* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WILL THE IRON FENCE SAVE A TREE HOLLOWED BY TERMITES?
  • Availability : Available
  • Translators : CAPT. RAJA LIMAYE
  • ISBN : 9788184981780
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 576
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WITH A WEALTH OF EVIDENCE, ARUN SHOURIE SPELLS OUT IMPERATIVES FOR DEFENCE BEYOND THE MILITARY.A MUST FOR OUR TIMES.
चीन, पाकिस्तान आणि बांगला देश, या शेजारी देशांकडून भारताला दिली जाणारी आव्हाने – विशेषत: लष्करी; हा या पुस्तकाचा गाभा आहे. पाकिस्तानमध्ये धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या दहशतवादाचा उलगडा करून घेताना, तेथे शालेय शिक्षणामध्ये सुरूवातीपासूनच द्वेषमूलक विचार कसे भिनवले जातात याच्या तपशिलाकडे गांभीर्याने पाहायला हवे. चीन स्वत:ची प्रगती साधताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणाच्या काय, कोणत्या आणि कशा खेळी करतो, चीनची व्यूहरचना कशी असते याचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे. या मोठ्या सत्ता फक्त आपला स्वार्थ कसा पाहतात हे जाणणेही महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय घटनांकडे पाहत असताना भारतीय नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे काश्मीरसारखे प्रश्न तर उद्भवलेच; पण याशिवाय पंजाबमधील दहशतवाद, लाखो बांगला देशींचा बेकायदा प्रवेश, बिहारमधील कोलमडलेले प्रशासन, नक्षलवाद अशा समस्या उभ्या राहतात; हे सप्रमाण सिद्ध करायचा यात प्रयत्न आहे. सजगपणे अभ्यास करून, सर्व अडचणींचे भान ठेवून, कालस्थान परत्वे आपल्या व्यवहारात बदल करून, लष्करीदृष्ट्या स्वत:ला सुसज्ज करून, सक्षम राष्ट्रीय शक्ती निर्माण करणे हा यावरील उपाय आहे. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्याबद्दल जिव्हाळा असणाया अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# GOVERNANCE #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR #MAGILPANAVARUNMAGECH #KALELKATYALAAAICHEMAN #ARUNSHOURIE #THEPARLIMENTARY SYSTEM #TRANSLATEDBOOK #ASHOKPATHARKAR #GOVERNENCE #VALVIGRASTAVRUKSHALAKATERIKUMPANVACHAVUSHAKELKA? #KALELKATYALAAAICHMAN #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR?
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वुईल द आयर्न सेव्ह ए ट्री हॉलोड बाय टर्माइटस्? हे अरूण शौरी यांचे पुस्तक २००५ मध्ये प्रकाशित झाले. त्याचा मराठी अनुवाद ‘वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का?’ या नावाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. या मराठी आवृत्तीसाठी दोन प्रकरे अरूण शौरी यांनी नव्याने लिहिली आहेत. चीन आणि नक्षलवाद यांच्या संदर्भात ती आहेत. अरूण शौरी यांनी दिलेल्या दोन व्याख्यानांमधून हे पुस्तक तयार झाले. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा स्मृतिव्याख्यान म्हणून झाले. करिअप्पा हे १९४७-१९४८ मध्ये वेस्टर्न एरिया कमांडर होते. पाकिस्तानच्या आक्रमकांना काश्मीर खोऱ्यातून पिटाळून लावून संपूर्ण काश्मीर जिंकून घेण्याआधीच त्यावेळी पंतप्रधान नेहरूंनी भारतीय लष्कराला थांबवले आणि आझाद काश्मीरचे लोढणे गळ्यात अडकवून घेतले, पुढे युनोकडे जाऊन सार्वमताची अट मान्य करून कायमची भावी कटकट मागे लावून घेतली याचे शल्य करिअप्पांना सतत जाणवत राहिले. १९५६ मध्ये कच्छवरील आक्रमण परतवून पाकचा जिंकलेला भाग परत करणे आणि काश्मीरबाबत कोणताही दबाव न आणता १९७१ च्या बांगला देश युद्धानंतर ९३हजार पाक युद्धबंद्यांना सोडून देणे तसेच जिंकलेला भूभाग परत करणे या राजकीय कृतीही करिअप्पांना व्यथित करणाऱ्या ठरल्या होत्या. त्यांच्या नावाच्या व्याख्यानमालेत बोलताना या सर्व पूर्वसृतींना उजाळा मिळणे स्वाभाविक होते. २००४ मध्ये आर्मर्ड कॉर्पसने त्यांना कॅव्हलरी स्मृती व्याख्यानासाठी पाचारण केले. आर्मर्ड कॉर्पस म्हणजे रणगाडा पथक. १९६५ च्या युद्धात भारतीय रणगाड्यांनी खेमकरण भागात पाकच्या पॅटन रणगाड्यांचा धुव्वा उडवला. त्यावेळी जनरल जे. एन. चौधरी हे लष्करप्रमुख होते. भारत स्वतंत्र झाल्यावर रणगाडा दलाचे पहिले भारतीय प्रमुख म्हणून त्यांनीच सुत्रे हाती घेतली होती. या व्याख्यानात चीनच्या जागतिक डावपेचाचे आणि महत्त्वाकांक्षेचे स्वरूप स्पष्ट करून भारत-चीन संबंधाचे भवितव्य कसे राहिल, कसे असावे याचा ऊहापोह केला होता. चीनची वृद्धिंगत होत चाललेली आर्थिक क्षमता लष्करी क्षमतेत रूपांतरित होणारा का? चीन आणि भारत आर्थिक क्षमतेतील रूपांतरित होणारा का? चीन आणि भारत आर्थिक क्षमतेतील अंतर या दोघांच्या लष्करी क्षमतेतील तफावत वाढणार का?’ असा प्रश्न शौरी विचारतात. या संभाव्य तफावतीकडे दुर्लक्ष वा डोळेझाक करणाऱ्या आपल्या राज्यकत्र्यांच्या वृत्तीमुळे भारताला हानी पोचणार नाही, अशी संरक्षणव्यवस्था आणि शासनपद्धती निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करून अशी शासनप्रणाली मिळेपर्यंत आपल्या देशाला खऱ्या अर्थाने सुरक्षितता वा शांतता लाभणार नाही असा नि:संदिग्ध इशारा अरून शौरी गंभीरपणे देतात. शौरी यांनी पहिल्या प्रकरणामध्ये भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील प्रगतीची रूपरेखा दिली आहे. अण्वस्त्रांचा विकास, अणुचाचण्यांचे यश, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती, कारगिलमधील विजय, सोव्हिएट युनियनच्या पतनानंतर भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात केलेला वास्तववादी यशस्वी बदल, आपल्या संरक्षणव्यवस्थेची क्षमता वाढवण्यासाठी फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, व इस्त्राएल या देशांशी केलेला कर, शस्त्रास्त्रे आणि युद्धसाहित्य निर्मितीत घातलेली भर, औद्योगिक क्षेत्रात मारलेली मुसंडी, भारतीय लष्करी कारवाईबाबत असणारी पाकपेक्षा अधिक सक्षम सिद्धता, काश्मीरमध्ये निवडुका स्वतंत्र आणि खुल्या वातावरणात घेण्याची दाखवलेली हिंमत आणि दहशतवादी शक्तींवर केलेली मात, ती सीमित असली तरी जनतेचे मनोधैर्य उंचावणारी नक्कीच होती वगैरे मुद्दे समर्थनासाठी पुढे केले आहेत. कोणत्याही देशाची संरक्षण यंत्रणा ही एखाद्या वृक्षाभोवती असलेल्या पोलादी कुंपणासारखी असते. ते पोलादी कुंपण कितीही मजबूत आणि चकचकीत असले तरी ते वाळवीने आतून पोखरलेल्या झाडाला वाचवू शकत नाही.एखादे वादळ त्या पोखरलेल्या झाडाला सहज पाडू शकेल. हे शौरी यांचे विधान या पुस्तकाच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण करणार आहे. दहशतवादी गटांचे संघटन खूप विरळ असते. काही दहशतवादी मारले गेले तरी त्यांचा गट संपत नाही. दहशतवाद्यांचे पायाभूत शस्त्र म्हणजे त्यांचे तंत्रज्ञान उदा. मदरसे, धार्मिक संस्था. या पार्श्वभूमीवर आपला खरा शत्रू कोण हे जाणून घ्यायला हवे. अरूण शौरी पाकिस्तानने भारताच्या परराष्ट्र धोरणाला आणि संरक्षण धोरणाला जखडून ठेवले आहे. दहशतवादी गटांना भारतात पाठवून येथील जनजीवन असुरक्षित आणि भयग्रस्त करून ठेवले आहे. १९८८ मध्ये बांगला देशाचे अध्यक्ष ईर्शाद यांनी इस्लाम हा राज्याचा धर्म असे जाहीर केले. बांगला देशातील मूलतत्त्ववाद्यांचा प्रभाव वाढतो आहे. पाकिस्तानी मूलतत्त्ववाद्यांचा तेथील वावर वाढतो आहे. पूर्वेकडील इस्लामीकरण या प्रकरणात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात लक्षावधी बांगलादेशी घुसलेले आहेत आणि भारतात घातपाती कृत्यांसाठी प्रशिक्षित बांगलादेशीय गट भारतात येत आहेत असे स्पष्ट करून अरूण शौरी आपल्या राज्यकर्त्यांचा व प्रशासनाचा गाफीलपणा आत्मघातकी ठरेल असा धोक्याचा इशारा देत आहेत.असाच चीनच्या संदर्भातील असणारा धोकाही शौरी दाखवून देतात. देशांतर्गत दहशतवादी गट म्हणून नक्षलवादी आंदोलनाची दखलही शौरी घेतात. ढासळत्या प्रशासन यंत्रणेचे दोष उघड करतात. त्यांचा इशारा स्पष्ट आहे. भारतीय राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा या प्रश्नाचे गांभीर्य वाढवत असेल तर जागरूक जनता निमूट बसणार का? त्या जनतेसाठीही शौरी काही मार्गदर्शक सुत्रे सांगतात. त्यासाठी प्रत्येक जबाबदार व्यक्तीने या पुस्तकाचे अध्ययन-अनुसरण करायला हवे. -अरुण शौरी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more