ASHOK PADHYE

About Author

Birth Date : 23/10/1938


NA

अशोक पाध्ये गेली चाळीस वर्षे लेखन व अनुवाद करीत होते. त्यांनी भूशास्त्रात एम. एस्सी. पदवी संपादित केली होती. विविध औद्योगिक संस्थांमध्ये जबाबदारीची पदे भूषविली. तसेच सल्लागार म्हणून काम केले. ते पुणे विद्यापीठाच्या सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉॅलॉजी पार्क या विभागाचे संचालक होते. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून आणि मासिकांमधून त्यांनी लेखन केले होते. इंग्रजी साहित्याचा अत्यंत सरस अनुवाद करणारे अनुवादक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले असून त्यांनी अनुवादित केलेले बी. जी. देशमुख लिखित आत्मचरित्र व जसवंत सिंग यांचे ए कॉल टू ऑनर हे राजकीय आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत. क्लिष्ट विषय सोप्या आणि रंजक शैलीत मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे अनुवंशशास्त्रावरील डीएनएचे गोल गोल जिने हे पुस्तक लोकप्रिय आहे. त्यांनी लिहिलेले अनेक लेख गाजले असून विज्ञान-पत्रकार, ग्लायडर वैमानिक व काचतज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते. विमानविद्या, सिनेमॅटोग्राफी व रशियन भाषा यांचे ते उत्तम जाणकार होते.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 22 total
A CALL TO HONOUR Rating Star
Add To Cart INR 450
BEAR ISLAND Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book
DECEPTION POINT Rating Star
Add To Cart INR 520
TBC Classic Book
DIGITAL FORTRESS Rating Star
Add To Cart INR 750
TBC Classic Book
DONGRI TE DUBAI Rating Star
Add To Cart INR 495
FEAR IS THE KEY Rating Star
Add To Cart INR 200
TBC Classic Book
INFERNO Rating Star
Add To Cart INR 600
TBC Classic Book
JINNAH : INDIA– PARTITION–INDEPENDENCE Rating Star
Add To Cart INR 500
MAGIL PANAWARUN....MAGECH Rating Star
Add To Cart INR 450
PARMESHWAR EK SANKETIK NAV Rating Star
Add To Cart INR 250
PUNE TE PANTAPRADHANANCHE KARYALAYA Rating Star
Add To Cart INR 400
SEAWITCH Rating Star
Add To Cart INR 240
TBC Classic Book
12

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more