ARUN SHOURIE

About Author

Birth Date : 02/11/1941


SCHOLAR, AUTHOR, FORMER EDITOR AND MINISTER, ARUN SHOURIE IS ONE OF THE MOST PROMINENT VOICES IN OUR COUNTRYS PUBLIC LIFE AND DISCOURSE. HE HAS WRITTEN OVER TWENTY-FIVE BESTSELLING BOOKS.

जालंधर येथे सुप्रतिष्ठीत शौरी कुटुंबात जन्मलेले अरुण शौरी हे बुद्धीवादी पत्रकार, राजकारणी व लेखक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. १९६८ ते ७२ आणि १९७५ ते ७७ या काळात वर्ल्ड बँकेवर अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९९८ ते २००४ या कालावधीत प्लॅनिंग कमिशनचे सल्लागार, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून कार्यरत होते. तसेच केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सरकार दरबारी शिपायांपासून उच्चपदस्थांपर्यंत चालत असलेले भ्रष्टाचार, वॉटरगेट अशी प्रकरणं, इंडियन एक्सप्रेस मधल्या लेखमालांमधून उघडकीस आणल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिटयूटने ज्यांच्या कृतीमुळे स्वातंत्र्याचे रक्षण झाले अशा वर्ल्ड प्रेस फ्रीडम हिरोजपैकी एक म्हणून गौरवले आहे. बिझिनेस वीकने स्टार ऑफ एशिया म्हणून; दि इकॉनॉमिक टाइम्स ने खाजगीकरणावरील कामामुळे बिझिनेस लीडर ऑफ दि इयर म्हणून गौरवले आहे. भारतीय कंपन्यांच्या प्रमुखांनी श्री अटल बिहारी वाजपेयी सरकारमधील सर्वांत उल्लेखनीय मंत्री म्हणून गौरवले आहे. मॅगसेसे अवॉर्ड, दादाभाई नौरोजी अवॉर्ड, अ‍ॅस्टर अवॉर्ड, इंटरनॅशनल एडिटर ऑफ दि इअर, पद्मभूषण या व अशा अनेक सन्मानांनी विभूषित, अरुण शौरी हे भारतातील अतिशय प्रसिद्ध असे वर्तमान आणि राजकीय घडामोडींवरील भाष्यकार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी मंत्रिमंडळात त्यांनी दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान व निर्गुतवणूक अशी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. हे त्यांचे एकविसावे पुस्तक.
Sort by
Show per page
Items 1 to 10 of 10 total
ANITALA JAMIN MILTO Rating Star
Add To Cart INR 450
24 %
OFF
ARUN SHOURIE COMBO SET-9 BOOKS Rating Star
Add To Cart INR 3750 INR 2839
ATMAVANCHANA Rating Star
Add To Cart INR 450
GOVERNANCE Rating Star
Add To Cart INR 320
HE SARV APALYALA KOTHE NENAR Rating Star
Add To Cart INR 650
KALEL KA TYALA AAICHE MAN Rating Star
Add To Cart INR 390
KHYATANAM ITHIHASKAR Rating Star
Add To Cart INR 250
MAGIL PANAWARUN....MAGECH Rating Star
Add To Cart INR 450
THE PARLIAMENTARY SYSTEM Rating Star
Add To Cart INR 295
VALVIGRASTA VRUKSHALA POLADI KUMPAN ... Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more