ARUN SHOURIE

About Author

Birth Date : 02/11/1941


SCHOLAR, AUTHOR, FORMER EDITOR AND MINISTER, ARUN SHOURIE IS ONE OF THE MOST PROMINENT VOICES IN OUR COUNTRYS PUBLIC LIFE AND DISCOURSE. HE HAS WRITTEN OVER TWENTY-FIVE BESTSELLING BOOKS.

जालंधर येथे सुप्रतिष्ठीत शौरी कुटुंबात जन्मलेले अरुण शौरी हे बुद्धीवादी पत्रकार, राजकारणी व लेखक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. १९६८ ते ७२ आणि १९७५ ते ७७ या काळात वर्ल्ड बँकेवर अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९९८ ते २००४ या कालावधीत प्लॅनिंग कमिशनचे सल्लागार, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून कार्यरत होते. तसेच केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सरकार दरबारी शिपायांपासून उच्चपदस्थांपर्यंत चालत असलेले भ्रष्टाचार, वॉटरगेट अशी प्रकरणं, इंडियन एक्सप्रेस मधल्या लेखमालांमधून उघडकीस आणल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिटयूटने ज्यांच्या कृतीमुळे स्वातंत्र्याचे रक्षण झाले अशा वर्ल्ड प्रेस फ्रीडम हिरोजपैकी एक म्हणून गौरवले आहे. बिझिनेस वीकने स्टार ऑफ एशिया म्हणून; दि इकॉनॉमिक टाइम्स ने खाजगीकरणावरील कामामुळे बिझिनेस लीडर ऑफ दि इयर म्हणून गौरवले आहे. भारतीय कंपन्यांच्या प्रमुखांनी श्री अटल बिहारी वाजपेयी सरकारमधील सर्वांत उल्लेखनीय मंत्री म्हणून गौरवले आहे. मॅगसेसे अवॉर्ड, दादाभाई नौरोजी अवॉर्ड, अ‍ॅस्टर अवॉर्ड, इंटरनॅशनल एडिटर ऑफ दि इअर, पद्मभूषण या व अशा अनेक सन्मानांनी विभूषित, अरुण शौरी हे भारतातील अतिशय प्रसिद्ध असे वर्तमान आणि राजकीय घडामोडींवरील भाष्यकार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी मंत्रिमंडळात त्यांनी दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान व निर्गुतवणूक अशी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. हे त्यांचे एकविसावे पुस्तक.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 12 of 12 total
38 %
OFF
ANITALA JAMIN MILTO Rating Star
Add To Cart INR 450 INR 279
24 %
OFF
ARUN SHOURIE COMBO SET-11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 5440 INR 4118
38 %
OFF
ATMAVANCHANA Rating Star
Add To Cart INR 450 INR 279
38 %
OFF
DON SANT Rating Star
Add To Cart INR 795 INR 493
38 %
OFF
GOVERNANCE Rating Star
Add To Cart INR 320 INR 198
38 %
OFF
HE SARV APALYALA KOTHE NENAR Rating Star
Add To Cart INR 650 INR 403
38 %
OFF
KALEL KA TYALA AAICHE MAN Rating Star
Add To Cart INR 390 INR 242
38 %
OFF
KHYATANAM ITIHASKAR Rating Star
Add To Cart INR 250 INR 155
38 %
OFF
MAGIL PANAWARUN....MAGECH Rating Star
Add To Cart INR 450 INR 279
38 %
OFF
THE COMMISSIONER FOR LOST CAUSES Rating Star
Add To Cart INR 895 INR 555
38 %
OFF
THE PARLIAMENTARY SYSTEM Rating Star
Add To Cart INR 295 INR 183
38 %
OFF
VALVIGRASTA VRUKSHALA POLADI KUMPAN ... Rating Star
Add To Cart INR 495 INR 307

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more