याच्या तपशिलाकडे गांभीर्याने पाहायला हवे. चीन स्वत:ची प्रगती साधताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणाच्या काय, कोणत्या आणि कशा खेळी करतो, चीनची व्यूहरचना कशी असते याचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे. या मोठ्या सत्ता फक्त आपला स्वार्थ कसा पाहतात हे जाणणेही महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय घटनांकडे पाहत असताना भारतीय नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे काश्मीरसारखे प्रश्न तर उद्भवलेच; पण याशिवाय पंजाबमधील दहशतवाद, लाखो बांगला देशींचा बेकायदा प्रवेश, बिहारमधील कोलमडलेले प्रशासन, नक्षलवाद अशा समस्या उभ्या राहतात; हे सप्रमाण सिद्ध करायचा यात प्रयत्न आहे. सजगपणे अभ्यास करून, सर्व अडचणींचे भान ठेवून, कालस्थान परत्वे आपल्या व्यवहारात बदल करून, लष्करीदृष्ट्या स्वत:ला सुसज्ज करून, सक्षम राष्ट्रीय शक्ती निर्माण करणे हा यावरील उपाय आहे. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्याबद्दल जिव्हाळा असणाया अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# GOVERNANCE #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR #MAGILPANAVARUNMAGECH #KALELKATYALAAAICHEMAN #ARUNSHOURIE #THEPARLIMENTARY SYSTEM #TRANSLATEDBOOK #ASHOKPATHARKAR #GOVERNENCE #VALVIGRASTAVRUKSHALAKATERIKUMPANVACHAVUSHAKELKA? #KALELKATYALAAAICHMAN #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR?
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वुईल द आयर्न सेव्ह ए ट्री हॉलोड बाय टर्माइटस्? हे अरूण शौरी यांचे पुस्तक २००५ मध्ये प्रकाशित झाले. त्याचा मराठी अनुवाद ‘वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का?’ या नावाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. या मराठी आवृत्तीसाठी दोन प्रकरे अरूण शौरी यांनी नव्याने लिहिली आहेत. चीन आणि नक्षलवाद यांच्या संदर्भात ती आहेत. अरूण शौरी यांनी दिलेल्या दोन व्याख्यानांमधून हे पुस्तक तयार झाले. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा स्मृतिव्याख्यान म्हणून झाले. करिअप्पा हे १९४७-१९४८ मध्ये वेस्टर्न एरिया कमांडर होते. पाकिस्तानच्या आक्रमकांना काश्मीर खोऱ्यातून पिटाळून लावून संपूर्ण काश्मीर जिंकून घेण्याआधीच त्यावेळी पंतप्रधान नेहरूंनी भारतीय लष्कराला थांबवले आणि आझाद काश्मीरचे लोढणे गळ्यात अडकवून घेतले, पुढे युनोकडे जाऊन सार्वमताची अट मान्य करून कायमची भावी कटकट मागे लावून घेतली याचे शल्य करिअप्पांना सतत जाणवत राहिले. १९५६ मध्ये कच्छवरील आक्रमण परतवून पाकचा जिंकलेला भाग परत करणे आणि काश्मीरबाबत कोणताही दबाव न आणता १९७१ च्या बांगला देश युद्धानंतर ९३हजार पाक युद्धबंद्यांना सोडून देणे तसेच जिंकलेला भूभाग परत करणे या राजकीय कृतीही करिअप्पांना व्यथित करणाऱ्या ठरल्या होत्या. त्यांच्या नावाच्या व्याख्यानमालेत बोलताना या सर्व पूर्वसृतींना उजाळा मिळणे स्वाभाविक होते. २००४ मध्ये आर्मर्ड कॉर्पसने त्यांना कॅव्हलरी स्मृती व्याख्यानासाठी पाचारण केले. आर्मर्ड कॉर्पस म्हणजे रणगाडा पथक. १९६५ च्या युद्धात भारतीय रणगाड्यांनी खेमकरण भागात पाकच्या पॅटन रणगाड्यांचा धुव्वा उडवला. त्यावेळी जनरल जे. एन. चौधरी हे लष्करप्रमुख होते. भारत स्वतंत्र झाल्यावर रणगाडा दलाचे पहिले भारतीय प्रमुख म्हणून त्यांनीच सुत्रे हाती घेतली होती. या व्याख्यानात चीनच्या जागतिक डावपेचाचे आणि महत्त्वाकांक्षेचे स्वरूप स्पष्ट करून भारत-चीन संबंधाचे भवितव्य कसे राहिल, कसे असावे याचा ऊहापोह केला होता. चीनची वृद्धिंगत होत चाललेली आर्थिक क्षमता लष्करी क्षमतेत रूपांतरित होणारा का? चीन आणि भारत आर्थिक क्षमतेतील रूपांतरित होणारा का? चीन आणि भारत आर्थिक क्षमतेतील अंतर या दोघांच्या लष्करी क्षमतेतील तफावत वाढणार का?’ असा प्रश्न शौरी विचारतात. या संभाव्य तफावतीकडे दुर्लक्ष वा डोळेझाक करणाऱ्या आपल्या राज्यकत्र्यांच्या वृत्तीमुळे भारताला हानी पोचणार नाही, अशी संरक्षणव्यवस्था आणि शासनपद्धती निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करून अशी शासनप्रणाली मिळेपर्यंत आपल्या देशाला खऱ्या अर्थाने सुरक्षितता वा शांतता लाभणार नाही असा नि:संदिग्ध इशारा अरून शौरी गंभीरपणे देतात. शौरी यांनी पहिल्या प्रकरणामध्ये भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील प्रगतीची रूपरेखा दिली आहे. अण्वस्त्रांचा विकास, अणुचाचण्यांचे यश, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती, कारगिलमधील विजय, सोव्हिएट युनियनच्या पतनानंतर भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात केलेला वास्तववादी यशस्वी बदल, आपल्या संरक्षणव्यवस्थेची क्षमता वाढवण्यासाठी फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, व इस्त्राएल या देशांशी केलेला कर, शस्त्रास्त्रे आणि युद्धसाहित्य निर्मितीत घातलेली भर, औद्योगिक क्षेत्रात मारलेली मुसंडी, भारतीय लष्करी कारवाईबाबत असणारी पाकपेक्षा अधिक सक्षम सिद्धता, काश्मीरमध्ये निवडुका स्वतंत्र आणि खुल्या वातावरणात घेण्याची दाखवलेली हिंमत आणि दहशतवादी शक्तींवर केलेली मात, ती सीमित असली तरी जनतेचे मनोधैर्य उंचावणारी नक्कीच होती वगैरे मुद्दे समर्थनासाठी पुढे केले आहेत. कोणत्याही देशाची संरक्षण यंत्रणा ही एखाद्या वृक्षाभोवती असलेल्या पोलादी कुंपणासारखी असते. ते पोलादी कुंपण कितीही मजबूत आणि चकचकीत असले तरी ते वाळवीने आतून पोखरलेल्या झाडाला वाचवू शकत नाही.एखादे वादळ त्या पोखरलेल्या झाडाला सहज पाडू शकेल. हे शौरी यांचे विधान या पुस्तकाच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण करणार आहे. दहशतवादी गटांचे संघटन खूप विरळ असते. काही दहशतवादी मारले गेले तरी त्यांचा गट संपत नाही. दहशतवाद्यांचे पायाभूत शस्त्र म्हणजे त्यांचे तंत्रज्ञान उदा. मदरसे, धार्मिक संस्था. या पार्श्वभूमीवर आपला खरा शत्रू कोण हे जाणून घ्यायला हवे. अरूण शौरी पाकिस्तानने भारताच्या परराष्ट्र धोरणाला आणि संरक्षण धोरणाला जखडून ठेवले आहे. दहशतवादी गटांना भारतात पाठवून येथील जनजीवन असुरक्षित आणि भयग्रस्त करून ठेवले आहे. १९८८ मध्ये बांगला देशाचे अध्यक्ष ईर्शाद यांनी इस्लाम हा राज्याचा धर्म असे जाहीर केले. बांगला देशातील मूलतत्त्ववाद्यांचा प्रभाव वाढतो आहे. पाकिस्तानी मूलतत्त्ववाद्यांचा तेथील वावर वाढतो आहे. पूर्वेकडील इस्लामीकरण या प्रकरणात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात लक्षावधी बांगलादेशी घुसलेले आहेत आणि भारतात घातपाती कृत्यांसाठी प्रशिक्षित बांगलादेशीय गट भारतात येत आहेत असे स्पष्ट करून अरूण शौरी आपल्या राज्यकर्त्यांचा व प्रशासनाचा गाफीलपणा आत्मघातकी ठरेल असा धोक्याचा इशारा देत आहेत.असाच चीनच्या संदर्भातील असणारा धोकाही शौरी दाखवून देतात. देशांतर्गत दहशतवादी गट म्हणून नक्षलवादी आंदोलनाची दखलही शौरी घेतात. ढासळत्या प्रशासन यंत्रणेचे दोष उघड करतात. त्यांचा इशारा स्पष्ट आहे. भारतीय राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा या प्रश्नाचे गांभीर्य वाढवत असेल तर जागरूक जनता निमूट बसणार का? त्या जनतेसाठीही शौरी काही मार्गदर्शक सुत्रे सांगतात. त्यासाठी प्रत्येक जबाबदार व्यक्तीने या पुस्तकाचे अध्ययन-अनुसरण करायला हवे. -अरुण शौरी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more